Tuesday 30 June 2020

प्रमुख युद्ध सराव

गरुड़ : भारत-फ्रांस
गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया
वरुण : भारत- फ्रांस
हॅन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन
जिमेक्स : भारत-जपान
धर्मा गार्डियन : भारत-जपान
कजिन संधि अभ्यास : भारत-जापान तटरक्षकदल
सूर्य किरण : भारत-नेपाळ
सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल
लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल
कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी
इंद्रधनुष : भारत-ब्रिटन
मालाबार : भारत-अमेरिका-जपान
रेड फ्लैग : भारत-अमेरिका
कोप : भारत-अमेरिका
मित्र शक्ति : भारत-श्रीलंका
सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका
इंद्र : भारत-रशिया
नसीम अल बह्न : भारत-ओमान
सम्प्रीती : भारत- बांग्लादेश
औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल
नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय सेना
एकुवेरिन : मालदीव-भारत

महत्वाचे प्रश्नसंच

*सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

*देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

*देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

*देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

*देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

*देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

*देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

*देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

*देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

*देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

*देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

*देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

*देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

*देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

*देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

*देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

*देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

*देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

*देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

*देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

*देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

*देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

*देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

*देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

*देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

*देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

*देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

*देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

*देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

*देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

*देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

*देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

*देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

*देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

*देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

*देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

*देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

*देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

*देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

*देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

*देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

*देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

*देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

*देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

*देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

*देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

*देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

*देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

*देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा (नागालँड)

१)महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना १९२० बेलापूर (अहमदनगर)

२)महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना - १९५० प्रवरानगर (अहमदनगर)

३)सर्वाधिक गाळप क्षमता असलेला कारखाना - वसंददादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली.

४) प्रथम महिला सहकारी साखर कारखाना - तांबाळे (कोल्हापूर)

५) साखरेचे जास्त उत्पादन करणारा जिल्हा - कोल्हापूर

६) सर्वाधीक शुगर कारखाने असलेला जिल्हा - सोलापूर

७) वसंतदादा शुगर रिसर्च इन्स्टिटयुट- मांजरी पुणे

८) मध्यवर्ती उस संशोधन केंद्र - पाडेगांव (सातारा)

९) महाराष्ट्रातील सर्वाधीक साखर उतारा कारखाना - हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना वाळवे जि. सांगली (१२.६०%)

१०) महाराष्ट्रातील सर्वाधीक गळीत हंगाम कालावधी कारखाना - यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर जि. पुणे ( २६९ दिवस)

११) महाराष्ट्रातील सर्वाधीक ऊस गाळप कारखाना - कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे जि. सांगली ( १४ लाख मे टन)

१२) महाराष्ट्रातील सर्वाधीक क्षमतेचा वापर करणारा कारखाना - विघ्नहर्ता सहकारी साखर कारखाना जुन्नर जि. पुणे (१७२% )

लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनचा दावा.


💠दक्षिण चीन महासागरापासून लडाखपर्यंत दादागिरी करत असलेल्या चीननं आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या ५८ व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचं म्हटलं. दरम्यानस भूतानने चीनच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि तो भूतानचा अविभाज्य भाग असल्याचंही म्हटलं.

💠चीनच्या दाव्याच्या विरोधात, वास्तविकता अशी आहे की मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. तथापि, भूतान आणि चीन दरम्यान कोणतंही सीमांकन झालेलं नाही. चीनच्या या कृतीचा भूतातनं कडाडून विरोध केला आहे, “साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य व सार्वभौम भूभाग आहे,” असं भूताननं स्पष्ट केलं आहे.

💠इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण वादातील एक महत्त्वाची बाब म्हणजे हे वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. परंतु जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीननं या संधीचा फायदा घेत या भूभागावर आपला दावा केला. चीनच्या या प्रकल्पावा केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलनं याला मंजुरी दिली आहे.

“प्रोजेक्ट प्लॅटिना”: महाराष्ट्रात चाललेला जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प.

L▶️कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरतो. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प राबवविला जात आहे. या प्रकल्पाला “प्रोजेक्ट प्लॅटिना” असे नाव देण्यात आले आहे.

▶️नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ‘प्लॅटिना’ प्रकल्प केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले.

▶️महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. राज्यात ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तिथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहेत. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाणार.

🟣प्लाझ्मा थेरपीविषयी....

▶️प्लाझ्मा थेरपीमध्ये आजारातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यात येतात. जे रुग्ण बरे होऊन चालले आहेत त्यांनी 10 दिवसानंतर 28 दिवसांच्या आत प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे.

▶️विकित्सक रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढतात. बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात प्रतिजैवकांचा विकास झालेला असतो. प्लाझ्मापासून ही प्रतिजैवके प्राप्त करून एखाद्या रोग्याला दिले जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

▶️मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो.

मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांना १ हजार रुपये दंड

🚫प्रशासनाचा इशारा

◾️मुंबई : करोना संसर्गाचा उद्रेक कधीही होण्याची भीती असल्यामुळे घराबाहेर पडताना तोंडावर मुखपट्टया लावण्याचे बंधन न पाळणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिली आहे.

◾️ सार्वजनिक स्थळी वावरताना तसेच खासगी कार्यालयात व खासगी वाहनातही मुखपट्टी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

धुपेचे प्रकार

नाली धूप

पर्वतावर पाऊस पडतो मग तिथून नाले वाहतात व ते आपल्या सोबत मृदा वाहून नेतात

पर्वतीय प्रदेशात पावसामुळे अनेक नाले वाहू लागतात त्यामुळे पर्वत उतारावर खोल घड्या निर्माण होतात व फार मोठ्या प्रमाणावर धूप होते धूप च्या या प्रकाराला नाली धूप अथवा घडी धूप असे म्हणतात

सह्याद्री महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगा व सातपुडा पर्वत मी पर्वतीय प्रदेशात या प्रकारची धूप होते

चादर धूप

उदरावर जोरदार वृष्टी च्या वेळी पाण्याचे लोटे वाहत येतात त्याचबरोबर मृदेचा विस्तृत थर वाहून जाते यालाच चादर धूप असे म्हणतात

महाराष्ट्र पठारावर होणारी धूप या प्रकारचे असते

झोड धूप

पावसाच्या थेंबाच्या आकार व रीतीने झालेल्या जमिनीच्या धूपला झोड धूप म्हणतात. मातीचे शितोळे फुकले जातात.

कडाच्या पडझडीची धूप

खूप पाऊस पडत असताना पाणी जमिनीत खोल पर्यंत मूर्ती व खालच्या खडकाच्या किंवा कठीण जमिनीच्या थरामुळे आणखी खाली पाणी जाऊ शकत नाही तेव्हा पाण्याच्या दाबाने पूर्ण बाजूचा भाग कोसळतो असे कोसळण्याचे प्रकार घाटांमध्ये खिंडीमध्ये दिसून येतात

नदीकाठची होणारी धूप

नद्या आणि नाले आपला मार्ग बदलतात व एका किनाऱ्याची जमीन कापड दुसऱ्या किनाऱ्यावर रेती आणि पोयटा साठवितात

काळी कसदार मृदा रेगूर मृदा

बेसाल्ट अग्निजन्य खडकापासून या मृदेची निर्मिती झाली

या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक आहे

सिंचनाच्या आधाराने अनेक पिके मृदेवर घेतली जातात

या मृदेवर पाण्याचा निचरा लवकर होत नाही म्हणून अति सिंचनामुळे ही दलदलयुक्त ही बनते

पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याचे कारण म्हणजे चुनखडी अधिक असते

महाराष्ट्रात ही मृदा कृष्णा भीमा गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते

तापी नदी खोऱ्याकडे या मृदेची सर्वाधिक जास्त जाडी सहा मीटर पर्यंत आहे

कर्नाटक कडे जाताना या मृदेचा रंग गडद काळा होते

या मूर्तीला काळा रंग ती त्यांनी फेरस मॅग्नेटाइट मुळे येतो

हे मृदा पठाराच्या पश्चिम भागाला अधिक प्रमाणात आहे

भुईमूग तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका तेलबिया ऊस कापूस तंबाखू हे खाद्य व नगदी पिकांबरोबरच संत्री-मोसंबी केळी द्राक्षे डाळिंब स्ट्रॉबेरी यांसारखे अनेक फळांचे उत्पादन काळा मृदेवर घेतली जातात

हाँगकाँगवर संपूर्ण कब्जा मिळवणारा कायदा चिनी संसदेत मंजूर


◾️ चिनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला.

◾️ त्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

◾️ कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग २३ वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले.

◾️हाँगकाँग चीनच्या नियंत्रणाखाली असले तरी तिथे वेगळे कायदे होते. त्यामुळे चीनला आपल्या पद्धतीने तिथे कारभार करता येत नव्हता.

◾️ चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. 

◾️हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे.

◾️हाँगकाँग १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत.

◾️तिथली जनता लोकशाही हक्कांसाठी जागरुक आहे. त्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत.

◾️मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलन झाले होते.


वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

🏷 कोणता देश ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ याच्या यादीत अग्रस्थानी आहे?
उत्तर : नॉर्वे

🏷 कोणत्या CSIR संस्थेनी कोविड-19 रोगासाठी ‘फेलुदा’ चाचणी विकसित केली?
उत्तर : इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी

🏷 कोणत्या मंत्रालयाने ‘विद्यादान 2.0’ मंच प्रस्तुत केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

🏷 कोणत्या राज्य सरकारने ‘आपदामित्र’ मदत क्रमांक कार्यरत केला?
उत्तर : कर्नाटक

🏷 कोणत्या संस्थेनी कोविड-19 संदर्भात ‘लॉकडाऊन लर्नर्स’ मालिका आरंभ केली?
उत्तर : औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC)

🏷 भारताच्या ध्वजाने प्रज्वलित केलेले मॅटरहॉर्न पर्वतशिखर कोणत्या देशात आहे?
उत्तर : स्वित्झर्लंड

🏷 सिटी युनियन बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कोण आहेत?
उत्तर : एन. कामाकोडी

🏷 सुधा मुर्ती यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या ऑडियो बूकचे शीर्षक काय आहे?
उत्तर : हाऊ द ओनियॉन गॉट इट्स लेयर्स

🏷 2020 साली जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : क्लायमेट अॅक्शन

🏷 कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

Monday 29 June 2020

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी


◆ पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे.

◆ तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता.

◆ त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

◆ काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता.

◆ भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता.

◆ ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं.

◆ सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता.

◆ सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्रानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

★ परदेशातील यंत्रणांनीही व्यक्त केला होता धोका

◆ पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवलेला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते, असाही एक इशारा या अ‍ॅप्सबद्दल देण्यात आला होता.

महत्त्वाच्या दऱ्या :

काश्मीर दरी- पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

कांग्रा दरी- हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

कुलू दरी- रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

काठमांडू दरी –  नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालिक रांगा / बाह्य हिमालय – हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालिक रांग आहे. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला. येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच डून (Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू-काश्मीर), शिवालिक रांगाच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण

बुरार्ड यांच्या मते हिमालयाचे वर्गीकरण खालील प्रकारे करण्यात आले आहे – १. पंजाब हिमालय २. कुमाऊँ हिमालय ३. नेपाळ हिमालय ४. आसाम हिमालय.
पंजाब हिमालय- सिंधू आणि सतलज नदी दरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून याची लांबी ५६० किमी इतकी आहे.

कुमाँऊ हिमालय – सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून याची लांबी ३२० किमी इतकी आहे.

नेपाळ हिमालय – काली नदी आणि तिस्ता नदी यांदरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून याची लांबी ८०० किमी इतकी आहे.
आसाम हिमालय – तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्यादरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून यांची लांबी ७२० किमी इतकी आहे.

पूर्वाचल – पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर दक्षिणेकडे जाताना यांमुळे टेकडय़ांची एक मालिकाच तयार झाली आहे. यामध्ये पुढील उपविभागांचा समावेश होतो – पूर्व-नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.

पूर्व-नेफा: यांमध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.
मिश्मी टेकडय़ा: मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची ४५०० मी. पेक्षा अधिक आहे.

नागा रांगा: नागालँड आणि म्यानमार यांदरम्यान, नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.

मणिपूर टेकडय़ा: भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक  सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली (Centripetal Drainage) आढळून येते.

सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली.

🔰अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.

🔰त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.

🔰या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश  होता.

🔰2-14 दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही 2 विषाणू कारण असतो.

🔰सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली.
आता करोना रुग्णांची संख्या 1कोटीच्या दिशेने असून 4,99,000 बळी गेले आहेत.

भारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनची रशियाला विनंती


🧬पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

🧬पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

🧬पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी केंद्राने ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...