Saturday 18 December 2021

पोलीस भरती आणि MPSC साठी महत्त्वाचे 60 प्रश्नसंच


1. वातावरणाची उंची --------- कि.मी. एवढी आहे?

२०० कि.मी.
७०० कि.मी. √
३९० कि.मी.
७५० कि.मी

2. .................. हा अचुंबकीय पदार्थ आहे .

रबर.  √

लोह
कोबाल्ट
निकेल

3. B (थायमिन) जीवनसत्वाअभावि कोणता रोग होतो?

पेलाग्रा
बेरी-बेरी   √
अॅनिमिया 
किलोसीस 

4. एस.आय.पद्धतीत उर्जेचे एकक कोणते?

बल
अश्व
ज्युल. √
शक्ती

5. १९३२ साली न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

प्रा. चॅडविक  √
नील्स बोहर 
गेरिक 
लॅमार्क

6. शास्त्रीय दृष्टया हिरा म्हणजे काय?

वायू
रत्न
कार्बन. √
खनिज

7. एका अंतर्वक्र आरशासमोर 30 cm अंतरावर एक पडदा ठेवला आहे .दोन्हींच्या मध्ये एक पदार्थ ठेवला आहे . आरशापासून कितीही अंतरावर पदार्थ ठेवला तरी  पडद्यावर त्याची प्रतिमा दिसत नाही, म्हणून आरशाचे नाभीय अंतर ....................

१० cm पेक्षा कमी असले पाहिजे .
३० cm पेक्षा जास्त असले पाहिजे. √
३० cm पेक्षा जास्त नसले पाहिजे 
१० cm पेक्षा कमी असाले पाहिजे .

8. काकडी टरबूज या पदार्थात पाण्याचे प्रमाण किती?

९० टक्के
९४ टक्के
९५ टक्के. √
८० टक्के

9. खालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहे?

कान 
ह्दय 
पोट
फुफ्फुस  √

10. पाण्याचा गोठणबिंदू किती?

४°
१००°
०°    √
१२°

11. राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे?

कार्याकारी.  √
संसदीय
विधिविषयक
कायदेकरी

12.  भारतीय राज्यघटनेच्या .............. परिशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत?

परिशिष्ट-१
परिशिष्ट-२
परिशिष्ट-३.  √
परिशिष्ट-४

13. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरुन घेण्यात आली?

आफ्रिका
आयर्लंड.  √
अमेरिका
कॅनडा

14. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या .......... आहे.

२८८
१९    √
४८
६७

15. लोकसभा व राज्यसभा यांचा सदस्य नसतांनाही कोणती व्याक्ति या सभागृहात उपस्थित राहू शकते?

महालेखाधिकारी व लेखापरिक्षक
अॅटर्नी जनरल व मंत्री   √
पंतप्रधान व मुख्यमंत्री
पत्रकार

16. जेव्हा .......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?

सामान्य लोकात
राज्य सभेत
लोक सभेत.  √
संसदेत

17. केंदीय लोकसेवा आयोगाची स्थापना ------------ करण्यात आली

कायद्यानुसार
संविधानानुसार.   √
मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार
राष्ट्रपतीच्या आदेशानुसार

18. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ........ अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात?

तीन
दोन.  √
चार
पाच

19. भारतातील सर्वोच्य न्याय सत्ता कोणती?

संसद
सर्वोच्च न्यायालय.  √
राष्ट्रपती
लोकसभा

20. उपराष्ट्रपतीला पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

राष्ट्रपती.   √
पंतप्रधान
सरन्यायाधीश
लोकसभेचे सभापती

21. भारतात दूरवर पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू कशामार्फत पोहोचविले जातात.

ट्रक 
रेल्वेमार्फत  √
पार्इपलार्इन
हवार्इ वाहतूक

22. लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?

काळी मृदा
गाळाची मृदा
जांभी मृदा    √
पिवळसर मृदा

23.

अ) मुंबई हे एक महत्वाचे नैसर्गिक बंदर आहे.

ब) मुंबईचे हेच एक वैशिष्टय किंवा महत्व आहे की त्यामुळे ते महत्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे.

अ व ब बरोबर असून त्याचे ब हे अ चे कारण आहे   √
अ व ब बरोबर परंतु ब हे अ चे कारण नाही
अ बरोबर, ब चूक  
दोन्हीही चूक

24. वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे?

गुजरात
जम्मू- काश्मिर 
कर्नाटक   √
महाराष्ट्र

25. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 
तापमान 
वातावरण   √
वरील सर्व

26. जनगणनेचा कायदा ………… मध्ये अस्तित्वात आला.

१९४७
१९५६
१९५२
१९४८  √

27. उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना  काय म्हणतात?

मोसमी वारे 
उष्ण वारे
लू .          √
आरोह वारे 

28. चंद्र मावळतो त्या वेळेस तो कसा दिसतो?

आहे तेवढाच
पूर्वीपेक्षा मोठा  √
पूर्वीपेक्षा लहान
सुरुवातीला लहान नंतर मोठा

29. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते.

केंद्र सरकार  √
राज्य सरकार 
जिल्हा परिषद 
महानगरपालिका

30. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?

चेरापूंजी 
मॉन्सीरम.  √
आबोंली 
दार्जिलिंग

31. श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

पंडिता रमाबार्इ
महर्षि र्धोडो केशव कर्वे.   √
सर विठ्ठलदास ठाकरसी
छत्रपती शाहू महाराज

32. १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली?

लो.टिळक
निबंधमालाकार चिपळूणकर
लोकहितवादी
गो.ग.आगरकर,  लोकमान्या टिळक आणि चिपळूणकर   √

33. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी   √
तात्या टोपे
अजीमुल्ला खान
अहमदशहा 

34. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.

राष्ट्रवादी 
समाजवादी 
अर्थवादी
सनदशीर   √

35. जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलाविण्यात आली होती?

महात्मा गांधीजींची सत्कार करण्याकरिता 
शेतसा-यात सुट मिळविण्याकरिता  
रौलेक्ट कायद्याचा निषेध करण्याकरिता  √
शिखांना जातीय मतदार निलावे याकरिता

36. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची?

महंमद आली जनी
कॉग्रेड एस.ए.डांगे 
महंमद इक्बाल   √
फिलीप स्प्रॅण्ट

37. मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणरा तरुण कोण?

अरविंद घोष 
भूपेंद्र दत्त
खुदिराम बोस   √
विष्णु पिंगळे

38. सन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

लॉर्ड लिटन
लॉर्ड कर्झन
लॉर्ड क्लाईव्ह
लॉर्ड डलहौसी   √

39. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

जुलै १९५१
मे १९५३
मे १९५५
ऑक्टोबर १९५६   √

40. इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे .......... ऐक्य होय.

हिंदू-मुस्लिम    √
मराठी-शिख
इंग्लिश-मुस्लिम
इंग्लिश-मराठी

1)दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर   √
(D) 23 डिसेंबर

2)नॅशनल ग्रीन कॉर्पोरेशन 'इकोक्लब' कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार्‍या राज्य संस्थांची पहिली वार्षिक बैठक _ येथे घेतली गेली.
(A) गुजरात   √
(B) नवी दिल्ली
(C) महाराष्ट्र
(D) तामिळनाडू

3)मत्स्यपालन व जलचर विकास निधी (FIDF) याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या संस्थेनी प्रथम त्रिपक्षीय सामंजस्य करार केला?
(A) मत्स्यपालन विभाग, भारत सरकार
(B) तामिळनाडू सरकार
(C) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)
(D) दिलेले सर्व   √

4)32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ _ येथे आयोजित केले गेले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली    √
(C) चेन्नई
(D) लखनऊ

5)________ येथे अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन झाले.
(A) नवी दिल्ली
(B) चंदीगड   √
(C) लखनऊ
(D) वाराणसी

6)परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
(A) राजीव कुमार
(B) अजय भूषण पांडे
(C) हर्षवर्धन श्रृंगला   √
(D) टी. व्ही. सोमनाथन

7)कोणत्या भारतीय भारोत्तोलकाने ‘कतार आंतरराष्ट्रीय चषक’मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 64 किलो वजनी गटात दोन राष्ट्रीय विक्रम केले?
(A) मीराबाई चानू
(B) जेरेमी लालरिनुंगा
(C) राखी हलदर   √
(D) पुनम यादव

8)कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नडाल   √
(C) रॉजर फेडरर
(D) डेव्हिड थिएम

9)वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
(A) नाशिक   √
(B) कोची
(C) नेल्लोर
(D) भोपाळ

10)कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञाला बांग्लादेशात ‘आंतरराष्ट्रीय कला परिषद’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गौरविण्यात आले?
(A) नयनजोत लाहिरी
(B) अचला मौलिक
(C) आर. नागास्वामी.   √
(D) डी. आर. भांडारकर

71. (4, 16, 49, 64) हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरता असेल?

संख्येच्या घनाला 2 ने गुणा
संख्येच्या वर्गाला 4 ने गुणा.
संख्येच्या वर्गाला 5 ने गुणा
यापैकी नाही.

72. एका सांकेतिक लिपीत 456 ह्याचा अर्थ “ Bring me apple “ असा होतो 358 ह्याचा अर्थ “ Peel green apple “असा होतो आणि 374 ह्याचा अर्थ “ Bring green fruit “ असा होतो. तर रवाली दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक “ me” करता योग्य होईल?

4
5
6
7

73. सतीश, धवन, तेजस, प्रमोद, अमोल, शरद, व सचिन हे सात विघार्थी एका रांगेत वसले आहेत तेजस व प्रमोद यांच्या मध्ये सतीश आहे सर्वात समोर धवन असून तो तेजसच्या डावीकडे आहे सचिन व अमोल यांच्या मध्ये शरद असून त्याचा क्रमांक शेवटून आहे तर मध्यभागी कोण आहे?

सचिन
प्रमोद
सतीश

अमोल

74. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

QFODJM
AFODJM
QFOJMD
ODMBHK

75.

एका नाटकात 90 कलाकार आहेत त्यापैकी 62 कलाकार तबलावादक आहेत व 44 कलाकार गाणे गातात जर 28 कलाकार तबला वाजविणे व गाणे ह दोन्ही करतात तर त्या नाटकात तबला वाजविणे व गाणे यापैकी एकही कला न येणारे कलाकार किती?

12
28
32
सांगता येत नाही

76. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
1, 11, 29 ____, 89.

46
55
57
63

77. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
ZNMA, YOLB, ___, WQJD, VRIE

XPKC
PYKC
WPKC
KCPY

78. एका सांकेतिक भाषेत “bsq msw cdba म्हणजे “Radha read book”,” cdba mnip grip”, म्हणजे “ Radha take tea” आणि “fidk grip pik म्हणजे “tea is good” तर “tea” साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?

bsq
cdba
pik
grip

79.

एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?

rust
nsb
mabs
kurt

80. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
IRTH: HQSG : : RQPO: ?

PQRS
QPON
NOPQ
OPNQ

सराव प्रश्नसंच - भूगोल

● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा
ब. नाशिक
क. रायगड
ड. पुणे

उत्तर - क. रायगड

● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा
ब. तापी
क. गोदावरी
ड. कृष्णा

उत्तर - अ. मुळा

● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ
ब. मुंबई विद्यापीठ
क. शिवाजी विद्यापीठ
ड. नागपूर विद्यापीठ

उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ

● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713
ब. 407434
क. 503932
ड. 603832

उत्तर - अ. 307713

● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
ड. चौथा

उत्तर - ब. दुसरा

● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड
ब. ठाणे
क. पालघर
ड. नाशिक

उत्तर - क. पालघर

● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड
ब. पुणे
क. नागपूर
ड. ठाणे

उत्तर - ड. ठाणे

● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे
ब. नाशिक
क. नागपूर
ड. कोल्हापूर

उत्तर - ब. नाशिक

● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर
ब. पुणे
क. सोलापूर
ड. रायगड

उत्तर - अ. अहमदनगर

● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे
ब. सांगली
क. वर्धा
ड. अहमदनगर

उत्तर - क. वर्धा

1857 च्या उठावाची कारणे


- सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
- 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिध्द आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग असल्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. यामागे असणारी कारणे जाणून घेऊयात...

🌺🌺 राजकीय कारणे:🌺🌺

- इ.स.1600 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
- इ.स.1757 च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
- इ.स.1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

- तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला.
- वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
- लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

🌺🌺आर्थिक कारणे:🌺🌺

- ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
- 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
- शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

🌺🌺लष्करी कारणे :🌺🌺

- शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.

- शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

- ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.

- इ.स.1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

🌺🌺  धार्मिक कारणे: 🌺🌺

- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक साम्राज्यवादाचा पुरस्कार केला.

- इ.स.1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
- अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

- कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

☘☘☘☘☘🌷🌷🌷☘☘☘☘☘

छत्रपती शाहू महाराजांनी महिलां संबंधी आपल्या कोल्हापूर संस्थानात केलेले महत्वाचे कायदे...

1) विधवांच्या पुनर्विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा  -1917

2) आंतरजातीय विवाह संमती कायदा 1919

3) स्त्रियांवरील अत्याचारांचा प्रतिबंध करणारा कायदा 1919

4) स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क देणारा कायदा 1920

5) देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा 1920

▪️"स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा" हा त्याकाळातील देशातील अशा प्रकारचा पहिला कायदा होता.

▪️स्वतंत्र भारताने हा कायदा 2006 साली अंमलात आणला

▪️ देवदासी प्रथा प्रतिबंध करणारा कायदा हे देशातील पहिलाच कायदा होय

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (सहगल)


🔸भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला,सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन...
🔸जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्यापोटी चेन्नई येथे...
🔸वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील तर आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या...
🔸लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (1928)...
🔸या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले.त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मींवर प्रभाव...

🔸लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग व अटक.पण शाळा,महाविद्यालयांवर बहिष्काराची कृती त्यांना अमान्य होती.स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे,असे त्यांचे मत...
🔸महाविद्यालयात BKN राव या विमानचालकाशी परिचय व विवाह.माञ पुढे मतभेद व विभक्त...
🔸मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBS (1938) तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण(1939)...
🔸चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला (1940).तिथे भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना...

🔸नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (1943).२ जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर...
🔸त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी,अशी इच्छा व्यक्त केली..
🔸या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या,शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले...
🔸सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले.21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले...
🔸1944 पर्यंत 1000 महिला जवान व 500 परिचारिका जवान अशी 1500 ची पलटण झाली...
🔸जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले...
🔸‘चलो दिल्ली‘ हे त्यांचे लक्ष्य.मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली (1945).तेव्हा आझाद हिंद सेनेची माघार..
🔸युद्धविरामापर्यंत कॅ.लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल...
🔸त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या.1 वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या (1946).भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर सुटका...

🔸भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाह (1947).कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला...
🔸भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले...
🔸त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या.पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली (1971)...
🔸बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या,वैद्यकीय मदत...
🔸भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा (1984)..

🔸दैदीप्यमान कर्तृत्वाबद्दल पद्मविभूषण (1998)...
🔸अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपती निवडणूकीत पराभूत (2002)...
🔸2012-कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन...
🔸प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) या त्यांच्या धाकट्या भगिनी होत...

व्यवसायावर आधारित जाती


◾️आजीवक - भिक्षूक

◾️किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात

◾️कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा

◾️ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

◾️खोत - कोकणातील एक वतनदार

◾️गुरव - शंकराचे पुजारी

◾️धोबी - परीट, रजक

◾️धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

◾️नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

◾️भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

◾️पाथरवट - दगडफोड करणारा

◾️मशालजी - मशाल धरणारा

◾️मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

◾️माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

◾️मोदी - धान्य दुकानदार

◾️मलंग - फकिराचा एक पंथ

◾️माहूत - हत्ती हाकणारा

◾️सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

◾️वडार - दगड फोडणारी एक जात

◾️बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

भारताला लागून असलेले स्थलीय देश


👁‍🗨बांग्लादेश :-4096 किमी

👁‍🗨चीन:-3488 किमी

👁‍🗨पाकिस्तान:-3323 किमी

👁‍🗨नेपाळ:-1751 किमी

👁‍🗨म्यानमार:-1643 किमी

👁‍🗨भूतान:-699 किमी

👁‍🗨अफगाणिस्तान:-106 किमी

🔴एकूण सिमा:-15106 किमी

👉भारतातील एकूण 17 राज्य ची सिमा इतर देशांना लागून आहे.

महाराष्ट्राच्या प्राकृतीक विभाग

महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात

पश्चिम किनारपट्टी (कोकण) :-

भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशांपैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.

निर्मिती :-

महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच सारखा कोकण म्हणून तयार झाला आहे.

विस्तार:-

उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून (दमणगंगा नदी खोरे) –  दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत, दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.

लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :-

पश्चिम किनारपट्टी ची दक्षिणोत्तर लांबी 560 किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी (सरासरी 44.7 किमी) असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत (वसई ते हरिश्चंद्रगड) ती विस्तारलेली आहे.

कोकण किनारपट्टी ची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कुडाळ येथील रांगणा किल्ला जवळ 40 किलोमीटर आहे. तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी ते 100 किलो एवढी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टी ची उंची 5 मीटरपासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी-कमी होत गेलेली आहे त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.

कोकण किनारपट्टीची रचना :-

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

उपभाग :-

कुंडलिका नदीखोरे यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागांत विभागली जाते.

उत्तर कोकण:- समाविष्ट जिल्हे:- दक्षिण कोकण:- समाविष्ट जिल्हे:-
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर रत्नागिरी व सिंधुदुर्ग

खलाटी:-

पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे,  खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.

वलाटी :-

कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.


भूरूपे :-

कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या अरबी समुद्रातील सागरी लाटांचे कार्य सतत चालू असते. त्यामुळे या भागात समुद्रकडे, सागरी गुंफा, चौपाटी, वाळूचे दांडे, चबुतरे अशी अनेक भूरूपे तयार झाली आहेत.  विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी अशी तयार झालेली भूरूपे मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात.

Latest post

चालू घडामोडी :- 18 मार्च 2024

◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली. ...