Saturday 4 July 2020

पूर्व परीक्षा संदर्भात

पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी पासून , कसा करावा असे बरेच प्रश्न विचारले जातात, या संदर्भातील माझा अॅप्रोच मी शेअर करत आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही साठी MCQ solving skill . चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे  अभ्यास ची method  मेन्स ची जी आहे  ती राहू दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रश्न हा उभा राहतो की,  मेन्स चा अभ्यासक्रम विस्तृतपणे उपलब्ध आहे,त्यामुळे कशे आणि किती वाचायचे याची कल्पना येते, परंतु प्रेलिम ला हेच लक्षात येत नाही( सामान्य अध्ययन चा बाबतीत तरी घडते).कारण आयोगाने देखील अभ्यासक्रम एका घटकासाठी एका ओळीत मांडला आहे. त्यामुळे किती खोलात जायचे, किती wide  , . त्या काळात अभ्यास करायचा ,याची आयडिया येत नाही.त्यामुळे gs ल बऱ्याचदा स्कोअर खूप कमी येतो.तर काय करावे आणि काय करू नये

१)  पुस्तके -
२-३ टॉपर ची booklist scan. करा .
त्यानंतर स्वतः ची booklist तयार करा. standard books. असतील तर एकच source  राहू द्यात.
e.g राज्यशास्त्र - कोळंबे किंवा लक्ष्मीकांत एकच वाचला तरी sufficient आहे.

2) योग्य नियोजन -
दोन पेपर आहेत आपल्याला. दोन्हीला संतुलित करता आले पाहिजे. असे होते की , GS . मध्ये विषय एवढे जास्त असल्याने , CSAT  कडे, आपले दुर्लक्ष होते. अपुऱ्या तयारी मुळे ,पेपर पण अवघड जातो, आणि पूर्व ला अपेक्षित marks. येत नाही. त्यामुळे दोन्ही पेपर व्यवस्थित कसे  cover  होतील हे पहिले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे.

3)  मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण -
बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की विश्लेषण का करावे , आणि करावे तर कसे करावे
A) . का करावे
विश्लेषण मुळे प्रश्नांचा रोख कसा आहे,कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे , काठिण्य पातळी किती आहे ह्या सर्व बाबींची समज येते. तसेच अभ्यासाला दिशा मिळते
B)  विश्लेषण कसे करायचे
a) प्रश्न  हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे हे ओळखता आला पाहिजे
b) त्यांनतर त्या विषयातील कोणत्या घटकाशी related  आहे.
c) त्याविषयावर to प्रश्न ,कसे विचारले आहेत
म्हणजे
factual , conceptual ,  किँवा statement based आहेत हे वर्गीकरण करणे
अश्या काही गोष्टी यात येतात

4) minimum books with maximum revision
पुस्तके जेवढी वाढवाल तेवढी उजळणी करताना समस्या येईल. त्यामुळे कमी पुस्तके निवडून जास्त वेळा चाळलेली better.  साधारण 1 reading नंतर 3-4 वेळा revision होतील अश्या दृष्टीने प्रयत्न करा. जेवढ्या जास्त revision तेवढं जास्त लक्षात राहते, विषयावरील  पकड  आणखी घट्ट होते.

5) सराव MCQ based. परिक्षा आहे,त्यामुळे ह्या प्रश्न कसे टाकलेत ,हा जो जाणतो तो यशस्वी होतो.  हे कौशल्य जास्तीत जास्त प्रश्न डोळ्या खालून गेल्यावर विकसित होते. त्यामुळे जास्तीत जास्त Quality प्रश्न सोडवण्याची सवय ठेवा.
त्यासाठी प्रश्न संच किंवा / आणि टेस्ट सीरिज चे प्रश्न सोडवू शकता.

6) टेस्ट सीरिज लावावी का नाही

ज्यांना time mgmt जमत नाही, अभ्यासात discipline राहत नाही त्यांनी अवश्य लावा. त्यामुळे हे issue tar solve होतातच , शिवाय स्पर्धेत आपण कुठे आहोत हे पण कळते
परंतु लावलीच पाहिजे तरच success   मिळते असे नाही. काही जणांना,टेस्ट चे paper किंवा मिळालेल्या मार्क्स मुळे टेन्शन वाढते,अश्यानी घरी आणून solve केले तरी चालेल.
टेस्ट पेपर चा फायदा करून घायचा असेल तर, मार्क्स किती मिळाले व रंक किती आली यापेक्षा , आपल्या कुठे चुका झाल्या , का झाल्या ह्या भागावर भर द्या.चुकलेले प्रश्न मार्क करून ठेवा, पेपर ची उजळणी करताना त्या कडे विशेष लक्ष द्या.

तयारी आपण केलेली असते ,खूप कष्ट घेतलेले असते,परंतु सर्वात महत्वाचे असते D - day  ची temperament, attitude. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणे , exam दिवशी सुधा तो दृष्टिकोन maintain ठेवणे, याचा तुम्हाला  यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा असेल. शेवटी relative performance matters. त्यामुळे एक्झाम मध्ये कठीण प्रश्न आले म्हणून depress hou नका किंवा खूप सोपे वाटले म्हणून excite होऊ नका. 2 तास sincere ठेवा, यश तुमचेच असेल.

बँक व स्थापना

🏦 RBI:-1 एप्रिल 1935

🏦 IFCI:-1948

🏦 SBI:-1 जुलै 1955

🏦 LIC:-सप्टेंबर 1956

🏦 UTI:-1 फेब्रुवारी 1964

🏦 IDBI:-जुलै 1964

🏦 GIC:-नोव्हेंबर 1972

🏦 RRB:-2 ऑक्टोबर 1975

🏦 EXIM:-1 जानेवारी 1982

🏦 NABARD:-12 जुलै 1982

🏦 NHB:-जुलै 1988

🏦 SIDBI:-1990
____________________________________

ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम

◾️1. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.

◾️2. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.

◾️3. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.

◾️4. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.

◾️5. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.

◾️6. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.

◾️7. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.

◾️8. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.

◾️9. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.

◾️10. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

औद्योगिक विकास.


🅾औद्योगिक क्रांती कारखाने विकास समाजात यामुळे बदल मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले. मुळात कारखाने स्टीम-चालित होते, परंतु नंतर इलेक्ट्रिकल ग्रीड विकसित झाल्यानंतर ते विजेवर बदलले गेले .

🅾 यांत्रिकीकृत असेंब्ली लाइनची प्रक्रिया पुनरावृत्ती करण्यायोग्य फॅशनमध्ये भाग एकत्र करण्यासाठी केली गेली होती, ज्यात प्रत्येक कामगार प्रक्रियेदरम्यान विशिष्ट पावले करतात. 

🅾यामुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आणि शेवटी प्रक्रियेची किंमत कमी झाली. नंतर मानवी ऑपरेटर पुनर्स्थित करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर वाढत्या प्रमाणातझाला. संगणक आणि रोबोटच्या विकासासह या प्रक्रियेस वेग आला आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠औद्योगिक कामगार.💠💠

🅾 औद्योगिक समाजात, लोकसंख्येचा एक मोठा भाग उद्योग नियुक्त करतो. हे सामान्यतः उत्पादन क्षेत्रात होते. मजदूर संघ म्हणजे मजुरांची एक संघटना जी मजुरी, तास आणि इतर काम परिस्थिती यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सामान्य उद्दीष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम केली. 

🅾कामगार संघटना, त्यांच्या नेतृत्त्वात, युनियन सदस्यांच्या वतीने नियोक्ताशी सौदे ( रँक आणि फाइल सदस्य) आणि नियोक्तांसह कामगार करारावर बोलतो. ही चळवळ प्रथम औद्योगिक कामगारांमध्ये उठली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

उद्योग.



🅾 एक उद्योग क्षेत्रातील आहे.  निर्मिती वस्तू किंवा संबंधित सेवा एक आत अर्थव्यवस्था .  एखाद्या समूहाचे किंवा कंपनीच्या कमाईचे मुख्य स्त्रोत हे कोणत्या उद्योगात वर्गीकृत केले जावे हे सूचक आहे . 

🅾जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट गटामध्ये कमाईचे अनेक स्रोत असतात, तेव्हा ते वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कार्यरत असल्याचे मानले जाते. औद्योगिक क्रांतीच्या काळात युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये उत्पादन उद्योग उत्पादन व कामगारांचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आणि त्यांनी पूर्वीचे व्यापारी आणि सरंजाम अस्वस्थ केले.

🅾अर्थव्यवस्था. स्टीम पॉवरचा विकास आणि स्टील आणि कोळशाचे उत्पादन यासारख्या तंत्रज्ञानाच्या निरंतर जलद प्रगतीतून हे पुढे आले .

🅾औद्योगिक क्रांतीनंतर शक्यतो आर्थिक उत्पादन एक तृतीयांश उत्पादन उद्योगांनी केले. बरेच विकसित देश आणि अनेक विकसनशील / अर्ध-विकसित देश (चीन, भारत इ) उत्पादन उद्योगावर लक्षणीय अवलंबून आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...