1. सातारा (1848 साली - देशातील खालसा झालेले प्रथम संस्थान)
2. नागपूर (1854 साली खालसा - भोसले संस्थान)
3. कोल्हापूर
4. सावंतवाडी
5. इचलकरंजी
6. गगनबावडा (महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस दिन - जवळपास 129 दिवस याच ठिकाणी)
7. कापशी
8. कागल
9. विशाळगड
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
1. सातारा (1848 साली - देशातील खालसा झालेले प्रथम संस्थान)
2. नागपूर (1854 साली खालसा - भोसले संस्थान)
3. कोल्हापूर
4. सावंतवाडी
5. इचलकरंजी
6. गगनबावडा (महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस दिन - जवळपास 129 दिवस याच ठिकाणी)
7. कापशी
8. कागल
9. विशाळगड
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला. मलिंगाने (36 वर्षीय) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हा इतिहास रचला. यासह मलिंगाने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला
टॉप 3 गोलंदाज
लसिथ मलिंगा : 74 सामने I 99 विकेट्स, शाहिद आफ्रिदीने : 99 सामने I 98 विकेट्स, शाकिब अल हसन : 72 सामने 88 विकेट्स
आर.अश्विन टॉपवर : भारतीय संघातर्फे टी-20 त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आर.अश्विनच्या नावावर असून त्याने 46 सामन्यात 52 गडी टिपले आहेत
▪️सिंधू संस्कृती
1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.
-----------------------------------------------------------
🔴 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
▪️यशवंतराव चव्हाण
(मे १, १९६० - नोव्हेंबर १९, १९६२)
▪️मारोतराव कन्नमवार
(नोव्हेंबर २०,१९६२ - नोव्हेंबर २४, १९६३)
▪️वसंतराव नाईक
(डिसेंबर ५, १९६३ - फेब्रुवारी २०, १९७५)
▪️शंकरराव चव्हाण
(फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७, १९७७)
▪️वसंतदादा पाटील
(मे १७, १९७७ - जुलै १८, १९७८)
▪️शरद पवार
(जुलै १८, १९७८ - फेब्रुवारी १७, १९८०)
▪️अब्दुल रहमान अंतुले
(जून ९, १९८० - जानेवारी १२, १९८२)
▪️बाबासाहेब भोसले
(जानेवारी २१, १९८२ - फेब्रुवारी १, १९८३)
▪️वसंतदादा पाटील
(फेब्रुवारी २, १९८३ - जून १,१९८५ )
▪️शिवाजीराव निलंगेकर
(जून ३, १९८५ - मार्च ६, १९८६)
▪️शंकरराव चव्हाण
(मार्च १२, १९८६ - जून २६, १९८८)
▪️शरद पवार
(जून २६, १९८८ - जून २५, १९९१)
▪️सुधाकरराव नाईक
(जून २५, १९९१ - फेब्रुवारी २२, १९९३)
▪️शरद पवार
(मार्च ६, १९९३ - मार्च १४, १९९५)
▪️मनोहर जोशी
(मार्च १४, १९९५ - जानेवारी ३१, १९९९)
▪️नारायण राणे
(फेब्रुवारी १, १९९९ - ऑक्टोबर १७, १९९९)
▪️विलासराव देशमुख
(ऑक्टोबर १८, १९९९ - जानेवारी १६, २००३)
▪️सुशील कुमार शिंदे
(जानेवारी १८, २००३ - ऑक्टोबर ३०, २००४ )
▪️विलासराव देशमुख
(नोव्हेंबर १, २००४ - डिसेंबर ५, इ.स. २००८)
▪️अशोक चव्हाण
(डिसेंबर ५, इ.स. २००८ - नोव्हेंबर ९, इ.स. २०१०)
▪️पृथ्वीराज चव्हाण
(नोव्हेंबर १०, इ.स. २०१० - सप्टेंबर १६, इ.स. २०१४)
▪️देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर, इ.स. २०१४ - विद्यमान
● एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे.
● नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्रांची स्थापना केली आहे.
● एक केंद्र 8,430 मीटर (27,657 फूट) आणि दुसरे 7,945 मीटर (26,066 फूट) उंचीवर उभारण्यात आले आहे. तसेच, आणखी तीन केंद्र उभारले जात आहे.
● जागतिक तापमान वाढीचा हिमनद्यांवर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करण्याचा उद्देश आहे.
● हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग आहे.
● हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. येथे ‘एव्हरेस्ट’ (उंची 8848 मीटर) हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. ह्या पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे.
● ही पर्वतरांग भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भुटान या देशांमधून जाते.
1. या ठिकाणी माझे काय काम?
उद्गारवाचक
नकरार्थी
प्रश्नार्थक
होकारार्थी
* उत्तर - प्रश्नार्थक
2. ‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे
* उत्तर - अपमान करणे
3. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे
पकडून ठेवणे
कचाट्यात पकडण
आळवणी करणे
शरण आणणे
* उत्तर - आळवणी करणे
4. केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे?
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
कृष्णाजी केशव दामले
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे
* उत्तर -प्रल्हाद केशव अत्रे
5. ..... जळले तरी पीळ जात नाही.
दोरखंड
चऱ्हाट
घर
सुंभ
* उत्तर - सुंभ
6. मी घरीच शिकलो
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक भावे
* उत्तर - अकर्मक कर्तरी
7. मी पुस्तके वाचली
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही
* उत्तर - कर्मणी प्रयोग
8. 'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कर्तबगारी दाखविणे
फसविणे
प्रकृती दाखविणे
हात दाखऊन भविष्य पाहणे
* उत्तर - फसविणे
9. रात्र संपता संपत नाही
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमानकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
* उत्तर - अपूर्ण वर्तमानकाळ
10. कपिलाषष्टीचा योग - या शब्दाचा अर्थ कोणता?
ऋणानुबंध
दुर्मिळ योग
योगायोगाने होणारी भेट
कपिल मुनींचा जन्मदिवस
* उत्तर - दुर्मिळ योग
----------------------------------------------------------
🅱 लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला.
🅱 गुरुवारी रात्री झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
🅱 त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.
🅱 लिव्हरपूलला 2018-19 च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.
🅱 बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
🅱 यापूर्वी 2012 मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.
🅱 आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.
🅱 28 वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले.
🅱 गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.
❇️ पुरस्कार विजेते :
▪️सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : व्हॅन डिक
▪️गोलरक्षक :अॅलिसन बेकर
▪️मध्यरक्षक : फ्रँक डी जाँग
▪️आक्रमणपटू : लिओनेल मेसी
▪️बचावपटू : व्हॅन डिक
- 1 ते 7 सप्टेंबर
- 1982 पासून केंद्र सरकारकडून साजरा केला जातो.
- लोकांच्या आरोग्यसंबंधी आणि सुदृढपणासाठी जागृकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
----------------------------------------------
● उद्देश
- आहार आणि पोषणाची वारंवरता यांचा आढावा घेणे
- राष्ट्रीय पोषण कार्यक्रमासंबंधी संशोधन आणि मजबुतीवर लक्ष्य ठेवणे
- लोकांच्या आहार आणि पोषणासंबंधीच्या स्थितीचे निरीक्षण करणे
- पोषणविषयक समस्यांचे निर्मूलन करणे
- आरोग्य आणि पोषणविषयक शिक्षण देवून जागृकता निर्माण करणे
1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?
1) अपसरण चिन्ह 2) स्वल्पविराम 3) अपूर्ण विराम 4) संयोग चिन्ह
उत्तर :- 4
2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.
1) यमक – अनुप्रास 2) अनन्वय – दृष्टान्त 3) अन्योक्ती – स्वभावोक्ती 4) शब्दालंकार आणि अर्थालंकार
उत्तर :- 4
3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे ?
1) अभ्यस्त 2) सामासिक 3) प्रत्ययसाधित 4) यापैकी कोणताही नाही
उत्तर :- 1
4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) धववाणी
उत्तर :- 3
5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) जलद 2) कसर 3) पथ 4) वीज
उत्तर :- 4
1) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
1) तालव्य 2) मूर्धव्य 3) दन्त्य 4) ओष्ठय
उत्तर :- 1
2) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –
1) मन + रथ 2) मनो + रथ 3) मन + ओरथ 4) मन: + रथ
उत्तर :- 4
3) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.
1) विकारी 2) अविकारी 3) दोन्ही 4) दोन्ही नाही
उत्तर :- 1
4) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.
1) वकिली 2) गुलाम 3) गायक 4) लबाड
उत्तर :- 1
5) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
1) अनिश्चित 2) संबंधी 3) दर्शक 4) आत्मवाचक
उत्तर :- 4
🔰इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🔰इस्राईलची राजधानी तेल अविवमध्ये हा प्रकल्प पाहिल्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले.
🔰"स्कॉच' या संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण, स्मार्ट सिटी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो.
🔰"डिजी ठाणे' या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
🔰डिजी प्रकल्प उभारणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.
लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला.
गुरुवारी झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.
तर लिव्हरपूलला 2018-19च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.
बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2012मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.
◾️मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीत सुद्धा दिसतील.
◾️नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले.
◾️आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.
◾️ परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
● राष्ट्रीपती रामनाथ कोविंद यांना गिनी या प्रजासत्ताकचा सर्वोच्च सन्मान "नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट" देण्यात आला आहे.
● गिनी आणि भारतामधील विकास आणि संबंधांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
गिनी
● गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला पूर्वी फ्रेंच गिनी म्हणून ओळखले जात असे.
● गिनी 2 ऑक्टोबर 1958 रोजी फ्रान्सपासून स्वतंत्र झाला
● गिनीचे क्षेत्रफळ 2,45,836 चौरस किलोमीटर आहे.
● त्याची राजधानी कोनाक्री आहे.
● गिनीची अधिकृत भाषा फ्रेंच आहे.
● गिनियाचे सध्याचे अध्यक्ष अल्फा कांडे आहेत, तर अब्राहम कसुरी फोफाना हे गिनियाचे पंतप्रधान आहेत.
● प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.
● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
● याआधी त्या दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :
● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.
● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.
● उद्देश : देशात विज्ञानाचा प्रसार करणे
● मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा
● नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने DRDO सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम (क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल) ची यशस्वी चाचणी घेतली.
●ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत हवाई लक्ष्य ठेवले होते.
QRSAM (Quick Reaction Surface-to-Air Missile)
● हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय सैन्यासाठी विकसित केले आहे.
● डीआरडीओ ने या मिसाइल ची निर्मिती भारत इलेक्ट्रनिक्स लिमिटेड च्या मदतीने केली आहे.
● हे क्षेपणास्त्र फारच कमी वेळात शत्रूंच्या लक्ष्यांवर नजर ठेवू शकते.
◆ इंधन प्रकार : घन इंधन
◆ रेंज : 25-30 किमी
● हे क्षेपणास्त्र एका ट्रकवर तैनात केले जाऊ शकते.
● हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर असलेले आपले लक्ष्य नष्ट करू शकते.
● क्यूआरएसएएमची प्रथम चाचणी 4 जुलै 2017 रोजी घेण्यात आली, नंतर 26 फेब्रुवारी 2019 रोजी या क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या.
● गुजरातमधल्या 597 फूट उंची असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला टाइम्स मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत स्थान दिले गेले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईचे ‘सोहो हाऊस’ या इमारतीनेही या यादीत स्थान मिळवले.
✅ सन 2019 मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या जगातली प्रथम पाच ठिकाणे -
1. जियोसी जियोथर्मल सी बाथ्स (हुसविक, आइसलँड )
2. कॅम्प अॅडव्हेंचर (रॉनेडे, डेन्मार्क)
3. मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम (टोकियो, जपान)
4. स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज अॅट डिस्नेलँड (अॅनाहिम, कॅलिफोर्निया)
5. SFER IK (तुलूम, मेक्सिको )
● गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर उंच आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याचे अनावरण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ही शिल्पाकृती विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारले. विक्रमी 33 महिन्यांमध्ये याचे बांधकाम केले गेले.
● मुंबईचे सोहो हाऊस हे 11 मजली इमारतीत असून ते अरबी समुद्राकाठी आहे. येथे 34 बैठकांचे सिनेमागृह, एक लायब्ररी आणि एक रूफटॉप बार आणि पूल आहे.
📢 खूप दिवसांपासुन प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस भरतीची जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी *३ सप्टेंबरपासून* ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहणार
💁♂ *पोलीस भरती प्रक्रिया मध्ये झाले मोठे बदल*
▪ राज्यात पहिल्यांदाच पोलीसभरती प्रक्रिया हि महापोर्टलद्वारे होणार आहे.
▪ यावेळेस पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आणि नंतर मैदानी चाचणी होणार
▪ लेखी परीक्षा हि पूर्वीप्रमाणेच ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे.
▪ लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार
🙋♂ *शारीरिक चाचणीतील बदल*
🔰 मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे
🔰 मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत.
👱♂ *पुरुष उमेद्वार शारीरिक चाचणी* - ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० राहतील
👱♀ *महिला उमेद्वार शारीरिक चाचणी* - मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण राहतील
✍ *NOTE - पोलीस भरती बाबत हे महत्वाचे अपडेट आहे*
👉आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली.
👉 NRCच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या अंतिम यादीत 3,11,21,004 नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे तर 19,06,657 नागरिकांना यादीतून वगळण्यात आले आहे.
👉राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या या यादीमुळे अनेकांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
👉 कारण या यादीतून आसाममधल्या त्या नागरिकांना वेगळे केळे जाईल ज्यांनी 1971 सालानंतर बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश केला होता.
👉गृहमंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, NRCमध्ये नाव समाविष्ठ नसलेल्या एखाद्या व्यक्तीला परदेशी ठरवळे जाणार नाही.
👉ज्या नागरिकांची नावे प्रस्तावित NRCमधून वगळण्यात आली आहेत त्यांना अपील करण्याची संधी मिळेल.
🌹🌳🌴NRC म्हणजे काय?🌴🌳🌹
👉राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) यामध्ये देशातल्या अधिकृत नागरिकांची नोंद असते.
👉ज्या नागरिकांचे नाव NRCमध्ये नसते त्याना अवैध मानले जाते.
👉NRCनुसार 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतीय मानले जात आहे.
👉NRC भारतीय नागरिकांच्या नावांची एक नोंदणी यादी आहे जे सन 1951 मध्ये तयार करण्यात आली होती.
👉आसाममध्ये बांग्लादेशामधून अवैधपणे आलेल्या लोकांच्या प्रश्नावरुन सर्वोच्च न्यायलयाने NRC अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
👉पहिली NRC 1951 साली जाहीर केले गेले होते.