Sunday 29 March 2020

पोलीस भरती प्रश्नसंच


♻️♻️ *'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन' हे कोणी म्हंटले ?*

A) सुभाष चंद्र बोस ✅✅
B) नारायण गुरु
C) सुखदेव
D) भगत सिंग

♻️♻️ *सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?*

A) सुधाकर 
B) केसरी
C) दीनबंधु ✅✅
D) प्रभाकर

♻️♻️ *महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?*
A) गुलामगिरी
B) जातीचा उच्छेद ✅✅
C)  शेतक-यांचा आसूड
D) ब्राह्मणांचे कसब

♻️♻️ *कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?*

A) तापी ✅✅
B) कावेरी
C) महानदी
D) कृष्णा

*महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?*

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

♻️♻️ *पुण्याचे प्लेग कमिश्नर रैंड यांची 1893 मध्ये _________ याने हत्या केली. *

A) दामोदर हरि चाफेकर ✅✅
B) वासुदेव बळवंत फडके
C) उस्ताद लहुजी मांग
D) अनंत कान्हेरे 

♻️♻️ *मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?*

A) ढाका ✅✅
B) कोलकाता
C) चितगांव
D) मुर्शिदाबाद

♻️♻️ *बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?*

A) लॉर्ड रिपन
B) लॉर्ड डफरीन
C) लॉर्ड डलहौसी
D) लॉर्ड कर्झन ✅✅

♻️♻️ *बार्डोलीचा सत्याग्रह ___________ यांच्या नेतृत्त्वाखाली झाला. *

A) सरदार पटेल ✅✅
B) म. गांधी 
C) विनोबा भावे
D) महादेव देसाई

♻️♻️ महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?

A) राजाराम मोहन रॉय
B) दादाभाई नौरोजी
C) वि. दा. सावरकर
D) वासुदेव बळवंत फडके ✅✅

तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

📍महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली आहे.

📍कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दहा रुपयात मिळणारी थाळी 5 रुपयात मिळणार आहे.

📍महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.

*⏰शिवभेजन मिळण्याची वेळ*

✅रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

♻️ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे.

🍽️ रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल असं भुजबळ म्हणाले.
🍽️ पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे.
🍽️ कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार असल्याचे ते म्हणाले.

*📣महत्वाचे*

💠या दरम्यान शिवभोजन थाळी केंद्रात रोज निर्जंतुकीकरण केले जाईल.

💠केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे. मास्क आणि सॅनेटायझर आता अत्यावश्यक सेवेत आणले आहेत.

💠त्यांनी सांगितलं की, स्वस्त धान्य दुकानात 2 महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध आहे. 6 महीने पुरेल एवढे अन्न धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे.

ट्रेनमध्येच उभारणार ‘ICU’ सह इतर सेवा


🔰भारतात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालाला आहे. देशात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर सातशे पेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

🔰तसेच केंद्र सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 दिवसांसाठी भारत लॉकडाउन केला आहे. त्याशिवाय सरकारकडून प्रदुर्भाव रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.

🔰देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रदुर्भाव ग्रामिण भागात झाल्यास मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. ते पाहाता मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी सुरू केली आहे.

🔰तर रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून या हलाकीच्या परिस्थितीत ग्रामीण भांगामध्ये स्वास्थ्य स्वेवा वेळेवर
पोहचेल.

शास्त्रज्ञ आणि शोध किंवा सिद्धांत

● झकॅरीस जॅन्सन
1590 मध्ये सूक्ष्मदरर्शकाचा सर्वप्रथम शोध लावला.

● राॅबर्ट हूक
1665 मध्ये बुचाच्या पातळ कापातील मृत पेशींचा शोध लावला.

● ल्युवेन्हाॅक
1674 मध्ये जीवाणू, आदीजीव, शुक्राणू इ. जीवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले.

● राॅबर्ट ब्राऊन
1831 मध्ये पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविल.

● जोहॅनिस पुरकिंजे
पेशीतील तरंगत्या द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले.

● एम. जे. शिल्डेन
पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे असा सिद्धांत 1838 मध्ये मांडला.

● थिओडाॅर शाॅन
वनस्पती वा प्राणी सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात, असा सिद्धांत 1839 मध्ये मांडला.

● राॅफल्ड विरशाॅ
सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होतो, असा सिद्धांत 1855 मध्ये मांडला.

जबाबदारी टाळण्यासाठी चीनने UNSC मध्ये रोखली करोना व्हायरसवरील बैठक.

✍सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. युरोपातील इस्तोनिया या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करोना व्हायसरवर चर्चेची मागणी केली होती. तसा रितसर प्रस्तावही त्यांनी दिला होता. पण चीनने UNSC मध्ये आपल्या विशेषधिकाराचा वापर करुन करोना व्हायरसच्या विषयावर चर्चा होऊ दिली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

✍इस्तोनिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य आहे. मागच्या आठवडयात त्यांनी करोना व्हायरसवर चर्चेची मागणी केली होती. करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे इस्तोनियाने म्हटले होते. इस्तोनियाने आपल्या प्रस्तावात करोना व्हायरससंबंधी सर्व माहिती पारदर्शकतेने मांडावी अशी मागणी केली होती. पण चीन त्यासाठी तयार नव्हता असे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

✍करोना व्हायरस या आजाराचे मूळ चीनमध्ये आहे. चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. तिथूनच संपूर्ण जगभरात या आजाराचा फैलाव झाला. करोना व्हायरससंबंधीची माहिती लपवल्याचा चीनवर आरोप होत आहे. चीनने वेळीच माहिती दिली असती तर या व्हायरसचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर रोखणे शक्य झाले असते असे तज्ञांचे मत आहे.

भारत: ‘हिंद महासागर आयोग’ याचा पाचवा निरीक्षक


📌 6 मार्च 2020 रोजी भारत हिंद महासागर आयोगाचा पाचवा निरीक्षक झाला. माल्टा, चीन, युरोपीय संघ आणि फ्रेंच लोकांचा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रान्कोफोनी हे आयोगाचे इतर चार निरीक्षक आहेत.

▪️ मुख्य बाबी

📌 या आयोगाचा निरीक्षक बनल्यामुळे भारताला पश्चिम हिंद महासागरातल्या आफ्रिका खंडाच्या आग्नेय किनाऱ्यास जोडणार्‍या आपल्या योजनांचा विस्तार करण्यात मदत होणार.

📌 हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या पश्चिम भागासोबत भारताच्या हितसंबंधांचे समर्थन करणे हा या निवडी मागचा हेतू आहे. तसेच हिंद क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी सुरक्षा आणि वृद्धी धोरणाचा देखील भारताला फायदा होणार.

▪️ हिंद महासागर आयोग

📌 1982 साली मॉरीशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरात हिंद महासागर आयोग (Indian Ocean Commission -IOC) याची स्थापना झाली. या समूहात मॉरीशस, मेडागास्कर, कोमोरोस, फ्रान्स आणि सेशल्स अश्या पाच आफ्रिकी हिंद महासागर राष्ट्रांचा समावेश आहे.

औरंगाबाद विमानतळाचं नामांतर

📌औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी माहिती दिली आहे.

📌त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

📌यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

📌दरम्यान, मार्च २०१९मध्ये तत्कालिन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी केली होती. त्या आधी २०११मध्येही विधानसभेत या नामकरणाचा अशासकीय ठराव आला होता. या नामांतरासाठी वायकरांनी पाठपुरावाही केला होता.

​​​​Coronavirus: करोना विषाणूचा फोटो घेण्यात यश; ‘एनआयव्ही’च्या वैज्ञानिकांची कामगिरी

भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.

भारतातील करोना विषाणू (कोविड १९) प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही) वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. या प्रतिमा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध होणार असून भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.

वुहानमधून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांमधील एका मुलीला परत आल्यानंतर करोनाची लागण दिसून आली होती. ही मुलगी केरळातील असून तिच्या घशातील नमुन्यात सापडलेल्या या विषाणूंच्या प्रतिमा मध्यपूर्व श्वासन रोगाशी साधर्म्य असलेल्या आहेत. ज्याला मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतात. तो विषाणू करोनाचाच प्रकार होता व २०१२ मध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आताचा विषाणू हा २००२ मधील सार्स-करोना विषाणूशीही साधर्म्य दाखवणारा आहे.

विषाणूच्या प्रवासाचा उलगडा होऊ शकतो

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. निर्मल गांगुली यांनी सांगितले की, “करोना विषाणूवर काट्यांसारखी रचना असते त्यामुळे त्यांना करोना म्हणतात. त्यावर शर्करा व प्रथिन संग्राहकांचा समावेश असतो. ते काटे पेशीत रुतले जातात व नंतर यजमान पेशीला चिकटून विषाणू आत घुसतो. विषाणूचे जे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे त्यावरून त्याचे जनुकीय मूळ व उत्क्रांती समजते व त्यातून हा विषाणू प्राण्यातून माणसात व नंतर माणसातून माणसात कसा पसरला याचा उलगडा होऊ शकतो.”

विषाणूंचा आकार गोल

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत केरळातील नमुने तपासण्यात आले. त्यानुसार भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, “विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा ७५ नॅनोमीटरचा दिसतो, त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो. केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील ५०० मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला व त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला. त्यानंतर सोडियम फॉस्फोट्युनिस्टिक आम्लाचा वापर करण्यात आला. नंतर १०० केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.”

महाराष्ट्राबद्दल सर्व माहिती


♻️💐महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर

♻️💐महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

♻️💐विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

♻️💐महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

♻️💐महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

♻️💐महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

♻️💐महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

♻️💐महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

♻️💐महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

♻️💐महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

♻️💐महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

♻️💐महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

♻️💐भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक


भारताच्या घटनेत भाग पाच मधील कलम 148 ते 151 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.
महालेखा परीक्षक यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याप्रमाणे अधिकार असतात.
कलम 148 नुसार राष्ट्रपती पंतप्रधान सल्ल्यानुसार महा लेखापरीक्षकाची नियुक्ती करतात.
महालेखापरीक्षकांच्या कार्यकाळ घटनेत निश्चित केलेला नाही.
संसदीय कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेला आहे .
6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे अधि काळ तोपर्यंत कार्य सांभाळू शकतात.
त्यांना राष्ट्रपती शपथ देतात तिसरा अनुसूची नुसार.
आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात.
त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याप्रमाणे पदावरून दूर केले जातील (गैरवर्तणूक किंवा अक्षमता या कारणावरुन).
त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने पारित झाला पाहिजे.
त्यांना संसदेत कायद्यानुसार भारताच्या संचित निधीतून वेतन व भत्ते दिले जातील.
पदावधी दरम्यान किंवा पदावधी संपल्यानंतर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कोणते पद धारण करू शकत नाहीत. कोणताही मंत्री संसदीय महालेखापरीक्षकांच्या प्रतिनिधित्व करू शकत नाही.
कलम 149 नुसार महालेखापरीक्षकांच्या कर्तव्य अधिकार दिलेले आहे.
नियंत्रक व महालेखा कायदा 1971  आहे, त्यात एकूण 1976 मध्ये सुधारणा केल्या.
ते राष्ट्रपतीना तीन अहवाल सादर करतात.
1) विनियोजन लेखांची लेखापरिक्षण
2) सार्वजनिक उपक्रमांचे लेखापरीक्षण
3) वित्तीय लेखांचे लेखापरिक्षण.
कलम 151 नुसार आपला अहवाल केंद्राचा राष्ट्रपतींकडे तर राज्याचा राज्यपालांकडे सादर करतात.

लोकसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ मंजूर

- लोकसभेत ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’ मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे 1934 सालच्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे.

- ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA), नागरी उड्डयन सुरक्षा विभाग (BCAS) आणि विमान अपघात अन्वेषण विभाग (AAIB) या संस्थांना वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे.

▪️ ठळक बाबी

- कायद्यान्वये, केंद्र सरकार (i) हवाई वाहतूक सेवांचे नियमन करणे, (ii) कोणत्याही निर्दिष्ट क्षेत्रावर उड्डाण करण्यास मनाई करणे आणि (iii) विमानाची नोंदणी याबाबतीत नियम बनवू शकणार. तसेच केंद्र सरकार तीनही आस्थापणांवर महासंचालकांची नेमणूक करू शकते.

- विधेयकांतर्गत दंडाची कमाल मर्यादा 10 लक्षावरून एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

- संरक्षण दलांच्या विमानांना या विधेयकांतर्गत कायद्यातून सूट देण्यात आली आहे.

- नागरी उड्डयन सुरक्षा विभाग हे नागरी उड्डयन मंत्रालयाशी संलग्न असलेले कार्यालय आहे. हे नागरी विमान वाहतूकीच्या सुरक्षेसाठी नियामक प्राधिकरण म्हणून कार्य करते. त्याची स्थापना 1976 साली झाली.

- नागरी उड्डयन महासंचालनालय विमान अपघात आणि घटनांचा तपास करते.
--------------------------------------------------

RBIने शहरी सहकारी बँकांसाठीच्या एक्सपोजर मर्यादेत कपात केली

- भारतीय रिझर्व्ह बँकेनी टियर-1 भांडवलाच्या एकट्या कर्जदाराच्या आणि कर्जदारांच्या गटासाठी शहरी सहकारी बँकांसाठी एक्सपोजर मर्यादा अनुक्रमे 15 टक्के आणि 25 टक्क्यांपर्यंत खाली आणली.

- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्वीच्या परवानगीप्रमाणे असलेली मर्यादा ही एकट्या कर्जदारांसाठी टियर-1 आणि टियर-2 भांडवलासह बँकेच्या भांडवलाच्या 15 टक्के आणि कर्जदारांच्या गटासाठी 40 टक्के मान्य आहे.

- भारतीय रिझर्व्ह बँकेनी प्राधान्य असलेल्या क्षेत्रासाठीचे कर्जाचे लक्ष्य देखील सुधारित केले गेले, जे ऑफ-बॅलन्स शीट एक्सपोजरच्या समायोजित निव्वळ बँक पत किंवा पत समतुल्य रकमेच्या 40 टक्क्यांवरून 75 टक्के केले.

- सुधारित मर्यादेच्या अंमलबजावणीसाठी UCB बँकांना 31 मार्च 2023 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

▪️भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातली केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

- ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.

- दि. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

- RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात.

- सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी. डी. देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
------------------------------------------------

मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार

- मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला.

- राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट सुरिंंदर मेहरा यांनी ११ मार्च रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.

▪️ठळक मुद्दे
- महाराष्ट्राच्या वाट्याला दोन : देशपातळीवर सहा पारितोषिके

▪️परतवाडा : भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय तथा राष्ट्रीय व्याघ्र संरक्षक प्राधिकरणाकडून व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशपातळीवरील सहा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

-  यात महाराष्ट्रातील दोन वनरक्षकांचा समावेश आहे.

▪️पहिला पुरस्कार
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा वनरक्षकास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यात देशपातळीवर गौरव प्राप्त करणारा महाराष्ट्रातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.

▪️ उल्लेखनीय कार्य

- मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील आकाश सारडा यांनी सन २०१७ मध्ये पोलिसांच्या मदतीने सहा आरोपींना सहा गाड्यांसह पकडून दिले. ते दुतोंड्या सापाच्या तस्करीत संलग्न होते.

-  व्याघ्र प्रकल्पाच्या वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत असताना त्यांनी २०१९ मध्ये चिखलदरा व चौराकुंडमधील शिकाºयांना पकडून वाघाच्या कातडीसह वाघनख व दात हस्तगत करण्यात उल्लेखनीय कार्य केले.
------------------------------------------------

जगभरातील 74 हजार कोरोना संक्रमित झाले ठणठणीत बरे

- कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील 100 हून अधिक देशात झाला आहे. या रोगावर अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने त्याला सपोर्टीव्ह औषधे देण्यात येतात. तरी देखील जगभरातील 73,968 कोरोना संक्रमित रुग्ण या रोगातून सुखरूप बरे झाले आहेत.

- जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात 1 लाख 56 हजारहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. तर 5833 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या वृहान प्रांतातून पसरत असलेल्या विषाणूने चीनमध्येच 3085 जणांचा बळी घेतला आहे. तर 81 हजार जणांना याची लागण झाली आहे.

- कोरोनाच्या धास्तीमुळे जगभरातील अनेक शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाटय़गृह बंद ठेवण्यात आली आहेत. चीनमधून लागण झालेल्या 81 हजार कोरोना रुग्णांपैकी 54 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर चीनपाठोपाठ इटलीमधील 1966 रुग्ण, इराणमधील 2959 तर स्पेनमधील 517 जण यातून बरे झाले आहेत
------------------------------------------------

नीता अंबानी जगातील 'टॉप टेन' प्रभावशाली महिलांच्या यादीत!

- आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आणि प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला आहे.

- प्रसिद्ध अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्स आणि जिम्नॅस्टिक सिमोन माईल्स या क्रीडा जगतातील सर्वात प्रभावशाली महिला ठरल्या आहेत.

- स्पोर्ट्स बिझनेस नेटवर्क आणि आय. ए. स्पोर्ट कनेक्ट यांच्यावतीने २०२० या वर्षासाठीच्या इन्फ्लुएन्शिअल वूमन इन स्पोर्ट महिलांची यादी जाहीर केली. या यादीत २५ महिलांची निवड करण्यात आली. नीता अंबानी या क्रिकेट आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारांशी निगडीत असल्याने त्यांचा टॉप टेन यादीत समावेश झाला आहे.

-  नीता अंबानी या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकीण आहेत. मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तसेच त्यांनी फुटबॉल आणि इतर खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी विशेष योगदान दिले आहे.

- आयपीएलचा पहिला सीझन वगळता इतर सर्व सीझनमध्ये नीता अंबानी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जेव्हा जेव्हा मुंबईची मॅच असायची तेव्हा तेव्हा त्यांनी मैदानावर हजेरी लावली होती. फक्त मुंबईच नाही तर इतर टीमच्या खेळाडूंसोबतही त्या मैदानावर चर्चा करताना दिसतात.

- नीता अंबानी यांच्याबरोबर टेनिसस्टार सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका, फॉर्म्युला वनच्या संचालक मंडळातील सदस्य एली नॉर्मन, वुमन्स एनबीएच्या आयुक्त कॅथी एंगेल्बर्ट, फिफाच्या सरचिटणीस सा मौरा, ऑलिम्पिक संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी कॉमिस, ईसीबीच्या व्यवस्थापकीय संचालक क्लेयर कॉनर या प्रभावशाली महिला ठरल्या आहेत.

- तसेच भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांचाही आयए स्पोर्ट कनेक्टच्या मूळ यादीत समावेश करण्यात आला आहे करा

Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...