स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे


2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख


3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे

                            ३) सचिन ढवळे 

                             

5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                              २) रंजन कोळंबे


6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                               २) खतीब


7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                             २)किरण देसले 


8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                              २) किशोर लवटे


9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                              २) रंजन कोळंबे


10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड



वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.


    तर लागा तयारीला... All The Best


नक्की वाचवा असा लेख ..



👉 तम्ही Mpsc चा अभ्यास खूप दिवसापासून करत असाल आणि तरीही तुमच्या कडे Syllabus ची Print नसेल तर समजून घ्या की तुम्ही Timepass करत आहात..


(ज्यांच्या कडे नसेल त्यांनी उद्या 10 परेंत राज्य सेवा Mainच्या syllabus ची प्रिंट काढून घ्या)


👉 राज्य सेवा देणार असाल तर लेख लिहायला सुरू करा ...स्वतःचे मत मांडायला शिका..Sunday la एक तरी Essay लिहीत चला..


मुलींसाठी महत्वाचे ...

अग तो ओळखीचा नाही त्याला का बोलते..

बाई सगळी मुलं सारखीच असतात ..त्यांच्या पासून दूर असलेलेच बरं...

तिथ चहा नको घ्यायला...तिथे खूप मुलं असतात...ETC ETC😜😜


तत्सम वाक्य बोलणे सोडून द्या..

जेव्हा तुम्ही अधिकारी बनाल तेव्हा दिवसात 1000 लोकांना तोंड द्यावे लागते..

त्या मुळे तुमच्यातील अधिकाऱ्याला आत्ता पासून Developing mode वर ठेवा..


👉 मला खूप वेळा एकच प्रश्न विचारला जातो की 

अभ्यासाची Basic सुरवात कशी करावी..?

Ans is here in 3 Steps👇


1 Syllabus ( पाठ होत नाही तो परेंत वाचा तरच पुढे जे वाचलं त्याला अर्थ राहील)


2 क्रमिक पुस्तक + NCERT (GEO HIS Sci and Eco)

( क्रमिक पुस्तक वाचा विकत घेऊन तेव्हाच जास्त समजेल त्या वर बाजारात आलेले पुस्तक घेऊ नका )


3 Reference Book + Current जे की खूप प्रमाणात उपलब्द आहेत...त्याची लिस्ट Telegram वर सर्व चॅनेल वर आहे.


(आपण फक्त Book list गोळा करत बसलो आहोत पुस्तक मात्र घेत नाही )


👉हल्ली रोज एक नवीन MPSC चा लेखक जन्माला येत आहे नवीन पुस्तक घेऊन..

त्या मुळे जे उत्तम लेखक आहेत त्यांचे पुस्तक वाचा उगाच पैसे आणि वेळ वाया घालवू नका.


👉 Below 25 age चे आहेत त्यांच्या साठी महत्वाचे...


हो अर्थातच मी GF/BF बद्दल बोलत आहे.😂😂


Gf BF नावाचा प्राणी तुमच्या LIFE मध्ये असेल तर तुमची already वाट लागली आहे असे इतर म्हणतात...😂😂


मला तुम्हला जरा वेगळ सांगायचे आहे की 


भांडण, Doubt आणि Restrictions मध्ये तुमचे नाते असेल तर समजून घ्या की MPSC मध्ये तुमच काय खर नाही..

कोणाचा call होता ..? दे मग Screenshot हे वाक्य तुमच्या Relationship मध्ये असेल तर तुमचं अवघड आहे 😂😂😂


(Hello I m not Interrupt in ur personal life ..It's just affecting to MPSC study so just telling u.🙃)


👉 जया दिवशी तुमचा छान स्टडी होतो ना तेव्हा तुम्ही By Soul happy असतात...


शब्द खूप टोचणारे आहेत पण मला स्पस्ट बोलायची सवय आहे...


घराबाहेर राहून अभ्यास करता ना तुम्ही..

मग महिन्याला 6000 खर्च तर होतच असतील 


म्हणजे तुमच्या घरचे तुम्हला 200 रुपय रोजाणे बाहेर ठेवत आहेत...


बस त्या एक दिवसाची 200 रुपय किंमत आहे ना तिच्या इतका अभ्यास करा...🙏🙏


ज्या दिवशी तुमचा 6 तास अभ्यास होणार नाही त्या दिवशी तुम्हला जेवण करण्याचा अजिबात अधिकार नाही ...नाही म्हणजे नाही🙏🙏🙏



फुकटचे सल्ले नाहीत हो ...खूप हृदयापासून लिहले आहे तुमच्यासाठी


वाचून विचार करा 

Online Test Series

जागतिक भूगोल विशेष


1. जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)


3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.


4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.


5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया


6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)


7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)


8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.


9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.


10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)


12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची


13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.


14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.


16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.


17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.


18. सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.


19. सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)


20. सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)


21. सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.


22. सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.


23. सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)


24. सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.


25. सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.


26. सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)


27. सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी


28. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)


29. सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)


30. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.


31. सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)


32. सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)


33. सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.


34. सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क


35. सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)


36. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.


37. सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.


38. सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.


39. सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.


40. सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.


41. सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)


42. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)


43. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)


44. सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.


45. सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.


46. सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


47. सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी


48. सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर


49. सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी


50. सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन


51. सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक


52. सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क


53. सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


54. सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.


55. सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)


56. सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)


57. सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)


58. सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.


59. सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.


60. सर्वात मोठा ग्रह - गुरु


दारिद्र्य

 दारिद्र्य पाहता येते मात्र  दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही.  गरिबीची व्याख्या ही तत्कालीन परिस्थिती व देशाचा विकास यावर आधारित प्रत्येक देशानुसार किंवा अर्थ व्यवस्थेनुसार वेगवेगळी असू शकते. म्हणून भारतातील दारिद्र्य  आणि दारिद्र्य विषयक समित्या यामध्ये विविधता आढळून येते. या सर्व समितीचा अभ्यास आपण पाहणार आहोत.


दारिद्र्य संकल्पना सविस्तर पाहणार आहोत. मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य असे म्हणता येईल. 


मानवी गरजा या सतत वाढणाऱ्या व अमर्यादित असतात. मात्र काही गरजा या मानवी जीवनासाठी आवश्यक ठरतात. त्या मूलभूत गरजा शिवाय मानवी जीवन अशक्य ठरते. अशा मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते.  अशा मानवी मूलभूत व अत्यावश्यक गरजा भागवणे देखील या लोक समूहाला अशक्य ठरते. अशा लोकांना आपण दारिद्र्य या संकल्पने अंतर्गत घेऊ शकतो.दारिद्र्याची संकल्पना सापेक्ष व निरपेक्ष अशा पद्धतीने मांडता येते –

1)  सापेक्ष दारिद्र्य –   देशातील उच्चतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्याची संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम पाच किंवा दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतात.


2) निरपेक्ष दारिद्र्य –  दारिद्र्याच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला दारिद्र्या खालील जनता असे समजले जाते. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्यरेषा असे म्हणतात.


दारिद्र्य रेषा –    

दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्यरेषा(Poverty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो. दारिद्र्य रेषा उपभोग खर्चाच्या आधारावरती ठरवली जाते. दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्ती मागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यूनस्तर निश्चित केला जातो. त्याला मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च (Monthly Per Capita Consumption Expenditure) म्हणून संबोधले जाते.

                या खर्चापेक्षा कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हटले जाते. तर त्या पेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्तीला किंवा कुटुंबांना दारिद्र्यरेषेवरील म्हणून संबोधले जाते.               


मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या घरगुती उपभोग सर्वेक्षण आकडेवारी चा वापर केला जातो. एन. एस. एस. ओ. मात्र अशी आकडेवारी काढण्यासाठी रिकॉल पिरीयड चा वापर करते. 1. यूआरपी  2. एमआरपी आणि

3. एम एम आर पी.


युनिफॉर्म रिकॉल पिरीयड (Uniform Recall Period: URP) – सर्व उपभोग्य वस्तूंचा काहीच दिवसांच्या कालावधीतील रिकॉल रेफरन्स या ठिकाणी घेतला जातो.


मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Mixed Recall Period: MRP) – पाच प्रकारच्या अधून-मधून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी एका वर्षाच्या कालावधीतील रिकॉल लक्षात घेतला जातो.


मॉडिफाइड मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Modified Mixed Recall Period: MMRP) – यामध्ये सात दिवसाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू , 30 दिवसांच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू आणि एका वर्षाच्या कालावधीत लागणाऱ्या वस्तू अशा सर्व वस्तूंचा विचार या प्रकारात केला जातो.


दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील प्रक्रिया आवश्यक ठरते


1) अत्यावश्यक वस्तू सेवांचा एक गट  निश्चित करणे.

2) अशा वस्तू व सेवांच्या उपभोगासाठी एक महिन्यासाठी आवश्यक असलेला एमपीसीइ(Monthly Per Capita Consumption Expenditure) निश्चित करणे. 

3) MPCE म्हणजे दारीद्र्य रेषा होय. अशा तीन दारिद्र्य रेषा केल्या जातात. अखिल भारतीय दारिद्र्य रेषा, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य  रेषा आणि राष्ट्रीय शहरी दारिद्र्य  रेषा यावरून दारिद्र्याचे प्रमाण ठरवले जाते.

4) राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून राज्यासाठी ग्रामीण व शहरी असा विभक्त दारिद्र्य रेषा प्रमाण ठरवणे.

दारिद्र्य समित्या

भारतातील दारिद्र्याच्या संदर्भात विविध समित्यांनी आपले विविध पद्धतींनी आणि आपल्या विविध प्रकारे त्यांनी दारिद्र्याचे मोजमाप केले आहे.  याचा आढावा आपल्याला पुढील प्रकारे घेता येईल.


1)   पी. डी. ओझा समिती – 

                    या समितीने 2250 कॅलरी प्रतिदिन प्रतिव्यक्ती हा निकष वापरून दारिद्र्याचे प्रमाण मोजले. 1960 – 61 मध्ये ग्रामीण भागात दहा ते अकरा रुपये व शहरी भागात 15 ते 18 रुपये मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवून दारिद्र्याचे प्रमाण मोजले आणि ते ग्रामीण भागात 51.6 टक्के तर शहरी भागात 7.6 टक्के आढळले. एकूण दारिद्र हे 44 टक्के होते.


2) अलघ समिती –

                          सर्वप्रथम नियोजन आयोगाने जुलै 1977 मध्ये वाय के अलघ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यांनी आपला अहवाल 1979 मध्ये सादर केला. या कृती दलाने दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली. या टोपलीत अन्नघटक बसवला. किमान दोन वेळचे अन्न मिळवू न शकणारा म्हणजे ही टोपली भरू न शकणारा गरीब समजावा. 

                            ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागातील व्यक्तींसाठी 2100 कॅलरी देईल इतके अन्न या समितीने गृहीत धरले. 2400 कॅलरी रोज मिळवण्यासाठी 1.64 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे महिन्याला 49.09 रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च करू शकणार गट म्हणजे दारिद्र्यरेषेवरील आणि हा खर्च करू न शकणारे घटक म्हणजे दारिद्र्यरेषेखालील असे या समितीने सुचवले.


3) डी टी लकडावाला समिती –

                                      1990 मध्ये डी टी लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेली. यांनी 1993 मध्ये आपला अहवाल मांडला. या अहवालाचा स्वीकार भारत सरकारने 1997 पासून केला. या समितीने प्रत्येक राज्यासाठी शहरी व ग्रामीण दारिद्र्य रेषा निश्चित केली. लाकडावाला समितीने एम पी सी इ ने मोजमाप यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरीयड चा वापर करून केला होता.


4) सुरेश तेंडुलकर समिती –

                            दारिद्र्य मोजणीची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी नियोजन आयोगाने 2009 मध्ये सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना केली.या समितीने दारिद्र्याची रेषा मोजण्यासाठी कॅलरी या निकषाचा वापर बंद करण्याची शिफारस केली. कारण समितीच्या मते कॅलरी, उपभोग व पोषण यांच्यामध्ये कमी परस्परसंबंध आहे.                       


या गटाने एम आर पी उपभोगा वर आधारित दारिद्र्य रेषा चा वापर केला. तेंडुलकर समितीने ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा मांडण्याच्या प्रकाराचा त्याग केला व एकच राष्ट्रीय दारिद्र्यरेषा मांडली. या गटाने 2009 – 10 साठी दारिद्र्य रेषा दारिद्र्याच्या प्रमाणाचे मोजमाप केले. तेंडुलकर गटाने 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 466.68 रुपये तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली.


                           याच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.5 टक्के तर शहरी भागात 25.7 टक्के इतके असल्याचे निश्चित केले.

              तेंडुलकर समितीने 2009 – 10 साठी ग्रामीण भागासाठी 673 रुपये तर शहरी भागासाठी 860 रुपये अशी दारिद्र्यरेषा सुचवली या दारिद्र्यरेषेच्या आधारे देशातील दारिद्र्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे व्यक्त केले. एकूण दारिद्र्य 29.7 टक्के तर ग्रामीण भागात 33.8 टक्के आणि शहरी भागात 20.9 टक्के इतके दारिद्र्य असल्याचे सांगितले.


5) सी रंगराजन समिती चे मोजमाप –

                                          2012 मध्ये रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गटाची स्थापना केली या गटामध्ये महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता हे अर्थतज्ञ सदस्य होते. रंगराजन समितीने तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून लकडावाला पद्धतीचाच स्वीकार करण्याची शिफारस केली. म्हणजे अन्न व इतर वस्तू व सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस त्यांनी केली.                                 


रंगराजन समितीने कॅलरी उपभोगाचा निकष ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी प्रति व्यक्ती प्रति दिन इतका तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी प्रतिव्यक्ती प्रतिदिन इतका गृहीत धरला. रंगराजन समितीच्या मोजमापानुसार 2011 – 12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5 टक्के ग्रामीण भागातील दारिद्रयाचे प्रमाण 30.9 टक्के तर शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण 26.4 टक्के असे व्यक्त केले.


              रंगराजन समितीने गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असणारी पाच राज्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत –

उत्तर प्रदेश (809 लाख), बिहार (438 लाख), मध्य प्रदेश (328 लाख), पश्चिम बंगाल (275 लाख),महाराष्ट्र (228 लाख)             


दारिद्र्याच्या प्रमाणानुसार सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण असलेली पाच राज्य पुढीलप्रमाणे सांगितली –

छत्तीसगड(48%), मणिपूर (47.7%), ओडिशा (46%), मध्य प्रदेश (44%) आणि झारखंड (42%)

रंगराजन समितीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण 20 टक्के होते.

राज्यसेवा प्रश्नसंच

 🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे

१.  दादाभाई नवरोजी

२.  मॉरीस डी मॉरीस

३. जेके मेहता

४.  वरीलपैकी एकही नाही✅✅

(स्पष्टीकरण:-

जनक मेहबूब उल हक)


🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?

१.  सापेक्ष दारिद्र्य✅✅

३. निरपेक्ष दारिद्र्य

२. नागरी दारिद्र्य

४.  शहरी दारिद्र्य


🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही

१.  कॉलरा

२. विषम ज्वर

३. खरुज

४. इसब

५. वरीलपैकी एकही नाही✅✅




🔰 चारकोल म्हणजे काय ?

१. लोणारी कोळसा ✅✅

२. दगडी कोळसा

३. कच्चा कोळसा

४. खाणीतील कोळसा


🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?

1.  १७००✅✅

2 १८००

३. १५००

4. १२००


🔰 पलागा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?

१. क

२. ई

३. ड

४. वरीलपैकी एकही नाही✅✅

(स्पष्टीकरण:-

पेला ग्ररोग्य  ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

सारख्या नावाचे तालुके

🔴 सारख्या नावाचे तालुके 🔴

❇️तालुका व जिल्हा❇️

🔳आष्टी:-बीड-वर्धा

🔳शिरूर:-बीड-पुणे

🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद

🔳खेड:-पुणे-रत्नागिरी

🔳कर्जत:-नगर-रायगड

🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक

🔳कारंजा:-वाशीम-वर्धा

🔳सेलू:-वर्धा-परभणी

🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती.

नेशनल पार्क ~राज्यवार

🎓  नेशनल पार्क ~राज्यवार 🎓

🌴राजस्थान
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

🌴मध्य प्रदेश
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

🌴अरुणाचल प्रदेश
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

🌴हरियाणा
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

🌴उत्तर प्रदेश
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

🌴झारखंड
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

🌴मणिपुर
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

🌴सिक्किम
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

🌴तरिपुरा
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

🌴तमिलनाडु
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

🌴ओडिसा
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

🌴मिजोरम
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

🌴जम्मू-कश्मीर
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

🌴पश्चिम बंगाल
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

🌴असम
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

🌴आध्र प्रदेश
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूगवामी नेशनल पार्क
4. श्री वेंकटेश्वरम राष्ट्रीय पार्क
5. कावला राष्ट्रीय पार्क
6. नागार्जुन सागर राष्ट्रीय पार्क
7. नेलापत्तु पक्षी राष्ट्रीय पार्क

🌴महाराष्ट्र
1. बोरीवली ( संजय गांधी ) राष्ट्रीय पार्क
2. चांदोली राष्ट्रीय पार्क
3. तबोड़ा राष्ट्रीय पार्क
4. गुग्गामल राष्ट्रीय पार्क
5. नवागांव राष्ट्रीय पार्क
6. तन्सा नेशनल पार्क, थाणे
7. मेलघाट राष्ट्रिय अभ्यारण्य

🌴अण्डमान-निकोबार
1. सैडिल पीक राष्ट्रीय उद्यान
2. महात्मा गाँधी मैरीन ( वंदूर ) राष्ट्रीय उद्यान
3. फोसिल राष्ट्रीय पार्क
4. कैंपबैल नेशनल पार्क
5. गलेथा राष्ट्रीय पार्क
6. माऊंट हैरिट नेशनल पार्क
7. रानी झांसी मैरीन राष्ट्रीय पार्क

🌴हिमाचल प्रदेश
1. पिन वैली पार्क
2. ग्रेट हिमालय राष्ट्रीय पार्क
3. रोहल्ला राष्ट्रीय पार्क
4. किरगंगा राष्ट्रीय पार्क
5. सीमलबरा राष्ट्रीय पार्क
6. इन्द्रकिला नेशनल पार्क
7. शिकरी देवी अभ्यारण्य

🌴गजरात
1. गिर राष्ट्रीय पार्क
2. मरीन राष्ट्रीय पार्क
3. ब्लेक बुक राष्ट्रीय पार्क
4. गल्फ आफ कच्छ
5. वंसदा नेशनल पार्क

🌴उत्तराखण्ड
1. जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क
2. वैली आफ फ्लावर राष्ट्रीय पार्क
3. नन्दा देवी राष्ट्रीय पार्क
4. राजाजी नेशनल पार्क
5. गोविन्द पासू विहार नेशनल पार्क
6. गंगोत्री राष्ट्रीय पार्क

🌴छत्तीसगढ
1. कांगेर घाटी ( कांगेर वैली ) राष्ट्रीय पार्क
2. इन्द्रावती राष्ट्रीय पार्क
3. गुरू घासीदास ( संजय ) राष्ट्रीय उद्यान

🌴करल
1. साइलेंट वैली राष्ट्रीय पार्क
2. पेरियार नेशनल  पार्क
3. मैथीकेतन नेशनल पार्क
4. अन्नामुदाई नेशनल पार्क
5. एर्नाकुलम नेशनल पार्क

🌴कर्नाटक
1. बांदीपुर राष्ट्रीय पार्क
2. नागरहोल ( राजीव गांधी ) राष्ट्रीय उद्यान
3. अंसी राष्ट्रीय पार्क
4. बनेरघाटला नेशनल पार्क
5. कुडूरमुख नेशनल पार्क
6. तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क

🌴 पंजाब
1. हरिकै वैटलैण्ड नेशनल पार्क

🌴 तेलंगाना
1. महावीर हरीना वनस्थली नेशनल पार्क
2. किन्नरसानी अभ्यारण्य

🌴 गोआ
1. सलीम अली बर्ड सैंचुरी
2. नेत्रावली वन्यजीव पार्क
3. चौरा राष्ट्रीय पार्क
4. भगवान महावीर नेशनल पार्क

🌴 बिहार
1. वाल्मिकी नेशनल पार्क
2. विक्रमसिला गंगटिक डॉल्फिन सैंचुरी
3. कंवर लेक बर्ड सैंचुरी

🌴 नागालैण्ड
1. इंटांग्की अभ्यारण्य, कोहीमा

🌴 मेघालय
1. बलफकरम नेशनल पार्क
2. सीजू अभ्यारण्य
3. नांगखिलेम अभ्यारण्य
4. नोकरे.

हे लक्षात ठेवा :- गांधी शांतता पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते (१९९५ ते २०२०)

♻️ हे लक्षात ठेवा :- गांधी शांतता पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते (१९९५ ते २०२०)

🏆 १९९५ : जुलियस न्यरेरे (टांझानिया)

🏆 १९९६ : एक टी अरियरत्ने (श्रीलंका)

🏆 १९९७ : गेरहार्ड फिशर (जर्मनी)

🏆 १९९८ : रामकृष्ण मिशन (भारत)

🏆 १९९९ : बाबा आमटे (भारत)

🏆 २००० : नेल्सन मंडेला (द.आफ्रीका)

🏆 २००० : ग्रामीण बॅंक (बांग्लादेश)

🏆 २००१ : जॉन ह्यूम (ब्रिटन)

🏆 २००२ : भारतीय विद्या भवन

🏆 २००३ : व्हॅकलाव हवेल (झेक)

🏆 २००४ : कोरेटा स्कॉट (अमेरिका)

🏆 २००५ : डेसमंड तुतु (द‌.आफ्रीका)

🏆 २०१३ : सी पी भट (भारत)

🏆 २०१४ : इस्रो (भारत)

🏆 २०१५ : विवेकानंद केंद्र (भारत)

🏆 २०१६ : अक्षय पात्र फाऊंडेशन

🏆 २०१६ : सुलभ इंटरनॅशनल

🏆 २०१७ : एकल अभियान ट्रस्ट

🏆 २०१८ : सासाकावा (जपान)

🏆 २०१९ : काबूस बिन सैद अल सैद (ओमान)

🏆 २०२० : शेख मुजिबूर रहमान (बांग्लादेश) .

आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणीचे प्रकार आणीबाणीचा कालावधी किती असतो ? आणीबाणी संपते कशी ? (Provocation of Emergency) – 

आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणीचे प्रकार 3

आणीबाणी म्हणजे काय ?
महत्वाचे मुद्दे
आणीबाणी म्हणजे काय ?
आणीबाणीचे प्रकार
आणीबाणीचा कालावधी किती असतो ?
आणीबाणी संपते कशी ? (Provocation of Emergency) – 

मूलभूत हक्क आणीबाणी वेळी असतात का?
आणीबाणी म्हणजे काय ? आणीबाणी म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये प्रस्थापित शासकीय यंत्रणा  चालवणे अवघड होते.  काही कारणामुळे ही यंत्रणा कोलमडून लागते आणि सर्वाधिकार भारतासारख्या विस्तृत देशामध्ये केंद्र सरकार कडे किंबहुना राष्ट्रपतीकडे जातात. अशा परिस्थितीला आणीबाणी म्हणतात.  आणीबाणी म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये राज्याला तात्काळ लगेचच कृती करणे आवश्यक असते. 

देशाची सुरक्षा अखंडता व स्थैर्य राज्य शासनाचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये काही आणीबाणी विषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. यातीलच एक तरतूद आणीबाणी म्हणजे काय.

आणीबाणी दरम्यान केंद्रशासन शक्तिशाली बनते घटक राज्य व केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. आणीबाणी मुळे संघराज्य संरचना एकात्मक संरचनेत परावर्तित होते. आणीबाणी म्हणजे काय ? भारताच्या घटनेत भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत.

आणीबाणीचे प्रकार
आणीबाणी म्हणजे काय
आणीबाणीचे प्रकार

भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी व आर्थिक आणीबाणी.

१) राष्ट्रीय आणीबाणी – किंवा राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय ?

राष्ट्रीय आणीबाणी युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे पुकारले जाते. या आणीबाणीला भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची उद्घोषणा असे म्हटले आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार अमलात आणली जाते

२) राज्य आणीबाणी

राज्य आणीबाणी ला राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. राज्यातील शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम 356 नुसार लावली जाते.

३) आर्थिक आणीबाणी-

देशातील आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यास आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते. आर्थिक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 307 मध्ये दिली आहे.

राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय?

युद्ध किंवा परकीय आक्रमण याच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधले जाते. सशस्त्र उठाव या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असता तिला अंतर्गत आणीबाणी असे संबोधले जाते. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण भारतासाठी किंवा एखाद्या भागासाठी करता येऊ शकते.

42 वी घटनादुरुस्ती 1976 नुसार राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा भारताचे एखाद्या भागासाठी ही करण्याचा अधिकार दिला. मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा तिसरा आधार अंतर्गत अशांतता हा होता.

मात्र अंतर्गत शांतता या शब्दांमध्ये संदिग्धता असल्याने 44 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1978 मध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द वापरण्यात आला. त्यामुळे 1975 च्या राष्ट्रीय आणीबाणी प्रमाणे अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येणार नाही.

राष्ट्रीय आणीबाणी साठी पंतप्रधानांच्या सह केंद्रीय कॅबिनेटची लेखी मान्यता आवश्यक असते. 44 वी घटनादुरुस्ती 1978 नुसार कॅबिनेटच्या लेखी निर्णयाची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणीबाणी ला दुष्प्रवृत्ती च्या आधारावर आणि विवेकशून्य व विकृत परिस्थितीवर अशा आणीबाणीला न्यायालयात आव्हान देता येते.

आणीबाणीचा कालावधी किती असतो ?
राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची संमती घ्यावी लागते यानुसार आणीबाणीचा कालावधी ठरतो.

राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे आवश्यक असते.

लोकसभेच्या विसर्जनाच्या कालावधीत आणीबाणीची घोषणा केलेली असल्यास नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 30 दिवसाच्या आत मान्यता होणे आवश्यक असते.

एका महिन्याच्या आत संसदेने मान्यता दिल्यास आणीबाणीचा अंमल सहा महिन्यापर्यंत असतो.

यानंतर संसदीय ठरावाद्वारे पुढे एकावेळी सहा महिन्यासाठी आणीबाणीचा कालावधी वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो

आणीबाणीचे सहा महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 30 दिवसाच्या आत आणीबाणीचा अंमल चालू राहण्यासाठी ठराव पारित होणे गरजेचे असते.
आणीबाणीच्या घोषणेचा ठराव किंवा आणीबाणीचा कालावधी वाढविण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने पारित होणे आवश्यक असते. (एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या २/३ बहुमताने)

आणीबाणी संपते कशी ? (Provocation of Emergency) – 
राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा केव्हाही संपुष्टात आणू शकतात. यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.

राष्ट्रीय आणीबाणी चे परिणाम –

राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान राज्य सरकार केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली येतात.
आणीबाणी दरम्यान संसदेने राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांचा अंमल आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यानंतर संपुष्टात येतो.
कलम 354 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे केंद्र व राज्यांच्या घटनात्मक महसूल विभागणी मध्ये फेरबदल करू शकता.
लोकसभेचा कार्यकाल संसदीय कायद्याद्वारे एकावेळी एक वर्षाने वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो.
आणीबाणी संपल्यानंतर सहा महिन्यापेक्षा अधिक काळासाठी लोकसभा-विधानसभा यांचा कार्यकाळ वाढवता येत नाही.
मूलभूत हक्क आणीबाणी वेळी असतात का?
राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 अंतर्गत असणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्याचे अधिकार निलंबित होतात. आणीबाणीचा अंमल संपल्यानंतर कलम 19 मधील सर्व अधिकार आपोआप पूर्ववत होतात.
कलम 359 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत तर ते बजावण्याचा हक्क निलंबित होतो.
आणीबाणी दरम्यान कलम 20 व 21 मधील हक्क अबाधित असतात. (कलम 20 अपराधाच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण आणि कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण.)

भारतीय संघराज्यात राष्ट्रपती मार्फत राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत तीन वेळा घोषित करण्यात आली आहे. (1962, 1971 व 1975) यातील 1975 मधील आणीबाणी अंतर्गत शांतता या कारणावरून करण्यात आली होती.

राज्य आणीबाणी म्हणजे काय ? राष्ट्रपती राजवट (State Emergency)-

कलम 355 नुसार राज्य शासनाचे परकीय आक्रमण व अंतर्गत अशांतता पासून संरक्षण करण्याचे व राज्यांचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याची सुनिश्चित करणे हे केंद्र शासनाचे कर्तव्य आहे.

कलम 356 नुसार राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याचे अशक्य झाले याची खात्री राष्ट्रपतींना झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हाती घेतात यालाच राष्ट्रपती राजवट/राज्य आणीबाणी घटनात्मक/आणीबाणी असे संबोधले जाते.

राष्ट्रपती राजवट (State Emergency)लागू करण्याचे घटनात्मक आधार

१) कलम 356 नुसार राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडल्यास आणि
२) कलम 365 नुसार राज्य शासनाने केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्यास राष्ट्रपती राजवट लावली जाते.

राष्ट्रपती राजवट कालावधी

राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजीव गांधी ची घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता देणे गरजेचे असते.
दोन महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाल्यास नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते.
संसदेची मान्यता मिळाल्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिने अस्तित्वात असतो पुढे एका वेळी सहा महिन्यासाठी वाढवता येतो.
राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव किंवा पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात मार्फत साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.
राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसऱ्या योजनेद्वारे समाप्त करू शकता यासाठी संसदेची संमती आवश्यक नसते.
State Emergency/राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या राज्याचे राज्यपाल, विधानमंडळ वगळता इतर संस्था व प्राधिकारी यांचे सर्व किंवा काही अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेतात.
38 व्या घटना दुरुस्ती कायद्याने अशी तरतूद केली की, कलम 356 चा वापर करण्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री अंतिम व निर्णायक असून तिला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.

44 व्या घटना दुरुस्ती कायद्याने ही तरतूद वगळण्यात आली. म्हणजे राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन  या आधारे आव्हान देता येते.

वित्तीय/ आर्थिक आणीबाणी म्हणजे काय?

कलम 360 नुसार देशाची आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्यास राष्ट्रपती वित्त आणीबाणीची घोषणा करू शकतात.

कालावधी
वित्तीय आणीबाणी संदर्भात संसदेची संमती घ्यावी लागते. मात्र आणीबाणी ला मान्यता मिळाल्यापासून तिचा अंमल महत्तम कालावधी दिलेल्या नाही.

वित्तीय आणीबाणी राष्ट्रपतींच्या दुसर्‍या उद्घोषणा द्वारे समाप्त होऊ शकते.
भारतात आजपर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही.

जागतिक स्तरावरील महत्वाच्या व्यक्ती

जागतिक स्तरावरील महत्वाच्या व्यक्ती

👤 जो बायडन
✅ अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष

👩‍🦰 कमला हॅरीस
✅ अमेरिकेच्या ४९व्या उपराष्ट्राध्यक्षा

👤 डेव्हिड मालपास (अमेरिका)
✅ जागतिक बॅंकेचे १३वे अध्यक्ष

👩‍🦰 क्रिस्टलिना जॉर्जिवा (बल्गेरिया)
✅ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख

👤 टेड्रोस अ‍ॅधॅनॉम (इथिओपिया)
✅ जागतिक आरोग्य संघटनेने ८वे प्रमुख

👤 अँटोनियो गुटेरेस (पोर्तुगाल)
✅ संयुक्त राष्ट्राचे ९वे सरचिटणीस

👩‍🦰 एनगोझी ओकोन्जो (नायजेरिया)
✅ जागतिक व्यापार संघटनेच्या ७व्या प्रमुख

👩‍🦰 ऑड्रे अझोले (फ्रान्स)
✅ युनेस्कोच्या ११व्या महासंचालिका

👩‍🦰 गीता गोपीनाथ (भारतीय वंशाच्या)
✅ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ

👩‍🦰 सना मरीन (३५) (फिनलॅंड)
✅ जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान.

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...