Tuesday 12 March 2024

राज्यसेवा प्रश्नसंच

1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?


 97,000

 9,700

 10,000

 21,000

उत्तर : 97,000


2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.


 5 km/s

 18 km/s

 18 m/s

 5 m/s

उत्तर : 5 m/s


3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?


 यकृत ग्रंथी

 लाळोत्पादक ग्रंथी

 स्वादुपिंड

 जठर

उत्तर : यकृत ग्रंथी


4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?


 A

 B

 D

 C

उत्तर : D


5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.


 42 ओहम

 576 ओहम

 5760 ओहम

 5.76 ओहम

उत्तर : 576 ओहम


6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?


 A

 B

 C

 D

उत्तर : A


7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?


 मुकनायक

 जनता

 समता

 संदेश

उत्तर : संदेश


8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?


 9800 J

 980 J

 98 J

 9.8 J  

उत्तर : 980 J


9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?


 वि.दा. सावरकर

 अनंत कान्हेरे

 विनायक दामोदर चाफेकर

 गणेश दामोदर चाफेकर

उत्तर : अनंत कान्हेरे


10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?


 गांधीजींना अटक

 काँग्रेसचा विरोध

 चौरी-चौरा घटना

 पहिले महायुद्ध

उत्तर : चौरी-चौरा घटना


11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?


 अनंत कान्हेरे

 खुदिराम बोस

 मदनलाल धिंग्रा

 दामोदर चाफेकर

उत्तर : मदनलाल धिंग्रा


12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?


 135 व 50

 135 व 60

 145 व 50

 145 व 60

उत्तर : 145 व 60


13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?


 अप्पासाहेब परांजपे

 तात्यासाहेब केळकर

 भास्करराव जाधव

 धोंडो केशव कर्वे

उत्तर : धोंडो केशव कर्वे


14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?


 राजा राममोहन रॉय

 केशव चंद्र सेन

 देवेंद्रनाथ टागोर

 ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?


 उदारमतवादी पक्ष

 स्वराज्य पक्ष

 काँग्रेस पक्ष

 मुस्लिम लीग

उत्तर : स्वराज्य पक्ष


16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?


 स्वामी दयानंद

 स्वामी विवेकानंद

 अॅनी बेझंट

 केशवचंद्र सेन

उत्तर : अॅनी बेझंट


17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?


 इस्लामाबाद

 ढाका

 अलाहाबाद

 अलिगड

उत्तर : ढाका


18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?


 1895

 1896

 1897

 1898

उत्तर : 1897


19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?


 डॉ. बी.आर. आंबेडकर

 वि.रा. शिंदे

 महात्मा जोतिबा फुले

 भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?


 1915

 1916

 1917

 1918

उत्तर : 1916



1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ 
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर 

   2) एस. डी. आर. 

   3) पेट्रो डॉलर   

   4) जी. डी. आर.


उत्तर :- 2✔️✔️


२) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब  

  2) ब व क 

   3) अ व क    

4) वरीलपैकी सर्व


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?


   1) नाबार्ड   

 

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


   3) स्टेट बँक ऑफ इंडिया


    4) वरील सर्व


उत्तर :- 1✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?



   1) कच्च्या मालाचा अभाव   

   2) अपु-या पायाभुत सुविधा

   3) आधुनिकीकरण   

   4) कामगारांची अनुपलब्धता


उत्तर :- 2✔️✔️


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️


५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे. 

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.  

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?


   1) अ फक्त  

  2) अ आणि ब फक्त 

   3) अ, ब आणि क  

  4) अ, ब आणि ड



उत्तर :- 3✔️✔️

वेव्हेल योजना विषयी माहिती


मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता.

त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते. युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती.

अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती.

मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले.

14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.

नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.
जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.

त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील.

त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.
भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.

केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.

विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले. बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली.

व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते.

याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत.

त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.

भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या.

त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

"चलेजाव चळवळ १९४२"

नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)


२अधिवेशने-

१-वर्धा -प्रस्ताव संमत

२-गवालिया टँक,मुंबई-सुरु


◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२


◾️कारण-

क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या

जपाण आक्रमण

महागाईचा भडका

महायुध्द


◾️घोषणा-

चले जाव (युसुफ मेहेरअली)

करा अथवा मरा(गांधी)


◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे

नेहरु-अल्मोडा

जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह


◾️असहभागी घटक-

मुस्लीम लीग,

हिंदु महासभा

लिबरल पार्टी

भारतीय कम्युनीस्ट पक्ष


◾️पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा

उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )

बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)

बिहार -पुर्णिया


◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो

INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद


◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.


सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* १८२९ : सती बंदीचा कायदा

* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.

* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.

* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना

* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव

* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.

* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.

* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.

* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत

* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.

* १९०४ : अभिनव भारतची स्थापना

* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.

* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.

* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.

* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह

* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.

* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.

* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.

* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.

* १९१५ : होरूल लीगची चळवळ.

* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.

* १९१६ : लखनौ करार.

* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.

१९१९ : माँटफर्ड कायदा.

* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.

* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.

* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.

* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा

* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.

* १९२३ : झेंडा सत्याग्रह.

* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.

* १९२७ : बार्डोली सत्याग्रह

* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.

* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट

* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.

* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.

* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.

* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

* १९३१ : गांधी-आयर्विन करार.

* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.

* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.

* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.

* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार

* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.

* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.

* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.

* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.

* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.

* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.

* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना

* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.

* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.

* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.

* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.

* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.

* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.

* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.

* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.

* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.

* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.

* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार

* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.

* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) ग्लुकोजचा द्रवणांक ...... इतका आहे.

1) 150⁰c✅✅

2) - 150⁰c 

3)-218⁰c

4)218.4⁰c





2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे .... आणि  .... पासून तयार करतात.

1) लाईम आणि सल्फर

2) लाईम आणि सोडियम

3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅

 4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर





3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?

 1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%

2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅

3) काॅपर 80% + टीन 20 %

4) काॅपर 90 % + टीन 10 %




4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?

अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 

ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर

क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर

ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे  


 1) अ, ब आणि क 

 2) फक्त क  

 3) ब आणि ड ✅✅

 4) फक्त ड






5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना .... वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.   

1) हायड्रोजन✅✅ 

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायाॅक्साइड

4) अमोनिया






6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :

1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅ 

2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.     

3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात. 

4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.






7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास  ' फूल्स  गोल्ड ' ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात. 

1)  हेमाटाईट 

2) मॅग्नाटाईट

3) सायडेरेईट 

4) पायराईट ✅✅





8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे. 

1) सेल्यूलोज

2) सुक्रोज

3) सॅकॅरिन ✅✅

4) ग्लुटेन 






9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी...... चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .

1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅

2) मॅगेनीज डायऑक्साईड 

3) कॅल्शियम कार्बोनेट 

4) सिल्व्हर नायट्रेट   







10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ..... हा वायू ' ब्लू कार्बन ' या नावाने ओळखला जातो. 

1) नायट्रोजन 

2) ऑक्सिजन 

3) कार्बन डायऑक्साईड✅✅

4) हायड्रोजन

पचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास


पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते. 


अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.

गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. 


गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची.


 गावामध्ये काही वाद, भांडणे झाल्यास त्यामध्ये लक्ष घालून सोडविणे, गावचा विकास होण्यासाठी योजना आखणे, गावाचा कारभार चालविणे, गावाचा कर गोळा करून राजाला खंड वसूली देणे इ. कामे ही पंचमंडळी पार पाडीत असत.


 गावात त्यांना फार मान होता. गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत.

मौर्याच्या काळामध्ये तर त्यांना ग्रामशासनाचा अधिकार होता. व त्या दृष्टीने ह्या पंचायती खूपच विकसित झालेल्या होत्या. 


सन ८०० ते १००० च्या दरम्यान बोल घराण्याच्या इतिहासातील एकल येथील चौदा शिळा खऱ्या ग्रामपंचायतीच्या निर्देशक आहेत. आजच्या ग्रामपंचायती करीत असलेली विविध गाव विकासाची कामे या ग्रामपंचायती त्या वेळी करीत होत्या. 


ग्रामपंचायतीची निवडणूक दरसाल होत असे व सर्व सभासद लोकनियुक्त असत. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नेमणूक होई.


 ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या निधी असायचा.न्याय निवाडे ही पंचायत करी, फाशीची शिक्षा क्वचितच अंमलात येई. देवळात नंदादीप लावणे अगर पंचायतीस अमुक इतक्या गाई पुरविणे या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत.



भारतात अनेक साम्राज्ये आली होती. बाहेरून आलेल्या मोगलांनी ही पद्धत स्विकारली. भारता सारख्या खंडप्राय खेडया पाड्यात विखुरलेल्या देशाला विकेंद्रित शासनाचीच जरुरी होती.


 त्यामुळेच ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण बनत होती. ग्रामीण कारागीर, कष्टकरी यांना पोट भरण्याकरीता व्यवसाय मिळत होता.



शिवाजी महाराजांच्या काळात

 ग्रामपंचायतीची पद्धत चोहीकडे चालू होती. तीच रयतेच्या सोयीची वाटल्यावरून महाराजांनी कायम ठेवली.


 रयतेला न्याय मिळवण्यासाठी लांब कुठे जावे लागू नये म्हणून गावातील पंचांनीच फुकट न्याय दयावा हे अभिप्रेत होते. छत्रपतीच्या काळात ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे चालू होत्या.



ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी मात्र आपल्या आपल्या स्वार्थासाठी गावगड्यांची चालू व्यवस्था मोडीत काढून तलाठी पोलीस पाटील यांच्यापासून ते कलेक्टर पर्यंत नोकरशाहीची फौज निर्माण केली. 


१८८२ साली लॉर्ड रिपनने मर्यादित स्वरुपात स्थानिक स्वराज संस्थेचा कार्यक्रम अंमलात आणला. परंतु आरोग्य आणि प्राथमिक सोयी सुविधा पुरतेच त्यांचे उद्दिष्ट मर्यादित होते. 


त्यामध्ये स्वराज्याचा मागमूसही नव्हता. याच काळात तालुका लोकल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड व काही मोठया गावात ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही काही काळ चालू होत्या.



देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या पुनुरुत्थापनाचा व नवनिर्माणाचा विचार सुरु झाला. त्यामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने विचार होणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा मुलभूत आणि व्यापक अर्थ मिळाला. 


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि घटना समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढयात लोकांनी उराशी बाळगलेल्या ध्येयात ग्राम स्वराज्य हे सूत्र होते. 


त्यामुळे देशाची घटना होत असताना ग्रामपंचायतीचा स्वतंत्र तिसरा सत्र असावा अशी सूचना मांडण्यात आली. त्या सूचनेला घटना समितीतील काही लोकांनी विरोध केला. 


भारतीय समाज व्यवस्था जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर आधारीत असल्यामुळे तथाकथित उच्च वर्गीय जातींना पंचायत व्यवस्थेत पंच म्हणून स्थान मिळत असे.


 तसेच गांवातील उच्च जातीय लोकच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असत. अशा रितीने या पूर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते..


 ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता. 


🔹परस्तावना🔹


आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.

महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.


🔹गरामसभेचे सदस्य 🔹


पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.


🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹


 कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.


🔹गरामसभेचा कारभार 🔹


ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.


🔹गरामसभेचे पदाधिकारी 🔹


ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]

अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.


🔴राज्य घटनेत करण्यात आलेला बदल🔴


७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग ९-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम २४३ ते कलम २४३-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायदयाने राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे.

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे.


🔴घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश🔴

पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारे आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप व मनमानी करू शकत नाहीत. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहीलेल्या नाहीत. बऱ्याचशा वेळा राज्यामध्ये शासन करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक घेण्याकरीता अनुकूल परिस्थिती नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलल्या जात असत. महाराष्ट्रात एकेकाळी निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तब्बल १२ वर्षानंतर घेण्यात आल्या होत्या. आता दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये ज्याकाही तरतूदी असतील त्यांचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे.


यशाची त्रिसूत्री

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

'✔️वेळ, 😥नियोजन आणि ✔️अंमलबजावणी'

कुठल्याही कामाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. उगाच घाई-गडबड करून काम लवकर होण्याऐवजी बिघडण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं(chemical reaction) उदाहरण नक्की समोर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, प्रयोगशाळा आहे, आवश्यक ती तज्ज्ञता आहे, सर्व अभिक्रियाकारके (reactants) आणि उत्प्रेरके(catalysts) हे सर्व असलं आणि आपण सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरीही हवा तो product तयार होण्यासाठी आपल्याला आवश्यक तो वेळ हा द्यावाच लागतो. याला म्हणायचं time constant, हा ठरलेला असतोच. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातही तो असतोच आवश्यक त्या सर्व गोष्टी पुस्तकं, अभ्यासिका, test series हे सर्व उपलब्ध असूनही वेळ द्यावा लागणारच असतो कारण काही गोष्टींमध्ये वेळेनुसारच maturity येत असते. Teachers/Mentors हे Catalysts प्रमाणे काम करून हा वेळ थोडाफार कमी करू शकतात एवढंच परंतू हवं ते product म्हणजे यश मिळवण्यासाठी स्वत:च transform होणं आवश्यक असतं.

दुसरं म्हणजे नियोजन. कितीही वेळ दिला तरीही आपल्याकडे योग्य नियोजन नसेल तरीही आपल्याला यश मिळणं अवघड आहे. कारण क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतो म्हणून काटेकोर नियोजन असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये long term, short term planning तसेच macro and micro management चं महत्त्व असतं.

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कारण प्रत्यक्ष कृतीविना सर्व संकल्प निरर्थक असतात.
(क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे) ही बऱ्याच जणांची समस्या असते.. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असते.. प्रत्यक्ष कृती करणे आणि त्यात सातत्य आणि सुधारणा राखने हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्याच टप्प्यावर out of the control factors आपल्याला सर्वाधिक त्रास देतात म्हणून अंमलबजावणीच्या वेळी मानसिक स्थिरता अत्यंत आवश्यक असते. ही स्थिरता आपण केलेल्या नियोजनावर आणि करत असलेल्या अभ्यासावर आपला पूर्ण विश्वास असल्यास मिळू शकते. अभ्यासिकेत किती वेळ बसतोय किंवा किती pages वाचून काढलेत यापेक्षा किती घटकांचा अभ्यास मी व्यवस्थित पूर्ण केला या गोष्टीला यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून दिखाऊपणा किंवा अवडंबर म्हणून पहाटे चार ला उठून अभ्यासाला बसने किंवा रात्र जागून काढून अभ्यास करणे असं काहीही अचाट न करताही व्यवस्थित, नियोजनपूर्वक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने आपला अभ्यास आपण पूर्ण केला, micro notes काढल्या, multiple revisions केल्या तर यश आपल्याला नक्की मिळेल.

शेवटी पुन्हा एकच  क्षेत्र कुठलंही असलं तरीही यश हा काही अपघात किंवा योगायोग नसतोच तर परिपूर्ण नियोजन आणि कठोर अंमलबजावणीचा तो परीणाम असतो.
म्हणून वेळ द्या, नियोजन करा आणि अंमलात आणा.
स्व.बाबा आमटेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर "भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा"

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


गणितातील महत्वाची सूत्रे

🔴 सरासरी 🔴

1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

 

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14

 

संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

 

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

 

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

 

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

 

3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

 

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810

 

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20) 

 

 सरळव्याज :-

·         सरळव्याज (I) = P×R×N/100

·         मुद्दल (P) = I×100/R×N

·         व्याजदर (R) = I×100/P×N

·         मुदत वर्षे (N) = I×100/P×R

·         चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे  

 नफा तोटा :-

·         नफा = विक्री – खरेदी    
 

·         विक्री = खरेदी + नफा     

·         खरेदी = विक्री + तोटा 

·         तोटा = खरेदी – विक्री    
 

·         विक्री = खरेदी – तोटा   
 

·         खरेदी = विक्री – नफा 

·         शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)  

 आयात, चौरस, त्रिकोण, कोन :-

·         आयत -
आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)   
    

·         आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी 

·         आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी    
 

·         आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी 

·         आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

·         आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         चौरस -

·         चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी     

·         चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2 

·         चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.

   समभुज चौकोण -

·         समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ     

·         = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2 

·         समलंब चौकोण -

·         समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2 

·         समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज 

·         समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर 

·         त्रिकोण -

·         त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2

·         काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ    
 

·          

·         = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2

·          

·         पायथागोरस सिद्धांत -

·         काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2 

 प्रमाण भागिदारी :-

·         नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर 

·         भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर 

·         मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर 

 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-

A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 

B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5 

C) गाडीचा ताशी वेग  = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ  × 18/5

 

D) गाडीची लांबी  = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.

1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर  = 3600/1000 = 18/5

 

G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2

 

H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी

 

I) भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

 

= वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक

 

लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 

************************************************************************

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे


🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

general question

 प्रश्न 1

कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” ही 25 सैनिकांच्या चमूची धावशर्यत आहे जे इतक्या दिवसांत 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील 

                      🔴 45 दिवस.



प्रश्न 2

भारतीय रेल्वेने सन 2023-24 पर्यंत इतक्या खासगी ट्रेन (तेजस एक्सप्रेस) चालविण्याचा निर्णय घेतला आहे 

                        🔴 150


प्रश्न 3

या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे 

                  🔴 गरेटर नोएडा, उत्तरप्रदेश.


प्रश्न 4

भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळाचे वर्तमानातले अध्यक्ष 

                      🔴 विनोद कुमार यादव


प्रश्न 5

इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे, असा निर्णय देणारे उच्च न्यायालय  

                    🔴 करळ उच्च न्यायालय.


प्रश्न 6  

“PACEसेटर फंड”ची स्थापना या साली भारत आणि संयुक्त राज्ये अमेरिका यांनी केली होती 

                    🔴 सन 2015.



प्रश्न 7

भारतीय रेल्वे याचे स्थापना वर्ष  

                    🔴 सन 1845 (08 मे).

प्रश्न 10

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते

          🔴 यशवंतराव चव्हाण


प्रश्न 11

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते

          🔴 शरी. प्रकाश


प्रश्न 12

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती

          🔴 मबई



प्रश्न 13

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते  

          🔴 मबई (1927)


प्रश्न 14

महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते

          🔴  मबई (2 ऑक्टोबर 1972



प्रश्न 15

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते

          🔴 कर्नाळा (रायगड)



प्रश्न 16

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते

          🔴 खोपोली (रायगड)



प्रश्न 17

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणता

           🔴 तारापुर



प्रश्न 18

महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते

      🔴 राहुरी (1968 जि. अहमदनगर)



प्रश्न 19

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता

🔴 परवरानगर (1950 जि. अहमदनगर)




प्रश्न 20

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणती

🔴 कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी


प्रश्न 21

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता 🔴 जमसांडे  देवगड (जि. सिंधुदुर्ग)



प्रश्न 22

महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते

            🔴 आर्वी (पुणे)



प्रश्न 23

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणते

           🔴 चद्रपुर



प्रश्न 24

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते

           🔴 दर्पण (1832)



प्रश्न 25

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते

          🔴 दिग्दर्शन (1840)



प्रश्न 26

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते

          🔴 जञानप्रकाश (1904)



प्रश्न 27

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती

          🔴 पणे (1848)




प्रश्न 28

महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती

          🔴 सातारा (1961)


प्रश्न 29

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती

          🔴 मबई (1854)


प्रश्न 30

महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते

          🔴 ताजमहाल, मुंबई



प्रश्न 31

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण

          🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण



प्रश्न 32

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण

          🔴 महर्षि धोंडो केशव कर्वे


प्रश्न 33

महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण

          🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण


प्रश्न 34

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति

         🔴 आचार्य विनोबा भावे



प्रश्न 35

महाराष्टाचे पहिले रँग्लर कोण

         🔴 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे



प्रश्न 36

महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर कोण

        🔴 आनंदीबाई जोशी



प्रश्न 37

महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा

       🔴 वर्धा जिल्हा



प्रश्न 38

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष 

       🔴 नयायमूर्ती महादेव रानडे



प्रश्न 39

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) कोठून कोठे धावली

    🔴 मबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )



प्रश्न 40

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) कोठून कोठे धावली

        🔴 मबई ते कुर्ला (1925)



प्रश्न 41

महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण

        🔴 सरेखा भोसले (सातारा)



प्रश्न 42

महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता

        🔴 सिंधुदुर्ग



प्रश्न 43

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा 

        🔴 कसुमावती देशपांडे



प्रश्न 44

महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण

        🔴 डॉ. सुरेश जोशी




प्रश्न 45

महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे केला

         🔴 वडूज



प्रश्न 46

ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता

          🔴 शवास (2004)



प्रश्न 47

राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता

          🔴 शवास



प्रश्न 48

राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता

          🔴 शयामची आई


प्रश्न 49

पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?

           🔴 पाण्याच्या वाफेमुळे



प्रश्न 50

भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?

           🔴 रडॉन चे



प्रश्न 51

शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?

          🔴 ननाटक



प्रश्न 52

भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?

         🔴 सातपुडा,विंध्यानचल



प्रश्न 53

कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?

          🔴 मनुष्यबळ विकास मंत्रालय



प्रश्न 54

विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोण

           🔴 अडी मरे 


प्रश्न 55

‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे

           🔴 परणव मुखर्जी 

 


प्रश्न 56

भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

            🔴 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया 

 


प्रश्न 57

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?

            🔴 सतीश माथुर



महाराष्ट्राचा भूगोल


🔅 महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६०

🔅 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी.


🔰 महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२

🔰 महाराष्ट्राची राजधानी – मुंबई

🔰 महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर

🔰 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे

🔰 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर

🔰 महाराष्ट्राचा आकार – त्रिकोणाकृती


🌊 महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा – ७२० कि.मी. 


🔅 महाराष्ट्रातील जिल्हे – ३६

🔅 महाराष्ट्रातील तालुके – ३५८

🔅 महाराष्ट्रातील महानगरपालिका – २७

🔅 महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा – ३४


⚜️ महाराष्ट्रातील महसूल विभाग (प्रशासकीय) महाराष्ट्रातील 

    प्रादेशिक विभाग – ५

⚜️  महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग – १

 

🔰  महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार – १५८’ उत्तर ते २२ उत्तर

🔰  महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार – ७२६ पुर्व ८९’ पूर्व रेखांश


🔰 महाराष्ट्राचे स्थान – उत्तर – पूर्व गोलाधार्त आहे.

🥉 कषेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – तिसरा


🔅 कषेत्रफळानुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.३६%

🥈 भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात 

     क्रमांक – दुसरा


🔅 भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.२८%

⚜️ मबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा 

     परिषदा नाहीत.

⚜️ मबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.


⬆️ महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य – मध्यप्रदेश

⬇️ महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य – गोवा व कर्नाटक

➡️ महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य – छत्तीसगड 

↘️ महाराष्ट्रच्या आग्नेयेला असलेले राज्य – तेलंगणा

↖️ महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य – गुजरात, दादरा, नगर हवेली.


⏫  महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार

⏬ महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग

⏩ महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली

⏪ महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर


🌊 सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – ठाणे (२५km)

🌊 सर्वात जास्त समुद्रकिनारा - रत्नागिरी (२३७km)


🔰 महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा – नंदूरबार



1⃣ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग

2⃣ महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद

3⃣ महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा – नागपूर


🐿 महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरूखार

🕊 महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल

🌼 महाराष्ट्राचे राज्यपूल – ताम्हन/जाराल

🦋  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरा - ब्ल्यू मॉरमोन

🍋 महाराष्ट्राचे राज्य वृक्ष - आंबा


📚 महाराष्ट्राची राजभाषा – मराठी

🔰 महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याची लागून आहे.

🔰 महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागून आहे.


🔅 विदर्भाचे काश्मीर व नंदनवन – चिखलदरा

🔅महाराष्ट्राचे नंदनवन- महाबळेश्वर


🌧  महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे 

      ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)

⛈ महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे 

     ठिकाण – गगनबावडा (कोल्हापूर)

☁️ महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण 

    - दहीवड व म्हसवड (सातारा)

🌧 महाराष्ट्रा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य 

     जास्त पडतो.

🌦 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला किनारी भागात 

     आंबेसरी / आमसरी असे म्हणतात.

⛈ उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला पठारी भागात अवकाळी

    किंवा वळवाचा पाऊस असे म्हणतात.

 🔅 हवामान संक्रामणाचा महिना – ऑक्टोबर

⛈ महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जूलै महिन्यात पडतो.

🏔 समुद्रासपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाते..


🔅 महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा – काळी मृदा

🔅 काळ्या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकापासून होते

🔅 टिटॅनी फेरस मॅकोटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला 

      काळा रंग येतो

🔅 काळ्या मृदेला रेगूर / रेगूड / कापसाची काळी मृदा 

     असेही म्हणतात

🔅 कापूस हे रेगूर मृदेतील अतिशय महत्त्वाचे पिक आहे.


🔰 मदा व जलसंधारण आयुक्तालय – औरंगाबाद

🔰 महाराष्ट्राचे वनांखालील एकूण क्षेत्र – २०.१२%

🔰 महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्यालय – नागपूर

🌳 महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने असणारा जिल्हा – गडचिरोली

🌵महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असणारा जिल्हा – लातूर

 

🔅 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३४ क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक आहे.


भारतीय संविधानाचे भाग


* •    भाग १ -* कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी

------------------------------------------------

*•    भाग २ -* कलमे ५-११ नागरिकत्व

------------------------------------------------

*•    भाग ३ -* कलमे १२-३५ मूलभूत हक्क

•    कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

•    कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

•    कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

•    कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

------------------------------------------------

*•    भाग ४ -*

•  सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१ 

•  कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन 

•  कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार 

•  भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये. 

------------------------------------------------

*•  भाग ५ -*

•  प्रकरण १ - कलमे ५२-७८ 

•  कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, 

•  कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक 

•  कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी, 

•  कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत. 

•  कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत, 

•  कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत, 

•  कलमे ९९-१०० 

•  कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत, 

•  कलमे १०७-१११ (law making process) 

•  कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत, 

•  कलमे ११८-१२२ 

•  प्रकरण ३ - कलम १२३ 

•  कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत 

•  प्रकरण ४ - कलमे १२४-१४७ 

•  कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत 

•  प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत. 

•  कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत 

------------------------------------------------ 

*भाग ६*- राज्यांच्याच्या बाबतची कलमे. 

•  प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या 

•  कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून 

•  प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत 

•  कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत, 

•  कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर, 

•  कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत. 

•  कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत. 

•  प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित. 

•  कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती 

•  कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार 

•  कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी 

•  कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे 

•  कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी 

•  कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी 

•  कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी 

•  प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत 

•  कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके. 

•  प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

*•  भाग ७*- राज्यांच्या बाबतील कलमे. 

•  कलम २३८ - 

------------------------------------------------

*•  भाग ८* - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे 

•  कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

*•  भाग ९* - पंचायती पद्धतीबाबतची कलमे 

•  कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत 

------------------------------------------------

*•  भाग ९ऎ*- नगरपालिकांबाबतची कलमे. 

•  कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत 

------------------------------------------------

*•  भाग १० - *

•  कलमे २४४ - २४४ऎ 

------------------------------------------------

*•  भाग ११* - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी 

•  प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  प्रकरण २ - कलमे २५६ - २६३ 

•  कलमे २५६ - २६१ - सामान्य 

•  कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत. 

•  कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध. 

------------------------------------------------

*•  भाग १२* - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत 

•  प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत 

•  कलमे २६४ - २६७ सामान्य 

•  कलमे २६८ - २८१ 

•  कलमे २८२ - २९१ इतर 

•  प्रकरण २ - कलमे २९२ - २९३ 

•कलमे २९२ - २९३ 

•  प्रकरण ३ - कलमे २९४ - ३०० 

•  कलमे २९४ - ३०० 

•  प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक 

•  कलम ३००ऎ - 

------------------------------------------------

*•  भाग १३*- भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे 

•  कलमे ३०१ - ३०५ 

•  कलम ३०६ - 

•  कलम ३०७ - 

------------------------------------------------

*•  भाग १४ - *

•  प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४ 

•  कलमे ३०८ - ३१३ 

•  कलम ३१४ - 

•  प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

•  कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

--------------------------------------.........

*•  भाग १४ऎ* - आयोग च्या बाबत कलमे 

•  कलमे ३२३ऎ - ३२३बी 

---------------------------------------------

*•  भाग १५*- निवडणूक विषयक कलमे 

•  कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे 

•  कलम ३२९ ऎ - 

----------------------------------------------

*•  भाग १६* - 

•  कलमे ३३० -३४२ 

-------------------------------------------

*•  भाग १७*- अधिकृत भाषॆबाबतची कलमे 

•  प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत 

•  कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी 

•  कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि 

•  प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश 

•  कलम ३५० - 

•  कलम ३५० ऎ - 

•  कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम 

•  कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम 

-----------------------------------------------

*•  भाग १८ - आणीबाणी* परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलम ३५९ऎ - 

•  कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

---------------------------------------------- 

*•  भाग १९ - इतर विषय*

•  कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय 

•  कलम ३६२ - 

•  कलमे ३६३ - ३६७ - इतर 

-----------------------------:-::-------------

*•  भाग २० -*

•  कलम ३६८ - घटनादुरुस्ती

---------------------------------------------

*•  भाग २१ -* 

•  कलमे ३६९ -३७८ऎ 

•  कलमे ३७९ - ३९१ - 

•  कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क 

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती.


🅾3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.

🅾 महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.

🅾महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.

🅾महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

🅾 महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना 'नगरसेवक' म्हणतात.

🅾महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.

🅾 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.

🅾 आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.

🅾 महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.

🅾महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.

🅾महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.

🅾 सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.

🅾 पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...