Friday 16 August 2019

🔸भारतीय क्रिकेट संघाचे आजवरचे प्रशिक्षक🔸

🌺🌺कुस्तीपटू बजरंग पुनियाला 'खेलरत्न पुरस्कार'?🌺🌺

🔰भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कुस्तीत लागोपाठ चांगले प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

🔰बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे. पुनियाने नुकतीच तबिलिसी ग्रां. प्री मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी त्याने इराणच्या पेइमान बिबयानीचा पराभव करून ६५ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले होते. भारतातील अव्वल कुस्तीपटू बजरंगने चीनमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून आशियात आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले होते. बजरंगने गेल्यावर्षी आशियाई खेळात तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदक पटकावले होते. १२ सदस्यीय निवड समितीने पुनियाच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भूतिया, मेरी कोम यासारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत.

🔰१२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापटूचे नाव सूचवू शकते. दरम्यान, गेल्यावर्षी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोघांना हा पुरस्कार मिळाला होता.

मदनलाल धिंग्रा


जन्म : १८ सप्टेंबर १८८३

(अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)

फाशी : १७ ऑगस्ट १९०९

(पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
                होमरूल लीग
धर्म : हिंदू
प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

                  मदनलाल धिंग्रा  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

🕺 सुरुवातीचे जीवन
            त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

👬 सावरकरांशी संबंध
           मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

🔫 कर्झन वायलीचा खून
                   ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.

🕯 शेवटचे वक्तव्य
           फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."

💎 नाटक
            मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏
                

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम
▪️ केरळ - कथकली
▪️आंध्रप्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
▪️ पंजाब - भांगडा, गिद्धा
▪️ गुजरात - गरबा, रास
▪️ ओरिसा - ओडिसी
▪️ जम्मू आणि काश्मीर - रौफ
▪️ आसाम - बिहू, जुमर नाच
▪️ उत्तराखंड - गर्वाली
▪️ मध्यप्रदेश - कर्मा, चार्कुला
▪️ मेघालय - लाहो
▪️ कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
▪️ मिझोरम - खान्तुंम
▪️ गोवा - मंडो
▪️ मणिपूर - मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
▪️ झारखंड - कर्मा
▪️ छत्तीसगढ - पंथी
▪️ राजस्थान - घूमर
▪️ पश्चिम बंगाल - गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश - कथक

बीपिन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. तीन महिन्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही समिती सरकारला आपला अहवाल सोपवेल. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत देशाचे २६ वे लष्करप्रमुख आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. तेच देशाचे पहिले सीडीएस असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सीडीएस तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना वरिष्ठ असतील कि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या समान त्यांचा दर्जा असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते सुद्धा अजून स्पष्ट नाही असे हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

♦️भारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट आसाम

● आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 400 km2 क्षेत्रफळ असणाऱ्या माजुली बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला 29 जून 2016 ला मान्यता देण्यात आली.

● पूर्वी माजुली बेट हे आसाम मधील जोरहाट जिल्ह्याचा उपविभाग होता.

● एखाद्या बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याची हि भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

● हा आसाम मधील 34 वा जिल्हा असेल.

● हे बेट ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यात तयार झालेले डेल्टा क्षेत्र आहे.

● हे नदीच्या मध्यात तयार झालेले जगातील सर्वात मोठे डेल्टा क्षेत्र आहे.

● या बेटाच्या उत्तरेला सुबानसिरी नदी,दक्षिणेला मुख्य ब्रम्हपुत्रा नदी व ईशान्येला ब्रम्हपुत्राची वितरिका खेरकाटीय सुली.

● या बेटावर मिशिंग जमातीची संख्या जास्त आहे.

● समाजसुधारक संत श्रीमंता शंकरदेवा यांनी 15 व्या शतकात सुरू केलेल्या आसामी नववैष्णव संस्कृतीचे मुख्य क्षेत्र

● माजुली बेट जैवविविधतेने संपन्न आहे.

● जमिनीच्या धूप होण्याचे प्रमाण बेटावर जास्त आहे.1891 मध्ये याचे क्षेत्रफळ 1250 km2 होते आता ते 400 km2 च्या आसपास आहे.
_______________

♦️आझाद हिंद फौज ♦️

★ निशान- तिरंगी ध्वज 

★ अभिवादनाचे शब्द- जय हिंद

★ घोषवाक्य- चलो दिल्ली

★ समर गीत- कदम कदम बढाये जा

★ भारतीयांना आव्हान - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा .

★ 1943 च्या अखेरीस अंदमान व निकोबार बेटे जिंकून नेताजींनी त्यांचे अनुक्रमे "शहीद" व "स्वराज्य" असे नामकरण केले.

यावर्षी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली आहे.

🌹🌳🌴चालु घडामोडी🌴🌳🌹

👉माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीत ‘वतन’ या देशभक्तीपर गाण्याचे प्रकाशन केले.

👉डिजिटल व्यवहाराची छत्री संस्था एनपीसीआयने म्हटले आहे की आधार सक्षम पेमेंट सिस्टमने यंदा जुलै महिन्यात 200 दशलक्ष व्यवहारांची मैलाचा टप्पा ओलांडला आहे.

👉भारतीय रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अज्ञात वाहनांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन “नंबर प्लेट” ही विशेष मोहीम सुरू केली. डीजी / आरपीएफ, श्री.अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली.

👉केंद्र सरकारने एक मोबाइल ॲप लाँच केले ज्याद्वारे शहरी नगरपालिका संस्था लोकांना घरातील कचरा उचलण्यास सक्षम करतील. स्वच्छ नगर ॲपद्वारे या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नागरी संस्थांना पैसे द्यावे लागतील.

👉फ्रान्स सरकारने भारतीय शेफ प्रियांम चटर्जी यांना नवी दिल्लीत ‘शेवालीर दे ल ऑर्ड्रे ड्यू मृते एग्रीकोलेटो’ देऊन गौरविले. कोलकाता येथील चॅटर्जी हे पहिले भारतीय झाले आहेत ज्यात भारतातील गॅस्ट्रोनॉमिक दृश्यासाठी पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा सन्मान प्राप्त झाला आहे.

👉बांगलादेशात प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ड्रोनच्या उड्डाणांवर ढाका येथे बंदी घालण्यात आली आहे.

👉गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई) ने भारतीय तटरक्षक दलासाठी ((ICG) पाचवा फास्ट पेट्रोल वेसल (FPV) लॉंच केला आहे.

👉कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने जाहीर केले की 2020  मध्ये बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला टी -20 क्रिकेटचा समावेश निश्चित झाला आहे.

👉कुस्तीपटू दीपक पुनिया याने तब्बल 18 वर्षांनी भारताला ज्युनिअर गटातील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे.

👉न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेन्डन मॅक्युलमची आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

👉PUBG हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी PUBG Nations Cup ही स्पर्धा दक्षिण कोरियाच्या सियोल शहरात तीन दिवस आयोजित  केली होती.

👉हि स्पर्धा जिंकून रशिया PUBG गेममधील पहिला वर्ल्ड चँपियन झाला आहे.

👉बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 72 व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे.

👉छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.

👉पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने स्मार्ट मोबिलिटीच्या अंतर्गत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात नव्याने 50 स्मार्ट ई-बस दाखल करण्यात आल्या. तसेच पीएमपीच्या 50 सीएनजी बसदेखील यावेळी ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या

👉भारताच्या अपंग क्रिकेट संघाने वर्ल्ड टी-20 सीरिज क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडलाच हरवून विजेतेपदाचा मान मिळवला.

👉मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीला लवकरच 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राचे कवच मिळणार आहे. हे क्षेपणास्त्र रडारशी संलग्न असेल. या संबंधीच्या खरेदीला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

👉भारतीय हवाई दल (IAF)  विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना स्वातंत्र्य दिनी वीर चक्र शौर्य पदक देण्यात येईल.

👉व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरचे सर्वाधिक प्रलंबीत फीचर्स, फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन अखेरीस अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आहे. हे वैशिष्ट्य सध्या ज्यांनी अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपच्या बीटा प्रोग्राममध्ये नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे.

👉पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने अभिनेत्याच्या जीवनावरील पुस्तकाची घोषणा केली, श्रीदेवी यांच्या नावाचे“श्रीदेवीः गर्ल वुमन सुपरस्टार” हे पुस्तक तिच्या 56 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झाले.

👉कर्नाटकमधील आयटी, बीटी आणि एस अँड टी विभागाने कर्नाटक इनोव्हेशन टेक्नॉलॉजी सोसायटी (KITS) च्या माध्यमातून ई-स्टेप सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे स्टार्ट-अप सक्षम बनविण्यासाठी पुढाकाराचा प्रसार करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

👉कर्नाटकमधील आयटी, बीटी आणि एस अँड टी विभागाने कर्नाटक इनोव्हेशन टेक्नॉलॉजी सोसायटी (KITS) च्या माध्यमातून ई-स्टेप सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे स्टार्ट-अप सक्षम बनविण्यासाठी पुढाकाराचा प्रसार करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

👉दिग्गज भारतीय धावपटू पी.टी. उषा, भारताच्या महान खेळाडूंपैकी एक. ती एशियन अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन (एएए) अ‍ॅथलीट्स कमिशनच्या सदस्या म्हणून नियुक्त झाली आहे.

👉नवी दिल्ली आणि उत्तर अमेरिका जोडणारी एअर इंडिया लवकरच उत्तर ध्रुवावर उड्डाण करणारी पहिली भारतीय विमान कंपनी बनणार आहे.

👉केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामांसाठी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 (SS 2020) लॉंच केले आहे.

🌺🌺 अतनू चक्रवर्ती 🌺🌺

🔰 केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे. चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली

🔰 अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जस्टिस एसएन शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यमान न्यायमूर्तींची सीबीआय चौकशी होणार आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला फायदा होईल असे आदेश दिल्याचा जस्टिस शुक्ला यांच्यावर आरोप आहे.

❇ *चालू घडामोडी वन लाइनर्स. 16 ऑगस्ट 2019.*


✳ शिब शंकर पॉल यांची बंगाल महिला प्रमुख प्रशिक्षक म्हणून नेमणूक

✳ मध्य प्रदेश सरकारने आदिवासींकडून घेतलेले कर्ज माफ केले

✳ ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2019 श्रीनगर, जम्मू व के येथे आयोजित केले जाईल

✳ अ‍ॅक्सिस बँक आणि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने बॅंकासुरन्स करारावर स्वाक्षरी केली

✳ 96 पोलिस कर्मचार्‍यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्टतेसाठी तपासणी 2019 मध्ये मेडल प्रदान करण्यात आले

✳ दशकातील 20000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली प्रथम खेळाडू बनला

✳ पाकिस्तानने 14 ऑगस्ट रोजी काश्मीर एकता दिन म्हणून आपला स्वतंत्र दिवस पाळला

✳ 22 ऑगस्टपासून हैदराबाद येथे तेलंगणा राज्य रँकिंग बुद्धिबळ स्पर्धा

✳ उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयचे सदस्यत्व मिळते

✳ बीसीसीआयने चंदीगडच्या केंद्र शासित प्रदेश क्रिकेट संघटनेसाठी असोसिएट सदस्यता देखील मंजूर केली

✳ आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने डेव्हिस चषक टाय पाकिस्तानबाहेर जाण्याची विनंती नाकारली

✳ वर्ल्ड कनिष्ठ कुस्ती स्पर्धा एस्टोनियामध्ये पार पडली

✳ वर्ल्ड कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत दीपक पुनियाने 86 केजी गटात सुवर्ण जिंकले

✳ दीपक पुनिया 18 वर्षांत प्रथम भारतीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनला

✳ वर्ल्ड ज्युनियर रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये विकीने 92 केजी प्रकारात कांस्य जिंकले

✳ जागतिक पोलिस आणि फायर गेम्स चीनमध्ये सुरू होतात

✳ जागतिक पोलिस आणि फायर गेम्समध्ये मंदार डिव्हेज 400 मी स्विमिंगमध्ये सुवर्ण जिंकला

✳ वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्समधील महिला 400 मी स्विमिंगमध्ये रीचा शर्मा सुवर्ण जिंकली

✳ रीचा शर्मा वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्समधील 4 × 50 रिलेमध्ये रौप्य जिंकली

✳ इराणचे अध्यक्ष एच रोहानी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत संबोधित करणार आहेत

✳ यूएनएससी 16 ऑगस्ट रोजी जे-के वर एक सत्र घेण्याची शक्यता आहे

✳ सुपर कप 2019 जिंकण्यासाठी पेनल्टीवर लिव्हरपूल बीट चेल्सी

✳ उद्घाटन युरो टी 20 स्लॅम 2020 पर्यंत पुढे ढकलला

✳ "ट्रिपल-डबल" ट्विस्ट बनविणारी सिमोन पित्त पहिली महिला ठरली

✳ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, यूएन फंडने भारताद्वारे योगदान दिले

✳ ईस्ट बंगाल डुरंड चषक 2019 ची उपांत्य फेरी गाठली

✳ सहाव्या आशियाई स्कूल टेबेल टेनिस स्पर्धेची सुरुवात वडोदरामध्ये होईल

✳ फ्रॅंकफर्ट येथे जागतिक कनिष्ठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धा

✳ वेस्ट इंडीज विरूद्ध भारत एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकला

✳ घरांमध्ये पाईपयुक्त पाणी पोचविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू करणार

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ गटाची घोषणा केली

✳ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लखनऊमधील कार्यालय बुलेटप्रुफ बनले जाईल

✳ इंडोनेशियात आशियाई टेबल टेनिस स्पर्धा होणार आहेत

✳ ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले

✳ कोलकाता नाइट रायडर्सने ब्रेंडन मॅक्युलम हेड कोच म्हणून नियुक्ती केली

✳ असित त्रिपाठी यांना ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले

✳ मिंटी अग्रवाल हे युथ सेवा पदकाची प्रथम महिला पुरस्कार प्राप्त

✳ जैव-इंधन धोरण जारी करणारे राजस्थान पहिले राज्य बनले

✳ 14 वे जागतिक शिक्षण परिषद (डब्ल्यूईएस) नवी दिल्ली येथे आयोजित

✳ चौदाव्या जागतिक शिक्षण परिषदेमध्ये राजस्थानला सर्वोत्कृष्ट नाविन्य आणि पुढाकार नेतृत्व पुरस्काराने सन्मानित केले

✳ कर्नाटक सरकारने विद्यार्थी उद्योजकांसाठी "ई चरण" कार्यक्रम सुरू केला

✳ एनकेशने एसएमईसाठी भारताचे पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड "फ्रीडम कार्ड" सुरू केले

✳ विम्बाई चपंगू मिस लंडनच्या मुकुटवढी असणारी पहिली काळा महिला बनली

✳ एअर इंडियाचे पहिले उड्डाण ओव्हर उत्तर ध्रुव ते दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को

✳ मांजरींच्या सुट्टीवर बंदी घालण्यासाठी न्यूयॉर्क हे पहिले राज्य बनले

✳ स्वातंत्र्यसैनिक दयानिधी नायक यांचे निधन

✳ माजी भारतीय क्रिकेटर व्ही.बी. चंद्रशेखर यांचे निधन.

🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास 🇮🇳

✍ पहिला राष्ट्रध्वज : १९०२ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला.

✍ हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.

✍ हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.

✍ द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.

✍ या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.

✍ हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.

✍ यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.

✍ वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.

✍ खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.

✍ मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.

✍ तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.

✍ या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.

✍ या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.

✍ झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.

✍ या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.

✍ चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.

✍ या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.

✍ पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.

✍ या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला.

✍ १९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.

✍ सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.

✍ दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.

✍ राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.

✍ अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.

✍ राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.

✍ मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.

✍ राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.
मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.

✍ "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.

✍ हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.
या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.

✍ १९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.

✍ १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...