Friday 30 July 2021

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक



‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिवस. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊ सविस्तर...


*टिळकांचा जीवनप्रवास :*


▪️ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. 


▪️ पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र 19 व्या वर्षी निवर्तले. 


▪️ 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 


▪️ 1876 साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.


▪️ महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. 


▪️ आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. 


▪️ दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच 2 जानेवारी 1880 ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. 


▪️ ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलने हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. 


▪️ टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. 


▪️ आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.


*टिळकांचं महत्वपुर्ण कार्य :*


▪️ 1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुलची स्थापना

▪️ 1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू

▪️ 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 

▪️ 1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले

▪️ ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिव जयंती’ उत्सवाला सुरूवात 

▪️ 1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद 

▪️ 1916 साली ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना 

▪️ टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हंटले गेले

▪️ टिळक ’लाल बाल पाल’ या त्रिमूर्तीमधील एक


दरम्यान, 1 आॅगस्ट 1920 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा



भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊयात सविस्तर...


टाटा यांचा जीवनप्रवास :


▪️ ज. आर. डी. टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला. उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव होते. 


▪️ सझान ब्रीअरे. त्या फ्रेंच होत्या. रतनजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाची स्थापना करणाऱ्या सर जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू होते. 


▪️ ‘जेआरडी’ यांची आई ही भारतात १९२९ मध्ये कार चालवणारी पहिली महिला होती. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. 


▪️ टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. 


▪️ फरान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. १९२५मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 


▪️ १९३८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. 


▪️ तयामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला. उद्योगात मूल्य आणि तत्त्वे यांचा पाया बळकट करून त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा आदर्श जगासमोर उभा केला. 


▪️ टाटा म्हणजे विश्वासार्हता, हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली. 


▪️ ८८ व्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या ‘जेआरडीं’च्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या ९५ झाली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. 


▪️ तयांच्याच मार्गदर्शनाखाली १९४१मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार, संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले. 


▪️ १९३६ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, १९४५मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राष्ट्रीय सादरीकरण कला केंद्र या संस्थांची स्थापनाही ‘जेआरडीं’नी केली. १९४५ मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली. 


▪️ १९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली. ‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते. देशात सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. 


▪️ तयासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दाखल घेऊन त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 


▪️ दरम्यान, देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते. या महान उद्योजकाचा १९९३ मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हामध्ये मृत्यू झाला.

वडील - मुलगा एकाच राज्याचे मुख्यमंत्री



👨‍👦 बीजु पटनायक - नवीन पटनायक (ओडिशा)


👨‍👦 एम करुणानिधी - स्टॅलिन (तमिळनाडू)


👨‍👦 शिबु सोरेन - हेमंत सोरेन (झारखंड)


👨‍👦 मलायमसिंह यादव - अखिलेश (उत्तरप्रदेश)


👨‍👦 राजशेखर रेड्डी - जगनमोहन (आंध्रप्रदेश)


👨‍👦 शख अब्दुल्ला - फारुख अब्दुल्ला (जे&के)


👨‍👦 फारुख अब्दुल्ला - उमर अब्दुल्ला (जे&के)


👨‍👦 दवी लाल - ओम प्रकाश चौटाला (हरियाणा)


⭐️ शकरराव चव्हाण - अशोक चव्हाण (महाराष्ट्र)


👨‍👦 पीए संगमा - कोनराड संगमा (मेघालय)


👨‍👦 रविशंकर शुक्ला - श्यामा चरण (मध्यप्रदेश)


👨‍👦 दोरजी खांडू व पेमा खांडू (अरुणाचल)


👨‍👦 एचडी देवेगौडा - कुमारस्वामी (कर्नाटक)


👨‍👦 एस आर बोम्मयी - बसवराज (कर्नाटक)

मीराबाई चानु .... 'लाकूडतोड ते अॉलिंपिक पदक!'

 


मीराबाई चा जन्म मणीपूर मधल्या एका खेड्यातला! 'लाकूड' हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडं आणण्यासाठी आपल्या भावंडांबरोबर जायची. सहा भावंडातली ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडं ती घेऊन यायची. तिनं आणलेली मोळी तिच्या मोठ्या  भावांनाही  उचलता येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचं होतं. मात्र आठवीच्या पुस्तकात तिनं मणीपूरच्याच कुंजराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिचं जीवनाचं ध्येय ठरलं... वेटलिफ्टरच व्हायचं! 


नंतर खडतर परिश्रम करत राज्य पातळीवर,  राष्ट्रीय पातळीवर तिनं उत्तम चमक दाखवली. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स , जागतिक चँपियनशिप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिनं सुवर्णपदकं जिंकली. 


पण सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे अॉलिंपिक ! 2015 च्या रिओ अॉलिंपिक मधे तीन प्रयत्नात ही वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या कारकीर्दीला लागलेला हा फार मोठा डाग होता. 2015 नंतर तिनं वर नमूद केल्याप्रमाणे अनेक पदकं जिंकलेली असली तरी रिओ मधील अपयशाची भरपाई झाली नव्हती. 


त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणंही अशक्य झालं. तशात कोवीडचं संकट ! लॉकडाऊन मुळे प्रॕक्टिस पूर्णपणे बंद! करियर संपणार की काय अशी सर्वांना धास्ती वाटू लागली. पण केंद्र सरकारनं 71 लाख रुपये खर्च करुन तिला ट्रेनिंग आणि प्रॕक्टिस साठी अमेरिकेत पाठवलं.. अॉक्टोबर 2020 मधे. तिथल्या प्रशिक्षणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणं शक्य होऊ लागलं. हळूहळू दिवसातून दोनदा सराव करायलाही जमू लागलं. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खूष झाले. 


... आणि पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला ... टोकियो अॉलिंपिक ! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती. 49 कि. गटात तिनं, 'क्लीन अँड जर्क' मधे 115 किलो वजन उचलून नवीन अॉलिंपिक रेकॉर्ड केलं. आणि एकूण 202 किलो वजन उचलून तिनं 'सिल्व्हर मेडल' जिंकलं. संपूर्ण देशात आनंदाची लहर उमटली. 


जे हात  लाकडाची मोळी वाहून आणत होते तेच आज 'अॉलिंपिक पदक' अभिमानानं उंचावत आहेत. अतिशय प्रेरणादायी अशी ही जीवनकथा !

आता शालेय पुस्तकात मीराबाईच्याही जीवनावरचा एक धडा समाविष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...