Wednesday 24 June 2020

भूगोल : पर्वतांचे प्रकार

◆ सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय.

जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार

★ वलित पर्वत :

◆ वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात.

★ विभंग-गट पर्वत :

◆  विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.

★ घुमटी पर्वत :

◆ भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ ज्वालामुखी पर्वत :

◆ पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

★ अवशिष्ट पर्वत :

◆ कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.
===========================

★ महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :

जलाशय            नदी         स्थळ/जिल्हा

●जायकवाडी/नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

● भंडारदरा –    (प्रवरा)    अहमदनगर

● गंगापूर –       (गोदावरी)       नाशिक

● राधानगरी – (भोगावती)    कोल्हापूर

● शिवाजी सागर -- (कोयना)   सातारा

● उजनी –       (भीमा)         सोलापूर

● तोतलाडोह/ मेघदूत जलाशय (पेंच)   नागपूर

● यशवंत धरण –    (बोर)        वर्धा

● मोडकसागर –    (वैतरणा)     ठाणे

● खडकवासला –    (मुठा)        पुणे

● येलदरी –            (पूर्णा)        परभणी

● बाभळी प्रकल्प – (गोदावरी)   नांदेड
▂▂▂

Daily Practice Test


1) भारतातून मलेरियाचे - - - -  सालापर्यंत निर्मूलन करण्यासाठी ' मेरा इंडिया ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

( 1 ) 2025
( 2 ) 2022
( 3 ) 2050 👈
( 4 ) 2028

2) खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोक विशू हा सण नववर्षाचा दिवस म्हणून साजरा करतात ?

( 1 ) कर्नाटक
( 2 ) मणिपूर
( 3 ) नागालँड
( 4 ) केरळ 👈

3) महिलांच्या सुरक्षिततेसाठी खालीलपैकी कोणत्या दूरसंचार कंपनीने माय सर्कल ' हे अॅप्लिकेशन सुरू केले आहे ?

( 1 ) रिलायन्स लिमिटेड
( 2 ) भारती एअरटेल 👈
( 3 ) बीएसएनएल
( 4 ) व्होडाफोन

4) एप्रिल 2019 मध्ये खालीलपैकी कोणत्या बँकांचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आले ?

( अ ) युनियन बँक ऑफ इंडिया
( ब ) देना बैंक
( क ) इंपेरियल बँक
( ड ) विजया बैंक

( 1 ) अ , ब , ड
( 2 ) ब आणि ड 👈
( 3 ) ब , क , ड
( 4 ) अ आणि क

5) ' टाईम्स ' या नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2019 मधील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तींचा समावेश आहे ?

( अ ) अरुंधती काटजू
( ब ) मेनका गुरुस्वामी
( क ) नरेंद्र मोदी
( ड ) मुकेश अंबानी
( इ ) निर्मला सीतारामन

( 1 ) अ , ब , ड 👈
( 2 ) अ , ब , क , ड
( 3 ) क , ड , इ
( 4 ) वरीलपैकी सर्व.

6) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

विधान अ : भारतामध्ये प्रत्येकी 10189 लोकांसाठी एक सरकारी डॉक्टर उपलब्ध आहे.
विधान ब : प्रत्येकी 1000 लोकांसाठी एक सरकारी डॉक्टर असावा, अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे.

( 1 ) अ बरोबर , ब चूक
( 2 ) ब बरोबर , अचूक
( 3 ) अ व ब दोन्ही बरोबर 👈
( 4 ) अ व ब दोन्ही चूक

7) ' वसुंधरा दिन ' - - - - - - - रोजी साजरा करण्यात येतो.

( 1 ) 26 जून
( 2 ) 12 मार्च
( 3 ) 22 एप्रिल 👈
( 4 ) 5 जून 

8) खालीलपैकी सत्य विधान / ने कोणते / ती ?

( अ ) वरुण ' हा भारत व रशियाच्या नौदलांदरम्यान घेण्यात येणारा युद्धसराव आहे.
( ब ) 2019 सालचा वरूण नौदल सराव मे महिन्यात गोवा येथे पार पडला.

( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब 👈
( 3 ) अ व ब दोन्ही
( 4 ) वरीलपैकी एकही नाही.

9) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

( अ ) या संघटनेची स्थापना 1919 मध्ये पॅरिसच्या तहाद्वारे करण्यात आली.
( ब ) या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
( क ) या संघटनेला 1969 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.
( ड ) भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे . वरीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत ?

( 1 ) अ , ब , क
( 2 ) ब , क , ड 👈
( 3 ) अ , ब , ड
( 4 ) वरीलपैकी सर्व

10 ) खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( अ ) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ' वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द केली.
( ब ) एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

( 1 ) अ बरोबर , ब चूक
( 2 ) ब बरोबर अचूक
( 3 ) दोन्ही बरोबर 👈
( 4 ) दोन्ही चूक

23 जून 1757 प्लासीची लढाई

प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.

ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले.

पोखरणच्या प्राचीन कुंभार कलेचे KVIC कडून पुनरुज्जीवन

▪️राजस्थान राज्यातल्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण या छोट्या गावातल्या प्रसिध्द कुंभार (मातीची भांडी तयार करणे) कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 20 जून 2020 रोजी 80 कुटुंबाना 80 इलेक्ट्रिक मातीकाम चाकांचे वितरण केले.

▪️इलेक्ट्रिक चाकांबरोबरच KVICने माती मिश्रणासाठीच्या 8 यंत्रांचेही वाटप केले.

▪️भारताची पहिली अणुचाचणी झालेल्या या गावाला टेराकोटा उत्पादनांची समृध्द परंपरा लाभली आहे.

▪️पोखरणमधे 300 कुंभार कुटुंबे अनेक दशके ही कुंभार कामात गुंतलेले आहेत.

▪️KVICने गावात 350 थेट रोजगार निर्माण केले आहेत.

▪️या 80 कुंभाराना KVICने 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी उत्कृष्ट भांडी घडवली आहेत.

▪️कुल्हड पासून ते फुलदाणी, मूर्ती, पारंपरिक भांडी, स्वयंपाकासाठी तसेच शोभेच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू हे कारागीर घडवतात.

▪️राजस्थान, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, हरयाणा, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, तामिळनाडू, ओडीशा, तेलंगणा, बिहार राज्यातल्या अनेक दुर्गम भागात KVICने कुंभार सशक्तीकरण योजना सुरु केली आहे.

▪️या योजनेच्या अंतर्गत KVIC माती मिश्रणासाठी यंत्र आणि भांडी तयार करण्यासाठी इतर साहित्य पुरवते.

विषाणूमुळे होणारे रोग

पोलिओ (Poliomycetis)

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf  V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

गालफुगी (Mums)

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस.

रुबेला (Rubella किंवा Gernman measles)

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.

गोवर (Measles)

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.

कांजण्या (Chicken Pox)

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.

देवी (Small Pox)

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...