Friday 26 July 2024

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा

◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा
◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा
◾️ वेल्हे तालुक्याचे - राजगड

🔖मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार जाणार प्रस्ताव केंद्राकडे

🚂 करी रोडचे -  लालबाग
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे -  डोंगरी (मध्य)
🚂 मरीन लाइन्सचे -  मुंबादेवी
🚂 चर्नी रोडचे - गिरगाव
🚂 कॉटन ग्रीनचे - काळा चौकी
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (हार्बर)
🚂 डॉकयार्ड रोडचे - माझगाव
🚂 किंग्ज सर्कलचे - तीर्थंकर पार्श्वनाथ
❇️ काही महत्वाचे नाव बदल :

◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.
◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज
◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ
◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले
◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले
◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले
◾️केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर
◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.
◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

नावे लक्षात ठेवा - महत्वाचे आहे 🗺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी सराव प्रश्न 26 जुलै - 2024

प्रश्न.1) मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

उत्तर - डॉ. दामोदर खडसे

प्रश्न.2) पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - राहुल गांधी

प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून ब्यालेस्टिक संरक्षण प्रणालीची  यशस्वी चाचणी घेतली आहे ?

उत्तर - चांदीपुर,ओडिसा

प्रश्न.4) IOC ने २०३० मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?

उत्तर - फ्रान्स

प्रश्न.5) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - 82 व्या

प्रश्न.6) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - सिंगापूर

प्रश्न.7) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?

उत्तर - हिंगोली

प्रश्न.8) क्रिस्टन मिशल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?

उत्तर - एस्टोनिया

प्रश्न.9) कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सूरू केली आहे ?

उत्तर - गुजरात

प्रश्न.10) भारतात कोणता दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर - 24 जुलै

Thursday 25 July 2024

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये


◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले



◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन



◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड


◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता



◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम



◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह



◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.



◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.



◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष



◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन



◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी



◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी



◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय



◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक


◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी



◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर



◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार



◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”

 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.



◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु



◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.



◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.



◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.



◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे



◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.



◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 

भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक



◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी


◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.


◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.


◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक



◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना



◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

चित्तरंजन दास

जन्म :- ५ नोव्हेंबर १८७०.


मृत्यू :- जून १९२५.


🎤 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात.


🏬 चित्तरंजनाचे शिक्षण कलकत्त्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय्. सी. एस्. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली


📝 शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कलकत्त्यास वकिलीस प्रारंभ केला; पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले.


📜 चित्तरंजन यांनी या काळात मालंच (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.


🏛 बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. १९१७ मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. 


♟ १९१८ मध्ये त्यांनी माँटेग्यू–चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला. कलकत्ता येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधीच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला; पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णतः गांधीवादी झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशास समर्पण केली. 


🎯 त्यांची अहमदाबाद (१९२१) व नंतर गया (१९२२) येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली


🏤 १९२४–२५ या साली ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते


🔮 सूतकताईचा प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. ते म्हणत, ‘माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती; माझे राजकारण म्हणजे धर्म’.


💐 अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.


🏩  त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसविण्यात आले, तसेच त्यांच्या राहत्या घरात (भोवनीपूर बंगल्यांत) चित्तरंजन सेवासदन नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले.

भारतीय संविधानातलं “आर्टिकल १५” नक्की आहे तरी काय ?


👇👇👇👇👇👇👇👇


● आर्टीकल १५’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आला आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या फारच चर्चेत आला आहे कारण तो चित्रपट आर्टीकलवर म्हणजे भारतीय संविधानातील १५ व्या कलमांवर आधारित आहे.


● लोकशाहीच्या नियमाने लोकांना मूलभूत हक्काने जीवन जगता यावे या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे हे पुन्हा एकदा ध्यानत घेण्याची गरज आहे की भारतीय संविधानातील कलम १५ नक्की काय आहे?


◆ भेदभाव ◆


● वंश, धर्म, लिंग, जन्मतारीख, राज्य अशा कोणत्याही मुद्द्यावर नागरिक भेदभाव करू शकत नाहीत.


 ◆ मोकळीक ◆


● नियम दोन नुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या जाती, धर्म, लिंग, जन्मस्थान आणि वंशाच्या आधारे दुकान, हॉटेल, सार्वजनिक खानावळी, सार्वजनिक मनोरंजन स्थळे, विहिरी, स्नानगृह, तलाव रस्ते आणि सार्वजनिक रिसॉर्ट अशा कोणत्याही ठिकाणी जाण्यास बंदी नाही. म्हणजेच भारतीय नागरिक कुठेही मोकळेपणाने जाऊ शकतात.


 ◆ आरक्षण व मोफत शिक्षण ◆


● देशाचे सर्व नागरिक समान आहेत, त्यांच्यात भेदभाव केला जाऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी महिला व मुलांना त्याच्यात अपवाद म्हणून पाहिले जाऊ शकते.


● कलम 15’ तील तिसर्या नियमानुसार स्त्रिया आणि मुलींसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या असल्यास कमल 15 नुसार ते थांबविणे शक्य नाही. यामध्ये मुलांसाठी आरक्षण किंवा मुलींसाठी मोफत शिक्षण या तरतुदी येतात.


  ◆ मागास जातींसाठी विशेष तरतूद ◆


● या ‘कलम 15’ तील नियम ४ नुसार साामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी म्हणजे एससी/एसटी/ओबीसी यांच्यासाठी राज्यांतर्गत विशेष तरतूद करण्याची मुक्तता आहे.धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. असा कोणतीही भेदभाव नसलेला समाज ही सरकारची आणि जनतेची जबाबदारी आहे.


● हा कायदा १९५५ साली केला गेला. १ जून १९५५ पासून हा कायदा वापरायला सुरुवात झाली परंतु १९६५ साली थोडा बदल त्यात केला गेला.


● १९७६ साली त्यावर अधिक संशोधन करून त्या कायद्याचं नाव बदलून नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम १९५५ असे केले गेले. हा सुधारित कायदा १९ नोव्हेंबर १९७६ पासून प्रभावी झाला.

-----------------------------------------------------


Police Bharti

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43. ​​'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ ग्रीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जेफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बुर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एंजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गुरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बुध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पॅसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पंडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गुरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले

Top 20 महत्वपूर्ण प्रश्न सीरीज


1. संसद का संयुक्त अधिवेशन कौन बुलाता है ?

उतर -राष्ट्रपति


2. एलबीडबल्यू (LBW) शब्द किस खेल से है ?

उतर - क्रिकेट


3. वायुमंडल की कौन सी परत हमें सूर्य से आने वाली अल्ट्रावायलेट किरणों से बचाती है ?

उतर - ओजोन


4. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ है ?

उतर -अजमेर


5. सम्राट अशोक ने किस युद्ध के बाद बोद्ध धर्म ग्रहण कर लिया था ?

उतर -कलिंग युद्ध


6. भारत का केन्द्रीय बैंक कौनसा है ?

उतर - भारतीय रिज़र्व बैंक


7. सालारजंग म्यूजियम कहाँ है ?

उतर -हैदराबाद


8. भारत में सबसे लम्बे समय तक मुख्यमंत्री कौन रहा है ?

उतर - ज्योति बसु (पश्चिम बंगाल)


9. संसार की सबसे लम्बी नदी कौनसी है ?

उतर - नील


10. किस तापमान पर सेल्सियस और फारेनहाइट तापमान बराबर होता है ?

उतर --40 डिग्री


11. कांसा किसकी मिश्रधातु है ?

उतर - तांबा और टिन


12. दिलीप ट्राफी का सम्बन्ध किस खेल से है ?

उतर -क्रिकेट


13. LPG का पूर्ण विस्तार क्या होगा ?

उतर -Liqified Petroleum Gas


14. गीता रहस्य पुस्तक किसने लिखी ?

उतर - बाल गंगाधर तिलक


15. राज्यसभा के कितने सदस्यों का चुनाव हर 2 वर्ष बाद होता है ?

उतर - एक-तिहाई


16. अमेरिकी राष्ट्रपति का कार्यकाल कितने वर्ष होता है ?

उतर - चार वर्ष


17. किस मिट्टी को रेगुर मिट्टी के नाम से जाना जाता है ?

उतर -काली मिट्टी


18. लाल मिट्टी का रंग लाल क्यों होता है ?

उतर - लौह ऑक्साइड की उपस्थिति के कारण


19. भारत के कितने प्रतिशत क्षेत्रफल पर खेती होती है ?

उतर -51%


20. भारत के पूर्वोत्तर के राज्यों में जंगलों को काटकर जो खेती की जाती है, वह क्या कहलाती है ?

उतर -झूम खेती

पुष्यमित्र शुंग : (इ.स.पू.१८७–१५१).


शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती. मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल होते. त्यांच्या काळी बॅक्ट्रियाच्या डीमीट्रिअस या ग्रीक राजाने उत्तर भारतावर स्वारी करून साकेत (अयोध्या), मथुरा व पांचाल हे प्रदेश पादाक्रांत केले आणि पाटलिपुत्रापर्यंत धडक मारली. त्याच्या स्वतःच्या राज्यात उपद्रव निर्माण झाल्याने त्याला लवकरच भारतातून पाय काढावा लागला तथापि या स्वारीमुळे मौर्य साम्राज्य खिळखिळे झाले, यात संशय नाही. या स्वारीचे उल्लेख पतंजलीच्या महाभाष्यात अरूणद् यवनः साकेतम्| अरूणद् यवनः मध्यमिकाम् | असे आढळतात. या परिस्थितीचा फायदा घेऊन शेवटचा मौर्य राजा बृहदरथ याचा शुंगवंशी सेनापती पुष्यमित्र याने सैन्यात फितुरी माजविली आणि मगधाची गादी बळकावली.


शेवटच्या मौर्य राजांच्या कारकीर्दीत मगध राज्याचा संकोच झाला होता पण पुष्यमित्राने आपली सत्ता दूरवर पसरविली. मध्य भारतात विदिशा येथे त्याचा पुत्र अग्निमित्र प्रांताधिपती म्हणून राज्य करीत होता पुष्यमित्राच्या सहाव्या वंशजाचा लेख अयोध्येस सापडला आहे. दिव्यावदान ग्रंथावरून आणि तारानाथाच्या तद्विषयक उल्लेखावरून त्याचा अंमल पंजाबात जलंदर आणि शाकल (सियालकोट) पर्यंत पसरला होता असे दिसते.


पुष्यमित्राने दोन अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख अयोध्येच्या लेखात आहे. तरीही त्याने आपली ‘सेनापती’ ही पदवी बदलली नाही. कालिदासाचे मालविकाग्निमित्र नाटक तत्कालीन घटनांवर आधारलेले आहे. त्यातही त्याच्या याच पदवीचा उल्लेख आहे.


पुष्यमित्राने वैदिक धर्माचे आणि संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन केले. त्याने अशोकाचे हिंसाविरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञयागास अनुमती दिली आणि स्वतःही अश्वमेघासारखे यज्ञ केले. पतंजलीच्या महाभाष्यात इदं पुष्यमित्रं याजयामः| असे उदाहरण आले आहे. त्यावरून त्याच्या यज्ञांत पतंजलीने स्वतः ऋत्विजाचे काम केले होते, असे अनुमान करतात.


पुष्यमित्राने बौद्धांचा छळ केला, असा एक प्रवाद आहे. दिव्यावदनात म्हटले आहे की, पुष्यमित्राने पाटलिपुत्रातील कुक्कुटारामनामक बौद्ध विहार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्याला यश आले नाही. नंतर त्याने चतुरंग सेनेसहित शाकलपर्यंत चाल केली आणि मार्गातील बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. शाकल येथे तर त्याने जो कोणी एका बौद्ध भिक्षूंचे शिर आणून देईल, त्याला शंभर दीनारांचे पारितोषिक मिळेल असे जाहीर केले पण या सर्व दंतकथा दिसतात. त्यांना समकालीन लेखी आधार काहीच नाही. बौद्धांनी अशोकाच्या पूर्ण चरित्राविषयी अशाच दंतकथा पसरविल्या होत्या. याच्या उलट शुंगांच्या राज्यात बौद्ध धर्म भरभराटीत होता, हे भारहुत आणि सांची येथील तत्कालीन स्तूपांवरून व तोरणांवरून दिसते. भारहुत येथील तोरणावर तर सुंगानं रजे| (शुंगांच्या राज्यात) असा स्पष्ट उल्लेख आहे. पुराणांतील उल्लेखावरून पुष्यमित्राने सु. ३६ वर्षे राज्य केले असे दिसते.


इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने.


1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____ ह्या ठिकाणी झाला. 

A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर 🅾

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका) 


2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ? 

A. 1890 

B. 1893 🅾

C. 1896 

D. 1899 


3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ? 

A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन 🅾

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्युट 


4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ? 

A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम 🅾

D. इंडियन आश्रम 


5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ? 

A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य 🅾


6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ? 

A. सन 1916 

B. सन 1918 🅾

C. सन 1919 

D. सन 1920 


7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ? 

A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन 🅾

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन 


8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले. 

A. सन 1930 

B. सन 1933 🅾

C. सन 1936 

D. सन 1939 


9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ? 

A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान 🅾

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना 


10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. 

A. 1 ऑगस्ट 1920 🅾

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935 


11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ? 

A. 6 

B. 8 🅾

C. 10 

D. 12 


12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ? 

A. कलम 356 

B. कलम 360 🅾

C. कलम 365 

D. कलम 368 


13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ? 

A. कायदामंत्री 

B. राष्ट्रपती 

C. सरन्यायाधीश 🅾

D. लोकसभा सभापती 


14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ? 

A. भारतातील सनदी अधिकारी 

B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती 

C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ 🅾

D. भारताचे सर्वोच्च न्यायालय 


15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ? 

A. 14 दिवस 🅾

B. एक महिना 

C. चार महिना 

D. एक वर्ष 


16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ? 

A. 250 

B. 270 

C. 350 

D. 500 🅾


17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ? 

A. उच्च न्यायालय 

B. नियोजन मंडळ 

C. आंतरराज्यीय परिषद 

D. यापैकी कोणी नाही 🅾


18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम 

B. 5 वर्षे 🅾

C. 6 वर्षे 

D. 10 वर्षे 


19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ? 

A. अमेरिका 

B. दक्षिण आफ्रिका 🅾

C. कॅनडा 

D. आयर्लंड 


20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ? 

A. 3 वर्षे 

B. 4 वर्षे 

C. 5 वर्षे 🅾

D. 6 वर्षे 


21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ? 

A. मायोसीन 

B. फायब्रीनोजन 🅾

C. केसीन 

D. व्हिटेलीन 


22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ? 

A. 10 

B. 8 

C. 6 

D. 4 🅾


23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ? 

A. सफरचंद 

B. काजू 

C. अननस 

D. नारळ 🅾


24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ? 

A. WTO 🅾

B. IMF 

C. IBRD 

D. ADB 


25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ? 

A. मिसोस्फियर 

B. थर्मोस्फियर 

C. ट्रोपोस्फियर 🅾

D. स्ट्रॅटोस्फियर 


26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? 

A. पर्णक्षेत्र निर्देशांक 

B. पर्णक्षेत्र कालावधी 🅾

C. पीक वाढीचा दर 

D. तुलनात्मक पीक वाढीचा दर 


27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____ येथे झाला. 

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण 

B. वडाळा, मालवण, शिरोडा 🅾

C. शिरोडा, संगमनेर, ठाणे 

D. कल्याण, मालवण, शिरोडा 


28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ? 

A. WHO 

B. WWF 

C. IEEP 

D. UNEP 🅾


29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ? 

A. कराड 

B. कोल्हापूर 

C. नरसोबाची वाडी 🅾

D. सातारा 


30. _______ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली. 

A. स्वामी विवेकानंद 

B. आगरकर 

C. गोखले 

D. लोकहितवादी 🅾


31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ? 

A. सन 1500 

B. सन 1510 🅾

C. सन 1520 

D. सन 1530 


32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 

A. सन 1500 

B. सन 1550 

C. सन 1600 

D. सन 1650



34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 🅾

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 🅾

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 

A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾


41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे. 

A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 

A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 

A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 

A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾


47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर 🅾

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾

D. ब, क


🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

महाराष्ट्राचा इतिहास.

🧩 मौर्य ते यादव...


🅾️(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)


🧩 मौर्य साम्राज्याचा काळ...


🅾️महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


🧩 सातवाहन साम्राज्याचा काळ...


🅾️सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. 


🅾️महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


🧩 वाकाटकांचा काळ...


🅾️वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



🧩कलाचुरींचा काळ...


🅾️वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


🧩 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ...


🅾️वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. 


🅾️त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


🧩 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ..


🅾️वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


🧩 यादवांचा काळ..


🅾️महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. 


🅾️यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना.


🅾️धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 

🅾️विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 

🅾️ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

 

🅾️त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

 

🅾️त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला.अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत 

जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.


🅾️ संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


🧩ब्राम्हो समाजाची स्थापना :


🅾️त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

 

🅾️हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 

🅾️केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.


भारत स्वातंत्र्याचा इतिहास.


🧩स्वातंत्र्याची घोषणा :


🅾️नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.


🅾️ त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.

 ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.

 

🅾️या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.


🅾️ मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.

 स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.

 

🅾️देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.

 

🅾️भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.

ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.

सिंधु नदीच्या खोर्‍यातील संस्कृती :

सिंधु संस्कृतीचा शोध –


सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.
सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.
ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.
आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.
आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


सिंधु संस्कृतीचे वैशिष्टे

जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे.
रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित रचना.
पुरापसून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती.
आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती.
मोहेंजदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे.
मोहेंजदडो हे शहर नदीच्या पुरामुळे सात वेळा नष्ट होवून पुन्हा वसविल्या गेल्याचे येथील पुराव्यावरून सिद्ध होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


स्थानिक प्रसाशन –

मोहेंजदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोईच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते.
नगररचना योजनाबद्ध होती.
यावरून या ठिकाणी आजच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपीवण्यात आल्याचे दिसून येते.
हडप्पाकालीन लोकजीवन –

सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


दैनंदिन जीवनप्रणाली –

अन्न : येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
वस्त्र व प्रावरणे : येथील उत्खनात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे.
अलंकार : हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले कवडया, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा समावेश होता.
करमणुकीची साधने : हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

धार्मिक संकल्पना –

पुजा अर्चना : हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते स्पष्ट होते.
अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात आसवेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असे.
उद्योग व व्यवसाय : हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते.
शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. ते शेतीमध्ये गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे.
भांडी : भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा येथील लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे दिसून येते.
कापड : कापूस व लोकरीपासून धागा तयार करणे आणि कापड तयार करणे हा येथील लोकांचा एक व्यवसाय होता.


व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्‍या मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

ब. जीनांचे चौदा मुद्दे


१. भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

२. सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

३. सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

४. केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

५. स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

६. पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

७. सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

८. कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.  

९. मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

१०. वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

११. राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

१२. मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

१३. केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

१४. केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

आर्य


◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. 


◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. 


◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली


◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. 


◾️गुरे ही त्यांची संपत्ती होती. 


◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. 


◾️त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या. 


◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. 


◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. 


◾️त्यांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय. 


◾️आर्यांनी चार वेद लिहिले

1)........

2)........

3)........

4)........


◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. 


◾️ वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.


◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला. 


◾️ जनावरे  ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले. 


◾️ हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. 


◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.


◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. 


◾️म्हणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.


◾️देशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते. 

भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान


सिंधू/हडप्पा संस्कृती



💁‍♂ महत्त्वाची स्थळे व नद्या 


⦿ हडप्पा ➾ रावी


⦿ मोहेंजोदाडो ➾ सिंधू


⦿ चन्हंदडो ➾ सिंधू


⦿ कोटदिजी ➾ सिंधू


⦿ कालीबंगन ➾ घग्गर


⦿ बनवाली ➾ घग्गर


⦿ रंगपुर ➾ मादर


⦿ रोपड ➾ सतलज


⦿ लोथल ➾ भोगवा


⦿ धोलावीरा ➾ रंगाई


⦿ राखीगढ ➾ चौटांग


⦿ आलमगीर ➾ हिंडन


(इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. 


इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. 


या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात.


 नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. 

जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले.


 हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.


 हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.


💠💠प्राचीन भारताचा इतिहास 💠💠

.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

🟢 सिंधु संस्कृतीचा शोध 🟢

◾️  सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या. 

◾️  सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय. 

◾️  ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. 

◾️ आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. 

◾️ आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

भरती विशेष सामान्यज्ञान


1) जैन धर्माचे पहिले तीर्थकर- ऋषभदेव


2) सिंधू संस्कृती ही संस्कृती होय - नागरी


3) चिनी प्रवासी युवान सॉंग यांच्या काळात भारतात आला - हर्षवर्धन


4) आजच शत्रू चे दुसरे नाव काय - कुणीक


5) जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार - वर्धमान महाविर


6) गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते - शुद्धोधन


7) 0 चा शोध कोणत्या देशात लागला - भारत


8) अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील कोणी सांगितले - गौतम बुद्ध


9) हॉटल येथे शिवाची मंदिरे यांच्या काळातील आहे - चालुक्य


10) पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे - बोध


11) प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती - रावी


12) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते - नृत्यसंगीत


13) गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला - लुंबिनी


14) हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे - कालीबंगन


15) महाभारतात दूत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय - गांधारी


16) मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे - सौदी अरेबिया


17) कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते - सम्राट अशोक


18) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले - कालीबंगन


19) मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण केले - 17


20) शीख धर्माचे दहावे गुरू - गुरूगोविंद सिंह


वाचा :- राज्यघटना बाबत मते

🍀एन श्रीनिवासन:-

✍️भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे


🍀आयव्हर जेंनीग्स:-

✍️1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत


🍀के हनुमंतय्या:-

✍️आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे

✍️ज्या प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे


🍀लोकनाथ मिश्र:-

✍️पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती


🍀लक्ष्मीनारायण साहू:-

✍️मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही


🍀एच बी कामत:-

✍️आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे


वाचा :- महाराष्ट्र इतिहास


● महाराष्ट्रात नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद आदी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


● महाराष्ट्रात महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.


● मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.


● जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. ‘सिमुक’ राजा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.


● सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची राणी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.


● राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले.


● शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.


● शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.


● चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली. तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.


● यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.


● महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली. तो या राज्याचा संस्थापक मानला जातो. 


बहामणी राज्याचे खालील 5 तुकडे झाले. 

1. वर्हाडी : इमादशाही

2. अहमदनगर : निजामशाही

3. बिदर : बरीदशाही

4. गोवलकोंडा : कुतुबशाही

5. विजापूर : आदिलशाही

प्रागैतिहासिक कालखंड‼️


👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती


अश्म युग👇👇👇


✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000


 मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे.


शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. 

हत्यारे तीक्ष्ण नव्हती.

शेतीचे ज्ञान नव्हते.

डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे.


नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश).

भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश,


✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000


 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात.


दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली.


✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500


 मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव ) 


 या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली.


हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत.

चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे.



शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन.

राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे.

स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात.

मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात.

पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ.


✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age)


Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India.

जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती



नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात.


सुरुवातीचे धातु तांबे हे होते.

या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले.

काही ठिकाणी ब्राँझचाही वापर.


ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा.


गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत.

कापड बनवण्याची कला अवगत होती.

मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.

स्त्री देवतांची पुजा करत.

Wednesday 24 July 2024

चालू घडामोडी :- 24 JULY 2024

1) राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिन दरवर्षी 24 जुलै रोजी साजरा केला जातो.

2) अॅडव्हान्स्ड थर्मल सोल्यूशन्स, इंक (एटीएस) ने जुलै 2014 मध्ये राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिनाची स्थापना केली.

3) अरुणाचल प्रदेश विधानसभेने 'अरुणाचल प्रदेश सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024' एकमताने मंजूर केले आहे.

4) 'ग्रामोदय संकल्प' मासिकाच्या आगामी अंकासाठी पंचायती राज मंत्रालयाकडून लेख आणि यशोगाथा मागवण्यात आल्या आहेत.

5) भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी 'इन्कम टॅक्स डे' साजरा केला जातो.

6) केव्ही सुब्रमण्यन यांची फेडरल बँकेने सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे.

7) 'Institute of Cost Accountants of India' (ICMAI) च्या अध्यक्षपदी 'विभूती भूषण' यांची निवड झाली आहे.

8) हरियाणामध्ये NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेडद्वारे ग्रीन चारकोल प्लांट उभारला जाईल.

9) 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

10) केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरू करण्याची घोषणा  करण्यात आली असून ते 63,000 आदिवासीबहुल गावात राबविण्यात येणार आहे.

11) केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये नैसर्गिक शेतीसाठी 10 हजार जैव-निविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

12) केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो 2012 लागू करण्यात आला होता.

13) सुभाष प्रसाद गुप्ता यांची भारताचे सुरीनाम या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

14 ) भावी मेहता यांना Oxford Bookstor बुक कवर पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

15) पंजाब राज्यात भारतीय सेना आणि वायू सेना यांच्या व्दारे गगन स्ट्राईक-2 या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

16) नागालँड या राज्यात कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

17) केंद्रीय अर्थसंकल्पात ईशान्य प्रदेशात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

18) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे.

19) ब्रिटन या देशाचा टेनिसपटू आणि अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

20) हंगेरी येथे झालेल्या हंगेरियन ग्रांप्री (GP) 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मॅकलारेनच्या ऑस्कर पियास्त्री या ऑस्ट्रेलियन रेसिंग ड्रायव्हरने आपले पहिले F1 विजेतेपद पटकावले.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫



⚙️ भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना COSPAR हॅरी मॅसी पुरस्कार 2024 ने सन्मानित
◾️हा पुरस्कार मिळवणारे पाहिले भारतीय
◾️हा पुरस्कार अवकाश संशोधनाच्या विकासात उल्लेखनीय योगदानाला दिला जातो
◾️पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मायनर प्लॅनेट (20064 प्रल्हादग्रवाल) या नावाने सन्मानित केले जाते.
◾️15 जुलै रोजी दक्षिण कोरियाच्या बुसान येथे 45 व्या COSPAR सायंटिफिक असेंब्लीच्या उद्घाटन समारंभात सन्मानित करण्यात आले
◾️AstroSat प्रकल्पाचे मार्गदर्शक आणि प्रमुख अन्वेषक होते
◾️भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेचा (चांद्रयान 1) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी इस्रोने स्थापन केलेल्या चंद्र टास्क फोर्सचे ते सदस्य होते

⚙️ गेवरा आणि कुसमुंडा खाणींचा समावेश जगातील पहिल्या 10 सर्वात मोठ्या खाणींच्या मध्ये झाला
1】🌆 साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) च्या गेवरा ( जगात दुसरी मोठी)
2】🌆 कुसमुंडा कोळसा ( जगात चौथी मोठी )
◾️दोन्ही खाणी छत्तीसगड कोरबा जिल्ह्यात आहेत
◾️या दोन खाणीतून भारताच्या एकूण उत्पादनाच्या 10% उत्पादन होते
◾️WorldAtlas.com यांनी हा रिपोर्ट प्रकाशित केला

⚙️ BCCI ने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनला 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे
◾️BCCI अध्यक्ष :  रॉजर बिन्नी
◾️BCCI सचिन : जय शहा ( यांची घोषणा)
◾️BCCI मुख्यालय :मुंबई
◾️BCCI स्थापना : डिसेंबर 1928

⚙️एलोन मस्क यांनी की एक्स 📱 आणि स्पेसएक्स मुख्यालय कॅलिफोर्निया मधून ते टेक्सासमध्ये हलवणार असल्याची घोषणा केली

⚙️ स्मृती मानधना महिला 🏏 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक धावा बनवणारी भारतीय खेळाडू बनली आहे
◾️ हरमनप्रीत कौर हिला मागे टाकले
◾️एकूण 3365 धावा बनवले आहेत

⚙️ भारताला एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) $240.5 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे
◾️भारतातील छतावरील सौर यंत्रणांना🌫 वित्तपुरवठा करण्यासाठी
◾️स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि नॅशनल बँक फॉर ग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मार्फत हे कर्ज वितरित केले जाईल.

⚙️आशियाई विकास बँक /Asian Development Bank
⭐️मुख्यालयः मांडलुयोंग, फिलीपिन्स
⭐️स्थापनाः 19 डिसेंबर 1966
⭐️68 सदस्य देश
⭐️अध्यक्षः मासात्सुगु असाकावा
------------------------------------------

महाराष्ट्राचे पर्यटन जगाला भुरळ पाडणारे



औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार ते कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणांच्या पर्यटनस्थळांची निवड करून तेथे अम्युझिंग पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्टस, जंगल सफारी, आलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आवाहन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सादरीकरण केले होते. मात्र या 20 पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्यातच गुंतवणूकदारांचे स्वतंत्र अधिवेशन भरविण्याचा मानस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आहे.


राज्यातील पर्यटन स्थळ प्रकल्पांची संख्या जास्त आहे. औरंगाबाद येथील फरादपूर परिसरासह तेथीव पर्यटन स्थळांचा विकास, चिखलदरा, नागपूर येथील नवेगाव खैरी, नंदुरबारमधील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा, नंदुरबारचाच तोरणमाळ परिसर, लोणार येथील आजिसपूर, सिंधुदुर्ग येथील मिठबाव, निवतीचा किनारा, रत्नागिरी हरनई किल्ला, रायगड किल्ला आणि परिसराचा विकास, रायगडमध्येच काशीद समुद्रकिनारा आणि परिसर, सुरेखा परिसर, ठाण्यात वसईचा किल्ला, पालघर येथील शिरगाव, मुंबईत एरंगल येथील कलाग्राम नावाने प्रदर्शन, सभा-चर्चासत्रांसाठी मोठे सभागृह उभारणी आदी प्रकल्पांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या विकासासाठी लागणारी जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उपलब्ध करण्यात येणार असून, राज्याच्या पर्यटन धोरणांनुसार त्यांचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर यांनी दिली.


महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. डोंगरदऱ्या, विस्तीर्ण समुद्रकिनारा, लेणी, किल्ले, अभयारण्य, मोठी वनराई...यादी खूपच मोठी आहे. विदर्भ, मराठवाडा असो, किंवा कोकण किनारपट्टी; राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सुंदर पर्यटनस्थळे दडलेली आहेत. फिरायचे म्हटले, तर अख्खे आयुष्यही कमी पडेल, इतकी ठिकाणे आपल्याच राज्यात आहेत. मग येताय ना...महाराष्ट्राच्या सफरीवर!


महाराष्ट्रातील लेणी


अजिंठा लेणी

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्याची लेणी इ.स.पूर्व शतकातील असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद विमानतळापासून 108 किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत. येथील 30 शिल्पे म्हणजे प्रत्येकाची स्वतंत्र खोली असल्यासारखे वाटते. येथे बुद्धाच्या जीवनावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. जवळचे रेल्वे स्थानक जळगाव असून, तेथून 58 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले वेरूळ जगातील ऐतिहासिक वारसास्थळ बनले आहे. येथील शिल्पांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन यांच्या शिल्पकलेचा संगम झालेला आहे. येथील धुमार लेणी, कैलासचे मंदिर प्रसिद्ध आहे.


घारापुरी लेणी

गेट वे ऑफ इंडियापासून 9 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रातील बेटावर घारापुरी लेणी आहेत. त्यांचा समावेश रायगड जिल्ह्यात होतो. यालाच एलिफंटा लेणी असेही म्हणतात. येथे दगडामध्ये महादेवाचे मंदिर कोरलेले आहे. येथे महादेव मूर्तींचा निर्माता, संरक्षक आणि संहारक म्हणून दाखवला आहे; जे खरोखर प्रेक्षणीय आहे.


पितळखोरे लेणी

औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरे लेण्यांमध्ये शिलालेख, कोरीव घोडे, हत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील दगडामध्ये बुद्धाची राजा असतानाची प्रतिमा कोरलेली आहे. हे बुद्धाचे राजा असतानाचे एकमेव शिल्प आहे. येथील लेण्यांची शिल्पे पाण्याच्या घर्षणाने नष्ट झालेली आहेत. पितळखोरे अजिंठ्याहून 78 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी अजिंठ्यापेक्षा 2200 वर्षे जुनी आहे.


कार्ले-भाजे लेणी

कार्ले-भाजे लेणी या इ.स.पूर्व शतकातील बौद्ध धर्माच्या हिनयान पंथीय लेणी असल्याचे सांगितले जाते. म्हणून या लेण्यांत बुद्धमूर्ती आढळत नाहीत. कार्ले हे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून 11 किलोमीटर अंतरावर आहे. कार्ले येथील महाचैत्याचे शिल्प भाजे लेण्याच्या साडेतीनपट मोठे आहे.


माहूरची लेणी

नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या जुन्या बस स्थानकाजवळील टेकडीत या लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या राष्ट्रकुल काळातील असल्याचे मानले जाते. येथे अनेक खांब असलेले 15 मीटर उंचीचे मोठे दालन आहे. त्यालाच जोडून गर्भगृह कोरलेले आहे.


महाराष्ट्रातील किल्ले


रायगड किल्ला

हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. उंच आणि वरील बाजूस निमुळत्या होत गेलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला होता. याच्या तिन्ही बाजूंनी असलेले खोरे याला सह्याद्री पर्वतापासून वेगळे करते. तिन्ही बाजूंनी येथे जाणे अशक्य होते. मुंबईच्या दक्षिणेस 210 किलोमीटर अंतरावर व महाडच्या उत्तरेस 27 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यापासून 5 किलोमीटर उंचीवर पश्चिमेस हिरकणी, उत्तरेस टकमक, पूर्वेस भवानी अशी तीन टोके आहेत. येथे जाण्यास केवळ एकच मार्ग ठेवलेला आहे. तोही डावपेचाचा मार्ग आहे. त्याशिवाय शिवाजी महाराजांची समाधी, बाजार, जगदीश्वराचे मंदिर या गोष्टीही पाहण्यासारख्या आहेत.


राजगड

राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. या किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. या किल्ल्याला त्या वेळी राजधानी समजले जात असे. हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. येथील सुवेळा माचीवरील हत्ती प्रस्तर पाहण्यासारखे आहे. उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून जागतिक पातळीवर राजगडचा गौरव केला जातो.


सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून जवळच खडकाळ बेटावर हा किल्ला उभारला आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून खास 100 पेक्षा अधिक तज्ज्ञ पोर्तुगीजांना बोलावले होते; तसेच या बांधकामासाठी 3000 कामगार तीन वर्षे झटत होते.

48 एकराचा हा किल्ला असून, किल्ल्याला 4 कि.मी. लांबीचा 9 मीटर उंच, 3 मीटर रुंद असा तट आहे, 42 बुरुज आहेत. मोठे दगड व 72576 किलोग्रॅम लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे याचा पाया शिसे ओतून उभारला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या शिवाजी मंदिरात शिवाजी महाराजांचा देशातील एकमेव दाढीविरहित पुतळा आहे.


पन्हाळा

कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस 19 किलोमीटर अंतरावर पन्हाळगड हा किल्ला आहे. त्रिकोणी आकाराचा पन्हाळा डोंगराळ भागात असून, त्याची उंची 850 मीटर आहे व परीघ 7.25 किलोमीटर आहे. अर्ध्या भागात नैसर्गिक भिंत आहे. उर्वरित भाग मजबूत दगड भिंतींच्या बुरुजाने संरक्षित आहे. किल्ल्याच्या दुहेरी भिंतीला तीन दरवाजे आहेत. त्यांपैकी दोन सुरक्षित आहेत. येथे मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. आजही पन्हाळा पर्यटनस्थळ म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कवी मोरोपंतांचा जन्म येथेच झाला; तसेच आज्ञापत्राचे लेखक रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी येथेच आहे.


प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. 1656 मध्ये हा किल्ला बांधला असून, अत्यंत कठीण आणि डोंगराळ भागात हा किल्ला आहे. येथे विजापूरचा सरदार अफजलखान याचा शिवाजी महाराजांनी वध केला होता. प्रतापगडाच्या माथ्यावर चिन्नमनस, धोबी, लिंगमळा धबधबा अशी ठिकाणे आहेत. तिथून दूरपर्यंत निसर्गसौंदर्य न्याहाळता येते; तसेच विल्सन पॉइंट, कारनॅक पॉइंट, हेन पॉइंट, एल्फिन्स्टन, बॉबिग्टन, फलचंद केंद्र येथून निसर्गन्याहाळता येतो.


हरिश्चंद्रगड

अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे ऐतिहासिक पुरावे असणारा किल्ला होय. चांगदेवांच्या अस्तित्वाचा शिलालेख, प्राचीन लेणी व गुहा मंदिरे, श्रीहरिश्चंद्रेश्वराचे शिल्पसमृद्ध मंदिर व अनेक जुनी हत्यारे या किल्ल्यावर पाहायला मिळतात. या किल्ल्यासंदर्भात अनेक शौर्यगाथा, कथा प्रचलित आहेत. किल्ल्यावरून कोकणकड्याचे अप्रतिम दृश्य दिसते.


नळदुर्ग

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हा किल्ला बोरी नदीच्या शेजारी आहे. या भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी जलमहाल उभारलेला आहे. येथील गंडभेरुंडाचे शिल्प आठवणीत राहण्यासारखे आहे. उपळ्या बुरूज आणि तेथील खंडोबाचे स्थान ही पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे आहेत.


महाराष्ट्रातील अभयारण्य


पेंच : पेंच हे वाघांसाठी आरक्षित राष्ट्रीय उद्यान आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिण भागात व नागपूर जिल्ह्याचा उत्तरेस हे वन आहे.

पेंच उद्यानाचे 4 विभाग पडतात. येथे विविध प्रकारची झाडे-झुडपे, गवत, वेली, रानगवत औषधी वनस्पती आहेत.


चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळ हे अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदरा 118 मीटर उंच टेकडीवर वसले असून, हे विदर्भातील सर्वांत उंच ठिकाण आहे. या भागात बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, डुक्कर आदी प्राणी आणि काही प्रमाणात रान कुत्रे पाहावयास मिळतात. चिखलदऱ्यापासून जवळच मेळघाट आहे. मेळघाटात व्याघ्रप्रकल्प राबवला जातो.


बोरडॅम : बोरडॅम हे महाराष्ट्राच्या पर्यटनस्थळातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. येथे अनेक प्रकारचे वन्यप्राणी पाहावयास मिळतात. बोर नदीवरील हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे. एप्रिल-मे हा काळ पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तेथे जाण्यासाठी विमानाने पर्यटनस्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर नागपूर, 35 किलोमीटर अंतरावर "वर्धा' स्थानक, तर 5 किलोमीटर अंतरावर "हिंगली' हे बस स्थानक आहे.


महाराष्ट्रातील उद्याने


ताडोबा राष्ट्रीय उद्यान : ताडोबा हे जुने आणि 625 किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले उद्यान आहे. विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्यान आहे. नागपूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.


नवेगाव राष्ट्रीय उद्यान : नागपूर जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान 1359 चौ.मी. भूभागावर विस्तारलेले आहे. येथे डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य आणि हरणांचे उद्यान आहे. उद्यानामध्ये उंच मनोरा उभारलेला आहे. नागपूर विमानतळापासून 100 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान : या उद्यानास बोरिवली राष्ट्रीय उद्यान असेही म्हटले जाते. मुंबईतील बोरिवलीच्या डोंगराळ भागात हे उद्यान आहे. शहरास लागून 104 चौ.कि.मी. क्षेत्रावर हे उद्यान विस्तारलेले आहे. सांताक्रूझ विमानतळापासून 20 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.


महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे


महाबळेश्वर : साताराजिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. उंच शिखरे, खोल दऱ्या, हिरवागार निसर्ग, थंड उत्साहवर्धक असे हे ठिकाण होय. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांत येथील पर्यटन पूर्णतः बंद असते आणि वाहनांच्या वापरास बंदी असते.


माथेरान : माथेरान रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 800 मीटर उंचीवर माथेरान वसलेल्या माथेरानचा शोध 1850 मध्ये मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टननी घेतला असे सांगितले जाते. नेरळहून मीटर गेजची छोटीशी ट्रेन येथे जाते.


अंबोली : सह्याद्रीच्या दक्षिण डोंगररांगांमध्ये 690 मीटर उंचीवर अंबोली हे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेले हे अंबोली थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथून 10 किलोमीटर अंतरावर बॉक्साइटच्या खाणी आहेत.


भंडारदरा : भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण नगर जिल्ह्यात आहे. येथील ऑर्थर तलावावर विल्सन धरण आहे. येथून प्रवरा नदीचा उगम होतो. अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हापासून ही नदी वाहत असल्याची आख्यायिका आहे.

विल्सन धरण, अम्ब्रेला धबधबा, ऑर्थर तलाव, कळसूबाई शिखर, अगस्ती ऋषींचा आश्रम ही ठिकाणे पर्यटकांची प्रमुख आकर्षणस्थळे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. विल्सन धरण 1910 मध्ये बांधले गेले. याची उंची 150 मीटर आहे. येथील हवा थंड व आल्हाददायक आहे.


पर्यटनस्थळे


कोका अभयारण्य: नैसर्गिक सौंदर्यासोबत नैसर्गिक साधन संपत्तीने भंडारा हा समृद्ध जिल्हा आहे. भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यू नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्ये नव्याने घोषित झाली आहेत.


अभयारण्याला कसे जाल : नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून, भंडाऱ्याहून चंद्रपूरच्या प्रवेशद्वारापर्यंत 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून 3 जिप्सींची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते.


पेंच अभयारण्य, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय : विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. या अभयारण्यांना भेट देण्यासाठी देश-विदेशांतून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय लवकर झाले, तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.


दाजीपूर अभयारण्य : कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर असलेले दाजीपूर अभयारण्य, की जे जैव विविधतेचे हॉट स्पॉट किंवा रानगव्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य रानगव्यांच्या भूमीबरोबरच विविध पक्षी आणि दुर्मिळ प्राण्यांच्या अधिवासाचे मूळ आहे. या अभयारण्यात 400 ते 500 गवे असून चित्ता, सांबर, मुंगूस, विविध सापांच्या जाती या ठिकाणी घर करून आहेत. जंगलामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसल्याने जंगलात जाण्यास मनाई आहे.


विसापूर किल्ला : हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले, की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.


मोराची चिंचोली : गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले असे एक गाव आहे. या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे. अष्टविनायकांपैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण हे जवळ आहे.


कास पठार : सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट केले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून, पर्यटकांची रीघ कास पठाराच्या दिशेने सुरू झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे.


चौल- अलिबाग : अलिबागमधील रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे एक बंदर ! त्या काळी इजिप्त, ग्रीस, आखातातील काही  देश, चीनदेखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता.

दूरशेत रायगड पावसाळी पर्यटन

आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड जिल्ह्यातील दूरशेत (ता. खालापूर) हे गाव. हे गाव मोठमोठ्या डोंगर व दऱ्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंग ठिकाणांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीपासून दूर जाऊन निसर्गाला जवळून पाहण्याचे हे एक सुंदर ठिकाण आहे. दूरशेत हे गाव पाली आणि महाडच्या दोन गणेश मंदिरांदरम्यान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलाब खान यांच्यामध्ये उंबरखिंडसाठी लढाई झाली होती. त्यामुळे हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते.


नाना फडणवीस वाडा, वाई : नाना फडणवीसांचा 245 वर्षांचा मेणवलीचा वाडा भारावून टाकणारा आहे. वाईपासूनच 10 कि.मी. अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.


ताम्हणी घाट : सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टिंग) जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला, की डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे.


प्रबळगड : महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीने असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात धोकादायक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे.


ट्रेकिंग स्थळे

माथेरानच्या कुशीत वसलेले भिवपुरी, दहीसरजवळील चिंचोटी, मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असणारे तुंगारेश्वर, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सनडॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांधा फॉल, खारघर परिसरातील पांडवकडा, खोपोली येथील झेनिथ धबधबा, मुंबई- पुणे महामार्गावरील पळसदरी, पनवेल परिसरातील गाढेश्वर धबधबा, फणसाड धबधबा, मुरुड-जंजिरा येथील सवतकडा, नवी मुंबई घणसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा, बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधबा, वांगणीजवळील भगीरथ धबधबा, नेरळजवळील टपालवाडी, भिवपुरीजवळील आषाणे धबधबा, माळशेज घाटाजवळील भिदबीचा धबधबा, निवळी घाटाजवळील निवळी धबधबा, कर्जतजवळील मोहिली धबधबा, मुरबाडजवळील पळुया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेकसुद्धा करू शकता. ठाणे जिल्ह्यातील जव्हार डोंगरदऱ्यांमधील दाभोसा धबधबा, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात असणारे कावनई. गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादींसारख्या बऱ्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. धुळे, नंदुरबारजवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते. डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी, असे वेड लावणारे सौंदर्य वरंधघाटात आहे. वरंधघाटात उतरल्यावर शिवथरघळ येथील गुहा आणि गुहेबाहेर पडणारा पाऊस आणि धबधबा पाहण्यासारखा आहे.


माळशेज घाट :

अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल, तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.


कणेरी मठ, कोल्हापूर : 

कोल्हापूरपासून दहा-बारा कि.मी.वर असलेल कणेरीमठ या ठिकाणाची सहल ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते. कणेरीमठ येथील सिद्धगिरी म्युझियमप्रेक्षणीय आहे. ही सहल मोकळी हवा, हिरवागार परिसर आणि शहरातील दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी अशीच ठरेल. सिद्धगिरी म्युझियम हे ठिकाण पुणे-बंगळूर महामार्गावर आहे.


टिपेश्वर वाघोबा : 

यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघे ------ किलोमीटर अंतर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दुर्मिळ प्राणी समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघांचे सहज दर्शन होऊ लागल्याने अभयारण्यात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

टिपेश्वर येथे वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी जावयाचे असल्यास पांढरकवडा येथून राष्ट्रीय महामार्ग 7 अदिलाबादकडे जाताना डाव्या बाजूस सुन्ना गावाजवळून अभयारण्यात प्रवेश करता येतो.


कुडा लेणी : 

मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून माणगावच्या आग्नेयला कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे.


मालवण देवबाग : 

देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील "सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती..

"सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.


गोनी किल्ला : 

जांभीवलीहून या किल्ल्याला जावे लागते. हा प्रवास लोणावळ्याहून सुरू होतो. बरोबर मार्गदर्शक हवा. लोणावळा-भीमाशंकर ही वाट उजव्या हाताला जंगलातून ही वाट जाते. उजवीकडे प्रचंड कातळ आणि डावीकडे खोल दरी. अरुंद वाट पार करताना कमालीच एकाग्रतेची आवश्कता आहे. येथे बहिरीदेवाची, श्रीगणेशाची आणि भवानीदेवीची मूर्ती आहे.

समुद्रकिनारा


श्रीवर्धन, हरिहरेश्वर :

 रायगड जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आहेत. येथील सुखद हवेची झुळूक, मऊ वाळू आणि समुद्राचे पाणी पर्यटकांना आकर्षून घेते. समुद्री अन्न, मासे, झिंगे, बोंबील यांची दुर्मिळता जाणवत नाही. श्रीवर्धन येथे पेशव्यांचे स्मारक आहे. पेशवे मूळचे श्रीवर्धन येथील होते. हरिहरेश्वर शहर हे शांत आणि आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पुळण व हरिहरेश्वरचे मंदिर प्रसिद्ध आहे.


वेंगुर्ले-मालवण :

 लांबवर विस्तारलेली पांढरी शुभ्र वाळू, चिकू, नारळ, आंबा अशा फळझाडांनी सजलेल्या टेकड्या यांनी वेंगुर्ले पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांची मान्यता मिळाली आहे. ही दोन्ही पर्यटनस्थळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. वेंगुर्ल्याच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेस खडकाळ प्रदेश आहे, तर माडांच्या झाडांमध्ये लपलेले मालवण शहरही खडकाळ क्षेत्रांनी वेढलेले आहे. मालवणचे खाद्यपदार्थही लोकप्रिय आहेत.


गणपतीपुळे : 

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले गणपतीपुळे   या ठिकाणास नेत्रदीपक समुद्रकिनारा लाभला आहे. येथील स्वयंभू गणेशाचे मंदिर कित्येकांचे श्रद्धास्थान आहे. स्वच्छ समुद्र किनारा, स्वच्छ पाणी, महत्त्वपूर्ण वनस्पती, माड आणि पाणथळ झाडे यांनी गणपतीपुळे समृद्ध बनले आहे. येथून 25 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.


डहाणू- बोर्डी : 

ठाणे जिल्ह्यातील डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिकूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पर्शियनांचे धर्मस्थळ उद्वाडा हे येथून जवळच आहे.

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...