Wednesday 8 May 2024

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



🔶मचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🔶भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🔶दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.


🔶फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.


🔶हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🔶चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🔶उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.


🔶कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

अंतनिर्मित (intrusive/plutonic) अग्निजन्य खडकांचे प्रकार



१) डाईक (dyke)
-भूगर्भातील तप्त लाव्हारस भूकवचामध्ये असलेल्या उभ्या भेगांमध्ये साचतो व तो थंड होऊन लांबवत खडकांची निर्मिती होते त्यास डाईक असे म्हणतात
-उदाहरणार्थ इंग्लंडच्या उत्तर भागात क्लिवलँड डाईक ज्याची उंची सुमारे दीडशे मीटर आहे

२) सिल (sill )व शीट
-जलजन्य किंवा रूपांतरित खडकांच्या आडव्या भेगेत लावारस येऊन साचतो व कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते ते त्यास सील असे म्हणतात
-याच पातळ किंवा कमी जाडीच्या खडकास शीट असे म्हणतात

३) लॅकोलिथ(lacolith)
-भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी खडक घुमटासारखे वर उचलले जातात आणि निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये हे लाव्हारसाचे निक्षेपण होते हे आणि त्यापासून घुमटाकार खडक तयार होतात त्यास लकोलिथ असे म्हणतात
-याची निर्मिती ती जलजन्य खडकांमध्ये होते
-संयुक्त संस्थानातील उटाह राज्यातील लासाल पर्वत आणि हेनरी पर्वत ही प्रमुख उदाहरणे आहेत

४) लोपोलीथ
-जेव्हा लाव्हारस खोलगट किंवा उथळ भागात साचतो आणि कालांतराने थंड होऊन बशीच्या(saucer shaped) आकारासारखा आकार निर्माण होतो त्यास लोपोलिथ असे म्हणतात

५) फेकोलिथ(phacolith)
-भूगर्भातील खडकांना जेव्हा घडीचा आकार प्राप्त होतो तेव्हा अशा खडकांमध्ये अपनती आणि अभिनती असतात . तेथे लाव्हारसाचे निक्षेपण होऊन वलयाकार भूआकार निर्माण होतो त्यास फेकोलीथ असे म्हणतात

६) बेथोलिथ (batholith)
-पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तप्त लावारस वर येण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा भूकवचामधील विस्तीर्ण व खोलगट पोकळीमध्ये लाव्हारसाचे निक्षेपण होते, येथे तयार होणाऱ्या विस्तीर्ण खडकाला batholith असे म्हणतात

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 🅾️

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 🅾️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾️


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾️

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 

A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾️


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾️


41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे. 

A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾️

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 

A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾️

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 

A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾️


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾️

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 

A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾️


47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾️


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर 🅾️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट     ब. अनुताई वाघ     क. ताराबाई मोडक     ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾️

D. ब, क

Decline of Mughal power – मुघल सत्तेचा ऱ्हास

● पार्शभूमी

● १२ च्या शतकाच्या अखेरीस घुरचा महमूद (Mahamud of Ghur) याने भारतावर हल्ले केले. त्यांच्या परिणामस्वरूप सन १२०६ मध्ये त्याचा गुलाम कुत्बुद्दिन ऐबक याने ‘दिल्ली सल्तनत’ (Delhi Sultanate) ची स्थापना केली.

● सन १२०६ ते १५२६ दरम्यान दिल्ली सल्तनतच्या पाच घराण्यांनी राज्य केले: गुलाम घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी घराणे. तुघलक घराण्याच्या हासानंतर १४ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत बहमनी राज्य (१३४७ ते १५ व्या शतकाची अखेर) व विजयनगर साम्राज्य (१३३६ ते १६ व्या शतकाची अखेर) या राज्यांची निर्मिती झाली.


● पुढे १५ व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यांची निर्मिती झाली: अहमदनगरची निझामशाही (१४९०-१६३३), विजापूरची अदिलशाही (१४९०१६८६), व-हाडची इमादशाही (१४९०- १५७४),गोवळकोंड्याची कुतुबशाही (१५१८-१६८७), व बिदरची बारिदशाही (१५२८-१६१९).

● पानिपतच्या पहिल्या युद्धात (१५२६) दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोधी याचा पराभव बाबरने केला. (बाबर हा मध्य आशियातील समरकंदचा शासक होता, मात्र पराभवामुळे त्याला राज्य गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला दक्षिणेकडे २ स्थलांतर करावे लागले. त्याने प्रथम काबूल काबीज करून
नंतर भारतावर स्वारी केली.) अशा रितीने बाबरने भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित केली. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून (१५३०-४० व १५५५-५६) याने राज्य केले.मुघल साम्राज्याचा खरा विस्तार अकबर (१५५६-१६०५),जहांगीर (१६०५-२७), शहाजहान (१६२७-५८) व औरंगजेब (१६५८-१७०७) यांच्या काळात घडून आला.त्यामुळे औरंगजेब पर्यंतच्या मुघल बादशाहांना ‘साम्राज्यवादी मुघल’ (Imperial Mughals) असे म्हणतात.

● औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर (१७०७) मात्र मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. औरंगजेबानंतरच्या बादशाहांना ‘उत्तर मुघल’ (Later Mughals) म्हणतात. १८५७ च्या उठावापर्यंत मुघल बादशहांनी दिल्लीहून राज्य केले, मात्र ते केवळ नावाचेच ‘बादशाह’ होते. त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेश सतत कमी होत गेला. शाहआलम दुसरा तर ‘निर्वासित बादशाह’ (fugitive emperor) होता,
त्याला महादजी शिंदेंनी दिल्लीच्या गादीवर पुन्हा प्रस्थापित (reinstate) केले.

● औरंगजेबानंतरच्या मुघल बादशाहांबद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:

◆ १)बहादूर शाह पहिला (१७०७-१२)

● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल गादीसाठी त्याच्या तीन मुलांमध्ये झालेल्या युद्धानंतर बहादूर शाह बादशाह बनला. सत्तेवर ते आल्यावर त्याने शाहआलम पहिला हे नाव धारण केले.

● त्याच्या काळात शिखांबरोबर समझौता होऊन गुरू गोविंद सिंह यांना मुघल सेवेत घेण्यात आले. मात्र ही युद्धबंदी तात्पुरती ठरली. गुरू गोविंद सिंह यांच्या मृत्यूनंतर (१७०८) शिखांनी बंदा बहादूरच्या नेतृत्वाखाली मुघलांविरूद्ध बंड केले.

● बुदेला व जाट यांबरोबरही मुघलांचा समझौता होऊन त्यांचे प्रमुख अनुक्रमे छत्रसाल व चुडामण यांना मुघल सेवेत घेण्यात आले.

● बहादूर शाहाने छ. शाहू राजांना (संभाजी महाराजांचा पुत्र) कैदेतून मुक्त केले. शाहू राजे महाराष्ट्रात परतल्याने ताराबाई व शाहू यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले.

◆ २)जहांदर शाह (१७१२-१३)

● बहादूर शाहाच्या चार मुलांमध्ये गादीसाठी झालेल्या संघर्षात जहांदर शाह यशस्वी ठरला. झुल्फिकार खान या मुघल सरदाराने (nobles)किंग-मेकर म्हणून कार्य कगागात्ती हाशा केलेल्या मदतीने तो गादीवर आला.

◆ ३)फारूक सियार (१७१३-१९)


•फारूक सियार सय्यद बंधू (अब्दुल्ला खान व हुसून अली) या सरदारांच्या मदतीने गादीवर आला. अब्दुल्ला खानला वझीर तर हुसेन अलीला मीर बक्षी बनविण्यात आले. मात्र त्याचबरोबर बादशाह व सय्यद बंधू यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. सय्यद बंधूंनी फारूकचा खून घडवून आणला व बहादूर शाहचा नातू रफी-उद-दरजत याला बादशाह बनविले. मात्र त्याला लवकरच मृत्यू झाला.

● फारूक सियारच्या काळात शिखांचा नेता बंदा बहादूर यास पकडण्यात आले व मारण्यात आले.

● १७१७ चे फर्मान: १७१७ मध्ये फारुक सियारने फर्मान जारी करून ईस्ट इंडिया कंपनीला गुजराथ व दख्खनमध्ये व्यापारी विशेषाधिकार प्रदान केले.

◆ ४)मुहम्मद शाह (१७१९-४८)

● रफीच्या मृत्यूनंतर सय्यद बंधूंच्या मदतीने मुहम्मद शाह गादीवर आला. १७२० मध्ये इतर सरदारांनी सय्यद बंधूंविरूद्ध कट रचून त्यांचा खून घडवून आणला.

● ऐशोआराम व राज्य कारभाराकडे दुर्लक्ष यांमुळे मुहम्मद शाहला (मुहम्मद शाह ‘रंगिला असे नाव पडले. त्याच्या काळात १७३८ मध्ये पहिल्या बाजीरावाने दिल्लीवर हल्ला करून दिल्लीत प्रवेश केला.

● मुहम्मद शाहच्या काळातच हैद्राबाद, अवध व बंगाल ही प्रादेशिक स्वायत्त राज्ये निर्माण झाली. मुघलांच्या सेवेत असलेल्या सरदारांनी/सुभेदारांनी मुघलांपासून विभक्त होऊन त्यांची स्थापना केली.

● १७३८-३९ मध्ये अफगाणिस्तानचा शासक नादीर शाह याने भारतावर हल्ला केला व दिल्लीची कठोरपणे लूट केली. त्याने मुघलांकडून सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश काढून घेतला. तसेच नादीर शाहने मुघलांकडून कोहीनूर हिरा, मयुरासन (Peacock Throne) व इतर मौल्यवान वस्तू बळकावल्या.

◆ ५)अहमद शाह (१७४८-५४)

● अहमद शाहच्या काळात अहमद शाह अब्दालीचे
(अफगाणिस्थानचा शासक व नादीर शाहचा पूर्वीचा जनरल) भारतावरील हल्ले. सुरू झाले. अहमदशाहाचा वझीर इमादउल-मुल्क याने त्यास आंधळे बनवून आलमगीर दुसरा यास गादीवर बसविले.

◆ ६)आलमगीर, दुसरा (१७५४-५९)

● त्यास १७५९ मध्ये त्याचा वझीर इमाद-उल-मुल्क याने ठार केले.

◆ ७)शाहआलम, दुसरा (१७५९-१८०६)

● तो आलमगीर, दुसरा याचा मुलगा होता. सत्तेवर आल्यावरही १२ वर्षे तो त्याच्या वझीराच्या भितीमुळे आपल्या राजधानीत राहत नव्हता.

● १७६४ मध्ये बक्सरच्या लढाईत मीर कासीम व शुजा उद्दौल्ला यांच्या बरोबर शाहआलम पराभूत झाला. १८०३ मध्ये इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा मिळविला व शाहआलमला अटक केला.
जारी इंग्रजांच्या कैदेतच त्याचा १८०६ मध्ये मृत्यू झाला.

◆ ८)अकबर, दुसरा (१८०६-३७)

● अकबर, दुसरा याने राम मोहन रॉय यांना राजा’ ही पदवी देऊन त्यांना इंग्लंडला पेन्शन वाढीसाठी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पाठविले.

◆ ९)बहादूरशाह जफर, दुसरा (१८३७-६२)

● हा शेवटचा मुघल बादशाह ठरला. १८५७ च्या उठावानंतर त्याला १८५८ मध्ये रंगूनला हद्दपार करण्यात आले, जेथे त्याचा १८६२ मध्ये मृत्यू झाला. बादशाह बहादूरशाह जफर हा उच्च प्रतिभेचा कवी होता. त्याने आपल्या व्यथा ‘गझलां’मधून नोंदवून ठेवल्या आहेत. रंगूनच्या तुरुंगात अत्यंत दयनीय जीवन जगणारा हा कविमनाचा बादशाह उद्याच्या आपल्या दशनीय मृत्यूचे उद्धस्त चिंतन करतांना म्हणतो,
“कितना है बदनसीब जफर दफन के लिये
दो गज जमीन भी न मिली कोई यार में”
(अरे जफर किती दुदैवी आहेस, तुला तुझ्या आप्त, मित्रांच्या साक्षीने तुझ्या मातृभूमीत तुला पुरण्यासाठी दोन हात जमीनदेखील नाही.)

1857 पूर्वीचे उठाव

 1. रामोशांचा उठाव


०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.


०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.


०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.


०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.


०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.


०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.


०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.


०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.


१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.


११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.


१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.


2. कोळ्यांचा उठाव


०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.


०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.


०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.


०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.


०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.


3. भिल्लांचे उठाव


०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.


4. गौंड जमातीतील उठाव


०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला.


5. हटकरांचा उठाव


०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.


०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.


6. धर्माजी प्रतापरावाचा उठाव


०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.


7. कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव


०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.


०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.


०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.


०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले

पोलीस भरती


1】' राजुला प्रेमाचे पत्र आले ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?

1)चेताणगुणोक्ती 

2)ससंदेह 

3)श्लेष  

4)अपन्हुती


उत्तर- श्लेष


 2】' त्याने अभ्यास केला ' प्रयोग ओळखा ?

1)भावे प्रयोग 

2)कर्तरी प्रयोग 

3)कर्मणी प्रयोग 

4)संकीर्ण प्रयोग 


उत्तर- कर्मणी प्रयोग


 3】' श्रीरामनवमी ' हा शब्द किती अक्षरी आहे ?

1)सहा 2)सात 

3)नऊ  4)आठ


उत्तर- सहा


 4】विसर्ग हा एक ..... वर्ण आहे.

1)तालव्य 2)ओष्ठय 

3)कंठय   4)दंततालव्य


उत्तर- कंठय


 5】' मला परीक्षेत पहिला नंबर मिळाला पाहिजे ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

1)आज्ञार्थी 2)स्वार्थी 

3)विध्यर्थी 4)संकेतार्थी


उत्तर- विध्यर्थी


 6】खालील वाक्यातील अलंकार ओळखा 

शरीराच्या ठेवणीप्रमाणे नीलूच्या सवयी व स्वभावही वेगळा होता

1)रूपक 2)उपमा 

3)उत्प्रेक्षा 4)स्वभावोक्ती


उत्तर- उपमा


 7】यक्षप्रश्न असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा ?

1) महत्वाची गोष्ट असणे 

2) योग्य प्रश्न असणे 

3) अयोग्य प्रश्न असणे

4)महत्वाची गोष्ट नसणे


उत्तर- योग्य प्रश्न असणे


 8】मी खूप लिहू लागलो-कविता, कथा, चित्रपटकथादेखील !

वरील वाक्याचा प्रकार सांगा ?

1)मिश्र वाक्य 

2)संयुक्त वाक्य 

3)केवल वाक्य 

4)संयुक्त-मिश्र वाक्य


उत्तर- केवल वाक्य


 9】अबीरमंजिरी या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ?

1)अव्ययीभाव समास 

2)तत्पुरुष समास 

3)द्वंद्व समास 

4)बहूव्रीही समास


उत्तर- द्वंद्व समास


 10】गर्द या शब्दाच्या विरुद्ध अर्थचा शब्द निवडा ? 

1)पातळ 2)विरळ 

3)दाट    4)कमी


उत्तर- विरळ


 11】कपडा शिवताना कडेने सोडलेल्या जागेस काय म्हणतात?

1)माया 2)तट 

3)सूत   4)तीर


उत्तर- माया


 12】कोल्हा : लबाड : : सिंह : ?

1)चपळ 2) हिंस्र 

3) राजा 4) आळशी


उत्तर- हिंस्र


13】' रुधिर ' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा? 

1)पाणी    2)रक्त 

3)म्हातारा 4)दारू


उत्तर- रक्त


 14】खलीलपैकी वेगळा पर्याय ओळखा? 

1)नोटा 2)लाटा 3)गोटा 4)वाटा


उत्तर- गोटा


 15】अनुक्रमे पुलिंगी-स्त्रीलिंगी-नपुसकलिंगी असलेला पर्याय ओळखा?

1)मन-भाव-भावना

2)वाट-रास्ता-वळण 

3)देश-मातृभूमी-राष्ट्र 

4)पाणी-लाट-समुद्र


उत्तर- देश-मातृभूमी-राष्ट्र


 16】समोर असलेल्या नमुन्याप्रमाणे जसेच्या तसे लिहिणे म्हणजेच......होय?

1)श्रुतलेखन 2)गतिलेखन

3)शुद्धलेखन 4)अनुलेखन


उत्तर- अनुलेखन


 17】खालीलपैकी भाषेची ग्रहनात्मक कौशल्ये कोणती आहेत?

 1)वाचन-लेखन

 2)भाषण-लेखन

 3)वाचन-श्रवण

 4)भाषण-श्रवण


उत्तर- वाचन-श्रवण


 18】वेगळा पर्याय निवडा ? 

1)पानिपत 2)झाडाझडती

3)मृत्युंजय 4)महानायक


उत्तर- मृत्युंजय


 19】वेगळा पर्याय निवडा ?

 1)खग 2)अचल 

 3)शैल  4)नग


उत्तर- खग


 20】वेगळा पर्याय निवडा ? 

1)मृग   2)सारंग 

3)कुरंग 4)कुंजर


उत्तर- कुंजर


 21】खालील पर्यायात संयुक्त क्रियापद असलेला पर्याय निवडा.

1)येऊन कर 2)पाळायला जा

3)मारून ये  4)खाऊन जा


उत्तर- पाळायला जा


 22】'तू फूल तोडलेस' या वाक्याचा प्रयोग सांगा?

1)कर्तृ-कर्म  2)कर्तृ-भाव 

3)कर्म-भाव 4)कर्म-कर्तृ


उत्तर- कर्तृ-कर्म


 23】वेगळा पर्याय निवडा.

1)भेरी    2)पडघम 

3)नगारा 4)तकलुबी


उत्तर- तकलुबी


 24】'अंगांत मांग शिरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा? 

1) त्वेष चढणे 

2) अंगात वारे येणे 

3) चांगले कृत्य करणे 

4) वाईट गोष्ट बोलणे


उत्तर- त्वेष चढणे


 25】'पहिली वस्तू मागणारा' या शब्द समुहासाठी योग्य शब्द सांगा?

1) भिकारी 2) मागरा 

3) हावरट  4) मळगी


उत्तर- मागरा


 26】मोठा भाऊ या टोपणनावाने कोणास ओळखले जाते? 

1) वि. वा. शिरवाडकर 

2) प्र. के. अत्रे 

3) कृ. के. दामले   

4) चि. त्र्यं. खानोलकर


उत्तर- वि. वा. शिरवाडकर

महादजी शिंदे



पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.


महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.


सैनिकी कारकीर्द


दक्षिण भारत


महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.


उत्तर भारत


१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६ बडी साद्री


मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.


ग्वालहेरचे शासक


जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या कडे शिंदे घराण्याची सुत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्द मराठे असा मोठा सामना तयार झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीब कडून क्रुरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्दच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली. मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान बनले.


पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द


पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.


पहिले इंग्रज-मराठा युद्ध


1७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.


वडगावची लढाई


१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.


१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली


सिप्री येथील हार


ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.


सालबाईचा तह १७ मे १७८२


महादजीच्या इंग्रजांकडून पराभव झाल्या नंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदीने तहची बोलणी केली जो सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला व उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली.


इंग्रजाशी तहानंतर इंग्रजांशी असलेल्या शस्त्र संधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.


निजाम राजवटीची स्थापना


1. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.


2. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.


3. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.


4. मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२० मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.


5. निजाम व मोगल सरदार मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.


6. पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात.


7. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले. इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान अलीचे स्वप्न होते.


8. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला दिले.


9. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.


इंग्रज निजाम संबंध


1. निजामाच्या हाताखाली दक्षिणेतील सहा सुभे आणि त्यांतील कडप्पा, कुर्नूल, अर्काट, शिरे व सावनूर हा नबाबाचा प्रदेश होता. याशिवाय म्हैसूर, तंजावर संस्थांनाचे राजे त्याचे मांडलिक म्हणून समजले जात.


2. दक्षिणेत त्यास प्रथम मराठे नंतर इंग्रज, हैदर व टिपू हे प्रतिस्पर्धी होते. मराठ्यांचे बळ खच्ची करण्याकरिता निजामाने अनेक उपाय योजले; पण त्याच्या सर्व कारस्थानांना शह देणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्याने निजाम व दिल्लीकर मोगल यांचे संबंध तोडण्याचे प्रयत्न करुन निजामाच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळविल्या.


3. १७४८ मध्ये निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर निजामशाहीत गोंधळ माजला. नवा निजाम नासिरजंग याच्याविरुद्ध त्याचा भाचा मुजफ्फरजंग याने बंड पुकारुन अर्काटच्या नबाबामार्फत फ्रेंचांशी संधान बांधले. या प्रकरणी झालेल्या लढायांत प्रथम नासिरजंग व नंतर मुजफ्फरजंग मारले जाऊन, नासिरजंगाचा भाऊ सलाबतजंग गादीवर आला सलाबतजंगाच्या दरबारी फ्रेंचांचे वर्चस्व वाढून उत्तर सरकार या नावाने ओळखला जाणारा प्रदेश फ्रेंच सैन्याच्या खर्चासाठी देण्यात आला.


4. १७५५ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध होऊन उत्तर सरकारचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा ताबा कबूल करण्यात यावा आणि त्याबाबत कंपनीतर्फे काही ठराविक रक्कम निजामाला देण्यात यावी, अशी बोलणी करण्याकरिता इंग्रजांनी आपले दोन अधिकारी हैदराबादला सलाबतजंगाकडे पाठविले, हाच निजाम व इंग्रजांचा आलेला पहिला संबंध होय. सलाबतजंगाने इंग्रजांची मागणी मान्य केली व उत्तर सरकारचा प्रदेश कायमचा इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला.


5. सलाबतजंगाला गादीवरुन काढून त्याचा धाकटा भाऊ निजाम अली १७६२ मध्ये निजाम बनला. त्याने आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत हैदर अली व टिपू यांच्याशी झालेल्या युद्धांनंतर इंग्रजांशी पूर्ण सहकार्य करुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.


6. १७९५ मध्ये निजाम अलीने मराठ्यांविरुद्ध इंग्रजांनी आपणास मदत करावी, अशी मागणी केली पण इंग्रजांनी निजामाची विनंती नाकारली. त्याचा परिणाम म्हणजेच खर्ड्याच्या लढाईत (१७९५) पराभूत होऊन निजामास मराठ्यांबरोबर नामुष्कीचा तह करावा लागला.


7. इंग्रजांनी या युद्धात आपल्याला मदत केली नाही, याचे वैषम्य वाटून निजामाने आपल्याकडे असलेल्या इंग्रजी सैन्याला परत पाठविले, पण स्वतःचा मुलगा अलीजाहने बंड केल्याने निजामास हे सैन्य परत बोलवावे लागले.


8. या काळात निजामाच्या सैन्यात फ्रेंचांचे बरेच वर्चस्व होते. पण १७९८ मध्ये फ्रेंच सेनापती मुसा रेमाँच्या मृत्यूनंतर हे सैन्य बरखास्त करावे, अशी इंग्रजांनी केलेली मागणी निजामाने मान्य केली. यामुळे फ्रेंचांची मक्तेदारी संपून निजामाच्या दरबारात इंग्रजांचे वर्चस्व वाढले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणच्या टिपूविरुद्धच्या लढाईत निजामाने इंग्रजांस मदत केली. लॉर्ड वेलस्लीने सुरु केलेल्या तैनाती फौजेच्या पद्धतीस निजाम बळी पडला.


9. १२ ऑक्टोबर १८०० मध्ये निजाम व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात तह झाला. या तहान्वये निजामाच्या संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबाद येथे कायम ठेवण्यात आली. निजामाने भारतातातील कोणत्याही सत्ताधीशांबरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही, असे कबूल केले.


10. इंग्रजी फौजेच्या खर्चाकरिता श्रीरंगपटणच्या लढाईत मिळालेले कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर व बल्लारी हे जिल्हे निजामाने इंग्रजांना कायमचे दिले. त्यांच्या मोबदल्यात निजामाचे परचक्रापासून व राज्यातील बंडखोरीपासून रक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी घेतलीयावेळेपासून निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले.


11. ही घटना निजाम अलीचा मुलगा सिकंदरजाह, सरदार महिपतराव वगैरेंना आवडली नाही. त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारस्थाने व हैदराबाद राज्याविरुद्ध बंडे सुरु केली. १८०० ते १८५७ या काळातील सिकंदरजाह, रावरंभा निंबाळकर, महिपतराव वगैरेंची कारस्थाने, त्याचप्रमाणे निरनिराळ्या जमातींची व व्यक्तींची बंडे मुख्यतः इंग्रजी सैन्याने मोडून काढली.१८५७ च्या उठावात हैदराबादच्या जनतेने भाग घेतला, पण इंग्रज आणि सालारजंग यांनी या चळवळीचा बंदोबस्त करण्यात यश मिळविले.


12. १८५७ नंतरच्या काळात मुख्यतः निजाम व इंग्रजांविरुद्धच्या हैदराबादमधील जनतेच्या सनदशीर चळवळींचा समावेश होतो. त्यांत १८९२ मधील आर्यसमाजाची स्थापना, १९०५ मधील स्वदेशी चळवळ, १९१० मधील दहशतवाद्यांची कृत्ये, १९२१ मधील आंध्र महासभा व स्टेट रीफॉर्म्स असोसिएशनची स्थापना व १९३८ मधील काँग्रेस, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचा सत्याग्रह वगैरे महत्त्वाच्या घटना होत.


13. १८८० पासून हिंदी मुसलमानांचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून इंग्रजांनी, निजाम व त्याचे अधिकारी यांच्या मनात, हैदराबादच्या राज्यास मोगली साम्राज्याचा अवशेष व मुसलमान संस्कृतीचे प्रतीक म्हणून विशिष्ट स्थान आहे, अशा प्रकारची कल्पना भरविली.


14. अर्थात त्यामुळेच पुढील राजकारणात निजामाने इंग्रजांना नुसतीच मदत केल

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.

महाराष्ट्राविषयी माहिती


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई


▪️उपराजधानी - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36


▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.


▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


महाराष्ट्र पोलीस भरती भूगोल imp माहिती.


(1) ✅️   महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.


(2) ✅️  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई


(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.


(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔


(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.


(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.


(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


(27) ✅️  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


(28) ✅️ पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


(30) ✅️ परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


(34) ✅️ पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. 


(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


(42) ✅️ सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.


(43) ✅️  सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.


(45) ✅️  सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


(46) ✅️ बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


(47) ✅️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.


(50) ✅️ पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


(53) ✅️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


(56) ✅️ नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


नद्या स्पेशल

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 

✅ - कृष्णा. 


2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

✅  - कृष्णा


3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 

✅ - कृष्णा. 


4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?

✅  - पुणे.


5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - हरीपुर.


7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - नरसोबाची वाडी. 

 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?

 ✅ - देहु. 


9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

✅  - कोयना. 


10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?

✅  - खडकवासला. 


11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - मुठा.


12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 

✅ - राधानगरी. 


13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - वारणा. 


15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - नीरा.


16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - सातारा. 


17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - भीमा. 


18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?

✅  - कोल्हापूर.


19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?

✅  - पुणे. 


20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - पुणे. 


भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी

1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते


2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास


3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ


4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस


5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस


6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ


7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस


8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये


9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास


10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस


11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस


12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस


13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास


14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास


15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास


16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस


17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास


18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ


19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात


20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस.


21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)


22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस


भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती


१) तापी नदी :--

    

-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 

--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो. 

--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते. 

--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. 

 

-------------------------------------------------


(२) गोदावरी नदी :--


-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब 

अशी नदी आहे. 

--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र 

आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व 

बंगालच्या उपसागरास मिळते. 

--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. 


---------------------------------------------------


(३)कृष्णा नदी :--


-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे 

उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते. 

--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत. 


-------------------------------------------------


(४) गंगा नदी :--


-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची 

नदी आहे. 

--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. 

--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. 


---------------------------------------------------


(५) सिंधू नदी :--


-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू 

नदीच्या काठीच झाला. 

--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी


नदी:-उगम:-लांबी:-उपनदया:-कोठे मिळते


गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास


यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ


गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस


घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस


गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ


दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस


ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये


सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास


झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस


रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस


सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस


नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास


तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास


साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास


चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस


महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास


गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ


कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात


भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस


कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)


तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस


Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...