Thursday 2 June 2022

महत्वपूर्ण माहिती ( राज्यसेवा पूर्व परिक्षा)

नोबेल पुरस्कार बद्दल माहिती ..

नोबेल पुरस्कार ची सुरवात हि स्वीडिश वैज्ञानिक आल्फेड नोबल यांनी नोबेल प्राईज देण्याची सुरवात केली..

● १९०१ मध्ये त्यांनी ,
Physics , chemistry , laterature , peace physiology or medicien इ.

(१९६९ ला अर्थशास्त्र चा पुरस्कार देण्यात सुरवात झाली)

★ पुरस्काराचे स्वरूप :- ९० लाख स्वाडीश क्रोनर (२०१९ च्या आकडेवारीनुसार) रु रोख आणि २४ कॅरेट गोल्ड मेडल.

★ नोबेल हा पुरस्कार हा १० डिसेंबर रोजी दिला जातो..
● आल्फ्रेड नोबेल यांच्या जयंती निमित्त दिला जातो..

★ पहिले भारतीय व्यक्ती ..
●● रवींद्रनाथ टागोर  (१९१३)
●● सी व्ही रमण (१९३०)
●● हर गोबिंद खुराणा ( १९६८)
●● मदर टेरेसा( १९७९)
●● सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३)
●● अमर्त्य सेन (१९९८)
●● व्यंकटरामन रामकृष्ण ( २००९)
●● व्ही.एस.नायपॉल (२००१)
●● कैलास सत्यार्थी  (२०१४)
●● अभिजित बॅनर्जी (२०१९) (भारतीय वंशीय व्यक्ती सध्या अमेरिकेचे नागरिक आहे.)

टीप :-  १) नोबेल पुरस्कार आत पर्यंत 10 भारतीय व्यक्तींना मिळाला आहे.

२) सर्वात जास्त पुरस्कार अमेरिका या देशातील व्यक्तींना मिळाला आहे.

◆● महात्मा गांधी यांना १९३७, १९३८, १९३९, आणि १९७४ ला नोबेल साठी नोमिनेट केले होते..

★★ २०२० चे नोबेल पुरस्कार विजेते★★

1) रसायनशास्त्र :-  इमॅन्युएल चार्पेंटीर(फ्रांस) , जेनिफर ए.दौदना(अमेरिका)

2) भौतिकशास्त्र :- अँड्रिया एम.गेझ , रॉजर पेनरोस , रेइनहार्ड गेन्झेल

3) वैद्यकशास्त्र :- हार्वी जे.आल्टर(अमेरिका) ,मायकल ह्युटन(ब्रिटन) , चार्ल्स.एम राईस(अमेरिका)

4) अर्थशास्त्र :-  पॉल मिलग्रोम रॉबर्ट विल्सन

5) शांतता :- WFP - जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Programme)

6) साहित्य :- लुईस ग्लक ( अमेरिका ).

मुस्लिम राजकारण व चळवळ ( थोडक्यात)

➡️ मुस्लिम राजकारण व चळवळ ( थोडक्यात)

◾️1905 बंगालची फाळणी

◾️1906 मुस्लिम लीग

◾️1909 स्वतंत्र मतदारसंघ

◾️1916 लखनौ करार (H+M) एकी

◾️1928 नेहरू अहवाल

◾️1928 जीनांचा दिल्ली प्रस्ताव

◾️1929 जीनांचा 14 कलमी योजना

◾️1930 सायमन अहवाल

◾️1937 प्रांत निवडणुका

◾️1940 पाकिस्तानचा प्रस्ताव ( द्विराष्ट्र सिद्धांत)

◾️1944 राजाजी योजना (पाकिस्तान ला समर्थन)

◾️1945 अपयशी सिमला परिषद

◾️1946 त्रिमंत्री योजना (अपयशी)

◾️1947 माऊंटबॅटन योजना

◾️1947 दोन स्वतंत्र्य देश.

वाहतूक व दळणवळण

वाहतूक व दळणवळण

१) कर्नल शेवांग रिनशेज पूल/लडाखचा सिंह
भारतातील सर्वाधिक उंचीवरील सर्व ऋतूकालीन पूल
आक्टो. २०१९ राजनाथसिंह हस्ते उद्घाटन
समुद्र सपाटीपासून १४०५० फूट उंचीवर
लडाखमध्ये श्योक नदीवर (दूरबूक व दौलत बेगओल्डी)

२) मैत्री ब्रिज
भारतीय लष्कराने केवळ ४० दिवसात तयार केलेला
सिंधू नदीवर (लेह) झुलता पुल

३) बोगीबिल पूल / अटल सेतू
देशातील सर्वात लांब रेल्वे – रस्ते पूल (४.९४ किमी)
ब्रहमपुत्रा नदीवर (आसाम- अरुणाचल प्रदेश जोडतो)
पुलाच्या खालच्या भागात दुहेरी रेल्वेमार्ग तर पुलाच्या वरच्या भागात ३ पदरी रस्ता

४) चेनानी – नाश्री बोगदा
देशातील सर्वाधिक लांबीचा (९.२ किमी) बोगदा
आक्टो २०१९ मध्ये या बोगदयास डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले.
JK मध्ये हा बोगदा रा.महामार्ग क्र. ४४ वर आहे.

५) कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट
जाने २०२० मध्ये या बंदराला १५० वर्षे पूर्ण
या प्रसंगी त्याचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी
कांडला बंदर – प.दीनदयाल उपाध्याय पोर्ट ट्रस्ट
न्हावाशेवा बंदर - प.जवाहरलाल नेहरु बंदर (JNPT)

६) द.किनारपट्टी रेल्वे क्षेत्र (आंध्रप्रदेश)
भारताचा १८ वा रेल्वे विभाग
मुख्यालय - विशाखापट्टण
एकूण लांबी - ३४९० किमी

७) तेजस एक्सप्रेस
विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाई देणारी रेल्वे
पहिली खाजगी रेल्वे (दिल्ली – लखनौ प्रवास)
१ ली सेमी – हाय स्पीड, पूर्ण वातानुकुलित रेल्वे

८) बुध्दीस्त सर्किट ट्रेन
भारत नेपाळ दरम्यान धावणार
गौतम बुध्दांच्या जीवनाशी निगडीत स्थळांना भेट देणारी

९) थार एक्सप्रेस व समझोता
थार - जोधपूर ते मुनाबाव दरम्यान (साप्ताहिक) एक्सप्रेस
समझोता - दिल्ली ते अटारी दरम्यान
भारत व पाक दरम्यान धावणाऱ्या या रेल्वे कलम ३७० हटवल्यानंतर रद्द करण्यात आल्या

१०) वंदे भारत एक्सप्रेस/ ट्रेन १८
स्वदेशी बनावटीची सर्वात वेगवान (१६०-१८० किमी)
पहिला प्रवास - दिल्ली ते वाराणसी
दुसरा प्रवास - (दिल्ली ते कटरा)
स्वतंत्र इंजिन नसणारी, १६ डब्यांची रेल्वेगाडी

११) समानता एक्सप्रेस
डॉ.बाबासाहेब व गौतम बुध्द यांच्याशी संबंधित
स्थळांना भेट देणारी ही रेल्वे
चैत्यभूमी, महू, बोधगया, सारनाथ, लुंबिनी, दीक्षाभूमी.

१२) स्पाइसजेट
१०० विमाने असणारी भारतातील चौथी कंपनी
एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो नंतरची ४ थी कंपनी

१३) कर्तापुर – साहिब कॉरिडॉर
भारतातील डेरा बाबा नामक ते पाक मधील कर्तापूर साहिब गुरुव्दारा जोडणारा हा मार्ग
(९/११/१९ रोजी उद्घाटन).

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा.

⭕️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा⭕️

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

विज्ञान प्रश्न उत्तरे सामान्यज्ञान

◼️ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढ-या पेशी

◼️ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◼️ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◼️ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◼️ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◼️ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◼️ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◼️ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◼️ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◼️ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

 अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ?
पाण्याचे बर्फ होताना ते प्रसरण पावते.

 कात्री ही कोणत्या प्रकारच्या तरफेचे उदाहरण आहे ?
तिस-या.

 नैसर्गिकरित्या सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
हिरा.

वायुविरहित इलेक्ट्राॅनिक्स गॅस लायटर कोणत्या तत्वावर काम करते ?
फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट.

 'होमिओपॅथी' चा जनक कोण ?
हायेनमन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

घटक काम काळ व वेग आणि आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ इतर भौमितिक सूत्रे

घटक - काम काळ व वेग

सुञ -
1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर 
2) वेग     = ----------
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = -----------
                     वेग

======================

✏आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ.✏

...आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.


एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....

           18        X  
वेळ  = ------ × --------
            5          v


एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18      (  X + Y )
वेळ  =  ------ × -----------------
              5             v

दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h  व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....

✏  एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18       ( X + Y )
वेळ =  -------- × -----------------
             5           ( v - u )

✏✏ एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....

           18       ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
            5          ( v + u )

_________________________________

 इतर भौमितिक सूत्रे - 

1.    समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 

2.    समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 

3.    सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

4.    वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

5.    वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

6.    घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

7.    दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 

8.    अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

9.    अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

10. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

11. शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  

12. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

13. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 

14. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 

15. (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  

16. वक्रपृष्ठ = πrl

17. शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 

_______________________________

Trick

🔹🔹Trick

           💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा

(१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५

(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+
     १८+१९+२० = १५५

(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+
      २८+२९+३० = २५५

(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
      ३८+३९+४० = ३५५

(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
     ४८+४९+५० = ४५५

(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
      ५८+५९+६० = ५५५

(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
      ६८+६९+७० = ६५५

(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
      ७८+७९+८० = ७५५

(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
      ८८+८९+९० = ८५५

(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
        ९८+९९+१०० = ९५५
    *****************************

          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५
        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०

          

जिल्हा परिषद/आरोग्य विभाग/पोलीस भरती प्रश्नोत्तरे


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे ? महाराष्ट्राविषयी माहिती 

 महाराष्ट्राविषयी माहिती 

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन.

◾️ मध्यवर्ती  ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत  संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 便 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी  संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू  संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी  संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब   संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 暈 कांदा - लसून 龍 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती  ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत  संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 便 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी  संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू  संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी  संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब   संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 暈 कांदा - लसून 龍 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

________________________

पंचायत समिती सदस्यांचे कार्य व अधिकार

पंचायत समिती सदस्यांचे कार्य व अधिकार


पंचायत समिती सभेतील मुद्दे

पंचायत समिती सदस्यांचे कार्य

पंचायत समिती सदस्य म्हणून सभेत प्रश्न विचारण्याचा, माहिती घेण्याचा, ठराव व उपसूचना मांडण्याचा व मत देण्याचा, सदस्यांना मूलभूत अधिकार आहे. आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देणे, कामाचा दर्जा सांभाळला जात नसल्यास ती बाब संबंधित अधिका-यांच्या निदर्शनास आणणे व त्यांनतरही समाधानकारक परिणाम न झाल्यास त्यासंबंधी सभेत प्रश्न उपस्थित करणे हे पंचायत समिती सदस्याचे काम आहे. पंचायत समितीची कामे व विकास कार्यक्रमासंबंधी माहिती मिळविण्याचा सदस्यांचा अधिकार असून तो सभेत वापरता येतो. सभेत प्रश्नाची पूर्वसूचना देऊन लेखी प्रश्न विचारता येतात. प्रशासनाने उत्तरावर उपप्रश्न विचारुन सत्य उघडकीस आणता येते.


पंचायत समिती सभेतील मुद्दे

पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रत्येक खात्याचा अहवाल सादर केला जातो; त्यावेळी समाधान न झाल्यास आपले मत सभेच्या निदर्शनास आणून सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना करता येतात. : ग्रामपंचायतीसंबंधी पंचायत समितीची जबाबदारी असून आपल्या भागातील ग्रामपंचायतीच्या कार्यातील अडचण दूर करुन मार्गदर्शन करण्याचे काम पंचायत समिती सदस्यांना करता येते.

पंचायत समितीच्या सभेपुढे शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांकडून आलेले आदेश व परिपत्रकांची माहिती दिली पाहिजे अशी सूचना आहे. ही माहिती सदस्यांना आपल्या भागात कार्य करण्यास उपयुक्त असते. ग्रामविकासाच्या कार्यात शिक्षणाला खूप महत्व असून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची जबाबदारी आहे. इमारत सुविधा, स्वच्छता, मुलांना पिण्याचे पाणी इत्यादी बाबतीत सदस्याने लक्ष दिल्यास त्यांचे चांगले परिणाम होतात. आश्रमशाळेत मुलांच्या आहाराची व राहण्याची व्यवस्था सरकारी नियमानुसार होते की नाही याकडेही लक्ष देता येते.





पंचायत समिती सदस्यांचे कार्य

जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना पंचायत समितीद्वारे राबविल्या जातात. हे काम प्रामुख्याने कर्मचारी करतात. त्यात आपला वाटा नाही अशी सदस्यांची समजूत असते. योजनेची माहिती सदस्यांना मिळते की नाही, अर्ज मंजूर करण्यास योग्य कार्यवाही होते की नाही व लाभार्थीना त्याचा पूर्ण लाभ मिळतो की नाही या बाबीकडे सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे.

पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषद व शासनाची कामे यावर देखरेख ठेवून कामाची d सांभाळली जात नसेल किंवा भ्रष्टाचार होत असेल तर पंचायत समिती सदस्याला लक्ष घालता येते.

पंचायत समितीचे कार्य प्रामुख्याने विकास कामांची कार्यवाही व देखरेख ठेवण्याचे असून कामाचा दर्जा सुधारण्यास व भ्रष्टाचाराला आळा घालण्यास पंचायत समितीचा जागृत व कार्यतत्पर सदस्य महत्वाचे काम करु शकतो.

Helping Verbs(साहाय्यकारी क्रियापदे)



1.Can


होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही.


2.Could


सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही.


3.Should


झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे.


4.Must


झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे.


5.Would


होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच.


6.May


यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास करेल,कदाचित पाऊस येईल, कदाचित शाळेत जाईल / कदाचित परवानगी घेण्यासाठी/देण्यासाठी.


7.Let


होऊ दे,अभ्यास करू दे, मारू दे, करू दे, देऊ दे, घेऊ दे, सांगू दे, विचारू दे, बोलू दे, एकूण घेऊ दे, समजावु दे, येऊ दे, जाऊ दे.


8.Let's


चला जाऊया,चला समजावुया,चला बोलूया,चला खेळूया,चला अभ्यास,चला करूया,चला गाणे गाऊया,चला मारूया,चला लिहुया,चला विचारूया,चला करूया.


9.Have/Has to


कराव लागत,बोलाव लागत, सांगाव लागत,समजावाव लागत,कराव लागत,विचाराव लागत, जाव लागत, काम लागत, कराव लागत, माराव लागत, सोडाव लागत, समजून घ्याव लागत, प्रेम कराव लागत / कराव लागत नाही.


10.Had to


कराव लागल, बोलाव लागल,सांगाव लागल,समजावाव लागल,विचाराव लागल,जाव लागल,काम कराव लागल,माराव लागल, सोडाव लागल,समजून घ्याव लागल,प्रेम कराव लागल/कराव लागल नाही.


11.Did have to


कराव लागत होत,बोलाव लागत होत,सांगाव लागत होत,समजावाव लागत होत,कराव लागत होत,विचाराव लागत होत, जाव लागत होत, काम लागत होत, कराव लागत होत, माराव लागत होत, सोडाव लागत होत, समजून घ्याव लागत होत, प्रेम कराव लागत होत/कराव लागत नाही.


12.will/shall have to


कराव लागेल,बोलाव लागेल, सांगाव लागेल,समजावाव लागेल,कराव लागेल,विचाराव लागेल, जाव लागेल, काम कराव लागेल, माराव लागेल, सोडाव लागेल, समजून घ्याव लागेल, प्रेम कराव लागेल /कराव लागणार नाही.


13.Should have


करायला ह्व होत, झाले पाहिजे होत,एकायला पाहिजे होत,करायला पाहिजे होत, सांगायला पाहिजे होत, अभ्यास करायला पाहिजे होत, मारायला पाहिजे होत, शांत बसायला पाहिजे होत, अनुभव घ्यायला पाहिजे होत, झोपायला पाहिजे होत, यायला पाहिजे होत, बोलायला पाहिजे होत / करायला नको होत.


14.Could have


(केल असत तर असत/ जाल नसत शक्यता होती),सांगू शकला असता, सांगू शकला असता,होऊ शकले असता,अभ्यास करू शकला असता, येऊ शकला असता,जाऊ शकला असता,बोलू शकला असता,लिहु शकला असता, आठवन शकला असता, ठेवू शकला असता, मारू शकला असता, समजावु शकला असता, बोलावू शकला असता, करू शकला असता, खाऊ शकला असता .


15.Must have


(भूतकाळात झालेच असेल) पाऊस आलाच असेल, तो भेटलाच असेल, तो मेलाच असेल, हरवलाच असेल, पास झालाच असेल, त्याने अभ्यास केलाच असेल.


16.Might have


कदाचित झाल असेल,कदाचित आलेला असेल, कदाचित गेलेला असेल, कदाचित मेलेला असेल, कदाचित पास झालेला असेल, कदाचित अभ्यास केलेला असेल,कदाचित समजवले असेल, कदाचित पाऊस पडला असेल .


17.Would have


झालच असत,पाऊस आलाच असता, तो भेटलाच असता,तो मेलाच असता,हरवलाच असता, पास झालाच असता, त्याने अभ्यास केलाच असता.

NPP (National People's Party)


⚠️ स्थापना - 6 जानेवारी 2013

⚠️ राष्ट्रिय पक्षाचा दर्जा - 7 जून 2019

⚠️ संस्थापक - पी. ए. संगमा

⚠️ पक्ष चिन्ह - पुस्तक

⚠️ मुख्यालय - इंफाळ (मणिपूर)

⚠️ सध्या पक्षाचे अध्यक्ष -  कॉनरॅड संगमा (सध्या मेघालयचे मुख्यमंत्री)

⚠️ लोकसभा & राज्यसभा दोन्हींमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.

⚠️ 17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ला देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला आहे.

⚠️ राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करणारा तो ईशान्य भारतातील पहिला पक्ष आहे.

⚠️ NPP या पक्षाला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मणिपूर या 4 राज्यांत राज्य पक्ष म्हणून दर्जा प्राप्त आहे.

⚠️ नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळवला.

⚠️किमान चार राज्यांत राज्य पक्ष झाल्याने NPP राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💈💈 राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे 8 पक्ष 💈💈
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1⃣ काँग्रेस

2⃣ भाजप

3⃣ बहुजन समाज पक्ष

4⃣ भारतीय कम्युनिस्ट पक्ष

5⃣ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

6⃣ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

7⃣ अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस.

8⃣ नॅशनल पीपल्स पार्टी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

विधानपरिषद असणारे भारतीय राज्य

  ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

1⃣ आंध्रप्रदेश : एकुण सदस्य  58 (50 + 8)
2⃣ बिहार : एकुण सदस्य 75 (63 + 12)
3⃣ कर्नाटक : एकुण सदस्य 75 (64 + 11)
4⃣ महाराष्ट्र : एकुण सदस्य 78 (66 +‌ 12)
5⃣ तेलंगणा : एकुण सदस्य 40 (34 + 06)
6⃣ उत्तरप्रदेश : एकुण सदस्य 100 (90 + 10)

◆ विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष‌ असतो, सदस्य होण्यासाठी वय कमीतकमी 30

◆ विधानपरिषदेत 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त.

◆ दर 2 वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

◆ आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

◆ महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

◆ अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी

: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

❇️ आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :-

◆ डॉ. अरुणा देरे - 2019✅
◆ विजया ध्यसा- 2001
◆ शांता शेलड़े- 1996
◆ दुर्गा भागवत - 1973
◆ कुसूमावती देशपांडे - 1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ कालावधी :  3, 4 व 5 डिसेंबर 2021

◆ स्थळ : नाशिक

◆ अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅

◆ स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ स्थळ : उदगीर ✅

◆ अध्यक्ष : भारत सासणे ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

◆ स्थळ : वर्धा ✅

◆ अध्यक्ष : पु. शि.रेगे ✅

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...