महाराष्ट्र

🔹 महाराष्ट्राची पूर्व - पश्चिम लांबी 800 कि. मी आहे

🔹 महाराष्ट्राची दक्षिण - उत्तर लांबी 700 कि. मी आहे

🔹 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 03, 07, 713 चौ. कि. मी

🔹 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या 9.36%  आहे

🔹 महाराष्ट्रात 27 महानगर पालिका आहेत

🔹 महाराष्ट्रात 234 नगरपालिका आहेत

🔹 महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत

🔹 1 जानेवारी 1981 साली कुलाब जिल्ह्याचे नाव बदलून रायगड रायगड करण्यात आले.

🔹 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती

🔹 महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो

🔹 महाराष्टाचा भारतात लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक लागतो

चलनवाढ व चलनघट.


🅾अर्थव्यवस्थेतील किंमतीची पातळी  जेव्हा चढत जाते, तेव्हा ‘चलनवाढ’ होत आहे असे म्हणतात.

🅾 याउलट  किंमतीची पातळी जेव्हा घटत असते, तेव्हा ‘चलनघट’ होत आहे असे  समजतात.

🅾चलनवाढ व चलनघट ह्या सर्वस्वी चलनविषयक घटना  होत, हा विचार जागतिक महामंदीपर्यंतच्या काळात मान्यता पावलेला होता.

🅾परंतु केन्सप्रणीत विचारसरणीप्रमाणे जर अर्थव्यवस्था अपूर्ण  रोजगाराच्या अवस्थेत असेल, तर पैशाचा पुरवठा वाढल्यास  किंमतीबरोबर रोजगारही वाढतो. ही ‘अपूर्ण चलनवाढ’ किंवा ‘सौम्य  चलनवाढ’ होय.

💠💠 चलनवाढीची कारणे.💠💠

🅾पैशातील उत्पन्नामुळे निर्माण होणारी वस्तूंची मागणी  आणि वस्तूंचा उपलब्ध पुरवठा यांच्या प्रक्रियेतून चलनवाढीचा दबाव  निर्माण होतो.

🅾 पैशाचा पुरवठा वाढल्यास व्यक्तिगत उत्पन्न वाढून वस्तूंची  मागणी वाढते. सरकारकडून तुटीचा अर्थभरणा, बॅंकांकडून पतपैशाचा  अतिरिक्त पुरवठा आणि उपभोगप्रवृत्ती वाढल्याने पैशाच्या भ्रमणवेगात  वाढ, या कारणांमुळे पैशाचा एकूण पुरवठा वाढतो.

🅾करांमध्ये सवलती मिळाल्या, राष्ट्रीय उत्पन्न वाढले व बचतप्रवृत्ती कमी झाली, तर खर्चासाठी उपलब्ध उत्पन्न वाढते. संचित बचती व हप्त्याने वस्तू मिळण्याच्या सोयीमुळे खर्चप्रवृत्ती वाढते.

🅾विदेशी मागणी वाढल्यास देशांतर्गत उपयोगासाठी वस्तूंचा साठा कमी होतो. उत्पादनवाढीलाही काही वेळ लागतो आणि अनेक अडचणी उद्‌भवतात. पूर्ण रोजगार असल्यास  अधिक अशक्य असते.

🅾या कारणांमुळे चलनवाढ संभवते शिवाय भविष्यकालीन परिस्थितीविषयीच्या अपेक्षाही भाववाढीला चालना देतात.

💠💠चलनवाढीचे सिद्धांत.💠💠

🅾मागणीसापेक्ष चलनवाढअतिरिक्त मागणीच्या दबावामुळे चलनवाढ उद्‌भवते, असे काही अर्थशास्त्रज्ञ प्रतिपादतात. पैशाचा पुरवठा वाढल्यास मागणी वाढून किंमती वाढतात.

🅾 सरकारी खर्चात वाढ, नजीकच्या भविष्यकाळात उत्पन्न, नफा व किंमती वाढण्याची अपेक्षा असल्याने उपभोग व गुंतवणूक प्रवृत्तींत वाढ, व्याजाचे दर कमी झाल्याने गुंतवणुकीत वाढ इत्यादींमुळे खर्च वाढतो.

🅾परिणामी व्यक्तिगत उत्पन्न वाढते. यापैकी काही भाग कर व बचतरूपाने मागे राहतो आणि उरलेल्या भागामुळे पूर्ण रोजगाराच्या परिस्थितीत चलनवाढ होते.

💠💠क्षेत्रीय चलनवाढ.💠💠

🅾मागणीचा दबाव वा व्ययप्रेरणा यांच्या अभावीही चलनवाढ होऊ शकते. एकूण मागणी कायम राहून मागणीचे स्वरूप मात्र बदलते आणि किंमती व वेतन कमी होऊ शकत नाहीत असे गृहीत धरल्यास, मागणी वाढलेल्या क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी साधनसामग्रीची मागणी वाढते.

🅾 त्यांच्या प्राप्तीसाठी जास्त किंमत द्यावी लागते. मागणी कमी झालेल्या क्षेत्रातील घटकांसाठीही त्यामुळे अधिक किंमत देणे भाग पडते. म्हणजे, मागणी वाढलेल्या क्षेत्रात प्रथम भाववाढ अनुभवास येते व त्यायोगे मागणी कमी झालेल्या क्षेत्रालाही ती व्यापून  जाते.

चलनवाढविरोधी धोरण
🧩 मुद्रानीती...

🅾मध्यवर्ती बॅंक महाग पैशाचे धोरण अनुसरते. त्यायोगे चलनसंकोच व पतनियंत्रणाचे मार्ग चोखाळले जातात.

🅾पर्यायी धोरण म्हणजे प्रचलित चलनव्यवस्था पूर्णतया रद्द करून नवीन चलनव्यवस्था निर्माण करणे.

🅾जर्मनी, रशिया, पोलंड, यूगोस्लाव्हिया वगैरे राष्ट्रांनी हे धोरण अंगीकारले होते.

चलनवाढीविरोधी धोरण.

🧩राजकोषीय नीती...

🅾सरकारचे अंदाजपत्रक वाढाव्याचे राखण्याच्या हेतूने सरकारी खर्चात योग्य ती कपात करून एकूण कररचना अधिक व्यापक व सखोल केली जाते.

🅾 स्वेच्छेच्या व सक्तीच्या बचत  योजना कार्यान्वित होतात. दीर्घमुदतीची कर्जे उभारली जातात. जरूर भासल्यास, चलनाचे अतिमूल्यनही केले जाते.

चलनवाढीविरोधी धोरण

🅾पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी उत्पादन साधनांचा पूर्ण उपयोग, भांडवल गुंतवणुकीस उत्तेजन, मक्तेदारीविरुद्ध उपाय, तांत्रिक सुधारणा, औद्योगिक शांतता यांकडे लक्ष दिले जाते.

🅾वेतनवाढीमुळे चलनवाढीला मदत होऊ नये म्हणून वेतन गोठविणे, वेतनाचा उत्पादनाशी संबंध जोडणे, वेतनवाढीची रक्कम कालांतराने देणे वगैरे उपाय योजतात. तसेच महत्त्वाच्या वस्तूंच्या कमाल  किंमती ठरवून त्यांच्या नियंत्रित वाटपाची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित  होते.

🅾चलनघटविरोधी धोरणाने मागणीला उत्तेजन मिळते. त्यासाठी स्वस्त पैशाचे धोरण अनुसरतात. मध्यम व गरीब वर्गांतील लोकांची खर्च प्रवृत्ती अधिक असल्याने त्यांच्याकडे अधिकतम पैसा राखावा लागतो.

🅾 म्हणून श्रीमंतांवर उद्‌गामी पद्धतीने कर-आकारणी, गरिबांना करांपासून सवलती व विविध प्रकारे आर्थिक साहाय्य, व्याजाच्या दरात घट, सरकारी क्षेत्रातील गुंतवणूक, सार्वजनिक हिताची कामे, तुटीचा अर्थभरणा इत्यादींचा अवलंब करून अर्थव्यवस्थेत आशादायक वातावरण निर्माण करावे लागते.
 

भारतातली चलनवाढीची कारणे.

🅾तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे

🅾ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो

🅾परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.

🅾ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.

🅾परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.

🅾काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

🅾या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

मार्गदर्शक तत्वे

भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

राज्याचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतले. राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. आयर्लंडने हे स्पेन कडून घेतले आहे.

मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येत नाही.


मार्गदर्शक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहे व हे भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहे.


हे तत्व सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात.


कलम 36 :-

यात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे व ही तीच व्याख्या आहे जी कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती चा उल्लेख केला आहे. आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे, प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे आदर्श साध्य करणे.

कलम 37:- मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जर मार्गदर्शक तत्व मिळाले नाही तर तुम्ही कोर्टमधे जाऊ शकत नाही.

कलम 38: – कल्याणकारी राज्याची व्याख्या

ज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल व यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील.

कलम 39 -1 :- राज्य (सरकार) सर्व व्यक्तींना जीवनउपयोगी किंवा जीवनाकरिता सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 -2: – राज्य समान कार्यासाठी समान वेतन देईल.

कलम 39 -3:- राज्य आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार करून देईल.

कलम 39 -4:- यानुसार पालक अल्पवयीन व्यक्ती यांचे शोषणाचे संरक्षण करेल. व त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याचे संधी उपलब्ध करून देईल. तसेच आरोग्य सुविधाकरिता कार्य योजना लागू करेल. (पोलिओ, अंगणवाडी)

कलम 39 -5:- समान न्याय व निःशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 -6:- यानुसार आर्थिक व्यवस्था राज्य निर्माण करेल म्हणजे खूप गरीब आणि खूप श्रीमंत होणार नाही म्हणजे समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करायची आहे.

कलम 40:- गांधीवादी तत्व (73वी घ. दु. 1992)

राज्य पंचायत राज निर्माण करण्याचे प्रयन्त करेल. पहिली ग्रामपंचायत 2 Oct 1959 रोजी नागौर जिल्हा राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आली.

कलम 41:- शिक्षण रोजगार (कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ठ बाबींचा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार )

राज्य हे आपले आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक साहाय्य हक्क उपलब्ध करून देणार.

बरेचश्या राज्यात या अंतर्गतच बेरोजगारी भत्ता, निराधार योजना, जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी लागू केले आहे.

कलम 42:- Maternity Leave

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था.
राज्य महिलांच्या प्रसूतीच्या वेळी विविध आरोग्य सुविधा निर्माण करून देईल.

उदा:- जसे की आर्थिक साहाय्य्य, वैद्यकीय साहाय्य्य

कलम 43:- कामगारांना निर्वाह वेतन

राज्य सर्व कामगारांना योग्य रीतीने निर्वाह वेतन देण्याची परिस्थिती निर्माण करेल.

कलम 43A:- 42 वी घ. दु. 1976 अनुसार संविधानात टाकण्यात आली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43B:- राज्य सहकारी सोसायटींकरिता प्रोत्साहन देण्यास प्रयन्तशील असेल. 97 वी घ. दु. 2011 अनुसार यांचा समावेश करण्यात आला.

कलम 44:- आचारसंहिता (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न राज्यांनी नेहमी करावा. नागरिकांना एकरूप नागरी संहिता. वैयक्तिक कायदे एकत्र करून सर्व नागरिकांना समान वागणूक प्रस्थापित करणे. संपूर्ण भारतीय राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता प्राप्त करून देण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील. 

कलम 45:- 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद.
राज्य ६ वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल.

पूर्वीच्या कलम ४५ ची तरतूद खालीलप्रमाणे होती.
राज्यसंस्था घटनेचा अंमल सुरु झाल्यापासून १० वर्षाच्या आत १४ वर्षाखालील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयन्तशील राहील. हे एकच असे कलम आहे ज्याला कालमर्यादा दिली होती.

कलम 46:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन सरकार करेल.
राज्यसंस्था दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल.
राज्यसंस्था त्यांचे सामाजिक अन्याय व इतर सर्व प्रकारच्या शोषणापासून संरंक्षण करेल.

कलम 47:- पोषणमान व राहणीमान उंचावणे, दारूबंदी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्त्यव्य असेल.
नागरिकांचे पोषणमान, राहणीमान तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्या गोष्टी राज्यसंस्थेच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानले जाईल.
विशेषतः मादक पेय तसेच आरोग्यास घातक असलेले अंमली पेये यांच्यावर बंदी आणण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

अपवाद : औषधी तयार करण्यास वापरली जाणारी पेये.

कलम 48:- कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन (गौहत्या)

याअंतर्गतच गाई व वासरे व इतर जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करने व त्यांच्या कत्तलला मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल.

कलम 48 (A) :- राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यांचा विकास त्याचबरोबर वने, नैसर्गिक संसाधने जशे नद्या, तलाव, समुद्र व त्यामधील असणारे जीव यांचे संरक्षण करेल व त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रणाल्या विकसित करेल.

टीप :- ही कलम 42 वी घ. दु. 1976 मध्ये संविधानात टाकण्यात आली.

कलम 49:- राष्ट्रीय महत्वाचे संस्थाने, वास्तू, स्मारक यांचे संरंक्षण राज्य करेल. संसदीय कायद्याअंतर्गत राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणून घोषित केले कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची असणारे स्मारके, ठिकाणे व वस्तूंची लूट, विद्रुपीकरण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यातीपासून संरक्षण करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी असेल .

कलम 50:- राज्य न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे पृथ्थकरण करेल.
लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.
मात्र सध्या राज्यसंस्थेअंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार, यांचा समावेश होतो.

कलम 51:- राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयन्त करेल.

राज्यसंस्था खालील बाबींसाठी प्रोत्साहन देईल.
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
ब. राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे
क. एकमेकांमध्ये व्यवहार करतांना आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचा आदर करणे. 

मराठी व्याकरण

           शब्दाच्या जाती ◾️

1)नाम -

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.

उदाहरण - घर, आकाश, गोड

2)सर्वनाम-

जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण - मी, तू, आम्ही

3) विशेषण-

जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच

4)क्रियापद-

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे

5)क्रियाविशेषण-

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या

6) शब्दयोगी अव्यय-

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

7) उभयान्वयी अव्यय-

जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा

8) केवलप्रयोगी अव्यय-

जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब
______________________________________

आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष

📚 पहिली १९६० : सयाजी सिलम

📚 दुसरी १९६२ : त्र्यंबक भरडे

📚 तिसरी १९६७ : त्र्यंबक भरडे

📚 चौथी १९७२ : एस. के. वानखेडे, बाळासाहेब देसाई

📚 पाचवी १९७८ : शिवराज पाटील, प्राणलाल वोरा

📚 सहावी १९८० : शरद दिघे

📚 सातवी १९८५ : शंकरराव जगताप

📚 आठवी १९९० : मधुकरराव चौधरी

📚 नववी १९९५ : दत्ताजी नलावडे

📚 दहावी १९९९ : अरुणलाल गुजराती

📚 अकरावी २००४ : बाबासाहेब कुपेकर

📚 बारावी २००९ : दिलीप वळसे-पाटील

📚 तेरावी २०१४ : हरिभाऊ बागडे

📚 चौदावी २०१९ : नाना पटोले
_____________________________________

अलंकारिक शब्द

🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
🌷 अकलेचा कांदा : मूर्ख
🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला
🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस
🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस
🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस
🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
🌷 खडास्टक : भांडण
🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर
🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
🌷 गंगा यमुना : अश्रू
🌷 गंडांतर : भीतीदायक संकट
🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 
🌷 गाढव : बेअकली माणूस
🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
🌷 घोरपड : चिकाटी धरणारा
🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
🌷 चालता काळ : वैभवाचा काळ
🌷चौदावे रत्न : मार
🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
🌷 थंडा फराळ : उपवास
🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस
🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग
🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत
🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा
🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा
🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य
🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
🌷 मृगजळ : केवळ अभास
🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य
🌷 रुपेरी बेडी : चाकरी
🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल
🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार
🌷 वाहती गंगा : आलेली संधी
🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य
🌷 सिकंदर : भाग्यवान
🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे
🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा
🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस
🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी       

प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची खरी नावे

●  *स्वामी विवेकानंद* : नरेंद्र दत्त

●  *स्वामी दयानंद सरस्वती* : मुळशंकर तिवारी

●  *म. गांधी* : मोहनदास करमचंद गांधी

●  *मानवेंद्रनाथ रॉय* : नरेंद्र भट्टाचार्य

●  *स्वामी श्रद्धानंद* : लाल मुन्शीराम

●  *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* : भीमराव रामजी सकपाळ

●  *राजर्षी शाहू महाराज* : यश वंत

●  *लोकमान्य बाळगंगाधर टिळक* : केशव

●  *अण्णा हजारे* : किसन बाबुराव हजारे

अमेरिकेनंतर ब्राझिल ठरतोय करोनाचा नवा हॉस्पॉट.


🔰जगाला लागलेलं करोना व्हायरसचं ग्रहण सुटायचं नाव घेईना. अमेरिकेनंतर आणखी एका देशात करोनाच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे.

🔰अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक आहे.

🔰ब्राझिलमध्ये करोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही.

🔰एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे.

🔰तर मागील 24 तासांत ब्राझिलमध्ये 1022 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰तसेच ब्राझिलमध्ये आतापर्यंत 50 हजार 629 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰गेल्या 24 तासांत ब्राझिलमध्ये 34 हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.तसेच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार झाली आहे.

🔰ब्राझिलच्याआधी सर्वाधिक मृत्यू अमेरिेकेत झाले आहेत. अमेरिकेत एक लाख 22 हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPSC पूर्व परीक्षांबाबत थोडक्यात मार्गदर्शन

✅ विद्यार्थी मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व यांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केले आहे.【राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर तर ११ ऑक्टोबर रोजी संयुक्त पूर्व गट - ब परीक्षा】..

✅ तर आपण उर्वरित दिवसांचे कसे नियोजन करावे याबद्दल तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे.

✅ आपण सध्या बरेच जण घरी अभ्यास करत आहात तर आपण जवळच्या शाळेत जाऊन अभ्यास करणाऱ्या मित्रांनी एकत्र येऊन तिथे अभ्यास करू शकता.. किंवा गावातच एखादी रिकामी खोली मध्ये अभ्यास करू शकता.

✅ सध्या वेळापत्रक आल्यामुळे किमान रोज १० तास अभ्यास झाला पाहिजे. तर आपण दर ५० मिनिटं अभ्यास १० मिन ब्रेक असे गट पाडूयात. पण या १० मिन मध्ये दुसरा कोणताही घ्यायचा नाही. फ्रेश होऊन बसण्यासाठी तसेच थोडा शांत बसून ध्यान करून ५० मिनिटं आपण काय वाचले यासाठी हा १० मिन चा ब्रेक आहे. मग परत ५० मिन अभ्यास १० मिन ध्यान करून वाचलेलं आठवणे असे करून अभ्यास करू शकता.. ही खूपच उपयुक्त पद्धती आहे.

✅ तर सर्वांनी शक्य होईल तेव्हढे लवकर सकाळी अभ्यासाला बसावे.

🏆 सध्या राज्यसेवा पूर्व २०२० चे कसे असावे अभ्यासाचे नियोजन या बद्दल सांगतो. नंतर 🏆संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब - २०२० बद्दल सांगेल...

◾️ 8 ते 8:50     = 50 मिन
◾️ 9 ते 9:50     = 50 मिन
◾️ 10 ते 10:50 = 50 मिन
◾️ 11 ते 11:50 = 50 मिन

☑️ या 200 मिन मध्ये 1 मुख्य विषय वाचू शकता. यानंतर 40 मिन मध्ये जेवण तसेच इतर सर्वकाही करून लगेच 1 ला बसावे अभ्यासाला.

◾️ 1 ते 1:50 = 50 मिन
या 50 मिन मध्ये रोज चालू घडामोडी विषय वाचवा.

◾️ 2 ते 2:50 = 50 मिन
◾️ 3 ते 3:25 = 25 मिन

☑️ या 75 मिन मध्ये रोज Comprehension म्हणजेच मराठी & इंग्रजी उतारे यांचा सराव करावा.

◾️ 3:30 ते 4:20 = 50 मिन
◾️ 4:30 ते 5:20 = 50 मिन
◾️ 5:25 ते 6:00 = 25 मिन

☑️ या 125 मिन मध्ये रोज गणित आणि बुद्धिमत्ता याचा सराव करावा.
✅ असे एकूण 200 मिन तरी C-SAT चा रोज स्टडी केला पाहिजे

◾️ 6:00 ते 6:30 = नाष्टा किंवा बाकी काम असेल काही तर करावे.

◾️ 6:30 ते 7:20 = 50 मिन
◾️ 7:30 ते 8:20 = 50 मिन
◾️ 8:30 ते 9:20 = 50 मिन

☑️ या 150 मिन मध्ये 1 मुख्य विषय वाचू शकता.

◾️ 9:20 ते 10 जेवण + इतर काम

◾️ 10 ते 10:50 = 50 मिन

☑️ या 50 मिन मध्ये 1 रोज एकच विषय या time ला वाचू शकता. Like इंडियन पोलिटी... कारण हा विषय पूर्व बरोबरच मुख्य ला देखील महत्त्वाचा Scoring विषय आहे.

✅✅ असे एकूण कमीतकमी 650 मिन स्टडी  【म्हणजेच जवळपास 11 तास】असे आपण【200 मिन. मुख्य विषय - १ + 50 मिन. चालू घडामोडी + 200 मिन. CSAT + 150 मिन. मुख्य विषय -२ + 50 मिन. रेग्युलर १ विषय.】करू शकता.  ते ही जास्त टेन्शन न घेता. ✅✅

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...