06 September 2019

चालू घडामोडी वन लाइनर्स, 06 सप्टेंबर 2019


✳ आयएसएसएफ शूटिंग रायफल / पिस्तूल वर्ल्ड कप रिओ येथे होणार आहे

✳ भारताने आयएसएसएफ नेमबाजी रायफल / पिस्टल वर्ल्ड कप मेडल टॅलीसह 09 पदके मिळविली

✳ एंग्लो चायनिज स्कूल, सिंगापूरने ग्लोबल टॉप 50 आयबी स्कूल्सची यादी टॉप 2019

✳ धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ग्लोबल टॉप 50 आयबी स्कूल 2019 यादीमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे

✳ रशियात 10 वा आशियाई पॅसिफिक युथ गेम्स

✳ कादंबरीकार किरण नगरकर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन

✳ झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

✳ आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला

✳ निसान इंडियाने राकेश श्रीवास्तव यांची नवीन एमडी म्हणून नियुक्ती केली आहे

✳ बॉब कार्टरने न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली

✳ डी मॅराडोना अर्जेंटिना सुपरलिगा साइड जिमनासिया प्रशिक्षक नियुक्त

✳ बी बाला भास्कर यांनी नॉर्वेमध्ये पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली

✳ सुमित डेबने एनएमडीसीचे संचालक (कर्मचारी) म्हणून पदभार स्वीकारला.

✳ डी एल मार्टिन कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडले गेले

✳ एम एन आर बालन पुडुचेरी असेंब्लीचे उपाध्यक्ष म्हणून निवडले

✳ बी पी दास यांनी ओडिशा मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला

✳ भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यपाल म्हणून शपथ घेतली

✳ ओलेक्सी होनारुक यांची युक्रेनियन पंतप्रधान म्हणून नेमणूक

✳ 2022 फिफा विश्वचषक पात्रता: ओमान बीट इंडिया

✳ कॉंग्रेस नेते सुखदेवसिंग लिब्रा यांचे 87 व्या वर्षी निधन

✳ गुजरात सरकार - अमेरिकेच्या डेलावेर स्टेटने बहिणीच्या राज्यासाठी सामंजस्य करार केला

✳ सहावा भारत-चीन सामरिक आर्थिक संवाद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ सेरेना विल्यम्सने यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ बियान्का अँड्रिसकू दशकात यूएस ओपन उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रथम किशोर बनला

✳ यूपी पोलिसांनी जातीय तणाव कायम ठेवण्यासाठी ‘सी-प्लॅन’ अॅप सुरू केला

✳ कोक इंडियाने कोकिंग कोलसाठी रशियाबरोबर सामंजस्य करार केला.

चालू घडामोडी प्रश्नसंच 6/9/2019

📌कोणत्या शहरात असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) या संस्थेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे?

(A) नवी दिल्ली, भारत
(B) सोल, दक्षिण कोरिया✅✅✅
(C) टोकियो, जापान
(D) बिजींग, चीन

📌मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या वार्षिक क्रमावारीनुसार कोणते शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहे?

(A) बँकॉक✅✅✅
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) जयपूर

📌कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?

(A) ओमान
(B) पाकिस्तान
(C) कतार✅✅✅
(D) सौदी अरब

📌इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट याच्या वार्षिक ग्लोबल लाइव्हअॅबिलिटी इंडेक्स 2019 याच्या यादीमध्ये नवी दिल्लीचा कोणता क्रमांक आहे?

(A) 115
(B) 118✅✅✅
(C) 119
(D) 220

📌इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (लंडन) याच्या वार्षिक ग्लोबल लाइव्हअॅबिलिटी इंडेक्स 2019 यानुसार कोणते शहर जीवन जगण्यास जगातले सर्वाधिक उत्तम शहर आहे?

(A) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया✅✅✅
(B) मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
(C) सिडनी, ऑस्ट्रेलिया
(D) ओसाका, जापान

📌100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.

(A) सन 2020
(B) सन 2021✅✅✅
(C) सन 2022
(D) सन 2023

📌दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी भारतात कोणत्या शहरात एक AWEB केंद्र उभारले जाणार आहे?

(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली✅✅✅

📌कोणाकडे सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) याचे अध्यक्षपद आहे?

(A) रोमानिया
(B) चीन
(C) भारत✅✅✅
(D) जापान

📌बांग्लादेशात 750 मेगावॅट क्षमतेचा गॅस-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या भारतीय ऊर्जा कंपनीने जपानी JERA कंपनीबरोबर भागीदारी केली?

(A) रिलायन्स पॉवर✅✅✅
(B) टाटा पॉवर
(C) NTPC मर्यादित
(D) अदानी पॉवर

📌वर्ष 2019 साठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाचा विषय कोणता आहे?

(A) लाइफस्टाइल अँड पोषण
(B) कॉम्प्लिमेंटरी फीडिंग✅✅✅
(C) पोषण, इज मस्ट
(D) गुड फीड, गुड डेव्हलपमेंट

गरवी गुजरात 🏛 गुजरातच्या दुसर्‍या राज्य भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले 🕍

🏛 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत गुजरात सरकारचे दुसरे राज्य भवन 'गरवी गुजरात' चे उद्घाटन झाले.

🏛 उद्घाटनादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (सध्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल) उपस्थित होते.

🏛 हे गुजरातमधील संस्कृती, हस्तकला आणि पाककृती यांचे प्रतिनिधित्व करेल.

🏛 हे राष्ट्रीय राजधानीतील 'प्रथम पर्यावरणपूरक' राज्य भवन आहे.

🏛 सुमारे 131 कोटी रुपये खर्चून हे बांधण्यात आले आहे

लग्नसमारंभ, हॉटेलिंगसाठी राज्यातील गडकिल्ले भाडेतत्वावर, देणार महाराष्ट्र सरकार


🌸......अत्यंत दुःखद घटना...... 🌸

शिक्षकांचा आदर राखण्यात भारत आठव्या स्थानी

🔰शिक्षक म्हटले की समाजातील प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणारी विशेष व्यक्ती आणि शिक्षकी व्यवसाय म्हणजे सन्मान आणि आदर असलेले क्षेत्र. ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स 2018 च्या अहवालानुसार शिक्षकांना आदर देण्याच्या बाबतीत भारत आठव्या स्थानी आहे.

🔰तर चीन आणि मलेशिया हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असून शिक्षकी पेशाला डॉक्टरांच्या व्यवसायाइतकाच मान दिला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच फिनलंड सारख्या देशांत या क्षेत्राला सामाजिक कार्याप्रमाणेच महत्त्व दिले जाते.

🔰 जगातील 35 देशांतील  सामान्य नागरिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावली आणि त्यावर आधारित अहवालांवरून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

🔴समाजातील इतर व्यवसायांशी तुलना करताना शिक्षकी पेशाकडे कसे पहिले जाते ❓❓❓

🔰 या एका निर्देशकांचा वापर या अहवालासाठी करण्यात आला आहे. सोबतच शिक्षकांचा त्या त्या देशांतील पगार, पालक त्यांना या व्यवसायामध्ये
येण्यासाठी किती प्रोत्साहित करता किंवा नाही या निर्देशकांचाही वापर या अहवालाच्या निष्कर्षांसाठी करण्यात आला आहे.

🔰2018 च्या ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स अहवालानुसार  शिक्षकांविषयीचा समाजातील आदर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यांमध्ये सकारात्मक संबंध आहे. चीन आणि मलेशिया या देशांना अनुक्रमे 100 आणि 93 गुण असून हे देश प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत. तायवान रशिया आणि इंडोनेशिया हे देश पहिल्या पाचमध्ये तर अर्जेंटिना, घाना, इटली, इस्त्राईल आणि ब्राझील हे देश शेवटच्या पाच देशांत आहेत.

चंद्रावर तिरंगा फडकविण्यासाठी ‘विक्रम’ सज्ज

🛰 ‘चांद्रयान- २’पासून वेगळा झालेला ‘विक्रम’ लॅंडर चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.

🛰 शनिवारी पहाटे दीड ते अडीच या वेळेत ‘विक्रम’ लॅंडर ही कामगिरी करणार आहे.

🛰भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (इस्रो) ही ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. भारताचा तिरंगा प्रथमच चंद्रावर फडकणार आहे. ही कामगिरी फत्ते होईल, याबाबत शास्त्रज्ञांनाही विश्‍वास आहे.

🛰‘‘विक्रम लॅंडर चंद्रावर उतरणे (सॉफ्ट लॅंडिंग) ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी असणार आहे, त्यात १०० टक्के यश येईल,’’ असे मत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी व्यक्त केले आहे. ‘चांद्रयान- १’ची मोहीम जी. माधवन नायर यांच्याच नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेली होती.

🛰‘इस्रो’ने २२ जुलै रोजी ‘चांद्रयान- २’चे प्रक्षेपण केले होते.

🛰 सुमारे ९७८ कोटी रुपये खर्च आलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा एक टप्पा २ सप्टेंबर रोजी पार पडला. त्या वेळी चांद्रयानापासून विक्रम लॅंडर वेगळा करण्यात आला.

      🌓 असे होईल चंद्रावतरण 🌔

🛰 लँडर चंद्राभोवतीच्या कक्षेत ३० किलोमीटर उंचीवर असताना एक वाजून ४० मिनिटांनी त्याच्यावरील ८०० न्यूटन शक्तीचे पाचपैकी दोन इंजिन सुरू करण्यात येतील.

🛰६२० सेकंदांच्या या प्रक्रियेतून (रफ ब्रेकिंग फेज) लँडर ५८७ किलोमीटर अंतर कापून चंद्राच्या जमिनीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर येईल.

🛰जमिनीपासून १०० मीटर उंचीवर असताना लँडर २२ सेकंदांसाठी तरंगते ठेवून उतरण्याच्या ठिकाणाची पाहणी करेल.

🛰जमिनीपासून १० मीटर उंचीवर असताना लँडरचा वेग शून्य करण्यात येईल. या स्थितीत एक वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरेल.

🛰लँडर चंद्रावर उतरल्यावर चार तासांनी त्याच्या आतील प्रग्यान रोव्हर बाहेर येऊन चांद्रभूमीवरील प्रवास सुरु करेल.

      🙇‍♀ विद्यार्थी अनुभवणार थरार🙇‍♂

🛰‘चांद्रयान- २’ मोहिमेनिमित्त ‘इस्रो’ने घेतलेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत ६० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

🛰त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘चांद्रयान- २’ची कामगिरी ‘इस्रो’च्या मुख्यालयात बसून पाहता येणार आहे.

🛰प्रश्नमंजूषा स्पर्धेत वीस प्रश्‍न विचारण्यात आले होते व त्यांची उत्तरे १० मिनिटांत द्यायची होती. यात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जाणून घ्या काय आहे 4G टेक्नोलॉजी आपल्याला माहिती आहे का?

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1G पासूनची भरारी 4G पर्यंत घेतली आहे .आज सर्वत्र 4G ची चर्चा चालू आहे . मग नेमकं काय आहे 4G ची टेक्नोलॉजी याबाबत माहिती घेऊया

          ☀️ 1G टेक्नोलॉजी

👉  1G टेक्नोलॉजी पासूनच वायरलेस टेलिफोन म्हणजेच मोबाइल चा परिचय जगाशी आला .
👉  मात्र अनलॉग सिग्नलवर आधारित 1G टेक्नोलॉजी मध्ये खराब आवाज येणे , मोबाइल हँडसेट  चा मोठा आकार आणि वजन तसेच डाटा स्पीड अतिमंद अशा समस्या होत्या .

        ☀️ 2G टेक्नोलॉजी

👉  ही टेक्नोलॉजी डिजीटल सिग्नलवर आधारित असून याद्धारे आपण फ़ोन कॉल सोबतच इंटरनेटचाही आनंद घेऊ शकतो .
👉  2G चा डाटा ट्रान्सफर स्पीड 236 kbps आहे . यामध्ये पिक्चर मॅसेज , टेक्स्ट मॅसेज , आणि मल्टीमेडिया मॅसेज आरामाने पाठविता येतात .
👉  मात्र विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही यात 2G अयशस्वी ठरते .

        ☀️ 3G टेक्नोलॉजी

👉 डाटा ट्रान्सफर स्पीड 21 Mbps आहे . यामुळे विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही या सुविधा सहज उपलब्ध मिळू लागल्या 
👉  यामुळे मोबाइल व लॅपटॉप साठी स्पेशल ऑनलाइन टिव्ही अप्लिकेशन आले .
👉  सोबतच फ़ोन मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील आला . याचा वापर विडियो कॉलिंग व सेल्फी साठी करू लागले .

        ☀️ 4G टेक्नोलॉजी

👉  यांच्यात इंटरनेटचा स्पीड 100 mbp ते 1 Gbps पर्यंत आहे .
👉  यामुळे स्मार्टफोनवर विना बफरिंग टिव्ही पाहणे , विडियो कॉल करणे , चित्रपट , सॉफ्टवेयर , गेम्स डाउनलोड करणे आदि सुविधा अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या .

तर चला 4G टेक्नोलॉजी चा मनमुराद आनंद लुटूया ..........

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

👉देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.

👉अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

👉केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्यसाधून देशातील शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018-19’ने गौरविण्यात आले.

👉 रजतपदक, मानपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

👉केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री- रमेश पोखरीयाल निशंक

मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त


👉राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

👉राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

👉ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

👉राज्याचे मुख्य सचिव राहिलेले यू.पी.एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते.

👉राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे.

👉त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. 

👉मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.

कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

👉कादंबरीकार किरण नगरकर यांचे काल  5 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले.

👉ते 67 वर्षाचे होते.

👉किरण नगरकर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक होते.

👉किरण नगरकरांची पहिली कादंबरी 'अभिरुची' नावाने १९६७-६८च्या सुमारास प्रसिद्ध झाली होती. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने १९७४ला प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. 

👉मोजक्याच कादंबर्‍या लिहून नगरकर अत्यंत लोकप्रिय असे कांदबरीकार म्हणून ओळखले जायचे.

👉 'रावण आणि एडी ही त्यांची कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली.  

👉नगरकरांच्या 'गॉड्स लिटल सोल्जर, ककल्ड या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले.

👉2001ला 'ककल्ड' या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 

👉'कबीराचे काय करायचे?' आणि 'बेडटाईम स्टोरी अशी आणखी काही त्यांची पुस्तके चांगलीच गाजली.

👉स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनयही केला होता.

👉अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

सुनील अरोरा:  असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB)  याचे नवे अध्यक्ष


👉भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले.

👉सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता.

👉रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार.

👉भारतीय निवडणूक आयोगाने 3 सप्टेंबर 2019 रोजी बेंगळुरू या शहरात AWEBची चौथी आमसभा आयोजित केली होती. त्यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.

👉आमसभेने AWEBचे नवे उपाध्यक्ष म्हणून दक्षिण आफ्रिका या देशाचे ग्लेन व्ह्यूमा माशिनीनी तसेच नवे सरचिटणीस (महासचिव) म्हणून कोरिया प्रजासत्ताकचे जोंग्युन चोए यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली आहे.

👉अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे, जे निवडणुकीच्या उत्तमोत्तम पद्धती तयार करणार आणि क्षमता बांधणी वाढवण्याबद्दल कार्य करणार.

🌹🌳🌴A-WEB बद्दल🌴🌳🌹

👉असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) ही जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन मंडळांची (EMBs) सर्वात मोठी संघटना आहे.

👉त्याची स्थापना दक्षिण कोरियाच्या सोंग-डू या शहरात 14 ऑक्टोबर 2013 रोजी झाली.

👉आता त्याचे कायमस्वरूपी सचिवालय सोल (दक्षिण कोरिया) या शहरात आहे.

👉जगभरात मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि सहभागी तत्त्वावर निवडणुका घेण्यात कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

👉यंदा युक्रेन, कंबोडिया, अफगाणिस्तान तसेच सिएरा लिओन, इंडोनेशिया आणि मॉरिशस हे नव्याने दाखल झालेले AWEBचे सभासद आहेत तर सहयोगी सदस्य म्हणून असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज (AAEA) संघात सामील झाले आहे.

👉आता संघात त्याचे सदस्य म्हणून 111 देशांमधली 120 निवडणूक आयोग मंडळे आणि सहयोगी सदस्य म्हणून 21 आंतरराष्ट्रीय संघटना सामील आहेत.

भारतीय लेखिका अॅनी झैदी: 2019सालाच्या ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाची विजेती


👉भारतीय लेखिका अॅनी झैदी यांचे नाव 2019 या सालाच्या ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाची विजेती म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

👉मुंबईच्या झैदी या एक स्वतंत्र लेखिका आहेत. त्यांना त्यांच्या 'ब्रेड, सिमेंट, कॅक्टस' या लेखनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. भारतातल्या समस्यांचे दर्शन घडविणारे हे लेखन आहे.

🌺पुरस्काराविषयी🌺

👉‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाद्वारे समकालीन सामाजिक समस्यांच्या संदर्भात मूळ विचारांना पुरस्कृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा पुरस्कार ‘कदास प्राइज फाउंडेशन (लंडन) या संस्थेतर्फे प्रायोजित आहे. पुरस्कार स्वरुपात 1 लक्ष अमेरिकन डॉलर एवढी रक्कम विजेत्याला दिली जाते.

भारतीय अर्थव्यवस्था पोहचणार पाचव्या स्थानावर

👉 यंदा ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

👉 आयएचएस मार्केटच्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अहवालानुसार भारत जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंमध्ये पुढे सरकत राहणार आहे.

❇️ विशेष

▪ 2025 पर्यंत भारत जपानलाही मागे सोडून आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
▪ 2019-23 दरम्यान जीडीपी सरासरी वाढ ही सात टक्के राहणार आहे.
▪ पुढील दोन दशकांमध्ये प्रती वर्षी 75 लाख लोकांना काम मिळत राहणार आहे.

❇️ आर्थिक वृद्धी :

▪️देशाची जीडीपी 3000 अब्ज डॉलर म्हणजेच 2.10 लाख अब्ज रुपयांवर पोहोचणार आहे.

▪️भारत आशियाई देशांसाठी आर्थिक वाढीचे इंजिन असणार आहे. यामुळे आशियातील व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्वाची भुमिका निभावणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय शैक्षणिक आयोग


भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग)

आयोग का नेमला?

प्राथमिक शिक्षणाची प्रगती १८५४ ते १८८२ या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला. वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

आयोगाच्या शिफारसी:-

प्राथमिक शिक्षणविषयक प्रमुख शिफारशी:-

» प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे

» प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा

» शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे

» मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

» इंग्लंडमधील १८७० आणि १८७६ च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा

» प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा

» स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे

» प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

» प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय करावी आणि प्राथमिक शिक्षणासाठी शासनाच्या निधीपैकी निश्चित निधी राखून ठेवावा.

आयोगाच्या इतर शिफारशी:-

» प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श माध्यमिक शाळा उघडावी

» माध्यमिक शाळांच्या वरच्या वर्गात विदयापीठातील शिक्षणासाठी तयारी करणारे विषय व ज्यांचा व्यवहारामध्ये उपयोग होईल, असे व्यावसायिक विषय अशी विभागणी असावी.

» महाविदयालयांना अनुदान देताना ते विदयार्थी व प्राध्यापकांच्या संख्येवर आणि व्यवस्थापन खर्चावर अवलंबून ठेवावे

» मुलींच्या शिक्षणासाठी स्थानिक आणि शासकीय निधींपैकी निश्चित निधी राखून ठेवावा

» मिशनऱ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग कमी करावा आणि कोणत्याही धर्माचे प्रत्यक्ष शिक्षण शाळातून देऊ नये.

भारतीय विद्यापीठ आयोग (रॅले आयोग)

» लॉर्ड कर्झनने विदयापीठांच्या सुधारणांकडे अधिक लक्ष देण्याचे ठरविले; कारण शिक्षणाच्या त्या स्तरावर आमूलाग सुधारणांची जरूरी होती. त्याप्रमाणे २७ जानेवारी १९०२ रोजी ब्रिटिश व्हाइसरॉय यांच्या कार्यकारी मंडळाचे एक सभासद रॅले यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला.

» भारतामध्ये विदयापीठीय शिक्षणाची अंतिम व्यवस्था ठरविणे आणि ती साध्य होण्याच्या दृष्टीने प्रचलित व्यवस्थेमध्ये सुधारणा सुचविणे यांसाठी हा आयोग होता.

» या आयोगाने फक्त विदयापीठ स्तरावरील शिक्षणाचा विचार करावा, असे सुचविण्यात आले होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, आयोगाने या मूलभूत गोष्टींचा विचार केला नाही.

» भारतातील तोपर्यंतच्या विदयापीठीय पातळीवरील सुधारणा लंडन विदयापीठाचा आदर्श समोर ठेवून केलेल्या होत्या.

प्रमुख शिफारशी:-

» विदयापीठ व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी

» विदयापीठांनी कडक नियम घालून व व्यवस्थितपणे महाविदयालयांच्या कामावर नियंत्रण ठेवावे

» संलग्नतेच्या अटी अधिक स्पष्ट व कडक कराव्यात

» महाविदयालयातील विदयार्थी कोणत्या वातावरणात राहतात आणि काम करतात यावर विदयापीठांनी अधिक चांगले लक्ष द्यावे

» विदयापीठांनी काही मर्यादेपर्यंत अध्यापनाचे कार्य स्वीकारावे व विदयापीठांचे अभ्यासक्रम आणि महाविदयालयांतील अध्यापन पद्धती, यांमध्ये आमूलाग्र सुधारणा करावी.

* आयोगाच्या या शिफारशींवर आधारित ‘ इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट’ १९०४ मध्ये अंमलात आला.

कलकत्ता विद्यापीठ आयोग (सॅडलर आयोग)

» ब्रिटिश सरकारने लीड्स विदयापीठाचे त्या वेळचे कुलगुरू सर एम्. ई.सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली १९१७ साली भारतातील विदयापीठांचे प्रश्न आणि भवितव्य यांचा अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमला.

» आयोगाच्या नावात केवळ कलकत्ता विदयापीठाचा उल्लेख असला, तरी या आयोगाच्या शिफारशी तत्कालीन भारतातील उच्च शिक्षणाला व विदयापीठांना लागू होत्या.

» या आयोगाने उच्च शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षणाचाही अभ्यास केला; कारण या आयोगाच्या मते माध्यमिक शिक्षणामध्ये सुधारणा झाल्याखेरीज विदयापीठ पातळीवरील शिक्षणात सुधारणा होणार नाहीत.

प्रमुख शिफारशी:-

» उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा मॅट्रिक्युलेशन ऐवजी इंटरमीडिअट असावी

» शासनाने इंटरमीडिअट महाविदयालये ही नवी व्यवस्था स्थापन करावी.

» या महाविदयालयांत कला, शास्त्र, वैदयक, स्थापत्य इ. अभ्यासकमांसाठी विदयार्थी तयार होतील.

» ही महाविदयालये स्वायत्त संस्था असतील किंवा निवडक शाळांना जोडली जातील.

» प्रत्येक राज्यातील शाळांत इंटरमीडिअट शिक्षण मंडळ स्थापन करावे इत्यादी.

» कलकत्ता विदयापीठांतर्गत महाविदयालये आणि विदयार्थी यांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यामुळे ढाक्का येथे विदयापीठ स्थापन करावे

» कलकत्त्यास अध्यापन करणारे विदयापीठ स्थापन करावे

Latest post

प्रथम गोलमेज परिषद – विश्लेषण

1.📍 काँग्रेसचा बहिष्कार – निर्णायक मर्यादा ✅️ ➤ परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अनुपस्थित राहणं ही सर्वात मोठी मर्यादा ठरली. ✅️ ➤ क...