Tuesday 12 January 2021

राष्ट्रीय युवा दिन: 12 जानेवारी


🔰12 जानेवारी 2021 रोजी देशभरात ‘युवाः – उत्साह नये भारत का’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला आहे.


🔰सवामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे नेहरू युवा केंद्र संघटनेच्यावतीने आयोजन करण्यात आले.


🔴पार्श्वभूमी.


🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत वर्ष 1984 याला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित करण्यात आले होते. 


🔰तयापाठोपाठ, भारत सरकारने 1984 सालापासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची घोषणा केली.


🔰सवामी विवेकानंद (12 जानेवारी 1863 – 4 जुलै 1902)


🔰सवामी विवेकानंद यांचे मूळ नाव वीरेश्वर तर रूढ झालेले नरेंद्रनाथ ही नाव होते. ते एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी होते.


🔰अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. 


🔰11 सप्टेंबर 1893 रोजी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला.


🔰1 मे 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ या नावाची संन्याशांची संस्था त्यांनी स्थापन केली. कलकत्त्यातील बेलूर मठ हे तिचे केंद्र-कार्यालय आहे.

पहिल्या टप्प्यात ५,२९७ पदांसाठी पोलीस भरती



पहिल्या टप्प्यात राज्यात ५,२९७ पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ७,५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच अतिरिक्त काही जागांना मंजुरी प्राप्त झाली आहे. ही पदभरती तिसऱ्या टप्प्यात केली जाईल. अशी एकूण १२,५०० पदांवर पोलीस भरती होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात दिली.

बेरोजगारी वाढत असताना राज्य सरकार पोलीस भरती पुढे ढकलत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नागपुरातील आकाशवाणी चौकात सोमवारी निदर्शने केली.

पोलीस दलातील १२ हजार पदांची भरतीप्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यास निघाले. ही माहिती कळताच गृहमंत्र्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. या चर्चेत त्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भरतीबाबत माहिती दिली. गृहमंत्र्यांनी हीच माहिती संध्याकाळी व्टिटरवर जाहीर केली.

राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट



लातूर, बीडमध्ये पक्षी-कोंबडय़ांचा मृत्यू; सात राज्यांमध्ये फैलाव

नवी दिल्ली, लातूर, बीड, नगर :  केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे. कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

सात राज्यांमधील स्थिती

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्य़ातील दोन कुक्कुटपालन केंद्रांतून संकलित केलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबडय़ांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात असल्याचे केंद्रीय पशूपालन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्य़ातही ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळले. नहान, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्य़ातूनही मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पशुपालन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्य़ातून घेतलेले पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल आला असून तेथे बर्ड फ्लूची साथ नसल्याचे पशूपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना 

‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्राच्या राज्यांना सूचना

’‘बर्ड फ्लू’बाधित भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली असून ती त्या त्या भागांची पाहणी करीत आहेत, असे केंद्राने सांगितले.

मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम.


🔶सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान सोमवारी बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.


🔶सथानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेले एआय-१७६ हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बंगळूरुच्या केंपेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील कर्मचारी विमानतळाच्या लाऊंजकडे आले, तेव्हा मोठय़ा संख्येत जमलेल्या लोकांनी आनंदाने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.


🔶एअर इंडिया किंवा इतर कुठल्या भारतीय विमान कंपनीतर्फे संचालित हे सर्वात लांब अंतराचे व्यावसायिक विमान उड्डाण असेल, असे एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते. जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.


🔶लोकांने हर्षोल्लास व्यक्त करत टाळ्या वाजवत असताना कॅप्टन झोया अगरवाल, कॅ. पापागरी तन्मयी, कॅ. आकांक्षा सोनावणे व कॅ. शिवानी मन्हास यांनी हाताचे अंगठे उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.  ‘भारतीय हवाई वाहतुकीतील महिला वैमानिकांनी इतिहास निर्माण केला असून हा मनात जतन करण्याचा आणि साजरा करण्याचा क्षण आहे. या चारही वैमानिकांचे हार्दिक अभिनंदन!’, असे ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)


🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : अध्यक्ष निश्चित नाही .

Online Test Series

शेकडेवारी


1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.


· उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.) 


· 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा. 


· 500 चे 30% = 150 


· 500 चे 10% = 50 


· 30% = 10%×3 


· = 50×3 = 150 


· 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.) 


· 500 ची 1% = 5 


· :: 500 चे 8% = 40


2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.


· उदा. 368 चे 12.5% = ? 


· 368×12.5/100


· = 368×1/8= 46 


3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.


· उदा. 465 चे 20% = 93 



· 465×20/100


· = 465×1/5 ने गुणा = 93 


4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.


· उदा. 232 चे 25% = 58 


· 232×25/100


· = 232×1/4= 58 


5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.


· उदा. 672 चे 37.5% = 252 



· 672×37.5/100 


· = 672×3/8 


· = 252 


6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.


· उदा. 70 चे 50% = 35 



· 70×50/100 


· = 70×1/2 


· = 35 


7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.


· उदा. 400 चे 62.5% = 250 



· 400×62.5/100 


· = 400×5/8


· = 250 


8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.


· उदा. 188 चे 75% = 141 



· 188×3/4 


· = 141 


9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.


· उदा. 888 चे 87.5% = 777 



· 888 × 87.5/100


· = 888×7/8 


· = 777


10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.


· उदा. 25 चे 25% = 6.25


· 25 × 25/100 


· = 625/100 


· = 6.25


Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...