Monday 7 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.
     शहाण्याला .................. मार.

   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

2) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

3) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

4) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

5) संयुक्त स्वर म्हणजे –

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

6) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 3

7) खाली दिलेल्या सामासिक शब्दातील ‘मध्यमपदलोपी समास’ ओळखा.

   1) साखरभात    2) पीतांबर   
   3) खरेखोटे    4) गल्लोगल्ली

उत्तर :- 1

8) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.

   1) अवतरण    2) संयोग     
   3) अपसरण    4) स्वल्पविराम

उत्तर :- 3

9) ‘धोंडा’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

   1) तत्सम    2) देशी     
   3) परभाषेतील    4) यापैकी कोणत्याच नाही

उत्तर :- 2

10) ‘सूर्य अस्तास गेला’ याचा व्यंग्यार्थ कोणता ?

   अ) सध्या स्नानाची वेळ झाली        ब) अभ्यासाची वेळ झाली
   क) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली    ड) गुरे घरी घेण्याची वेळ झाली

   1) सर्व चूक          2) सर्व बरोबर
   3) फक्त अ, ब बरोबर आणि बाकी दोन्ही चूक    4) फक्त अ, ब चूक आणि बाकी दोन्ही बरोबर

उत्तर :- 2

'आरे'आंदोलनः २९ पर्यावरणवाद्यांना अखेर जामीन

- आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेतील आंदोलनकर्त्या २९ जणांना कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा मोहिमेसाठी आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीच्या कोर्टात हजर केले असता २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

- मबुईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात जाताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडे कापण्याचा प्रकार समोर आला. पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीपासून या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आज आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर केले असता यातील २९ जणांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ५५ जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली तत्काळ याचिका आज दाखल करून घेण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने पर्यावरणप्रेमींना मोठा झटका बसला आहे.

- गोरेगाव हायवेपासूनच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. लोकांना आरे परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. मुंबई 'मेट्रो ३'चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्याच्या व त्यासाठी तेथील २ हजार ६५६ झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसेच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तिथे दाद मागा, असे न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितले होते. रात्रीच्या सुमारास झाडे तोडण्यात येत आहे.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारताची ‘मिसाईल पॉवर’

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला.

▪️पृथ्वी-1

सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.

▪️अग्नि-1

अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.

▪️आकाश

जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.

▪️नाग

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.

▪️त्रिशूल

जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.

▪️अग्नि 2

एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.

▪️पृथ्वी 3

नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.

▪️ब्राह्मोस

भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

▪️सागरिका

समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.

▪️धनुष

पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

▪️अग्नि-3

अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.

▪️अग्नि-4

पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.

▪️अग्नि-5

भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.

▪️निर्भया

जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.

▪️प्रहार

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा

◾️यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.

◾️विल्यम जी.केलिन, सर पीटर जे. रेटक्लिफ, ग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

◾️सोमवारी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे. मंगळवारी भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

◾️ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा या तिन्ही वैज्ञानिकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या मात्रामुळे आपल्या सेलुलर मेटाबोलिज्म आणि शारीरिक हालचालीवर प्रभाव करतो. या वैज्ञानिकांच्या शोधामुळे एनिमिया, कँसर आणि अन्य आजारांवरील उपाय जलद होऊ लगाले.

🔷 नोबेल पुरस्काराचे स्वरूप 🔷

◾️नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र, सुवर्णपदक (१७५ ग्रॅम), रोख रक्कम ९ मिलियन स्विडिश क्राऊड म्हणजे १४ लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय ७ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे.

◾️सुवर्णपदकाचे मूल्य लावले तर ते ५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही पुरस्कारार्थींनी त्याची बोली लावून विक्री केली होती. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती.

current_affairs_Quiz

1) इंडियन ऑइल कंपनीने प्लास्टिकच्या कचर्‍यापासून कोणत्या ठिकाणी रस्ता तयार केला आहे?
उत्तर : फरीदाबाद

2) पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणारे राज्य कोणते?
उत्तर : राजस्थान

3) पंजाब नॅशनल बँकेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?
उत्तर : एस. एस. मल्लिकार्जुन राव

4) महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले?
उत्तर : पॅलेस्टाईन

5) “इंडिया अँड द नेदरलँड्स - पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर” या पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : वेणू राजामोनी

6) ‘बेस्ट लर्निंग अँड शेअरींग स्पेस अवॉर्ड 2019’ जिंकलेल्या राज्याचे नाव काय आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

7) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या भारताच्या कार्यकारी संचालकपदी कोण आहे?
उत्तर : सुरजित भल्ला

8) भारत सरकार कोणत्या सालापर्यंत प्लास्टिक-मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे?
उत्तर : सन 2022

9) ओडिशा राज्य सरकारने लोक-केंद्रित प्रशासन विकासासाठी कोणता उपक्रम राबवला?
उत्तर : मो सरकार पुढाकार

10) तैवानमध्ये नुकत्याच आलेल्या कोणत्या वादळामुळे शेतीचे नुकसान झाले?
उत्तर : मिताग

मराठी प्रश्नसंच 7/10/2019

Q.1) अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
वरील भारुड रचना खालीलपैकी कोणी लिहिली .(MPSC 2016)
A) संत ज्ञानेश्वर
B) संत एकनाथ
C) संत जनाबाई
D) संत तुकाराम
उत्तर : B) संत एकनाथ

Q.2) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? (MPSC 2010)
A) नागरी
B) मोडी
C) संस्कृत
D) देवनागरी
उत्तर : D) देवनागरी

Q.3) देवनागरी लिपी लिहीण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. (MPSC 2010)
A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.
B) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे.
C) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे.
D) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे.
उत्तर : A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.

Q.4) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? (MPSC 2012 )
A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत
B) मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी
C) मराठी, तेलगू, हिंदी, संस्कृत
D) मराठी, कानडी, गुजराती, बंगाली
उत्तर : A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत

Q.5) देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. (MPSC 2010)
A) देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही.
B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते.
C) देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते.
D) देवनागरी लिपीत एका वर्णाला दोन ध्वनी असतात.
उत्तर : B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते.

Q.6) पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
" भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते" कारण - (MPSC 2015)
A) भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात.
B) भाषेमध्ये बदल होत जातात.
C) भाषेच्या व्याकरणांच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही
D) भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो.
उत्तर : B) भाषेमध्ये बदल होत जातात.

Q.7) "कान फुटले तुहे का तोंडाले कुलुप लावले कोण?"
हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे? (महा.टीईटी-16)
A) अहिराणी
B) वऱ्हाडी
C) वारली
D) झाडबोली
उत्तर : B) वऱ्हाडी

Q.8) ऋ बदद्ल अ, ई, उ, र हे पर्याय स्विकारण्याची प्रवृत्ती कोणत्या भाषेपासून घेतली? (महा.सेट-2015)
A) कन्नड भाषेपासून
B) अपभ्रशं भाषेपासून
C) तामिळ भाषेपासून
D) संस्कृत भाषेपासून
उत्तर : B) अपभ्रशं भाषेपासून

Q.9) सुरावली हे कोणत्या प्रकाराच्या स्वनिमाचे उदाहरण आहे? (महा.सेट-2015)
A) खंडित
B) खंडाधिष्टीत
C) महाप्राण
D) सघोष
उत्तर : B) खंडाधिष्टीत

Q.10) स्वन म्हणजे काय? (महा.सेट-2015)
A) अक्षर
B) भाषेत वापरला जाणारा ध्वनी
C) ध्वनी
D) उच्चार
उत्तर : B) भाषेत वापरला जाणारा ध्वनी

Q.11) वामन पंडिताने भगवत गीतेवर कोणती टिका लिहिलेली आहे? (महा.सेट-2015)
A) भावार्थदिपीका
B) यथार्थदिपीका
C) गीतागौरव
D) उध्दवगीता
उत्तर : B) यथार्थदिपीका

Q.12) मराठी पहिला दिवाळी अंक कोणी प्रकाशित केला? (महा.सेट-2015)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) रा.भी.गुंजीकर
C) का.र.मित्र
D) वि.सि.गुर्जर
उत्तर : C) का.र.मित्र

Q.13) पुढीलपैकी कोणता विशेष प्रमाण भाषेचा नाही? (महा.सेट-2015)
A) निरनिराळ्या गटांकडून परस्पर संपर्कासाठी वापर
B) लेखन व्यवहारात प्राधान्य
C) अनौपचारिक संदर्भातील वापर
D) औपरारिक संदर्भातील वापर
उत्तर : C) अनौपचारिक संदर्भातील वापर

Q.14) मराठीतील भाषांतरीत साहित्यातील सुची कोणी केली? (महा.सेट-2015)
A) मृणालिनी गटकरी
B) विना मुळे
C) विना आलासे
D) सु. रा. चुनेकर
उत्तर : B) विना मुळे

Q.15) ब्राम्ही लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केली? (जि.नि.स.परभनी-2015)
A) विलीयम जोश
B) जेम्स प्रीसेप
C) जॉन मार्सल
D) चॉल्स मॅके
उत्तर : B) जेम्स प्रीसेप

Q.16) महानुभवानी आपले वाङ्मय कोणत्या सांकेतिक लिपीत लिहिले आहे? (महा.सेट-2015)
A) ब्राम्ही लिपी
B) खरोष्टी लिपी
C) सकळ लिपी
D) मोडी लिपी
उत्तर : C) सकळ लिपी

Q.17) भाषा हा शब्द संस्कृतमधील ...........धातुपासून आला आहे. (तलाठी, धुळे-2010)
A) भाषिक
B) भाषा
C) बोलणे
D) भाष्
उत्तर : D) भाष्

Q.18) भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला __ म्हणतात. (डीएमईआर, लि.टं-15)
A) व्याकरण
B) भाषाशास्त्र
C) लिपी
D) बाराखडी
उत्तर : A) व्याकरण

Q.19) काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला ___ लिपी म्हणतात. (समाजकल्याण, पुणे-2014)
A) अर्धमागधी
B) देवनागरी
C) पाली
D) मोडी
उत्तर : D) मोडी

Q.20) विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? (जि.प. चंद्रपूर-2014)
A) मित्र
B) भाषा
C) भावना
D) समाज
उत्तर : B) भाषा

Q.21) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने __ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. (जि.प.भंडारा-2015)
A) रंगनाथ पठारे
B) नरेंद्र जाधव
C) श्याम मनोहर
D) यापैकी नाही
उत्तर : A) रंगनाथ पठारे

Q.22) कोणता घटक भाषेत वापरला जात नाही? (लिपिक, वर्धा-2015)
A) रूप
B) रूपिका
C) स्वन
D) स्वनिम
उत्तर : D) स्वनिम

Q.23) मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? (लिपिक, वर्धा-2015)
A) इंडो-युरोपियन
B) द्रविड भाषाकुल
C) ऑस्ट्रो-ओशियायी
D) सिनो-तिबेटीयन
उत्तर : A) इंडो-युरोपियन

Q.24) स्वनिमाचे भाषेतील कार्य कोणते ? (लिपिक, वर्धा-2015)
A) पुरकविनियोग
B) अर्थविभेदकता
C) शब्दसिद्धी
D) नाशिक्यरंजन
उत्तर : B) अर्थविभेदकता

Q.25) स्वनिम ही एक आदर्श कल्पना असून स्वनानंतर हे त्याचे काय आहे? (लिपिक, वर्धा-15)
A) प्रात्यक्षिक
B) समांतर
C) व्यंजन
D) अर्थांतर
उत्तर : A) प्रात्यक्षिक

Q.26) बोलण्याची प्रक्रिया अर्थाकडून ध्वनीनिर्मितीकडे जात असते, तर ऐकण्याची प्रक्रिया ध्वनी ग्रहणाकडून अर्थाकडे जात असते? (लिपिक, वर्धा-2015)
A) संपूर्ण विधान चूक
B) पूर्वाध चूक उत्तरार्ध बरोबर
C) संपूर्ण विधान बरोबर
D) पूर्वाध बर

Q.34) मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात? (ग्रामसेवक बुलढाणा 2014)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) दादोबा पांडूरंग तर्खडकर
C) मो.के. दामले
D) यापैकी नाही
उत्तर : B) दादोबा पांडूरंग तर्खडकर

Q.35) विभावरी शिरुळकर कोणत्या लेखिकेचे टोपणनाव आहे? (म्हाडा लि.टं. - 2015)
A) दुर्गा भागवत
B) इंदिरा संत
C) मालती बेडेकर
D) संजीवनी मराठे
उत्तर : C) मालती बेडेकर

Q.36) "माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।''

असे मराठीचे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे? (म. पो. लातूर 2013)
A) संत ज्ञानेश्वर
B) संत एकनाथ
C) संत तुकाराम
D) संत रामदास
उत्तर : A) संत ज्ञानेश्वर

Q.37) मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? (लिपिक वाशिम -2012)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) दादोबा पांडूरंग
C) विष्णू शास्त्री चिपळूनकर
D) यापैकी नाही
उत्तर : C) विष्णू शास्त्री चिपळूनकर

Q.38) वि.वा.शिरवाडकर कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? (म. पो. अकोला- 2013)
A) कुसुमाग्रज
B) ग्रेस
C) गोंविदाग्रज
D) बालकवी
उत्तर : A) कुसुमाग्रज

Q.39) मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? (म्हाडा व.लि. -2015)
A) २७ फेब्रुवारी
B) २८ फ़ेब्रुवारी
C) १ मार्च
D) २ मार्च
उत्तर : A) २७ फेब्रुवारी

Q.40) 'ळ' हा वर्ण मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आला आहे? (महा.सेट. -2015)
A) प्राकृत
B) द्रविड
C) आर्य
D) आसामि
उत्तर : B) द्रविड

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...