Saturday 18 January 2020

मायकेल पात्रा: RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

🔆भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत.

🔆विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहणार. भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध विभागात 35 वर्षांचा पात्रा यांना अनुभव आहे.

💢डॉ. मायकेल पात्रा...

🔆IIT मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले डॉ. पात्रा हे 2005 सालापासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करीत आहेत. 1985 साली ते भारतीय रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केले. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार राहिले आहेत.

💢RBI विषयी...

🔆भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔆‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

🔆RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

ए. पी. माहेश्वरी: CRPF चे नवे महानिदेशक

🔰 केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

🔰 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

🔰 उत्तरप्रदेश संवर्गातून 1984च्या तुकडीचे IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) आहेत.

🔰 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

🔴 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

🔰 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) याची स्थापना ‘क्राऊन रिप्रेझेंटेटीव्ज पोलीस’ या नावाने 27 जुलै 1939 रोजी झाली.

🔰 नक्षलविरोधी कारवाई आणि जम्मू व काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी कारवाया यांची जबाबदारी असलेले देशातले आघाडीचे अंतर्गत सुरक्षा दल आहे.

🔰 त्यात 3.25 लक्षहून अधिक सैनिकांसह हे दल जगातले सर्वात मोठे निमलष्करी दल ठरते.

हर्नाडेझ बार्सिलोनाचा मुख्य प्रशिक्षक

🌀स्पेनला २०१०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मातब्बर खेळाडू आणि बार्सिलोनाचा माजी कर्णधार हॅव्हिएर हर्नाडेझ लवकरच बार्सिलोनाच्याच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कतार प्रीमियर लीगमध्ये अल-साद संघाला मार्गदर्शन करणाऱ्या हर्नाडेझच्या भवितव्याविषयी स्वत: क्लबच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे.

🌀बार्सिलोनाचे सध्याचे प्रशिक्षक इर्नेस्टो व्हॅलवरेड यांची लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे हर्नाडेझकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेषत: स्पॅनिश सुपर चषकातील उपांत्य फेरीत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

🌀‘‘हर्नाडेझ बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्याच्या चर्चाना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. परंतु तूर्तास तरी अल-साद संघासोबतचा त्याचा करार संपलेला नाही,’’ असे अल-साद क्लबचे क्रीडा संचालक मोहम्मद गुलाम अल-बलुशी म्हणाले. मात्र याविषयी अंतिम निर्णय दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाचा असेल, असेही अल-बलुशी यांनी सांगितले.

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला..

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

🧬या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

🧬होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी...

🧬पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे. होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे. ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

🧬या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत. कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.

महत्त्वाचे प्रश्नसंच

१) मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा वापर होत नाही?(MPSC Main-IV 2016)
१) साक्षरता दर                         २) दरडोई स्थल देशांतर्गत उत्पन्न
३) जन्माच्यावेळी जगण्याचा दर        ४) कृषी उत्पादकता

२) २०१४ च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारत आणि त्याचा शेजारील देश पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत. (MPSC Main-IV 2015)
१)१३५ व १७४             २)१२६ व १३६
३) १३५ व १४६ व          ४)१२५ व १४७

३) जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (२०१०) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main IV-2015)
अ) विकसनशील अर्थव्यवस्था खाली विश्वाची सुमारे ८३ टक्के लोकसंख्या आहे, ती जगाच्या सुमारे ३८ टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.
ब) युरोपातील काही देश विकसनशील आर्थव्यवस्था दर्शवितात.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब            ३) दोन्ही          ४) एकही नाही

४) भ्रष्टाचाराबाबतच्या विधानांचा विचार करा.(MPSC Main-IN 2015)
अ) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही विविध देशातील भ्रष्टाचाराचे प्रमाण मोजणारी संस्था आहे.
ब) संस्थेने २०१४ यावर्षात १७५ देशांतील भ्रष्टाचाराचा अभ्यास केला,
क) भारताला १०० पैकी ३८ गुण मिळाले.
ड) १७५ देशांमध्ये भारताला ८५ वा क्रमांक मिळाला,
इ) स्वित्झर्लंड सगळ्यात शिखरावर आहे.
फ) सोमालिया सगळ्यात खाली आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत?
१)क       २) ड        ३) इ        ४) फ

५) २०१४ या मानवी विकास निर्देशांका संदर्भात जुळणी करा. (MPSC Main -IN 2015)
अ) सिंगापूर         i) ०.८९१
ब) इस्त्रायल        ii) ०.९०१
क) जपान          iii) ०.८८८
ड) दक्षिण कोरिया  iv) ०.८९०

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -२, ४ - ३, ५ - १

६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

१०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ६- २, ७- ४, ८-२, ९ -२, १०-१

१) भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमख कारणे कोणती?(MPSC Main -IN 2015)
अ) मालमत्तेची खाजगी मालकी
ब) वारसाहक्काचा कायदा
क) करचुकवेगिरी ड) समांतर अर्थव्यवस्था

पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) ब,क आणि ड
३) अ,क आणि ड
४) वरील सर्व

२) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main -IV 2015)
अ) यु.एन.डी.पी. च्या (२०१४ च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार १५२ देशांमध्ये भारताचा १२७ वा क्रमांक लागतो.
ब) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत १८७ पैकी १६५वा आहे.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब          ३) दोन्ही         ४) एकही नाही

३) (UNDP) च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (२००९) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही?(MPSC Main -IV 2015)
(भारताची आयु अपेक्षा ६३.४ व प्रौढ साक्षरताटक्केवारी (२००७) ६६ होती)
अ) अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा २००७ सुमारे ८४ होती.
ब) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी २००७ मध्ये सुमारे ९९ होती.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ       २) केवळ ब          ३) दोन्ही       ४) एकही नाही

४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचे नाव काय?(MPSC Main-IN 2015)
१) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक
२) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक
३) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक
४) पर्यावरणीय कुज़्नेत्स वक्र गृहितक

५) लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो? (MPSC Main-IV 2015)
अ) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान
ब) स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर
क) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न
ड) शेतात काम करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी

१)ड,ब,अ        २) अ,ब,क       ३) क,ड,ब          ४) अ,ब,क,ड

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -१, ४ - ४, ५ - २.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 16 जानेवारीला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ______ प्रदेशामध्ये पहिली-वहिली अन्नप्रक्रिया शिखर परिषद आयोजित केली गेली.

(A) जम्मू
(B) सिक्किम
(C) लडाख✅✅
(D) हरयाणा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता रशियाचे पंतप्रधान कोण आहेत?

(A) मिखाईल मिशूस्टीन✅✅
(B) रॉबर्ट अबेला
(C) मॅन्युएल व्हॅल्स
(D) महिंदा राजपक्षे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?

(A) चीन✅✅
(B) भारत
(C) रशिया
(D) इस्त्राएल


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबत सामंजस्य करार केला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश✅✅
(B) आसाम
(C) मणीपूर
(D) मिझोरम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने 9 फेब्रुवारीला “हेल्थ रन” नावाने एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे?

(A) राजस्थान
(B) हरयाणा
(C) महाराष्ट्र✅✅
(D) उत्तरप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अरुणाचल प्रदेश विधानसभेनी नवीन बोधचिन्ह स्वीकारले


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
- अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेनी नवीन बोधचिन्हाचा स्वीकार केला आहे, जो राज्याची विशिष्ट ओळख आणि संस्कृती प्रतिबिंबित करतो.

▪️ठळक बाबी

- नवीन बोधचिन्हामध्ये राष्ट्रीय चिन्ह आणि फॉक्सटेल ऑर्किड (राइन्कोस्टाईलिस रेटुसा) हे राज्य पुष्प आहे.

- राष्ट्रीय चिन्ह भारतीय राज्यघटनेच्या महासंघ यंत्रणेचे प्रतीक आहे.

- फॉक्सटेल ऑर्किड हे राज्याचे राज्य फूल आहे. ते राज्याचे वैशिष्ट्य प्रदर्शित करते, तर फुलांचा निळा रंग विधानसभा सचिवालयाची स्वायत्तता दर्शवितो.

▪️अरुणाचल प्रदेश राज्य

- अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातले एक प्रमुख राज्य आहे. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य म्हणून 1987 साली स्थापना झाली. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. इटानगर ही राज्याची राजधानी आहे.

- हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू.

◾चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे.

◾महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती.

◾हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली.

◾हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.तसेच चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात.

◾मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे.

◾ हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे.

◾2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती.

◾हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे.

◾प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे.

◾ वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो.

◾चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 GB माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे.

◾फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.

◾टेलिस्कोपने आतापर्यंत जवळपास 44 पल्सरचा शोध लावला आहे.

◾ पल्सर हा वेगाने फिरणारा न्यूट्रॉन किंवा तारा असतो, जो रेडिओ लहरी आणि विद्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित करतो.

◾या टेलिस्कोपच्या पाच किमीच्या परिघामध्ये कोणतेही शहर नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्हाला हे पाठ आहेत ना - काही महत्वाची कलमे

1. घटना कलम क्रमांक 14
कायद्यापुढे समानता

2. घटना कलम क्रमांक 15
भेदभाव नसावा

3. घटना कलम क्रमांक 16
समान संधी

4. घटना कलम क्रमांक 17
अस्पृश्यता निर्मूलन

5. घटना कलम क्रमांक 18
पदव्यांची समाप्ती

6. घटना कलम क्रमांक 19 ते 22
मूलभूत हक्क

7. घटना कलम क्रमांक 21 अ
प्राथमिक शिक्षण

8. घटना कलम क्रमांक 24
बागकामगार निर्मूलन

9. घटना कलम क्रमांक 25
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

10. घटना कलम क्रमांक 26
धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

11. घटना कलम क्रमांक 28
धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

12. घटना कलम क्रमांक 29
स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40
ग्राम पंचायतीची स्थापना

15. घटना कलम क्रमांक 44
समान नागरिक कायदा

16. घटना कलम क्रमांक 45
6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

17. घटना कलम क्रमांक 46
शैक्षणिक सवलत

18. घटना कलम क्रमांक 352
राष्ट्रीय आणीबाणी

19. घटना कलम क्रमांक 356
राज्य आणीबाणी

20. घटना कलम क्रमांक 360
आर्थिक आणीबाणी

21. घटना कलम क्रमांक 368
घटना दुरूस्ती

22. घटना कलम क्रमांक 280
वित्त आयोग

23. घटना कलम क्रमांक 79
भारतीय संसद

24. घटना कलम क्रमांक 80
राज्यसभा

25. घटना कलम क्रमांक 81
लोकसभा

26. घटना कलम क्रमांक 110
धनविधेयक

27. घटना कलम क्रमांक 315
लोकसेवा आयोग

28. घटना कलम क्रमांक 324
निर्वाचन आयोग

29. घटना कलम क्रमांक 124
सर्वोच्च न्यायालय

30. घटना कलम क्रमांक 214
उच्च न्यायालय

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला

◾️भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

◾️या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

✍होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

◾️पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे.

◾️होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे.

◾️ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

◾️या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत.

◾️कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पियुष गोयल यांच्याकडे जागतिक आर्थिक मंच-2020 साठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व

🎆 दावोस येथे होणाऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांचा सहभाग

🎆 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दावोस येथे होणाऱ्या 50 व्या जागतिक आर्थिक मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. दावोस येथे 20 ते 24 जानेवारी 2020 दरम्यान जागतिक आर्थिक मंच-2020 चे आयोजन करण्यात आले आहे.

🎆 पियुष गोयल यांच्यासमवेत केंद्रीय नौवहन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, कर्नाटक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, पंजाबचे अर्थमंत्री, तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच इनव्हेस्ट इंडियाचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे.  

🎆 पियुष गोयल ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, सौदी अरब, स्वित्झर्लंड, कोरिया आणि सिंगापूर या देशांच्या मंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच ते जागतिक व्यापार संघटनेचे संचालक आणि आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था (ओईसीडी) च्या सरचिटणीसांना भेटणार आहेत.

🎆 याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि देशात जागतिक गुंतवणूक निर्माण करणे याविषयी बैठक घेणार आहेत.     

🎆 दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक व्यापर संघटनेच्या अनौपचारिक मंत्रीस्तरीय संमेलनातही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सहभागी होणार आहेत.

🎆 दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत जगातील आघाडीचे नेते जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. एकत्रित आणि शाश्वत विश्वाचे भागीदार ही यावर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे

मुंबई महापालिकेत मेगा भरती; लवकरच होणार ऑनलाईन परीक्षा


चतुर्थ श्रेणीतील कामगार, कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा मेगाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाची मेगा भरती लवकरच होणार आहे. महापालिकेतील ८१० कार्यकारी सहाय्यकांच्या रिक्तपदांची भरती होणार असून लवकरच याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेवून भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक वर्गातील एकूण ८१० रिक्तपदे सरळसेवेद्वारे भरण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी महापालिकेने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून या पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाईन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अंदाजित खर्च ७ कोटी ८० लाख ८३ हजार ५५० रुपये एवढा येणार आहे.

मुंबई महापालिकेत लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पध्दतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण १ लाख अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ९०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. तर मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ७०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीची निवड तसेच परीक्षा घेण्यास मंजुरी प्राप्त व्हावी यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी सष्ट केले.
सर्व उमेदवारांचे ऑनलाईन पध्दतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाईन यांच्या महा रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे.

महाआयटी आणि आय.बी.पी.एसची माघार
महापालिकेच्या या कार्यकारी सहाय्यक पदासाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु टंकलेखनाची चाचणी परीक्षा घेण्यास शासन नियुक्त महाआयटी आणि आय.बी.पी.एस या नामांकित संस्थांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी माघार घेतल्याने महाऑनलाईन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Latest post

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ? - पुणे. ०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ? - बाॅक्साईट. ०३) डाॅ.पंजाब...