Showing posts with label Economics. Show all posts
Showing posts with label Economics. Show all posts

02 January 2026

राज्यसेवा, PSI-STI-ASO प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

   1) एच. एच. विल्सन  

   2) आर. सी. दत्त  

   3) कार्टराईट    

   4) हारग्रीव्हज


उत्तर :- 2


२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

   1) 21 डिसेंबर 2002  

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 21 जानेवारी 2003 

   4) 31 जानेवारी 2003


उत्तर :- 1


३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

   1) 50 मिलीयन (5 कोटी)   

   2) 58 मिलीयन  (5.8 कोटी)

   3) 60 मिलीयन (6 कोटी)     

   4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- २


४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

   1) 33.3%   

   2) 36.7%    

   3) 24.8%   

   4) 30.0%

 

उत्तर :- 2


५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

   1) भटिंका    

    2) सिंद्री    

    3) कोची  

    4) हाजिरा


उत्तर :- 2



१) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान 

   

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान


   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान


   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान


            अ  ब  क  ड


         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता


   1) ब, ड आणि क    2) अ आणि ब    3) अ, ब आणि क    4) ब आणि ड


उत्तर :- 4


३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क      2) ब आणि क    3) फक्त अ    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)    

  2) गांधी योजना    

 3) नेहरू योजना    

 4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

   1) कर्नाटक   

   2) महाराष्ट्र    

   3) गुजरात 

    4) राजस्थान


उत्तर :- 4



६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

   1) भारताचे राष्ट्रपती    2) पंतप्रधान    3) भारताचे उपराष्ट्रपती    4) वित्तमंत्री

उत्तर :- 2


७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

   1) स्थानिक आणि राज्य सरकार     

   2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड

   3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार      

   4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ

उत्तर :- 3


८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

   ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

   क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?


   1) फक्त अ    

   2) फक्त अ आणि ब  

   3) फक्त ब आणि क    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

   अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.   

    ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

   क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

   वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.


   1) फक्त अ   

  2) फक्त अ आणि ब 

  3) फक्त अ आणि क    

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


1०) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?

   1) आसाम  

   2) मणिपूर     

   3) त्रिपूरा     

   4) बिहार


उत्तर :- 4


१) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ................. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3    2) 40.4      

   3) 45.0    4) 58.4


उत्तर :- 1


२) 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता ?

   1) 13.26%    2) 18.51%    

   3) 20.47%    4) 22.18%


उत्तर :- 2


३) भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची   पसंती मिळत आहे.

   1) आंध्रप्रदेश    2) कर्नाटक    

   3) गुजरात    4) तामिळनाडू


उत्तर :- 3


४) कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?

   1) औद्योगिक धोरण, 1956  

   2) औद्योगिक धोरण, 1970

   3) औद्योगिक धोरण, 1977 

   4) औद्योगिक धोरण, 1991


उत्तर :- 4


५) खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.

   1) खाजगी मालकीचे   

    2) सार्वजनिक मालकीचे

   3) संयुक्त मालकीचे  

   4) यापैकी एकही नाही


उत्तर :- 2



६) आर्थिक विकासावरून पुढील सुचित होते.

   अ) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

   ब) देशाच्या सामाजिक – आर्थिक संचरनेतील प्रागतिक बदल

   क) बेकारी, दारिद्रय आणि विषमतेतील घट


   1) अ फक्त    

   2) अ आणि क    

   3) अ आणि ड   

   4) ब आणि ड


उत्तर :- 4


७) 2011 च्या जनगणनेनुसार ..................... या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर वयोगट 0-6 सर्वात कमी आहे.

   1) हरियाणा आणि जम्मू काश्मिर   

   2) हरियाणा आणि पंजाब

   3) पंजाब आणि राजस्थान  

   4) हरियाणा आणि राजस्थान


उत्तर :- 1


२२०८) केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही  ?

   1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट    

    2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

   3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा    

   4) वरीलपैकी काहीही नाही



उत्तर :- 4


९) भारताच्या पंतप्रधानांनी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी’ नुतनीकरण कार्यक्रम ..................... रोजी सुरू केला.

   1) 13 डिसेंबर 2001    

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 01 डिसेंबर 2004    

   4) 03 डिसेंबर 2005


उत्तर :- 4


१०) खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो  ?

   1) 1951 – 56     

   2) 1961 – 66

   3) 1966 – 69      

   4) 1969 – 72


     उत्तर :- 3


१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

   1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

   2) डॉ. झाकीर हुसेन

   3) श्री. व्ही. व्ही. गिरी     

   4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद


उत्तर :- 2


२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

   1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

   2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

   3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

   4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1


३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

   1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

   2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

   3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

   4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.


उत्तर :- 3


४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

   ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.


   1) अ    

  2) ब   

  3) दोन्हीही 

  4) एकही नाही


उत्तर :- 4


५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

   अ) बाह्य (परकीय) आक्रमण     

   ब) अंतर्गत कलह

   क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश    

  ड) आर्थिक कलह


   1) अ, ब, क   

   2) अ, क, ड 

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, ड

 

उत्तर :- 2


६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा  समावेश असतो.

   1) फक्त लोकसभा    

   2) फक्त राज्यसभा    

   3) लोकसभा व राज्यसभा   

   4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा


उत्तर :- 4


७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

 ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.


   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

   4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.


उत्तर :- 2


८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

   3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

   4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.


उत्तर :- 2


९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

   1) प्रधानमंत्री    

   2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश    

   3) भारताचे उपराष्ट्रपती   

  4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 3


1०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”  राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू    

   2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   3) के. एम. मुन्शी  

   4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर :- 1


1) खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा.

  विद्युत प्रकल्प      जिल्हा

         अ) पवना        i) ठाणे

         ब) तिलारी        ii) सिंधुदुर्ग

         क) भातसा        iii) परभणी

         ड) येलदरी        iv) पुणे

             अ  ब  क  ड

         1)  ii  i  iv  iii

         2)  i  iii  ii  iv

         3)  iv  ii  i  iii

         4)  i  iv  iii  ii


उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

   अ) वर्धा    ब) कोयना    क) उल्हास    ड) सावित्री


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, अ    3) अ, ब, ड, क    4) ड, क, ब, अ


उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ........... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    3) औरंगाबाद    4) सोलापूर


उत्तर :- 2


4) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ............. या विभागात आहे.

   1) विदर्भ    2) कोकण    3) मराठवाडा    4) नाशिक

उत्तर :- 3


5) मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ ..............जिल्ह्यात वसलेला आहे.

   1) गडचिरोली    2) भंडारा    3) अमरावती    4) यवतमाळ


उत्तर :- 3

10 December 2025

भारतीय सार्वजनिक वित्तातील तुटीच्या संकल्पना

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) अर्थसंकल्पीय तूट (Budget Deficit)
➤ सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती (उधारीसह) यांच्यातील फरक म्हणजे अर्थसंकल्पीय तूट.
➤ म्हणजे सरकारचे एकूण खर्च जास्त आणि प्राप्ती कमी असेल तर ही तूट निर्माण होते.

सूत्र:
अर्थसंकल्पीय तूट = एकूण खर्च – एकूण प्राप्ती (उधारीसह)

2) महसुली तूट (Revenue Deficit)
➤ सरकारचा महसुली खर्च हा महसुली प्राप्तीपेक्षा जास्त झाल्यास जी तूट निर्माण होते तिला महसुली तूट म्हणतात.
➤ महसुली तूट दर्शवते की सरकार चालू व्यवस्थापन खर्च भागवण्यासाठीही पुरेशी महसुली कमाई करू शकत नाही.

सूत्र:
महसुली तूट = महसुली खर्च – महसुली प्राप्ती

3) वित्तीय तूट (Fiscal Deficit)
➤ सरकारला आपल्या सर्व खर्चासाठी एकूण किती उधारी घ्यावी लागते, याचे मोजमाप म्हणजे वित्तीय तूट.
➤ सरकारच्या उधारीविना होणाऱ्या प्राप्तीचा विचार करून उरलेली उणीव ही वित्तीय तूट असते.

सूत्र:
वित्तीय तूट = एकूण खर्च – (महसुली प्राप्ती + उधारीविना भांडवली प्राप्ती)

4) प्राथमिक तूट (Primary Deficit)
➤ वित्तीय तुटीतून व्याज देयके (पूर्वीच्या कर्जांवरील) वजा केल्यावर जी तूट उरते तिला प्राथमिक तूट म्हणतात.
➤ हे मोजमाप दर्शवते की जुनी कर्जे वगळता सरकार प्रत्यक्ष किती कर्ज घेत आहे.

सूत्र:
प्राथमिक तूट = वित्तीय तूट – व्याजदेयके

5) प्रभावी महसुली तूट (Effective Revenue Deficit)
➤ महसुली तुटीतून राज्यांना/स्थानिक संस्थांना भांडवली मालमत्ता निर्माणासाठी दिलेले अनुदान वजा केले की उरते ती प्रभावी महसुली तूट.
➤ याने कळते की महसुली तुटीत नेमका गैरउत्पादक खर्च किती आहे.

सूत्र:
प्रभावी महसुली तूट = महसुली तूट – भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी दिलेले अनुदान


6) प्राथमिक महसुली तूट (Primary Revenue Deficit)
➤ महसुली तुटीतून व्याज देयके वजा केली की जी रक्कम उरते तिला प्राथमिक महसुली तूट म्हणतात.
➤ महसुली तुटीतील प्रत्यक्ष चालू तूट किती आहे, हे यातून दिसते.

सूत्र:
प्राथमिक महसुली तूट = महसुली तूट – व्याजदेयके

7) चलनी तूट (Monetised Deficit)
➤ वित्तीय तुटीपैकी ज्या भागाची भरपाई RBI नवीन चलन छापून किंवा सरकारी रोखे खरेदी करून करते, त्या भागाला चलनी तूट म्हणतात.
➤ यातून सरकारची तूट थेट केंद्रीय बँकेद्वारे भरली जाते.

सूत्र:
चलनी तूट = RBI कडून सरकारला दिलेला निव्वळ कर्जपुरवठा

🟦 एकदम थोडक्यात सारांश
➤ अर्थसंकल्पीय तूट: खर्च – प्राप्ती (उधारीसह)
➤ महसुली तूट: महसुली खर्च – महसुली प्राप्ती
➤ वित्तीय तूट: खर्च – उधारीविना प्राप्ती
➤ प्राथमिक तूट: वित्तीय तूट – व्याजदेयके
➤ प्रभावी महसुली तूट: महसुली तूट – भांडवली अनुदान
➤ चलनी तूट: RBI वित्तपुरवठा

09 December 2025

भाक्रा धरण

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


सुमारे २२६ मीटर उंच आणि ५१८ मीटर लांबीचे, भाक्रा धरण हे टिहरी धरणानंतर भारतातील दुसरे सर्वात उंच धरण आहे.


 हे जगातील सर्वात उंच सरळ गुरुत्वाकर्षण धरण देखील आहे.


भाक्रा धरण सतलज नदीवर बांधले गेले आहे आणि ते हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर नांगल शहराजवळ आहे.


हे सिंचनासाठी तसेच जलविद्युत वापरासाठी आहे.


भाक्रा राईट बँक पॉवर हाऊसची स्थापित क्षमता ७८५ मेगावॅट (५x१५७ मेगावॅट) आहे आणि भाक्रा लेफ्ट बँक पॉवर हाऊसची स्थापित क्षमता ५९४ मेगावॅट (३x१२६ मेगावॅट + २x१०८ मेगावॅट) आहे.



धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये पूर्ण झाले.


भाक्रा धरणाचे संचालन आणि देखभाल भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) द्वारे केली जाते.


भाक्रा धरण हे सरळ गुरुत्वाकर्षणासह काँक्रीट धरण आहे ज्यामध्ये चार स्पिलवे रेडियल गेट्स आहेत आणि त्यांची डिझाइन केलेली स्पिलवे क्षमता ८२१२ क्युमेक आहे.


धरणाच्या गोविंद सागर जलाशयाची एकूण साठवण क्षमता ९६२१ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आणि प्रभावी साठवण क्षमता ७१९२ दशलक्ष घनमीटर आहे.

01 December 2025

नरेगा योजना (MNREGA) माहिती:



🔹 कायदा व सुरुवात:

▪️NREGA Act: 2005 (रोजगारासंदर्भात कायदा केलेली पहिली योजना)

▪️सुरूवात: 2 फेब्रुवारी 2006, अनंतपुर, आंध्रप्रदेश


🔹 उद्दिष्ट:

▪️ग्रामीण बेरोजगारी कमी करणे

▪️ग्रामीण भागासाठी रोजगाराची हमी


🔹 रोजगाराची हमी:

▪️सामान्य ग्रामीण भाग: 100 दिवस रोजगार

▪️दुष्काळग्रस्त भाग: 150 दिवस रोजगार

▪️आदिवासी (वन हक्क कायद्यानुसार अधिकार): 150 दिवस रोजगार


🔹 प्रारंभिक टप्पा:

▪️सुरुवात 200 जिल्ह्यांमधून (सर्वाधिक जिल्हे बिहारमध्ये; गोव्यातील एकही जिल्हा नव्हता)

▪️पहिल्या टप्प्यात विलीन झालेल्या योजना:

🔹 कामाच्या बदल्यात अन्न

🔹 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना


🔹 संपूर्ण भारतात विस्तार:

1 एप्रिल 2008: नरेगा संपूर्ण भारतात लागू

2 ऑक्टोबर 2009: नाव बदलून मनरेगा (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act)


🔹 मजुरी:

▪️सुरुवातीला दर: 120 रू. प्रति दिवस (Flore rate / वास्तविक मजुरी दर)

▪️सर्वाधिक मजुरी: हरियाणा

▪️6 जानेवारी 2011 पासून मजुरी दर ठरतो CPI for Agricultural Labour आधारावर

Budget MCQ महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) सरकारी कर्जाची सदस्यता आणि उपभोगाची प्रवृत्ती

➤ प्रश्न: लोक सरकारी कर्ज घेतल्यास उपभोगाची प्रवृत्ती का कमी होते?

➤ उत्तर: लोकांचे स्वतःकडील पैसे कमी होतात → खरेदी क्षमता कमी → बाजारातील मागणी कमी.


2) सार्वजनिक कर्जाचे परिणाम

➤ व्यक्तीची बचत प्रवृत्ती वाढते.

➤ सरकारच्या गुंतवणुकीचा दर वाढतो → आर्थिक वृद्धीला चालना.

➤ सामाजिक असमानता वाढते (श्रीमंत श्रीमंत, गरीब गरीब).


3) राजकोशीय धोरणाची उद्दिष्ट्ये

➤ स्त्रोतांचे उपलब्धीकरण (Allocation of resources).

➤ स्त्रोतांची वाटणी (Distribution of resources).

➤ आर्थिक वाढीस चालना देणे.


4) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

➤ स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प: आर. के. शमुकानंदन शेट्टी, 1947

➤ गणराज्यानंतरचा पहिला: जॉन मथाई (1950)

➤ निवडणुकीनंतरचा (1952): सी. डी. देशमुख


5) राजकोशीय धोरणाबद्दल विधान

➤ विधान: फक्त सरकारी जमा वाढवण्यावर भर → अयोग्य

➤ खरे: राजकोशीय धोरण = जमा (Revenue) + खर्च (Expenditure) दोन्हीवर भर.


6) रेल्वे अर्थसंकल्पासंबंधी समिती

➤ रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याची शिफारस: विवेक देवराॉय समिती


7) संसदेत अर्थसंकल्पाची तरतूद

➤ Annual Financial Statement संबंधित संविधान कलम: कलम 112

➤ इतर महत्त्वाची कलमे: कलम 110 (धन विधेयक), कलम 266 (संचित निधी), कलम 267 (आकस्मिक निधी)


8) शून्य आधारित अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य

➤ विधान: मागील वर्षाचा आधार घेतला जातो → नाही

➤ ZBB मध्ये प्रत्येक खर्च 'शून्य' पासून सिद्ध करावा लागतो.


9) पारंपरिक अर्थसंकल्पाचा उद्देश

➤ उद्देश: किती खर्च करायचा आहे?

➤ आउटकम बजेटिंग: काय साध्य करायचे?


10) आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी

➤ वितरित न झालेला निधी → लॅप्स (Laps) होतो


11) महसूली तूट आणि राजकोशीय तूट

➤ राजकोशीय तूट ≥ महसूली तूट

➤ राजकोशीय तूट = सरकारचे एकूण कर्ज, खर्चापेक्षा कमी नसते


12) शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर

➤ केंद्र सरकारने ZBB नेहमी वापरला नाही → फक्त एका वर्षी पूर्णपणे वापरले

➤ महाराष्ट्र: ZBB वापरणारे पहिले राज्य


13) जेंडर बजेट आणि आउटकम बजेट

➤ एकाच वेळी सुरुवात: 2005-06 (पी. चिदंबरम)

६ वी पंचवार्षिक योजना (1980-85)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️मुख्य मुद्दे

▪️कालावधी — 1980 ते 1985

▪️उपनाव — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना

▪️प्रतिमान — अग्निहोत्री, मान व अशोक रुद्र (Open Consistency Model)

▪️मुख्य भर — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

▪️लक्ष्य दर — 5.2%

▪️साध्य दर — 5.54%

▪️ऊर्जा — सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावर

▪️घोषणा — गरीबी हटाओ


🔹️राजकीय घडामोडी

➤ ऑपरेशन ब्लू स्टार : 3–6 जून 1984

➤ भोपाळ गॅस दुर्घटना : 2–3 डिसेंबर 1984


🔹️महत्त्वाच्या योजना / प्रकल्प

➤ लोखंड-पोलाद प्रकल्प :

  • सालेम (TN)

  • विशाखापट्टणम (AP)

➤ IRDP : 2 ऑक्टोबर 1980

➤ दुसरा 20 कलमी कार्यक्रम : 14 जानेवारी 1982

➤ 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण (₹200 Cr+) : 15 एप्रिल 1980


🔹️मूल्यमापन

➤ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली

➤ अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित

➤ आर्थिक वाढीचा दर प्रथमच 5% पेक्षा अधिक

21 November 2025

वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दल काही महत्वाच्या तथ्ये :-

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



➡️ हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे.


➡️ 1954 मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता


🔖 GST हा 101वा दुरुस्ती कायदा म्हणून सादर करण्यात आला.

➡️ संविधानिक दुरुस्ती विधेयक 122वी दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन करप्रणाली भारतात एप्रिल 2016 पासून लागू केली जाणार आहे.


⭐️ GST कायदा विधानसभेत पारित करणारे भारतातील पहिले राज्य 

- आसाम


⭐️ भारताचा GST कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे ?

- कॅनडा


⭐️ भारतात GST कधीपासून लागू झाला ? 

- 1 जुलै 2017


⭐️ भारत GST लागू करणारा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

- 171 वा देश 


⭐️ भारतात GST लागू करण्याची सूचना कोणत्या समितीने केली ? 

- विजय केळकर समिती


⭐️ जीएसटी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते 

- असीम दासगुप्ता


⭐️ GST दरांचे किती प्रकार आहेत ?

- 0% 5% 12% 18% 28%


⭐️ GST नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत

- 15 अंक


⭐️ GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत 

- अर्थमंत्री


⭐️ राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन 

– पणजी, गोवा येथे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖

18 November 2025

प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB : Regional Rural Banks)

 या बँका क्षेत्रीय किंवा विभागीय ग्रामीण बँका म्हणून देखील ओळखल्या जातात.

 उद्देश : -
दूर्गम ग्रामीण भागात बँक व्यवसाय रूजवून तेथील प्रादेशिक विषमता दुर करण्यास हातभार लावणे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

 स्थापना : - 26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.

⚜ 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पाच ठिकाणी ग्रामीण बँका सुरू झाल्या.

 ग्रामीण बँका - - - राज्य - - - पुरस्कृत बँक
  
 मोरादाबाद - - -  उत्तर प्रदेश - - - सिंडीकेट बँक

 गोरखपूर - - - उत्तर प्रदेश- - - स्टेट बँक ऑफ इंडिया

 भिवानी - - - हरियाणा - - - पंजाब नॅशनल बँक

 जयपूर - - - राजस्थान- - - यूनायटेड खमर्शियल बँक

 माल्डा - - - प. बंगाल- - - यूनायटेड बँक

⚜ प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.

⚜ भांडवल उभारणीत वाटा : केंद्र : 50% ; संबंधित राज्य सरकार : 15% ; पुरस्कृत व्यापारी बँक : 35%.

⚜ उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक RRB कार्यरत आहेत.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

रुपयाचे अवमूल्यन

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



(Devaluation of Rupee) :-

अवमूल्यनाचा अर्थ : रुपया परकीय चालनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे, (Rupee is depreciating) असे म्हणतो.

अवमूल्यनामुळे सुद्धा रुपया परकीय चलनाच्या संदर्भात स्वस्त होत असतो.

मात्र अवमूल्यन सरकारने मुद्दाम घडवून आणलेले असते. अवमूल्यनाव्दारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा (RBI) धोरणात्मक निर्णय असतो.

तिसरे अवमूल्यन, 1991 –:

जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये जगातील महत्वाच्या चलनांच्या संदर्भात (डॉलर, पाउंड, मार्क, येन, फ्रँक इ.) घडवून आणण्यात आले.

i) 1 जुलैला 9.5 टक्क्यांनी.

ii) 3 जुलैला 10 ते 10.78 टक्क्यांनी.

iii) 15 जुलैला 2 टक्क्यांनी. तिन्ही टप्पे मिळून रुपयाचे अवमूल्यन सुमारे 20 टक्क्यांनी झाले.

तत्कालीन वित्तमंत्री – डॉ. मनमोहनसिंग.

अवमूल्यनाचे परिणाम :-

1) आयतीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. आयात महाग झाल्याने आयातदरांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते.

 

2) निर्यातीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. भारतीय वस्तु परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. त्यामुळे भारताची निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते.

 आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) कडून सोने खरेदी :-

सप्टेंबर 2009 मध्ये IMF ने आपले वित्तीय संसाधने वाढविण्यासाठी (कमी उत्पन्न गटातील देशांना अधिक मदत करता यावी यासाठी) 403.3 टन सोने विकण्याचा निर्णय घोषित केला.

त्यानुसार रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2009 मध्ये 6.7 अब्ज डॉलर्स खर्च करून 200 टन सोने खरेदी केले. त्यामुळे भारताच्या परकीय चलन साठयातील सोन्याचे प्रमाण 357.7 टनाहून 557.7 टनापर्यंत (एकूण साठयापैकी 6 टक्के) वाढले.

तसेच त्याबरोबर भारत जगातील 10 व्या क्रमांकाचा सरकारी सोने धारण करणारा देश (official gold-holding country) बनला.

दुसरे अवमूल्यन, 1966 –

6 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलर व इतर हार्ड यूरोपियन चलनांच्या संदर्भात 36.5 टक्क्यांनी घडवून आणण्यात आले.

या अवमूल्यनामुळे रुपयाचा विनिमय दर 4.76 रुपये प्रती डॉलर वरून 7.50 रुपये प्रती डॉलर असा कमी झाला.

तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0.186621 ग्रॅम्स वरून 0.118489 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

या अवमूल्यनाची उद्दिष्टे –

1) भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे.

 

2) भारताची निर्यात वाढविणे.

 

3) भारताचा व्यापारतोल कमी करणे.

 

अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागल्याने व्यापार तूट अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही.

तत्कालीन अर्थमंत्री – सचिव चौधरी

अवमूल्यनाचे प्रयोग :

स्वातंत्र्यप्राप्तिनंतर रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडवून आणण्यात आले होते.

पहिले अवमूल्यन, 1949 –

26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5 टक्क्यांनी अवमूल्यन घडवून आणण्यात आले. पाउंड स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडवून आणण्यात आले नाही.

अवमूल्यनामुळे एका रुपयाची डॉलरमधील किंमत 30.2 सेंटस वरुन 21 सेंटस पर्यंत कमी झाली. तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0268601 ग्रॅम्स वरून 0.186621 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तुट कमी झाली. 1948-49 मध्ये 185.1 कोटी रुपये असलेली व्यापार तूट 1949-50 मध्ये 141.9 कोटी तर 1950-51 मध्ये 49.6 कोटी रुपये एवढी कमी झाली. मात्र हा अनुकूल परिणाम फार काळ टिकला नाही. 1951-52 मध्ये तूट वाढून 237.1 कोटी रुपये झाली.

तत्कालीन अर्थमंत्री – जॉन मथाई

४ थी पंचवार्षिक योजना

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


👉 कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

👉 पराधान्य : स्वावलंबन 

👉 घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ  👉 मॉडेल : Open Consistency Model खर्च : 

👉 परस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) 

👉 २. Small Farmer Development Agency (SFDA) 

👉 ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) 

👉 ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)


👉 महत्वपूर्ण घटना 


👉 १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. 

👉 २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. 

👉 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) 

👉 ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. 

👉 ६. Foreign Exchange Regulation Act-1973


👉 मल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- 


१) बांगलादेश मुक्ति युद्ध १९७१ 


अग्रणी बँक योजना

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.

शिफारस -

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली.

सुरुवात -

1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली.

योजना -

देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली.

कार्ये -

जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -

जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -
 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.
 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.
 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.
 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.
 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला.

महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)

स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना.

सध्यस्थिती -

सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती.

उषा थोरात समिती -

भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

17 November 2025

राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


➤ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू झाला.

➤ हा कार्यक्रम भारतातील सर्वात गरीब व असुरक्षित नागरिकांना अधिकार-आधारित सामाजिक सुरक्षा देण्याचा संकल्प आहे.

➤ अंमलबजावणी — ग्रामीण विकास मंत्रालय

➤ योजना — पूर्णपणे केंद्र पुरस्कृत, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांमध्ये लागू.


🔹️उद्दिष्टे 🎯

➤ मूलभूत सामाजिक सुरक्षा व उत्पन्न संरक्षण

▪️ गरीब रेषेखालील वृद्ध, विधवा, दिव्यांग व्यक्ती व कुटुंबप्रमुख मृत झालेल्या कुटुंबांचे संरक्षण.

➤ समावेशक वाढ प्रोत्साहन

▪️ ‘No one left behind’ या तत्त्वानुसार सामाजिक संरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे.

➤ धोरण निर्देशक तत्वांची अंमलबजावणी

▪️ कलम 41, 42, 47 अंतर्गत सामाजिक सहाय्याची राज्याची जबाबदारी प्रत्यक्षात आणणे.

➤ प्रमाण

▪️ सध्या 3.09 कोटी लाभार्थी — जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक.


🔸️NSAP अंतर्गत पाच उप-योजना 🧩

🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना (IGNOAPS) 👴

➤ 60–79 वर्षे: ₹200/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)

➤ राज्य पुरवणी (टॉप-अप): ₹50 ते ₹5700/महिना

➤ सरासरी एकूण पेन्शन: सुमारे ₹1100 (अनेक राज्यांमध्ये)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना (IGNWPS) 👩‍🦳

➤ 40–79 वर्षांच्या विधवा: ₹300/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना (IGNDPS) ♿️

➤ 18–79 वर्षे, गंभीर/बहुविकलांग: ₹300/महिना

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना


🔹️राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS) ⚰️

➤ BPL कुटुंबातील 18–59 वर्षांच्या कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूवर

➤ ₹20,000 एकरकमी सहाय्य


🔹️अन्नपूर्णा योजना 🌾

➤ IGNOAPS साठी पात्र पण पेन्शन न मिळणारे वृद्ध

➤ 10 किलो अन्नधान्य/महिना – मोफत


🔹️महत्त्व व सामाजिक-आर्थिक परिणाम 🌍

➤ उत्पन्न सुरक्षा

▪️ 3.09 कोटी लाभार्थ्यांना नियमित आर्थिक आधार

➤ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)

▪️ वेळेवर, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पेमेंट

➤ आर्थिक समावेशन

▪️ लाभार्थ्यांचे बँक खात्यांशी एकत्रीकरण

➤ SDGs मध्ये योगदान

▪️ SDG 1 – No Poverty

▪️ SDG 2 – Zero Hunger

▪️ SDG 10 – Reduced Inequality


🔹️आव्हाने ⚠️

➤ केंद्राकडील पेन्शन रक्कम अत्यल्प

▪️ महागाईनुसार वाढ होत नाही

➤ दस्तऐवजांचा अभाव

▪️ अनेक विधवा व दिव्यांग लाभार्थी ओळख प्रक्रियेतून वंचित

➤ राज्यांच्या टॉप-अपवर अवलंबित्व

▪️ राज्यागणिक पेन्शनमध्ये मोठी तफावत


🔹️निष्कर्ष 🔍

➤ NSAP हा आर्थिक सुरक्षा (पेन्शन), अन्न सुरक्षा (अन्नपूर्णा) आणि डिजिटल शासन (DBT + Aadhaar + PFMS) यांचा परस्परपूरक संगम आहे.

➤ वृद्ध, विधवा, दिव्यांग व गरीब कुटुंबांना वेळीच, सन्मानपूर्वक आणि लक्षित सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

27 October 2025

अर्थसंकल्पाचे प्रकार

▪️* पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget) :- 

» पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.


▪️* निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) :- 

निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.


▪️* शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):- 

» शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.

» पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. 

» भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला. 

» त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. 

» २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)

सहकारी बँकांचे विलीनीकरण

💰कद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याच्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे. याशिवाय, नव्याने स्थापन झालेल्या भारतीय महिला बँक ला सुद्धा SBI मध्ये विलीन केले जाईल.


💰SBI च्या सहा सहकारी बँका आहेत, त्यामध्ये ⤵️⤵️

🔰सटेट बँक ऑफ हैदराबाद, 

🔰सटेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर, 

🔰सटेट बँक ऑफ पटियाला, 

🔰सटेट बँक ऑफ म्हैसूर, 

🔰सटेट बँक ऑफ त्रावणकोर, 

🔰सटेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर 


⬆️⬆️या आहेत⬆️⬆️


🏧SBI विलिनीकरणाचे फायदे🏧


💰विलीनीकरण झाल्यानंतर, 

🔝🔝🔸बकिंग क्षेत्रात अग्रेसर SBI हे जगातील टॉप-50 बँकांच्या यादीमध्ये प्रविष्ट होणार.🔸🔝🔝


💰ससाधने जमवण्यासाठी एकल कोषागार असणार आणि मोठ्या प्रमाणात कुशल संसाधनांच्या पायाचे योग्य वितरण केले जाणार.

💰SBI मध्ये अवलंबले जाणारे नवीन तंत्रज्ञान हे सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना समानरूपाने उपलब्ध होणार.

💰तयाच्या उपकंपन्या सोबत SBI भागभांडवल बाजारात प्रचंड कमाई करू शकणार. अशा प्रकारे तो फायदा सर्व भागभांडवल धारकांना देखील होणार.

💰विलीनि‍करणानंतर SBI ची एकूण मालमत्ता रु. 37 लाख कोटी (37 ट्रिलियन रुपयांवर) पोहोचणार.यामुळे SBI चे 50 कोटी पेक्षा अधिक ग्राहक होणार, 


🏧आणि  22,500 शाखा आणि 58,000 ATM उपलब्ध होणार.🏧


 🏧💸SBI विलिनीकरणाचे तोटे💸🏧

💰या विलीनि‍करणानंतर , बँकेच्या प्रशासनाला कर्मचारी एकत्रीकरण आणि शाखा सुसूत्रीकरण संबंधित काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

⛔️अनेक कर्मचारी सहकारी संघ या विलीनि‍करणाच्या विरोधात आहेत.⛔️


🏧💸SBI च्या विलीनीकरणाआधी💸🏧

💰SBI मध्ये पूर्वीचे विलीनीकरण निरोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. 

🔰2008 मध्ये, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि 2010 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंदोर चे विलीनीकरण करण्यात आले होते. 

🔰विलीनीकरण होण्याच्या आधी SBI च्या 7 सहकारी बँका होत्या.


अर्थशास्त्र विषयातील आता पर्यंत विचारलेले प्रश्न

1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क


1. सहकार चळवळीशी संबंधीत असलेले फेंडरीक निकोल्सन (1892) यांनी भारतात सहकारी संस्था स्थापनेसाठी खालीलपैकी कोणती शिफारशी केल्या.

अ) ग्रामिण भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी रायफेजन पध्दतीचा वापर करावा.
ब) शहरी भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी शुल्झ डेलित्झ पध्दतीचा वापर करावा.
क) निकोल्सन यांनी संस्था स्थापनेची प्रेरणा जर्मनी या देशाकडून घेतली.

१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
3) अ, ब आणि क अयोग्य
४) अ, ब आणि क योग्य✅

2. रुपयाच्या अवमुल्यन केले असता खालीलपैकी कोणते परीणाम घडून येतात.

अ) रुपयाची किंमत कमी होईल व डाँँलरची किंमत वाढेल.
ब) परकीयांना भारतात गुंतवणुक करणे सोपे होईल व रोजगार वाढेल.
क) भारताची आयात वाढेल व निर्यात कमी होईल.
ड) चालु खात्यावरील तुट कमी होईल आणि भांडवली खात्यात वाढ होईल.

१) अ, ब आणि क
२) अ, ब आणि ड✅
३) ब, क आणि ड
४) वरील सर्व

3. घाऊक किंमतीचा निर्देशांक विषयी पुढील विधाने विचारा घ्या.

अ) अभिजित सेन कार्यदलानुसार 2010 पासून 676 वस्तूंच्या घाऊक किंमतीवरुन काढला जातो.
ब) यासाठी आधारभूत वर्ष 2004-05 स्विकारण्यात आले आहे.
क) यामध्ये सर्वाधिक भार प्राथमिक वस्तुंना देण्यात आला आहे.

१) अ आणि ब✅
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व 

4. राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.

अ) या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब) या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क) या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व  ✅

5. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००० चा प्रयत्न

१) बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे
सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
२) महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान
करणे
३) वरील दोन्ही✅
४) वरीलपैकी कुठलेच नाही

6. अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य
पर्याय निवडा.
१) उपजीविका, स्वतबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार/हक्क✅

२) आरोग्य, भरणपोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार/हक्क

३) अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता

४) राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण

7. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

अ) वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे
ब) नागरी खटल्यांपासून स्वतची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो.
१) केवळ अ
2) केवळ ब
३) दोन्ही
४) एकही नाही✅

8. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट ४८ मध्ये नेमली.
ब) प्रोफेसर डी. आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते.

१) केवळ अ योग्य
२)केवळ ब योग्य
३) अ व ब दोन्ही योग्य
४)अ व ब दोन्ही अयोग्य✅

9. मनरेगा विषयी असत्य विधान ओळखा.
१. ही योजना २ फेब्रुवारी २००६ ला भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालया मार्फत सुरू करण्यात आली
२.या योजनेत किमान रोजगार १२७ रु प्रती दिन इतका मिळतो
३. अर्ज केल्यानंतर किमान ३० दिवसाच्या आत काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता दिला जातो✅
४.ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो

10. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे (IRDP) कोणत्या योजनेत विलीन करण्यात आले?
१.इंदिरा आवास योजना
२.स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजना✅
३.स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना
४.भारत निर्माण योजना

1. जागतिक बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या पहिल्या मानव भांडवल निर्देशांकात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
१.108 वा
२.115 वा✅
३.91 वा
४.131 वा

2. भारतात 1997 सालापासून उद्योगांना 'मिनिरत्न' व 'नवरत्न' दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
१.सी. रंगराजन
२.अर्जुनसेन गुप्ता✅
३.अभिजितसेन गुप्ता
४.एम. नरसिंहन

3. भारतात शासकीय मार्गाने संरक्षण क्षेत्रात किती टक्के परकीय थेट गुंतवणूकीस (FDI)परवानगी आहे?
१.51%
२.66%
३.74%
४.100%✅

4. भारतात संरक्षण क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने किती टक्के FDI ला परवानगी आहे?
१.26%
२.49%✅
३.74%
४.100%(शासकीय मार्गाने 100% FDI परवानगी)

5. 2017-18 आकडेवारीनुसार भारतात राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे?
१.महाराष्ट्र✅(15437 किमी)
२.उत्तरप्रदेश (8711 किमी)
३.राजस्थान(7906किमी)
४.दिल्ली(678किमी)

6. भारतात कृषी हवामान विभाग स्थापन कोणत्या साली करण्यात आली होती?

१.1875( भारतीय हवामान विभाग , पुणे स्थापन)
२.1918
३.1932✅
४.1953

7. भारताचे पहिले त्रैवार्षिक आयात निर्यात धोरण 1985 साली कोणत्या समितीच्या शिफारशीवरून स्वीकार करण्यात आले होते?

१.व्ही.व्ही.रामैय्या समिती
२.अबीद हुसेन समिती
३.मुदलियार समिती✅
४.एल.के.झा. समिती

8. भारताच्या परकीय व्यापार धोरणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत?

अ.आयात पर्यायीकरण
ब. निर्यात प्रोत्साहन
क. परकीय बाजारपेठ काबीज करणे
ड. शेती व्यापारास प्रोत्साहन

पर्याय

१.अ,ब,क,ड
२.अ,ब,क
३.फक्त क
४.अ,ब✅

9. 1971 साली कार्यान्वित करण्यात आलेली भारताची झर्लिना  ही अणुभट्टी कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती?
१.अमेरिका
२.ब्रिटन
३.फ्रान्स✅
४.स्वदेशी बनावटीची

10. संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती?
१.बँक ऑफ हिंदुस्थान
२.RBI
३.पंजाब नॅशनल बँक✅
४.बँक ऑफ महाराष्ट्र

1.स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ञांमद्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
1.प्रा.वी. म.दांडेकर
2.डॉ. नीलकंठ रथ
3.म.एस. अहलुवालीया
4.जॉन मालथस✅

2.खाजगिकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय ओळखा
1.उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3.निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा धारण करणे✅

3.खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही?
1.बँकांची बँक म्हणून काम पाहणे
2.जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे✅
3. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणे
4.चलन निर्मिती करणे

4. महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरण (toll policy)  बाबत खालील विधाने विचारात घ्या.
1. अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पावर पथकर आकारला जाणार नाही✅
2. 200 कोटी रुपयाखालील  प्रकल्प खाजगीकरणानंतर्गत करण्यात येणार नाही
3. फक्त 200 कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पांसाठी पथकर आकारला जाईल
4. एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान 20. कि. मी असावे

5.लोकांची योजना चे जनक म्हणून ..... यांचा निर्देश करावा लागेल?
1. श्रीमान नारायण
2.मानवेंद्रनाथ रॉय✅
3. प. जवाहरलाल नेहरु
4. एम. विश्वेश्वरय्या

6.विशेष उचल अधिकार (SDRs) सुविधा कोनामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
1. जागतिक बँक
2. जागतिक व्यापार संघटना
3. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ
4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी✅

7. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनाचे स्वामित्व, नियंत्रण व्यवस्थापन .....केले आहे.
1. सरकारद्वारे
2. समाजद्वारे
3. खासगी व्यक्तिद्वारे✅
4. सहकाराद्वारे

8.सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्ट्ये कोणती आहेत?
अ) उपभोक्त्यांना स्वस्त आणि सवलतीच्या दरात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे
ब) लोकसंख्येचा किमान पोषणात्मक दर्जा टिकवून ठेवणे
1.अ बरोबर ब चूक
2.अ चूक ब बरोबर
3.दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

9.दरडोई उत्पन्न म्हणजे .....
1.देशातील एकूण लोकसंख्या भागीले एकूण राष्ट्रीय उत्पन्न
2. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाचे एकूण उपभोग खर्च
3. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाची एकूण लोकसंख्या✅
4. एकूण उपभोग खर्च भागीले एकूण लोकसंख्या

10. लोकसंख्या स्थित्यंतरातील तिसरी अवस्था असलेला पर्याय सांगा.
1. जास्त जन्मदर व जास्त मृत्युदर
2. जास्त जन्मदर व कमी मृत्युदर
3. कमी जन्मदर व जास्त मृत्युदर
4. कमी जन्मदर व कमी मृत्युदर✅

1. महाराष्ट्रातील भारनियमनाचे  प्रमुख कारण काय आहे?

1. वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती✅
2. योग्य व्यवस्थापनाचा अभाव
3. पारेशनातील गळती
4. चुकीचे सरकारी धोरण

2. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत आर्थिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
क) धातू वस्तू
ड) लघू उद्योग
योग्य पर्याय निवडा
1. (अ) आणि (ब)
2. (ब) फक्त✅
3. (क) आणि (ड)
4. (ड) फक्त

3. महाराष्ट्र सरकारने २०१३ सालच्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म ,लघू व मध्यम उपक्रमांबाबतीत पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे?
1. आशावादी
2. वास्तवादी
3. पवित्रवादी✅
4. अवास्तववादी

4. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील घटकांचा समावेश होतो
अ) आंतरराष्ट्रीयीकरण
ब) खाजगीकरण
क) शिथिलीकरण
ड) विकेंद्रीकरण
1.(अ) आणि(ड)
2. (अ) आणि(क)✅
3. (ब) आणि(क)
4. (क) आणि(ड)

5. १९९१ च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट्ये होती?
अ) औद्योगिक परवानाराज संपुष्टात आणणे
ब) खाजगी क्षेत्राचे महत्व कमी करणे
क)सार्वजनिक क्षेत्राचे महत्व कमी करणे
ड)लघुउद्योगाचा विकास
दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा:
1. फक्त(अ)
2. (ब) आणि(ड)
3. (अ) आणि(क)✅
4. वरील सर्व

6. खालीलपैकी कोणती विधाने जागतिकीकरणाचा नकारात्मक परिणाम दर्शवतात
अ) कामगार संघटित क्षेत्रातून असंघटित क्षेत्रात ढकलले गेले
ब) स्पर्धा निर्माण केली
क) कामगार संघटनांची सौदाशक्ती घटली
ड) थेट परकीय गुंतवणूक वाढली
पर्यायी उत्तरे
1(अ) व (क) ✅
2. (अ) व (ड)
3. (ब) व (क)
4. (अ) व (ब)

7.  २०११-१२ मध्ये भारताच्या निर्यातीच्या बाबतीत वरची पाच राज्ये कोणती होती?
1. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक✅
2. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ
3. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि पंजाब
4. महाराष्ट्र, गुजरात,तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश

8. भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे?
1.OECD देशांचे भारतीय निर्यातीमधील महत्व वाढले आहे
2.  भारताचा OPEC प्रदेशाशी व्यापार मोठ्या प्रमाणात सुधारला आहे✅
3. भारताच्या निर्यातीत इंग्लंडचे स्थान प्रथम आहे
4.  सार्क प्रदेशातून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे

9. सॉफ्टवेअर निर्यातीतील हिश्य्यानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ कोणती आहे?
1. अमेरिका✅
2. इंग्लंड
3. चीन
4.  जपान

10.  २०११-१२ मध्ये झालेल्या खाद्यान्नाच्या भाववाढीमध्ये  खालील घटकांचा महत्वचा वाटा होता.
अ) दूध
ब) अंडी, मटण, मासे
क) खाद्यतेल
ड) साखर
योग्य पर्याय निवडा
1. फक्त(अ) आणि (ब) ,(क)✅
2. फक्त(अ) (ब) आणि(ड)
3.फक्त (ब) (क) आणि(ड)
4. फक्त(ब) आणि(ड)


1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क

1. वस्तू व सेवांच्या उत्पादनात घट होण्याची प्रमुख कारणे कोणती?
अ) उत्पादन घटकांची टंचाई
ब) औद्योगिक कलह
क) नैसर्गिक आपत्ती
ड) कर कपात
1. अ,ब,ड✅
2. ब,क,ड
3. अ,क,ड
4. अ,ब

2. अर्थव्यवस्थेत पुढील कोणत्या घटकांचा विचार केला जातो?
अ)  उत्पादन
ब) उपभोग
क) वितरण
ड) उपलब्ध साधनसामग्रीचे विभाजन
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क
4. वरील सर्व✅

3. भौतिक जीवनमान निर्देशांकावर काही मर्यादा आहेत. याबाबत अयोग्य विधान ओळखा
अ) बेरोजगारी, गृहनिर्माण, न्याय सुरक्षितता, मानवी हक्क हे घटक दुर्लक्षित झाले आहेत
ब) यात निर्देशकांचे तीन घटक सारखे महत्वाचे असतात
क) या निर्देशांकाद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलाचे स्पष्टीकरण करता येते.
1. अ,ब
2. ब,क
3. अ,ब,क
4. क✅

4खालीलपैकी कोणते आर्थिक वृद्धीचे निर्देशक मानले जाते?
अ) स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाढ
ब) दरडोई उत्पन्नामध्ये वाढ
क) दरडोई उपभोगात  वाढ
ड) लोकांचा सहभाग
1. अ,ब,क✅
2. ब,क,ड
3. ब,क
4. वरील सर्व

5. टेलिफोन क्षेत्राबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. महानगर टेलिफोन निगम. लि
2. भारत संचार निगम लि
3. टेलिकॉम रेग्युलिटी ऑथिरिटी लि✅
4. विदेश संचार निगम लि

6. खालीलपैकी दारिद्र्याचे आर्थिक परिणाम कोणते
अ) उत्पन्नात विषमता
ब) संसाधनांचा अपव्यय
क) मानवी मूल्यांचा ऱ्हास
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
1. अ,ब
2. ब,क,ड
3. अ,ब,ड✅
4. वरीलपैकी सर्व

7. मंदीच्या काळातील बेकारीला कोणती बेकारी म्हणतात
अ) घर्षणजन्य
ब) चक्रीय
क) ऐच्छिक
ड) संरचनात्मक
1. अ,ब,क
2. ब✅
3. अ,ब
4. वरील सर्व

8. खाजगिकरणाबाबत खालील कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत , याबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3. निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा लागू✅

9. मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत पैसा म्हणून कशाचा वापर होत?
अ) पिसे , हस्तिदंत
ब) प्राण्यांची कातडी लोकर
क) मीठ, शिंपले
ड) नाणी
1. अ,ब,क✅
2. वरील सर्व
3. अ,ब,ड
4. अ,क,ड

10. खातेदाराने स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेवून आल्यास, त्यात नमूद केलेली रक्कम त्यास द्यावी असा आदेश म्हणजे काय?
अ) हुंडी वटवणे
ब) रोख कर्ज
क) अल्प मुदत कर्ज
1. ब,क बरोबर
2. फक्त अ बरोबर✅
3. अ,क
4. फक्त ड

1. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ) न्यून लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या खूप जास्त असणे
ब) न्यून लोकसंख्या म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचापूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्या पुरेशी असणे
क) न्यून लोकसंख्येचे उदाहरण भारत आहे
1. अ,क बरोबर
2. अ,ब,क बरोबर
3. फक्त ब बरोबर
4. वरीलपैकी एकही नाही✅

2. श्रमापेक्षा यंत्रसामुग्रीचा जास्त वापर ...... यंत्रणांमध्ये केला जातो?
1. भांडवलप्रधान ✅
2. श्रमप्रधान
3. पारंपरिक
4. यापैकी नाही

3. केंद्र सरकार खालील गोष्टींसाठी जबाबदार असते?
1. अन्नधान्याची साठवणूक✅
2. शिधापत्रिकांचे वितरण
3. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची माहिती
4. स्वस्त धान्याच्या दुकानांच्या कामाचे पर्यवेक्षण

4. भाववाढीचे नकारात्मक परिणाम सांगा
1. खरेदीक्षमता घटते
2. बचत घटते✅
3. भांडवल उभारणी घटत
4. उत्पन्न वाढते

5.भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाबाबत योग्य विधाने ओळखा
1. देशाच्या उत्पादनात सध्या प्राथमिक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे✅
2. देशाच्या उत्पादनात सध्या द्वितीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
3. देशाच्या उत्पादनात सध्या ्तृतीयक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
4. देशाच्या उत्पादनात सध्या तृतीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे

6. सार्वजनिक उणीवांचा योग्य पर्याय ओळखा.
अ) गरिबांचा मर्यादित फायदा
ब) वितरकांचा फायदा होत नाही
क) शहरी पूर्वग्रह
ड) प्रादेशिक विषमता
1. अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. यापैकी नाही

7.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली
1. १९७२ च्या दुष्काळानंतर
2. २००० च्या दुष्काळानंतर
3. १९७३ च्या पहिल्या तेल झटक्यानंतर
4. १९४३ च्या बंगाल दुष्काळानंतर✅

8. भारतातील बेकारी नष्ट होण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत
अ) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
ब) सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम
क) कृषी सेवाकेंद्र
ड) धडक कार्यक्रम
इ) जवाहर रोजगार योजना
उत्तर :-वरील सर्व✅

9.पुढील कोणते विधान अयोग्य आहे.
अ) दहशतवादामूळे विदेशी व्यापारावर विपरीत परिणाम होतो
ब) भ्रष्ट्राचारामुळे आर्थिक विषमता निर्माण होते
क) साठेबाजीमुळे वस्तूंच्या व सेवांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण होतो
ड) उत्पादनात वाढ करण्याचा आकृतिबंध नैसर्गिक पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात घातक आहे
1. अ
2.ब
3. क
4. यापैकी नाही✅

10.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केलेली जवाहर रोजगार योजना पुढील कोणत्या वर्गासाठी होती
अ) आदिवासी
ब) अनुसूचित जाती
क) वेठबिगार
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ ,ब
4. अ,ब,क✅

1. पुढील विधानांवर विचार करा.
अ) जेव्हा देशाची आयात जास्त असते तेव्हा देशाचा व्यापार प्रतिकूल असतो.
ब) जेव्हा देशाची निर्यात जास्त असते तेव्हा देशात भाववाढ होत असते.
1. अ बरोबर ब चूक
2. अ चूक ब बरोबर
3. अ व ब दोन्ही चूक
4. अ व ब दोन्ही बरोबर✅

2.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली?
1. 1972 च्या दुष्काळानंतर
2. 2000 च्या दुष्काळानंतर
3. 1973 च्या पहिल्या तेल झटक्यांणातर
4. 1943 च्या बंगाल दुष्काळानंतर✅

3. ग्राहक संरक्षण कायद्याचे मुख्य उद्दिष्ट सांगा?
अ) ग्राहकांना चांगले व परिपूर्ण सरंक्षण देणे
ब) ग्राहकांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी सुलभ व वेगवान यंत्रणेची तरतूद करणे
क) भेसळयुक्त वस्तूची विक्री थांबवणे
ड) साठेबाजी व काळाबाजार करणे
1.अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,ब✅
4. वरील सर्व

4.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
अ) आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेत गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता इत्यादी समस्या निराकरणाचा प्रयत्न केला जात नाही
ब) आर्थिकवृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे
1. अ बरोबर ब चूक
2. ब बरोबर अ चूक
3. दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

5.भौतिक जीवनमान निर्देशकांचे निर्देशक घटक खालील पैकी कोणते?
अ) सरासरी आयुर्मान
ब) माता मृत्युदर
क) साक्षरतादार
ड) बालमृत्यूदर
1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. ब फक्त

6.अयोग्य पर्याय ओळखा
अ) आर्थिकवृद्धी होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा असतो
ब) आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी कमी होत जातो तर उद्योग व  सेवाक्षेत्राचा वाटा वाढत जातो
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

7.शासनाने गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाय योजनांबाबत अयोग्य पर्याय ओळखा.
1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम- कामाच्या बदल्यात धान्य
2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम- पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत✅
3 .स्वयंरोजगारासाठी  ग्रामीण युवकांना प्रशिक्षण- स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण
4. जवाहर रोजगार योजना

8.भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये ओळखा
अ) जन्मदर व मृत्युदर यातील घटता फरक
ब) घटता बालमृत्यूदर
क) लोकसंख्या दशवार्षिक वाढीचा घटता दर
ड) कमी जन्मदर व उच्च मृत्युदर
1. अ,ब
2. अ,ब,क✅
3. वरील सर्व
4. यापैकी नाही

9.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) लोकसंख्या स्थित्यंतराचा सिद्धांत जन्मदाराचे व मृत्यूदराचे उच्च वेगकडून कमी वेगाकडे स्थित्यंतर स्पष्ट करते
ब) १९२१ या वर्षाला महाविभाजन वर्षे असे म्हणतात
1. केवळ अ
2. केवळ ब
3. अ आणि ब✅
4. अ व ब दोन्ही नाहीत

10. कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
1.1950
2. 1956
3. 1952✅
4. 2000

1. बेकारीच्या आर्थिक परिणामविषयी चुकीचे विधान ओळखा?
अ) संसाधनांचा अपव्यय
ब) कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अवघड
क) दारिद्र्य व उत्पादनातील विषमता
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
इ) अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भर
1. अ,ब
2. क,ड,इ
3. यापैकी नाही✅
4. वरील सर्व

2.1991 साली नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता खालील कोणत्या कारणावरून वाटू लागली?
अ) आर्थिक अस्थिरता
ब) प्रतिकूल व्यापरतोल
क) कर्जाचा वाढता भार
ड) भाववाढ
इ) जर्मनीचे विघटन
1. अ,ब,क,ड
2. अ,ब,क✅
3. ब,क,ड,इ
4. वरील सर्व

3.खालीलपैकी आधुनिक काळातील सर्वात महत्वाची समस्या कोणती?
अ) पर्यावरण हानी
ब) बेरोजगारी
क) रोगराई
ड) प्रतिकूल मान्सून
1. अ✅
2. अ,ब,क
3. क,ड
4. वरील सर्व

4.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) प्रचलित मजुरी दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असतानाही न मिळणे म्हणजे बेकारी होय
ब) तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी असे म्हणतात.
क) जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात त्याला संरचनात्मक बेकारी म्हणतात
1. अ, क
2. ब,क
3. अ,ब
4. वरील सर्व✅

5.भारतातील उच्च जन्मदराच्या कारणांपैकी अयोग्य कारण ओळखा.
अ) सार्वत्रिक विवाह
ब) दारिद्र्य
क) स्त्रियांचा निम्न दर्जा
ड) वाढती साक्षरता
1.अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,ब,क,ड
4. ड✅

6.जागतिकीकरणात पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो
अ) आधुनिक दळणवळण
ब) माहिती तंत्रज्ञान
क) प्रगत वाहतूक
ड) डॉलर ची निर्मिती
1. अ,क
2. अ,ब,ड
3. अ,ब,क✅
4. अ,क,ड

7.भारतातील खनिज तेलाबाबत अयोग्य विधान ओळखा.
अ) भारतात तेल संशोधनासाठी तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना करण्यात आली
ब) 1959 साली ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

8.10 व्या पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधाने ओळखा.
1. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी 7.8% झाली
2. त्यामुळे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरला.✅
3. औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी 8.8% वार्षिक दराने वाढली
4. फेब्रुवारी 2007  मध्ये भारताचा विदेशी चलनाचा साठा 185  बिलिअन डॉलर पर्यंत पोहोचला होता.

9. खालीलपैकी कोणत्या कारणाने कागदी चलनाची निर्मिती झाली
अ) धातू, पैसा वाहून नेण्याच्या अडचणीमुळे 
ब) सोने, चांदीचा पुरवठा कमी असल्यामुळे
क) नाण्यात होणाऱ्या झीजमुळे
1. फक्त अ
2. अ व ब
3. अ व क
4. वरील सर्व✅

10.राष्ट्रीय उत्पन्न हा चक्रीय प्रवाह आहे , कारण......
अ) उत्पन्न हे दरवर्षी मोजले जाते
ब) एका व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा खर्च होय.
1. अ बरोबर
2. ब बरोबर✅
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक

1. ई. स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.
1. प्रा सोलो आणि सम्यूल्सन
2. गुंन्नर मीरडाल आणि प्रा राजन
3. प्रा विल्यम नॉरधस आणि प्रा पॉल रोमर ✅
4.अमर्त्य सेन आणि प्रसू

2. लेखक समिती व त्यांच्या दारिद्रयाच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा
        अ गट
अ. जागतिक बँक
ब. श्री  गौरव दत्त
क. लकडावाला समिती
ड. डॉ दांडेकर आणि डॉ रथ
         
          ब गट
I. दरडोई दर दिवशी ग्रामीण भागात 2400 उष्मांक आणि शहरी भागात 2100 उष्मांक मिळण्याइतके अन्नधान्य मिळणे आवश्यक.
II. दारिद्र यातील अंतर (दारिद्रय आतील पोकळी)
III. दरडोई दर दिवशी आहारासाठी 2250 उष्मांकापेक्षा कमी अन्न मिळणे
IV. 1973- 74 च्या किमतीनुसार ज्यांना दरडोई महिना ग्रामीण भागात रुपये 49.0 नऊ आणि शहरी भागात रुपये 57 आहारासाठी मिळत नाहीत
✅उत्तर:- अ-IV, ब-III, क- I, ड- II

3. घाऊक किंमत निर्देशांका मध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतींचा विचार केला जातो?
अ. प्राथमिक वस्तू
ब. इंधन
क. उत्पादित वस्तू
1. फक्त अ आणि क
2. फक्त अ आणि ब
3. फक्त ब
4. वरील सर्व✅

4. पी डी ओझा (1960-61) समितीने दारिद्र्यरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?
1. प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न
2. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च✅
3. वरील दोन्ही
4. यापैकी नाही

5. सर्वसमावेशक वृद्धि प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे?
अ. महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
ब. सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
क. वरीलपैकी दोन्ही
ड. यापैकी नाही

6. योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले
ब. आयातपर्यायी करण निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला
क. दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले
ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले
1.ब, क, ड
2.ब, क
3.अ, ब✅
4. क, ड

7. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही?
1. अति गरिबी आणि भूक यांचे उच्चाटन
2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता
3. बालमृत्यू दर कमी करणे
4. कृषी शाश्वतता साध्य करणे✅

8. लिंग असमानता निर्देशांकामध्ये(GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?
अ. प्रजनन स्वास्थ्य
ब.सबलीकरण
क.श्रम बाजार
1.अ, ब
2.ब, क
3.ब
4.अ, ब, क, ड✅
या प्रश्नामध्ये अ ब आणि क हे तीनच पॉइंट दिले असुन उत्तरामध्ये मात्र अबकड असे चार पर्याय दिल्यामुळे हा प्रश्न चुकीचा असल्याने याचा एक गुण आयोगामार्फत दिला जाऊ शकतो

9. अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत?
अ. नई रोशनी
ब. पढो परदेस
क. शिका व कमवा
ड. नई मंजिल
1. अ, ब
2. क, ड
3. वरीलपैकी कोणतेही नाही
4. वरील सर्व

10. जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट (SDGs) ठरविण्यात आली त्यानुसार पुढील पैकी कोणती वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेले नव्हते?
अ. गरिबीचे उच्चाटन असमान ती विरुद्ध संघर्ष लिंगभाव समानता
ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा महासागर व जंगल रक्षण
क. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी पाठपुरावा आणि समीक्षा साठी प्रभावी संरचना विकास
ड. अतिरेकी संघटना वर बंदी आणि पर आक्रमण वर बंदी
1.क, ड
2.अ, ब, क
3. ड
4.अ

11. वित्तीय सर्वसमावेशकते आपण चुकीचा प्रश्न साठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली?
1. 16 मे 2014
2. 15 में 2014
3. 28 ऑगस्ट 2014✅
4. 18 नोवेम्बर 2014

12. सन 1991 मध्ये विकासाचे एल पी जी प्रतिमान.......
या त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी अमलात आणले?
1.पी व्ही नरसिंहराव
2. प्रणव मुखर्जी
3. डॉ मनमोहन सिंग ✅
4. पी चिदंबरम

25 October 2025

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (BBBP)

१. सुरुवात

➤ २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात.


२. लक्ष्यगट

➤ नुकतीच लग्न झालेली व तरुण जोडपी

➤ गर्भवती व स्तनदा माता

➤ आई-वडील


३. उद्दिष्टे

➤ पक्षपाती लिंग निवडीचे उच्चाटन करणे

➤ मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे

➤ मुलींच्या शिक्षणात आणि सर्व क्षेत्रांत सहभाग सुनिश्चित करणे


४. प्रमुख बाबी

➤ महिला आणि बालविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नाने राबवली जाते

➤ जागरूकता मोहीम, मीडिया कॅम्पेन, शालेय व सामाजिक हस्तक्षेप यावर भर



💰 सुकन्या समृद्धी योजना (SSY)


१. सुरुवात

➤ २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाणा येथूनच सुरू


२. लक्ष्यगट

➤ १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली


३. उद्दिष्टे

➤ मुलींचा जन्मदर वाढवणे

➤ मुलींच्या जगण्याचे प्रमाण (Survival Rate) सुधारणे

➤ शिक्षणासाठी व भविष्याकरिता बचत करण्याची सवय लावणे


४. महत्वाचे मुद्दे

➤ पोस्ट ऑफिस किंवा मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडता येते

➤ एका कुटुंबातील दोन मुलींसाठी खाते उघडण्याची मुभा

➤ खाते उघडण्याची वयमर्यादा – मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असावी

➤ खाते मॅच्युरिटी – २१ वर्षे किंवा मुलीचे लग्न (किमान १८ व्या वर्षी)

➤ आयकर कलम ८०C अंतर्गत करसवलत


📝 टीप: दोन्ही योजनांचा उद्देश स्त्रीभ्रूणहत्या थांबवून मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता देणे आहे.

आर्थिक विकास आणि वृद्धी (व्याख्या)


🔹️ मायर व बाल्डविन - "आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे, ज्याअंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते."


🔹️ किंडल बर्जर - "अधिक उत्पादन व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक स्थळातील बदल म्हणजे आर्थिक विकास होय."


🔹️ ए. मॅडिसन - "श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी, तर गरीब राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक विकास होय."


🔹️ उर्सुला हिक्स - "विकसित देशांतील आर्थिक प्रगतीस वृद्धी तर अविकसित देशांतील आर्थिक प्रगतीस विकास म्हणता येईल."


🔹️ शुम्पिटर - "आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थितीक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून, विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते. या उलट अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात संथपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे वृद्धी होय."


🔹️ जे. के. मेहता - "आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल संख्यात्मक (Quantitative) तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील बदल गुणात्मक (Qualitative) स्वरूपाचे असतात."


🔹️ प्रो. बने - "विकसनशील देशात अर्थव्यवस्थेचा विविध घटकात वाढ करून ती टिकविण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन व नियमांची गरज असते याला आर्थिक विकास म्हणतात, तर विकसित अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया स्वयंसूर्ते नसते त्यामुळे त्या प्रगतीला आर्थिक वृद्धी म्हणता येते."

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची साधने


1) स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDP) :- देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या "अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GDP होय. 


🛑GDP - अंतर्गत शक्ती दर्शवते.


2)स्थूल राष्ट्रीय उत्पाद(GNP) :- "देशाच्या नागरिकांनी जगात कोठेही राहून उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GNP होय. 


उदा :- अजय - अतुल यांनी अफ्रिकेत जाऊन तिथे स्टेज शो केला तर त्यांना तिथे मिळालेले पैसे GNP मध्ये मोजले जातील‌. ते GDP मध्ये मोजले जाणार नाहीत.(हा M(आयात) झाला.)


उदा :- जाॅन सीना त्याच्या देशातून भारतात आला आणि स्टेज शो केला त्याने भारतातात मिळवलेले पैसे जाताना त्याच्या देशात घेऊन गेला तर ते वजा करावे लागतील (हा X (निर्यात)‌झाला)


📍गेलेला पैसा वजा (-)करता आणि आलेला पैसा समाविष्ट (+)करता तेंव्हा आपल्याला GNP मिळतो.


🔰 निर्यात(X) - जास्त असेल तर GNP जास्त असणार आहे.


उदा - GDP 1000 रू + निर्यात 400 + आयात 300 = 1100 GNP

म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 1100 रू.


💠आयात(M) - जास्त असेल तर GDP जास्त असणार आहे आणि GNP कमी असणार आहे.

उदा - GDP 1000 रु + निर्यात 400 - आयात 600 = 800 GNP

म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 800 रू.


🔶स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP) = GDP + X(निर्यात ) - M(आयात ) पाठच करा (PYQ)


⭕️घसारा (डेप्रिसिएशन) - एखादी भांडवली वस्तू आहे ती जर एका आर्थिक वर्षात घसरत असेल (तिची झीज होत असेल )तर तिची घसरण पैशाच्या स्वरूपात मोजली जाते. त्याला घसारा म्हणतात. 


🔰 निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP):-

घसारा वजा करून जे उत्पन्न मिळते त्याला म्हणतात नेट डोमेस्टिक प्रोडक्ट (NDP)


✅NDP = GDP - घसारा 


⭕️ निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(NNP):-

घसारा जर GNP मधून वजा केला तर NNP मिळतो.


✅NNP = GNP - घसारा


🟡 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे सर्वात सुयोग्य साधन/मापन NNP हे आहे. 

म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात NNP चा वापर केला जातो.


💠 राष्ट्रीय उत्पन्न टाॅपिकवरती वरील महत्त्वाच्या संकल्पनांवरती राज्यसेवा पूर्व तसेच संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न आलेले आहेत.(PYQ) 

पाठच करा.

22 October 2025

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multidimensional Poverty Index - MPI)

 

विकसन संस्था

➤ MPI हा ऑक्सफर्ड पोवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) या संस्थेने विकसित केला.


प्रकाशन व मोजमाप

➤ 2010 पासून UNDP (United Nations Development Programme) ने OPHI च्या सहकार्याने MPI मोजणे व प्रकाशित करणे सुरू केले.


MPI मोजण्यामागील उद्देश

➤ दारिद्र्य केवळ उत्पन्नावर मोजले जाऊ नये, तर जीवनातील विविध मूलभूत पैलूंचा विचार केला जावा.

➤ शिक्षण, आरोग्य व जीवनमान या तीन प्रमुख परिमाणांवर आधारित मापन.


मुख्य परिमाणे (Dimensions)

✅️ शिक्षण (Education)

➤ कुटुंबातील प्रौढ शिक्षणाचा स्तर

➤ मुलांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण

✅️ आरोग्य (Health)

➤ बालमृत्यू दर

➤ पोषण स्थिती

✅️ जीवनमान (Living Standards)

➤ स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता

➤ स्वच्छ पाणी व स्वच्छतागृह

➤ वीजपुरवठा

➤ घरातील रहिवासी स्थिती

➤ मालमत्तेची उपलब्धता


मोजण्याची पद्धत

➤ एखाद्या व्यक्ती/कुटुंबाला बहुआयामी गरीब मानले जाते, जर ते किमान 33% निर्देशकांमध्ये वंचित असतील.

17 October 2025

TCS_IBPS वर आधारित प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा

12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग

13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए

14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर

15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ

16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च

18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार

19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड

20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक

21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी

22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3

23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज

24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड

25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड

26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी

27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?
उत्तर- मुंबई

28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन

30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा

31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी

32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे

34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक

35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर-  ल्युकेमिया

36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती

37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी

38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर-  महात्मा गांधी

39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर

40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन

41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज

42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13

44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड

45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर

46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर

48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया

49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर

50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान

51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका

52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर

53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- कावेरी

55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद

56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी

57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट

58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी

59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा

60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस

61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
उत्तर- लोकमान्य टिळक

62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858

63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
उत्तर- 1909

64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड आयर्विन

65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उत्तर- सविनय कायदेभंग

66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
उत्तर- दादाभाई नौरोजी

67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
उत्तर- 26 जानेवारी 1930

68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजलअली

70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
उत्तर- 3

71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार

72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
उत्तर- स्वर्णसिंह समिती

73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे? 
उत्तर- कलम 123

74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
उत्तर- 22

75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
उत्तर- 11

76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 3 डिसेंबर

77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
उत्तर- श्रीलंका

78) सुजय कशाशी संबंधित आहे?
उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल

79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
उत्तर- ॲल्युमिनियम

80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
उत्तर- यकृत

81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
उत्तर- डेसिबल

82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
उत्तर- तुर्कस्तान

83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
उत्तर- 1991

84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी

90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
उत्तर- पुणे

99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

101) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

102) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

103) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

104) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

105) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

106) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

107) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?
उत्तर- कृष्णराव साबळे

108) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?
उत्तर- 1913

109) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

110) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
: उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय?
उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत?
उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

201) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
उत्तर- तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

202) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर- सिमुक

203) चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- हेमाद्री

204) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर- भाऊ महाजन

205) कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
- प्लासी