Sunday 9 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०९ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०९ जून २०१९ .
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवच्या सर्वोच्च नागरी " निशान इजुद्दीन " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने बांग्लादेशला १०६ धावांनी पराभूत केले
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंडने अफगाणिस्तानला ७ विकेट्स राखून पराभूत केले
● अॅशले बार्टी ने २०१९ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● डोमिनिक थिमने नोवाक जोकोविचला पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली
● राँजर फेडरर व डोमिनिक थिम २०१९ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंजणार
● फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेत जर्मनीने चीनवर १-० ने मात केली
● २ रा भारतीय चित्रपट महोत्सव सप्टेंबर २०१९ मध्ये बोस्टन येथे आयोजित केला जाणार
● जपान संघ पहिल्यांदाच अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरला
● २ री इंडिया ओपन इंटरनॅशनल तायक्वोंडो चॅम्पियनशिप स्पर्धा हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार
● नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी मालदीव ला रवाना
● ए एन ३२ या बेपत्ता विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा भारतीय वायु दलाने केली
● वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
● १२ जून रोजी कर्नाटक सरकार कॅबिनेटचा विस्तार करणार
● भारतातील पहिल्या डायनासोर संग्रहालयाचे उद्घाटन गुजरात येथे करण्यात आले
● आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री म्हणून पी पुष्पा श्रीवाणी यांची नियुक्ती करण्यात आली
● विदेश मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर लवकरच बांग्लादेशला भेट देणार आहेत
● अमेरिकेने भारताला सशस्त्र ड्रोनची विक्री करण्यास परवानगी दिली
● एफआयएच महिला सीरीज फाइनल टूर्नामेंट हिरोशिमा , जपान येथे आयोजित करण्यात आले
● हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हाती समाजाला आदिवासी दर्जा देण्यांची मागणी केली
● जी-शॉक इंडियाने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून टाइगर श्रॉफ ची नियुक्ती केली
● एक्स १ रेसिंग लीग ने रवी कृष्णन यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली
● योग मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार्या मीडिया सदस्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवमध्ये कॉस्टल वॉच रडार सिस्टमचे उद्घाटन केले
● शाकिब-अल-हसन विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा बांगलादेशचा दुसरा खेळाडू ठरला आहे
● भारत - मालदीवने दोन देशांना जोडणारी फेरी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे
● भारत व मालदिवने जलविद्युत क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला
● मालदिवच्या संसदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले
● भारत-बांग्लादेश बॉर्डर वार्तालाप बैठक पुढील आठवड्यात ढाका येथे आयोजित करण्यात येणार
● किंग्स कप फुटबॉल स्पर्धा थायलंड मध्ये आयोजित करण्यात आली
● किंग्स कप फुटबॉल स्पर्धेत भारताने थायलंडला १-० ने पराभूत केले
● केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२० लीग सुरू केली
● पर्यावरण क्षेत्रामध्ये रेल्वे व्हील फॅक्टरीला सर्वोत्कृष्ट परफॉर्मिंग उत्पादन युनिट म्हणून गौरविण्यात आले
● जम्मु-कश्मीर बँकचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना पदावरून हटविण्यात आले
● आर के चिब्बेर यांची जम्मु-कश्मीर बँकचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● बिजिंग इंटरनॅशनल ऑडिओलॉजी कॉन्फरन्स २०१९ बिजिंग , चीन येथे आयोजित करण्यात आली
● ईस्टर हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख सिसीरा मेंडिस यांनी राजीनामा दिला
● जपान येथे आयोजित जी-२० व्यापार व डिजिटल अर्थव्यवस्थेवरील मंत्रिमंडळाच्या बैठकीला पियुष गोयल उपस्थित
● चेन्नई वाहतूक पोलिसांनी ' GCTP Citizen Service ' अॅपचे अनावरण केले
● उत्तर मध्य रेल्वेने प्रवांशाच्या सोयीसाठी नवीन अॅप " नमन " सुरू केले
● दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल यांनी पदभार स्वीकारला .

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल 🚊

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल 🚊

१) पंबन रेल्‍वे पूल :-
रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली.
१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला.
पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला
समुद्री पूल आहे.
२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता.
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे.
दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील.
याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.

-----------------------
२) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे.
यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे.
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे.
या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने
देखरेख केलेला हा पूल आहे.
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले.
२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.
-----------------------

३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे.
कांडरौर गावात हा पूल आहे.
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे.
१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला.
पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे.
कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------

४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्‍हणता येईल.
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे.
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही.
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे.
या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे.
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.
_____________________________________

खालील तक्ता लक्षात ठेवा

📚 खालील तक्ता लक्षात ठेवा📚

---------------------------------------------------
*विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -*

1. 100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल

2. 10 क्विंटल = 1 टन

3. 1 टन = 1000 कि.ग्रॅ.

4. 1000 घनसेंमी = 1 लिटर

5. 1 क्युसेक=1000घन लि.

6. 12 वस्तू = 1 डझन

7. 12 डझन = 1 ग्रोस

8. 24 कागद = 1 दस्ता

9. 20 दस्ते = 1 रीम

10. 1 रीम = 480 कागद.

*अ) अंतर –*

1. 1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

2. 1 से.मी. = 0.394 इंच

3. 1 फुट = 30.5 सेमी.

4. 1 मी = 3.25 फुट

5. 1 यार्ड = 0.194 मी.

6. 1 मी = 1.09 यार्ड

*ब) क्षेत्रफळ -*

1. 1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

2. 1 सेमी 2 = 0.155 इंच 2

3. 1 एकर = 0.405 हेक्टर

4. 1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

5. 1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

6. 1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल

7. 1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल

8. 1 गॅलन = 4.55 लिटर

*क) शक्ती -*

1. 1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

2. 1 किलो वॅट = 1.34 एच.पी.

3. ड) घनफळ - 1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

4. 1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3

5. क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

6. 1 मी 3 = 35 फुट 3

7. 1 यार्ड 3 = 0.765 मी. 3

*इ) वजन -*

1. 1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0

2. 1 पौंड (lb) = 454 ग्रॅम

3. 1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)

*दिनदर्शिका –*

· एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस

· महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.

· टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.
========================

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती

✍ लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.
सभासदांची संख्या :
✍ घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.
मतदारसंघ निर्धारण आयोग :
✍ या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...