19 August 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम



मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.

मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये 

1)औरंगाबाद

2)नांदेड 

3)परभणी 

4)बीड 

5)जालना 

6)लातूर 

7)उस्मानाबाद व 

8) हींगोली 

हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत

लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.


पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.


या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.


निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला. 

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.

15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.

 या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.

    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.


१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये



🎯भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे. 


🛑साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम पाच राज्य खालीलप्रमाणे सांगता येतील.

 1) केरळ (93.91%), 

 2) लक्षद्वीप (92.28%), 

 3) मिझोराम(91.58%),

 4) त्रिपुरा(87.75%), 

 5) गोवा(87.40%), 


🛑साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्ये


1) बिहार (63.82 टक्के )

2) तेलंगणा (66.5 टक्के )

3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के )

4) राजस्थान (67.06 टक्के )

5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)

6) झारखंड (67.63 टक्के)

7) जम्मू आणि कश्मीर (68.74 टक्के) 

8) उत्तर प्रदेश ( 69.72 टक्के )

9) मध्य प्रदेश (70.63 टक्के) 

10) छत्तीसगड (71.04 टक्के)

महाराष्ट्र - सामान्यज्ञान



★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. देवेंद्र फडणवीस
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : चेन्नमनेनी विद्यासागर राव
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१

मूलभूत अधिकार/हक्क



· भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे. 


· घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे. 


· म्हणून सध्या 6 अधिकार आहेत. 


1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18




2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22




3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24




4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28




5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30




6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार - कलम 32

Imp इन्फॉर्मशन.....


1) ✅️ कच्ची फळे पिकवण्यासाठी गॅस  - इथिलीन



2) ✅️ शक्तीचे एकक  - वॅट



3) ✅️ हवेचा दाब मोजण्यासाठी  - बॅरोमीटर



4) ✅️ संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना - मुंबई



5) ✅️ अभिनव भारत संघटना - स्वातंत्र्यवीर सावरकर



6) ✅️ उर्दू भाषेचा निर्माता  - अमीर खुसरो



7) ✅️ शेतकऱ्यांचा आसूड  - महात्मा फुले



8) ✅️ केसरी वर्तमानपत्र  - बाळ गंगाधर टिळक



9) ✅️ भोगावती नदीवरील धरण  - राधानगरी



10) ✅️ मनसर टेकड्या  - नागपूर



11) ✅️ तिस्ता नदीचा उगम  - पश्चिम बंगाल



12) ✅️ नर्मदा नदीचा उगम  - अमरकंटक



13) ✅️ मसूरी थंड हवेचे ठिकाण  - उत्तराखंड



14) ✅️ जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन   - भारत



15) ✅️ जीवन रेखा सिंचन प्रकल्प - जालना



16) ✅️ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान   - आसाम



17) ✅️ भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार  -  नवी दिल्ली



18) ✅️ जगातील सर्वात लांब नदी  - नाईल



19) ✅️ भारताचे मध्यवर्ती ठिकाण  - नागपूर



20) ✅️ इंटरपोलचे मुख्यालय  - फ्रान्स



21) ✅️ भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती  - 1843



22) ✅️ माहिती अधिकार कायदा  - 2005



23) ✅️ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय   - हेग



24) ✅️ इस्राईलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव   - मोझाद



25) ✅️ महाराष्ट्राचे निमलष्करी दल   - SRPF



26) ✅️ महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय   -  मुंबई



27) ✅️ महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने  - पानझडी



28) ✅️ भारतातील सर्वात मोठा दिवस - 21 जून



29) ✅️ अफगाणिस्तान देशाची राजधानी  - काबुल



30) ✅️ केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक   - गोपाळ गणेश आगरकर

माहितीचा अधिकार कायदा (RTI - Right to Information Act)

 माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला देश स्वीडन हा ठरला आहे.

 1766 मध्ये फ्रिडम ऑफ प्रेस अक्ट असा कायदा करून स्वीडने महितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य केला.

 स्वीडननंतर डेन्मार्क, फीनलँड व नॉर्वे या देशांनी माहितीच्या अधिकारचे कायदे केले.

 1966 साली अमेरिकेत 'फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्ट' स्वीकारण्यात आला.

 1966 मध्ये ब्रिटनने महितीचा अधिकार स्वीकारला....

 1982 च्या दरम्यान कॅनडा, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रकुलातील देशांनी माहितीच्या अधिकाराचा पुरस्कार केला.

 1990 पर्यंत जगातील 13 राष्ट्रांनी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता.

 १९९० नंतर भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता...

 28 डिसेंबर 2005 रोजी चीनने 'द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन ऑफ लॉ' असा कायदा लागू केला..

 जागतिक माहिती अधिकार सप्ताह 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत असतो.

 महाराष्ट्र माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर हा असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त केंद्र सरकारने माहितीचा अधिकार हा कायदा संपूर्ण भारतात 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू केला.

 माहितीचा अधिकार हा कायदा एकूण 31 कलमांचा आहे. या कायद्यातील कलम 12 नुसार, केंद्रीय माहिती आयोगाची रचना केली आहे.

 केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 साली करण्यात आली. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

 आयोगात 1 मुख्य माहिती आयुक्त असतो. तर जास्तीत जास्त इतर 10 माहिती आयुक्त असतात.

 केंद्रीय माहिती आयुक्तांचा दर्जा निवडणूक आयुक्तांसारखा असतो. यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत असतो.

 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना दरमहा 90000 इतके वेतन असते.

 भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह हे होते.

विभागीय आयुक्त



     राज्याने प्रशासन योग्यरीत्या चालविले जावे यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहेत. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद.

प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात. विभागीय आयुक्त हा सर्वात महत्वाचा प्रादेशिक अधिकारी असतो. तो आपल्या क्षेत्रात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. लॉर्ड विल्यम बेन्गटिंकने १८२९ मध्ये महसूल आयुक्त हे पद निर्माण केले. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीश यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले.

– राजस्थान सरकारने १९६१ ला आपल्या राज्यातून विभागीय आयुक्त हे पद रिक्त ( रद्द ) केले.

– उत्तरप्रदेशमध्ये विभागीय आयुक्तांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली.

पात्रता                       पदवीधर

निवडणूक                   UPSC मधून बढतीद्वारे

नेमणूक                      राज्य शासन

दर्जा                          IAS  चा असतो.

कार्यक्षेत्रे                     महसूल आणि प्रशासकीय विभाग

वेतन व भत्ते                 राज्य शासन

कार्यकाळ                    महसूल आणि प्रशासकीय विभाग

वेतन व भत्ते                  राज्य शासन

कार्यकाल                     ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

राजीनामा                     राज्य शासनाकडे

रजा                            राज्य शासन

बडतर्फी                       केंद्र शासनाद्वारे


विभागीय आयुक्तांचे अधिकार व कार्य 


१) विभागीय महसूल प्रशासकीय अधीकारी म्हणून भूमिका पार पाडणे.

२) आपल्या क्षेत्रातील शासनाच्या विविध विबीभागामध्ये काही वाद झाल्यास त्यांचे निराकरण करणे.

३) पंचायतिराजसंबंधित भूमिका पार पाडणे.

४) जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार

५) गावातील पडीक जमिनीचे मागासवर्गीयांमध्ये वाटप करणे.

६) जमीनदारी पद्धतीवर अंकुश ठेवणे.

७) पोलीस प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

८) विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

९) विभागातील विविध यंत्रणामधून माहिती, आकडेवारी, तक्ते, अहवाल मागविणे त्यांची तपासणी करणे व राज्य शासनास अहवाल देणे.

१०) शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणे.

११) विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.


नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती.


✅ भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.


✅ भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.


❇️ भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल.


❇️ अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.


❇️ सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.


❇️ जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)


❇️ इग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.


✅ आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.


❇️ गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. 


❇️ गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.

प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. 


❇️ गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. 


5⃣ परांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.


❇️ गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.


❇️ परधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


१) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32    2) अनुच्छेद 25    3) अनुच्छेद 14    4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1

२) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4

३) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
   2) मालमत्तेविषयक हक्क
   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क
   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- 2

४) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये
   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार
   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट
   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4

५) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा    2) विधान परिषद    3) उच्च न्यायालय    4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

   1) सर्व विधाने
   2) कोणतेही नाही
   3) फक्त अ 
   4) अ आणि ब

उत्तर :- 3

७) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

उत्तर :- 4

८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती
        व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.

   1) अ    
   2) ब  
   3) क   
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

९) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा    2) स्वातंत्र्याचा 
   3) धर्माचा    4) चौथ्या

उत्तर :- 1

१०) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार 
    2) संपत्तीचा अधिकार
   3) स्वातंत्र्याचा अधिकार  
   4) शैक्षणीक अधिकार

उत्तर :- 2

११) मूलभूत हक्कांसदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत.
   ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते.
   क) संसद त्यांवर मर्यादा घालू शकते.
   ड) ते समर्थनीय आहेत.

    1) अ 
    2) ब   
   3) क  
   4) ड

उत्तर :- 1

१२) भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील “धर्मस्वातंत्र्याचा हक्क” यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ?

   1) एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क

   2) एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क

   3) एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क

   4) सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क

उत्तर :- 4

१३) मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे  ?

   1) कायदेमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ
   3) राजकीय पक्ष 
   4) न्यायमंडळ

उत्तर :- 4

१४) भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती ?

   1) कलम 13 ते 17 
  2) कलम 14 ते 18 
  3) कलम 15 ते 19   
4) कलम 16 ते 20

उत्तर :- 2

१५) घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

   अ) पोटकलम 4-A चा 77 व्या घटनादुरुस्तीव्दारे समावेश केला गेला.

   ब) पोटकलम 4-A हे पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात आहे.

   क) पोटकलम 4-A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या हिताकरता, पदोन्नतीमधील    आरक्षणासंदर्भात आहे.

   1) अ आणि ब बरोबर, तर क चूक आहे.

   2) अ आणि क बरोबर, तर ब चूक आहे.

   3) सर्व बरोबर आहेत

   4) अ बरोबर, तर ब आणि क चूक आहेत.

उत्तर :- 1

१६) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

   1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

    2) मुद्रण स्वातंत्र्य

   3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2

१७) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व 
   ब) देशाची एकता   
   क) प्रांताची सुरक्षितता  
   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

   1) अ, क    2) ब, ड    
  3) अ, ब      4) ड

उत्तर :- 3

१८) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क   
   2) स्वातंत्र्याचा हक्क 
   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 
  4) मालमत्तेचा हक्क

उत्तर :- 4

१९) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. 

   1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)
   2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)

उत्तर :- 3

२०) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या   अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.

         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ  
2) केवळ ब आणि क   
3) केवळ अ आणि क   
4) केवळ अ, ब आणि क

उत्तर :- 4

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले :



मूळ आडनाव – गोह्रे

जन्म – 11 मे 1827

मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890


1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.


उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन परिचय :


आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.


शिक्षण:


फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.


विवाह:


महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.

त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.


पुढील शिक्षण :


इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.


संस्थात्मक योगदान :


3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.

1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.

1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :


1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 - 'ब्राम्हणांचे कसब'

1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.

1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.

1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

वैशिष्ट्ये :


थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.

1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.

2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.

ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.

सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

नाम व त्याचे प्रकार

 प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.

 उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव,स्वर्ग, पुस्तक इ.

 नामाचे प्रकार :

·         नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम -

·         एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.

उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध,सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.

 

·         ( सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते. )

विशेष नाम -

·         ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.

उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन,अमेरिका,गोदावरी इ.

·         ( विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे. )

उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम -

·         ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.

उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.

 

·         ( पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.

उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात. )