Monday 23 December 2019

मानव विकास निर्देशांक 2019 [Human Development Index 2019]

- जारी करणारी संस्था - UNDP
- निकष: दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, योग्य राहणीमान

- भारताचा क्रमांक - 188 देशांच्या यादीत 129 वा (2018 साली 130 वा)
- भारताचा HDI - 0.647 
- भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश
1. नॉर्वे (HDI - 0.954)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.946)
3. आयर्लंड (HDI - 0.942)
4. जर्मनी (HDI - 0.939)
5. हँगकाँग (HDI - 0.939)

मानव विकास निर्देशांकात ब्रिक्स राष्ट्रे 
1. चीन 85 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
4. रशिया 49 वा क्रमांक
5. भारत 129 वा क्रमांक

भारताच्या  शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक
1. नेपाळ 147
2. पाकिस्तान 152
3. बांग्लादेश 135
4. श्रीलंका 71

HDI मध्ये जगातील शेवटचे राष्ट्र 
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. चाड - 187 वा
4. दक्षिण सुदान - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा

नोबेल पुरस्कारांबाबत माहिती नसलेल्या गोष्टी

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.

_*नोबेल पुरस्काराबाबतच्या काही रोचक गोष्टी*_

👉 या पुरस्कारातील लॉरीएट या शब्द हा ग्रीक पुरातन काळात खेळाडू आणि कवींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावरुन घेतला आहे. देवता अपोलो आपल्या डोक्यावर जो मुकुट घालयचे त्याला लॉरेल व्रेएथ म्हणतात.
   
👉 नोबेल पुरस्काराचे प्रमाणपत्र स्विडीश आणि नॉर्वेचे कॅलिग्राफर आणि कलाकार तयार करतात.

👉 नोबेल मेडल हे हाताने तयार केलेले असून 18 कॅरेट ग्रीन प्लेटेड तर 24 कॅरेट सोने वापरण्यात आले आहे.
  
👉 आतापर्यंत देण्यात आलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचे सरासरी वय 59 वर्ष आहे.

👉 नोबेल विजेत्यांपैकी अधिक जणांचे वाढदिवस हे जून महिन्यात येतात.

👉 1901 पासून 49 वेळा नोबेल पुरस्कार देण्यात आले नाहीत. पुरस्कार न देण्याच्या घटना पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध या काळात सर्वात जास्त आहेत.

👉 लीयनिड हुरविक्ज़ यांना 2007 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाला होता. नोबेल पुरस्कार मिळवणारे ते सर्वात वयस्कर आहेत.

👉 पाकिस्तानची मलाला सर्वात कमी वयातील नोबेल पुरस्कार विजेती आहे. तिला वयाच्या 17व्या वर्षी 2014 मध्ये शांततेसाठी पुरस्कार मिळाला होता.

👉 आतापर्यंत 48 महिलांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी दोन महिलांनी हे पुरस्कार नाकारले.

👉 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेला आतापर्यंत 3 वेळा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. या संघटनेला 1901 मध्ये शांततेचा पहिला नोबेल देण्यात आला होता.

👉 Linus Pauling ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांना दोन वेगवेगळ्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. 1954 मध्ये रसायनशास्त्रसाठी तर 1962 मध्ये शांततेसाठी हे पुरस्कार मिळाले होते.  

👉 आतापर्यंत 5 भारतीय नागरिकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर भारतीय वंशाच्या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

👉 केवळ जिवंत असणाऱ्या व्यक्तींनाच नोबेल पुरस्कार दिला जातो. मात्र आतापर्यंत तिघांना मृत्युनंतर हा पुरस्कार दिला गेला आहे.

👉 सर्वात जास्त नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागतो.

👉 नियमानुसार प्रत्येक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त तिघांना पुरस्कार देता येतो.

👉 नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर रोजी दिले जातात. याच दिवशी 1896 मध्ये आल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते.

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर

📛निरनिराळ्या कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

📛यावर्षी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये विविध कारणांमुळे 95 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

📛नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्या विरोधात देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

📛त्यानंतरही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये यासाठी देशाच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘इंडियन कौन्सिल फॉक रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’सोबतच दोन थिंक टँकनं सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

📛2012 पासून आतापर्यंत देशभरात 367 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛2018 मध्ये जगभरातील इंटरनेट सेवेच्या बंदच्या प्रकरणांपैकी तब्बल 67 टक्के प्रकरणं ही भारतातील आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख पिके

📚 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्र्राचा सर्वांगीण अभ्यास करणे अगत्याचे ठरते. आज जाणून घेऊयात महाराष्ट्रात घेतली जाणारी प्रमुख पिके

● *तृणधान्य :* ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू

● *कडधान्य :* तूर, मूग, उडीद, मटका, हरभरा

● *गळीत धान्य :* भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई

● *नगदी पिके :* कापूस, ऊस, हळद, तंबाखू

● *वन पिके :* बाभूळ, नेम, सारा, चिंच, निलगिरी

● *चारा-पिके :* नेपियर गवत, मक्का, लसूण, घास, चवळी हि दुहेरी फायद्याची पिके

नैसर्गिक मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार

⚜‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,’ या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.

⚜सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

⚜तर पोलीस महासंचालक विशेष साहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाईल.

⚜पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या दर्जापर्यंतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत मिळेल. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे मिळणारा निधी, मदतीव्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाईल.

⚜ याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नुकतेच दिले आहेत.

⚜विविध घटनांमध्ये ‘ऑनड्युटी’ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विम्याची रक्कम, तसेच पोलीस कल्याण निधीतून विविध स्वरूपात मृतांच्या वारसांना मदत दिली जाते.

⚜मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास यापूर्वी त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रकमेच्या स्वरूपात वाढ करावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अंमलदार वर्गातून केली जात होती.

जागतिक उत्तेजक प्रकरणांत २०१७ मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

✍‘वाडा’च्या अहवालात भारताचा क्रमांक सातवा

◾️आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंच्या आकडेवारीत २०१७मध्ये आधीच्या वर्षांपेक्षा १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) अहवालात म्हटले आहे.

◾️२०१६मध्ये उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे १५९५ खेळाडूंनी उल्लंघन केले होते, तर २०१७मध्ये १८०४ खेळाडूंनी उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती माँट्रिअल स्थित एका संस्थेने अभ्यासांतर्गत दिली आहे.

◾️२०१७मध्ये ११४ देशांच्या आणि ९३ क्रीडा प्रकारांमध्ये उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे खेळाडू दोषी सापडले आहेत.

◾️रशियाचा क्रमांक या यादीत पाचवा लागतो.

◾️ ‘वाडा’ने १० डिसेंबरला रशियावर चार वर्षे बंदी घातली आहे.

◾️त्यामुळे २०२०चे टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२मध्ये कतारला होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होता येणार नाही.

✍ इटलीचे खेळाडू अग्रेसर

🔘उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंमध्ये
📌 इटलीचे खेळाडू (१७१)
📌 फ्रान्स (१२८), 
📌 अमेरिका (१०३),
📌  ब्राझील (८४) आणि
📌 रशिया (८२) यांचा क्रमांक लागतो.  ‘वाडा’च्या अव्वल १० देशांच्या यादीत चीन, भारत, बेल्जियम, स्पेन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही क्रमांक लागतो.

✍शरीरसौष्ठवपटूंचा सर्वाधिक समावेश

◾️उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणारे सर्वाधिक २६६ खेळाडू हे
📌शरीरसौष्ठवमधील आहेत. त्यानंतर 📌अ‍ॅथलेटिक्स (२४२) आणि
📌सायकलिंग (२१८) यांचा क्रमांक लागतो. फुटबॉल आणि रग्बी हे अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

७३ वी घटना दुरुस्ती

देशाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत राज्याचे महत्त्व ओळखून त्याला आपल्या राजकीय कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकार द्वारे व त्यांच्या सहभागानेच राबविणे शक्य होते. पंचायत राज व्यवस्थेविषयी राज्य सरकारे उदासिन होती. देशातील लोकशाही व्यवस्थेमध्ये “पंचायत राज व्यवस्थेला” स्वायत्त संस्था म्हणून स्थान दयावयाचे असेल तर त्याच्या मुलभूत व्यवस्थेची तरतूद असणारी घटना दुरुस्ती करण्याचे नक्की ठरले. त्यासाठी ६४ वे घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेपुढे मांडण्यात आले. लोकसभेने ते १८८९ च्या ऑगस्टमध्ये मंजूर केले. परंतु कॉंग्रेस या सत्ताधारी पक्षाला राज्य सभेत बहूमत नसल्यामुळे ह्या विधेयकाला राज्य सभेची मंजूरी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी ते विधेयक पून्हा दुसऱ्यांदा १९९० च्या सप्टेंबर महिन्यात व्ही.पी.सिंग यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडी सरकारने लोकसभेत मांडले. परंतु बिलावर चर्चा होण्यापूर्वीच राष्ट्रीय आघाडी सरकार कोसळले व लोकसभा बरखास्त झाली. त्यामुळे हे विधेयक आपोआप बारगळले. त्यानंतर ते विधेयक पी.व्ही.नृसिंहराव सरकारने सप्टेंबर १९९१ मध्ये लोकसभेत तिसऱ्यांदा मांडले. त्याला २२ डिसेंबर १९९२ रोजी मंजूरी दिली. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ डिसेंबर १९९२ रोजी राज्य सभेने ते मंजूर केले.
अशा तऱ्हेने केंद्र सरकारने पंचायत राज्य पद्धतीला बळकट करणारी ७३ वी घटना दुरुस्ती केली. राष्ट्रपतींनी त्या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिली आणि भारतात तिची अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून सुरु झाली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना पंचायती राज्य पद्धती सुरु करण्याकरीता कायदे करण्यास सांगितले. लोकसभेने ७३ वी व ७४ वी घटना दुरुस्ती कायदा केला

चालू घडामोडी ( जाने. १९ ते मार्च १९) महत्वाचे ...


--------------------
• २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापासून ब्रिटीश मार्शल धुनएवजी,प्रथमच भारतीय मार्शल धून 'शंखनाद" वाजवण्यात आली.भारतीय लष्करासाठी ही धून नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयाच्या संगीताच्या प्राध्यापिका डॉ.नाफडे यांनी संगीतबद्ध केली आहे.

• औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचा कॅडेड सागर मुगले याला राजपथावरील १४४ सदस्यीय एनसीसी पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला .राज्यातील २२ कॅडेडस पथसंचलनात सहभागी झाले.

• २०२२ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

• भारतात होणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. २०२५ वर्षापर्यंत महाराष्ट्र हे पहिले ट्रीलिअन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनेल

• केंद्र सरकारने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्हाचा स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांक लागला. तर नाशिक व सोलापूर जिल्हा परीषदेचा नागरीकांचा प्रतिसाद या घटकात विशेष सन्मान करण्यात आला.

• स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशपातळीवर स्वच्छता दर्पण या घटकाखाली मुल्यांकन करण्यात आले .यामध्ये देशस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धा, सिंधूदुर्ग ,सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांचा सन्मान करण्यात आला.

• युनिसेफच्या आणि इतरसामाजिक संस्थांच्या साह्यानेप्रत्येक गावाचा शाश्वत स्वच्छतेचा आराखडा तयार केला जात आहे.यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग घेतला असल्याने यातून स्वच्छविषयी लोकशिक्षणही घडत आहे असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले.

• ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे,यासाठी मुख्यंमंत्री ग्रामीण पेयेजल योजना राबविण्यात आली

• २०२२ पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबकडे आपला हक्काचा निवारा असावा असा निर्धार केद्र सरकाने केला

• प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १२ लाख घरांची निर्मिती व २०२० पर्यंत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गातील एकही गरजू कुटुंब घराविना वंचित राहू नये असे महाराष्ट्र सरकारनेठरवले आहे.

चालू घडामोडी ( जाने. १९ ते मार्च १९) क्रीडा घडामोडी


••••••••••••••••••••••••••••••••••••••
● इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2019:-
------------------------------------------
● भारताच्या सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
● कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिने अंतिम फेरीत माघार घ्यावी लागली. त्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आलं
● सायनाचं 2019 मधील पहिलं विजेतेपद आहे

● मुंबई मॅरेथॉन २०१९:-
------------------------------------
• मुंबई मॅरेथॉन २०१९ मध्ये पुरुषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट (२:०९:१५ )याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू (२:२५:४५ )हिने बाजी मारली.
• पुरुषांच्या स्पर्धेत आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या धावपटूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. तर महिलांमध्ये गोबेना हिला आणि बिर्के देबेले धावपटूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले
• मुंबई मॅरेथॉनचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी करण्यात येते
• लंडन मॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबई मॅरेथॉनचे आयोजन होते.
• २००४ पासून या स्पर्धेला सुरुवात

● रणजी करंडक २०१८-१९:-
--------------------------------------
• सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम लढतीत ७८ धावांनी विजय मिळवत विदर्भने दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला.
• सलग दोन वेळा आपल्या संघाला जेतेपद मिळवून देणारा फैज फाजल हा ११ वा कर्णधार ठरला.सलग दुसऱ्यांदा ट्राॅफी जिंकणारा विदर्भ हा सहावा संघ ठरला.यापूर्वी मुंबई,सौराष्ट्र,दिल्ली,राजस्थान,कर्नाटक संघाने असे यश मिळवले.विदर्भाने गत सत्रात दिल्लीचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.
• वासिम जाफर १० रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे.या यादीमध्ये अशोक मंकड हे १२ रणजी विजेतेपदांसह पहिल्या तर अजित वाडेकर ११ विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वासिम जाफरने 10 विजेतेपद मिळवत मनोहर हर्डीकर आणि दिलीप सरदेसाई या खेळाडूंशी बरोबरी केली आहे

● रणजी ट्राफी:-
• स्पर्धेची सरुवात :- १९३४
• एकूण संघ:-३७
• सर्वाधिक विजेता संघ :-मुंबई (४१ वेळा )
• सर्वाधिक धावा :- वसिम जाफर (११७७५ धावा )
• सर्वाधिक बळी :- राजेंद्र गोयल (६४० बळी)
• पहिले आंतराष्ट्रीय सामना खेळणारे पहिले खेळाडू :रणजितसिंहजी (रणजी ) यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते
----------------------------------------------

चालू घडामोडी (जाने. फेब्र. २०१९)

पद्म पुरस्कार २०१९:-
---------------------
* प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले
* यामध्ये ४ पद्म विभूषण, १४ पद्म भूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.
* यात २१ माहिला तर ११ हे अप्रवासी भारतीय, परदेशी नागरिक आहेत. ३ मान्यवरांना मरणोत्तर तर एका तृतीय पंथीय व्यक्तीस पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
* या ११२ जणांच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील ११ मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे .यात २ पद्म विभूषण,१ पद्म भूषण तर ८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पद्मविभूषण (४)
१) शिवशाहीर बलवंत मोरेश्वर पुरंदरे: कला:महाराष्ट्र
२) तीजन बाई;लोकगायिका ; छत्तीसगड
३) इस्माईल ओमर गुलेह, (परदेशी नागरिक):सार्वजनिक सेवा:डीजीबोटी
४) अनिल कुमार नाईक: उद्योग : महाराष्ट्र

पद्मभूषण - (१४)
• डॉ. अशोक कुकडे :मेडीसीन,आरोग्यसेवा: महाराष्ट्र

पद्मश्री -(९४)
• मनोज वाजपेयी:-कला -चित्रपट:-महाराष्ट्र
• दिन्यार कॉन्ट्रैक्टर:-कला-रंगमंच :-महाराष्ट्र
• सुदाम काटे:-मेडीसीन :-महाराष्ट्र
• वामन केंद्रे :कला :-महाराष्ट्र
• रवींद्र कोल्हे/स्मिता कोल्हे:-मेडीसीन -आरोग्यसेवा: महाराष्ट्र
• शंकर महादेवन, कला-गायक :-महाराष्ट्र
• नगीनदास संगवी:-साहित्य ,शिक्षण:-महाराष्ट्र
• शब्बीर सय्यद :-समाजसेवा :-महाराष्ट्र
--------------------------------------------

'अनंता'ची व्याख्या करणारा गणिततज्ज्ञ; श्रीनिवास रामानुजन

◾️अगदी नव्याने शोधलेल्या कृष्णविवराचे वर्तनाचे कोडे सोडविण्यासाठी रामानुजन यांच्या गणिती सूत्रांचा वापर करण्यात आला आहे.

◾️आजही रामानूजनच्या त्या वहीतील अनेक सूत्रे नव्या संशोधनाची दिशा स्पष्ट करत आहे.

◾️अवघे बत्तीस वर्षे जीवन लाभलेले रामानुजन विज्ञान जगतासाठी लाभलेले अलौकिक वरदान आहे.

◾️रविवारी (ता. 22) त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात येतो. 

✍जीवनपट 

◾️रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील तिरोड या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले.

◾️त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धांत सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. 

◾️रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1991 साली छापून आला.

◾️ त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला.

◾️1993 साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रा. जी. एच. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती.

◾️त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते.

◾️लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते 17 मार्च 1994 रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. 1914 ते 1917

◾️या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले.

◾️ 1918 साली रॉयल सोसायटी ऑफ लंडनने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते.

◾️त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. 

◾️रामानुजन यांच्या वहीतील सूत्रांचा आजही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या त्या नोंदवहीत ब्रह्मांडाच्या विज्ञानाची अनेक रहस्ये आजही न उलगडलेल्या अवस्थेत आहेत.

◾️इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना क्षयरोग जडला होता.

◾️पुढे 1919 साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती.

◾️वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी 27 एप्रिल 1920 रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले.

➖➖➖➖➖

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...