Thursday 10 December 2020

अर्थव्यवस्था प्रश्नपत्रिका


1) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) ही संस्था पुढीलपैकी कोणते कार्य करते ?

अ)वित्तीय स्थिरता सुरक्षित करणे

ब) जागतिक मौद्रीक सहकार्य

क) अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे

ड) शाश्वत आर्थिक विकास करणे✅


1) फक्त क                    2) क आणि ड

3) अ, ब,क                  4 ) वरील सर्व


2) IMF  मधील सदस्य देशाची संख्या किती आहे ?

1) 164

2) 176

3) 184

4) 189✅


3) ब्रिटनुउड परिषद अमेरिकेतील पुढीलपैकी कोणत्या राज्यात झाली होती ?

1) जॉर्जीया

2) न्यू ह्याम्पशायर✅

3) अलास्का

4) फ्लोरिडा


4) IMF  ही संस्था प्रथम 1945 मध्ये जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा एकूण किती देश सदस्य होते ?

1) 29✅

2) 44

3) 49

4) 54


5) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष या संस्थेच्या चिन्हा मध्ये एकूण किती " पानांचा " समावेश आहे ?

1) 4

2) 5✅

3) 6

4) 7


6) IMF  च्या कार्यालयीन भाषांमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश होतो ?

अ)ENGLISH

ब) FRENCH✅

क) ARABIC

ड) SWISS


1) अ आणि ब                   2) फक्त अ 

3) अ, ब,क                       4) वरील सर्व


7) IMF मध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून कोण कार्य करत आहे ?

1) क्रिस्टीलिना जॉर्जिव्हा

2) गीता गोपीनाथ✅

3) रुघुराम  राजन

4) क्रिस्टिना लिगार्ड


8) 8 मे 1947 रोजी IMF  कडून कर्ज घेणारा पहिला देश कोणता होता ?

1) जर्मनी

2) फ्रान्स✅

3) ब्रिटन

4) ग्रीस


9) UN  मध्ये सदस्य असूनही IMF  मध्ये सदस्य नसलेले देश कोणते आहेत ?

अ) उत्तर कोरिया

ब) मोन्याको

क) अंडोरा

ड) लाईचटेंस्टन


1)फक्त अ                      2) अ आणि क

3) अ, ब, क                   4) वरील सर्व✅


10) IMF  मध्ये भारताचा " एकूण कोटा " किती प्रमाणात आहे ?

1)   2.76 %✅

2)   2.64 %

3) 17.46 %

4) 16.52 %


सवाऱ्या चंद्रावरच्या


◾️गल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. 


◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.


◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका. 


◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.


◾️ तयानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं. 


◾️तया काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.


◾️ तयानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.


    💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢


◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.


◾️ तयापैकी १६ यशस्वी झाल्या. 


◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.


  💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢


◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या. 


◾️यातील १५ यशस्वी झाल्या. 


◾️लना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले. 


◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.


      💢 जपान : १९९० पासून 💢


◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली. 


◾️चद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला. 


◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.


◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.


        💢 चीन : २००७ पासून 💢


◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. 


◾️चग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते. 


◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.


💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢


◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता. 


◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली. 


◾️शरीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले. 


◾️चद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.


◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.


लुशाई टेकड्या



लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.

महेंद्रगिरी



महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.


पुराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.


बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.


महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.


ब्रिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.


या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.

1) मलयगिरि



दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.


अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम्‌ टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्‍या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.


पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.


या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.


2) भारतातील एक प्राचीन ठिकाण. 

याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.


रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.

दख्खन पठार


‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर



1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983]


2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983]


3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


5. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा [1984]


6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]


7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम [1985]


8. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम [1985]


9. केवला देव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान [1985]


10. पुराने गोवा के चर्च व मठ - गोवा [1986]


11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश [1986]


12. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक [1986]


13. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश [1986]


14. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र [1987]


15. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक [1987]


16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल [1987]


17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडू [1987]


18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [1988]


19. सांची का बौद्ध स्मारक - मध्यप्रदेश [1989]


21. हुमायूँ का मकबरा - दिल्ली [1993]


22. दार्जिलिंग हिमालयन रेल - पश्चिम बंगाल [1999]


23. महाबोधी मंदिर, गया - बिहार [2002]


24. भीमबेटका की गुफाएँ - मध्य प्रदेश [2003]


25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर - तमिलनाडु [2004]


26. एरावतेश्वर मन्दिर - तमिलनाडु [2004]


27. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र [2004]


28. नीलगिरि माउंटेन रेलवे - तमिलनाडु [2005]


29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [2005]


30. दिल्ली का लाल किला - दिल्ली [2007]


31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]


32. सिमलीपाल अभ्यारण्य - ओडिशा [2009]


33. नोकरेक अभ्यारण्य - मेघालय [2009]


34. भितरकनिका उद्यान - ओडिशा [2010]


35. जयपुर का जंतर-मन्तर - राजस्थान [2010]


36. पश्चिम घाट [2012]


37. आमेर का किला - राजस्थान [2013]


38. रणथंभोर किला - राजस्थान [2013]


39. कुंभलगढ़ किला - राजस्थान [2013]


40. सोनार किला - राजस्थान [2013]


41. चित्तौड़गढ़ किला - राजस्थान [2013]


42. गागरोन किला - राजस्थान [2013]


43. रानी का वाव - गुजरात [2014]


44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश [2014]


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



* मुचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* श्रीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


* भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


* दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

 

* फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

 

* हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


* चंबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


* उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

 

* कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.


* नागार्जुनसागर

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

वातावरणाचे थर -


 वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 वातावरणाचे मुख्य थर 


📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती



♍️जग : वनसंपत्ती♍️ 


💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️


💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️


💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️


💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


सह्याद्री पर्वत


--------------------------------

• सह्याद्रीची निर्मिति प्रस्तरभंगामुळे झाली आहे


• सह्याद्री हा अवशिष्ट पर्वत आहे


• सह्याद्री पर्वतास पश्चिमघाट असेही म्हणतात


• सह्याद्री पर्वत कोकण किनार पट्टीस समांतर आहे


• सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेस सातमाळा डोंगरा पासून( तापी नदी) ते दक्षिणेस *कन्याकुमारी* पर्यन्त आहे


• सह्याद्री पर्वताची लांबी १६०० किमी असून, महाराष्ट्रात त्याची ४४० किमी आहे


• सह्याद्री पर्वताने (पश्चिम घाट) दक्खननच्या पठराची पश्चिम सीमा निश्चित केली आहे


• सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्या पासून सरासरी ३० ते ६० किमी अंतरावर आहे


• सह्याद्री पर्वताची उंची ९१५ ते १२२० मीटर आहे


• सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे कमी होत जाते तर उत्तरेकड़े वाढते


• सह्याद्री पर्वताची रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस कमी आहे


• सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे 

महाराष्ट्रातील अभयारण्ये



भारतात २००९-१० मध्ये ५१५ अभयारण्ये होती. 


महाराष्ट्रात ३५ अभयारण्ये. 


अ.क्र. - जिल्हा - अभयारण्य - क्षेत्रफळ


०१. धुळे - अनेर धरण - ८३


०२. अमरावती - मेळघाट वाघ संरक्षक अभयारण्य - ११५०


०३. कोल्हापूर - राधानगरी - ३५१


०४. ठाणे - तानसा - ३०५


०५. वर्धा - बोर - ६१


०६. सोलापूर, अहमदनगर - माळढोक पक्षी अभयारण्य - १२२२


०७. जळगांव - यावल अभयारण्य - १७८


०८. रायगड - कर्नाळा पक्षी अभयारण्य - ५


०९. भंडारा - नागझिरा - १५३


१०. नांदेड - किनवट - २१९


११. अहमदनगर - देऊळगांव रेहेकुरी - ३


१२. सातारा - कोयना - ४२४


१३. सांगली - सागरेश्वर - ११


१४. पुणे, ठाणे - भिमाशंकर - १३१


१५. सांगली,कोल्हापूर - चांदोली - ३०९


१६. रायगड - फणसाड - ७०


१७. नाशिक - नांदूर मधमेश्वर - १००


१८. चंद्रपूर - अंधारी - ५०९ 


१९. अहमदनगर - कळसूबाई हरिश्चंद्र - ३६२


२०. गडचिरोली  - चापराला - १३५


२१. औरंगाबाद, जळगांव - गौताळा औट्रमघाट - २६१


२२. यवतमाळ, नांदेड - पैनगंगा - ३२५


२३. सिंधुदुर्ग - मालवण - २९


२४. पुणे - मयुरेश्वर - ५


२५. औरंगाबाद - जायकवाडी - ३४१


२६. बीड - नायगाव मयुर अभयारण्य - ३०


२७. उस्मानाबाद - येडशी - २२


२८. बुलडाणा - आंबा बरवा - १२७


२९. बुलडाणा - ज्ञान गंगा - २०५


३०. अकोला - नरनाळा - १२


३१. अमरावती - वाण - २११


३२. यवतमाळ - टिपेश्वर - १४८


३३. गडचिरोली - भामरागड - १०४


३४. ठाणे - तुम्भारेश्वर - ८६


३५. वाशीम - कारंजा सोहोळ - १८

जगाची संक्षिप्त माहिती


➖➖➖➖➖➖➖➖➖

( खंडाचे नाव, क्षेत्रफळ ,एकूण जगाच्या क्षेत्रफळाच्या % क्षेत्रफळ, देश/ प्रदेश, या क्रमाने वाचावे)

➖➖➖➖➖➖➖➖➖


▶️ आशिया

– ४,३९,९९०००चौ .कि. मी.

– २९.५% 

– भारत ,इराण ,इराक ,इस्राईल, जॉर्डन, बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया ,मलेशिया, म्यानमार, श्रीलंका ,जपान.


▶️ आफ्रिका

– २९८००००० चौ .कि .मी.

– २० % 

– इजिप्त, लिबिया ,अल्जेरिया, मोरोक्को ,सुदान ,इथेपिया, केनिया, सोमालिया ,झांबिया साउथ, आफ्रिका, नायजेरिया ,अंगोला .


▶️ उत्तरअमेरिका

– २४३२०००० चौ. कि. मी

– १६.३ % 

– अमेरिका ,कॅनडा, ग्रीनलंड ,वेस्ट इंडिज, मध्य अमेरिका ,मेक्सिको .


▶️ दक्षिण अमेरिका

– १७५९९००० चौ. कि. मी.

– ११.८ % 

– अर्जेंटीना ,बोलाव्हिया ,ब्राझिल, चिली ,कोलंबिया ,इक्विनेर ,पेरुग्वे, पेरू ,उरूग्वे ,व्हेनुझुएला, गयाना .


▶️ युरोप

– ९७००००० चौ. कि .मी .

– ६.५ % 

– फ्रान्स, झेकोस्लोव्हाकिया ,इंग्लंड, हंगेरी ,नॉर्वे ,स्वीडन, पोर्तुगाल, इटली, स्पेन, स्वित्झरलैंड, रशिया, ऑस्ट्रिया.


▶️ ऑस्ट्रेलिया

– ७६८३३००० चौ. कि .मी

– ५.२ % 

– न्यू साऊथ वेल्स क्वीन्स लँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया, तस्मानिया .


▶️ अंटार्किटका

– १४२४५०००चौ.कि.मी

– ९.६ % 

– कोणताही देश सहभागी नाही 

➖➖➖➖➖➖➖➖➖

शेतकरी समुह अर्थ व स्थिती


*🔻- अर्थ-*---

  शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे.  या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत. 

======


*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*


विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.

भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. 

         शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.

               

*शेतकरी संघटना*---

      सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.

शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले  स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे. 

औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासमोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.

आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये




*🔻- लक्षणे -*---


१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.


२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.

उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.


३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे  आदिवासी समुह आहेत.


४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.


५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.


६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.


७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.


८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.


९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.

=========

*🔻- आदिवासी समुह वैशिष्ट्य-*


१) *विशिष्ट भूप्रदेश*---

   एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते. 

उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि. 

कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात. 


२) *समूहाचा आकार*---

   आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.


३) *रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह*---

   आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात. 


४) *विवाहपद्धती*---

   विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.


५) *कुटुंबपद्धती*---

   या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.


६) *आर्थिक स्थिती*---

   आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात. 

उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.


७) *धर्म व जादूचा प्रभाव*---

   आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.


८) *शिक्षण व मनोरंजनाची साधने*---

   दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नकला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.


९) *स्त्रियांचा दर्जा*---

   आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.


१०) *जीवनपद्धती*---

   आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.

============================================



भारतातील महत्वाची शहरे :


🔷अमृतसर -  सुवर्ण मंदिर


🔶अहमदाबाद - साबरमती आश्रम


🔷आग्रा - लाल किल्ला


🔶कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल


🔷कानपूर - कातड्याच्या वस्तु


🔶कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण


🔷कोणार्क -  सूर्य मंदिर


🔶गगोत्री -  गंगा नदीचा उगम


🔷चदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी


🔶जयपूर - जंतर मंतर वेधशाळा


🔷जोधापूर - मोती महल


🔶डलहौसी -  थंड हवेचे ठिकाण


🔷औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर


🔶नागपूर -  मध्यवर्ती वसलेले शहर


🔷मबई -  नैसर्गिक बंदर


🔶नाशिक -  सात टेकड्यांवर वसलेले शहर


🔷पोरबंदर -  महात्मा गांधींचे जन्म स्थळ


🔶हदराबाद -  चारमिनार 


गाल्फ प्रवाह



काय आहे गल्फा प्रवाह


📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.* 


📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.

दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात. 


📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो. 


📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो

पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो


📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते. 


📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.

गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात. 


*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*


📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.

पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.


📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.

उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते. 


📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते. 


📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.

अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.


 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

____________________________________

भारतातील महत्वाचे धबधबे

 

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे. 


२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी 


३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी 


४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी 


५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी 


६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी 


७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी 


८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

भारतातील महत्वाची सरोवरे



१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर 


२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. 


३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर 


४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर 


५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. 


६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर 

____________________________________

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )

नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )

सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर

कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

जगातील सर्वात उंच 10 शिखरे


🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) 

🔹8848 मीटर उंच.


🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8611 मीटर उंच.


🔵(3).... कांचनगंगा (भारत ) 

🔹8586 मीटर उंच.


🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)

🔹8516 मीटर उंच.


🔵(5)...... मकालू (नेपाळ)

🔹8463 मीटर उंच 


🔵(6).......चो ओयू (नेपाळ) 

🔹8201 मीटर उंच.


🔵(7).......धौलागिरी (नेपाळ) 

🔹8167 मीटर उंच.


🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ) 

🔹8163 मीटर उंच


🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8125 मीटर उंच.


🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)

 🔹8091 मीटर उंच.


🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)

🔹8068 मीटर उंच.


🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)

 🔹8051 मीटर उंच.


🔵(13)...... गशेरब्रूम --2

🔹(हिमालय) 8035 मीटर उंच


🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)

🔹8027 मीटर उंच.


🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.

भारतीय रेल्वे विभाग

   

1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951

2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951

3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952

4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951

5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955

6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955

7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966

8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952

9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958

10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996

11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996

12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996

13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996

14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996

15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996

16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998

17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे :



     *बंदरे  -  राज्य*

1) कांडला - गुजरात

2) मुंबई - महाराष्ट्र

3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्

4) मार्मागोवा - गोवा

5) कोचीन - केरळ

6) तुतीकोरीन - तमिळनाडू

7) चेन्नई - तामीळनाडू

8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

9) पॅरादीप - ओडिसा

10)न्यू मंगलोर - कर्नाटक

11) एन्नोर - आंध्रप्रदेश

12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल

13) हल्दिया - पश्चिम बंगाल

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :



  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव


1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 

3) काळे खंड - आफ्रिका 

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन

भारतातील सर्वात लांब


1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) 

महत्त्वाच्या दऱ्या


🚣🏻काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे. 


🚣🏻कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

 

🚣🏻कलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.


🚣🏻काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.


🚣🏻शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

 हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते. 

📚🙏

महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान


🔹 बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.

🔹 महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.

🔹 महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.

🔹 वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.

🔹 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.

🔹 सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.

🔹 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.

🔹 कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.

🔹 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.

🔹 भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.

🔹 सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.

🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.

🔹 फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.

🔹 महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.

🔹 माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.

फोर्ब्स पावर लिस्ट’2020



● फोर्ब्सने 2020 (Forbes Power Women ) वर्षातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे. 


या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलॅंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ज्यांनी कडक नियमावली करत आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवलं.


● 17 व्या वार्षिक ‘फोर्ब्स पावर लिस्ट’ मध्ये 30 देशांमधील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सनं म्हटलं आहे की, यामध्ये दहा देशांच्या प्रमुख, 38 सीईओ आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. भलेही त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील मात्र 2020 सालात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे.


● निर्मला सीतारमण या यादीत 41 व्या स्थानी आहेत. नडार मल्होत्रा 55 व्या तर किरण मजूमदार शॉ 68 व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत 98व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत.

महाराष्ट्रात 'दिशा कायदा' मंजूर



राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. 


 यानुसार एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाला तर सीआरपी कलमाच्या बदलासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. 


 यानुसार जन्मठेपेची शिक्षा आता मृत्यूदंडात करण्यात आली आहे. या कायद्याला दिशा कायदा शक्ती बिल असं नाव देण्यात येणार आहे. 


 दरम्यान, या कायद्यानुसार आता फास्ट ट्रॅकवर आरोपींना शिक्षा करण्यात येणार आहे.


📚 काय आहे दिशा कायदा : #Act


 बलात्काऱ्याला कठोरात कठोर शिक्षा आणि तीसुद्धा अवघ्या 21 दिवसात देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक 2019 आणलं.


 या नव्या कायद्यानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणांसाठी 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. 


या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.


Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना ४१ वे स्थान.



🏆 फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे.


🏆 १७ व्या वार्षिक 'फोर्ब्स पॉवर लिस्ट'मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.


🏆 "फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला.


🏆 या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, 


🏆 किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. एन्जेला मार्केल या युरोपमधील प्रमुख नेत्या आहेत.


🏆 जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करून जर्मनीत दहा लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल यांचं नेतृत्व खंबीर आहे. 


🏆 अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी करोना महासाथीदरम्यान देशात कडक लॉकडाउन लागू करून आपल्या देशाला मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे त्यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

Online Test Series

Latest post

चालू घडामोडी :- 15 मार्च 2024

◆ ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, पंतप्रधानांच्या समितीने केली निवड. ◆ दरवर्षी 14 मार्च रोजी 'पाय डे...