Thursday 30 September 2021

मोर्य ते यादव


मौर्य साम्राज्याचा काळ  


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


सातवाहन साम्राज्याचा काळ 


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


वाकाटकांचा काळ 


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


कलाचुरींचा काळ 


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ 


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ 


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


यादवांचा काळ 


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

थोर भारतीय विचारवंत



(१) राजा राममोहन राॅय :--

           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली. 

मृत्यू २७ सप्टेंबर १८३३


(२) स्वामी विवेकानंद :--

            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे 

भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण. 


(३) रवींद्रनाथ टागोर :--

            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली 

हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१. 


(४) न्यायमूर्ती रानडे :--

           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१. 


(५)लोकमान्य टिळक :--

             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.


(६) महात्मा गांधी :--

            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली 

लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८. 


(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--

              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे 

पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार. 


(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--

         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६. 


(९) सुभाषचंद्र बोस :--

               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते. 


(१०) इंदिरा गांधी :--

               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या 

पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव




👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

मराठवाडा मुक्ती संग्राम



मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.

मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये 

1)औरंगाबाद

2)नांदेड 

3)परभणी 

4)बीड 

5)जालना 

6)लातूर 

7)उस्मानाबाद व 

8) हींगोली 

हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत

लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.


पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.


मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.


या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.


निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला. 

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.

15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.


हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.

 या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.

    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.


१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

रशिया



🎯रशियाचा इतिहास🎯


🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. 


🔴पर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली . 


🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात . 


🔴जन १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली . 


*🎯रशियन साम्राज्य-🎯*


🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. 


🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. 


*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. 


🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. 


🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात. 


🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. 


🔵ह प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.


🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.


🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले. 


🔵कथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.


🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .


 *🎯सोव्हियेत रशिया-🎯*


सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.


🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता.  


🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. 


🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.


*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. 


🔵समारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. 


🔴सबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. 


🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

आजाद हिंद सेनेची स्थापना



👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 


👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला.  


👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना.  


👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. 


👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली


👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. 


👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. 


👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. 


👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.

____________________________________

सिंधू संस्कृती



०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती. 


०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही. 


०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

गोपाल गणेश आगरकर



जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

मृत्यू : 17 जून 1895,पुणे

1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

संस्थात्मिक योगदान :


1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.

शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.

'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक.

हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

वैशिष्टे :


इष्ट असेल ते बोलणार......

राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.

हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

धोंडो केशव कर्व



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :


1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

1907 - हिंगणे महिला विद्यालय.

1910 - निष्काम कर्मकठ.

1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

1 जानेवारी 1944 - समता संघ.

1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

1948 - जातींनीर्मुलन संघ.

1918 - पुणे - कन्याशाळा.

1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :


मानवी समता - मासिक.

1893 - विधवेशी पुनर्विवाह.

1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

विठ्ठल रामजी शिंदे



जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.

'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.

जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :


1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.

1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.

अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.

ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.

1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 - तरुण ब्रहयो संघ.

1937 - बहुजन पक्षाची स्थापना.

स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :


प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

Untouchable India,

History Of Partha,

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

वैशिष्ट्ये :


शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.

अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 - मुंबई धर्म परिषद.

1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

आचार्य विनोबा भावे



जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.


संस्थात्मक योगदान :


1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.

संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.

18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.

कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.


आचार्य यांचे लेखन :


1923-महाराष्ट्र धर्म मासिक.

गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.

मधुकर(निबंधसंग्रह)

गीता प्रवचने.

'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.

विचर पोथी.

जीवनसृष्टी.

अभंगव्रते.

गीताई शब्दार्थ कोश.

गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.


वैशिष्टे :


वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.

गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.

मंगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.

'जय जगत' घोषणा

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले



मूळ आडनाव – गोह्रे

जन्म – 11 मे 1827

मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890


1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.


उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन परिचय :


आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.


शिक्षण:


फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.


विवाह:


महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.

त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.


पुढील शिक्षण :


इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.


संस्थात्मक योगदान :


3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.

1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.

1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :


1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 - 'ब्राम्हणांचे कसब'

1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.

1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.

1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

वैशिष्ट्ये :


थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.

1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.

2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.

ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.

सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

1857 च्या पूर्वीचे उठाव



आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)


गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

हटकरांचा उठाव - मराठवाड्यात


नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.

नेता - नौसोजी नाईक

प्रमुख ठाणे - नोव्हा

ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

खानदेशातील भिल्लाचा उठाव


भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

काजरसिंग नाईकचा उठाव:


1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

थोर_समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ


० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण-

० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

महाराष्ट्राचा इतिहास



⭕️ मौर्य ते यादव ⭕️

(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)



👉 मौर्य साम्राज्याचा काळ


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



👉 सातवाहन साम्राज्याचा काळ


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



👉 वाकाटकांचा काळ


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



👉 कलाचुरींचा काळ


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



👉 यादवांचा काळ


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

________________________________________

प्राचीन भारत इतिहास



 वेद काल


०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.

०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.

०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.

०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.

०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.

०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.


ऋग्वैदिक काळ


०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.

०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.

०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.

१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.

११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.

१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.

१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.

१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.

१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.

१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.

१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.

१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.

१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.

२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.


उत्तर वैदिककाळ 


२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.

२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.

२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.

२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.

२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.

२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.

२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.

२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.

महाराष्ट्राविषयी माहिती


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई


▪️उपराजधानी - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36


▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.


▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


General Knowledge



● कोणत्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी आकाश प्राइम क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेण्यात आली?

उत्तर :  इंटेग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर 


●  तैवान समुद्रधुनी ही १८० किलोमीटर रुंदी असलेली समुद्रधुनी असून ती तैवानचे बेट आणि _ खंडाला विभागते.

उत्तर : आशिया


● कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात? 

उत्तर : २८ सप्टेंबर


● _ राज्यामधील प्रसिद्ध ‘सोजात मेहंदी’ला सरकारकडून भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.

उत्तर : राजस्थान 


●  २०२१ साली “जागतिक हृदय दिवस”ची संकल्पना कोणती आहे?

उत्तर : यूज हार्ट टू कनेक्ट


● कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ या कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय


● ‘ऑस्ट्रावा ओपन २०२१ (टेनिस)’ स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले?

उत्तर : सानिया मिर्झा-शुई झांग


● कोणत्या दिवशी ‘अन्नाचे नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागृती दिवस’ साजरा करतात?

उत्तर : २९ सप्टेंबर

भारताचे जनक/शिल्पकार



1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय

2. आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

11. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

15. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

भारतातील लोकनृत्ये



🔸 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य

🔹 तामिळनाडू : भरतनाट्यम

🔸 करळ : कथकली

🔹आध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम

🔸 गजरात : गरबा , रास

🔹 ओरिसा : ओडिसी

🔸 जम्मू व काश्मीर : रौफ

🔹 पजाब : भांगडा , गिद्धा

🔸 आसाम : बिहू , झूमर नाच

🔹 उत्तराखंड : गर्वाली

🔸 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला

🔹 मघालय : लाहो

🔸 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी

🔹 मिझोरम : खान्तुंम

🔸 गोवा : मंडो

🔹 मणिपूर : मणिपुरी

🔸 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम

🔹 झारखंड : कर्मा

🔸 छत्तीसगढ : पंथी

🔹 राजस्थान : घूमर

🔸 पश्चिम बंगाल : गंभीरा

🔹 उत्तर प्रदेश : कथक


राज्यात १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदार नोंदणी मोहीम



🔰स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिला आहे.


🔰भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत निवडणूक आयुक्त मदान यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला.


🔰मख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सल्लागार दिलीप शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत.


🔰आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरुस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा, असे मदान यांनी सांगितले.

11 शास्त्रज्ञ ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2021’ यांनी सन्मानित..



🔰26 सप्टेंबर 2021 रोजी 11 शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -


🔰पथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ बिनॉय कुमार सैकिया.


🔰जविक विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ अमित सिंह आणि डॉ अरुण कुमार शुक्ला.


🔰रासायनिक विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ कनिष्क बिस्वास आणि डॉ टी गोविंदराजू.


🔰अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ देबदीप मुखोपाध्याय.

गणित विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ अनिश घोष आणि डॉ साकेत सौरभ.


🔰वद्यकीय विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ. जिमोन पनीयामकल आणि डॉ रोहित श्रीवास्तव.

भौतिक विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ कनक साहा.

कबिनेट भूमीका मते



❇️रमसे मुर:-


🔳कबिनेट हे राज्याच्या नौकेचे सुकाणू आहे.


❇️लॉवेल:-


🔳ही राजकीय कमानीची आधारभूत शिळा होय.


❇️सर जॉन मॅरियॉट:-


🔳कबिनेट हा केंद्रबिंदू असून सर्व राजकीय यंत्रणा त्याभोवती फिरते.


❇️गलाडस्टोन:-


🔳हा सूर्यमालेतील मध्य असून इतर भाग त्याच्या भोवती परिभ्रमण करतात.


❇️बार्कर:-


🔳हा धोरणाचा चुंबक आहे.


❇️बागेहॉट:-


🔳ह जोडणारे एक संयोग चिन्ह आहे आणि कार्यकारी व कायदेविषयक विभाग याना जोडणारा दुवा आहे.


❇️आयव्हर जेंनीग्ज:-


🔳ह ब्रिटनच्या घटनात्मक व्यवस्था चा गाभा असून ते शासनव्यवस्था ला एकसंध बनविते.


❇️एल एस एमरी:-


🔳ह निदेश देणारे सरकारचे मध्यवर्ती केंद्र आहे.

2021 मागणीपत्र


(28 सप्टेंबर पर्यंत )

STI -190
ASO -106
PSI -

Tax Assistant - 117
Clerk - 514
Excise -

📌 राज्यसेवा

DC -12
DySP -17
MFAS -15
Labour Commi- 22
Tahsildar -

SO - 43
DEO - 25
ARTO - 4
SKill officer- 16
Labour officer - 54

( संख्या आणि पदांमध्ये बदल होऊ शकतो पण 90% अचूकता आहे )

Wednesday 29 September 2021

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

राज्यघटनेतील परिशिष्ट्ये (Schedules)



सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.

परिशिष्ट – 1 –   घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)


परिशिष्ट – 2 –   राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील


परिशिष्ट – 3 –   विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने


परिशिष्ट – 4 –   राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद


परिशिष्ट – 5 –   अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण


परिशिष्ट – 6 –   उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन


परिशिष्ट – 7 –   केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती


परिशिष्ट – 8 –   राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)


परिशिष्ट – 9 –   विविध कायद्यांची माहिती


परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती


परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी


परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी


अजित पवारांकडे वस्तू आणि सेवा कर मंत्रिगटाचे अध्यक्षपद



🔰वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करून त्यातील गळती रोखून ती अधिक सुटसुटीत करण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यंच्या अध्यक्षतेखाली आठ राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा मंत्रिगट के ंद्रीय वित्त मंत्रालयाने स्थापन के ला आहे. अजितदादा   राष्ट्रीय पातळीवर प्रथमच महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.


🔰वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या अलीकडेच लखनौत झालेल्या बैठकीत प्रणालीतील गळती दूर करण्याबाबत चर्चा झाली.  सध्याच्या रचनेत काही बदल के ले जाणार आहेत. हे बदल सुचविण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्यात आलाआहे. 


🔰अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटात दिल्ली, हरयाणा, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा समावेश आहे. हा मंत्रिगट वेळोवेळी वस्तू आणि सेवा परिषदेला सूचना किं वा शिफारसी करणार आहे.

महत्वाची बातमी - आरोग्य विभागाची परीक्षा आता २४ व ३१ ऑक्टोबरला - आरोग्यमंत्री टोपे



🔰आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपाने देखील या मुद्य्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली आहे.


🔰दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात आज महत्वपूर्ण माहिती दिली. या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची त्यांनी सांगितले असून, त्यानुसार आता गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय आज (सोमवार) आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे.


🔰या संदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ”कोणताही धोका न पत्करता या दोन्ही दिवशी रविवार असल्याने, शाळा शंभर टक्के उपलब्ध होतातच. या अनुषंगाने या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बैठकीत अन्य बाबींवर देखील चर्चा झाली. त्यामध्ये डॅशबोर्ड केला पाहिजे, त्यावर सगळ्या परीक्षा केंद्रांची यादी दिली पाहिजे,


🔰विद्यार्थ्यांची यादी डॅशबोर्डवर दर्शवली गेली पाहिजे. हे त्यांनी एक वेळापत्रक देऊन एक साधारणपणे १ ऑक्टोबरला त्यांनी डॅशबोर्ड द्यावा. संपूर्ण विद्यार्थ्यांची व परीक्षा केंद्रांची यादी त्यांनी दिली पाहिजे. याशिवाय त्या संबंधित शाळांनी देखील या परीक्षा केंद्रांना मान्यात दिलेली असलं पाहिजे. त्यामुळे योग्यप्रकारे ऑडिट करण्याचं काम होईल. त्यांना असं बंधनकारक केलं आहे जे अगोदर देखील केलेलं होतं की, ९ दिवस अगोदर सर्व परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले पाहिजेत.याबाबत देखील खात्री केली जाईल.

स्पेनमधील ज्वालामुखीच्या उद्रेकात घट



🔰सपेनमधील बेटांवरील ज्वालामुखीच्या उद्रेकात पाचशे इमारती गाडल्या गेल्या असून सुमारे सहा हजार लोक विस्थापित झाले आहेत. आता गेल्या आठवडय़ापासून या ज्वालामुखीतून राख व लाव्हारस बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी उद्रेकाची प्रक्रिया संपली असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. कॅनरी आयलंड टेलिव्हिजनन जी दृश्ये दाखवली त्यानुसार ला पामा बेटावर कुंब्रे  विजा पर्वतराजीत आता राखेचे लोट दिसत नाहीत.


🔰१९ सप्टेंबरला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ला  पामा ज्वालामुखी हा कमी सक्रियतेच्या टप्प्यात असून माद्रिद येथील इन्स्टिटय़ूट ऑफ जिओसायन्सेस या संस्थेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्वालामुखीची तीव्रता कमी झाली आहे. आगामी काळात त्याची वाटचाल कशी होते हे पहावे लागेल.


🔰सपेनमधील ला पामा बेटावरील लोकांनी विषारी वायू टाळण्यासाठी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. अजूनही लाव्हा रस एक हजार अंश तापमानापर्यंत जाऊ शकतो व त्याचे वहन होऊ शकते. अ‍ॅटलांटिक महासागरात हा लाव्हारस वीस अंश सेल्सियस तापमानाने मिसळत आहे. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, औष्णिक धक्क्य़ाने पाण्याची वाफ होत असून हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत आहे. ज्वालामुखीपासून काचेसारखे कण तयार होत असून त्यामुळे श्वसनमार्गात अडथळे येतात.

भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..


🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.


🐅मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)

🐅सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)

🐅पच (महाराष्ट्र)

🐅वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)

🐅दधवा (उत्तरप्रदेश)

🐅सदरबन (पश्चिम बंगाल)

🐅पारंबीकुलम (केरळ)

🐅बदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)

🐅मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)

🐅“जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा

 

🌸(CA|TS)” विषयी...


🐅CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.


🐅2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.


🌸पार्श्वभूमी...


🐅दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला. 

आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारी - पंतप्रधान मोदी.



🔰आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवील, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार असून त्यात आरोग्याविषयक नोंदी असतील  असे त्यांनी स्पष्ट केले.


🔰ही योजना कार्यान्वित करताना त्यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेत बदल होत गेले, त्यात हा नवा टप्पा आहे.


🔰यातील आयुष्मान भारत डिजिटल योजनेचा पथर्शक प्रकल्प हा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लय़ावरून १५ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केला होता.  सध्या आयमुष्मान भारत डिजिटल योजना पथदर्शक पातळीवर सहा केंद्रशासित प्रदेशात राबवली जात होती.  आता ती देशभरात राबवण्यात येत असून त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य  प्राधिकरण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची  तिसरी वर्षपूर्ती साजरी करीत आहे.

हवेत अचुक लक्ष्यभेद करणाऱ्या ‘आकाश प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.



🔰डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमीनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारीत आवृत्तीची ‘आकाश प्राईम’ ची यशस्वी चाचणी आज घेतली. ओडिशातील चांदीपुर इथल्या एकात्मित चाचणी तळावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या आकाश क्षेपणास्त्राच्या तुलनेत नव्या दमाच्या आकाश प्राईममध्ये स्वदेशी उपकरणांचा जास्त वापर करण्यात आला आहे. 


🔰आकाश प्राईममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणखी अचुकतेने ग्रहण करणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच उंचावर गेल्यावर थंड हवेतही खात्रीशीर काम करु शकेल अशा पद्धतीच्या सुधारणा या आकाश प्राईममध्ये करण्यात आल्या आहेत. आकाश प्राईमची चाचणी करतांना जमिनीवरील आवश्यक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्वांमुळे जमीनीवरुन हवेतील लक्ष्यभेद करण्याची भारताची संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. 


🔰३० किलोमीटरच्या परिघातील जमिनीपासून २० किलोमीटर उंचीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची आकाश क्षेपणास्त्राची मूळ क्षमता आहे. ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने आकाश क्षेपणस्त्र लक्ष्यभेद करु शकते. तेव्हा आकाश प्राईमच्या रुपात आकाश क्षेपणास्त्रात आणखी अचूकता आली आहे.

दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम..



🔰राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दुग्ध व्यवसायात कार्य करणाऱ्या महिलांसाठी देशव्यापी प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे.


🔰27 सप्टेंबर 2021 रोजी हरियाणामधील हिसार येथील लाला लाजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पहिला प्रकल्प महिला बचत गटाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


🔰दग्ध व्यवसाय क्षेत्राशी जुळलेल्या महिलांची प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग (NCW) देशभरातील कृषी विद्यापीठांसोबत भागीदारी करीत आहे.


🔰परशिक्षणादरम्यान क्षेत्रात विस्तार उपक्रम राबविण्यासाठी शास्त्रीय प्रशिक्षण आणि व्यवहारिक कल्पनांद्वारे महिला शेतकरी आणि बचत गटांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.


🔴राष्ट्रीय महिला आयोग (NCW) विषयी...


🔰राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ही भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे. आयोग सर्वसाधारणपणे महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींच्या संदर्भात सरकारला सल्ला देते. आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

अ‍ॅमेझॉन ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनी.



🎬ऑनलाइन व्यापारातील महाकाय कंपनी अमेझॉन ही दुसरी ‘इस्ट इंडिया कंपनी’च आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ या नियतकालिकातील मुख्य लेखात करण्यात आला आहे. ‘इस्ट इंडिया कंपनी २.०’ असे या लेखाचे शीर्षक आहे.


🎬‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी या नियतकालिकाच्या आगामी अंकाचे मुखपृष्ठ ट्वीटरवर प्रसारित केले. मुखपृष्ठावर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्रही आहे. ‘पांचजन्य’च्या ३ ऑक्टोबरला बाजारात येणाऱ्या अंकात अ‍ॅमेझॉनवर कडाडून टीका करणारी ‘मुखपृष्ठ कथा’ करण्यात आली आहे. त्यात या कंपनीचे वर्णन ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे करण्यात आले आहे. ‘भारतावर कब्जा मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात जे केले, तेच अ‍ॅमेझॉनच्या कृतींमधून दिसून येते,’ असे या लेखात नमूद केले आहे.


🎬‘अ‍ॅमेझॉन’ने सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी फार मोठी रक्कम वापरल्याचे उघड केल्याचे ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘आयएएनस’ या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीमुळे लाच देण्याची गरज भासते असा प्रश्न अ‍ॅमेझॉनला विचारायला हवा, असे ते म्हणाले.

Saturday 25 September 2021

Online Test Series

भारतातील लोकनृत्ये

🔸 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
🔹 तामिळनाडू : भरतनाट्यम
🔸 केरळ : कथकली
🔹आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
🔸 गुजरात : गरबा , रास
🔹 ओरिसा : ओडिसी
🔸 जम्मू व काश्मीर : रौफ
🔹 पंजाब : भांगडा , गिद्धा
🔸 आसाम : बिहू , झूमर नाच
🔹 उत्तराखंड : गर्वाली
🔸 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
🔹 मेघालय : लाहो
🔸 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
🔹 मिझोरम : खान्तुंम
🔸 गोवा : मंडो
🔹 मणिपूर : मणिपुरी
🔸 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
🔹 झारखंड : कर्मा
🔸 छत्तीसगढ : पंथी
🔹 राजस्थान : घूमर
🔸 पश्चिम बंगाल : गंभीरा
🔹 उत्तर प्रदेश : कथक

उज्ज्वला 2.0” योजना



🔰19 सप्टेंबर 2021 रोजी मध्य प्रदेश राज्यात “उज्ज्वला 2.0” (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जबलपूरमध्ये आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जवळपास 5 लक्ष महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅसच्या (LPG) जोडण्या देवून शुभारंभ करण्यात आला.


❄️उज्ज्वला 2.0 योजनेचे वैशिष्ट्य


🔰खड्यातून अनेकजण कामासाठी शहरात स्थलांतरीत होतात. तिथे त्यांना अधिवासाचा पुरावा दाखवण्याबाबतच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता कामगारांना अधिवासाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. गॅस जोडणी मिळवण्यासाठी त्यांना फक्त आपल्या पत्त्याबाबत स्वघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.


❄️परधानमंत्री उज्ज्वला योजना


🔰परधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

MPSC 2022: पुढच्या महिन्यात जाहीर होणार वेळापत्रक



🔰राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता आयोगाने पटापट सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढच्या वर्षात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं आयोगाने सांगितलं असून तसेच प्रलंबित निकाल ३० सप्टेंबरपर्यंत लावण्याचे देखील नियोजन आयोगाकडून केलं जात आहे. परिपत्रक जारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही माहिती दिली आहे.


🔰राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे.


🔰एमपीएससीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.


🔰अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत. त्या जागांची माहिती एमपीएससीला कळवायची आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे.


🔰जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या आहेत. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले होते.

करोनाबाधित आढळल्यानंतर ३० दिवसांत केलेली आत्महत्या म्हणजे करोनामृत्यूच- केंद्र



🔰कद्राने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले की, करोनाबाधित आढळणाऱ्या व्यक्तीने 30 दिवसांच्या आत आत्महत्या केल्यास त्यास करोनामृत्यूच ठरवले जाईल. यामुळे मृताच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत मिळणार आहे.


🔰करोनामृत्यू कशास म्हणावे याबद्दलच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सरकारने म्हटले होते की करोना संसर्गादरम्यान विषबाधा, आत्महत्या, हत्या, अपघात इत्यादीमुळे झालेल्या मृत्यूला करोनामृत्यू मानले जाणार नाही. न्यायालयाने सरकारला या अटीवर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.


🔰गरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने महामारीला बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत निधी निश्चित केल्याबद्दल सरकारने आनंद व्यक्त केला. “आज आम्ही खूप आनंदी आहोत. ज्या लोकांना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी हे सांत्वन ठरेल. सरकार करत असलेली प्रत्येक गोष्ट ज्यांना त्रास झाला त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.


🔰भारताने जे केले ते इतर कोणताही देश करू शकला नाही याची आम्हाला न्यायालयीन दखल घ्यावी लागेल, ”अशी टिप्पणी न्यायमूर्ती शाह, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने केली आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिका



🔰 नाव    -     शहर     -     स्थापना 🔰


१) बृहन्मुंबई महानगरपालिका - मुंबई - १९८८


२) पुणे महानगरपालिका - पुणे - १९५०


३) नागपूर महानगरपालिका - नागपुर - १९५१


४) ठाणे महानगरपालिका - ठाणे - १९८२


५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका -  पुणे -१९८२


६) नाशिक महानगरपालिका - नाशिक - १९८२


७) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण - १९८२


८) वसई-विरार महानगरपालिका - पालघर - २००९


९) औरंगाबाद महानगरपालिका  - औरंगाबाद - १९८२


१०) नवी मुंबई महानगरपालिका - नवी मुंबई -  १९९२


११) सोलापूर महानगरपालिका - सोलापूर - १९६४


१२) मीरा-भाईंदर महानगरपालिका -ठाणे - २००२


१३) भिवंडी-निजामपुर महानगरपालिका - ठाणे - २००२


१४) अमरावती महापालिका - अमरावती - १९८३


१५) नांदेड-वाघाळा महानगरपालिका - नांदेड -१९९७


१६) कोल्हापूर महानगरपालिका - कोल्हापूर - १९७२


१७) अकोला महानगरपालिका - अकोला - २००१ 


१८) उल्हास नगर महानगरपालिका - ठाणे - १९९८


१९) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका - सांगली - १९९८


२०) मालेगाव महानगरपालिका - नाशिक - २००३


२१) जळगाव महानगरपालिका - जळगाव - २००३


२२) लातूर महानगरपालिका - लातूर - २०१२ 


२३) धुळे महानगरपालिका - धुळे - २००३


२४) अहमदनगर महानगरपालिका - अहमदनगर - २००३


२५) चंद्रपूर महानगरपालिका - चंद्रपुर - २०११


२६) परभणी महानगरपालिका - परभणी - २०११


२७) पनवेल महानगरपालिका - रायगड  -  २०१६


🔸एकूण  महानगरपालिका : २७ ✅


🔹सर्वात मोठी महानगरपालिका : बृहन्मुंबई


🔸२७वी  महानगरपालिका : पनवेल

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही

उत्तर- 2

----------------------------------------------------------------

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल

उत्तर- 2
---------------------------------------------------------------

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

उत्तर- 2

---------------------------------------------------------------

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर- 3

---------------------------------------------------------------

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4.  यापैकी नाही

उत्तर-2

  ---------------------------------------------------------------

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा

उत्तर- 4

---------------------------------------------------------------

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम

उत्तर – 4

---------------------------------------------------------------

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर

उत्तर- 3
---------------------------------------------------------------

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक

उत्तर- 1

----------------------------------------------------------------

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका

उत्तर- 3

बौद्ध परिषदा



1⃣ पहिली बौद्ध परिषद


▪️काळ:-483 इ स पू

▪️अद्यक्ष:-महाकश्यप

▪️ठिकाण:-राजगृह

🏵राजा:-अजातशत्रू


2⃣ दसरी बौद्ध परिषद


▪️काळ:-387 इ स पू

▪️अद्यक्ष:-महास्तवीर रेवत

▪️ठिकाण:-वैशाली

🏵राजा:-कालाशोक


3⃣ तिसरी बौद्ध परिषद


▪️काळ:-243 इ स पू

▪️अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स

▪️ठिकाण:-पाटलीपुत्र

🏵राजा:-अशोक


4⃣ चौथी बौद्ध परिषद


▪️काळ:-पहिले शतक

▪️अद्यक्ष:-वसुमित्र

▪️ठिकाण:-कुंडलवण

🏵 राजा :-कनिष्क

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------


१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई

भारताची राष्ट्रीय प्रतिके



Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

उत्तर: वाघ


Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

उत्तरः मोर 


Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?

उत्तरः गंगा डॉल्फिन


Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

उत्तरः आंबा


Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

उत्तर: कमळ


Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)


Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

उत्तरः हॉकी


Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?

उत्तर - 3 : 2


Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर


Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

उत्तरः वंदे मातरम्


राष्ट्रीय मुद्रा  रुपया

राष्ट्रीय फळ  आंबा    

राष्ट्रध्वज  तिरंगा  

राष्ट्रचिन्ह  राजमुद्रा  

ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)

 1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?

(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


 1)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?

(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚



3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


 4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?

(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?

(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2



🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚


6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?

(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I



7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?

(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?


(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439



9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?

(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?

(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅


1 '' स्मार्ट ब्लँक बोर्ड '' योजना राज्यात लागु केली  गेली आहे ?

1) अरूणाचल प्रदेश

2)महाराष्ट्र

3)तामिळनाडू✅✅

4)गुजरात




 2. कोणत्या देशाने २०२६ पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

भारत

चीन 

अमेरिका ✔️✔️

इस्त्राईल


3. जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या  देशाने मदत केली ? 

 अमेरिका

 फ्रान्स

 रशिया

 जपान✔️✔️



 4. कोणत्या राज्य सरकारने "एक मास्क अनेक जिंदगी " मोहिम राबविण्यास सुरूवात केली?

राजस्थान

मध्यप्रदेश✔️✔️

महाराष्ट्र

गुजरात


 5. आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे , ते कोठे आहे ?

 भूज ( गुजरात )

 कच्छ ( गुजरात )✔️✔️

 मुत्पनडल ( तामिळनाडू )

 मनिकरण ( हिमाचल प्रदेश )


6. GSTला मान्यता देणारे पहिले राज्य कोणते?

छत्तीसगड़

आसाम✅✅

बिहार

झारखंड


 7.  भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे ?


 कानपूर

 मुंबई

 नवी दिल्ली✔️✔️

 कर्नाल


8.सरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या  शहरात भारताच्या पहिल्या प्रगत ' हायपरसॉनिक विंड टनेल ' चे उद्घाटन केले ?

 दिल्ली

 तिरुअनंतपुरम

 हैदराबाद ✔️✔️

 इंदौर



 9. भारताचे प्रथम लिंग डेटा केंद्र ...... मध्ये   स्थापित केले जाईल ?

मुंबई

केरळ ✔️✔️

दिल्ली

हैदराबाद




 10. '' बँक टू व्हिलेज '' कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे ?

1) दिल्ली 

2) गोवा

3) जम्मु काश्मिर✅✅

4) दमण -  दीव


 कोणत्या राज्य सरकारकडून नुकतेच वर्ष 2021-2022 च्या अर्थसंकल्पात कोणत्या ठिकाणी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट  स्थापन करण्यास मंजूरी दिली.


चालू घडामोडी

 Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?

उत्तर :- पुलियार


Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?

उत्तर :-  यूएस चेंबर ऑफ कॉमर्स


Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?

उत्तर :- आर्यना सबलेन्का


Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स


Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?

उत्तर :-  शेन्झेन


Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?

उत्तर :- अनस्टॉपेबल


Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर :- मेघन मर्केल


Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?

उत्तर :- 7 मे


Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?

उत्तर :- तेलंगणा


Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?

उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी


Q11) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?

उत्तर :- 12


Q12) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?

उत्तर :-  जपान


Q13) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?

उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना


Q14) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?

उत्तर :-  ब्लॅक फंगस


Q15) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?

उत्तर :- एस. जानकीरमन


Q16) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?

उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!


Q17) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :-  क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन


Q18) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?

उत्तर :- सागरी अभयारण्य


Q19) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?

उत्तर :-  राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण


Q20)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?

उत्तर:- मुंबई


Q21) कोणत्या व्यक्तीची आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली?

उत्तर :- हेमंत बिस्वा सरमा


Q22) कोणत्या व्यक्तीने ‘2021 लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकला?

उत्तर :-  राफेल नदाल


Q23) कोणता देश द्वितीय विश्वयुद्धात जर्मनी देशाने आत्मसमर्पण केल्याचा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा करतो?

उत्तर :- रशिया


Q24) कोणत्या संस्थेने ‘नेचर इन ए ग्लोबलाइज्ड वर्ल्डः कन्फ्लिक्ट अँड कन्झर्वेशन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :- IUCN


Q25) हिंद महासागरात अनियंत्रित स्थितीत पडलेला ‘लाँग मार्च 5B’ अग्निबाण कोणत्या देशाचा आहे?

उत्तर :- चीन


Q26) विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक सामाजिक कल्याणसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

उत्तर :-  CBSE दोस्त फॉर लाइफ


Q27) राजकीय आणि धार्मिक संस्थांना SSE मंचाद्वारे निधी उभा करण्यास परवानगी न देण्याची शिफारस करण्यात आलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE) या मंचांच्या संदर्भातील तांत्रिक गटाचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :-  हर्ष कुमार भानवाला


Q28) कोणत्या राज्यात ‘हक्की पिक्की’ ही आदिवासी जमाती आढळते?

उत्तर :-  कर्नाटक


Q29) कोणते जल जीवन अभियानाच्या अंतर्गत ‘हर घर जल’ संकल्प पूर्ण करणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले?

उत्तर :-  पुडुचेरी


Q30) कोणत्या संस्थेने “कनेक्टेड कॉमर्स: क्रिएटिंग ए रोडमॅप फॉर ए डिजिटली इंक्लूसिव भारत" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :- नीती आयोग



आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा


1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45




2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल 

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅




3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅


पहिला टप्पा =6जानेवारी 2021



4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड




5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅





 9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched


Hight=44.4miter




 8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा




10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा

चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान



थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली


 डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर


जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर


(ड) 2 नोव्हेंबर


# : फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात "Parivarthanam" योजना सुरू केली?


(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️

Explanation  : scheme for better livelihood of fisher folk?


कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?

(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान   


 

#  :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो? 

अ) राष्ट्रीय शिक्षक दिन 

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन 

ड) शिक्षक दिन     


  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? 

अ) 25 वे 

ब) 26 वे    

क) 27 वे  

ड) 28 वे✔️     


अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप


Answer  : the JC Daniel Award 2020   

 अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक


आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️


Answer  : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)


ऑक्टोबर 2020  रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️


नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा


कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स


Answer  :-  Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 ) 


# : कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश


# : नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ    

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️   



ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय 

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही


आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर





प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी


 जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


 राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


प्रश्नः कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, " बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय " करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही


 केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...