01 May 2022

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

हुतात्मा स्मारक,मुंबई
पूर्वार्ध
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषतः नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.

दार कमिशन व जे.व्ही.पी कमिटी
डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

फाजलअली आयोग
डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

चळवळीस सुरुवात

महाराष्ट्र राज्य
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.[१] तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.[२] मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजीझाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ. स. १९५५चे हुतात्मे[३]

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडविन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] हृदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नू गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरू

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर

—नाशिक --

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)

-- बेळगांव --

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी

-- निपाणी --

१०५] कमलाबाई मोहिते

-- मुंबई—

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

१०७] शंकरराव तोरस्कर

१०८] बंडु गोखले

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविषयी पुस्तके
महाराष्ट्र : एका संकल्पनेचा मागोवा (माधव दातार)
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा (ऐतिहासिक, लेखिका - शिरीष पै)

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

टोपणनावाला इंग्रजीत 'निकनेम' (Nickname) म्हणतात. मराठीले अनेक लेखक 'निकनेम'ने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :-

अरुण टिकेकर : (टिचकीबहाद्दर); (दस्तुरखुद्द)
अनिल बाबुराव गव्हाणे : (बापू)
अशोक जैन : (कलंदर)
अशोक रानडे (दक्षकर्ण)
आत्माराम नीलकंठ साधले : आनंद साधले, दमयंती सरपटवार
आत्माराम शेट्ये : (शेषन कार्तिक)
आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद)
आनंद साधले : (दमयंती सरपटवार)
आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
कृष्ण गंगाधर दीक्षित : (संजीव)
कृष्णाजी अनंत एकबोटे (सहकरी कृष्ण)
कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
कृ.श्री. अर्जुनवाडकर (पंतोजी)
केशव नारायण देव : (पतितपावनदास)
डॉ.कैलास रायभान दौंड (कैलास दौंड)
गंगाधर कुलकर्णी (रसगंगाधर)
गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर) (दुर्गातनय)
गणेश वामन गोगटे : (लीला)
गणेश विठ्ठल कुलकर्णी (कुंभोजकर) : (व्यतिपात)
ग.दि. माडगुळकर (गदिमा)
गोपाळ गोविंद मुजुमदार : (साधुदास)
गोपाळ नरहर नातू : लोककवी (मनमोहन); मीनाक्षी दादरकर
गोपाळ हरी देशमुख : (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
चंद्रकांत सखाराम चव्हाण : (बाबूराव अर्नाळकर)
चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
चिंतामण रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे वडील : (दूत)
चिं.त्र्य.खानोलकर - आरती प्रभु या नावाने काव्यलेखन व चिं.त्र्य.खानोलकर या नावाने गद्यलेखन
जयवंत दळवी : (ठणठणपाळ)
तुकारामतात्या पडवळ : (एक हिंदू)
तुळसी परब : ओज पर्व
दगडू मारुती पवार : कथालेखक (जागल्या)
दत्ता टोळ : (अमरेंद्र दत्त)
दत्तात्रेय रामचंद्र् कुलकर्णी : (श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर)
दामोदर माधव कुळकर्णी : (माधवसुत)
डॉ. दामोदर विष्णू नेने : (दादूमिया)
दासोपंत दिगंबर देशपांडे : (दासोपंत)
दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
देवदत्त टिळक : (लक्ष्मीनंदन)
द्वारकानाथ माधव पितळे : (नाथमाधव)
द्वारकाबाई हिवरगांवकर/मनोरमा श्रीधर रानडे : (गोपिकातनया)
धनंजय चिंचोलीकर : (बब्रूवान रुद्रकंठावार)
न.र. फाटक : (अंतर्भेदी), (करिष्मा), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
नरसिंह चिंतामण केळकर : (अनामिक; आत्‍मानंद)
नागावकर : (गंधर्व)
नागेश गणेश नवरे : (नागेश)
नारायण गजानन आठवले : (राजा ठकार)
नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
नारायण विनायक कुलकर्णी : गोविंदसुत (की विनायकसुत?)
परशराम गोविंद चिंचाळकर : गोविंदसुत
प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
पांडुरंग सदाशिव साने : (साने गुरुजी)
पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी : (पांडुरंग शर्मा)
पुरुषोत्तम धाक्रस (फडकरी)
पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी : पृथ्वीगीर हरिगीर
प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)
प्र.न. जोशी : (पुष्पदंत)
प्रभाकर जनार्दन दातार : शाहीर प्रभाकर
प्रभाकर नारायण पाध्ये : (भाऊ पाध्ये)
प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
फोंडूशास्त्री करंडे : द्विरेफ
बळवंत जनार्दन करंदीकर : (रमाकांत)
बा.सी. मर्ढेकर : (मकरंद)
बाळकृष्ण अनंत भिडे : (बी)
बाळूताई खरे/मालती बेडेकर : (विभावरी शिरूरकर)
ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझरीकर : (श्रीधर)
भागवत वना नेमाडे : (भालचंद्र नेमाडे)
भा.रा. भागवत : (संप्रस्त)
मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर : (गोपिकातनया)
महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
मा.गो. वैद्य : (नीरद)
महादेव आसाराम घाटेवाळ : (माधव परदेशी)
माधव दादाजी मोडक : (बंधु माधव)
मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : (विभावरी शिरूरकर)
मीनप्पा व्यंकटेश केलवाड : गोविंदशर्मा
मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
मुक्ता विठ्ठल कुलकर्णी : (मुक्ताबाई)
मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड : (सुमेध वडावाला)
मृदुला तांबे : (सृष्टिलावण्या)
मेहबूब पठाण : (अमर शेख)
मो.ग. रांगणेकर : (धुंडिराज)
र.गो. सरदेसाई : (र.गो.स., हरिविवेक)
रघुनाथ चंदावरकर : (रघुनाथ पंडित)
रघुवीर जगन्नाथ सामंत (कुमार रघुवीर)
रविन थत्ते : (रविन मायदेव थत्ते)
रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
राम गणेश गडकरी : (बाळकराम)
रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
रामचंद्र विनायक कुलकर्णी : (आनंदघनराम)
रामचंद्र विनायक टिकेकर - अरुण टिकेकर यांचे आजोबा : (धनुर्धारी)
रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
रा.श्री. जोग : (निशिगंध)
लक्ष्मीकांत तांबोळी : (लता जिंतूरकर)
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलालमधील पहिला) : (के.लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत)
लीला भागवत : (भानुदास रोहेकर)
वा.रा.कांत : (कांत)
विठ्ठल वामन हडप : (केयूरक)
विनायक गजानन कानिटकर : (रा. म. शास्त्री, ग्यानबा)
विनायक नरहरी भावे : (विनोबा)
वि.ल. बर्वे : (आनंद)
वि.शा. काळे  : (बाबुलनाथ)
विश्वनाथ वामन बापट : (वसंत बापट
विष्णू भिकाजी गोखले : (विष्णूबाबा ब्रह्मचारी)
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज )
विष्णूशास्त्री चिपळूणकर : (गोल्या घुबड)
वि.ह. कुलकर्णी (चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास)
वीरसेन आनंद कदम : (बाबा कदम)
शंकर दाजीशास्त्री पदे : पिनाकी, भ्रमर, शंकर
शिवराम महादेव गोऱ्हे : (चंद्रशेखर; चंद्रिका)
श्रीधर व्यंकटेश केतकर : गोविंदपौत्र
श्रीपाद रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे काका : मुसाफिर
स.अ. शुक्ल : (कुमुद)
संजीवनी मराठे (जीवन)
सतीश जकातदार : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
संतोष दौंडे (संतोष मधुकर दौंडे)
सुनंदा बलराम कुलकर्णी : (सानिया)
सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
सेतुमाधव पगडी : (कृष्णकुमार)
पी. विठ्ठल
ज्ञानेश्वर नाडकर्णी : (तुकाराम शेंदाणे)
(?) अप्पा बळवंत
(?) (वामनसुता)
(?) (देशभगिनी)
(?) (लक्ष्मीतनया)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी
.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४२ साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे ४३ वे साहित्य संमेलन होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.

माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :

अरुणा ढेरे व्यक्ती आणि कथनात्मक लेखन (नानासाहेब यादव)
दभि सहवास आणि सन्मान (डॉ. श्यामला मुजुमदार)
संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव (संपादक - अरुण पारगावकर)
’साहित्य दरबारातील दशरत्‍ने’ (प्राचार्य श्याम भुर्के)

साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी [१]
संपादन करा
१. इ.स. १८७८ (पुणे) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

इ.स. १८७९ ते इ.स. १८८४ (संमेलन नाही)
२. इ.स. १८८५ (पुणे) कृष्णशास्त्री राजवाडे

इ.स. १८८६ ते इ.स. १९०४ (संमेलन नाही)
३. इ.स. १९०५ (सातारा) रघुनाथ पांडुरंग करंदीकर

४. इ.स. १९०६ (पुणे) गोविंद वासुदेव कानिटकर

५. इ.स. १९०७ (पुणे) विष्णू मोरेश्वर महाजनी

६. इ.स. १९०८ (पुणे) चिंतामण विनायक वैद्य

७. इ.स. १९०९ (बडोदे) कान्होबा रामछोडदास कीर्तिकर

इ.स. १९१० (संमेलन नाही)
इ.स. १९११ (संमेलन नाही)
८. इ.स. १९१२ (अकोला) हरी नारायण आपटे

इ.स. १९१३ (संमेलन नाही)
इ.स. १९१४ (संमेलन नाही)
९. इ.स. १९१५ (मुंबई) गंगाधर पटवर्धन

इ.स. १९१६ (संमेलन नाही)
१०. इ.स. १९१७ (इंदूर) गणेश जनार्दन आगाशे

इ.स. १९१८ ते इ.स. १९२० (संमेलन नाही)
११. इ.स. १९२१ (बडोदे) नरसिंह चिंतामण केळकर

इ.स. १९२२ ते इ.स. १९२५ (संमेलन नाही)
१२. इ.स. १९२६ (मुंबई) माधव विनायक किबे

१३. इ.स. १९२७ (पुणे) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

१४. इ.स. १९२८ (ग्वाल्हेर) माधव श्रीहरी अणे

१५. इ.स. १९२९ (बेळगाव) शिवराम महादेव परांजपे

१६. इ.स. १९३० (मडगाव) वामन मल्हार जोशी

१७. इ.स. १९३१ (हैदराबाद) श्रीधर वेंकटेश केतकर

१८. इ.स. १९३२ (कोल्हापूर) सयाजीराव गायकवाड

१९. इ.स. १९३३ (नागपूर) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

२०. इ.स. १९३४ (बडोदे) नारायण गोविंद चापेकर

२१. इ.स. १९३५ (इंदूर) भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

२२. इ.स. १९३६ (जळगांव) माधव जूलियन

इ.स. १९३७ (संमेलन नाही)
२३. इ.स. १९३८ (मुंबई) विनायक दामोदर सावरकर

२४. इ.स. १९३९ (अहमदनगर) दत्तो वामन पोतदार

२५. इ.स. १९४० (रत्‍नागिरी) नारायण सीताराम फडके

२६. इ.स. १९४१ (सोलापूर) विष्णू सखाराम खांडेकर

२७. इ.स. १९४२ (नाशिक) प्रल्हाद केशव अत्रे

२८. इ.स. १९४३ (सांगली) श्रीपाद महादेव माटे

२९. इ.स. १९४४ (धुळे) भार्गवराम विठ्ठल वरेरकर

इ.स. १९४५ (संमेलन नाही)
३०. इ.स. १९४६ (बेळगाव) गजानन त्र्यंबक माडखोलकर

३१. इ.स. १९४७ (हैदराबाद) न.र. फाटक

इ.स. १९४८ (संमेलन नाही)
३२. इ.स. १९४९ (पुणे) शंकर दत्तात्रय जावडेकर

३३. इ.स. १९५० (मुंबई) यशवंत दिनकर पेंढारकर

३४. इ.स. १९५१ (कारवार) अनंत काकबा प्रियोळकर

३५. इ.स. १९५२ (अमळनेर) कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

३६. इ.स. १९५३ (अमदावाद) विठ्ठल दत्तात्रय घाटे

३७. इ.स. १९५४ (दिल्ली) लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

३८. इ.स. १९५५ (पंढरपूर) शंकर दामोदर पेंडसे

इ.स. १९५६ (संमेलन नाही)
३९. इ.स. १९५७ (औरंगाबाद) अनंत काणेकर

४०. इ.स. १९५८ (मालवण) अनिल

४१. इ.स. १९५९ (मिरज) श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

४२. इ.स. १९६० (ठाणे) रामचंद्र श्रीपाद जोग

४३. इ.स. १९६१ (ग्वाल्हेर) कुसुमावती देशपांडे

४४. इ.स. १९६२ (सातारा) नरहर विष्णू गाडगीळ

इ.स. १९६३ (संमेलन नाही)
४५. इ.स. १९६४ (मडगाव) वि.वा. शिरवाडकर

४६. इ.स. १९६५ (सातारा) वामन लक्ष्मण कुलकर्णी

इ.स. १९६६ (संमेलन नाही)
४७. इ.स. १९६७ (भोपाळ) विष्णू भिकाजी कोलते

इ.स. १९६८ (संमेलन नाही)
४८. इ.स. १९६९ (वर्धा) पु.शि. रेगे

इ.स. १९७० (संमेलन नाही)
इ.स. १९७१ (संमेलन नाही)
इ.स. १९७२ (संमेलन नाही)
४९. इ.स. १९७३ (यवतमाळ) गजानन दिगंबर माडगूळकर

५०. इ.स. १९७४ (इचलकरंजी) पु.ल. देशपांडे

५१. इ.स. १९७५ (कऱ्हाड) दुर्गा भागवत

इ.स. १९७६ (संमेलन नाही)
५२. इ.स. १९७७ (पुणे) पु.भा. भावे

इ.स. १९७८ (संमेलन नाही)
५३. इ.स. १९७९ (चंद्रपूर) वामन कृष्ण चोरघडे

५४. इ.स. १९८० (बार्शी) गं.बा. सरदार

५५. इ.स. १९८१(फेब्रुवारी) (अकोला) गो.नी. दांडेकर

५६. इ.स. १९८१ (डिसेंबर) (रायपूर) गंगाधर गाडगीळ

इ.स. १९८२ (संमेलन नाही)
५७. इ.स. १९८३ (अंबेजोगाई) व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

५८. इ.स. १९८४ (जळगांव) शंकर रामचंद्र खरात

५९. इ.स. १९८५ (नांदेड) शंकर बाबाजी पाटील

६०. इ.स. १९८६ (मुंबई) विश्राम बेडेकर

इ.स. १९८७ (संमेलन नाही)
६१. इ.स. १९८८ (ठाणे) वसंत कानेटकर

६२. इ.स. १९८९ (अमरावती) केशव जगन्नाथ पुरोहित

६३. इ.स. १९९०(जानेवारी) (पुणे) यू.म. पठाण

६४. इ.स. १९९०(डिसेंबर) (रत्‍नागिरी) मधू मंगेश कर्णिक

इ.स. १९९१ (संमेलन नाही)
६५. इ.स. १९९२ (कोल्हापूर) रमेश मंत्री

६६. इ.स. १९९३ (सातारा) विद्याधर गोखले

६७. इ.स. १९९४ (पणजी) राम शेवाळकर

६८. इ.स. १९९५ (परभणी) नारायण सुर्वे

६९. इ.स. १९९६ (आळंदी) शांता शेळके

७०. इ.स. १९९७ (अहमदनगर) ना.सं इनामदार

७१. इ.स. १९९८ (परळी-वैजनाथ) द.मा. मिरासदार

७२. इ.स. १९९९ (मुंबई) वसंत बापट

७३. इ.स. २००० (बेळगाव) य.दि. फडके

७४. इ.स. २००१ (इंदूर) विजया राजाध्यक्ष

७५. इ.स. २००२ (पुणे) राजेंद्र बनहट्टी

७६. इ.स. २००३ (कऱ्हाड) सुभाष भेंडे

७७. इ.स. २००४ (औरंगाबाद) रा.ग. जाधव

७८. इ.स. २००५ (नाशिक) केशव मेश्राम

७९. इ.स. २००६ (सोलापूर) मारुती चितमपल्ली

८०. इ.स. २००७ (नागपूर) अरुण साधू

८१. इ.स. २००८ (सांगली) मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

८२. इ.स. २००९ (महाबळेश्वर) हे संमेलन अध्यक्षाविना पार पडले

८३. इ.स. २०१० (मार्च), (पुणे), द.भि. कुलकर्णी

८४. इ.स. २०१० (डिसेंबर), ठाणे, उत्तम कांबळे

इ.स. २०११ संमेलन नाही
८५. इ.स. २०१२(फेब्रुवारी), चंद्रपूर, वसंत आबाजी डहाके

८६. इ.स. २०१३ (जानेवारी), चिपळूण, नागनाथ कोतापल्ले,

८७. इ.स. २०१४ (जानेवारी), सासवड, फ.मुं. शिंदे

८८. इ.स. २०१५ (जानेवारी), घुमान, डॉ. सदानंद मोरे

८९. इ.स. २०१६ (जानेवारी), पिंपरी, डॉ. श्रीपाल सबनीस

९०. इ.स. २०१७ (फेब्रुवारी), डोंबिवली, डॉ. अक्षयकुमार काळे

९१. इ.स. २०१८ (फेब्रुवारी), बडोदे, डाॅ.. लक्ष्मीकांत देशमुख

९२. इ.स. २०१९ (फेब्रुवारी), यवतमाळ, अरुणा ढेरे

९३. इ. स. २०२० (जानेवारी), उस्मानाबाद, फादर फ्रान्सिस दिब्रिटो

९४. इ. स. २०२१ (मार्च), (कोरोना मुळे स्थगिती), नाशिक, जयंत नारळीकर

1मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन

महाराष्ट्र दिन

संपादन करा
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.

इतिहास

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

हुतात्म्यांची नावे
संपादन करा
२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे

सिताराम बनाजी पवार
जोसेफ डेव्हिड पेजारकर
चिमणलाल डी. शेठ
भास्कर नारायण कामतेकर
रामचंद्र सेवाराम
शंकर खोटे
धर्माजी गंगाराम नागवेकर
रामचंद्र लक्ष्मण जाधव
के. जे. झेवियर
पी. एस. जॉन
शरद जी. वाणी
वेदीसिंग
रामचंद्र भाटीया
गंगाराम गुणाजी
गजानन ऊर्फ बंडू गोखले
निवृत्ती विठोबा मोरे
आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
बालप्पा मुतण्णा कामाठी
धोंडू लक्ष्मण पारडूले
भाऊ सखाराम कदम
यशवंत बाबाजी भगत
गोविंद बाबूराव जोगल
पांडूरंग धोंडू धाडवे
गोपाळ चिमाजी कोरडे
पांडूरंग बाबाजी जाधव
बाबू हरी दाते
अनुप माहावीर
विनायक पांचाळ
सिताराम गणपत म्हादे
सुभाष भिवा बोरकर
गणपत रामा तानकर
सिताराम गयादीन
गोरखनाथ रावजी जगताप
महमद अली
तुळशीराम पुंजाजी बेलसरे
देवाजी सखाराम पाटील
शामलाल जेठानंद
सदाशिव महादेव भोसले
भिकाजी पांडूरंग रंगाटे
वासुदेव सुर्याजी मांजरेकर
भिकाजी बाबू बांबरकर
सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान
शंकर गोपाल कुष्टे
दत्ताराम कृष्णा सावंत
बबन बापू भरगुडे
विष्णू सखाराम बने
सिताराम धोंडू राडये
तुकाराम धोंडू शिंदे
विठ्ठल गंगाराम मोरे
रामा लखन विंदा
एडवीन आमब्रोझ साळवी
बाबा महादू सावंत
वसंत द्वारकानाथ कन्याळकर
विठ्ठल दौलत साळुंखे
रामनाथ पांडूरंग अमृते
परशुराम अंबाजी देसाई
घनश्याम बाबू कोलार
धोंडू रामकृष्ण सुतार
मुनीमजी बलदेव पांडे
मारुती विठोबा म्हस्के
भाऊ कोंडीबा भास्कर
धोंडो राघो पुजारी
ह्रुदयसिंग दारजेसिंग
पांडू माहादू अवरीरकर
शंकर विठोबा राणे
विजयकुमार सदाशिव भडेकर
कृष्णाजी गणू शिंदे
रामचंद्र विठ्ठल चौगुले
धोंडू भागू जाधव
रघुनाथ सखाराम बीनगुडे
काशीनाथ गोविंद चिंदरकर
करपैया किरमल देवेंद्र
चुलाराम मुंबराज
बालमोहन
अनंता
गंगाराम विष्णू गुरव
रत्नु गोंदिवरे
सय्यद कासम
भिकाजी दाजी
अनंत गोलतकर
किसन वीरकर
सुखलाल रामलाल बंसकर
पांडूरंग विष्णू वाळके
फुलवरी मगरु
गुलाब कृष्णा खवळे
बाबूराव देवदास पाटील
लक्ष्मण नरहरी थोरात
ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
गणपत रामा भुते
मुनशी वझीऱअली
दौलतराम मथुरादास
विठ्ठल नारायण चव्हाण
देवजी शिवन राठोड
रावजीभाई डोसाभाई पटेल
होरमसजी करसेटजी
गिरधर हेमचंद लोहार
सत्तू खंडू वाईकर
गणपत श्रीधर जोशी
माधव राजाराम तुरे(बेलदार)
मारुती बेन्नाळकर
मधूकर बापू बांदेकर
लक्ष्मण गोविंद गावडे
महादेव बारीगडी
कमलाबाई मोहिते
सीताराम दुलाजी घाडीगावकर
शंकरराव तोरस्कर

______________________________

जागतिक कामगार दिन
राष्ट्रीय सुट्टीचा दिवस

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.[१]

चेन्नईतल्या मरीना किनाऱ्यावरील "श्रमाचा विजय" समूहशिल्प
हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.[२]

इतिहास

सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती.[१] या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला.[३] ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.[४]

या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली.[२] त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.[३]