Thursday 31 December 2020

मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू.


🍀रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका  ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.


🍀तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🍀तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.


🍀सरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.


🍀एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली  2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

वहाबी आंदोलन


🔹वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते

🔸वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

🔹आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

 🔸पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते 

🔹ह आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

 🔸ज उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते



📚 सय्यद अहमद ची इच्छा 📚

🔹सय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

🔸तयांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

🔹सय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

🔸अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

🔹तयांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

🔸अापल्या नावाचे सिक्के भी चालवले


📚  फाँसी ची शिक्षा 📚

🔸1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

🔹कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

🔸तयांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली


फॉर्वर्ड ब्लाॕक



🔹सभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


 🔸पक्षाचे उद्दीष्ट -


कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना

मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


मुखपत्र-फार्वड ब्लॉक


"नागपुर-पहिली परिषद "


२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.

 परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

ताश्कंद करार



● भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी हा करार झाला.


● भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 


● भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या मध्यस्थीने हा करार झाला.


●या करारान्वये संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.


● २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले.


● एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.


● एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.


● एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.


● एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.


● युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.


● उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.


● अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे. 


● या करारानंतर लगेच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंद येथेच निधन झाले.

बगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -



🔸बगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.


🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.


🔸तयामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.


🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.


🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.


🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.

नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?



- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखला दिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. 


- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.


-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते. 


-  डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं. 


- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य



●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे


●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.


●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.


●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.


●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे


●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे


●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे


●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले


●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज


●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर


●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे


●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई


●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई 


●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई


●केसरी — लोकमान्य टिळक


●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख


●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे


●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख


●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी


●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर


●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी


●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.


●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.


●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.


●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे


●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे


●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित 


●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.


●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



🎯 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


🎯 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


🎯 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

सटॅच्यू ऑफ युनिटी


✔️मर्तिकार :- शिल्पकार राम सुतार 

✔️ कोठे :-  नर्मदा नदी , गुजरात

✔️ उची :- १८२ मीटर 

✔️ जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात 

      भव्य पुतळा आहे. 

✔️ लोकार्पण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ✔️ पतळ्याचे वजन :-  १७०० टन 

✔️ ह शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प 

      आहे. 

✔️ पायांची उंची :- ८० फूट,

✔️ हाताची उंची :-  ७० फूट

✔️ चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये  

     असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची       

     उंची १५३ मीटर आहे.


✔️  हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच 

       पुतळा मानला जायचा, मात्र 'स्टॅच्यू 

       ऑफ युनिटी'ने त्याचा पुतळ्याचाही 

       रेकॉर्ड मोडला आहे.

✔️  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनण्यास 

        कालावधी :-  ३३ महिने 

✔️ पतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० 

      पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. 

✔️ खर्च :-  २ हजार ९८९ कोटी रुपये 

✔️ सरवात :- ३१ ऑक्टोबर २०१३

✔️ सरदार पटेल यांच्या १३८ व्या 

     जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात 

     आले होते.

✔️ नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री 

      होते

✔️ लोकार्पण सोहळ्यासाठी 'युनिटी ट्रेन' 

      नावाची ट्रेनही धावणार आहे.

✔️ या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर, 

      अलाहबाद,रायबरेलीहून लोक या  

      ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे

आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी

 

♒️आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.


♒️करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.


♒️तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


♒️विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना  यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

Wednesday 30 December 2020

ब्रिटन कडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता.


🔰करोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे.

तर यासोबतच ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.


🔰बरिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत.


🔰आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या  करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.

सुबोध जयस्वाल ‘सीआयएसएफ’च्या महासंचालकपदी



पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या(सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.


केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी के ंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य के ली होती. त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती के ली आहे. त्यांचा कार्यकाल हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल.

2020 नंतरचे स्पर्धा परीक्षा जग



मित्रांनो Mpsc खूप काही महत्वाचे निर्णय घेत आहे. पुढे पण घेत राहील.

आयोगाला 6 महिन्यात बऱ्यापैकी वेळ भेटला आहे 

आयोग webiste बदल करत आहे 

आता आयोग मुख्य परीक्षा online करत आहे .आयोगावर जे दिरंगाइचे आरोप होतात ते कमी होतील. मुख्य परीक्षा निकाल लवकर लागतील.

उमेदवारांच्या उत्तरपत्रिका रेल्वे स्टाफ selection सारख्या ऑनलाइन पाहता येतील.

 Survival of the fittest जो 

डार्विनच्या नियम आहे त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत चला.

प्रत्येक गोष्टीला विरोध करत बसू नका.

स्पर्धा खूप वाढतेय.


उमेदवारांनी स्वतःचा time limit ठरवून घ्या . 

बाकी पण खूप गोष्टी आहेत या जगात  करण्यासाठी. तुम्ही थांबत नव्हता म्हणून शेवटी आयोगाला attmept limit आणावे लागले 

वयाच्या तिशीनंतर पार्ट time जॉब करत तयारी करत चला.

देशातील राज्य आयोगांमध्ये आपले MPSC पारदर्शकतेसाठी देशात एक नंबर आहे हे विसरू नका.


आता सर्वांनी शासनाला लवकरात लवकर पदभरती करण्यासाठी विनंती करावी एवढीच अपेक्षा !!!!!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) दशकातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.



पुरस्कार विजेत्यांची यादी

◆ दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 

- विराट कोहली

◆ दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी

◆ दशकातील सर्वोतम कसोटी क्रिकेटपटू 

- स्टीव्ह स्मिथ

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू 

- विराट कोहली 

◆ दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू 

- राशिद खान 

◆ दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम दवेन्टी-२० महिला क्रिकेटपटू 

- एलिस पेरी 

◆ दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू  

- कायले कोएटझर 

◆ दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू 

- कॅथरिन ब्राइस

◆ दशकातील सर्वोत्तम खेलभावनेचा पुरस्कार 

- महेंद्रसिंह धोनी

महासागर किती खोल आहेत?


आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग सपाट नाही. तो अनेक भूखंडांचा बनलेला आहे. या भूखंडांनाच टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात. हे भूखंड स्थिर नसून ते सतत सरकत असतात. त्यामुळे जिथं असे दोन भूखंड एकमेकांना भिडतात तिथं तणावाची परिस्थिती निर्माण होते. भूखंडांच्या त्या टकरीपोटी एखादा भूखंड वर उचलला जातो. त्याचे उंच पर्वत बनतात. दुसरा एखादा भूखंड खाली ढकलला जातो. तिथं खोल विवरं निर्माण होतात. ती पाण्यानं भरली की तिथं खोल खोल महासागर बनतात.


जशी सर्वच पर्वतांची उंची सारखी नाही. एव्हरेस्टसारखं एखादं शिखर उंचच उंच असतं. सह्याद्रीसारख्या पर्वतराजींची उंची त्याच्या पावपटच असते. महासागरांच्या खोलीचीही स्थिती वेगळी नाही. काही महासागर चांगलेच खोल आहेत, तर इतर काही उथळ आहेत. एवढंच काय, पण एखाद्या महासागराची खोलीही सगळीकडे सारखीच नसते. तिच्यातही चढउतार असतात त्यामुळे महासागरांमधला सर्वात खोल प्रदेश कोणता आणि तो किती खोल आहे? असा प्रश्नच आपण विचारू शकतो.


प्रशांत महासागरातला ऑस्ट्रेलिया व पापुआ न्यूगिनीच्या उत्तरेला आणि फिलिपाईन्सच्या पूर्वेला असलेल्या मॅरियाना बेटानजीकचा मरियाना ट्रेंच या नावानं ओळखला जाणारा प्रदेश सर्वात खोल आहे. १९५१ साली इंग्लंडच्या एका सर्वेक्षण जहाजानं त्याची खोली प्रथम मोजली. त्यामुळे त्या खोल भागाला चॅलेंजर डीप' या नावानं ओळखलं जातं. त्याची खोली तब्बल ११,०३३ मीटर आहे. म्हणजेच त्या जागी जर एव्हरेस्ट या जगातल्या सर्वात उंच शिखराला आणून ठेवलं तर त्याच्या माध्यावरून बाहणाच्या पाण्याची खोलीही दीड किलोमीटरपेक्षा जास्त भरेल.


इतक्या खोलावर अर्थात संपूर्ण निर्जीव प्रदेश असेल, अशी कल्पना होती; पण १९६० मध्ये अमेरिकन नौसैनिक जाक पिकार्ड आणि डोनाल्ड वॉल्श हे 'प्रत्रिएस्त' या जहाजातून तिथं पोहोचले. त्यानंतर बँथीस्कोप नावाच्या एका उपकरणात शिरून ते त्या खोलीवर उतरले आणि त्यांनी त्या प्रदेशाचे सर्वेक्षण केलं. तिथं त्यांना अनेक पाणवनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा संचार असलेला दिसून आला. त्यांच्या या मोहिमेतही त्या प्रदेशाची खोली मोजली गेली. त्यातूनच आता ११.०३ किलोमीटर  महासागरांची सर्वात जास्त खोली आहे, हे सर्वमान्य झालं आहे.

महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न



1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

Tuesday 29 December 2020

राज्यतील सर्व प्रदेशिक परिवहन कार्यालय क्रमांक



◾️आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.


◾️ या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो. 


◾️उदाहर्णार्थ रायगडमधील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या गाड्यांचा क्रमांक MH-06 ने सुरु होतो. या क्रमांकाने सुरु होणारी गाडी ही महाराष्ट्रातील (MH) सहाव्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे असा अर्थ होतो. 


◾️दिवसोंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याने अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्रमांकाची यादी आता ५६ वर जाऊन पोहचली आहे. 


◾️अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात आता MH-56 पर्यंतच्या गाड्या पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शहरातील गाड्यांसाठी कोणता क्रमांक वापरला जातो…


MH-01 – मुंबई (दक्षिण)

MH-02 – मुंबई (पश्चिम)

MH-03 – मुंबई (पूर्व)

MH-04 – ठाणे

MH-05 – कल्याण

MH-06 – रायगड

MH-07 – सिंधुदूर्ग

MH-08 – रत्नागिरी

MH-09 – कोल्हापूर

MH-10 – सांगली

MH-11 – सातारा

MH-12 – पुणे

MH-13 – सोलापूर

MH-14 – पिंपरी चिंचवड

MH-15 – नाशिक

MH-16 – अहमदनगर

MH-17 – श्रीरामपूर (अहमदनगर)

MH-18 – धुळे

MH-19 – जळगाव

MH-20 – औरंगाबाद

MH-21 – जालना

MH-22 – परभणी

MH-23 – बीड

MH-24 – लातूर

MH-25 – उस्मानाबाद

MH-26 – नांदेड

MH-27 – अमरावती

MH-28 – बुलढाणा

MH-29 – यवतमाळ

MH-30 – अकोला

MH-31 – नागपूर

MH-32 – वर्धा

MH-33 – गडचिरोली

MH-34 – चंद्रपूर

MH-35 – गोंदिया

MH-36 – बुलढाणा

MH-37 – वाशिम

MH-38 – हिंगोली

MH-39 – नंदूरबार

MH-40 – वाडी (नागपूर)

MH-41 – मालेगाव (नाशिक)

MH-42 – बारामती (पुणे)

MH-43 – वाशी (सानपाडा)

MH-44 – अंबेजोगाई (बीड)

MH-45 – आकलूज (सोलापूर)

MH-46 – पनवेल

MH-47 – बोरिवली

MH-48 – वसई

MH-49 – नागपूर (पूर्व) भंडारा रोड

MH-50 – कराड

MH-51 – संगमनेर (अहमदनगर)

MH-52 – परभणी (ग्रामीण)

MH-53 – पुणे (दक्षिण)

MH-54 – पुणे (उत्तर)

MH-55 – मुंबई (मध्य)

MH-56 – ठाणे (ग्रामीण)

महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार (Crops of Maharashtra)



🔸तणधान्य :


Eg.ज्वारी ,बाजरी ,तांदूळ ,गहू


🔸कडधान्य :


Eg. तूर मूग उडीद मटका हरभरा


🔸गळीत धान्य:

 

Eg.भुईमूग ,तीळ, सूर्यफूल ,करडई.


🔸नगदी पिके:

 सर्वात जास्त पैसा इथून मिळतो.


Eg.कापूस, ऊस ,हळद ,तंबाखू


🔸वन पिके 


Eg.बाभूळ, नेम सारा ,चिंच ,निलगिरी.


🔸चारा-पिके :


Eg.नेपियर गवत ,मक्का ,लसूण घास ,चवळी


महाराष्ट्र जमीन वापर 2015- 16 2011 आकडेवारी


▪️एकूण भौगोलिक क्षेत्रफळ तीन लाख सात हजार 58 लाख हेक्टर कारण आपण शेती हेक्टर मध्ये करतो


वने 52.0 5 हेक्टर 16.9 % तसे पाहिले तर 33% वने राहिले पाहिजे


▪️महाराष्ट्रातील पेरणी क्षेत्र 68 लाख हेक्टर निवड पेरणी क्षेत्र 56. 4% पडीक जमिनीखालील क्षेत्र 25. 93 लाख हेक्टर 8.4%


▪️महाराष्ट्रातील अन्नधान्य उत्पादन 2014- 15


◆ 1960 – 61 – 70. 44 लाख टन


◆ 2014-15 – 109.48 लाख टन


◆ 2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे प्रमुख जिल्ह्यांच्या उतरता क्रम.


● सर्वाधिक क्षेत्र (2014- 15)


●अहमदनगर> सोलापूर> बीड> उस्मानाबाद >पुणे


●विदर्भातून एकही जिल्हा नाही आहे.


◆2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकांचे सर्वाधिक उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे


●जळगाव >अहमदनगर> नाशिक> सांगली >पुणे

जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती



🔹 वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश



▪️ तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.



▪️ गहू - चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.


▪️ मका - अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.



▪️ कापूस - चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.


▪️ ताग - बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.


▪️ कॉफी - ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.


▪️ चहा - भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.


▪️ जवारी-बाजारी - भारत, चीन, रशिया.


▪️ बार्ली - रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.


▪️ रबर - मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.


▪️ ऊस - भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.


▪️ तबाखू - अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त


▪️ कोको - घाना, ब्राझिल, नायजेरिया.

भारतातील प्रमुख जमाती


❇️जमात                 ❇️ राज्य


अबोर                  अरुणाचल प्रदेश

आपातनी             अरुणाचल प्रदेश

आओ                  नागाल्यांड

अंगामी                 नागाल्यांड

कोल                   छत्तीसगढ

कोटा                   तामिळनाडू

मुंडा                    झारखंड 

कोलाम                आंध्र प्रदेश

छुतीया                आसाम

चेंचू                     आंध्र प्रदेश

गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड

बैगा                     छत्तीसगढ,झारखंड

भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ

बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू

भोट                    हिमाचल प्रदेश

लेपचा                  सिक्कीम

वारली                  महाराष्ट्र

चकमा                  त्रिपुरा

गड्डी                     हिमाचल प्रदेश

जयंती                  मेघालय

बोदो                    आसाम

खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड

गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ

लुशिया                 त्रिपुरा

मोपला                  केरळ

भुतिया                  उत्तरांचल

जारवा                   छोटे अंदमान

कुकी                    मणिपूर

कुरुख                  झारखंड, ओरीसा

अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश

डाफला                अरुणाचल प्रदेश

कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र

हो                       छोटा नागपूर

मुरीया                  बस्तर छोटा नागपूर

संथाल                  वीरभूम,झारखंड

गुज्जर                  हिमाचल प्रदेश

खोंड                     ओरिसा

मिकिर                  आसाम

उरली                  केरळ

मीना                    राजस्थान

ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड

तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

भूगोल 10 प्रश्न आणि उत्तरे

1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

1. डोंगरी वारे 

2. दारिय वारे ✅

3. स्थानिक वारे

4. या पैकी नाही 


2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.

2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅

3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.

4. या पैकी नाही 


3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.

2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.

3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.


1. फक्त 1

2. फक्त 2

3. फक्त 3 ✅

4. सर्व बरोबर


4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

1. 1607✅

2. 1707

3. 1807

4. 1907


5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

1. स्लेट

2. बेसाल्ट☑️

3. टाईमस्टोन 

4. कार्टज


6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

1. छोटा नागपूर 

2. अरवली ☑️

3. माळवा 

4. विंध्य


7⃣ खालील विधानाचा विचार करा.

1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.

2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.

3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

1. फक्त 1 व 2 

2. फक्त 2 व 3

3. फक्त 1 व 3 ☑️

4. फक्त 3


8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा☑️

2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 

3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा

4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना


9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

1. कोयना 

2. धोम ☑️

3. चांदोली 

4. राधानगरी


1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

1. अहमदनगर

2. पुणे 

3. सातारा 

4. वरील सर्व☑️


📚खालीलपैकी कोणत्या देशास पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात ?

1. क्युबा

2. थायलंड

3. फिनलँड

4. नॉर्वे

उत्तर:- 2


व्हीक्टोरिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

1. नायगारा

2. इग्वाझु

3. झांबिझी

4. नाईल

उत्तर:- 3


खालीलपैकी वली पर्वत कोणता नाही ?

1. हिमालय

2. आल्प्स

3. रॉकी

4. फ्युजियामा

उत्तर:- 4


कृष्णराजसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहेत ?

1. कृष्णा

2. कावेरी

3. भीमा

4. गोदावरी

उत्तर:- 2


राज्यपाल मंत्रिपरिषदेणे शिफारस केलेली नामनिर्देशित सदस्यांची नावे फेटाळू शकतात का ?



👉घटनात्मक तरतुद :- कलम 171( 3, 5 ) कलमानुसार राज्यपालास विधान परिषदेत साहित्य, विज्ञान, कला सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेषज्ञान असलेल्या व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.

  अर्थातच या नेमणुका नेहमीच वादग्रस्त ठरतात व यातून सरकार व राज्यपाल असा नवावाद  उद्भवतो. केंद्र आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारे असतील तर हा वाद अधिक तीव्रपणे दिसून येतो.सध्या अशीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे.


 ♦️ इतर घटनात्मक मुद्दे व पेचप्रसंग.

📌कलम 167 नुसार मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या प्रशासकीय व कायदेशीर बाबी संबंधी माहिती मागविणे हा राज्यपालांचा घटनात्मक

स्वेचछाधिन अधिकार आहे. याच कलमांतर्गत नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागण्याचा अधिकार राज्यपालांना मिळतो.परंतु नामनिर्देशित सदस्यांच्या नावांना मंजुरी देणे हा राज्यपालांचा  स्वेचछाधिन अधिकार आहे का/नाही याबाबत स्पष्टपणे तरतुद आढळत नाही.

 👉 आरंभी उच्च न्यायालयांचे सुद्धा याबाबत एकमत नव्हते.


📌163(1) कलमानुसार घटनात्मक 

स्वेचछाधिन अधिकार वगळता राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्री परिषदेची तरतूद आढळते. परंतु हा सल्ला राष्ट्रपती प्रमाणे राज्यपालांवरती बंधनकारक नाही. याआधारे राज्यपाल नावांची यादी फेटाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.(रामनाईक यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकारने दिलेली यादी नामंजूर केली होती) 


 ♦️राज्यपाल काय आक्षेप घेतील ?


📌शिफारस केलेल्या यादीतील काही ठराविक नावे वगळली तर इतर नावांना राजकीय पार्श्वभूमी आहे.


📌अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय:-

 एखाद्या व्यक्तीने राजकारणात तसेच प्रशासनात दीर्घकाळ भाग घेतला असेल तर तिला समाजसेवेचा व्यावहारिक अनुभव आहे असे गृहीत धरता येईल.

(याच व इतर निर्णयांच्या आधारे राज्यपालांचा आक्षेप न्यायालयीन लढाईमध्ये खोडून काढला जाईल )


📌 1974 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्यपालाचे स्वेचछाधिन अधिकार वगळता त्याला आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल. (या आधारे राज्यपालांना शिफारस केलेल्या नामनिर्देशीत सदस्यांची यादी नामंजूर करता येणार नाही).


♦️तात्पर्य :- वरील सर्व चर्चेवरून असे दिसते की घटनात्मकदृष्ट्या सरकारने दिलेली नामनिर्देशित सदस्यांची यादी मंजूर करणे राज्यपालांवर बंधनकारक आहे की नाही हा मुद्धा विवादास्पद आहे परंतु नावांची शिफारस घटनात्मक तरतुदींना अनुसरून नसेल तर राज्यपाल अशी यादी नामंजूर करू शकतात हे मात्र फिक्स.


सीमा रेखाएं - प्रमुख अंतर्राष्ट्रीय सीमाएँ


√√ रेखा का नाम – डूरंड रेखा (Durand Line)

● किसके बीच – पाकिस्तान तथा अफगानिस्तान

● 1886 में सर मार्टिमर डूरंड द्वारा निर्धारित।

-----------------------

√√ रेखा का नाम – मैकमोहन रेखा (Macmahon Line)

● किसके बीच – भारत तथा चीन

● 1120 किमी. लंबी यह रेखा सर हेनरी मैकमोहन द्वारा निर्धारित की गई थी। लेकिन चीन इसे स्वीकार नहीं करता।

-----------------------

√√ रेखा का नाम – रेडक्लिफ रेखा (Radcliffe Line)

● किसके बीच – भारत तथा पाकिस्तान

● 1947 में भारत-पाकिस्तान सीमा आयोग के अध्यक्ष सर सायरिल रेडक्लिफ द्वारा निर्धारित।

------------------------

√√ रेखा का नाम – 17 वीं समानांतर रेखा (17th Parallel)

● किसके बीच – उत्तरी वियतनाम तथा द. वियतनाम

● वियतनाम के एकीकरण के पहले यह देश को दो भागों में बांटती थी।

-----------------------

√√ रेखा का नाम – 24 वीं समानांतर रेखा (24th Parallel)

● किसके बीच – भारत तथा पाकिस्तान

● पाकिस्तान के अनुसार कच्छ क्षेत्र का यह रेखा सही निर्धारण करती है लेकिन भारत इस रेखा को स्वीकार नहीं करता है।

-----------------------

√√ रेखा का नाम – 38 वीं समानांतर रेखा (38th Parallel)

● किसके बीच – उत्तर कोरिया तथा दक्षिण कोरिया

● कोरिया को दो भागों में बांटती है।

------------------------

√√ रेखा का नाम – 49 वीं समानांतर रेखा (49th Parallel)

● किसके बीच – अमेरिका तथा कनाडा

● अमेरिका तथा कनाडा को दो भागों में बांटती है।

-----------------------

√√ रेखा का नाम – हिंडनबर्ग रेखा (Hindenburg Line)

● किसके बीच – जर्मनी तथा पोलैंड

● प्रथम विश्व युद्ध में जर्मनी की सेना यहीं से वापस लौटी थी।

------------------------

√√ रेखा का नाम – ओडरनास रेखा (Order-Neisse Line)

● किसके बीच – जर्मनी तथा पोलैंड

● द्वितीय विश्व युद्ध के बाद निर्धारित की गई।

-----------------------

√√ रेखा का नाम – मैगिनाट रेखा (Maginot Line)

● किसके बीच – जर्मनी तथा फ्रांस

● जर्मनी के आक्रमण से बचाव के लिए फ्रांस ने यह रेखा बनाई थी।

------------------------

√√ रेखा का नाम – सीजफ्राइड रेखा (Seigfrid Line)

● किसके बीच – जर्मनी तथा फ्रांस

● जर्मनी ने यह रेखा बनाई थी।

कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर



💮तीन आठवड्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत मंजूरी मिळाल्यानंतर कर्नाटकच्या कॅबिनेटने सोमवारी ‘गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक 2020’  मंजूर केले.


💮तर आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी त्यावर मोहोर उठवल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

तसेच या नव्या विधेयकानुसार, गायींची अवैध विक्री, अवैध वाहतूक दंडनीय अपराध असणार आहे.


💮जर गायीला एखादा संसर्गजन्य आजार जडला ज्यामुळे इतर गुरांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, अशाच वेळी त्या गायीची कत्तल केली जाऊ शकते, असं कर्नाटकचे कायदा मंत्री जे. सी. मधूस्वामी  यांनी म्हटलं आहे.


💮तर या विधेयकातील सेक्शन 1 (2) नुसार, गुरं म्हणजे गाय, गायीचं वासरु आणि बैल तसेच 13 वर्षांखालील म्हैस किंवा रेडा यांचा समावेश आहे.

या विधेयकानुसार, जर गोहत्या घडून आल्यास गुन्हा दाखल होऊन तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.


💮तसेच या शिक्षेसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 50,000 ते 5 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.

भारताला सर्वात आधी मिळणार ‘कोविडशिल्ड’चे पाच कोटी डोस - अदर पुनावाला


🧨सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारी एक दिलासादायक बातमी दिली. करोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी डोस सर्वात आधी भारतात दिले जातील.


🧨पनावाला म्हणाले, “आमच्याजवळ कोविशिल्डचे चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करु.”


🧨२०२१ च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.

ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना राज्य सरकारचे अर्थसाहाय्य


⛺️टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंना सोमवारी राज्य सरकारद्वारे प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. राज्यातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.


⛺️या खेळाडूंमध्ये नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे तसेच पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. वर्षां येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘खेळाडू हे राज्याचे वैभव आहेत. टोक्यो ऑलिम्पिकसाठी राज्यातील पाच खेळाडू पात्र ठरले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवावी लागतात, त्यासाठी कठोर परिश्रमासह एकाग्रता महत्त्वाची असते. राज्यातील हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून राज्यासह देशाची मान उंचावतील, अशी आशा आहे.’’


⛺️नमबाज राही सरनोबत हिने सांगितले की, ‘‘आम्ही सर्व खेळाडू पदक जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत. सरकारच्या पाठिंब्यामुळे आम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यशस्वी होऊन राज्याचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करू.’’

करोना आर्थिक मदत योजनेवर ट्रम्प यांची स्वाक्षरी


🧩अमेरिकी लोकांना करोना काळात येत असलेल्या अनेक अडचणी पाहून ९०० अब्ज डॉलर्सच्या मदतीचा समावेश असलेले २.३ लाख कोटी डॉलर्सचे खर्च विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यावर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर स्वाक्षरी केली, अन्यथा अमेरिकेवर आर्थिक टाळेबंदीची नामुष्की येण्याचा धोका होता. कारण अनेक सेवांवरचा खर्च सरकारने मंजूर करणे गरजेचे असते अन्यथा त्या ठप्प होऊ शकतात.


🧩टरम्प यांनी सुरुवातीला या विधेयकास मंजुरी देण्यास नकार दिला होता. यातील तरतुदी अपुऱ्या असून हे विधेयक ‘अपमानास्पद’ आहे असे सांगून ते मंजूर करण्यास ट्रम्प यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली होती. ट्रम्प हे २० जानेवारीला व्हाइट हाऊस सोडणार असून त्यांनी अखेर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर हे विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव होता.


🧩टरम्प यांनी निवेदनात म्हटले आहे, की बेरोजगार लोकांना आर्थिक लाभ मिळावेत तसेच भाडय़ासाठी मदत मिळावी यासाठी आपण हे विधेयक मंजूर करीत आहोत. आमचे हवाई सेवेतील कर्मचारी परत कामावर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लस वितरणासाठी निधी लागणार आहे.

साताऱ्यातील शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार.


‼️टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील  शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


‼️जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे.


‼️बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना टाळेबंदीतही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात. आई-वडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी दूरसंवादाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला. मोठय़ा मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला.


‼️जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली. या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह अ‍ॅवॉर्डस पुरस्कारा जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा



☄️विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र



 महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.


विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना नूतन वर्ष 2021 साठी शुभेच्छा दिल्या असून पत्रात म्हटले आहे की, आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.


आपणास विदित आहेच की, महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1, वर्ग-2 आणि वर्ग-3 विभागातील सेवाभरतीच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.


कोविड-19 महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्ष 2021 पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी, त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी. अशी सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी मांडल्या आहेत

दक्षिण कोरियानं विकसित केलेल्या ‘कृत्रिम सूर्या’चा जागतिक विक्रम; जाणून घ्या याचं महत्व

✍🏻_ दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा 'कृत्रिम सूर्य' म्हणजे एक उपकरण आहे, ज्याला KSTAR (Korea Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात.


✍🏻_ सूर्य हा अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र, या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक विविध प्रयोग करत आहेत. त्यानुसार, आण्विक आणि न्यूक्लियर ऊर्जेला एक चांगला स्त्रोत मानून सूर्याप्रमाणे पृथ्वीवर न्यूक्लियर फ्युजनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरु केला आहे. या प्रयत्नातूनच दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवला असून या सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा २० सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे. कारण या कृत्रिम सूर्याचं तापमान १०० मिलियन (१० कोटी) डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. याची खऱ्या सूर्याशी तुलना केल्यास सूर्याच्या गाभ्याचे तापमान हे केवळ १५ मिलियन (१.५ कोटी) डिग्री सेल्सिअस आहे.



पहिल्यांदाच झाला असा विक्रम


दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा कृत्रिम सूर्य म्हणजे एक उपकरण आहे, ज्याला KSTAR (Korea Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात. या उपकरणाने १० कोटी डिग्री सेल्सिअस तापमान २० सेकंदांपर्यंत कायम ठेवलं. जे यापूर्वी १० सेकंदांपर्यंतही कायम ठेवलं जाऊ शकत नव्हतं.


दक्षिण कोरिया आणि अमेरिकाचा संयुक्त प्रयत्न


गेल्या महिन्यांत कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जी येथील KSTAR रिसर्च सेंटरने घोषणा केली होती की, सियॉल नॅशनल युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त संशोधनातून त्यांनी प्लाझ्माचं तापमान १० कोटी डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक राखण्यात यश मिळवले आहे.


असं वाढलं वेळेतील अंतर


यापूर्वी सन २०१९ मध्ये KSTAR प्लाझ्मा मोहिमेत प्लाझ्माच्या तापमान वाढीचा वेळ केवळ ८ सेकंद होता. जो त्यावेळचा नवा जागतिक विक्रम होता. तर सन २०१८ मध्ये झालेल्या प्रयोगात पहिल्यांदा प्लाझ्मा आयनचं तापमान १० कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. मात्र, ते केवळ १.५ सेंकंदांसाठीच कायम राहिलं होतं.


प्लाझ्माचं महत्व काय?


पृथ्वीवर सूर्याप्रमाणे न्यूक्लिअर फ्जुजन निर्माण करण्यासाठी प्लाझ्माची अवस्था तयार करणे अत्यंत गरजेचे असते. जे KSTAR सारख्या न्यूक्लिअर फ्युजनच्या उपकरणात हायड्रोजन आयसोटोपद्वारे निर्माण केलं जाऊ शकतं. या अवस्थेत आयन आणि इलेक्ट्रॉन विभक्त होतात आणि आयन अधिक तापमानावर गरम करुन त्याच तापमान कायम ठेवावं लागतं. आजवर दुसऱ्या प्लाझ्मा उपकरणांनी खूपच कमी कालावधीसाठी प्लाझ्माचं उच्च तापमान कायम ठेवलं होतं. पण कोणीही १० सेकंदापेक्षा जास्त वेळ गाठला नव्हता.


जगाला दिली जाणार माहिती


न्यूक्लियर फ्युजनच्या या उपकरणातून मिळवलेली ऊर्जा व्यावसायिक कारणांसाठी खूपच महत्वाची उपलब्धता आहे. KSTAR आपल्या प्रयोगातील प्रमुख निकाल हे जगभरातील संशोधकांसोबत शेअर करणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा असोसिएशनच्या फ्यूजन एनर्जी कॉन्फरन्समध्ये वैज्ञानिक आपल्या यशाची माहिती देणार आहेत.

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) अंतर्गत 22 प्रकल्प पूर्ण.


🌺राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) मार्फत यावर्षी 22 प्रकल्प पूर्ण झाले. त्याव्यतिरिक्त सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण कमी करणे, वनीकरण आणि जैवविविधता यांच्याशी संबंधित 17 नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.


💠राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) विषयी....


🌺राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या “गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016” अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.


🌺पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये ‘नमामि गंगे’ अभियानाची सुरुवात केली. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) यांच्यावतीने चालवले जात आहे. अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केले जाणार आहे. यात नदीचा विकास, सांडपाण्याचा निचरा तसेच घाट आणि श्मशान जागांचे निर्माण अशी कार्ये चालवली जात आहेत.


💠गगा नदी....


🌺गगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते.

सांगोला ते शालीमार दरम्यान धावली 100 वी किसान रेलगाडी


🔶28 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातले सांगोला (जिल्हा सोलापूर) ते पश्चिम बंगालमधले शालीमार या दोन स्थानकांच्या दरम्यान 100 व्या किसान रेलगाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने झेंडा दाखवून मार्गस्थ केले.


🔶पाठविण्यात येणाऱ्या अनेक प्रकाराच्या मालाच्या एकत्रित रेलगाडी वाहतूक सेवेमध्ये फुलगोबी, ढोबळी मिरची, कोबी, शेवग्याच्या शेंगा, मिरची, कांदा अशा भाज्या तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, सीताफळ इत्यादी फळे असणार आहेत. मार्गातल्या सर्व थांब्यांवर मालवाहतुकीच्या या रेलगाडीच्या आकाराला कोणतेही बंधन न ठेवता नाशिवंत माल रेलगाडीमध्ये भरणे आणि उतरवण्याला परवानगी देण्यात आली आहे.


🛑 ठळक बाबी


🔶कद्र सरकारने फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के सवलत दिली आहे.पीएम कृषी संपदा योजनेच्या अंतर्गत मेगा फूड पार्क, शीत साखळी पायाभूत आणि कृषी प्रक्रिया क्लस्टर अंतर्गत अशा 6500 प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज अंतर्गत सूक्ष्म अन्न-प्रक्रिया उद्योगासाठी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


🛑‘किसान रेलगाडी’ विषयी


🔶किसान रेलगाडी म्हणजे देशातल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. गेल्या 4 महिन्यात 100 किसान रेलगाडी धावल्या.


🔶पहिली किसान रेलगाडी 7 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर पर्यंत चालवण्यात आली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत हा प्रवास वाढविण्यात आला. शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही रेलगाडी सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु करण्यात आली.


🔶देशभरात कृषी उत्पादनांची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी किसान रेलगाडीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. ही सेवा नाशिवंत उत्पादनांची अखंड पुरवठा साखळी प्रदान करते.


🔶किसान रेलगाडीतून वाहतूक करण्यासाठी किमान प्रमाण निश्चित करण्यात आलेले नाही त्यामुळे छोटे उत्पादनही कमी किमतीत मोठ्या बाजारात पोहोचू शकतात. शेतकरी आपला कृषी माल आता दुसऱ्या राज्यातही विकू शकतो.


🔶किसान रेलगाडी म्हणजे फळे, भाजीपाला, दुध, मासे यासारखा नाशिवंत माल पूर्ण सुरक्षितपणे वाहून नेणारे फिरते शीतगृह आहे. रेल्वे स्थानक परिसरात नाशवंत रेलगाडी कार्गो केंद्र उभारण्यात येत आहेत, ज्यामध्ये शेतकरी आपल्या कृषी मालाची साठवण करू शकतात.

दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले.


🔰मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.


✅ठळक बाबी....


🔰‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सेवेचा दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस मार्गापर्यंत विस्तार करण्यात आला. गेल्या वर्षी अहमदाबाद शहरात या सेवेची सुरवात करण्यात आली होती.‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रवाश्यांना देशात कुठेही आणि कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एकीकृत संधी प्रदान करते.


🔰देशातल्या कोणत्याही भागातून प्राप्त झालेले रुपे-डेबिट कार्ड असलेल्या व्‍यक्तिला ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येणार अआहे. ही सुविधा 2022 सालापर्यंत संपूर्ण दिल्ली मेट्रो जाळ्यासाठी उपलब्ध होणार आहे.

Online Test Series

Online Test Series 02/01/2021

Online Test Series

Monday 28 December 2020

28 December 2020 Current Affairs



🥀1. IMF में शामिल होने वाला 190वां सदस्य देश कौन बना है ?

✅Ans. अंडोरा


🥀2. किसने शहरी शिक्षा नीति में सुधार के लिए पैनल का गठन किया है ?

✅Ans. नीति आयोग


🥀3. किस राज्य सरकार ने स्वास्थ्य सुरक्षा अभियान चलाने की घोषणा की है ?

✅Ans. छत्तीसगढ़


🥀4. टोयोटा किर्लोस्कर मोटर ने किस बैंक के साथ समझौता किया है ?

✅Ans. बैंक ऑफ़ बडौदा


🥀5. किस राज्य सरकार ने नई औद्योगिक नीति 2020-2025 की घोषणा की है ?

✅Ans. कर्नाटक


🥀6. भारत के किस रेलवे जॉन ने बैग ऑन व्हील्स सेवा शुरू की है ?

✅Ans. उत्तर रेलवे


🥀.7. NATO ने किस देश में अंतरिक्ष केंद्र स्थापित करने पर सहमति व्यक्त की है ?

✅Ans. जर्मनी


🥀8. भारत को कितने साल बाद ILO गरवर्निंग बॉडी की चेयरमैनशिप मिली है?

✅Ans . 35 साल 


🥀9. किस बैंक ने 129 करोड़ रुपये का शुद्ध लाभ दर्ज किया है ?

✅Ans. यस बैंक


🥀.10. किस देश ने चीन से Covid-19 टीके की खरीद को खारिज कर दिया है ?

✅Ans. ब्राज़ील

पोलीस भरती अपडेट



💁‍♂️ राज्यात पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पोलीस पदांची भरती होणार

-  राज्याच्या गृह मंत्र्यांची महत्वाची घोषणा


🧐  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल २७ डिसेंबरला सांगितले की ,राज्य सरकार पोलिस हवालदारांच्या १२,००० पदांसाठी भरती करणार आहे 


💁‍♂️ पहा काय म्हणाले गृहमंत्री - गृहमंत्री म्हणाले १२ हजार पैकी 5 हजार 295 पदांची भरती पहिल्या टप्यात होणार आहे , तर त्यासंबंधीचे आदेश आता लवकरच दिले जातील - नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली , तसे या भरती विषयी आणखी काही अपडेट आले , तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू 


📌 दरम्यान राज्यात पहिल्या टप्प्यात-  5 हजार 295 पदांची भरती लवकरच होणार आहे , हि माहिती स्पर्धा परीक्षकांची खूप महत्वाची आहे , आपण थोडा वेळ काढून इतरांना अवश्य शेअर करा 


🙏  - पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रीनींना तसेच आपल्या नातेवाईकांनाही  शेअर करा(सहकार्य करा.)

भारतीय शहरों के पूर्व नाम


1. हिन्दुस्तान, इंडिया या भारत का असली नाम - आर्यावर्त्त !


2. कानपुर का असली नाम - कान्हापुर !


3. दिल्ली का असली नाम - इन्द्रप्रस्थ !


4. हैदराबाद का असली नाम - भाग्यनगर !


5. इलाहाबाद का असली नाम - प्रयाग !


६6. औरंगाबाद का असली नाम - संभाजी नगर !


7. भोपाल का असली नाम - भोजपाल !


8. लखनऊ का असली नाम - लक्ष्मणपुरी !


9. अहमदाबाद का असली नाम -  कर्णावती !


10. फैजाबाद का असली नाम - अवध !


11. अलीगढ़ का असली नाम - हरिगढ़ !


12. मिराज का असली नाम - शिव प्रदेश !


13. मुजफ्फरनगर का असली नाम - लक्ष्मी नगर !


14. शामली का असली नाम - श्यामली !


15. रोहतक का असली नाम - रोहितासपुर !


16. पोरबंदर का असली नाम - सुदामापुरी !


17. पटना का असली नाम - पाटलीपुत्र !


18. नांदेड का असली नाम - नंदीग्राम !


19. आजमगढ का असली नाम - आर्यगढ़ !


20. अजमेर का असली नाम - अजयमेरु !


21. उज्जैन का असली नाम - अवंतिका !


22. जमशेदपुर का असली नाम काली माटी !


23. विशाखापट्टनम का असली नाम - विजात्रापश्म !


24. गुवाहटी का असली नाम - गौहाटी !


25. सुल्तानगँज का असली नाम - चम्पानगरी !


26. बुरहानपुर का असली नाम -  ब्रह्मपुर !


27. इंदौर का असली नाम - इंदुर !


28. नशरुलागंज का असली नाम - भीरुंदा !


29. सोनीपत का असली नाम - स्वर्णप्रस्थ !


30. पानीपत का असली नाम - पर्णप्रस्थ !


31.बागपत का असली नाम - बागप्रस्थ !


32. उसामानाबाद का असली नाम - धाराशिव (महाराष्ट्र में) !


33. देवरिया का असली नाम - देवपुरी ! (उत्तर प्रदेश में)


34. सुल्तानपुर का असली नाम - कुशभवनपुर


35. लखीमपुर का असली नाम - लक्ष्मीपुर ! (उत्तर प्रदेश में)

आयसीसीने " दशकातील सर्वोत्तम टेस्ट संघ " घोषित केला आहे



🇮🇳 दशकातील सर्वोत्तम टेस्ट संघात २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे


🇮🇳 विराट कोहली : कर्णधार 

👤 अलिस्टर कुक : इंग्लंड 

👤 डव्हिड वॉर्नर : ऑस्ट्रेलिया 

👤 कन विलियमसन : न्युझीलंड 

👤 सटीव्ह स्मिथ : ऑस्ट्रेलिया 

👤 कमार संगकारा : श्रीलंका 

👤 बन स्टोक्स : इंग्लंड

🇮🇳 आर अश्विन : भारत 

👤 डल स्टेन : दक्षिण आफ्रिका 

👤 सटुअर्ट ब्रोड : इंग्लंड 

👤 जम्स अँडरसन : इंग्लंड .

जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई .


🦋यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न  दिसतो.


🦋पण आता उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने  अशा प्रकारे नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई सुरु केली आहे.


🦋तर पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे.


🦋तसेच उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.

देशातील गुणवत्ताधारक परराष्ट्रांच्या सेवेत.


🧩नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गेल्या २० वर्षांतील उच्च गुणवत्ताधारक (टॉपर्स) सध्या कुठे आहेत, असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर, ‘‘त्यापैकी निम्म्याहून अधिक परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर आहेत,’’ असे मिळते.


🧩कोणी न्यू यॉर्कमध्ये कर्करोगतज्ज्ञ आहे, कोणी जगप्रख्यात मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) पीएचडी फेलो आहे, कोणी हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहे, तर कोणी सिंगापूरमध्ये निधी व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ११ गुणवत्ताधारक ‘गुगल’मध्ये कार्यरत आहेत.


🧩‘सीबीएसई’ आणि ‘सीआयएससीई’ या केंद्रीय शिक्षण मंडळांनी १९९६ ते २०१५ या काळात घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांत देशात प्रथम आलेल्या ८६ विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केले. त्यातील हे निष्कर्ष आहेत.


🧩निम्म्याहून अधिक उच्च गुणवत्ताधारक सध्या परदेशात वास्तव्य करीत आहेत आणि अमेरिका हे त्यांनी निवडलेले ठिकाण आहे. त्यापैकी बहुतेकजण आयआयटीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान पदवीधारक आहेत. त्यांच्यापैकी निम्मे गुणवत्ताधारक हे महानगरांबाहेर वाढलेले आहेत. त्यापैकी एक अल्पसंख्यांक समाजातील आहे, परंतु त्यांत दलित आणि आदिवासींमधील एकाचाही समावेश नाही. विशेष म्हणजे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींना परदेशात जाण्याची संधी कमी मिळते.

Online Test Series

Sunday 27 December 2020

महाराष्ट्र पोस्टल सर्कल पोस्टमन व MTS परीक्षा तिथी जाहीर व हॉल तिकीट लिंक ॲक्टिव.





२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी; अव्वलस्थानी असेल ‘हा’ देश.

🔰भारतीय अर्थव्यवस्था ही सन २०२५ पर्यंत जगातील पाचवी तर सन २०३० मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे. या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.


🔰सीईबीआरच्या अहवालात म्हटलं की, करोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकलं होतं. पण भारत २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.


🔰भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९ टक्के आणि २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन २०३५ मध्ये जीडीपीची वाढ ५.८ टक्के राहिल. यादरम्यान भारत सन २०३० मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर.

🔰 राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.


🔰 ‘एनसीआरबी’ने मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे.


🔰 राजधानी दिल्लीत महिला अत्याचाराचे 12 हजार 92 गुन्हे नोंदले गेले तर मुंबईत 6 हजार 519 गुन्ह्यांची नोंद झाली. नागपूरमध्ये अशा गुन्ह्यांची 1 हजार 144 प्रकरणे नोंदली गेली.


🔰 नागपूरमधील गुन्हेगारीचा दर मुंबईपेक्षाही अधिक असल्याचं दिसून आले आहे.


🔰 एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण 13.7 % इतके असल्याचं अहवालात म्हटले आहे.

राउरकेला (ओडिशा) येथे भारतातले सर्वात मोठे हॉकी मैदान उभारले जाणार.


🔶ओडिशामध्ये राउरकेला शहरात एक जागतिक दर्जाचे हॉकी मैदान उभारले जाणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याविषयी घोषणा केली.


⭕️ ठळक बाबी...


🔶 भारतातले सर्वात मोठे हॉकी मैदान असणार. मैदानाची 20000 आसन क्षमता असणार.त्याठिकाणी पुरुषांचे ‘2023 FIH हॉकी विश्वचषक’ खेळवले जाणार आहेत.

मैदान 15 एकर एवढ्या भूमीवर तयार केले जाणार.


⭕️ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) विषयी


🔶आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. त्याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे. 


🔶FIH चे पाच खंडात एकूण 128 सदस्य संघ आहेत. FIH याच्यावतीने दर चार वर्षांनंतर पुरुष हॉकी विश्वचषक (1971 सालापासून) आणि महिला हॉकी विश्वचषक (1974 सालापासून) या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )

रोगांचे वर्गीकरण


संसर्गजन्य


इन्फ्लुएंजा,

क्षय, 

नायटा, 

अमांश,

 घटसर्प,

पोलियो.


असंसर्गजन्य

   

मधुमेह (डायबिटीस),

कर्करोग.


विषाणूंपासून होणारे


देवी, 

इन्फ्ल्युएंझा, 

पोलिओ, 

कांजिण्या,

काला आजार, 

जैपनीज एन्सेफेलाइटिस


जिवाणूंपासून होणारे 


कुष्ठरोग, 

कॉलरा (पटकी),

न्यूमोनिया, 

क्षय (टी. बी.)


दुषित पाण्यापासून 


कॉलरा, 

विषमज्वर, 

अतिसार, 

कावीळ,

जंत इत्यादी.


हवेतून पसरणारे


सर्दी, 

इन्फ्ल्यूएंझा, 

घटसर्प, 

क्षय.


कीटकांमार्फत पसणारे


अतिसार

अमांश, 

पटकी

मलेरिया,

हत्तीरोग,

 नारू,

प्लेग


कवकांपासून होणारे


गजकर्ण, 

चिखल्या.

क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार



· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.


· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.


· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.


· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.


· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.


📌क्षयरोगाचे प्रकार :


1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)


📌क्षयरोगाची लक्षणे :


1. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,


2. हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप


3. वजन कमी होणे


4. थुंकीतून रक्त पडणे


5. भूक मंदावणे इ.


क्षयरोगाचे निदान :


लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.


1. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.


2. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.


📌प्रतिबंधक लस -


0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.


राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर


होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)


सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.


📌क्षयरोग औषधोपचार :


सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.


1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.


2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)

भारतातील जागतिक वारसा स्थळे


भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने


★ भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.


◆ ताज महाल


◆ खजुराहो मंदिर


◆ आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश


◆ फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदे


◆ जुना गोवा


◆ सांची स्तूप, मध्य प्रदेश


◆ खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश


◆ भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश


◆ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


◆ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र


◆ एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


◆ अजिंठा लेणी, महाराष्ट्र


◆ वेरूळ लेणी, महाराष्ट्र


◆ चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू


◆ महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु


◆ हंपीमधील मंदिरे, कर्नाटक


◆ पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


◆ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम


◆ मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम


◆ केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान


◆ कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा


◆ महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


◆ भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


◆ नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल


◆ कुतुब मिनार, दिल्ली


◆ लाल किल्ला, दिल्ली


◆ हुमायूनची कबर, दिल्ली


◆ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल


◆ नालंदा विद्यापीठ(महाविहार), बिहार


◆ खांगचेंडझोंगा राष्ट्रीय अभयारण्य, सिक्किम


◆ कैपिटल इमारत संकुल, चंडीगड़


भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-



१) रामसर करार - 

वर्ष - १९७१


* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२


२) CITES - 

वर्ष - १९७३


* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०


३) बोन करार - 

वर्ष -१९७९


* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३


४) व्हिएन्ना करार -

 वर्ष - १९८५


* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१


५) बँसेल करार - 

वर्ष - १९८९


* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९


२६) UNFCCC - 

       वर्ष - १९९२


* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३


७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७


* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२


८) CBD जैवविविधता करार - 

वर्ष -१९९२


* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४


९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -वर्ष - २०००


* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३


१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -

वर्ष - १९९४


* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६


११) रोटरडँम करार - 

वर्ष - १९९८


* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५


१२) स्टॉकहोम करार -

 वर्ष - २००१


*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .


ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६

मराठी व्याकरण

  नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दासविशेषण असे म्हणतात.


उदा.


चांगली मुले


काळा कुत्रा


पाच टोप्या


विशेषण – चांगली, काळा, पाच


विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या


(नक्की वाचा):


वाक्य व त्याचे प्रकार


 


विशेषणाचे प्रकार :


गुणवाचक विशेषण


संख्यावाचक विशेषण


सार्वनामिक विशेषण


1. गुणवाचक विशेषण :


नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात.


उदा.


हिरवे रान


शुभ्र ससा


निळे आकाश


2. संख्या विशेषण :


ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.


संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.


गणना वाचक संख्या विशेषण


क्रम वाचक संख्या विशेषण


आवृत्ती वाचक संख्या विशेषण


पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण


अनिश्चित संख्या विशेषण


1. गणना वाचक संख्या विशेषण :


ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणालागणनावाचक विशेषण असे म्हणतात


उदा.


दहा मुले


तेरा भाषा


एक तास


पन्नास रुपये


गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात


1. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.


2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.


3. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.


2. क्रमवाचक संख्या विशेषण :


वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.


उदा.


पहिल दुकान


सातवा बंगला


पाचवे वर्ष


3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :


वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यासआवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात.


उदा.


तिप्पट मुले


दुप्पट रस्ता


दुहेरी रंग


4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :


जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषणअसे म्हणतात.


उदा.


मुलींनी पाच-पाच चा गट करा


प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा


5. अनिश्चित संख्या विशेषण :


✍️ ज्या विशेषणाव्दारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.


उदा.


काही मुले


थोडी जागा


भरपूर पाणी


3. सार्वनामिक विशेषण :


✍️ सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांनासार्वनामिक विशेषण असे म्हणतात.


उदा.


हे झाड


ती मुलगी


तो पक्षी


✍️ मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.


मी – माझा, माझी,


तू – तुझा, तो-त्याचा


आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा


हा – असा, असला, इतका, एवढा, अमका


तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका


जो – जसा, जसला, जितका, जेवढा


कोण – कोणता, केवढा


पृथ्वीची अक्षीय गती


◆ पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा अक्ष व ज्या अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात.


 ◆ भ्रमणाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला दिवस म्हणतात.


◆ अक्षीय गती ही पृथ्वीची दैनिक गती असून तिच्यामुळेच दिवस व रात्र होत असतात. 


◆अक्षीय गतीमुळे विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी सु. १,६०० किमी. गतीने फिरत असतो आणि जसजसे ध्रुवावरील बिंदूची गती शून्य असते.


◆ अक्षीय गतीमुळे उत्तर गोलार्धामधील गतिशील वस्तू उजवीकडे विचलित होते; अशा प्रकारे चक्रवात हा अक्षीय गतीचा पुरावा आहे. मात्र फूको लंबक (जे. बी. एल्. फूको या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी शोधून काढलेला लंबक) हा अक्षीय गतीचा पहिला दृश्य पुरावा आहे.


◆  पृथ्वीच्या अक्षीय गतीत पुढील तीन प्रकारचे बदल होत असतात व त्यांच्यामुळे दिवसाचा (दिवस व रात्र यांचा मिळून) कालावधीही बदलत असतो.

सर्वांधिक बिबटे असणारी राज्ये



🐆 मध्यप्रदेश (३४२१)

🐆 कर्नाटक (१७८३)

🐆 महाराष्ट्र (१६९०) 

🐆 तमिळनाडू (८६८)

🐆 छत्तीसगड (८५२)

🐆 उत्तराखंड (८३९)

🐆 ओडिशा (७६०)

🐆 करळ (६५०)

🐆 आध्रप्रदेश (४९२)

🐆 राजस्थान (४७६)

🐆 तलंगणा (३३४)

🐆 उत्तरप्रदेश (३१६)

🐆 बिहार (९८)

🐆 गोवा (८६) 

🐆 पश्चिम बंगाल (८३)

🐆 आसाम (४७)

🐆 झारखंड (४६)

🐆 अरुणाचल प्रदेश (११)

केरळमध्ये देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ उभारले जाणार



यूएन विमेन या संघटनेच्या मदतीने देशातले पहिले ‘जेंडर डेटा हब’ याची स्थापना करण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे.

‘जेंडर डेटा हब’ म्हणजे यूएन विमेन या संघटनेच्यावतीने महिला सशक्तीकरणासाठी चालविले जाणारे उपक्रम राबविण्यासाठी उपलब्ध असलेले स्थायी ठिकाण होय.


‘जेंडर डेटा हब’चे कार्यक्षेत्र दक्षिण आशिया पुरता निश्चित केले गेले आहे. म्हणजेच त्याठिकाणी दक्षिण आशियातल्या महिलांसाठीच्या जेंडर पार्कसाठी क्षमता-निर्मिती आणि प्रकल्प विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची रचना केली जाणार.


केरळमध्ये स्त्री-पुरुष समानता आणि सशक्तीकरणाच्या दिशेने कार्य करण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने 2013 साली जेंडर पार्कची स्थापना करण्यात आली.


ते संशोधन, धोरण विश्लेषण, क्षमता विकास, पुरस्कार, सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबविण्याचे एक व्यासपीठ आहे.

ते स्त्री-पुरुष समानतेसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करण्यास संबंधित हस्तक्षेप तयार करण्यासाठी कार्य करते.


‘युनायटेड नेशन्स एंटिटी फॉर जेंडर इक्वलिटी अँड द एम्पोवेरमेंट ऑफ विमेन’ किंवा ‘यूएन विमेन’ ही जागतिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एकी संघटना आहे. त्याची स्थापना 2 जुलै 2010 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.

केरळमध्ये २१ वर्षीय युवतीचा महापौरपदाचा मार्ग मोकळा




तिरुअनंतपुरम : केरळमध्ये तिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय युवतीची निवड झाल्यात जमा आहे, कारण नगरसेवकांच्या बैठकीत तिचे नाव मंजूर करण्यात आले असून आता केवळ माकपच्या राज्य शाखेचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.


आर्या यांनी सहा दिवसांपूर्वी माकपच्या नगरसेविका म्हणून शपथ घेतली. सर्व काही सुरळीत पार पडले तर त्या महापौर होणार आहेत. अजूनही त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून आता त्या तिरुअनंतपुरमच्या सर्वात तरुण महापौर ठरतील.


पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम महापालिकेत माकपची सत्ता स्थापन झाली असून पक्षाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यात आर्या राजेंद्रन यांचे नाव महापौर पदासाठी सुचवण्यात आले.


महाराष्ट्रात भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते.


आर्या राजेंद्रन यांना अभिनंदनाचे अनेक संदेश आले असून त्या मुदावनमुक्कल या भागात भाडय़ाच्या घरात राहतात. त्यांनी सांगितले, की परिपक्वता व नेतृत्व गुण हे कुणाच्या वयावरून ठरवले जात नसतात. राजकारण पुढे नेणे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे ही आपली दोन उद्दिष्टे राहतील.


आर्या या माकप कार्यकर्ते के. राजेंद्रन यांच्या कन्या असून ते तारतंत्री आहेत. आई श्रीलता या एलआयसी प्रतिनिधी आहेत. आर्या या गणितात बीएस्सी करीत असून ऑल इंडिया सेंट्स महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत आहेत. कचरामुक्त शहरावर त्यांनी भर दिला आहे.

कम्युनिस्ट पक्ष



📌भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा १९३६ पासून काँग्रेसचाच एक भाग होता; 

📌परंतु त्या पक्षाची शिस्त स्वीकारण्याची इच्छा नसल्यामुळे तो १९४५ मध्ये काँग्रेसबाहेर पडला.

📌 राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहिल्यामुळे या पक्षाचा भारतीय जनतेवर विशेष प्रभाव पडला नाही.


▪️ 1964 मध्ये हा पक्ष फुटला.


1)भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)

- रशिया समर्थन

- उजव्या आणि केंद्रीय मतप्रवाह चे समर्थन करणारा गट  

- सध्याचा दर्जा (राष्ट्रीय पक्ष)

- निवडणूक चिन्ह (मक्या चे कणीस व विळा)


2)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM)

- चीन समर्थन

- डाव्या मतप्रवाह चे समर्थन करणारा गट  

- सध्याचा दर्जा (राष्ट्रीय पक्ष)

- निवडणूक चिन्ह (विळा हातोडा व तारा)


👉 आर्या या मार्क्सवादी कम्युनिस्ट कडून  (CPM) नगरसेवक आहेत.


सारख्या नावाची तालुके



❇️तालुका व जिल्हा❇️


🔳आष्टी:-बीड-वर्धा


🔳शिरूर:-बीड-पुणे


🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद


🔳खड:-पुणे-रत्नागिरी


🔳कर्जत:-नगर-रायगड


🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक


🔳कारंजा:-वाशीम-वर्धा


🔳सलू:-वर्धा-परभणी


🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती


भारतातील राज्ये व लोकनृत्य

🔷【आंध्रप्रदेश】----कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।


🔷【असम】----बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।


🔷【बिहार】---जाट– जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, बिदेसिया।


🔷【गुजरात】--गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।


🔷【हरियाणा】--झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।


🔷【हिमाचल प्रदेश】---झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 


🔷【जम्मू और कश्मीर】---रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली। 


🔷【कर्नाटक】---यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 


,🔷【केरल】---कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।   


,🔷【महाराष्ट्र】---लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।   


🔷【ओडीशा】---ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।


🔷【पश्चिम बंगाल】---काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।


🔷【पंजाब】 ---भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।  


🔷【राजस्थान】--घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।   


🔷【तमिलनाडु】---भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।


🔷【उत्तर प्रदेश】---नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता। 


🔷【उत्तराखंड】---गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली। 


🔷【गोवा】---तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।  


🔷【मध्यप्रदेश】---जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  


🔷【छत्तीसगढ़】---गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।


🔷【झारखंड】---अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।  


🔷【अरुणाचल प्रदेश】---बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  


🔷【मणिपुर】--डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।  


🔷【मेघालय】---का शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।  


🔷【मिजोरम】----छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्वान, जंगतालम, पर लाम, सरलामकई/ सोलाकिया, लंगलम।         


🔷【नगालैंड】----रंगमा, बांस नृत्य, जीलैंग, सूईरोलियंस, गीथिंगलिम, तिमांगनेतिन, हेतलईयूली। 


🔷【त्रिपुरा】---होजागिरी 


🔷【सिक्किम】---छू फाट नृत्य, सिकमारी, सिंघई चाम या स्नो लायन डांस, याक छाम, डेनजोंग नेनहा, ताशी यांगकू नृत्य, खूखूरी नाच, चुटके नाच, मारूनी नाच।  


🔷【लक्ष्यद्वीप】  --लावा, कोलकाई, परीचाकली

Saturday 26 December 2020

Online Test Series

17वी बिहार विधानसभा निवडणूक - 2020



👉 या निवडणुकीचे एकूण 3 टप्पे


📌पहिला टप्पा - 28 ऑक्टोबर : 71 जागा


📌दसरा टप्पा 3 नोव्हेंबर : 94 जागा


📌 तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर :- 78 जागा

 

▪️मतदानाचा निकाल : 10 नोव्हेंबर 2020


▪️बिहार विधानसभा जागा : 243


▪️बिहार विधानसभा पक्ष : 13


📌सर्वाधिक जागा राष्ट्रीय जनता दल पक्षांनी जिंकल्या आहेत (75) त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (74) जागावर विजय मिळवला.


📌या निवडणुकीत एकूण 7 लाख 6 हजार 252 मतदारांनी नोटा पर्यायाचा स्वीकार केला. (एकूण मतदारांपैकी 1.7% )


📌या निवडणुकीत एनडीए ला 125 जागा मिळाल्या तर युपीएला 111 जागा तर इतर पक्षांना 67 जागा


♦️नितीशकुमार 17 व्या बिहार विधानसभेचे मुख्यमंत्री


📌नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले ते बिहार राज्याचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 


📌बिहार विधानसभा निवडणूकीत 243 पैकी 125 जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख म्हणून नितीश

कुमार यांची ओळख आहे.


📌मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.


📌शपथ बिहारचे राज्यपाल फागु चौव्हान यांनी दिली. 


♦️उपमुख्यमंत्री पदी शपथ -


1. तारकिशोर प्रसाद (भाजप),


2. रेणू देबी


📌बिहारच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार (80 दिवस) यांना ओळखले जाते.


♦️JDU जनता दल (युनायटेड) 


📌सथापना : 30 ऑक्टोबर, 2003


📌सस्थापक अध्यक्ष : नितिश कुमार


📌जनतादल युनायटेड हे बिहार आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत राज्यपक्ष म्हणून ओळखले जातात.


📌लोकसभेमध्ये सदस्य संख्येच्या दृष्टीने हा 7 व्या क्रमांकाचा पक्ष आहे.


♦️NDA - नॅशनल डेमाक्रॉटिक अलायन्स


📌सथापना : 1998


📌सस्थापक : अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी,बाळासाहेब ठाकरे


📌अध्यक्ष : नरेंद्र मोदी


📌2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये NDA ने एकूण 543 पैकी 350 जागा मिळविल्या.


♦️पक्षनिहाय जिंकलेल्या जागा.


राष्ट्रीय जनता दल  -75


भारतीय जनता पक्ष -74


जनता दल -43


राष्ट्रीय काँग्रेस - 19


कम्युनिस्ट पार्टी - 12


एमआयएम- 05


हिंदुस्थान अवाम मोर्चा -


विकसील इन्सान पार्टी-


♦️भारतीय निवडणूक आयोग


📌कलम 324 (1)अंतर्गत स्थापन (स्वतंत्र घटनात्मक संस्था)


📌कार्यकाळ : 6 वर्षे (वयाची 65)


 📌रचना : 2 + 1


📌 सध्या मुख्य निवडणूक आयुक्त : सुनील अरोरा (नेमणूक-राष्ट्रपती) 


📌पहिले निवडणुक आयुक्त : सूकुमार सेन

चालू घडामोडी

 1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?

(National Council Of Applied Economic Research) 

>>>  -7.3 %


2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?

>>> राजस्थान 


3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?

>>> गुजरात 


4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?

>>> पंजाब 


5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश 


6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?

  4). हरियाणा    

1). दिल्ली

2). मुंबई

3). आसाम


7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?

>>> योगासन 


8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?

>>> सुवर्ण - 3  रजत -2 कांस्य -4


अमित पंघाल - 52 KG

मनिषा मौन - 57 KG 

सिमरनप्रीत कौर - 60 KG 


आयोजन - जर्मनी (कोलोन) 


9).  भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*

>> दिल्ली 


10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?

>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी 


BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?

>>> चेतन शर्मा 


*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*


>>> कवयित्री 


13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?

>>> 25 डिसेंबर 


14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन  म्हणून साजरा करतात. ?

>>> 24 डिसेंबर 


*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*


>>> कुरुक्षेत्र 


16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?

>>> त्रिपुरा 


17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?

>>> ICICI बँक


18). धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?

>>> पश्चिम बंगाल 


19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?

>>> सत्येंद्र गर्ग


20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?

>>> बँक आँफ वडोदा

Friday 25 December 2020

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले


🔰ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. करोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.


🔰राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले.


🔰मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.

FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही


❇️1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे फास्टॅग आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे.


❇️तसेच जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.


❇️जानेवारीपासून फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जुन्या गाड्यांनाही फास्टॅग लावावा लागणार आहे. 2017 पासूनच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य होते.


❇️फास्टॅग खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसनची फोटो कॉपी, वाहनाचे आरसी बुक लागणार आहे. फोटो आयडीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.


❇️एनएचएआयनुसार तुम्ही फास्टॅग कोणत्याही बँकेकडून खरेदी करू शकतात. यासाठी 200 रुपये  घेतले जातात.


❇️फास्टॅगवर कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करता येणार आहे. सरकारने बँक आणि पेमेंट वॉलेटमधून रिचार्ज करण्य़ासाठी अतिरिक्त चार्ज लावण्यासाठी सूट दिलेली आहे.

जव्हारमध्ये १२ व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा


🎗शरपारख ते नाशिक व  शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांना मिळाले आहेत. जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे.


🎗परातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी १९८० च्या सुमारास जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या या जैववैविध्य समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचादेखील समावेश होता. जैववैविध्य आणि पुरातत्त्व असे दोन्ही विषय त्याच्या अभ्यासाचे असल्याने त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.


🎗‘‘हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले आहे. या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृतिबदलाचे पुरावेदेखील पुढे आले आहेत.

Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?



भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 


2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.


भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.

2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते..


◾️ करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.


◾️ 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.


◾️“2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.


 ◾️ चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे.


◾️ या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस



🔶न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.


🔶भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे.


🔶फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.


🔶सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती.


🔶तर या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया  या देशात पार पडले होते.

चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या


🔶कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.


🔶तसेच लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे कोविड-19 लशी ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शीतकरण व्यवस्थेची चाचणी, चाचणीसाठी येणाऱ्या गर्दीचे शारीरिक अंतर ठेवून व्यवस्थापन करणे यांचाही सराव फेऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


🔶तर प्रत्येक राज्याने दोन जिल्ह्य़ांत अशा फेऱ्या आयोजित करावयाच्या आहेत. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग येथे मुख्यत्वे फेऱ्यांचे आयोजन अपेक्षित आहे.

मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती



मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांची संख्या मेघालयात मोठय़ा प्रमाणात असून, या कुळातील नवीन प्रजाती नुकतीच समोर आली आहे.


भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, अरुमुगम उमा, एन.मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के. मुखिम आणि तेजस ठाकरे यांच्या चमूने या प्रजातीवर संशोधन केले आहे. नुकतेच अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट आणि हर्पेटोलॉजिस्टच्या ‘कोपिया’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भात शोधनिबंध प्रकाशित झाला.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेघालयमधील एरिस्टोन रेडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीचे छायाचित्र जयसिन्हा यांना पाठवले. त्यानंतर त्यांनी आपल्या चमूसह मेघालयाचा दौरा करून या प्रजातीचा अभ्यास केला. गुणसूत्रे, आकारशास्त्राच्या अभ्यासाद्वारे जयसिन्हा यांनी त्यावर जानेवारीमध्ये शोधनिबंध लिहिला. त्यानंतर एक वर्षांने कोपियाने त्यावर शिक्कामोर्तब केले.


एरिस्टोन यांनी ही प्रजाती सर्वप्रथम आमच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘चन्ना एरिस्टोनी’ असे करण्यात आल्याचे जयसिन्हा यांनी सांगितले. डोंगराळ भागातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहांमध्ये हा मासा हमखास सापडतो. 


तसेच पाण्यात दगडांच्या सांद्रीमधून त्याचा अधिवास असतो असे त्यांनी नमूद केले. तसेच या माशास वर्षभर थंड पाणी आणि भरपूर ऑक्सिजनची गरज असते. 


या माशास चांगली मागणी असते.

महाराष्ट्रात चन्ना कुळातील प्रजाती ‘डाकू’ या नावाने ओळखली जाते, असे जयसिन्हा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत राज्यातून या प्रजातीचे अस्तित्व जवळपास नामशेष झाले असून, गेल्या वर्षी रत्नागिरीजवळ नोंद झाली होती.

1 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य



नवीन वर्षात 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व प्रकाराच्या नवीन अथवा जुन्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या दि. 1 जानेवारी, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय सरकारच्या रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅगच्या आवश्यकतेसंदर्भात घोषणा केली असून ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.


फास्टॅग सुविधा


‘फास्टॅग’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलित करण्यात येत आहे. फास्टॅग - इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) योजनेच्या अंतर्गत ही सुविधा अंमलात आणली जात आहे. फास्टॅग ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.


रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर ही सुविधा चालते. गाडीच्या वाहकाला ऑनलाइन पद्धतीने ‘फास्टॅग’चे टॅग मिळते. त्याच्या खात्यात वाहक काही रक्कम टाकणार. नाक्यावरचे टॅग रीडर प्रत्येक वेळी वाहकाने वाहनावर चिपकवलेले टॅग वाचणार आणि त्यातून टोल रक्कम वजा होणार.

देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राबवित आहे. 


स्वयंचलित पद्धतीने तात्काळ होणारा व्यवहार वाहनांच्या दळणवळणाला गती देणार. त्यामुळे वाहनांच्या रांगा नाक्यावर दिसणार नाहीत. उभ्या अवस्थेत असलेल्या चालू गाड्यांमुळे वायफळ जाणार्‍या इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...