Saturday 28 March 2020

गालफुगी


गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे.

वर्णनसंपादन करा

झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. गालफुगी हा गोवराइतका संसर्गजन्य नाही. एके काळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता. सार्वत्रिक लसीकरणानंतर याचे प्रमाण कमी झाले आहे. चार ते सात या वयात तो साधारणपणे आढळतो. भारतातील दर एक लाख मुलांमधील त्याचे १९४१ मधील प्रमाण दररोज २५० नवे रुग्ण असे होते. गालफुगीच्या लसीचा वापर सुरू झाल्यानंतर हे प्रमाण ७६ एवढे कमी झाले. गालफुगीची लस प्रचलित झाल्याने गालफुगीच्या रुग्णामध्ये खूपच घट झाली. १९८७मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णामध्ये पाच पटीने वाढ झाली होती. याचे कारण शाळेमध्ये लसीकरणामध्ये झालेले दुर्लक्ष. १९९६ पासून शाळेतील मुलांमध्ये १००% लसीकरणाची मोहीम राबवल्याने सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल- यू एस ) च्या रिपोर्ट प्रमाणे देशभरात फक्त ७५१ नवे रुग्ण आढळले. (दर पन्नास लाखात एक ).

कारण आणि लक्षणेसंपादन करा

पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक ना लागणे आणि निरुत्साह. कधी कधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आम्लयुक्त पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही. बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो.

डेंग्यू ताप

लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात​.

एकदम जोराचा ताप चढणे

डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे

डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते

चव आणि भूक नष्ट होणे

छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे

मळमळणे आणि उलट्या

त्वचेवर व्रण उठणे

२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ)

हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव - चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्‌सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.

तीव्र, सतत पोटदुखी

त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे

नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे

रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे

झोप येणे आणि अस्वस्थता

रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते

नाडी कमकुवतपणे जलद चालते

श्वास घेताना त्रास होणे

३) डेंग्यू अतिगंभीर आजार

ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.

-लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि संयुक्त वेदना यांचा समावेश आहे. गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक आहे, जे जीवघेणा धोकादायक असू शकते. -ताप आणि वेदनादायक डोकेदुखी अचानक अचानक सुरू झाल्यामुळे ही फ्लूसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. इतर लक्षणामध्ये त्वचेवर पुरळ, स्नायू आणि संयुक्त वेदना, मळमळ आणि उलट्या समाविष्ट होतात. अत्यंत प्रकरणांमध्ये, अत्याधिक रक्तस्राव (रक्तस्राव) आणि मृत्यू होऊ शकतो.

रेबिज


रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
------------------------------------------------------

स्वाईन फ्ल्यू संकलित माहिती

स्वाइन फ्लू रोगाची लक्षणे

हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.

आजाराची कारणे

स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुक्करांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.

डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झलेलि होती.

संसर्ग

स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.

आजाराची लक्षणे

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते.

टॅमी फ्ल्यू याा गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

आजार कसा टाळावा ?

१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.

२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.

४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

६. पौष्टिक आहार घ्यावा.

७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.

८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.

१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.

उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान, विषाणू तपासणी

स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणेव राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

उपचार

कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरु केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.

प्रतिबंधक लस

या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत.
१५ सप्टेंबर २००९ ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली.
ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.
अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे

करोनाला झुंजवणाऱ्या चार प्रतिकारक पेशींचा शोध :

करोना विषाणूला मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणाली कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी केला असून त्यांच्या मते लहान मुलातील प्रतिसाद यात सर्वात प्रखर असतो व वृद्धांमधील प्रतिसाद सर्वात क्षीण असतो. करोना विषाणूचा मानवी शरीर नैसर्गिक पातळीवर प्रतिकार करताना प्रतिपंड तयार होत असतात त्यांचा अभ्यास केल्याने आता या विषाणूवर औषध शोधणे सोपे जाणार आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील  संशोधकांनी केला असून त्यात रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे की, प्रथमच करोनाला मानवी प्रतिकारशक्तीकडून दिला जाणारा प्रतिसाद नोंदला गेला आहे.

मेलबर्न विद्यापीठातील पीटर डोहर्थी इन्स्टिटय़ूट फॉर इनफेक्शन अ‍ॅण्ड इम्युनिटी या संस्थेतील संशोधक कॅथरिन केडझिरन्स्का यांनी म्हटले आहे की, मानवी प्रतिकारशक्ती करोना विषाणूला जोरदार प्रतिसाद देत असते असे दिसून आले आहे. जे लोक दगावतात त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते.

एक महिला तीन दिवस बरीच आजारी दिसत होती पण नंतर ती व्यवस्थित बरी झाली. मध्यम तीव्रतेच्या आजारात तरी प्रतिकारशक्ती चांगली काम करताना दिसली आहे. जे लोक बरे झाले त्यांच्यात नेमके कुठले घटक प्रभावी ठरले व जे मरण पावले त्यांच्यात कुठले घटक कमी पडले याचा शोध घेण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून विषाणूतज्ञांना लस तयार करणे सोपे जाणार आहे. 

कौशल्य वाढविण्यासाठी IIT गांधीनगर ‘प्रोजेक्ट ISSAC’ उपक्रम.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (IIT-GN) ही संस्था देशात लागू असलेल्या संचारबंदीच्या परिस्थितीत घरातच असताना त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट ISSAC’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे.

हा कार्यक्रम तयार करण्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ ‘सर आयझॅक न्यूटन’ यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमधून प्रेरणा घेतली. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना 1665 साली लंडनमध्ये आलेल्या ग्रेट प्लेगच्या साथीमुळे त्यांना घरी पाठविण्यात आले होते. तेव्हा ते 22 वर्षांचे होते. त्या काळात त्यांनी कॅल्क्यूलस तसेच ऑप्टिक्स आणिगुरुत्वाकर्षणासंबंधी त्यांचे सिद्धांत यासह अनेक गहन शोध लावले होते.

कार्यक्रमाचे स्वरूप...

प्रकल्पाचा भाग म्हणून, लेखन, चित्रकला, कोडिंग, संगीत, कल्पक विधान अश्या अनेक नवीन कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी संस्थेतर्फे चार वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात.

💠विद्यार्थ्यांना लिखानाची सवय लावण्यासाठी टीव्ही, इंटरनेटवर उपलब्ध मनोरंजक मालिका / चित्रपट / नेत्यांचे संबोधन अश्या चित्रफिती बघून त्याविषयी अहवाल आणि त्यांचे विचार लिहिणे, कम्प्युटर कोडिंगसंबंधी 12 दिवसांची स्पर्धा, अश्या अनेक स्पर्धांचा समावेश आहे.

मराठी व्याकरण अलंकार

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात.  

अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.  

🔹उदा.

ढगांशी वारा झुंजला रे

काळाकाळा कापुस पिंजला रे

आतां तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच !              

🟤भाषेचे अलंकार :-🟤

🔸भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.  

🔹केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.                

🔹केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.                

🔹भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात.🔹   

१. शब्दालंकार  

२. अर्थालंकार         

🟤शब्दालंकार🟤      

शब्दालंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे

अ) अनुप्रास अलंकार :-  

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ            

गडद गडद निळे जलद भरुनी आले, 

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.            

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।

गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।       

🔹ब) यमक अलंकार :-

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो.          

उदाहरणार्थ              

राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी

फळा आली माय । मायेची पाठवणी

🔹पुष्पयमक या यमकाचे उदाहरण

सुसंगती सदा घडो,  

सृजनवाक्य कानी पडो, 

कलंक मातीचा झडो, 

विषय सर्वथा नावडो

🔹दामयमक या यमकाचे उदाहरण

आला वसंत कवीकोकील हाही आला, 

आलापितो सुचवितो अरुणोदयाला

🔹क) श्लेष अलंकार :-         

वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो.     

उदाहरणार्थ

मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही.- अभंग श्लेष

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.- अभंग श्लेष          

ते शीतललोपचारे जागी झाले हळूच मग बोले

औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले- अभंग श्लेष

श्रीकृष्ण नवरा मी नवरी  

शिशुपाल नवरा मी न-वरी- सभंग श्लेष  

कुस्करु नका ही सुमने  

जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने- सभंग श्लेष            

वरील ओळींमधील नवरी, न-वरी, सुमने, सु-मने, नलगे, न-लगे अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्यास अभंग श्लेष म्हणतात.           

श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे.

🟤अर्थालंकार🟤

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

१) उपमा अलंकार :-

दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ  

अ) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी 

आ) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी 

इ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 

🟤२) उत्प्रेक्षा अलंकार :-🟤

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.

उदाहरणार्थ

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे

किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार  

शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले  

अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार

🟤३. अपन्हुती अलंकार🟤

उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.

उदाहरणार्थ- 

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी  

ती हाक येई कानी, मज होय शोककारी  

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी

ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे              

हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले   

मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो  

नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो 

🟤४. रूपक अलंकार 🟤  

उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.

उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा  

दावी मुखचंद्रमा सकळीकांसी

बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी  

अमृताची वृष्टी, मज होय.              

🟤५. व्यतिरेक अलंकार🟤

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

अमृताहून गोड, नाम तुझे देवा             

कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हीच बलवान       

तू माउलीहून मयाळ, चंदाहून शीतळ, 

पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा         

सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो,

त्याला पाहता लाजून, चंद्र आभाळी लोपतो    

🟤६. अनन्वय अलंकार 🟤

उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध    

उदाहरणार्थ  

झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा

आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी

या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान     

🟤७. भांतीमान अलंकार 🟤      

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो.        

उदाहरणार्थ 

हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, 

म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा  

शंख द्वयी धरुनी कुंकुम किरवाणी  

लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी            

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे, 

पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे  

घालीन अंजन अशा मातीने तटाकी  

कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी     

न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 20 मार्च 2020 रोजी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.

दिनांक 28 एप्रिल 1958 रोजी जन्मलेल्या न्या. धर्माधिकारी यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 1980 रोजी वकील म्हणून नोंदणी केली.

त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिवाणी, घटनात्मक, कामगार तसेच सेवासंबंधी प्रकरणांमध्ये वकिली (प्रॅक्टीस) केली.

न्या. धर्माधिकारी यांची दिनांक 15 मार्च 2004 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली तर दिनांक 12 मार्च 2006 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी न्या. भूषण धर्माधिकारी यांची प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...