Friday 3 April 2020

आजचे महत्त्वाचे प्रश्नसंच


♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २

♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3

देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

बाबू गेनू


जन्म : १९०८(महाळुंगे, तालुका आंबेगाव,पुणे)

मृत्यू : १२ डिसेंबर १९३०(मुंबई)

नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य. मुंबई येथे गिरणीत कामाला असून उदरनिर्वाह करीत असत. पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले.

१२ डिसेंबर १९३० रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या २२ वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला. बाबुगेनूंना हौतात्म्य लाभले.

🍁🔹🍁🔹🍁🔹🍁🔹🍁🔹🍁🔹

MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची माहिती

Covid 19 या अचानकपणे आलेले संकटामुळे स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थ्यांना येण परीक्षा जावळ असलेल्या काळात पुणे सोडून गावी जावे लागले. लायब्ररी-अभ्यासाचे नियमित ठिकाण - रूम सोडून आहे त्या परिस्थितीत घरी जावे लागल्यामुळे comfort zone च्या बाहेर आले आहे. त्यात अनेक विद्यार्थी सर्व पुस्तके सोबत घेऊन गेलेच असतील असे ही नाही.
या काळात मला अनेक लोकांनी कॉल मेसेज करून आपल्या समस्या मांडल्या आहेत.
त्यातील बहुतांश common प्रश्न असे आहेत :
1) परीक्षा कधी होणार?
2) घरी अभ्यासच होत नही
3) link break झाल्या सारखे होत आहे
4) आता परीक्षा पुढे गेल्या मुळे नेमका काय वाचायचे?
5) revision करायचे की reading पूर्ण करायचे?
6) csat stop करू का?
7) जास्त वेळ भेटल्या मुळे competition वाढेल का?
8) mains la कमी वेळ मिळेल?
या आणि या सारखे बरेच प्रश्न आहेत

माझ्या मते याची उत्तरे अशी असावीत :

परीक्षा कधी होणार हे आता स्पष्ट नही परंतु परीक्षा कधी जरी झाली तरी अभ्यासाच्या दृष्टीने अणि मानसिक दृष्टीने परीक्षेसाठी तयार असणे हे आपले कर्तव्य आहे.
बर्‍या पैकी मुलांचे अभ्यास झाले असून आता revision मोड मध्ये आहेत

1) परीक्षा कधी होईल याचा विचार करत बसू नका extra वेळ भेटला आहे score अजून वाढला पाहिजे असा सकारात्मक विचार ठेवुन प्लॅनिंग करा

2) ज्या topics वर test मध्ये score कमी येत आहे त्याचे फक्त revision न करता पुन्हा तो topic नव्याने वाचून काढा.

3) revision सुरू असेल तर वेळ लागू देत पण detail revision करा कारण हा part जेव्हा mains मध्ये repeat होईल तेव्हा हा part वर तुमचे त्या वेळी कमी efforts लागतील अणि आत्ताच mains ch 40% अभ्यास होईल.

4) जो part आपण नेहमी विसरतो त्या part कडे आता लक्ष देऊ शकता.

5) csat pratice थांबवू नका
Csat रोज exam जावळ आहे असा समजूनच करा ( अनेक मुले csat कडे या time मध्ये दुर्लक्ष केल्यामुळे परीक्षेत फटका बसू शकतो)

6)multiple choice questions mcqs रोज सोडवत रहा. Exam च्या आदल्या दिवसा पर्यंत mcqs and csat practice सुरूच ठेवणे योग राहील.

7) अभ्यास होऊन आता परीक्षा पुढे पुढे जात आहे हे frustrating आहे पण जास्त unstable न होता आपला अभ्यासातील momentum सेम ठेवा.

8) परीक्षा पुढे गेल्या मुळे सर्वाना जास्त वेळ भेटणार त्यामुळे competition वाढेल असल्या विचारात ही पडू नका. मला sufficient वेळ आहे अणि मी माझे best देईल येवढाच विचार मनत ठेवा.

9) किती जरी comfort zone च्या बाहेर निघाले असाल तरी minimum 6 तास तरी अभ्यास होईल असा नियोजन करा.

10) ज्यांनी books सोबत nehli नाही त्यांनी please अभ्यास बंद करू नका. Online बरेच material आहे. Telegram वर बरेच links आहेत. Classes च्या टेस्ट series ch soft copies आहेत. Maths- mental ability online question पाहून सोडवत रहा. Mobile internet n pen and paper घेऊन ही या वेळ अभ्यास होऊन तुम्ही पास होऊ शकता फक्त hopes सोडू नका.

11) सर्वात important तुमची प्रकृती सांभाळा. Covid 19 चे सावट तुमच्या जावळ ही फिरकू नये या साठी घरी राहून आपल्या अभ्यासात वेळ घालवावा.

संकटाचे संधीत रूपांतर करा,
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच भेटेल फक्त आता टेंशन न घेता अभ्यासाचे योग नियोजन लावा.

  

महात्मा गांधी

- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 1915 वयाच्या 45 व्या वर्षी भारतात परतले

● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल

● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918
- पहिला भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात

● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918
- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी

● असहकार चळवळ

- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- माहिती संकलन वैभव शिवडे यांने केले आहे.
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित

● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला

● वैयक्तिक सत्याग्रह
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत घोषणा
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही

● चले जाव
- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त

विम्बल्डन टेनिस स्पर्धा द्वितीय महायुद्धानंतर प्रथमच रद्द करण्यात आली.

🎯चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा या वर्षी रद्द करण्यात आली असून द्वितीय महायुद्धानंतर पहिल्यांदाच म्हणजेच 75 वर्षांनंतर स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षीची स्पर्धा 28 जून ते 11 जुलै या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची घोषणा ऑल इंग्लंड क्लबने केली आहे.

🎯जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नियोजित असलेल्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. विम्बल्डन स्पर्धा 28 जून 2020 पासून सुरू होणार होती.

स्पर्धेविषयी

🎯विम्बल्डन अंतिम स्पर्धा ही टेनिस क्रिडाप्रकारातली सर्वात जुनी (सन 1877 सालापासून) आणि सर्वोच्च मानांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा लंडन (इंग्लंड) येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकुएट क्लब येथे खेळली जाते. विंबल्डन विजेत्याला ऑल इंग्लंड क्लबचे सभासदपद दिले जाते. विम्बल्डन ग्रास कोर्टवर खेळवले जाणारे एकमेव ग्रँडस्लॅम आहे.

🎯आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) ही जागतिक टेनिस, व्हीलचेयर टेनिस आणि बीच टेनिस स्पर्धांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. 1913 साली ‘आंतरराष्ट्रीय लॉंन टेनिस महासंघ’ म्हणून संघाची स्थापना झाले आणि त्याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. आज या संघटनेशी 211 राष्ट्रीय टेनिस संघटना आणि सहा क्षेत्रीय संघटना संलग्न आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर) या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा ITF तर्फे आयोजित केल्या जातात.

​​मिसाइलच्या कारखान्यात इस्रायलने सुरु केली व्हेंटिलेटर्सची निर्मिती.

●करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या  इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे.

● इस्रायली _एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यामध्ये पहिल्या *30 व्हेंटिलेटर्सची_ निर्मिती करण्यात आली आहे.

● इस्रायलमध्ये वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्य*ा  _Inovytec ने हे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. दर आठवडयाला शंभर व्हेंटिलेटर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

● एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या या *कारखान्यात अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘अ‍ॅरो’ मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सॅटलाइटची_ निर्मिती केली जाते.

● तर मागच्यावर्षी इस्रायलने सुद्ध*ा *चंद्रावर लँडिंगचा* प्रयत्न केला होता. त्यासाठी मानवरहीत *यानाची निर्मिती* सुद्धा इथेच करण्यात आली होती.

छत्तीसगढ सरकारचा मोठा निर्णय; आता 1⃣ 4⃣ नाही तर 2⃣ 8⃣ दिवसांचं होम आयसोलेशन.

🔰करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सर्व राज्य सरकारदेखील आपापल्या पातळीवर योग्य ती पावलं उचलत आहेत.

🔰यादरम्यान करोनाच्या संशयित रूग्णांबाबत छत्तीसगढ सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता करोनाच्या संशयितांना १४ नाही तर २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

🔰दरम्यान, सुकमा जिल्ह्यात तेलंगणहून आलेल्या अनेक गावकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी १०० बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत.

🔰या ठिकाणी करोनाच्या संशयित रूग्णांना ठेवण्यात आलं आहे, शेजारी राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता सुकमा जिल्ह्यात आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे.

🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे.

🔰तर दुसरीकडे आता छत्तीसगढ सरकारच्या निर्देशाप्रमाणे करोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगण सरकारनंही करोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

🔰निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...