1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)
🔸️ स्थापना: 1948
🔸️ अहवाल: 1948
🔸️ अध्यक्ष: एस. के. धार
🔸️ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष
🔸️ शिफारस:
✔️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा
✔️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली
✔️ मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत व्यक्त
2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)
🔸️ स्थापना: 1948
🔸️ अहवाल: 1949
🔸️ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या
🔸️ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष
🔸️ शिफारस:
✔️ भाषिक तत्त्वास विरोध केला
✔️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही
3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)
🔸️ स्थापना: 1953
🔸️ अहवाल: 1955
🔸️ अध्यक्ष व सदस्य:
✔️ फाजल अली (अध्यक्ष)
✔️ के. एम. पण्णीकर
✔️ हृदयनाथ कुंझरू
🔸️ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार
🔸️ शिफारस:
✔️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन
✔️ ‘एक राज्य - एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार
✔️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले