Monday 16 January 2023

कांही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-

◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅


◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅


◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर✅


◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅


◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅


◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅


◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅


◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅


◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक✅


◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅


◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅


◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅


◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅


◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅


◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅


◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर✅


◆ महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर✅


◆ कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर✅


◆ लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद✅


◆ महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर  --  औरंगाबाद✅


◆ महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड✅


◆ महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा -- उस्मानाबाद✅


◆ महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा   -- नांदेड✅


◆ देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा  --  अमरावती✅

पोलीस भरती 2020 - 21


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे 


* विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती 


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.
मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हींगोली
हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत
लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.
यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.
 या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...