*· सिंधुदुर्ग----------------1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
*· जालना-----------------1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
*· लातूर-------------------16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
*· गडचिरोली--------------26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
*· मुंबई उपनगर---------1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
*· वाशिम-----------------1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
*· नंदुरबार----------------1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
*· हिंगोली----------------1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
*· गोंदिया----------------1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
*· पालघर-----------------2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन
Sunday 12 December 2021
महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती
जाणून घ्या :- ट्रेन व स्टेशनचे प्रकार
● *पॅसेंजर ट्रेन* : जी ट्रेन स्टेशनवर थांबते तिला पॅसेंजर ट्रेन म्हणतात.
● *एक्सप्रेस ट्रेन* : जी ट्रेन प्रमुख स्टेशनवर थांबते आणि तिचा वेग जास्त असतो तिला एक्सप्रेस ट्रेन म्हणतात.
● *मेल ट्रेन* : जी ट्रेन विशेष करून डाक सामुग्री घेवून जाते तिला मेल ट्रेन म्हणतात.
● *सुपरफास्ट ट्रेन* : या गाडीची गती तासी 100 कि.मी. पेक्षा जास्त असते म्हणून तिला सुपर फास्ट ट्रेन म्हणतात.
● *गुडस ट्रेन* : ही ट्रेन सामान किंवा वस्तु वाहून नेते. मालगाडीच्या डब्याला वॅगन आणि प्रवासी डब्याला कोच म्हणतात.
● *बुलेट ट्रेन* : या ट्रेनची गती सर्वात जास्त असते. ही ट्रेन विद्युत चुंबकीय बलच्या आधारे चालते.
● *मोनो ट्रेन* : ही ट्रेन पृथ्वीच्यावर अर्थात आकाशात रोप-वे सारखी चालते.
● *जनता एक्सप्रेस* : या ट्रेनमध्ये फक्त व्दितीय श्रेणीचे डब्बे असते.
● *अप ट्रेन* : जी ट्रेन मुख्यालयापसून निर्धारित स्टेशनपर्यंत जाते या प्रकाराला अप ट्रेन म्हणतात.
● *डाउन ट्रेन* : जी ट्रेन मुख्यालयाकडे निर्धारित स्टेशनपासून परत येते या गाडीला डाउन ट्रेन म्हणतात.
💁♂️ असे आहेत रेल्वे स्टेशनचे प्रकार :
1. *वे साईड स्टेशन* : यावरुन एकाच दिशेने गाड्या जाणे-येणे करतात.
2. *जंक्शन स्टेशन* : यावरुन वेगवेगळ्या दिशेने गाड्या (मार्ग) जातात.
3. *टर्मिनल स्टेशन* : हे स्टेशन शेवटचे असते.
4. *भूमिगत स्टेशन* : हे स्टेशन जमिनीच्या खाली असते.
भूगोल महत्त्वाची माहीती
♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके
♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास
3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)
🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)
1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229
Mpsc pre exam samples questions
1) एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ____ यांचा समन्वय होता.
A. मक्ता, रयतवारी, कायमधारा
B. रयतवारी, महालवारी, मौजेवारी
C. मौजेवारी, कायमधारा, रयतवारी✍️
D. मक्ता, मौजेवारी, महालवारी.
________________
2) पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?
A. वक्तृत्त्व - कला आणि साधना
B. आमच्या आठवणी✍️
C. दगलबाज शिवाजी
D. माझी जीवन गाथा.
________________
3) होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?
A. खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.
B. अमरावती होमरूल लीगचे खापर्ड अध्यक्ष होते.
C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते✍️
D. नागपूरच्या परिसरात मुंजेनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.
________________
4) ते लहूजींचे शिष्य होते.
लहूजींना त्यांचा अभिमान होता.
ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.
त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.
ते कोण?
A. जोतीबा फुले✍️
B. यशवंत फुले
C. मेघाजी लोखंडे
D. नारायण लोखंडे.
________________
5) खालील व्यक्तींपैकी कोणी फग्र्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?
(a) बी.जी. टिळक
(b) जी.के. गोखले
(c) धों.के. कर्वे
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b) फक्त
B. (b), (c) फक्त
C. (a), (c) फक्त
D. (a), (b), (c). ✍️
________________
6) पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
(a) : ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी
(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया
(c) अँन ऑटोबायोग्राफी
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b), (c)
B. (b), (c), (a)
C. (c), (a), (b)
D. (a), (c), (b). ✍️
________________
7) 'रयत शिक्षण संस्थेचे' _ हे उद्दिष्ट नव्हते.
A. मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे.
B. मुलाना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे.
C. मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण देणे.
D. समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्रि-पुरुषांचे संघ निर्माण करणे.✍️
__________________
8) 1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?
A. सुचेता कृपलानी
B. मृदूला साराभाई
C. अरुणा असफ अली✍️
D. लीलाताई पाटील.
________________
9) _ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
A. शंकरराव देव✍️
B. जमनालाल बजाज
C. के.एफ्. नरिमन
D. किशोरलाल मश्रूवाला.
________________
10) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
A. अहमदाबाद, चंपारण, खेड़ा
B. खेडा, अहमदाबाद, चंपारण
C. चंपारण, अहमदाबाद, खेड़ा ✍️
D. चंपारण, खेडा, अहमदाबाद.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’✅✅
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
____________ या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा✅✅
(D) सुशील चंद्र
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज✅✅
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे "दर्पण' पत्र ओळखले जाते.
🅾वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले. पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या थोर पुरुषांचे ते गुरू होत. न्या. ना. ग. चंदावरकरांनी त्यांचा पश्चिम भारतातील "आद्य ऋषी' असा त्यांचा सार्थ गौरव केला होता.
🅾"दर्पण'चा पहिला अंक शुक्रवार, दि. 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. पहिले काही महिने हे पत्र पाक्षिकच होते. 4 मे 1832च्या अंकापासून ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. हे वृत्तपत्र आठ पानी होते व त्यात पानातील दोन स्तंभांपैकी डावीकडच्या स्तंभात इंग्रजी मजकूर व समोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे. गंमत म्हणजे दर्पणच्या अंकाला "कागद' असे म्हटले जात असे.
🅾 तसा उल्लेख खुद्द बाळशास्त्री करीत असत. त्या काळी कोणत्याही वृत्तपत्राचा खप 300-400 प्रती याच्या पुढे नसे. वर्षभरातच दर्पणने 300ची मजल गाठली होती. हे पत्र सुमारे साडेआठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडले.
🅾"दर्पण'ची ओळख आद्य मराठी पत्र अशी असली, तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्या वृत्तपत्राचे नाव "मुंबापूर वर्तमान' असे होते. रविवार, दि. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता.
🅾 या पत्राच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेला एक "विक्षिप्त' यांचा लेख "बॉम्बे गॅझेट' या मुंबईतील इंग्रजी पत्राने आपल्या 23 जुलै 1828 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. लंडन येथे निघणाऱ्या "एशियाटिक जर्नल ऍण्ड मंथली रजिस्टर (फॉर इंडिया ऍण्ड इट्स डिपेन्डन्सीज)' या मासिकाच्या फेब्रुवारी 1829च्या अंकात "महरट्टा न्यूजपेपर' या मथळ्याच्या वृत्तात "मुंबापूर वर्तमान' या पत्राचा उल्लेख होता.
🅾हे वृत्त "दी बॉम्बे गॅझेट' या पत्राच्या 23 जुलै 1828 च्या अंकावरून घेतल्याचाही उल्लेख एशियाटिक जर्नलमध्ये होता. "बॉम्बे गॅझेट' मध्ये 9 जुलै 1828च्या अंकात या पत्राची इंग्रजी व मराठी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. परंतु या पत्राचे चालक, संपादक, प्रकाशक कोण होते, ते किती काळ चालले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे की ते 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. यावरून "मुंबई वर्तमान' हेच मराठीतील आद्य वृत्तपत्र असे म्हणता येईल.
🅾पण त्यातही एक गोची अशी, की "बॉम्बे गॅझेट'च्या प्रास्ताविकात "एक नवीन मराठी वर्तमान पत्र' असा उल्लेख आहे. याचा अर्थ त्यापूर्वी एखादे पत्र निघत होते की काय, अशी शंका "मराठी वृत्तपत्रांचा इतिहास'कर्ते रा. के. लेले यांनी व्यक्त केली आहे.
🅾परंतु कालानुक्रमे "दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणता आले नाही, तरी मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान "दर्पण'कडेच जातो, असा लेले यांचा अभिप्राय आहे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -
🔸बंगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.
🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.
🔸त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.
🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.
🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.
चलेजाव आंदोलन (१९४२).
🧩घटनाक्रम
🅾 क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
🅾 मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू.
🅾 (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर.
🅾 ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.
🅾गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.
🅾 कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
🅾 प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
🅾बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
🅾 या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.
🅾सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
🅾या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
🅾 काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
🅾 व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
🅾मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
🅾 भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
🅾निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
🅾 स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
🅾 भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.
🧩छोडो भारत चळवळ.
🅾क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला.
🅾 ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले.
🅾 देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.
🧩नेताजी सुभाष चंद्र बोस...
🅾भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले.
🅾त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.
🧩आझाद हिंद सेना...
🅾ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
🅾नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
🅾१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
🧩भारतीय नौदलाचा उठाव..
🅾आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली.
🅾या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
Latest post
पठाराची स्थानिक नावे
1) गाविलगडचे पठार – अमरावती 2) बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...
-
6th History+Polity :- Click Here 7th History+Polity :- Click Here 8th History+Polity :- Click Here 9th History+Polity :- Click Here 10th H...
-
6th Science :- Click Here 7th Science :- Click Here 8th Science :- Click Here 9th Science :- Click Here 10th Science 1 :- Click Here 1...
-
5th भूगोल :- Click Here 6th भूगोल :- Click Here 7th भूगोल :- Click Here 8th भूगोल :- Click Here 9th भूगोल :- Click Here 10th भूगोल :- ...