Sunday 1 May 2022

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

                    व्यक्तीच्या परस्पर सहचार्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. व या सामाजिक संबंधाचा  वैज्ञानिक पद्धतीने आभ्यास केला पाहिजे .असे काही विचारवंतांना वाटू लागले व त्यांनी या सामाजिक संबंधाचा शास्त्रीय पद्धतीने आभ्यास करावयास सुरुवात केली व त्यामुळे प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत  केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .

         समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधाचा आभ्यास केला जातो व हा आभ्यास करत असताना निरीक्षण , वर्गीकरण , गृहीत कृत्य , पूर्वकथान व निष्कर्ष इत्यादी  मार्गाचा अवलंब समाजशास्त्रामध्ये करता येणे शक्य अाहे.असे प्रतिपादन ऑगस्ट कॉम्त यांनी 1828 मध्ये स्पष्ट केले व तेथुनच समाजशात्रीय विचाराची सुरुवात झाली व समाजशात्रीय विचार विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले योगदान दिल्याचे दिसून येते. हे विचारवंत आपण खाली पाहूया यात भारतीय विचारवंत देखील आहेत .

विचारवंत

*ऑगस्ट कॉम्त (19 जानेवारी 1798)फ्रेंच

*हबेर्ट स्पेन्सर (27 एप्रिल 1820)लंडन

*इमाईल दरखीम(15 एप्रिल 1858)फ्रांस

*मॅक्स वेबर (21 एप्रिल 1864)जर्मन

*कार्ल मार्क्स (5 मे 1818)जर्मन

भारतीय विचारवंत
संपादन करा
*जी.एस. घुर्यें (12 डिसेंम्बर 1893)

*एम. एन. श्रीनिवास (1916)

*मुजुमदार

*इरावती कर्वे

             वरील सर्व विचारवंतांपैकी ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.

ऑगस्ट कॉम्त :-

                       ऑगस्ट कॉम्त यांनी खऱ्या अर्थाने शास्त्रीय दृष्टीकोनातून समाजशास्त्रीय विचारास सुरुवात केली. ऑगस्ट कॉम्तचा जन्म 19 जानेवारी 1798 रोजी झाला. फ्रान्समधील मॉटपेलिअर या शहरात झाला. त्यांचे आई वडील कॅथलिक पंथाचे अनुयायी होते. तर कॉम्त हा कॅथलिक पंथावर टीका करणारा होता. मानावी जीवनचा

विकास घडवून आणण्यासाठी काय करता येईल? याचा विचार करण्यासाठी कॉम्त ने आपले सर्व आयुष्य खर्च केले. या थोर विचारवंतांचे 5 सप्टेंबर 1857 मध्ये निधन झाले. ऑगस्ट कॉम्त यांनी त्यांच्या विहारांची मांडणी खूप छान प्रकारे केली आहे.

          ऑगस्ट कॉम्त ने प्रत्यक्षवाद या ग्रंथामध्ये तीन अवस्थेचा सिद्धांत मंडला. या तीन अवस्थेच्या सिद्धांतात त्याने सर्व मानवी समाजातसर्व काळात मानवी बुद्धीच्या विकासाचा आढावा घेतला. यात कॉम्त म्हणतो, मानवी बुद्धीचा विकास, शास्त्राची प्रगती, मानवी समाजाचा विकास या तीन एकामागून एक येणाऱ्या अवस्थेतून  झालेला आहे. ती अवस्था काल्पनिक अवस्था, अध्यात्मिक किंवा तात्त्विक अवस्था, प्रत्यक्षवादी व वैज्ञानिक अवस्था या तीन अवस्था आहेत.

      समाजाची रचना:-

                        कॉम्त म्हणतो, समाज विकासाच्या तीन अवस्था मधे समाज पायावस्था व समाज रचना ही सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची असते . काल्पनिक अवस्थेमध्ये राजेशाही आसते व लष्कराचे राज्य असते .राजा हा सर्व ठिकाणी ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार मनाला जातो .ईश्वर हा राजाचा राजा असून त्याच्या इच्छेनुसार सर्व कारभार चालतो. राजाची आज्ञा न मानल्यास त्यांना शिक्षा मिळते व तुलना नैसर्गिक अधिकार नसतात.

         तात्त्विक अवस्थेमध्ये मानवी विचारांची स्थिती तिथेच न थांबता हळू हळू कल्पना अशी येत गेली की, प्रत्येक घटने मागे ईश्वरच असतो असे नाही.काही अमूर्त शक्ती आहेत व त्याच्यामुळे सुद्धा काही विश्वाच्या घडामोडी घडून येतात. या मानवी शक्तीचा विकास झाल्याचे दिसते.

         शेवटच्या वैज्ञानिक अवस्थेत समाजातब्बद्ल होतात. समाज उद्योग प्रधान बनतो. अनेक नवनवीन शोध लावले जातात.समाजात बौद्धिक सुधारणा होते व समाज जीवन सुखी व संपन्न होण्यास मदत होते.

          कॉम्तचा विज्ञानवादी सिंद्धान्त अतिशय प्रसिद्ध आहे विज्ञानवाद , प्रत्यक्षवाद  किंवा शास्त्रीय दृष्टीकोन असेही म्हणतात .कॉम्त विज्ञानवाद कशाला म्हणावे हे सांगताना ती स्वतःच गोंधळून गेलेला दिसतो. मात्र कॉम्त अवैज्ञानिक राहिला अशी त्याच्यावर टीका केली जाते .

कॉम्त विज्ञानवादाचा अर्थ शास्त्रीय शस्त्रविहित अभ्यास पद्धतीने असाे होतो. कॉम्त मानतो जगातील सर्व घडामोडी मग त्या कोणत्याही स्वरूपाचे असो निश्चित असा नैसर्गिक नियमाद्वारे घडवून येत असतात.

        कॉम्प्तची सामाजिक स्थित्यात्मक व गत्यात्मकतेच संकल्पना ही आहे. स्थित्यात्मक समाज शास्त्राविषयीचा  विचारांमध्ये अपणास व्यवस्थेचा विचार जाणवतो.तर गत्यात्मक समाजशास्त्रात प्रगतीचा विचार मांडला आहे . 

       

सामाजिक शास्त्र

सामाजिक शास्त्र

सामाजशास्त्र याच्याशी गल्लत करू नका.
मानवी वर्तन व समाज यांसंबंधीच्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान (Social science) असे म्हणतात.

सामाजिक शास्त्रे ही व्यापक संकल्पना असून् नैसर्गिक शास्त्र नसणाऱ्या सर्व शास्त्रांचा यात सामावेश होतो. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादि.

सामाजिक शास्त्र (इंग्लिश:Social Science) :-

अ) सामाजिक शास्त्र अर्थ :-

समाजातील मानवी वागणुकीचा, वर्तनाचा, हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.

समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो.

उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. हे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

१) अर्थशास्त्र :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

२) समाजशास्त्र ( इंग्लिश : SOCIOLOGY) :- मानवाच्या सामाजिक अंतरसंबंधाच्या वागणूक अभ्यास.[१]

३) राज्यशास्त्र :-  राज्यसंस्थेशी असणारा मानवी राजकीय वर्तनाचा अभ्यास.[२]

४) मानसशास्त्र :- मानवी मनाचा, मानवी वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो.[३]

५) मानववंशशास्त्र :- मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास.[४]

६) तर्कशास्त्र

७) इतिहास इ.

ब) सामाजिक शास्त्रातील नियम :- सामाजिक शास्त्र विषयांमध्ये मानवाच्या वेगवेगळ्या वागणुकीचा अभ्यास करून नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे अनेक नियम किंवा सिद्धांत तज्ञांनी मांडलेले आहेत मात्र हे सिद्धांत १००% अचूक नसतात. कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीचे विचार, बुद्धी, तत्त्वे, आवडीनिवडी, सवयी, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती इ. परिस्थिती वेगवेगळी असते अशा भिन्न प्रवृत्तीच्या सर्व लोकांना नियम लागू करण्यासाठी, हे नियम अचूक ठरण्यासाठी सामाजिक शास्त्रात सिद्धांतामध्ये "गृहीते" मांडावी लागतात.

उदा. अर्थशास्त्रात मागणीचा नियम, पुरवठाचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम इत्यादी अनेक नियमांमध्ये “इतर परिस्थिती कायम आहे” अशी गृहिते मांडेेलली आहेत.

क) संपूर्ण समाज हीच प्रयोगशाळा :-  सामाजिक शास्त्राचा अभ्यास, नियम किंवा सिद्धांत नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे बंदिस्त प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही, तर संपूर्ण समाज हीच सामाजिक शास्त्र विषयांसाठी एक प्रयोगशाळा असते.

समाजशास्त्र

समाजशास्त्र
मानवी समाज आणि त्याची उत्पत्ती, विकास, संस्था आणि संस्था यांचा वैज्ञानिक अभ्यास

सामाजिक शास्त्र याच्याशी गल्लत करू नका.
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[१] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[२] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.

व्यवस्थाबद्द ज्ञान सम्मुचयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.

नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.

सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.

थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाषी निगडीत असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.

शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्षनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.

आदर्श प्रमाणभूत मानुन अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नितीशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे.

समाजशास्त्र एक आधुनिक शास्त्र
संपादन करा
समाजशास्त्राचा आरंभाचा काळ लक्षात घेता असे स्पष्ट होते की ते एक आधुनिक शास्त्र असे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इ. शास्त्रांना जसा दीर्घ इतिहास आहे. तसा दीर्घ इतिहास समाजशास्त्राला नाही. समाजशास्त्राची वाटचाल 150-175 वर्षांची आहे. परंतु, या शास्त्राचा अभ्यासविषय मानवी समाजाइतकाच प्राचीन आहे.

समाजाचे अध्यन प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व इतर देषात करण्यात येत होते. यासंबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत.

1.    ग्रीक देषात प्लेटो व ॲरीस्टाॅटल यांनी रिपब्लिक व पाॅलिटिक्स हे ग्रंथ लिहीले. या ग्रंथात समाज, राज्य व कायदा याविषयी सविस्तर विश्लेषण आहे.

2.    रोमन तत्त्वज्ञा सिसेरी यांनी हा ग्रंथ व मॅकवेलचा या ग्रंथात समाज जीवनावर प्रकाश टाकला आहे.

3.    भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या गंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मीयांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते. 

4. भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या ग्रंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मीयांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते.

समाजशास्त्राचा आरंभ

   बहुतांश देशात प्राचीन काळात समाजाचे अध्ययन करण्यात येत होते असे प्रतिपादन केले असले तरी खऱ्या अर्थाने समाजाच्या अध्ययनाची शास्त्रीय दृष्टीने सुरुवात मागील शतकापासून झाली.

   इ.स. 1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली.ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय. आगस्ट कौन ने  ही संज्ञा उपयोगात आणण्यापूर्वी समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र हे भौतिक शास्त्राप्रमाणे स्वतंत्र शास्त्र असावे या हेतूने  सामाजिक भौतिक ही संज्ञा वापरली. परंतु पुढे घटनांच्या अध्ययनासाठी कितपत तंतोतंत उपयोगात आणता येतील असा प्रश्न निर्माण झाल्याकारणाने त्यांच्या ऐवजी ही संज्ञा वापरली. आणि तेव्हापासून समाजाचे शास्त्र म्हणून  असा शब्द उपयोगात आणला गेला.

आधुनिक समाज शास्त्राचे जनक
संपादन करा
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.

१. लेस्टर वार्डः

‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.

२.    फ्रॅन्कलीन गिडिंगजः

समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.

वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येते असे सुचविले आहे.

३.    आगबर्न व निमकाॅकः

”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र असे म्हणतात.“

येथे समाजाचे शास्त्रीयरितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.

४.    मॅक आयव्हर व पेजः

समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.

५.    मार्षल जोन्सः

समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.

६.    हॅरी जाॅन्सनः

समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो.

७. मॅक्स वेबरः

समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.

८.    अल्केष इकेल्सः

समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारंपारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.

समाजशास्त्राचे घटक
संपादन करा
वर सांगितलेल्या व्याख्येवरून समाजशास्त्राचा अध्ययनविषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात.

अ.    मानवी समाजाचे अध्ययन. ब्.    सामाजिक संबंधाचे अध्ययन. क्.    सामाजिक समुहाचे अध्ययन. ड्.    सामाजिक क्रियांचे अध्ययन.

१.    मानवी समाजाचे अध्ययनः

समाजशास्त्रा संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. समाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणताही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजशास्त्राचा अभास विषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे.

२.    सामाजिक संबंधाचा अभ्यासः

काही अभ्यासकांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक संबंध असला पाहिजे कारण त्यांच्या मते मानवी समाज व्यक्ती, व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांषी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. त्यामुळे समाजशास्त्रात संबंधांचा अभ्यास झाला पाहिजे.

३. सामाजिक समुहांचे अध्ययनः

जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समुहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांषी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावष्यक गरजा एकटयाने भागवू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात. आणि समुहाची निर्मिती होते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समुहांचा अभ्यास झाला पाहिजे.

४.    सामाजिक क्रियांचे अध्ययनः

मॅक्स वेबर व इतर समाज शास्त्रज्ञानानुसार समाजशास्त्राचा अभ्यासविष सामाजिक क्रिया असला पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात ‘परमाणू’ जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो. त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्त्वाच्या असतात.

वरील बाबींवर समाजशास्त्रात अभ्यास करण्यात यावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

समाजशास्त्राचे विभाजन
संपादन करा
अल्केस इंकेलस यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयीचे ठळक भागात विभाजन केले आहे.

1.    समाजशास्त्रीय विष्लेषणः

मानव संस्कृती आणि समाज सामाजिक दृष्टीकोन वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन.

2.    समाजातील प्राथमिक घटकः

सामाजिक क्रिया आणि सामाजिक संबंध, व्यक्तीचे व्यक्तीमत्व, समुह, समुदाय, मंडळे, आणि संघटन इ. अध्ययन.

3.    मूलभूत सामाजिक संकल्पनाः

कुटूंब, आर्थिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक, न्याय इ. विषयीचे अध्ययन.

समाजशास्त्राची व्याप्ती व संप्रदाय
संपादन करा
दोन संप्रदाय

1) विषेशात्मक संप्रदाय 2) समन्वयात्मक संप्रदाय

विषेशात्मक संप्रदायाचे प्रमूख प्रणेते आहेत जाॅर्ज सिमेल, विरकांत, वाॅनविज, टाॅनिज, मॅक्स वेबर.

विषेशात्मक संप्रदाय
संपादन करा
   या संप्रदायाच्या अभ्यासकांनी समाजशास्त्राला स्वतंत्र अभ्यास विषय आहे हे पटवून सांगण्याचा स्वरूपाचे अध्ययन कोणत्याही सामाजिक शास्त्रात केले जात नाही. म्हणून तो एक वैषिष्टयपूर्ण अभ्यास आहे.

1.    सिमेलः

समाजशास्त्रात सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचा अभ्यास केला पाहिजे. त्यातील अंतवस्तूचा ;ब्वदजमदजद्ध अभ्यास करण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे भूमिती म्हणजे फक्त लांबी, रूंदी, उंची, इ.चे मापन करतो. त्या वस्तुमध्ये काय आहे. याचा विचार करत नाही. तसेच सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.

येथे सिमेल यांनी भूमीतीतील अध्ययन पद्धतीप्रमाणे सामाजिक संबंधाच्या स्वरूप व अंतर्वस्तूत भेद केला आहे. अंतर्ववस्तूचा स्वरूपावर परिणाम होत नाही. त्यांच्यामते समाजातील संबंधाचे सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, प्रभुत्व, आाधिनता इ. अभ्यासणे आवष्यक आहे. परंतु ते कोणत्या क्षेत्रात निदर्षनास येतात हे पाहणे आवष्यक नाही. या प्रक्रिया, आर्थिक, धार्मिक, राजकीय, इ. क्षेत्रात दिसून येतील परंतु त्याला महत्त्व न देता फक्त स्वरूपावर लक्ष केंद्रित करावे. या पद्धतीने मानवी समाजाचे अध्ययन होऊ शकते.

2. विरकांत:

विरकांत या अभ्यासकाने देखील स्वरूपात्मक विचारसरणीचा पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते समाजशास्त्र हे स्वायत्त शास्त्र झाले पाहिजे. तसेच सामाजिक संबंधाबरोबर मानसिक संबंधांचा देखील अभ्यास या विषयात करावा कारण सर्व सामाजिक संबंधाच्या मुळाषी मानसिक संबंध असतात. यष, प्रेम, मत्सर, व्देष, घृणा, सन्मान इ. मानसिक बाजूंवर व्यक्ती-व्यक्तीतील संबंध आधारीत असतात.

3.    वाॅन विजे:

वाॅन विजे या अभ्यासकांनी देखील सामाजिक संबंधाचे स्वरूप समाजशास्त्राचा अभ्यास विषय असला पाहिजे असे वाटते. सामाजिक संबंधामुळेच समाज निर्माण होतो. हे संबंध अनेक प्रकारचे असतात. वाॅन विजे यांनी संबंधाचे 650 प्रकार सांगितले आहे. हे संबंध व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह, समूह-समूह या बरोबर आर्थिक, धार्मिक, राजकीय, व अन्य प्रकारचे आहेत.

4. टाॅनिजः

टाॅनिज या जर्मन समाजशास्त्राने सामाजिक संबंधाच्या स्वरूपावर आधारीत समुदाय आणि मंडळ असा भेद केला आहे. समुदयातील मध्यस्ािांच्या संबंधाचा आधार भावनात्मक बंध आणि नातेगिरी असतो तर मंडळातील व्यक्तीचे संबंध अवैयक्तिक स्वरूपाचे असतात. अशा प्रकारे समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र झाले पाहिजे व त्याचा अभ्यासविषय इतर शास्त्रांचा असू नये या विचारांचे समर्थन वरील अभ्यासकांनी केले आहे.

टिकाः

1.    अभ्यास विषयावर मर्यादा पडली आहे.

2.    सामाजिक संबंधाचे अध्ययन ही बाब फक्त समाजशास्त्राच्या अभ्यासाइतकीच मर्यादित नाही. इतर सामाजिक शास्त्रात सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. राज्य शास्त्रात आंतर राष्ट्रीय करणे अपरिहार्य आहे.

3.    समाजशास्त्रात अंतर्वस्तुला वगळून अभ्यास करणे शक्य नाही. कारण अंतर्वस्तुचा स्वरूपावर परिणाम होणे अगदी अपरिहार्य असते.

4.    आधुनिक काळात कोणतेही शास्त्र पूर्णता स्वतंत्र आहे असे म्हणता येत नाही. सर्व शास्त्रांमध्ये संकल्पना आणि सिद्धांताची पर्यायाने ज्ञानाची देवाण-घेवाण चाललेली असते. कोणताही अभ्यासपूर्ण स्वतंत्र नसतो.

समन्वयात्मक संप्रदाय
संपादन करा
समाजशास्त्राच्या व्याप्ती संबंधी निष्चित भूमिका घेणारा संप्रदाय म्हणजे समन्वयात्मक संप्रदाय होय. समन्वयात्मक संप्रदायाच्या समर्थकांचे मत हे शास्त्र सामान्य शास्त्र झाले पाहिजे. समाजशास्त्राच्या अभ्यासविषयाबाबत संकुचित भूमिका स्विकारता येणार नाही. फक्त सामाजिक संबंधाचा अभ्यास केला तर विषयाचा विकास होणार नाही. यासाठी अभ्यासविषय व्यापक असावा म्हणून समाजशास्त्रात मानवी जीवनाचे सर्वांगिण अध्ययन केले पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक जीवनाचे अध्ययन करणारे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, इ. विषेष मानवी शास्त्रे आहेत. हया शास्त्रात समाज जीवनासंबंधी शास्त्रीय रितीने एकत्रित केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजशास्त्रज्ञांनी करणे उपयुक्त आहे.

लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक, भौगोलिक समाजशास्त्र, आर्थिक इ. शास्त्रांचा अभ्यास केला जातो. या संप्रदायांचे मुख्य प्रणेते व त्यांचे विचार खालील प्रमाणे आहे.

1.एमिल डुरखाईमः

डुरखाईमने समाजशास्त्राच्या व्याप्तीस तीन भागात विभागले आहे.

1) सामाजिक आकारशास्त्र: या भागात मानवी समाज जीवाचा भौगोलिक आधार, लोकसंख्या, लोकसंख्या रचना इ. घटकांचे अध्ययन करण्यात येते.

2) सामाजिक शरीरशास्त्र: समाजातील धार्मिक, आर्थिक, राजकीय व अन्य अंगाचे अध्ययन सामाजिक शरीरशास्त्रात केले जाते. वर्तमान काळात या भागांचा अभ्यास करणारी शास्त्रे निर्माण झाली आहेत. धर्माचे समाजशास्त्र, आर्थिक समाजशास्त्र इ.

3) सामान्य समाजशास्त्र:  समाज जीवनात घडणाÚया घटनांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करून त्या आधारे सामान्य नियम व सिद्धांताची मांडणी करणे.

2. गिन्सबर्ग

1.    सामाजिक आकारशास्त्रः

या शाखेत समाजरचनेत समाविष्ट होणाÚया लोकसंख्या, सामाजिक समूह, सामाजिक संस्था इ. घटकांचे ध्ययन करण्यात येते.

2.    सामाजिक नियंत्रणः

सामाजिक नियंत्रण प्रक्रियेत नियंत्रणाची साधने असणाÚया धर्म, निती, प्रथा व परंपरा कायदा तसेच अन्य साधनांचा अभ्यास करण्यात येतो.

3.    सामाजिक प्रक्रियाः

समाजात सातत्याने निदर्षनास येणाÚया संघटनात्मक जसे सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, यांचा सविस्तर अध्ययन करणे.

4.    सामाजिक विकृतीशास्त्रः

सामाजिक विघटन आणि सामाकि समस्यांचे अध्ययन हा सामाजिक विकृती शास्त्राचा अभ्यासविषय मानन्यात येत

के. डेव्हिस:

डेव्हिसने समाजशास्त्राच्या व्याप्तीचे विवरण देताना एकूण पाच भाग केले आहेत.

1.    समाजसंरचनाः उपसमुह, दर्जा, भूमिका, मूल्य, प्रमाणके. इ.

2.    सामाजिक कार्येः प्रकार्ये, अपकार्ये, प्रकट व अप्रकट कार्ये. इ. कार्यांचे प्रकार.

3.    सामाजिक आंतरक्रियाः सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, एकात्मता इ. प्रक्रियांचा अभ्यास.

4.    व्यक्ती आणि समाजः यांच्या परस्पर सबंधांचा विचार.

5.    समाजिक परिवर्तनः परिवर्तनाचे प्रकार गती, दिशा इ.

तत्त्वांचे अध्ययन
संपादन करा
   वरील अभ्यासकांप्रमाणेच हाॅब हाऊस, सोरोकिन सारख्या विचारवंतानी समन्वयात्मक विचारसरणीचा पुरस्कार केला आहे.

   यानुसार समग्र समाजाच्या अभ्यासात समाज शास्त्रज्ञाने उपयोग करून ज्ञानाचे संकलन करावे या दोन्ही विचारसरणीमध्ये कोणती विचारसरणी स्विकारावी?

समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र

शास्त्रांचे प्रमूख दोन प्रकार
संपादन करा
मानवाने आपल्या भोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जी धडपड केली त्यातून अनेक शास्त्रे विकसित झाली. या शास्त्रांचे प्रमूख दोन प्रकार पडतात.

1.    नैसर्गिक शास्त्रे, 2. सामाजिक शास्त्रे

1.    नैसर्गिक शास्त्रे:

निसर्गातील (भौतिक) क्षेत्रातील वस्तू इ. अभ्यास करणारी शास्त्रे नैसर्गिक शास्त्रे होय.

उदा. जीव, रसायन, खगोल, पदार्थविज्ञानशास्त्र इ. अशा शास्त्रात मानवी भाव-भावना वर्तन यांचा संबंध नसतो.

वस्तुनिष्ठ, काटेकोरपणे, त्रिकालाबाधित सत्य ठरू शकतील असे नियम प्रस्थापित करणे हेच त्यांचे कार्य असते.

2.    सामाजिक शास्त्रे:

मानवा-मानवातील सामाजिक संबंध व परस्परांवर परिणाम करणाÚया आंतरक्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो. त्या शास्त्रास सामाजिक शास्त्र म्हणतात.

उदा. मानस, अर्थ, राज्य, मानव, समाजशास्त्र इ. मानवाच्या वर्तनाबद्दल सामान्य नियम प्रस्थापित करण्याचा करत असतात. समाजशास्त्राखेरीज इतर सामाजिक शास्त्रे समाजाचा अभ्यास करतात व ती शास्त्रे विषिष्ट संबंधांचाच अभ्यास करतात म्हणून त्यांना विषिष्ट सामाजिक शास्त्रे असे म्हटले जाते. परंतु समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते.

3.    समाजशास्त्राची वैज्ञानिक अभ्यास पद्धतः

समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते. समाजशास्त्राचा अभ्यासक सामाजिक घटनांबद्दल सर्व सामान्य नियम प्रस्थापित करतो तेंव्हा त्यास वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या अवस्थातून जावे लागते. त्या पुढीलप्रमाणे.

1.    समस्या सूत्रणः

यामध्ये ज्या विषयाचा अभ्यास करायचा तो विषय निष्चित करतो त्यातील प्रष्न निवडून त्याविषयी प्रष्न निर्माण करतो. यामुळे त्या समस्येला निष्चित रूप प्राप्त होते. त्याचे अभ्यासाचे स्वरूप, उद्दिष्ट निष्चित होते. पुढील अभ्यासाची दिशा स्पष्ट होते.

उदा. चित्रपट व गुन्हेगारी संबंध पाहताना चित्रपटाचा गुन्हेगारीला साहय होते का? अषी समस्या निर्माण केल्यावर अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. अर्थात एक गोष्ट येथे लक्शात ठेवली पाहिजे की, अभ्यासात समस्येचे हे रूप तसेच राहील का आवश्यकते नुसार बदलेल किंवा बदलावे लागेल.

2.    निरीक्षणः

समस्या निष्चित झाल्यानंतर अभ्यासक त्या समस्येच्या संदर्भातील घटनांचे हेतूपूर्वक शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करतो. निरीक्षण म्हणजे पाहणे नव्हे. वास्तवातील घटना जशा घडत असतात तषी अभ्यासक नोंद होत असते. निरीक्षण म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा पाया, त्यामुळे तो भक्कम, शास्त्रषुद्ध असणे अत्यंत आवष्यक आहे. यासाठी अभ्यासकाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते यापैकी प्रमूख म्हणजे पुढीलप्रमाणे.

अ) निरीक्षण हे वस्तुनिष्ठ हवे, आवडी-निवडी, मते, संस्कृती, धर्म, देश, जात इ. निरीक्षणावर प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनात पूर्वग्रह न आणता घटनांचे यथातथ्य, वास्तव, निरीक्षण केले पाहिजे, एखादयाला (अभ्यासकाला) चित्रपट पाहणे आवडत नसेल व चित्रपटाने गुन्हेगारीला उत्तेजन मिळते अशा पूर्वग्रह तयार झालेला असेल तर त्याने निरीक्षण चुकीचे, अशास्त्रीय ठरेल व पुढचे संषोधन सदोष होईल.

ब) अभ्यासविषयी घटनांचे संकलन केले पाहिजे. तार्किकदृष्टया निरीक्षण योग्य हवे नको त्या घटनांचे निरीक्षण योग्य हवे. नको त्या घटनांचे निरीक्षण नको. तसे हव्या त्या घटनेकडे दुर्लक्ष होता कामा नये.

क) निरीक्षण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असते. निरीक्षण अप्रत्यक्ष असेल तर निरीक्षणातील खरेखोटेपणा तपासून पाहून त्या निरीक्षणाचा स्विकार करावा, निरीक्षणासाठी तंज्ञाचे साहय उपलब्ध होऊन शकते. त्याचा वापर करून घटनांचे संकलन करावे.

3.    वर्गीकरणः

निरीक्षणाच्या मार्गाने जी माहिती संकलित केली त्या माहितीचे वर्गीकरण करणे आवष्यक असते. कारण गोळा केलेली माहिती गुंतागुंतीची असते. यातून फारसा अर्थ निष्पन्न होत नाही. तेव्हा ही माहिती सोपी, बोलकी करण्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यासक घटना, व्यक्ती, व्यक्तीविषेष, साम्यभेद इ. निष्कर्शाच्या आधारे त्या माहितीची सुसंवाद विभागणी करतो. घटनांचे कमी-जास्त महत्त्व, घटनातील क्रम, इ. गोष्टी लक्शात येतात.

उदा. गेल्या वर्षी किती चित्रपट प्रकाशित झाले, किती चित्रपटात गुन्हेगारीचा विषय हाताळला आहे. त्याचे प्रमाण किती, किती गुन्हेगार चित्रपट पाहणारे होते. त्यांचे वय, शिक्षण, आर्थिक स्तर, इ. घटनांचे वर्गीकरण केल्यावर त्या घटना अधिक अर्थपूर्ण होतात. त्या लक्शात ठेवणे सोपे जाते.

4.    अभ्युपगम:

निरीक्षण केलेल्या घटनांचे वर्गीकरण केल्यावर त्या घटनांचा परस्परांशी संबंध दिसून येतो. त्यांचा क्रम लावता येतो कारण कार्यसंबंध जाणून घेता येतो. कोणती घटना कोणत्या कारणामुळे घडली याचे स्पष्टीकरण देता येते. अषी स्पष्टीकरणात्मक कल्पना अभ्यासकांच्या मनात जेव्हा तयार होते. तेंव्हा तीला अभ्युपगम असे म्हटले जाते.

उदा. गुन्हेगारी चित्रपटातील गुन्हयांच्या कल्पना उचजून गुन्हे करण्याचे प्रमाण एकूण गुन्हयांच्या प्रमाणाच्या मानाने अल्प आहे. परंतु हे स्पष्टीकरण संभाव्य स्पष्टीकरण असते. अभ्युपगम चुकीचा देखील असण्याची शक्यता असते. त्यासाठी पुढील अवस्थेची गरज असते.5.    प्रचीती किंवा पडताळाः

निष्चित समस्याबाबत निरीक्षण, वर्गीकरण केल्यानंतर अभ्यासकाच्या मनात अभ्युपगम तयार होतो. त्याची पुन्हा प्रचिती दिसून येते का नाही. हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते घटनेचे अंतिम स्पष्टीकरण नसते. अभ्युपगमाविषयी शंका उपस्थित करणे. अभ्युपगमाला पोषक प्रचिती आली तर आपला अभ्युपगम खरा नाही तर चुकीचा मानावा यामुळे अभ्यासकाला पुढे जाता येते. किंवा पाठीमागे वळून पुन्हा नव्याने संषोधन करावे लागते. अभ्युपगमाची प्रचिती लगेच येईल किंवा बरीच वर्षे वाट पाहावी लागते.

6.    सामान्यीकरणः

अभ्यासकाने निष्चित केलेल्या समस्येबाबतच्या घटनांचे निरीक्षण, वर्गीकरण, करून त्याआधारे अभ्युपगम तयार केला जातो त्याला त्याची प्रचिती आली की, अभ्यासलेल्या घटनांच्या बाबतीत निष्चित असे सामान्य विधान करू शकतो यालाच सामान्यीकरण म्हटले जाते.

सामान्यीकरण म्हणजे विषिष्ट घटना यांच्यातील कारण कार्य संबंधाबद्दल सर्वत्र लागू पडणारा नियम प्रस्थापित करणे होय. या नियमाला शास्त्रीय आधार असल्याने याला समाजशास्त्रीय नियम म्हणतात.

7.    पूर्वकथनः

सामान्यीकरणाने जो नियम प्रस्थापित केला जातो. त्या आधारे विषिष्ट परिस्थितीत भविष्यकाळात काय घडेल याचे निष्चित कथन करता येणे म्हणजे पूर्वकथन होय. पूर्वकथन म्हणजे ज्योतिशाने सांगितलेले भविष्य नव्हे. जे घडून येईल, अगर येणार नाही. उदा. गुन्हेगारी चित्रपटाने गुन्हयाच्या कल्पना पुरवल्या असा नियम प्रस्थापित केला तर उद्या गुन्हेगारी चित्रपट प्रमाण वाढेल व इतर परिस्थती तषीच राहीली तर गुन्हयाचे प्रमाण निष्चितच वाढेल. असे सांगणे म्हणजे पूर्वकथन होय. सामाजिक परिस्थतीवर नियंत्रण ठेवणे व अपेक्षित सामाजिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी, सामाजिक समस्या नियंत्रित करण्यासाठी पूर्वकथन उपयुक्त आहे.

आता पर्यंत शास्त्रासाठी आवष्यक असलेल्या कसोटयांची नोंद करून ती प्रत्येक कसोटी समाजशास्त्राला लागू पडत असलयाने स्पष्ट होते. याव्यतिरीक्त काही अभ्यासकांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्षवणारे काही वैषिष्टये सांगितली आहेत.

राॅबर्ट ब्रिअरस्टेड ;त्वइमतज ठपमतेजमकद्धरू

राॅबर्ट ब्रिअरस्टेड यांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्षविणारी वैषिष्टये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत.

1.    समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मात्र ते नैसर्गिक शास्त्र नाही.

2.    समाजशास्त्र युद्ध किंवा सैदांतिक शास्त्र आहे. पण ते व्यावहारिक शास्त्र नाही.

3.    समाजशास्त्र अमूर्त शास्त्र आहे.

4.    समाजशास्त्र सामान्यीकरण करणारे शास्त्र आहे. ते विशेषीकरण करणारे शास्त्र नाही.

5.    समाजशास्त्र अनुभवजन्य शास्त्र आहे.

6.    ते सामान्यविज्ञान आहे. विषेष विज्ञान नाही.

हॅरी जाॅन्सन यांनी सांगितलेले स्वरूप पुढीलप्रमाणे आहेः

1.    समाजशास्त्र अनुभवजन्य शास्त्र आहेः

शास्त्रात ज्ञान प्राप्त करताना अनुभवावर भर देतो येतो. जे अनुभवातून सिद्ध होत नाही. त्याला शास्त्रात कोणतेही स्ािान नसते. उदा. कल्पना, श्रद्धा, विश्वास, इ. गोष्टींना वैज्ञानिक चैकटीत वाव नसतो. समाजशास्त्र एक शास्त्र असल्यामुळे निरीक्षणातून मिळवलेल्या आणि तर्कशास्त्राच्या आधारावर तपासलेल्या ज्ञानाचा समावेष होतो. समजाशास्त्रात मानवी जीवनाविषयी अनुभवावर प्राप्त ज्ञानाच्या आधारे संकल्पना आणि सिद्धांताची मांडणी करता येते. म्हणून या शास्त्राला अनुभवजन्य शास्त्र असे म्हणतात.

2.    हे सैदांन्तिक शास्त्र आहेः

विज्ञानात अनुभवजन्य पद्धतीने तथ्यांचे संकलन केल्यानंतर त्या माहितीला निष्चित रूप देण्यात येते आणि सिद्धांत मांडल जातात. समाजशास्त्रात घटनांचे वैज्ञानिक रितीने अध्ययन करण्यात येऊन तथ्ये संकलित केली जातात. या तथ्यांच्या अमूर्तीकरणातून सिद्धांत प्रतिपादन केले जातात. आणि म्हणून समाजशास्त्राला सैद्धांन्तिक शास्त्र म्हणतात. उदा. एमिल डुरखाईम यांनी तथ्यांचे संकलन करून आत्महत्येचा सिद्धांत मांडला आहे

.3.    समाजशास्त्र संचयी शास्त्र आहेः

विज्ञानात ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सातत्याने चाललेली असते. एक प्रकारे ज्ञानाचा संचय केला जातो. प्राप्त केलेल्या ज्ञानाचे वैज्ञानिकरीतीने परिक्षण व पूर्नपरिक्षण करून ज्ञानाचे क्षेत्रात नविन भर टाकली जाते. म्हणून शास्त्र संचयी असते. समाजशास्त्र देखील अभ्यास वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक घटनांबाबत ज्ञान प्राप्त करतात. त्या ज्ञानात नवीन अध्ययन पद्धती तंत्र, आणि त्यावर केलेली टिका लक्शात घेऊन नव्याने भर टाकण्यात येते. त्यातून ज्ञानाचा संचय होतो.

4.    हे नैतिकदृष्टया तटस्थ शास्त्र आहे.

विज्ञानात तथ्यांचे संकलन करीत असताना. नैतिक तटस्थतेवर लक्ष केंद्रित केले जाते.             अभ्यासक वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून तथ्य एकत्रित करतो. या तथ्याबाबत चांगले-वाईट, योग्य, अयोग्य, आवडते-नावडते अशा शब्दात अभिप्राय देत नाही. कारण असे अभिप्राय संशोधन करणाÚयाचा पक्षपाती दृष्टीकोन व्यक्त करतो समाजशास्त्रात मूल्यात्मक अभिप्राय व्यक्त केले जात नाही. भिक्शावृत्ती, किंवा वेष्यावृत्ती चांगली की वाईट या वादात न पडता त्याचा तटस्थपणे अभ्यास केला जातो.

यावरून असे स्पष्ट होते की, समाजशास्त्राचे स्वरूप शास्त्रीय आहे.

समाजषास्त्राचा इतर सामाजिक शास्त्राषी संबंध

समाजषास्त्रात मानवी वर्तनाचे अध्ययन केले जाते. इतर सामाजिक शास्त्रे मानवी वर्तनाच्या अध्ययनास केंद्रीय मानतात. या शास्त्रात मानवषास्त्र, मानसषास्त्र, अर्थषास्त्र इतिहास, राज्यषास्त्र इ. समावेष होतो. ही शास्त्रे मानवी वर्तनाच्या एका विषिष्ट अंगाचे अध्ययन करतात. मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठी संबंधित असलेल्या सर्व शास्त्रात पारस्परिक संबंध असणे अपरिहार्य आहे. हे संबंध पाळणे गरजेचे आहे. ते पुढीलप्रमाणे.

1.    समाजषास्त्र व मानवषास्त्रः

समाजषास्त्र व मानवषास्त्र ही दोन सामाजिक शास्त्रे आहेत. समाजषास्त्रात मानवी समाजाचे तर मानवषास्त्र मानवाच्या अभ्यासाषी निगडीत आहे. मानवषास्त्रात प्रामुख्याने आदीवासी समाजाचा अभ्यास अपेक्षित आहे. याप्रकारे दोन्ही शास्त्रे मानवी जीवनाला अध्ययनाचे केंद्रबिंदू मानतात म्हणूनच अनेक अभ्यासकांनी सामाजिक मानव शास्त्राला समाजषास्त्राची एक शाखा या हेतूने संबोधले आहे. परंतु या शास्त्राचा अभ्यास आदीवासी व ग्रामीण समुदयापुरतेच मर्यादीत आहे. या विषयीचा अभ्यास समाजषास्त्रात देखील केला जातो. परंतु या दोन्ही शास्त्रामध्ये काही अंतर दिसून येते. ते पुढीलप्रमाणे.

1) समाजषास्त्रात वर्तमानकालीन समाजाचे अध्ययन करता येते. तर सामाजिक मानवषास्त्रात आदिवासी समाजाचा अभ्यास केला जातो.

2) समाज शास्त्राचा दृष्टीकोन विषेषात्मक आहे तर मानवषास्त्र वर्णनात्मक समजला जातो.

3) समाजषास्त्रात मुलाखत, प्रष्नावली, निरीक्षण, या अभ्यासपद्धतीचा उपयोग केला जातो. तर मानवषास्त्रात सहभागी निरीक्षण ही पद्धत अवलंबली जाते.

4) समाजषास्त्र विषुद्ध विज्ञान आहे. तर मानव शास्त्राला उपयोजित विज्ञान मानतात.

या दोन्ही शास्त्रामध्ये फरक जरी असले तरी व्यापक दृष्टीने पाहता हे दोन्ही शास्त्रे परस्परांषी संबंधित आहेत.

2.    समाजषास्त्र व अर्थषास्त्रः

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा व्यतिरीक्त त्याच्या अन्यही गरजा आहे. परंतु अमर्यादित गरजांची पूर्तता करणारी साधने अत्यंत मर्यादित आहेत.या दोन्हीमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थषास्त्र करते. हा प्रष्न सोडविण्यासाठी मानवाचे चालू असलेले प्रयत्न म्हणजे आर्थिक वर्तन होय. मानवांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी संपत्तीचे उत्पादन व वितरण कसे होते त्याला अर्थषास्त्र असे म्हणतात.
अर्थषास्त्र एका बाजूने संपत्तीचा अभ्यास आहे तर दुसÚया अधिक महत्त्वाच्या बाजूने मानवाचा अभ्यास आहे. उदा. गिरणी कामगारांचा संप ही केवळ आर्थिक बाजू नसून त्यात सामाजिक बाबी देखील गुंतल्या आहेत. बेकारी ही आर्थिक क्षेत्रातली असली. तरी तिचे परिणाम सामाजिक असल्याने सामाजिक समस्या म्हणून तिचे अध्ययन करावे लागते. या व्यतिरीक्त, संप, वेष्या व्यवसाय, गुन्हेगारी, दारिद्रय इ. समस्या सोडविण्यासाठी दोन्ही शास्त्रांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतात. औद्योगिक प्रगतीने आर्थिक विकास तर होतोच पण त्याचबरोबर सामाजिक परीवर्तनही घडून येते. म्हणूनच असे म्हटले जाते की, समाजषास्त्र व अर्थषास्त्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

3.    समाजषास्त्र व राज्यषास्त्रः

समाजषास्त्राचे मूळ इतिहास व राज्यषास्त्रात सापडते राज्यषास्त्राचा अभ्यासविषय राज्य संस्था, ही मूलतः समाजव्यवस्थेचा एक घटक असून ती एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. मानवाचे राजकीय वर्तन हा त्याच्या सामाजिक वर्तनाचा एक भाग आहे. कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करण्यासाठी राज्य शास्त्राला समाजषास्त्र विचारांचा व संषोधनाचा आधार घ्यावा लागतो. लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे सरकार मिळते. या लोकप्रिय विधानातून राजकारण हे समाजाचे प्रतिबिंब आहे हे स्पष्ट होते. याबरोबरच कायदा, प्रषासन, नियंत्रण, गुन्हे, आंतरराष्ट्रीय सहकार्य असे अनेक विषय दोन्ही शास्त्रात आढळतात.

समाजषास्त्राचे महत्त्व

समाजषास्त्राच्या महत्त्वाच्या संदर्भात दोन प्रमूख दृष्टीकोनांचा विचार करावा लागतो. 1) शुद्ध संषोधन मधील आणि 2) उपयोगितावादी.

संषोधनानुसार ज्ञानाचा विकास आपले लक्ष्य असावे याउलट शास्त्र व त्यांत प्राप्त केलेले ज्ञान हे मानवी जीवनासाठी आहे. असा उपयोगिता किंवा व्यवहार वादयांचा विचार आहे. परंतु, समाजषास्त्राचे महत्त्व लक्षात घेताना या दोन्ही विचारांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.

1) मानवी समाजाचे अध्ययनः

समाजषास्त्र विषयात मानवी समाजाचे यथार्थ स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही समाजाला वस्तुनिष्ठपणे जाणून घेतल्याषिवाय त्या समाजाच्या विकासाचा व त्या समाजातील प्रष्नांच्या निराकरणाचा विचार करता येणार नाही. त्यामुळे समाजषास्त्रात मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे.

2) सामाजिक समस्यांचे अध्ययनः

मानवी समाज टिकून राहावा म्हणून त्यात उद्भवणाÚया समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे. आधुनिक काळात या समस्यांची संख्या व तिव्रता वाढत असल्याचे दिसून येते. या समस्यांची तिव्रता कमी करण्याच्या उद्देषाने व समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देषाने समस्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या समस्या मानवी समाजाषी संबंधित असल्याने समाजषास्त्रात त्याचे अध्ययन केले जाते. म्हणून समाजषास्त्र हा विषय महत्त्वाचा आहे.

3) तणाव निवारणः

मानवी समाजात सजातियता ऐक्य सहकार्य असावे असे वाटते परंतु तसे चित्र दिसत नाही. लोकांचे विचार, प्रथा, परंपरा, मूल्ये, ध्येये वेग-वेगळी असतात. यातुनच विजातियतेचे दर्षन होते. व परस्परांविषयी मतभिन्नता संदेह निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होते. तणावामुळे संघर्ष उद्भवतो व याचा वाईट परिणाम समाजावर होतो व ऐक्य या भावनेला तडा जातो. खरे पाहिले तर तणाव व्यक्ती व विभिन्न गटात अगदी शुल्लक कारणावरून उद्भवतात. लोक बुद्धिवादापेक्षा भावनेच्या आहारी जातात व विपरीत घडते.

भारतासारख्या देषात धर्म, पंथ, जाती, भाषा, वर्ग, प्रदेष, पक्ष विषमता इ.मुळे समाजाचे विभाजन झाले आहे. या गटात बÚयाचवेळा संघर्ष होतात 1983 साली पूर्वग्रह, गैरसमाज, अज्ञान, मिथ्याधारणा इ. दंगली झाल्या. तणावांचे शास्त्रशुद्ध अध्ययन करण्याचे कार्य समाज शास्त्रज्ञांचे आहे. अभ्यासक झालेल्या तथ्यांच्या आधारवर ते तणाव निरसनासाठी सूचना मांडतात व समाजातील ऐक्य (एकता) टिकाऊ शकतात.

4) समाजकल्याणः

समाजातील सर्व व्यक्ती किंवा गटांमध्ये समान गतीने प्रगती होत नाही. काही गटांना जास्त संधी मिळते ते प्रगतीकडे वाटचाल करतात. याउलट काही गट दुर्लक्षित, उपेक्षित राहतात अषा गटांकडे लक्ष पुरविले नाही. तर त्या गटांची उपेक्षा वाढते व समाजाच्या प्रगतीला अडथळे येतात. भारत शासनाने  ‘सर्वांचे सर्व कल्याण’ हे ध्येय निष्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी उपेक्षित गटांकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना तयार कराव्यात उपेक्षितांचे अध्ययन करून योजना बनविण्याचे कार्य समाजषास्त्रज्ञ करू शकतात.

भारतातील उपेक्षित गटांमध्ये बालक, महीला, वृद्ध, आदीवासी, अस्पृष्य, कामगार वर्ग इ. समावेष होतो. यांचे अध्ययन करून व समस्या लक्षात घेऊन कल्याण कार्यक्रमाची आखणी केली जाते व यात उपयोग समाजषास्त्राचा होतो.

5) सामाजिक नियोजनः

   विषिष्टय ध्येय साध्य करण्यासाठी एक निष्चित दिषेने सामाजिक सांस्कृतिक बदल घडवून आणणारा आराखडा म्हणजे नियोजन होय. कोणत्याही प्रकारचा विकास घडवून आणणे किंवा समस्या सोडविण्यासाठी सामाजिक नियोजन आवष्यक आहे. नियोजन करताना त्या समाजाच्या वास्तविक परिस्थितीची आणि समस्यांच्या स्वरूपाची पूर्ण जाणीव असावी लागते. हे कार्य समाजषास्त्राचा अभ्यास करणाÚया व्यक्तीला चांगल्या प्रकारे जमू शकते. कारण तो समाजषास्त्राचा अभ्यास विषय मानला जातो. म्हणजेच सामाजिक नियोजनाच्या हेतूसाठी समाजषास्त्राचे अध्ययन महत्त्वाचे आहे.

6) व्यावसायिक महत्त्वः

1.    वैद्यकीय समाजषास्त्र, औद्योगिक, ग्रामीण समाजषास्त्राच्या अभ्यासकांना प्रकल्प अधिकारी म्हणून संधी उपलब्ध होते.

2.    विकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, कारागृह अधिक्षक श्रमिक कल्याण अधिकारी, बाल-कल्याण अधिकारी इ. क्षेत्रात संधी उपलब्ध आहे.

3.    षिक्षक, प्राध्यापक, कुटूंब नियोजन प्रकल्प, अनाथश्रम, वृद्धाश्रम, स्त्री कल्याणकारी संस्था, इ. क्षेत्रात देखील समाजषास्त्राचा अभ्यास करणाÚयांना संधी उपलब्ध आहे.

उपशाखा
संपादन करा
समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत समाजशास्त्रात विविध समस्या घेऊन अभ्यास केला जातो. समाजशास्त्रात अनेक शास्त्रज्ञांनी विविध सिद्धान्त मांडला आहे यांमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे. तसेच त्यांनी ग्रामीण व शहरी भागाचा अभ्यास समाजशास्त्रात केला आहे. सामाजिक चळवळी व त्यांचा समस्या समाजशास्त्रात मांडल्या आहेत.

लिंगभावाचे समाजशास्त्र
संपादन करा
सामूहिक वर्तनशास्त्र
संपादन करा
तुलनात्मक समाजशास्त्र

लोकसंख्याशास्त्र : लोकसंख्या वाढीचे परिणाम
संपादन करा
मानवी परिसंस्थाशास्त्र
संपादन करा
वैद्यकीय समाजशास्त्र
संपादन करा
औद्योगिक समाजशास्त्र
संपादन करा
लष्करी समाजशास्त्र
संपादन करा
सैन्याची विचारसरणी
सैन्याची अंतर्गत एकी
सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता
सैन्यामधील स्त्रियांचे स्थान
सैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन
सेना - संस्था आणि संरचना
सैन्याची सततची युद्धाची तयारी
राजकीय समाजशास्त्र

== धार्मिक समाजशास्त्र

शहरी समाजशास्त्र
संपादन करा
ग्रामीण समाजशास्त्र
संपादन करा
भारतीय ग्रामीण समाजशास्त्रात भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातिव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनांचा अभ्यास केला जातो.

मराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासाठी वरदा प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेले त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक उपयुक्त आहे. शेती हा ग्रामीण जीवनाचा पाया आहे.

शेतकरी समाजशास्त्र
संपादन करा
ग्रामीण भागातील शेतकरी जीवनशैलीचा यामध्ये समावेश असतो.

सामाजिक मानसशास्त्र
संपादन करा
सैद्धान्तिक समाजशास्त्र
न्याय समाजशास्त्र
संपादन करा
आंतरजालीय समाजशास्त्र
संपादन करा
माध्यमाचे समाजशास्त्र
संपादन करा
वर्गांचे आणि जातींचे समाजशास्त्र Marathi project 11
संपादन करा
विज्ञानाचे समाजशास्त्र
संपादन करा
== पर्यावरणाचे समाजशास्त्र == व्याख्या

ज्ञानाचे समाजशास्त्र
संपादन करा
कार्ल मेनहिंम ज्यांनी ज्ञानाचे समाजशास्त्र ह्या शाखेला जन्म दिला ही ज्ञानाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी शाखा आहे.[३] म्हणजेच व्यक्तींच्या सामाजिक अस्तित्वाच्या माध्यमांतून सामाजिक विश्व आणि ज्ञान यांमधील नाते ठरते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट सामाजिक गटाच्या कल्पना त्या गटाच्या सामाजिक संरचनेतील स्थानाशी संबंधित असतात. कार्ल मार्क्सने सामाजिक वर्गाच्या त्याच्या विश्लेषणामध्ये त्याने कल्पनांचे नाते सामाजिक वर्गाशी जोडले आहे; याचाच अर्थ असाही होतो की, ज्ञानाच्या विचारविश्वाच्या समाजशास्त्राची मांडणी मेनहिंमने त्याच्या आधीच्या अनेक समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या कार्याचा आधार घेऊन केली आहे. मर्टनने(१९५७) केलेल्या व्याख्येनुसार, ज्ञानाचे समाजशास्त्र हे कल्पनांचा किंवा वैचारिक व्यवहारांचा पद्धतशीर अभ्यास करते.[४]

भारतीय समाजशास्त्रज्ञ
संपादन करा
आर. के. मुखर्जी
इरावती कर्वे
ए. आर. देसाई
एम. एन. श्रीनिवास
एस. सी. दुबे
जी. एस. घुर्ये
डी. पी. मुखर्जी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामाजिक संघटना
संपादन करा
अमेरिकी सामाजिक संघ (ASA)
आंतरराष्ट्रीय सामाजिक संघ (ISA)
आफ्रिकी सामाजिक संघ (AfSA)
दक्षिण आफ्रिकी सामाजिक संघ (SASA)
आयरलँड सामाजिक संघटना(SAI)
ऑस्ट्रेलियन सामाजिक संघ (TASA)
कॅनेडियन सामाजिक संघ (CSA)
जर्मन सामाजिक संघ (DGS)
पोर्तुगाल सामाजिक संस्था (APS) - Associação Portuguesa de Sociologia
ब्रिटिश सामाजिक संघ (BSA)
ब्राझील सामाजिक संस्था (SBS) - Sociedade Brasileira de Sociologia
भारतीय सामाजिक संस्था (Insoso)
युरोपीय सामाजिक संघ (ESA)

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...