17 January 2026

पंचायत राज प्रणालीचा विकास

🔥 बलवंतराय मेहता समिती (1957)

- ✔️ स्थापना: जानेवारी 1957

- ✔️ उद्देश: CDP (1952) आणि NES (1953) यांचे कार्य तपासणे

- ✔️ अहवाल सादर: नोव्हेंबर 1957

- ✔️ स्वीकारले: जानेवारी 1958

- ✔️ अंमलबजावणी: 2 ऑक्टोबर 1959, नागौर जिल्हा, राजस्थान

- ✔️ त्रिस्तरीय प्रणाली: ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद



🔥 अशोक मेहता समिती (1977)

- ✔️ स्थापना: डिसेंबर 1977

- ✔️ उद्देश: पंचायत राज संस्थांचे पुनरुज्जीवन

- ✔️ अहवाल सादर: ऑगस्ट 1978

- ✔️ द्विस्तरीय प्रणाली: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती



🔥 दंतेवाला समिती अहवाल (1978)

- ✔️ ब्लॉक-स्तरीय नियोजन

- ✔️ वर्ष: 1978

- ✔️ सल्ला: ब्लॉक स्तरावर विकेंद्रित नियोजन कार्य करणे



🔥 हनुमंता राव समिती अहवाल (1984)

- ✔️ जिल्हा नियोजन

- ✔️ वर्ष: 1984

- ✔️ सल्ला: जिल्हा स्तरावर विकेंद्रित नियोजन कार्य करणे



🔥 जी.व्ही.के. राव समिती (1985)

- ✔️ स्थापना: 1985, योजना आयोग

- ✔️ उद्देश: ग्रामीण विकास आणि गरीबी निर्मूलनासाठी विद्यमान प्रशासकीय व्यवस्था पुनरावलोकन

- ✔️ अहवाल सादर: 1986

- ✔️ महत्त्वपूर्ण भूमिका: जिल्हा स्तरावर पंचायती राज संस्थांना सशक्त बनवणे



🔥 एल.एम. सिंघवी समिती (1986)

- ✔️ स्थापना: 1986, राजीव गांधी सरकार

- ✔️ उद्देश: 'लोकशाही आणि विकासासाठी पंचायती राज संस्थांचे पुनरुत्थान'



🔥 थंगन समिती (1988)

- ✔️ स्थापना: 1988, संसद सल्लागार समितीची उपसमिती

- ✔️ उद्देश: जिल्हा नियोजनासाठी राजकीय आणि प्रशासकीय रचनेचा तपासणी



🔥 गाडगीळ समिती (1988)

- ✔️ स्थापना: 1988, काँग्रेस पक्ष

- ✔️ उद्देश: धोरणे आणि कार्यक्रम

व्ही. टी. कृष्णम्माचारी समिती, 1960

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹 नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती

🔹 स्थापना : 1960

🔹 अहवाल सादर : 1962

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तीव्र गतीने स्थापन करावी

➤ प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा

➤ विकास गट हा नियोजनाचा घटक मानावा

➤ विकास कार्यक्रमात सहकारी संस्था व कर्मचारी प्रशिक्षणाला प्राधान्य

➤ जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक


💠 तखतमल जैन समिती, 1966

🔹 स्थापना : 17 जुलै 1966

🔹 अहवाल सादर : 28 फेब्रुवारी 1967

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ सर्व राज्यांत कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात

➤ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा

➤ स्थानिक स्वराज्य संस्था सुसज्ज यंत्रणा असावी

➤ देखरेख, नियंत्रण व विकास कामातून जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त करावे


💠 अशोक मेहता समिती, 1977

🔹 स्थापना : 12 डिसेंबर 1977

🔹 अहवाल सादर : 21 ऑगस्ट 1978

🔹 सदस्य : (एकूण 12)

➤ प्रकाशसिंह बादल

➤ एम. जी. रामचंद्रन

➤ इ. एम. एस. नबूद्रिपाद

➤ मंगलदेव कवर

➤ अण्णासाहेब शिंदे

➤ मोहम्मद अली खान

➤ बी. शिवरामन

🔹 सदस्य सचिव : एस. के. राव

🔹 एकूण शिफारसी : 132

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था (जिल्हा परिषद व मंडल पंचायत)

➤ 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यांची मंडल पंचायत

➤ पंचायत निवडणुकांत सर्व स्तरावर राजकीय पक्षांचा खुला व अधिकृत सहभाग असावा

लोकसभेचे सभापती (Speaker of Lok Sabha)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔸️वेतन व भत्ते

➤ सभापतींचे वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केलेले असतात।


🔸️मतदानाचा अधिकार

➤ सभापतींना साधारण परिस्थितीत मतदान करता येत नाही।

➤ समान मत विभागणी (tie) झाल्यासच सभापती निर्णायक मत (casting vote) देतात।


🔸️राजीनामा

➤ सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे सादर करतात।


🔸️पदावरून दूर करण्याचा ठराव

➤ सभापतींच्या पदावरून हटविण्यासंबंधी ठराव विचाराधीन असेल, तेव्हा ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत।

➤ मात्र त्यांना भाषण करण्याचा व कार्यवाहीत सहभागी होण्याचा अधिकार असतो।


🔸️हटविण्याच्या ठरावाच्या वेळी मतदान

➤ अशा वेळी सभापती सभागृहामध्ये पहिल्या फेरीत मतदान करू शकतात।


🔸️अर्थ विधेयकासंबंधी अधिकार

➤ अर्थ विधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते।

➤ कोणते विधेयक ‘अर्थ विधेयक’ आहे की नाही हे ठरविण्याचा अंतिम अधिकार सभापतींना आहे।


🔹️ लोकसभेचे उपसभापती (Deputy Speaker)

🔸️राजीनामा

➤ उपसभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात।


🔸️संयुक्त अधिवेशनात भूमिका

➤ जर लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील, तर संसदीय संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान राज्यसभेचे उपसभापती भूषवतात


🔹️ महत्त्वपूर्ण तथ्ये

🔸️लोकसभेचे पहिले उपसभापती

➤ एम. अनंतसयनम अय्यंगार


🔸️भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➤ श्रीमती मीरा कुमार

भारतीय राज्यघटना

पार्श्वभूमी:

दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.

या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.


घटना परिषदेची रचना :

१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.

2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.

3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.


घटना परिषदेचे कार्य:

I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.

II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.

III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.

V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.


घटनेचा उद्देश ठराव:

कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.

1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.

2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.

3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.

a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण

b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.

c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.

d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.

e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.





घटना परिषदेची इतर महत्वाची कामे

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७

II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९

III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०


घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे

या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.


घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष

अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष

१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू

२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू

३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल

५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू

६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद

७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या


मसुदा समिती

आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)

२) एन. गोपालस्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

४) के.एम.मुन्शी

५) सय्यद मोहमद शादुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)

मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.

तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.

- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.


मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?


पहिले वाचन

४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.


दुसरे वाचन

दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.


तिसरे वाचन

तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.


राज्य घटना प्रत्यक्ष लागू

- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-



राज्य घटनेची वैशिष्ट्ये :


a)विस्तृत लिखित राज्यघटना:

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.

मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:

- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.

- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.

- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.

- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.


c) मुलभूत हक्क:

- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.

- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.

- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.


d) लवचिक व ताठर राज्यघटना :

- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.

- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.

- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.

- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.


e) मुलभूत कर्तव्य :

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.

- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.

- ही केवळ आदर्शे आहेत.


f) निधर्मी राष्ट्र:

- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.

- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.

- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


g) मार्गदर्शक तत्व:

- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.

- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.

- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.


h) एकेरी नागरिकत्व :

- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.

- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.


i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :

- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)


j)मतदानाचा अधिकार :

- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.

- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.


k)आणीबाणीची तरतूद :

- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.


l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:

- केंद्र, राज्य, पंचायत राज

- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.

- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.

- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.


राज्यघटनेविषयीचे काही दोष:

1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.

2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”

3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”


  अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मसुदा समिती (Drafting Committee)

📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.


राज्यघटना टेस्ट क्र १♦️


1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?

१. ४४✅

२. ४८

३. ४६

४. ५०


2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.

१. घटनेचा मसुदा

२. मूलभूत अधिकार 

३. घटनेचा सरनामा ✅

४. मार्गदर्शक तत्त्वे


3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?

१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅

२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण

३. लोकपाल 

४. लोकायुक्त


4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?

१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅

२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो 

३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते

४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो


5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

१. गृहमंत्री

२. पंतप्रधान✅

३. राष्ट्रपती

४. उपराष्ट्रपती


5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?

१. महाराष्ट्र विधानसभा - 278

२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88

३. लोकसभा - 543

४.राज्यसभा - 250✅


6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.

१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅

२. हुंडा पद्धती बंद करणे

३. निरक्षरता दूर करणे 

४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे


7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब

२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 

३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅

४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार


8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?

१. कलम 21 

२. कलम 23 

३. कलम 24 ✅

४. कलम 28


9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?

१. कलम 350

२. कलम 368✅

३. कलम 370 

४. कलम 360


10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?

१. महाराष्ट्र 

२. राजस्थान 

३. जम्मू कश्मीर 

४. आंध्र प्रदेश✅


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू


3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4


5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅


7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅


9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅

२.31 ते 35

३.22 ते 24

४.31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.


१.राष्ट्रपती✅

२.उपराष्ट्रपती

३.पंतप्रधान

४.राज्यपाल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?


१.राष्ट्रपती

२ राज्यपाल

३.पंतप्रधान

४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅



4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅

२.29 ऑगस्ट 1947

३.10 जानेवारी 1947

४.9 डिसेंबर 1946



5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1

२.परिशिष्ट-2

३.परिशिष्ट-3✅

४.परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅

२.48

३.52

४.यापैकी नाही



7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर

२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅

३.पंडित नेहरू

४.लॉर्ड माऊंटबॅटन



8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद

२.डॉ. आंबेडकर✅

३.महात्मा गांधी

४.पंडित नेहरू



9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा

२.विधानसभा

३.राज्यसभा✅

४.विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅

२.मंत्रीमंडळ

३. राज्यसभा सदस्य

४. राष्ट्रपती


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.


वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 


या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?


१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.


अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.


ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.


क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.


ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड


१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 



२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे


३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅



४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅



५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही


6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?

१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

२.भारतीय राज्यघटना✅

३.माहिती व प्रसारण मंत्रालय

४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया


7) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?

१.२/३

२.१/४

३.१/३✅

४.३/४


8.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?

१. नियोजन मंत्री

२.वित्तमंत्री

३.पंतप्रधान✅

४.राष्ट्रपती


9. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?

१.राष्ट्रीय विकास परिषद

२.आंतरराज्य परिषद

३.नियोजन आयोग

४.वित्त आयोग✅


10. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?

१.जवाहरलाल नेहरू

२.सरदार पटेल✅

३.महात्मा गांधी

४.मोतीलाल नेहरू


१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.

१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये

३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅

४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास


२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?

१) बिहार    २) किंद्रीय प्रांत ✅   ३) बॉम्बे    ४) पंजाब


३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.

अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता

क) समान अखिल भारतीय सेवा

१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व✅


४) योग्य क्रम निवडा

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे


५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?

१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये ✅   ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे


६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?

१) २१  ✅   २) २२     ३) २३     ४) २४


७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?

समिती     -     अध्यक्ष

१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद      

२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी

३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी

४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅


८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?

१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४✅


९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?

१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू


१०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?

१)प्रौढ मताधिकार

२)साम्राज्य अंतर्गत शासन✅

३)सापेक्ष स्वायत्तता


1.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?

1. 30 वर्षे

2. 21 वर्षे

3. 25 वर्षे✅

4. 18 वर्षे


2.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?

1. मुख्यमंत्री

2. राज्यपाल✅

3. राष्ट्रपती

4. यापैकी नाही


3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?

1. पंतप्रधान व मुख्यमंत्री

2. राज्यपाल✅

3. राष्ट्रपती

4. मुख्य न्यायमूर्ती


4.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?

1. तहसीलदार

2. जिल्हाधिकारी✅

3. आयुक्त

4. उपजिल्हाधिकारी

  


5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?

1. १ मे १९६०

2. १ मे १९६१

3.  १ मे १९६२✅

4.  १ मे १९६४


6. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती? 

1. अकलूज

2. इस्लामपूर✅

3. मिरज

4. सांगली


7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत 

1. लोकसभा

2. पंचायतराज संस्था

3. राज्य विधिमंडले

4. यापैकी nahi✅


8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती? 

1.पाच

2. सात✅

3. नऊ

4. अकरा


9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?

1. चावडी

2. पार

3.दफ्तर

4. सजा✅


10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?

1. तहसीलदार✅

2. उपविभागीय अधिकारी

3. जिल्हाधिकारी

4. विभागीय अधिकारी

राज्यघटना प्रश्नसंच

१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम 360 ✅✅✅

ड) कलम 365


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅✅✅

ड) वरीलसर्व


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅✅✅

ड) सहा महिने


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅✅✅

ड) महाराष्ट्र


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅✅✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅✅✅

ड) यापैकी नाही


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅✅✅

ड) व्ही. के. सिंग


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅✅✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅✅✅

क) कलम २६३

ड) कलम २६४


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅✅✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७


११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅✅✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 


१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅✅✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे


१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅✅✅


१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅✅✅


१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅✅✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅✅✅

२.31 ते 35

३.22 ते 24

४.31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅✅✅

२.उपराष्ट्रपती

३.पंतप्रधान

४.राज्यपाल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती

२ राज्यपाल

३.पंतप्रधान

४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅✅✅



4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅✅✅

२.29 ऑगस्ट 1947

३.10 जानेवारी 1947

४.9 डिसेंबर 1946



5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1

२.परिशिष्ट-2

३.परिशिष्ट-3✅✅✅

४.परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅✅✅

२.48

३.52

४.यापैकी नाही



7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर

२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅✅

३.पंडित नेहरू

४.लॉर्ड माऊंटबॅटन



8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद

२.डॉ. आंबेडकर✅✅✅

३.महात्मा गांधी

४.पंडित नेहरू



9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा

२.विधानसभा

३.राज्यसभा✅✅✅

४.विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅✅✅

२.मंत्रीमंडळ

३. राज्यसभा सदस्य

४. राष्ट्रपती