Saturday 31 October 2020

बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.



🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. मूळचे भारतीय असलेल्या वैवेल रामकलावन यांची  सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली  आहे.


🔰माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


🔰ववेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. जिथे ते साधारणपणे दोन वर्षां अगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही असे म्हटले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.


🔰शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. सर्व ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याचे ते अभिमाने सांगतात. खरंतर या गावाची परिस्थिती फारशी चांगली नाही, गाव अत्यंत मागासलेलं देखील आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास १३५ वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक


🔰अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे.


🔰तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.


🔰टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नव्या कंपनीला तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाकडून 500 एकर जागा देण्यात आली फॉक्सकॉन यापूर्वीपासून भारतात आयफोन 11 सहित अन्य मोबाईल फोन्सची निर्मिती करत आहे.


🔰टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेडद्वारे (TEAL) या प्रकल्पाला तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे.

या प्रकल्पात ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे.तसंच यापैकी 90 टक्के महिला कर्मचारी असतील अशीही माहिती समोर आली आहे.

'माहीत आहे का तुम्हांला ?


◾️ राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते.


◾️ तयांनी अठराव्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच ठिकाणी जंतर-मंतर (खगोलीय वेधशाळा) बांधले. 


◾️आज मथुरा येथील जंतर-मंतर अस्तित्वात नाही परंतु उर्वरित चारही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. 


◾️आजही जंतर-मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. 


◾️जतर-मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखविणारे घड्याळ नव्हे तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून खगोलांच्या निरीक्षणाची सोयही उत्तम आहे.


◾️जतर-मंतर मधील यंत्रांच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. 


◾️अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे 'सांस्कृतिक वारसा' म्हणूनच महत्त्वाची ठरली आहेत.


प्रश्न मंजुषा

(1)1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?

तात्या टोपे

मंगल पांडे✅✅✅

नानासाहेब पेशवे

बहादुरशहा जफर



2)चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

उत्तरांखंड 

उत्तर प्रदेश

पंजाब

बिहार✅✅✅ 




3)जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?

पाचवा

सहावा✅✅✅

सातवा

आठवा




4)नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?

5+3+3+4✅✅✅

5+10+12

5+8+4

5+4+3+2




5)कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?

नादौन पोलीस ठाणे✅✅✅

नानखारी पोलीस ठाणे

रामपूर पोलीस ठाणे

नेरवा पोलीस ठाणे


१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?


१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅



४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅

सातवाहन राजा



1) सीमुक (100-70 ईसा पूर्व)


2) कान्हा (70-60 ईसा पूर्व)


3) सातकर्नी (212 - 195 ईसा पूर्व)


4) शिवस्वति (पहली शताब्दी ईसवी)


5) गौतमीपुत्र सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


6) वशिष्ठिपुत्र पुलूमवी (दूसरी शताब्दी ईसवी)


7) वशिष्ठिपुत्र सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


8) शिवस्कंद सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


9) यज्ञश्री शातकर्णी (दूसरी शताब्दी ईसवी)


10) विजय (दूसरी शताब्दी ईसवी)


सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन


🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे.


🔰अप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते.


🔰त मॉडेल वॉट्सअप, टेलिग्राम, संवाद (SAMVAD) आणि GIMS या सारख्या व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अप्लिकेशन सारखे असुन ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग पद्धतीचा अवलंब करते.


🔰सवेच्या काळात सुरक्षित मेसेजिंग पद्धत सुलभ करण्यासाठी संपूर्ण भुदलात SAI अॅपचा वापर केला जाणार आहे.


🔴भारतीय भुदलाविषयी...


🔰भारतीय लष्कराचा पायदळ विभाग म्हणजेच भारतीय भुदल हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. दलाची स्थापना 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली.


🔰दलाची संरचना: तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती हेच असतात. भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) व त्याखाली उप (व्हॉइस) भूसेनाध्यक्षांचे स्थान असते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशाचे सात कक्ष (कमांड) पाडले असून त्या प्रत्येकावर लेफ्टनन्ट जनरलच्या हुद्याचा अधिकारी प्रमुख (आर्मी कमांडर) असतो.


🔰भदलाची जबाबदारी: भारताच्या भूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, देशात कायदा व सुरक्षा राखण्याकरीता सरकारला मदत करणे व आपत्काली नागरिकांना साहाय्य करणे

पडिता रमाबाई



★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.


★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)


★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.


★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.


★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.


★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.


★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.


 ★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,

 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.


★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष


★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.


★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.


★ आत्मचरित्र - माझी साक्ष


★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.


★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.


🎯 पडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था


१) आर्य महिला समाज


२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी


३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी


४) बातमी सदन 👉 अधांसाठी


५) प्रीतिसदन 👉 वद्ध,अशक्त,अपंगांसाठी


 ६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी


★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.

____________________________


🎯 सवासदन :-


★ स्थापना-1908 (मुंबई)


★ संस्थापक - रमाबाई रानडे,


👉 बहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने


★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग


✍️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:


✍️बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.


✍️बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.


✍️बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.


✍️परत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.


✍️बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे.


✍️परत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे.


✍️कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तातंरण, अपहरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानि होता कामा नये.


✍️बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा.


✍️बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करू नये, अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हीतासाठी साठी आवश्यक असते.


✍️कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क असतो.


✍️बालकांची काळजी घेणे किंवा संरक्षण करणे यासाठी जबाबदार संस्था, सेवा आणि सुविधांनी संस्थापित मानाकंनाना धरून राहण्याची निश्चिती करावी.


✍️मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबंत्वाचा पुरस्कार आणि समाजामध्ये सक्रिय सहभागाने आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता यावा आणि चांगले जीवन जगता यावे.


💕आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत.


✍️मलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये.


✍️बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षण आहे.


✍️परत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे.


✍️कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मूकायला लागता कामा नये.


✍️कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानि भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत.


✍️सन्य हमल्या बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.


✍️आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.


✍️कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप, त्याच्या/तिच्या घरावर किंवा त्याच्या/तिच्या सन्मान आणि नावलौकीकावर आघात होता कामा नये.

ग्राम विकास व पंचायतराज विभाग



पंचायत महिला शक्ती अभियान


पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांनी सन 2007 पासून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरु केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना महिला प्रतिनिधींना येणा-या अडीअडचणी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यप्रणाली याबाबत महिला लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभियान महत्वाचे आहे.


पंचायत महिला शक्ती अभियानचे कार्य :


कोअर कमिटीची स्थापनाराज्यस्तरीय संमेलनाचे आयोजनविभागीय संम्मेलनाचे आयोजनराज्य आधार केंद्राची स्थापनालोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ स्थापन करणे.


पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य सहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियांनांतर्गत विभाग निहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.


पंचायत महिला शक्ती अभियांनातर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्हयातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा 33 जिल्हयातून प्रत्येकी 3 अशा 99 सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या 99 सदस्यांतून 18 प्रतिनधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते. अशा प्रकारचा लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ देशात प्रथम महाराष्ट्र राज्याने स्थापित केला आहे.


लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या संघाची जबाबदारी :


लैंगिक अन्याय, बालकांचे शोषण, अस्पृश्यता संबंधित विषयाबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे.याबाबतचे ठराव घेऊन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणे.महिला सबलीकरणासाठी कृती आराखडा सादर करणे.चार्टर ऑफ डिमांडमध्ये मान्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करणे.


या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्हयात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्हयातील 3 महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या 5 जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर 2 महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.


संघाच्या कार्यकारीणीची मुदत 2 वर्षांची आहे. संघाच्या कार्यकारीणीची दर तिमाही बैठक बोलाविणे आणि त्या बैठकांचे समन्वय करणे यासाठी समन्वयक म्हणून यशदा, पुणे येथे पंचायत महिला शक्ती अभियान हाताळणारे सहयोगी प्राध्यापक हे कामकाज पाहतात. कार्यकारीणीची बैठक दर 3 महिन्यातून घेणे तसेच संघातील सर्व महिला लोकप्रतिनिधींची परिषद वर्षातून एकदा घेणे ही समन्वयक यांची जबाबदारी आहे.

चालू घडामोडी

 प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

Thursday 29 October 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

(A) बिजींग, चीन✅

(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड

(C) शांघाय, चीन

(D) टोकियो, जापान


2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.

(A) अफगाणिस्तान

(B) इराक

(C) बांग्लादेश✅

(D) सौदी अरब



3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?

(A) वल्टरी बोटास

(B) सेबेस्टियन व्हेटेल

(C) मॅक्स वर्स्टपेन

(D) लेविस हॅमिल्टन ✅

 


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) चीन

(B) जापान

(C) तैवान ✅

(D) क्रोएशिया



5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅

(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा

(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे

 


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) रतन टाटा

(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅ 

(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय

(D) आनंद महिंद्रा



7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी मुंबई

(C) आयआयटी कानपूर ✅ 

(D) आयआयएम अहमदाबाद




8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

(A) नामदेव ढसाळ

(B) जे. व्ही. पवार

(C) अरुण कांबळे

(D) राजा ढाले ✅



9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?

(A) बँक ऑफ महाराष्ट्र

(B) पंजाब नॅशनल बँक

(C) भारतीय स्टेट बँक ✅

(D) कॅनरा बँक



10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?

(A) नवी दिल्ली ✅

(B) महाराष्ट्र

(C) पश्चिम बंगाल

(D) गोवा



11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?

(A) दिपक मिश्रा

(B) ए. के. सिक्री ✅

(C) मदन लोकुर

(D) टी. एस. ठाकुर



12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.

(A) BSNL

(B) एअरटेल

(C) रिलायन्स जियो ✅

(D) व्होडाफोन



13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?

(A) इंदिरा गोस्वामी

(B) माहीम बोरा

(C) पुरोबी बोर्मूदेय ✅

(D) यापैकी नाही



14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?

(A) आचार्य देवव्रत

(B) कलराज मिश्रा ✅

(C) केशरी नाथ त्रिपाठी

(D) कल्याण सिंग



🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅ 

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??*

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार

 


        🔰आजार व विषाणू🔰 


▪️गोवर (मिझल): गोवर विषाणू


▪️इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C)


▪️कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G)


▪️पोलिओ : पोलिओ विषाणू


▪️जापनीज मेंदूज्वर : Arbo-virus


▪️रबिज : लासा व्हायरस


▪️डग्यू : Arbo-virus


▪️चिकुनगुन्या : Arbo-virus


▪️अतिसार : Rata virus


▪️एड्स : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)


▪️दवी : Variola Virus


▪️कांजण्या : Varicella zoaster


▪️सर्दी  : सर्दीचे विषाणू


▪️ गालफुगी : Paramixo virus


▪️जर्मन गोवर : Toza virus

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी...



इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.


📚 ठळक बाबी...


शेजारच्या नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांच्याही खाली भारताचे स्थान आहे.


सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो.

देशातल्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या निर्धारीत पौष्टीक आहारापासून वंचित आहे.भारतातली 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. देशात लहान मुलांमध्ये खुंटलेल्या वाढीचे प्रमाण 37.4 टक्के आहे.

भारतीय टपाल सेवा आणि अमेरिकेची टपाल सेवा यांचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीच्या आदान-प्रदानासाठी करार.



🔰27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत सरकारची टपाल सेवा (इंडिया पोस्ट) आणि अमेरिकेची टपाल सेवा (USPS) यांच्यादरम्यान टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्कविषयक (कस्टम) माहितीचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आदान-प्रदान करण्यासाठी करार झाला.


🔴ठळक बाबी ...


🔰करारानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि त्याची इलेक्ट्रॉनिक माहिती एकमेकांसोबत सामायिक केली जाणार आहे. त्यामुळे टपाल गंतव्य देशामध्ये येण्याआधीच त्यासंबंधित सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे.


🔰करारामुळे दुसऱ्या देशातून प्रत्यक्ष टपाल आल्यानंतर सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याचा वेळ वाचणार आहे. विकसनशील देशांमध्ये जागतिक टपाल वितरण कार्यपद्धतीनुसार टपालाने येणाऱ्या वस्तूंची आधी सूचना विशिष्ट नियमांच्या अधीन राहून दिली जाते.

करारामुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमध्ये विश्वसनीयता, स्पष्टता आणि सुरक्षितता निर्माण होवून कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होवू शकणार आहे.

पार्श्वभूमी


🔰भारताच्या दृष्टीने अमेरिका हे निर्यातीसाठी सर्वात अव्वल स्थान आहे. टपाल सेवेच्या माध्यमातून भारतातून अमेरिकेला वस्तू पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. 2019 साली जवळपास 30 टक्के पत्रे आणि वस्तूंची लहान पाकिटे अमेरिकेला पाठविण्यात आली होती. तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्या पाकिटांपैकी एकट्या अमेरिकेतून जवळपास 60 टक्के पाकिटे भारतामध्ये आली होती.


🔰आता नवीन सहकार्य करारानुसार, टपालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निर्यात करणे सोईचे ठरणार आहे. त्यामध्ये भारतातून रत्ने व आभूषणे, औषधे आणि इतर स्थानिक उत्पादने अमेरिकेमध्ये पाठविणे सोईचे ठरणार आहे. करारामुळे लहान आणि मोठ्या निर्यातदारांना टपाल सेवेच्या  माध्यमातून ‘निर्यात सुलभता’ प्रदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होवू शकणार आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला



सन २०२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (World Food Programme) या संस्थेला देण्यात आले आहे.


जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समिती केली आहे. 


१९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे.

विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म



1⃣ *जडत्व :*


▪️ जव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.


▪️ वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.


2⃣ *संतुलित बल :*


▪️ सतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.


▪️ दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.


3⃣ असंतुलित बल :


▪️ जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.


▪️ वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.


4⃣ *बल :* 


▪️ बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.


▪️ बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.


▪️ बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.


▪️ वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.


▪️ सथिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

जगातील औद्योगिक उत्पादने व देश


● *इलेक्ट्रॉनिक वस्तु* : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.


● *कागद(वर्तमानपत्राचा)* : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.


● *कागद (लगदा)* : अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.


● *जहाज बांधणी* : जपान, द.कोरिया, ब्रिटन.


● *मोटारी* : अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.


● *लोह-पोलाद* : रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.


● *साखर* : क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.


● *सीमेंट* : रशिया, चीन, अमेरिका.


● *खते* : अमेरिका, रशिया, जर्मनी.


● *विमाने* : अमेरिका, ब्रिटन.


● *यंत्र सामुग्री* : अमेरिका, जर्मनी.


● *रसायने* : अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.

'या' आहेत भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


● *आसाम* : गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर


● *गुजरात* : भिल्ल


● *झारखंड* : गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख


● *त्रिपुरा* : चकमा, लुसाई


● *उत्तरांचल* : भुतिया


● *केरळ* : मोपला, उरली


● *छत्तीसगड* : कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब


● *नागालँड* : नागा, खासी, गारो, आओ, अंगामी


● *आंध्र प्रदेश* : कोळम, चेंचू


● *पश्चिम बंगाल* : संथाल, ओरान


● *महाराष्ट्र* : भिल्ल, गोंड, वारली


● *मेघालय* : गारो, खासी, जैतिया


● *सिक्कीम* : लेपचा


● *तामिळनाडू* : तोडा, कोट, बदगा

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड


🔰परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील.


🔰तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी 355 जण इच्छुक होते. सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत.


🔰तर दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी  यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत.


🔰नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे.

ऑक्सफर्ड’ची लस परिणामकारक


🔰बरिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे.

तर या आधी जुलैमध्ये ही लस 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांत सिद्ध झाले होते. आता त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.


🔰‘ऑक्सफर्ड’ची करोना प्रतिबंधक लस लवकर बाजारात येऊन आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील मळभ दूर होण्याची आशा वाढली आहे. ऑक्सफर्ड लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का ही कंपनी करणार आहे.


🔰अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने म्हटले आहे, की प्रतिकारशक्तीतील वाढ तरुण व ज्येष्ठांमध्ये सारखीच असून ज्येष्ठांमध्ये लशीचे काही किरकोळ दुष्परिणाम दिसण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे ही लस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.  ‘एझेडडी 1222’ ही लस सुरक्षित असल्याचे हे पुरावे अलीकडेच हाती आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा.


🔰चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला  आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे.


🔰अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे.


🔰तसेच जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.

चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे.


🔰 चद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादित नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आले आहे.


सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आहे.


🔰 NASA

सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) या अंतरराळ संशोधन संस्थेनी प्रथमच जाहीर केले.


🔰NASAच्या ‘स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी’ (सोफिया) नामक वेधशाळेतून चंद्रावरील प्रकाशित भागात पाणी असल्याची घोषणा करण्यात आली. ‘सोफिया’ ही जगातली सर्वात मोठी विमानामध्ये स्थापित एक वेधशाळा आहे. बोइंग 747 या विमानात बदल करून ही उंच आकाशात उडणारी वेधशाळा तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे केलेल्या निरीक्षणांवरून चंद्रावरील पाण्याबाबत निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातल्या क्लेव्हीयस दरीत पाणी असल्याचे आढळले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰पथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, आता प्रथमच सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सूर्याच्या थेट प्रकाशात चंद्रावर पाणी टिकून राहणे अशक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे यापूर्वी मत होते.


🔰निष्कर्षानुसार, चंद्रावर पाणी प्रवाही नसून रेणूंच्या स्वरूपात आणि गोठलेल्या अवस्थेत आहे. सौर वादळे किंवा लघुग्रहांद्वारे चंद्रावर पाणी आले असण्याची शक्यता आहे. प्रत्येक चौरस मीटरमध्ये 350 मिलिलिटर पाणी असल्याचा अंदाज आहे. चंद्रावर 15 हजार चौरस मैलांवर पाणी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


🔰अल्प प्रमाणात असूनही, या शोधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तसेच चंद्राच्या कठीण आणि हवारहित वातावरणात पाणी कसे टिकून राहते हा देखील एक प्रश्न आहे.

अडोरा: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद



🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद म्हणून अँडोरा देशाला मान्यता देण्यात आली आहे.


🔴अडोरा देश


🔰अडोरा हे पिरेनीज पर्वताच्या दक्षिण उतारावरील, यूरोपातले अत्यंत लहान राज्य आहे. त्याच्या उत्तरेस फ्रान्सचे आर्येझ व पिरेनीज ओरिएंटल्स प्रांत व दक्षिणेस स्पेनचा लेरीदा प्रांत आहे. त्याचे क्षेत्रफळ 464 चौ. किमी. (पाँडिचेरीपेक्षा थोडे कमी) आहे. अँडोरा ला व्हेल्या ही देशाची राजधानी आहे. अँडोराचे नागरिक कँटेलेन भाषा बोलतात. तिथे युरो आणि फ्रँक चलन वापरले जाते.


🔴आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.

मिरजेच्या पारंपरिक तंतुवाद्यांना नवे रंगलेपन



🔰सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहुरंगी बनविले आहे. तंबोरे, सतारीच्या या नव्या रूपाला देश-परदेशातील कलाकारांचीही पसंती मिळत आहे.


🔰लाखेऐवजी आता ‘मेटॅलिक’ रंगाचा वापर करून मिरजेची सतार बहुरंगी बनवत असताना तिच्यातील स्वरामध्ये कोणताही बदल होणार नाही याची दक्षताही घेतली आहे.


🔰मिरज शहर दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथून परदेशातही तंतुवाद्यांची निर्यात केली जाते. येथे बनवलेल्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकित कलाकारांकडून मागणी असते. 


🔰पारंपरिक पद्धतीमध्ये मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करून तो तंतुवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. बत्ताशी आणि पत्रीलाख पातळ करून त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकिरी, जांभळा यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ट कारागिरांनी हातखंडा मिळविला होता. गेली अनेक वर्षे  स्पिरीटमिश्रित रंगांतील वापर तंतुवाद्यांसाठी होत होता.

भारतीय निवडणूक आयोग



- संवैधानिक संस्था

- कलम 324

- स्थापना: 25 जानेवारी 1950

- निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ

- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त: सुकुमार सेन

- मुख्य आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात: 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे ते पदावर राहतात

----------------------------------------


 राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

----------------------------------------

● लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

-------------------------------------------


लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

---------------------------------------


 पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03

----------------------------------------


 वैशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

--------------------------------------

• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?*



 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do's And Dont's म्हणजेच निवडणूक 'आचारसंहिता' होय.


 *पक्ष, उमेदवारांवर काय असतात बंधनं?* : 


▪️ पक्षाने आपल्या प्रचारामध्ये असं कोणतंही भाषण, प्रचार सामग्री, घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळं समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये फुट पडेल तसंच त्यांच्यात वाद निर्माण होतील.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल बोलता येणार नाही. असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो.


▪️ निवडणूकीच्या प्रचारात  मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना अमिष दाखवणं, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे. 


▪️ कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवणं, थांबवणं बंधनकारक आहे. तसंच नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचाराध्ये अडथळा आणण्याचा अधिकार नाही, असे केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.


▪️ कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येणार नाही. याकरिता उमेदवारानं आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र मिळवणं आवश्यक आहे. तसंच संबंधीत बाबींची पोलीस ठाण्यात माहिती देणं आवश्यक आहे. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या, मनोरंजनात्मक योजनांची घोषणा तसेच अमंलबजावणीही करता येत नाही. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणूकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. असं केल्यास याला आचारसंहितेचा भंग मानण्यात येतो.


▪️ आचारसंहिता केवळ निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांपुरतीच मर्यादीत नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते. 


▪️ निवडणूकीवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली आपल्या आवडीच्या ठिकाणी करता येत नाही. यापैकी कोणतंही काम केल्यास ते थांबवण्याचा संपूर्ण हक्क निवडणूक आयोगाला असतो.


*सोशल मीडियावरही आचारसंहिता* : इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्षांना जाहिरात पोस्ट करण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर ते जाहिरात पोस्ट करू शकणार आहेत. 


 *तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप्स* : 'समाधान' या वेब पोर्टलवर सामान्य जनता निवडणूक आणि प्रक्रियेबाबत आपल्या प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत. 


तसेच एक असेही अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे ज्याद्वारे मतदाता आचारसंहितेचा भंग होत असल्याचे ती घटना रेकॉर्ड करून निवडणूक आयोगाकडे पाठवू शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच सुविधा नावाचे अ‍ॅप राजकीय पक्षांसाठी लॉन्च करण्यात आले असून याद्वारे उमेदवार, प्रतिनिधी निवडणुकीसाठी लागणार विविध परवानगी अर्ज करू शकणार आहेत.


 *दिव्यांगांसाठी विशेष अ‍ॅप* : दिव्यांग मतदारासाठी इलेक्शन कमीशनने पर्सन विद डिसेब्लिटी (PWD) नावाचे अ‍ॅप लॉन्च केले आहे. याद्वारे मतदान केंद्रावर अशा लोकांना वाहन सेवा, पाणी, रँप सेवा, व्हिलचेअर सेवा आणि ब्रेल बॅलेट पेपर आणि ब्रेल वोटर स्पिल अशा सुविधा पुरवण्यात येईल.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



📌 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


📌 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

पचायत राज


💢परस्ताविक


भारतीय संघराज्य व्यवस्थेमंधे तीन पातळ्यांवर शासनाचे कार्य चालते. 


1) संघराज्य 

2) घटकराज्य 

3) स्थानिक 


स्थानिक शासन संस्था म्हणजे स्थानिक भागातील जनतेचे स्वत:चे प्रश्न सोङविण्यासाठी निवडून दिलेल्या प्रतिनीधीच्या शासन संस्था होय.  साधारणत: राज्य पातळीखालील सर्व शासनसंस्था म्हणतात. 


💢 सथानिक जनतेला स्थानिक पातळीवरील सार्वजनिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याच्या कार्यात सहभागी करून घेणे हा स्थानिक शासनसंस्थेचा प्रमुख हेतु आहे. तसेच त्याचे कार्यही अशा कायद्याचा तरतुदींनुसार चालते. मात्र त्यांच्या दैनंदिन कारभारात राज्यशासन हस्तक्षेप करीत नाही. आपल्याला आधिकारक्षेत्रात त्या स्वायत्त असतात आणि त्यांना बरेच निर्णयस्वातंत्रही असते.  भारतात सर्वत्र स्थानिक शासनसंस्थेला "स्थानिक स्वराज्यसंस्था"असे म्हणण्याचा प्रघात आहे. 


💢 भारतात स्थानिक स्वराज्यसंस्थाचे प्रमुख दोन प्रकार आहेत: ग्रामीण व शहरी.

73 व्या घटनादुरूस्ती कायद्यात विविध पातळ्यांवरील ग्रामीण स्वराज्य संस्थांना "पंचायत "या सामान्य नावाने संबोधले आहे,तर 74 व्या घटनादुरूस्ती कायद्यात विविध प्रकारच्या शहरी स्थानक स्वराज्य संस्थांना "नगरपालिका "या सामान्य नावाने संबोधले आहे. 


💢 गरामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्यवस्थेला "पंचायतराज " असेही संबोधले जाते. कलम 243 अन्वये, "पंचायत "म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर, मधल्या पातळीवर व जिल्हा पातळीवर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्थां होय, 


Monday 26 October 2020

धरणांची पाणी क्षमता



धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???


1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??

2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??

3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??


सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???


आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.


▪️पाणी मोजण्याची एकके


● स्थिर पाणी मोजण्याची एकके – 


1) लिटर 

2) घनफूट 

3) घनमीटर  


▪️धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)


● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.


1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स


2) वाहते पाणी मोजण्याची एकके-


1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. 


2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते. 


● उदा.

पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.

म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.


● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.


● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.


◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे


1)उजनी  117.27 टीएमसी 

2)कोयना  105.27 टीएमसी 

3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )

4)पेंच तोतलाडोह  35.90 टीएमसी 

5) वारणा  34.40 टीएमसी

6) पूर्णा येलदरी  28.56 टीएमसी

बारा ज्योतिर्लिंगे



१) सोमनाथ -

सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.


२) मल्लिकार्जुन -

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३) महाकाळेश्वर -

 उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.


४) अमलेश्वर -

 ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.


५) वैद्यनाथ -

 शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.


६) भीमाशंकर -

 भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.


७) रामेश्वर -

 दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.


८) नागेश्वर -

 श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.


९) काशीविश्वेश्वर -

 वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.


१०) केदारेश्वर -

 हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.


११) घृष्णेश्वर -

 (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.


१२) त्र्यंबकेश्वर -

नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।


दामोदर नदी :



बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते. 


सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते.


दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्व‌स्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत.


दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात.


 दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे.


दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. सिंगभूम, पुरूलिया व रांची यांच्या सीमेवर डास्मा डोंगररांग असून यातून सुवर्णरेखा नदी मार्ग काढते. याच्या दक्षिणेस सिंगभूमच्या सपाट प्रदेशात अनेक अवशिष्ट शैल व माथ्यावर जांभा दगडांचा थर असलेली छोटी पठारे आहेत. चक्रधरपूर व चैबासा यांच्या पश्चिमेस छोटानागपूर पठाराची कड आहे. या पठारावर अनेक उपपठारे असून त्यांपैकी रांची पठार सु. ६१० मी. उंच आहे. ते पश्चिमेस ३१४ मी. पर्यंत उंच होत गेले असून त्यालाही अनेक अवशिष्ट शैल व कटक आहेत. रांची पठाराच्या उत्तरेस हजारीबाग पठार असून दोहोंच्या दरम्यान दामोदर नदी विभंग दरीतून वाहते. 


दामोदर खोऱ्यात हुगळीला मिळणारी दामोदर, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या सुप्रसिद्ध शोण नदीला मिळणारी उत्तर कोएल व महानदीस मिळणारी दक्षिण कोएल या प्रमुख नद्या असून त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूरनियंत्रण हा दामोदर खोरे प्रकल्पाचा एक प्रमुख उद्देश आहे.

शिवालिक नदी :




उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे.

सरमा नदी :

 


भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८' उत्तर अक्षांश व ९४० १८' पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो.


सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते; मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते.

 

सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत.

माण नदी :



 महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.

मांजरा नदी :



महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.

 

 

मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.

काटेपूर्णा नदी :



अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरुळ, अकोला आणि मुर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते. अकोल्यापासून आग्नेयीकडे ३५ किमी. वरील वास्तापूर या गावानजीक या नदीवर मातीचे धरण बांधून अंदाजे २४,००० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलत करण्याची योजना आहे.

भवानी नदी :



 द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्‌गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात.


जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

महीनदी :



(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते.

 

पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे.

 

मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते.

कदा नदी :



निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अ‍ॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या


कुंदा नदीप्रकल्प


खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अ‍ॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.


कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्‌गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अ‍ॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे.

सीना नदी :



 भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.


मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

लुशाई टेकड्या



लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.


यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर



1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983]


2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983]


3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


5. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा [1984]


6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]


7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम [1985]


8. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम [1985]


9. केवला देव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान [1985]


10. पुराने गोवा के चर्च व मठ - गोवा [1986]


11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश [1986]


12. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक [1986]


13. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश [1986]


14. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र [1987]


15. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक [1987]


16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल [1987]


17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडू [1987]


18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [1988]


19. सांची का बौद्ध स्मारक - मध्यप्रदेश [1989]


21. हुमायूँ का मकबरा - दिल्ली [1993]


22. दार्जिलिंग हिमालयन रेल - पश्चिम बंगाल [1999]


23. महाबोधी मंदिर, गया - बिहार [2002]


24. भीमबेटका की गुफाएँ - मध्य प्रदेश [2003]


25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर - तमिलनाडु [2004]


26. एरावतेश्वर मन्दिर - तमिलनाडु [2004]


27. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र [2004]


28. नीलगिरि माउंटेन रेलवे - तमिलनाडु [2005]


29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [2005]


30. दिल्ली का लाल किला - दिल्ली [2007]


31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]


32. सिमलीपाल अभ्यारण्य - ओडिशा [2009]


33. नोकरेक अभ्यारण्य - मेघालय [2009]


34. भितरकनिका उद्यान - ओडिशा [2010]


35. जयपुर का जंतर-मन्तर - राजस्थान [2010]


36. पश्चिम घाट [2012]


37. आमेर का किला - राजस्थान [2013]


38. रणथंभोर किला - राजस्थान [2013]


39. कुंभलगढ़ किला - राजस्थान [2013]



40. सोनार किला - राजस्थान [2013]


41. चित्तौड़गढ़ किला - राजस्थान [2013]


42. गागरोन किला - राजस्थान [2013]


43. रानी का वाव - गुजरात [2014]


44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश [2014]


भारतातील लोकनृत्ये:



🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य


🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम


🔶 करळ --- कथकली


🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम


🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा


🔶 *गुजरात* --- गरबा, रास


🔶 *ओरिसा* --- ओडिसी


🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ


🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच


🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली


🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला


🔶 *मेघालय* --- लाहो


🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी


🔶 *मिझोरम* --- खान्तुंम


🔶 *गोवा* --- मंडो


🔶 *मणिपूर* --- मणिपुरी


🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम


🔶 *झारखंड*---- कर्मा


🔶 *छत्तीसगढ* --- पंथी


🔶 *राजस्थान* --- घूमर


🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा


🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक


जागतिक वारसा स्थळ



युनोची संघटना यूनेस्को सांस्कृतिक अथवा निसर्ग वारसा यादी तयार करते, सध्या जगत 1031 वारसा स्थळे यादीत आहेत, जगात 

इटली (51), चीन (48), 

स्पेन (48), फ्रांस (41), 

जर्मनी (40), मेक्सिको (33), 

भारत (32), जगात भारत सातव्या क्रमांकावर आहे. आशियात चीनमध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत.

  

वारसा स्थळे घोषित करण्यामागे त्या स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि पुढच्या पिढ्यापर्यंत हा अमुल्य वारसा सुपूर्द करणे ही उद्दिष्टे आहे.

  

भारतात सर्वप्रथम 1983 मध्ये आगर्‍याचा किल्ला व अजंठा लेणी या दोन स्थळाचा यादीत समावेश करण्यात आला, सध्या भारतात 32 स्थळे यादीत आहेत. त्यापैकी 25 सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत, तर 7 निसर्गस्थळे आहेत.

  

महाराष्ट्रात सर्वाधिक चार स्थळे आहेत. (अजंठा व वेरूळ लेणी (1983), घारापुर लेणी (1987), छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशन (मुंबई) 2004)

  

दिल्लीमध्ये कुतुबमिनार, हुमायुचा मकबरा, लाल किल्ला ही स्थळे आहे.

  

मध्य प्रदेशमध्ये भीम बेरकांच्या अश्मकालीन गुफा, सांचीचा स्तूप खजुराहोची मंदिरे आहेत.

  

राजस्थानमध्ये केवलदआ राष्ट्रीय उद्यान, जंतरमंतर खगोल प्रयोगशाळा चित्तोड, गाग्रोन, जैसलमेर कुंभलगड, अंबर, रणथंबोर हे किल्ले आहे.  

  

उत्तर प्रदेशमध्ये आगर्‍याचा किल्ला, फतेहपूर सिक्री, ताजमहल ही स्थळे आहे.

  

आसाममध्ये काझीरंगा, मानसा अभयारण्य ही स्थळे आहेत.

  

गुजरातमध्ये रानी की वाव, चंपानेर-पावागड पुरातत्व परिसर ही स्थळे आहे.

  

कर्नाटकमध्ये विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, पट्टडकल येथील चालुक्यांची मंदिरे ही स्थळे आहे.

  

तामीळनाडूमध्ये तंजावर गंगाईकोंड चोल पूरम व दोरयसम येथील मंदिर, महाबलीपूरम ही स्थळे आहे.

भारतातील प्रमुख जमाती



जमात                  राज्य


अबोर                  अरुणाचल प्रदेश

आपातनी             अरुणाचल प्रदेश

आओ                  नागाल्यांड

अंगामी                 नागाल्यांड

कोल                   छत्तीसगढ

कोटा                   तामिळनाडू

मुंडा                    झारखंड 

कोलाम                आंध्र प्रदेश

छुतीया                आसाम

चेंचू                     आंध्र प्रदेश

गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड

बैगा                     छत्तीसगढ,झारखंड

भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ

बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू

भोट                    हिमाचल प्रदेश

लेपचा                  सिक्कीम

वारली                  महाराष्ट्र

चकमा                  त्रिपुरा

गड्डी                     हिमाचल प्रदेश

जयंती                  मेघालय

बोदो                    आसाम

खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड

गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ

लुशिया                 त्रिपुरा

मोपला                  केरळ

भुतिया                  उत्तरांचल

जारवा                   छोटे अंदमान

कुकी                    मणिपूर

कुरुख                  झारखंड, ओरीसा

अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश

डाफला                अरुणाचल प्रदेश

कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र

हो                       छोटा नागपूर

मुरीया                  बस्तर छोटा नागपूर

संथाल                  वीरभूम,झारखंड

गुज्जर                  हिमाचल प्रदेश

खोंड                     ओरिसा

मिकिर                  आसाम

उरली                  केरळ

मीना                    राजस्थान

ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड

तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



* मुचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* श्रीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


* भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


* दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

 

* फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

 

* हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


* चंबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


* उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

 

* कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.


* नागार्जुनसागर

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

वातावरणाचे थर


 वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 वातावरणाचे मुख्य थर 


📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

भारतातील महत्वाची शहरे :



🔷अमृतसर -  सुवर्ण मंदिर


🔶अहमदाबाद - साबरमती आश्रम


🔷आग्रा - लाल किल्ला


🔶कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल


🔷कानपूर - कातड्याच्या वस्तु


🔶कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण


🔷कोणार्क -  सूर्य मंदिर


🔶गगोत्री -  गंगा नदीचा उगम


🔷चदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी


🔶जयपूर - जंतर मंतर वेधशाळा


🔷जोधापूर - मोती महल


🔶डलहौसी -  थंड हवेचे ठिकाण


🔷औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर


🔶नागपूर -  मध्यवर्ती वसलेले शहर


🔷मबई -  नैसर्गिक बंदर


🔶नाशिक -  सात टेकड्यांवर वसलेले शहर


🔷पोरबंदर -  महात्मा गांधींचे जन्म स्थळ


🔶हदराबाद -  चारमिनार 

वारणा नदी



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :



1. ग्रहाचे नाव - बूध


सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

 परिवलन काळ - 59

 परिभ्रमन काळ - 88 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव - शुक्र


सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

 परिवलन काळ - 243 दिवस

 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

 परिवलन काळ - 23.56 तास

 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव - मंगळ


सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

 परिवलन काळ - 24.37 तास

 परिभ्रमन काळ - 687

 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव - गुरु


सूर्यापासुन चे अंतर - 77.86

 परिवलन काळ - 9.50 तास

 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


6. ग्रहाचे नाव - शनि


सूर्यापासुन चे अंतर - 142.6

 परिवलन काळ - 10.14 तास

 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव - युरेनस  


सूर्यापासुन चे अंतर - 268.8

 परिवलन काळ - 16.10 तास

 परिभ्रमन काळ - 84 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


सूर्यापासुन चे अंतर - 449.8

 परिवलन काळ - 16 तास

 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

जगातील सर्वात उंच 10 शिखरे



🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) 

🔹8848 मीटर उंच.


🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8611 मीटर उंच.


🔵(3).... कांचनगंगा (भारत ) 

🔹8586 मीटर उंच.


🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)

🔹8516 मीटर उंच.


🔵(5)...... मकालू (नेपाळ)

🔹8463 मीटर उंच 


🔵(6).......चो ओयू (नेपाळ) 

🔹8201 मीटर उंच.


🔵(7).......धौलागिरी (नेपाळ) 

🔹8167 मीटर उंच.


🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ) 

🔹8163 मीटर उंच


🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8125 मीटर उंच.


🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)

 🔹8091 मीटर उंच.


🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)

🔹8068 मीटर उंच.


🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)

 🔹8051 मीटर उंच.


🔵(13)...... गशेरब्रूम --2

🔹(हिमालय) 8035 मीटर उंच


🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)

🔹8027 मीटर उंच.


🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.


महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे :-



●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 

रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. 

१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. 

पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 

समुद्री पूल आहे. 

२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 

काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. 

दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 

याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.


-----------------------

 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 

यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 

नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. 

या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने 

देखरेख केलेला हा पूल आहे. 

३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. 

२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.

वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.

-----------------------


३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 

कांडरौर गावात हा पूल आहे. 

कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. 

१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. 

पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. 

कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ

कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.

---------------------


४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही

म्‍हणता येईल. 

पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 

या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना

हा कर नाही. 

विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.

हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 

या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 

या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.

पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार :



व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

📌 भशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


📌 खडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


📌 बट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


📌 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

📌सयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


 📌आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


📌 खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


📌 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 

📌उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

Latest post

चालू घडामोडी :- 18 मार्च 2024

◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली. ...