Monday 19 August 2019

शब्दसमूहाबद्दल एक शब्द


▪️ज्याला कधीही मृत्यू नाही असा - अमर

▪️ज्याला कधीही वाट येत नाही असे - अवीट

▪️मोफत अन्न मीळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

▪️ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे - अनुपम, अनुपमेय

▪️कोणाचा आधार नाही असा - अनाथ

महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक

✍शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सेनापदक दिलं जाणार आहे.

✍उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आलं.

✍त्यांच्या शौर्याचा गौरव मरणोत्तर सेना पदक देऊन केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती.

✍कौस्तुभ राणे यांना मागच्याच वर्षी नियंत्रण रेषेजवळ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देण्यात आले होते.

✍तसेच त्यांना मेजर हा हुद्दा देऊन लष्करात बढतीही देण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले.

✍मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या वैभववाडी येथील सडुरे गावचे राणे कुटुंब १९९० मध्ये मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर या इमारतीत रहायला आले.

✍कौस्तुभचे शालेय शिक्षण मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत झाले.

✍लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या कौस्तुभने शालेय जीवनातच सैन्यात जायचे नक्की केले होते.

✍लष्करी शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले.

✍ऑक्टोबर २०११ मध्ये लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजू झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि २०१८ मध्ये मेजर पदावर कार्यरत होते.

✍मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आले.

✍कौस्तुभ यांचे वडील खासगी कंपनीत नोकरीला होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांची आई निवृत्त शिक्षिका आहेत.

✍काश्मीरमध्ये बदली होण्याआधी ते कोलकाता येथे आपल्या पत्नीसह रहात होते.

✍मात्र काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि मुलाला आई वडिलांकडे मीरारोडला रहायला पाठवले होते.

✍एप्रिल २०१८ मध्येच त्यांनी कुटुंबाची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर बातमी आली ती त्यांच्या जाण्याचीच. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. 

✍त्यांच्या शौर्याचा गौरव सेना पदक देऊन केला जाणार आहे.

महत्त्वाचे खटले आणि वर्ष:

🔸 शंकरी प्रसाद खटला- 1951

🔸 मद्रास राज्य वि चंपकम दोराईराजन खटला- 1951

🔸 बेरुबारी खटला- 1960

🔸 गोलकनाथ वि पंजाब राज्य- 1967

🔸 केशवानंद भारती वि केरळ राज्य - 1973

🔸 मेनका खटला- 1978

🔸 मिनर्वा मिल्स खटला- 1980

🔸 इंद्र सहानी खटला- 1992

🔸 किहोतो होलोहोन खटला- 1993

🔸 एस आर बोम्मई खटला- 1994

🔸 एल चंद्रकुमार खटला- 1997

🔸 आय आर कोइल्हो खटला- 2007

भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

निष्ठा योजना

👉मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून जगभरातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना सुरु करण्यात येणार आहे.

👉या योजनेचे नाव ‘निष्ठा योजना’ असणार आहे.

👉निष्ठा म्हणजेच National Initiative on School Teachers Head Holistic Advancement (NISHTHA).

👉या योजने अंतर्गत ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

👉यात सर्व राज्यातील शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे.

👉२२ ऑगस्टला योजनेची सुरुवात होणार आहे.

👉मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल .

आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड निघोज




▪️अहमदनगर ला निसर्गाने खूप भर भरून दिलंय ह्याचाच एक उदाहरण निगोज चे रांजणखळगे अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते.

▪️ आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही.

▪️अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. या गावात "श्री मळगंगा माउली"चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे रांजणखळगे गावापासून तीन कि.मी अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहे.

▪️खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.

▪️इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात.

▪️तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.

▪️सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते.मी हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.

▪️नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे.

✅ कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो.


महाराष्ट्रात संरक्षण मंत्रालयाने चालवलेल्या संस्था

🔹नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे

🔸नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी – पुणे

🔹इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन – मुंबई

🔸जसलोक रिसर्च सेंटर – मुंबई

🔹हाफकिन इन्स्टिट्यूट – मुंबई

🔸इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन – मुंबई

🔹रिजनल कॅन्सर सेंटर – पुणे

🔸इंडियन ड्रग रिसर्च लॅबरोटरी – पुणे

चालू घडामोडी वन लाइनर्स, 19 ऑगस्ट 2019


19 ऑगस्ट: जागतिक छायाचित्रण दिन

अभिनव बिंद्रा यांची पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्ती

हरभजन सिंग यांना पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त केले

गगन ढळ यांना ओडिशा वन विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

14 वे "कोकण -19" भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही दरम्यान द्विपक्षीय व्यायाम

केरळमधील तिरुर सुपारी द्राक्षारस भौगोलिक इंडिकेसन (जीआय) टॅग मिळविते

मिझोरम गेट्स भौगोलिक इंडिकेसन (जीआय) टॅग कडून टाव्हलोहपुआन आणि मिझो पुंची

अथलेटिक मिटिंक रीटर 2019 झेक प्रजासत्ताकमध्ये प्रारंभ करा

झेक प्रजासत्ताकमध्ये अ‍ॅथलेटिक मिटिंक रीटर 2019 मध्ये मोहम्मद अनसने पुरुषांच्या 300 मी सुवर्णात पुरुषांची नोंद केली

विराट कोहलीच्या सन्मानार्थ डी.डी.सी.ए.

अमेरिकेच्या एफडीएने प्रीटॉमॅनिइड ड्रग रेझिस्टंट टीबीसाठी नवीन औषध मंजूर केले

पद्मश्री पुरस्कारदाता दामोदर गणेश बापट यांचे निधन

प्रख्यात बांगलादेशी कादंबरीकार रिझिया रहमान यांचे निधन

दिल्ली सरकार 29 ऑक्टोबरपासून शासकीय बसांवर महिलांसाठी नि: शुल्क प्रवासाची ऑफर देणार आहे

पंतप्रधान मोदी 23-24 ऑगस्ट रोजी युएईच्या राज्य दौर्‍यावर असतील

पंतप्रधान मोदी 24-25 ऑगस्ट रोजी बहरेनच्या राज्य दौर्‍यावर असतील

पंतप्रधान मोदी 23 ऑगस्टला यूएईचा सर्वोच्च नागरी सन्मान "जाएदचा आदेश" प्राप्त करणार आहेत

कॅनडाचा रवींदरपाल सिंग टी -20 आयमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला

चौथा जागतिक पोलिस आणि फायर गेम्स चीनमध्ये

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरुवात आज स्वित्झर्लंडच्या बासेल येथे झाली

ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेत न्यूझीलंडने भारतावर 2-1 अशी मात केली

एएएम एस जयशंकर 21 ऑगस्टपासून 2 दिवसाच्या नेपाळच्या दौर्‍यावर येणार आहेत

मिशेल जॉन्सन एमसीसी ऑनररी लाइफ मेंबर म्हणून निवडले

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद शहजादला 1 वर्षासाठी निलंबित केले

अशेस 2019: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची दुसरी कसोटी सामना

सिनसिनाटी मास्टर्समध्ये रशियाचे डॅनिल मेदवेदेव पुरुष एकेरीचे विजेतेपद

अमेरिकेच्या मेडीसन कीजने सिनसिनाटी मास्टर्समध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले

विराट कोहली सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स क्रिकेटर

दक्षिण कोरियामध्ये 20 व्या आशियाई महिला व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ

ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धा एस्टोनियामध्ये पार पडली

ज्युनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने 3 पदके जिंकली

इंग्लंडचा खेळाडू अशली कोलने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली

भूतानला डिजिटल पेमेंट्स, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारत मदत करेल

ऑलिम्पिक हॉकी टेस्ट स्पर्धेत भारत महिलांनी ऑस्ट्रेलियाला 2-2 असा बरोबरीत रोखले

कझाकस्तानमध्ये यू 12 एशियन टेनिस टीम स्पर्धा आयोजित

यू 12 एशियन टेनिस टीम स्पर्धेत भारताने सुवर्ण जिंकले

अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दिल्लीत भारतीय ग्रँड प्रिक्स-VI चे आयोजन

जागतिक कौशल्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा रशियामधील केझान येथे होणार आहे

भारत-नेपाळ संयुक्त आयोगाची पाचवी बैठक काठमांडू येथे होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते  भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत  प्रकल्पाचे उद्घाटन


👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

👉4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे.

👉 प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे.

👉2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

👉मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.

👉हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

👉हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे.

👉बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

✍️भुटान

👉हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे.

👉थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात.

👉झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.

राज्यात नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले

▪️राज्यातील रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याचे झरे असण्याची शक्‍यता अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे.

▪️ मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पर्यटनासाठी उपयुक्त असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांबाबत अनभिज्ञतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या योग्य संवर्धनाची गरज शास्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

▪️अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या वनस्पतींबाबत पुण्यातील भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या अभ्यासकांकडून संशोधन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा अभ्यास सुरू असून या अभ्यासांतर्गत या गरम पाण्याच्या झऱ्यांचा शोध लागला आहे.

▪️भूगर्भातील खालच्या थरात असलेल्या लाव्हामधून बाहेर पडणारी उष्णता ज्यावेळी भूगर्भातील पाण्याला मिळते, त्यावेळी पाण्याचे तापमान वाढते. लाव्हामुळे मिळणाऱ्या उषणतेमुळे तापलेले हे पाण्याचे स्रोत म्हणजेच गरम पाण्याचा झरा (हॉट वॉटर स्प्रिंग)असतो. काही ठिकाणी या झऱ्याचे तापमान सामान्य असते. अशावेळी या झऱ्यामध्ये नागरिक अंघोळदेखील करू शकतात. मात्र, काही ठिकाणी हे तापमान अतिशय घातक असते.

या पाण्यात असणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मजीवांमुळे त्वचेचे रोग नष्ट होण्यास मदत होते.

राज्य पुनर्रचना आयोग 1953

- अध्यक्ष: फजल अली
- सदस्य: के.एम.पण्णीकर, ह्रद्यनाथ कुंझरू
- आयोगाने आपला अहवाल सप्टेंबर 1955 मध्ये सादर केला.

- या आयोगाने 14 राज्ये [आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, बाॅम्बे, जम्मू आणि काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल] निर्माण करण्यात आली.

- याच आयोगाने सहा केंद्रशासित प्रदेशांची [अंदमान व निकोबार बेटे, लॅकॅडिव्ह मिनिकाॅय व अमिनदिवी बेटे, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, मणीपूर] निर्मिती केली.

- 1956 नंतर भाषिक राज्यांच्या मागण्यांनी जोर धरला त्यामुळे 1960 मध्ये बाॅम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात (15 वे) या राज्यांची निर्मिती करण्यात आली.

भारत- भूतान आर्थिक, सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेणार- मोदी

✍पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले असून त्यांनी त्यांचे समपदस्थ लोटे शेरिंग यांच्याशी शनिवारी चर्चा केली. वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली असून यासंबंधात १० सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

✍दोन्ही देशांच्या संबंधात दृढता आणि विश्वास आणण्याचा यात प्रयत्न असून मोदी यांनी शेरिंग यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटर संदेशात दिली. त्यांनी म्हटले आहे, की भूतानमधील जुने धार्मिक केंद्र असलेल्या सिमटोका डोझाँग बरोबर समझोता करार होणार आहे. रुपे कार्डही सुरू करण्यात आले आहे.

✍मोदी यांची ही भूतानला दुसरी भेट असली तरी त्यांच्या दुसऱ्या पर्वातील पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी यांना भूतानच्या ताशीछोडझोंग राजवाडय़ात सलामी देऊन जंगी स्वागत करण्यात आले. पारो विमानतळावरही त्यांचे शाही स्वागत झाले.

✍दोन्ही देशांदरम्यान व्यापक चर्चा झाली असून आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यास मोठी संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते भूतानी विद्यार्थ्यांशी प्रतिष्ठित रॉयल विद्यापीठात संवाद साधणार आहेत.

बीपिन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ?


📌लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

📌तीन महिन्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही समिती सरकारला आपला अहवाल सोपवेल. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत देशाचे २६ वे लष्करप्रमुख आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. तेच देशाचे पहिले सीडीएस असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सीडीएस तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना वरिष्ठ असतील कि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या समान त्यांचा दर्जा असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते सुद्धा अजून स्पष्ट नाही असे हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

📌संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...