Tuesday 14 December 2021

महाराष्ट्राला मागे टाकत गुजरात सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अलीकडील अहवालानुसार, गुंतवणुक आणि व्यवसायात सातत्याने सुधारणा झाल्यामुळे गुजरात हे देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले आहे.  


गुजरातने महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.  RBI च्या मते, 2020 पर्यंत गुजरातचे सकल मूल्यवर्धित (GVA) सरासरी 15.9 टक्क्यांनी वाढून 5.11 लाख कोटी रुपये झाले आहे.  याच कालावधीत महाराष्ट्राचा GVA 7.5 टक्क्यांनी वाढून 4.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  म्हणजेच आठ वर्षांचा सरासरी विकासदर गुजरातच्या निम्मा होता.  


गुंतवणुकीने गुजरातला मागे टाकण्यात मोठी भूमिका बजावली, जी 2012-2020 मध्ये 5.85 लाख कोटी रुपये होती.  याच काळात महाराष्ट्र 4.07 लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली.  


याशिवाय गुजरातमध्ये व्यवसाय परवाने देण्यासाठी एकच सुलभ कामगार कायदा आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना यासारख्या सुधारणांनीही मोठी भूमिका बजावली.  


सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आजही सेवा क्षेत्रात देशात आघाडीवर आहे.  राज्याचा सेवा GVA 2020 मध्ये वार्षिक सरासरी 12.6 टक्के दराने वाढून 15.1 लाख कोटी रुपये झाला. 


सेवा क्षेत्रात, तामिळनाडू रु. 3.43 लाख कोटींच्या GVA सह दुसऱ्या, कर्नाटक रु. 2.1 लाख कोटींसह तिसर्‍या स्थानावर आणि उत्तर प्रदेश रु. 1.87 लाख कोटींसह चौथ्या स्थानावर आहे.  2020 मध्ये देशातील एकूण उत्पादन GVA 16.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आचारसंहिता संपताच लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना वाढीव संधीचा निर्णय



🔰वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी विधान परिषद निवडणुकीमुळे शासन आदेश निघू शकलेला नाही.


🔰आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचा शासन निर्णय काढला जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी माध्यमांना दिली. करोना परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला एकही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, सरकार त्यांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


🔰आचारसंहितेमुळे शासन निर्णय लांबणीवर - करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती. करोनाच्या संकटामुळे हे घडल्याने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने ११ नोव्हेंबरला सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता एक वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला होता.


🔰मात्र, त्यानंतर काही दिवसांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागल्याने राज्य शासनाला या संदर्भातील शासन निर्णय काढता आला नाही, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.


धर्माधारित फाळणी ही ऐतिहासिक चूक.



🔰भारताने १९७१ साली पाकिस्तानविरुद्धचे थेट युद्ध जिंकले आणि सध्या पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धचे अप्रत्यक्ष युद्धही भारत जिंकेल. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होताना भारताचे धर्माच्या नावावर झालेले विभाजन ही ‘ऐतिहासिक चूक’ होती हे १९७१च्या युद्धाने दाखवून दिले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.


🔰दहशतवादाला प्रोत्साहन देऊन आणि इतर भारतविरोधी कारवाया करून पाकिस्तान भारताचे तुकडे करू इच्छितो, असे भारताने १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय पर्वाच्या’ (सुवर्णमहोत्सवी समारंभ) उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.


🔰भारताच्या सशस्त्र दलांनी १९७१च्या युद्धात पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीला मिळवले आणि सध्या ते दहशतवादाचा धोका मुळापासून नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष युद्ध जिंकलो आणि आम्ही अप्रत्यक्ष युद्धही जिंकू अशी मी हमी देऊ शकतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

घटनेतील मूलभूत हक्क



♦️KEY POINTS TO REMEMBER


कलम 14 - समानता

कलम 15 - भेदभाव

कलम 16 - समान संधी

कलम 17 - अस्पृश्यता 

कलम 18 - किताब


कलम 19 - स्वातंत्र्य

कलम 20 - अपराध दोषसिद्धी

कलम 21 - जीवित व्यक्तिगत

कलम 21A - शिक्षण

कलम 22 - अटक स्थानबद्धता 


कलम 23 - वेठबिगारी मनाई

कमल 24 - बालकामगार मनाई


कलम 25 - धार्मिक आचरण

कलम 26 - धार्मिक संघटन

कलम 27 - धार्मिक कर

कलम 28 - धार्मिक शिक्षण


कलम 29 - अल्पसंख्याक हित संवर्धन

कलम 30 - अल्पसंख्याक शिक्षण


कलम 31 - रद्द (संपत्तीचा हक्क)


कलम 32 - घटनात्मक उपाययोजना


कलम 33 - सेनेच्या हक्कात बदल

कलम 34 - लष्करी कायदा

कलम 35 - संसदेला अधिकार

The Infinity Current



1. कोणते राज्य डिसेंबर 2021 मध्ये, भारतातील पहिले पूर्णपणे कोविड-19 लसीकरण झालेले राज्य 

बनले आहे?


1. हिमाचल प्रदेश

2. हरियाणा

3. मध्य प्रदेश

4. गुजरात


उत्तर- 1


------------------------------------------------------------


2. 6 डिसेंम्बर ह्या दिवशी भारत आणि कोणता देश मैत्री दिवस साजरा करणार आहे?


1. नेपाळ

2. बांग्लादेश

3. भूतान

4. म्यानमार


उत्तर- 2


------------------------------------------------------------


3. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा


अ. अनन्या बन्सल हिने आशिया युवा पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे 

ब. आशिया युवा पॅरालिम्पिक स्पर्धेत F-20 प्रकारात शॉटपुट मध्ये पहिले पदक जिंकले.

क. ही स्पर्धा बहरिनमधील मनामा येथे झाली आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब

3. या आणि ब

4. एकही नाही


उत्तर- 1


Correct ans- अनन्या बन्सलने रौप्यपदक जिंकले आहे.


------------------------------------------------------------


4. कोणत्या राज्यसरकारने  महिलांसाठी बॅक टू वर्क योजना सुरू केली आहे?


1. मध्य प्रदेश

2. केरळ

3. झारखंड

4. राजस्थान


उत्तर- 4


------------------------------------------------------------


5. 21 व्या शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार आहेत?


1. फ्रांस

2. व्हिएतनाम

3. रशिया

4. अमेरिका


उत्तर- 3


------------------------------------------------------------


6. खालीलपैकी अचूक विधान निवडा


अ. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुंबईतील नेव्हल येथे यार्ड 22 व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वाड्रनला राष्ट्रपती मानक प्रदान करण्यात येणार आहे.

ब. राष्ट्राला दिलेल्या सेवेबद्दल सर्वोच्च कामांडरने लष्करी तुकडीला दिलेला राष्ट्रपती मानक हा सर्वोच्च सन्मान आहे.

क.  वेसल स्क्वाड्रनला किलर्स नावाने ओळखले जाते.


1. अ, ब, क

2. अ, ब

3. ब, क

4. अ, क


उत्तर- 1


------------------------------------------------------------


7. ......या भारतीय-अमेरिकन गणितज्ञांना सिप्रियन फोयास पुरस्कार मिळाला आहे.


1. निखिल श्रीवास्तव

2. शकुंतला देवी

3. सी.एस. शेषाद्री

4. सी.आर.राव


उत्तर- 1


------------------------------------------------------------


8. इंडोनेशियन जावा बेटावर डिसेंम्बर 2021 मध्ये उद्रेक झालेल्या प्राणघातक ज्वालामुखीचे नाव काय आहे?


1. मौना लोआ

2. फुजियामा

3. सेमेरू

4. किलिमांजारो


उत्तर-3


------------------------------------------------------------


9. राष्ट्रीय पुनर्निर्मित कंपनी चे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली?


1. अंशुला कांत

2. प्रदिप शाह

3. सुनील मेहता

4.  सुनीत शर्मा


उत्तर- 2


------------------------------------------------------------


10. उत्तरप्रदेश मधील कोणत्या शहरांमध्ये दूरदर्शन केंद्राच्या अर्थ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले?


1. कानपूर

2. फैजाबाद

3.लखीमपूर

4. गोरखपूर


उत्तर-4

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे


51) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)


52) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश


53) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :उत्तर प्रदेश


54) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?

उत्तर : आसाम


55) एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :मध्य प्रदेश


56) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?

उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.


57) भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?

उत्तर : 22 मार्च 2020


58) भारत चीन वाद केव्हा झाला?

उत्तर : 17 जून 2020


59) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर : पाच ऑगस्ट 2020.


60) महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू

 

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

✍चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..

साराबंधी चळवळ (सन 1918) :-

✍ 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.. गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

✍ शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा गांधीजीचा दूसरा विजय होता..

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

✍ भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

✍या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

✍या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

✍13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.. या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

मोर्ले-मिंटो अधिनियम 1909

🅾लॉर्ड मिंटोची व्हॉईसरॉय पदी निवड झाल्याने संपूर्ण भारत हा राजकीय अशांततेकडे जाताना दिसला.

🅾 त्यामुळे तत्कालीन भारतमंत्री मोर्ले व व्हॉईसरॉय मिंटो यांनी मिळून भारत सरकार अधिनियम पारित 1909 ला पारित केले.

🅾 यानुसार प्रांतीय विधानमंडळाचे आकार व सदस्यसंख्या व अधिकार वाढवण्यात येतील.

🅾 भारतीयांना प्रस्ताव दाखल करणे त्यावर प्रश्न विचारानेही हि तरतूद प्राप्त झाली.

🅾मुसलमानांकरिता स्वातंत्र्य मतदार संघाची निर्मिती करण्यात आली.

🅾 ज्याचा उद्देश राष्ट्रीय आंदोलनामध्ये फूट पाडणे असा होता. या अधिनियमावरच भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली.

🅾 जहालवादी व क्रांतिकारी लोकांनी मोठ्या प्रमाणात आपले कार्य करण्याची सुरुवात केली.

🅾 भारत सरकारने 1911 मध्ये राष्ट्रद्रोह अधिनियम पारित केला.

🅾 यानुसार जहालवादी नेता लालालाजपत राय व अजित सिंह यांना अटक करण्यात आली.

🅾 याचवर्षी इंग्लंडचा सम्राट जॉर्ज पंचमच्या स्वागताकरिता भव्य दिल्ली दरबारचे आयोजन करण्यात आले होते.

🧩 1919 मॉन्टेग्यु चेम्सफोर्ड अधिनियम:-

🅾 मॉन्टेग्यु हा भारतमंत्री व चेम्सफोर्ड हा व्हॉईसरॉय होता.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

🅾 पहिल्यांदा द्विदल शासन पद्धत चालू करण्यात आली.

🅾 व्हॉईसरॉयच्या कॉउंसिल मध्ये ६ सदस्य ठेवण्यात आले. त्यापैकी ३ पदे भारतीयांना प्राप्त झाले.

🅾 शीख, ख्रिश्चन व अँग्लो इंडियन यांना वेगळे मतदार संघ प्राप्त झाले.

🅾 प्रॉपर्टी टॅक्स व एज्युकेशन टॅक्स लागू करण्यात आला.

🅾 भारतीयांकरिता एक हायकमिशनचे ऑफिस लंडन या ठिकाणी बनवण्यात आले.

🅾 लोकसेवा आयोगाची स्थापना व त्याचे पूर्ण बांधकाम 1926 मध्ये पूर्ण झाले.

राष्ट्रगीत (National Anthem)

- राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

- २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

- राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

- काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

- जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

- १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

- राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

- राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

- १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

- बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🅾परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🅾सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🅾प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🅾परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🅾मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🅾सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🧩प्रार्थना समाजाचे कार्.

🅾प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🅾न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🅾ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🅾देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🅾मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🅾४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🅾मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🅾इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🅾इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🅾प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🧩प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन..

🅾प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

महात्मा गांधीजीं बाबत संबोधन

१. महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

२. बापू - सरोजिनी नायडू

३. भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट

४. राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

५. मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

६. देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

७. अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

८. इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

९. अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सराव  प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून 
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस 
रासबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - रासबिहारी बोस

3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई 
शिवाजी महाराज 
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्य

7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले
रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

🔸🔹

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🅾परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🅾सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🅾प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🅾परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🅾मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🅾सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🧩प्रार्थना समाजाचे कार्.

🅾प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🅾न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🅾ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🅾देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🅾मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🅾४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🅾मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🅾इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🅾इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🅾प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🧩प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन..

🅾प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 22/11/2019

१)  भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द
     विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

   अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व  देशातील कायद्याचा आदर करणे.
   ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
   क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
   ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
   1) अ, क    2) ब      3) ड      4) सर्व

उत्तर :- 4
२)  मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

   1) मंत्रीमंडळ    2) जनता      3) प्रतिनिधी    4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर :- 2

३)   योग्य क्रम निवडा.
   अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे    ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
   क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे    ड) संविधानाचा सन्मान करणे

   1) अ, ड, क, ब    2) ड, अ, क, ब    3) ड, ब, अ, क    4) ड, अ, ब, क

उत्तर :- 2

४)  खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?
   1) देशाचे संरक्षण करणे            
   2) नियमित कर भरणे
   3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे    4) एकही नाही

उत्तर :- 2

५)  राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
   अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
   ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
   क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.
   ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
        वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?
   1) अ   
    2) ब, क 
    3) अ, ब, क
    4) सर्व

उत्तर :- 4

६)  मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.

अ) सार्वभौमत्वाचे रक्षण 

ब) राष्ट्रगीताचा सन्मान

क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण

ड) वैज्ञानिक दृष्टिकोन

    1) अ, ब, क, ड
    2) ब, अ, क, ड  
    3) ब, अ, ड, क  
    4) ड, क, ब, अ

उत्तर :- 3

७)  एका विशिष्ट मुलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवडयांचा उल्लेख मुलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?

   1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रधज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

   3) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे.

   4) 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

उत्तर :- 3

८)  खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

   1) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

   2) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

   3) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.

   4) पंचायत राजची निर्मिती करणे.

उत्तर :- 4

९)  खालील विधाने लक्ष्यात घ्या :

   अ) स्वर्ण सिंह समितीच्या
मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

   ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

   क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

        वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?

   1) अ, ब
   2) ब, क   
   3) अ, क  
   4) क

उत्तर :- 1

१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

   ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनासबंधनकारक केले गेले.

        वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

   1) अ 
    2) ब  
   3) अ, ब  
   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

"भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक" कॅग (CAG)

- घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 दरम्यान कलम 148 ते 151 दरम्यान या पदाच्या तरतुदी आहेत.
- कलम 148(1) : नुसार भारताला एक कॅग असेल ज्याची नेमणुक राष्ट्रपती(पंतप्रधानांच्या सल्ल्याने)  करतात.
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रमाणे पदावरून बडतर्फ केले जाते त्याच प्रमाणे कॅगला पदावरून दूर केले जाते.
- कलम 148(2) : कॅगला शपथ हे परिशिष्ट 3 मधील शपथेच्या नमुन्यानुसार राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती देते.
- कलम 148(3) : कॅगचे वेतन तसेच निवृत्तीवेतन संसद ठरवील त्याप्रमाणे परिशिष्ट 2 प्रमाणे दिले जातील.
- कलम 148(4) : पदावधी संपल्यावर कॅग पुन्हा केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये कोणत्याही पदास पात्र असत नाही.
- कलम 148(5) : कॅगच्या अधिकारात ते पदावर असताना कोणतेही बदल करायचे असल्यास कॅगशी विचारविनिमय करून राष्ट्रपती करतील.
- कलम 148(6) : कॅग व त्यांचा प्रशासकीय व कार्यालयीन खर्च हा भारताचा संचित निधीतून केला जाईल.
- कॅग राजीनामा ध्यायचा असल्यास राष्ट्रपतीला देतील.

"कॅग" विषयी अन्य घटनात्मक तरतुदी
- कलम 149 : कॅगचे कर्तव्य व अधिकार
- कॅगची कर्तव्ये व अधिकार कायदा, 1971 नुसार कॅगची कामे सांगण्यात आली.
- 1976 साली या कायद्यात बदल करून कॅगची लेखविषयक कामे काढून केवळ लेखा परीक्षण कामे ठेवण्यात आली.
- कलम 150 : कॅग राष्ट्रपतींना केंद्र व राज्यसरकारचे लेखे कोणत्या नमुन्यात ठेवावेत याबाबत सल्ला देतात.
- कलम 151(1) : कॅग केंद्र सरकारचे लेखा अहवाल राष्ट्रपतींना देतात तर राष्ट्रपती ते अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात.
- कलम 151(2) : कॅग राज्य सरकारचे लेखा अहवाल राज्यपालना देतात तर राज्यपाल ते अहवाल राज्य विधिमंडळासमोर प्रत्येक सभागृहात मांडतात.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...