Sunday 7 February 2021

प्रार्थना समाज


✔️बराम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली.

✔️1867 मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

✔️आत्माराम पांडुरंग 1823-1898 नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थान करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते.

✔️परार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत.

✔️थोडक्यात प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती.

✔️एकेश्र्वरवादाच्या सिध्दान्ताव्यितिरिक्त समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला.

✔️मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.


🔰समाज सुधारणेच्या बाबतीत प्रार्थना समाजाने आपल्या समोर चार उद्देश ठेवले

१. जातिभेद निर्मूलन

२. बालविवाह प्रतिबंध,

३. विधवा विवाह

४. स्त्री शिक्षण

घटना समितीच्या प्रमुख 8 समित्या व त्याचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे

1) संघ अधिकार समिती - पंडित नेहरू 

2)  संघ राज्यघटना समिती - पंडित नेहरू

3) राज्याशी चर्चेसाठी समिती - पंडित नेहरू

4) प्रांतीय घटना समिती - वल्लभभाई पटेल 

5)  मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वंचित भाग सल्लागार समिती  - सरदार वल्लभभाई पटेल

6)कार्यपद्धती नियम समिती - राजेंद्र प्रसाद 

7) सुकाणू समिती - राजेन्द्र प्रसाद 

8) मसुदा समिती - डॉ बाबासाहेब आंबेडकर

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक


                                                                                  

         जन्म : 7 सप्टेंबर 1791

         (भिवडी, पुरंदर, पुणे)


        फाशी : 3 फेब्रुवारी 1832

                   (पुणे)

━━━━━━━━━━━━━━━

            ◾️सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.


           ◾️सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.

          ◾️सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.


           ◾️बरिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

          

◾️सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.


            ◾️तयावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.


             ◾️रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.


             ◾️शवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला.


           ◾️1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे.


          ◾️उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे  अशी त्याची इच्छा होती."


विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश



👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय 


👤 सधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय .

सीबीआयचे आतापर्यंतचे सर्व संचालक


👤 डी पी कोहली : १९६३ ते १९६८

👤 एफ वी अरुल : १९६८ ते १९७१

👤 डी सेन : १९७१ ते १९७७

👤 एस एन माथुर : १९७७ ते १९७७

👤 सी वी नरसिंहन : १९७७ ते १९७७

👤 जॉन लोबो : १९७७ ते १९७९

👤 आर डी सिंह : १९७९ ते १९८०

👤 ज एस बाजवा : १९८० ते १९८५

👤 एम जी कत्रे : १९८५ ते १९८९

👤 ए पी मुखर्जी : १९८९ ते १९९०

👤 आर शेखर : १९९० ते १९९०

👤 विजय करण : १९९० ते १९९०

👤 एस के दत्ता : १९९० ते १९९३

👤 क वी आर राव : १९९३ ते १९९६

👤 जोगिंदर सिंह : १९९६ ते १९९७

👤 आर सी शर्मा : १९९७ ते १९९८

👤 डी आर कार्तिकेयन : १९९८ ते १९९८ 

👤 टी एन मिश्रा : १९९८ ते १९९९

👤 आर के राघवन : १९९९ ते २००१

👤 पी सी शर्मा : २००१ ते २००३

👤 य एस मिश्रा : २००३ ते २००५

👤 वी एस तिवारी : २००५ ते २००८

👤 अश्वनी कुमार : २००८ ते २०१०

👤 ए पी सिंह : २०१० ते २०१२

👤 रणजित सिन्हा : २०१२ ते २०१४

👤 अनिल सिन्हा : २०१४ ते २०१६

👤 राकेश अस्थाना : २०१६

👤 आलोक वर्मा : २०१७

👤 एम नागेश्वर राव : २०१८ ते २०१९

👤 आर के शुक्ला : २०१९ ते २०२१

👤 परविण सिन्हा : २०२१ पासून .

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा



काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नाना पटोले विदर्भातून येतात. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.


 नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


२०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


नाना पटोले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पण विधानसभा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये बदल करत सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेऊन, विधानसभेचे कामकाज चालवले. नाना पटोले यांनी बुधवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. 


आज सकाळी ते महाराष्ट्रात परतले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याचे माध्यमांकडून सांगण्यात येत आहे.

जागतिक लोकशाही निर्देशांक २०२०



✅ पहिले पाच देश आणि गुणांक


🇳🇴 ०१) नॉर्वे : ९.८१ 

🇮🇸 ०२) आइसलँड : ९.३७ 

🇸🇪 ०३) स्वीडन : ९.२६ 

🇳🇿 ०४) न्युझीलंड : ९.२५

🇨🇦 ०५) कॅनडा : ९.२४


👎 शेवटचे पाच देश आणि गुणांक


🇹🇩 १६३) चाड : १.५५ 

🇸🇾 १६४) सिरीया : १.४३ 

🇨🇫 १६५) मध्य आफ्रिका प्र. : १.३२

🇨🇩 १६६) कॉंगो : १.१३ 

🇰🇵 १६७) उत्तर कोरिया : १.०८ .


✅ भारतातील शेजारील देश व त्यांचा क्रमांक


🇱🇰 ६८) श्रीलंका : ६.१४

🇧🇩 ७६) बांग्लादेश : ५.९९

🇧🇹 ८४) भूटान : ५.७१

🇳🇵 ९२) नेपाळ : ५.२२

🇵🇰 १०५ ) पाकिस्तान : ४.३१

🇲🇲 १३५) म्यानमार : ३.०४

🇦🇫 १३९) अफगाणिस्तान : २.८५

🇨🇳 १५१) चीन : २.२७


✅ जगातील काही प्रमुख देश व त्यांचे क्रमांक


🇩🇪 १४) जर्मनी : ८.६७

🇬🇧 १६) ब्रिटन : ८.५४

🇯🇵 २१) जपान : ८.१३

🇺🇲 २५) अमेरिका : ७.९२

🇮🇱 २७) इस्त्रायल : ७.८४

🇧🇷 ४९) ब्राझील : ६.९२

🇷🇺 १२४) रशिया : ३.३१ .

कर्नाटकात लिथियम धातूचा मोठा साठा सापडला



विजेरी वाहनांमध्ये महत्त्वाची असलेली रिचार्जेबल बॅटरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या लिथियम धातूचा मोठा साठा भारतात कर्नाटकातील एका जिल्ह्यात सापडला आहे. 


बेंगळुरूपासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर मंड्या जिल्ह्यात लिथियमचे साठे सापडले आहेत. 


शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हे साठे 16 हजार टन असण्याची शक्यता आहे.


लिथियम (चिन्ह Li; अणुक्रमांक 3; अणुभार 6.941) हा एक धातूरूप मूलद्रव्य असून, हलक्या धातुंच्या श्रेणीत येतो. 


हा धातू रूपेरी पांढरी असून सोडियमापेक्षा कठीण परंतु शिशापेक्षा मऊ आहे. 


त्याला चाकू किंवा टोकदार वस्तूने सहजपणे कापले जाऊ शकते. 


यूहान आउगस्त आर्फव्हेडसन यांनी 1817 साली पेटॅलाइट खनिजाचे विश्लेषण करताना लिथियमाचा शोध लावला.

Amazon चे फाउंडर जेफ बेझोस यांची मोठी घोषणा, CEO पदावरुन होणार पायउतार



जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत बेझोस कंपनीच्या सीईओ पदावरुन पायउतार होतील. त्यांच्या जागी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसचे प्रमुख अँडी जेसी यांच्याकडे सीईओची जबाबदारी येईल.


अ‍ॅमेझॉनमधील भागीदारीच्या जोरावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बेझोस यांनी तिसऱ्या तिमाहीमध्ये सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. बेझोस यांनी अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना एक लेटर पाठवून याद्वारे माहिती दिली. 


अ‍ॅमेझॉनमध्ये आता नवीन प्रोडक्ट्सवर जास्त लक्ष देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सीईओ पद सोडल्यानंतर त्यांच्याकडे स्पेस एक्सप्लोरेशन कंपनी ब्लू ओरिजिनसोबतच अन्य प्रोजेक्ट्सवर लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळेल.


दरम्यान, सीईओ पद सोडल्यानंतरही बेझोस हेच कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर असतील आणि कंपनीत त्यांचा दबदबा कायम असेल असं समजतंय.


 57 वर्षांच्या बेझोस यांनी 1994 मध्ये अ‍ॅमेझॉनची स्थापना केली होती. तर, बेझोस यांच्याजागी सीईओ बनणारे अँडी जेसी यांनी 1997 मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून अ‍ॅमेझॉनमध्ये कामाला सुरूवात केली होती. "अँडीला कंपनीत सर्वजण ओळखतात, ते दीर्घकाळापासून कंपनीसोबत काम करत आहे. मला खात्री आहे की ते उत्तम लीडर ठरतील", असं बेझोस म्हणाले.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...