30 September 2025

चालू घडामोडी :- 29 सप्टेंबर 2025

◆ कर्नाटकातील बिदर जिल्ह्याला जल शक्ती अभियान: कॅच द रेन अंतर्गत जल संचय जन भागिदारी (JSJB) पुरस्कार मिळाला.

◆ बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय आणि पश्चिम चंपारणमधील उदयपूर तलाव यांना रामसर यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

◆ गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावासहित भारतात आता एकूण 93 रामसर स्थळे झाली आहेत.

◆ सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमान अधिकृतपणे सेवेतून निवृत्त केले आहे. 

◆ दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. [हा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेचा (UNWTO) एक उपक्रम आहे, जो 1980 मध्ये सुरू झाला होता.]

◆ जागतिक पर्यटन दिन 2025 ची थीम "पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन" ही आहे. 

◆ जागतिक पर्यटन दिन 2021 ची थीम "पर्यटन आणि शांतता" ही होती.

◆ मलेशियात 27 ते 29 सप्टेंबर 2025 या काळात जागतिक पर्यटन दिन आणि जागतिक पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती. 

◆ राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने 'मातीकरण' तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग केला.

◆ 12 वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद (SMDS-XII) देहरादून येथील दून विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती.

◆ ओडिशातील भुवनेश्वर येथे दुसरी राष्ट्रीय मध्यस्थी परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती.

◆ दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.

◆ जागतिक हृदय दिन 2025 ची थीम “एक ठोकाही चुकवू नका" (Don't Miss a Beat) ही आहे.

◆ जागतिक हृदय दिन 2024 ची थीम "कृतीसाठी हृदय वापरा" (Use heart for action) अशी होती.

29 September 2025

चालू घडामोडी :- सप्टेंबर 2025

◆ भारताच्या इन्स्टंट पेमेंट सिस्टम नेटवर्क UPI (Unified Payments Interface) मध्ये सामील होणारा कतार देश आठवा देश बनला आहे.


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेड (ASHVINI) च्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची (MBRAPP) पायाभरणी केली.


◆ सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MOSPI) ने चंदीगड येथे झालेल्या 29 व्या CoCSSO बैठकीत वन पर्यावरण लेखा 2025 अहवाल प्रसिद्ध केला.


◆ पर्यावरणीय लेखा 2025 च्या वन अहवालानुसार, रेकॉर्डेड वनक्षेत्र (RFA) च्या वाट्यामध्ये उत्तराखंड राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.


◆ संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 2025 मध्ये दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ-ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचे पहिले सॉवरेन मोबिलिटी क्लाउड लाँच केले.


◆ आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघ (IFEH) च्या नेतृत्वाखाली दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो.


◆ 2025 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन नवी दिल्ली येथे होत आहे.


◆ भारत सरकारने IIT मद्रास या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघ (UN) Centre of Excellence for Artificial Intelligence (AI) म्हणून नियुक्त केले आहे.


◆ संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतो.


◆ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना सुरू केली.


◆ भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी पेंग्विन रँडम हाऊस ने प्रकाशित केलेले "Why the Constitution Matters" हे आपले पहिले पुस्तक लिहिले आहे.


◆ रशिया देश ने 2030 पर्यंत बंद इंधन चक्रासह जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे.


◆ आयुष मंत्रालयाने 10 व्या आयुर्वेद दिनानिमित्त गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) येथे "Prayas" एकात्मिक न्यूरो-पुनर्वास केंद्र चे उद्घाटन केले.

28 September 2025

रागासा चक्रीवादळ



🔹 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ (Typhoon)

🔹 वेग ताशी – 270 ते 295 किलोमीटर पर्यंत होता

🔹 ‘सुपर टायफून’ म्हणून ओळखले जाते

🔹 मुख्य प्रभावित क्षेत्र – फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन

🔹 पॅसिफिक महासागरात तयार झाले

🔹 'Ragasa' हे नाव फिलिपिन्सने दिले आहे

🔹 Ragasa अर्थ – “अचानक वेगवान हालचाल”


🔰 नुकतीच आलेली काही चक्रीवादळे


🔹 शक्ती (मे 2025) – बंगालचा उपसागर, भारताचा पूर्व किनारा (नाव – श्रीलंका)


🔹 अल्फ्रेड (मार्च 2025) – ऑस्ट्रेलियाचा दक्षिण-पूर्व किनारा (नाव – ऑस्ट्रेलिया)


🔹 जुड (मार्च 2025) – मादागास्कर आणि मोझांबिक (नाव – मॉरिशस)


🔹 डिक्लेडी (जानेवारी 2025) – दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर


🔹 चिदो (डिसेंबर 2024) – मोझांबिक (नाव – मॉरिशस)

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025



🔹 पुरस्काराचे स्वरूप

➤ ३० वर्षांखालील तरुणांना उत्कृष्ट पर्यावरणीय नवकल्पनांसाठी दिला जाणारा UNEP चा प्रतिष्ठित पुरस्कार.


🔹 २०२५ चे विजेते

🔹 जिनाली मोदी (भारत) ✅✅

🔹 जोसेफ न्गुथिरा (केनिया)

🔹 नोएमी फ्लोरिया (अमेरिका)


🔹 भारताची जिनाली मोदी – विशेष सन्मान

➤ मुंबईतील उद्योजिका आणि Banofi Leather च्या संस्थापक.

➤ केळी पिकाच्या कचऱ्यापासून (Banana Crop Waste) शाश्वत (Sustainable) व पर्यावरणपूरक लेदर पर्याय तयार केला.


🔹 नाविन्यपूर्ण उपाय (Innovation)

🔹 पारंपरिक लेदरच्या तुलनेत ९५% कमी पाणी वापर.

🔹 ९०% पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन घट.

🔹 विषारी रसायनांचा वापर टाळला, ज्यामुळे फास्ट फॅशन उद्योगाचा पर्यावरणीय परिणाम कमी.


🔹 इतर महत्त्वाचे मुद्दे

🔹 प्रत्येक विजेत्याला $20,000 बीज भांडवल (Seed Funding) दिले जाते.

🔹 Mentorship उपलब्ध होते.

🔹 त्यांच्या कल्पनांना जागतिक स्तरावर व्यासपीठ दिले जाते.

आर. वेंकटरमणी - भारताचे अटॉर्नी जनरल (महान्यायवादी) दुसऱ्यांदा नियुक्त



1.कार्यकाळ

🔹 30 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कार्यकाळ संपला

🔹 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन 2 वर्षांचा कार्यकाळ सुरू


2.संवैधानिक अधिष्ठान

🔹 संविधानाच्या कलम 76(1) अंतर्गत नियुक्ती


3.वैयक्तिक माहिती

🔹 वय – 75 वर्षे

🔹 माजी वरिष्ठ अधिवक्ता


4.पदभार स्वीकार

🔹 1 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यभार स्वीकारला

🔹 के.के. वेणुगोपाल यांच्यानंतर नियुक्ती


5.भूमिका व कार्य

🔹 भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार

🔹 सर्वोच्च न्यायालयात सरकारसाठी युक्तिवाद करणे

🔹 सरकारला कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला देणे


6.स्थिती

🔹 केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत

🔹 संसदेत बोलू शकतात; पण मतदान करू शकत नाहीत


7.पदाचे स्वरूप

🔹 हे पद संवैधानिक आहे

🔹 नियुक्तीचा कार्यकाळ निश्चित नाही; राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर राहतात ✅

किनार्यालगतचे सागरी भागातील बेटे व सामुद्रधुनी


🏝️ प्रमुख बेटे


🔹 गंगा नदीच्या मुखाशी – न्यू मरे, सागर, गंगासागर


🔹 नर्मदा नदीच्या मुखाशी – आलिया बेट


🔹 भारत–श्रीलंका दरम्यान – पंबन बेट


🔹 चिलका सरोवरादरम्यान – निक्शोपित बेट


🔹 चिलका सरोवराच्या मुखाशी – पैरकुद बेट


🔹 सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर – कच्छ, बेला, खाडी बेटे


🔹 पुलिकत सरोवराच्या मुखाशी – श्रीहरीकोटा बेट


🔹 महानदी व ब्राह्मणी नदीच्या मुखाशी – शॉर्ट व व्हिलर बेट


🌊 सामुद्रधुनी व विशेष भौगोलिक रचना


🔹 दक्षिण अंदमान व लिट्ल अंदमान दरम्यान – डंकन पास


🔹 कोको बेटे (म्यानमार) व उत्तर अंदमान दरम्यान – कोको स्ट्रेट


🔹 तमिळनाडू व श्रीलंका दरम्यान – पाल्क स्ट्रेट


🔹 भारत व श्रीलंका दरम्यान – अडम ब्रीज


27 September 2025

भारताच्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला IUCN मान्यता


1️⃣ मूलभूत माहिती

🔹 IUCN – International Union for Conservation of Nature

🔹 पाल्क खाडीतील भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला औपचारिक मान्यता


2️⃣ स्थापना व कायदेशीर आधार

🔹 स्थापना – 2022 (तमिळनाडू सरकार)

🔹 कायदा – वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत


3️⃣ भौगोलिक तपशील

🔹 स्थान – उत्तर पाल्क खाडी, तामिळनाडू

🔹 क्षेत्रफळ – 448.34 चौ. किमी


4️⃣ डुगोंगविषयी माहिती

🔹 डुगोंग याला सामान्यतः ‘समुद्री गाय’ म्हणून ओळखले जाते

🔹 हे सागरी शाकाहारी प्राणी आहेत आणि सागरी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे


📌 टीप: भारतातील पहिले आणि एकमेव डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र

बिहारमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन

1️⃣ मूलभूत माहिती

🔹 ठिकाण – पटना, बिहार

🔹 उद्घाटन – मुख्यमंत्री नितीश कुमार


2️⃣ वैशिष्ट्ये

🔹 एकूण क्षेत्रफळ – 21 एकर

🔹 एकूण खर्च – 889 कोटी रुपये


📌 टीप: विज्ञान प्रसार, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सायन्स सिटी एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर


◾️ गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली

◾️केवल महाराष्ट्रातच देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक झाली


🔹 महाराष्ट्रात गुंतवणूक

💠 2023-24 मध्ये : 🔥 1,25,101 कोटी

💠 2024-25 मध्ये : 🔥 1,64,875 कोटी


🔹 भारतातील गुंतवणूक नुसार क्रम (2024-25)

🔹 महाराष्ट्र – 1,64,875 कोटी

🔹 कर्नाटका – 56,030 कोटी

🔹 गुजरात – 47,947 कोटी

🔹 दिल्ली – 51,540 कोटी

🔹 तमिळनाडू – 31,103 कोटी

भारतामधील 2 नवीन रामसर स्थळे


1️⃣ बिहारमधील नवीन स्थळांचा समावेश

🔹 गोकुळ जलाशय – बक्सर जिल्हा (448 हेक्टर)

🔹 उदयपूर सरोवर – पश्चिम चंपारण जिल्हा (319 हेक्टर)


2️⃣ एकूण माहिती

🔹 एकूण 93 रामसर स्थळे

🔹 एकूण क्षेत्रफळ – 13,60,719 हेक्टर


3️⃣ महत्त्वाचे तथ्ये

🔹 भारताचा जागतिक स्तरावर क्रमांक – तिसरा

🔹 तमिळनाडूमध्ये सर्वाधिक – 20 रामसर स्थळे

🔹 जागतिक पाणथळ दिन – 2 फेब्रुवारी

🔹 रामसर कराराची तारीख – 2 फेब्रुवारी 1971

🔹 रामसर मुख्यालय – ग्लैंड, स्वित्झर्लंड

🔹 भारतातील पहिले रामसर स्थळे – चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राजस्थान)

🔹 क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे – सुंदरबन पाणथळ (प. बंगाल) – 4230 किमी²

🔹 क्षेत्रफळानुसार सर्वात लहान – रेणुका तलाव (हिमाचल प्रदेश) – 0.2 किमी²

26 September 2025

चालू घडामोडी :- 25 सप्टेंबर 2025

◆ कर्नाटक राज्य सरकारने नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्था प्रवेगक कार्यक्रम (LEAP) सुरू केला आहे.

◆ 23 सप्टेंबर 2025 रोजी सात वर्षे पूर्ण करणारी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना "आयुष्मान भारत पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजना" आहे.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची येथे सुरू करण्यात आली होती.

◆ राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) ने "सोलर पीव्ही पोटेंशियल असेसमेंट ऑफ इंडिया (ग्राउंड-माउंटेड)" हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

◆ अंत्योदय दिवस दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) च्या अंमलबजावणीत उत्तर प्रदेश राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे.

◆ अग्निकुल कॉसमॉसने चेन्नईतील IIT मद्रास रिसर्च पार्कमध्ये भारतातील पहिली खाजगी लार्ज-फॉर्मेट ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुविधा सुरू केली आहे.

◆ पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील गोवर्धन इको व्हिलेज येथे "देसी फूड मॅटर्स" उपक्रमाचा शुभारंभ केला.

◆ राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेदिक घटक आणि उत्पादनांचा डिजिटल डेटा मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव "DRAVYA पोर्टल" आहे.

◆ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना (बिहार) येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले.

◆ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन दरवर्षी 24 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

◆ आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे.

◆ भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी मोरोक्कोमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) च्या संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.

25 September 2025

चालू घडामोडी :- 24 सप्टेंबर 2025



◆ सिंगापूरमध्ये झालेल्या 25 व्या आशियाई प्रादेशिक परिषदेत भारताची इंटरपोल आशियाई समितीचा सदस्य म्हणून निवड झाली आहे.

◆ इंटरपोल आशियाई प्रादेशिक परिषदेत "केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI)" भारतीय संस्थेने भारताचे प्रतिनिधित्व केले.

◆ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) सप्टेंबर 2025 साठी सुरू केलेल्या इंटर्नशिप कार्यक्रमाचे नाव "ऑनलाइन शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम (OSTI)" आहे.

◆ महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायत, सरपंच डॉ. आनंदराव पावरा यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्काराची विजेती ठरली आहे.

◆ भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) नवी दिल्ली येथे ब्राझील-भारत कृषी तंत्रज्ञान क्रॉस-इन्क्युबेशन प्रोग्राम (MAITRI 2.0) ची दुसरी आवृत्ती सुरू केली.

◆ भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांनी "राज्य वित्त 2022-23: एक दशकीय विश्लेषण" हा अहवाल प्रसिद्ध केला.

◆ कॅगच्या राज्य वित्त अहवाल 2022-23 नुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक महसूल अधिशेष नोंदवला.

◆ दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2025 ची थीम ''सांकेतिक भाषांच्या अधिकारांशिवाय मानवी हक्क नाहीत'' (Human rights are not without sign language rights) ही आहे.

◆ आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन 2024 ची थीम "साइन अप करा सांकेतिक भाषेच्या अधिकारांसाठी" (Sign up for sign language rights) ही होती.

◆ झारखंडच्या बेतला राष्ट्रीय उद्यानात भारतातील पहिले AI-सक्षम निसर्ग अनुभव केंद्र सुरू होणार आहे.

◆ सप्टेंबर 2025 मध्ये, युरोपचा पहिला एक्सास्केल सुपरकॉम्प्युटर, "ज्युपिटर" जर्मनीमध्ये लाँच करण्यात आला.

◆ संयुक्त ऑपरेशनल रिव्ह्यू अँड इव्हॅल्युएशन (CORE) कार्यक्रम नवी दिल्ली येथील युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया येथे मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी (HQ IDS) द्वारे आयोजित केला जात आहे.

24 September 2025

काही महत्त्वाच्या परिषदा व आयोजक ठिकाण


🔹️ जागतिक हायड्रोजन शिखर परिषद २०२५ - रॉटरडॅम, नेदरलँड्स


🔹️ ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - सातारा


🔹️ ५१ वी वार्षिक G7 शिखर परिषद - कॅनडा


🔹️ COP 33 (२०२८) - भारत


🔹️ २०२६ मधील ब्रिक्स शिखर परिषद - भारत


🔹️ वॉन हवामान बदल परिषद २०२५ - जर्मनी


🔹️ ७ वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद - पुणे


🔹️ पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद - चेन्नई


🔹️ Quad २०२५ ची बैठक - भारत


🔹️ ग्रीन हायड्रोजन समिट २०२५ - आंध्रप्रदेश


🔹️ एआय इम्पॅक्ट समिट २०२६ - भारत


🔹️ २५ वी शांघाय शिखर परिषद २०२५ - चीन

राज्यघटनेतील भाग (Parts)

◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र

◆ भाग दूसरा – नागरिकत्व

◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क

◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे

◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये

◆ भाग पाचवा – संघ

◆ भाग सहावा – राज्य

◆ भाग सातवा – रद्द

◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश

◆ भाग नववा – पंचायत

◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका

◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था

◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र

◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध

◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स

◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.

◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा

◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे

◆ भाग पंधरावा – निवडणुका

◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी

◆ भाग सतरावा – भाषा

◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी

◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण

◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी

◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी

◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५



१. G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा 


२. G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका 


३. BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०) 


४. QUAD शिखर परिषद २०२५: भारत 


५. ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस 


६. SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान 


७. NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए


८. सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड 


९. COP ३० (२०२५): ब्राझील 


१०.COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान 


११. INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई

22 September 2025

Super Questions


1.   धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? 

✅  - अमरावती


2.   कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?

✅.  - कोरकू 


3.   अमरावती जिल्ह्यातून जाणार्‍या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?

✅.   - गाविलगड रांग 


4.  पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?

✅.   - अजिंठा, बुलढाणा 


5.   पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

✅.   - पैनगंगा 


6.  तापी नदीच्या खोर्‍यात येणारा जिल्हा कोणता? 

✅  - बुलढाणा 


 7.  अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? 

✅  - विषम 


8.   बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 

✅  - अकोला 


9.  कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - अकोला 


10.    जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?

✅.  - अकोला 


11.   विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? 

✅   - अकोला 


12.    शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - अकोला 


13.   काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.  - अकोला 


14.   पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 

✅.  - अकोला


15.   नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?

✅.   - बुलढाणा   


16.   कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?

✅.   - अमरावती 


17   यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?

✅.   - गोंड 


18.  लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - बुलढाणा 


19.    किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - नांदेड व यवतमाळ 


20.   यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?

✅.   - गोंडवन 


21.    लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ? 

✅.  - अमरावती 


22.   महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?

✅.  - अकोला, अमरावती 


23.  अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?

✅.  - विदर्भ 


24.    चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे? 

✅.  - सातपुडा 


25.  टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे? 

✅.  - नांदेड व यवतमाळ 


26.  लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - बुलढाणा 


27.    जलगंगा धरण कोठे आहे? 

✅.  - बुलढाणा


28.  गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?

✅.   - विदर्भ 


29.  हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? 

✅.  - यवतमाळ 


30.  श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे?

 - कारंजा 


महाराष्ट्रातील अभयारण्ये



नरनाळा – अकोला

टिपेश्वर -यवतमाळ

येडशी रामलिंग – उस्मानाबाद

अनेर – धुळे, नंदुरबार

अंधेरी – चंद्रपूर


औट्रमघाट – जळगांव

कर्नाळा – रायगड

कळसूबाई – अहमदनगर

काटेपूर्णा – अकोला

किनवट – नांदेड,यवतमाळ


कोयना – सातारा

कोळकाज – अमरावती

गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव

चांदोली – सांगली, कोल्हापूर

चपराला – गडचिरोली


जायकवाडी – औरंगाबाद

ढाकणा कोळकाज – अमरावती

ताडोबा – चंद्रपूर

तानसा – ठाणे

देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर


नवेगांव – भंडारा

नागझिरा – भंडारा

नांदूर मध्यमेश्वर -नाशिक

नानज – सोलापूर

पेंच – नागपूर


पैनगंगा – यवतमाळ, नांदेड

फणसाड – रायगड

बोर – वर्धा

बोरीवली(संजय गांधी) – मुंबई

भिमाशंकर – पुणे, ठाणे

पोलीस भरती प्रश्नसंच

 दक्षिण भारतातील गंगा कुठल्या नदीला म्हंटले जाते

१) गोदावरी ✅✅✅

२) कृष्णा

३) भीमा

४) नर्मदा 



 १)गोदावरीची एकूण लांबी १,४६५ km आहे.

२) महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी ८०० km आहे.

३) गोदावरी नदी महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते

 अचूक नसलेली विधाने निवडा.


१) १,२ 

२) २,३ ✅✅✅

३) १,२,३

४) फक्त २

गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे

गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते




 कळसूबाई शिखरावर कुठली नदी उगम पावते

१) प्राणहिता

२) इंद्रावती

३) मांजरा

४) दारणा ✅✅✅


दारणा नदी गोदावरी ची उजवी उपनदी आहे

 १)सातमाळा  डोंगरा वर शिवणा नदी उगम पावते

२) बालाघाट डोंगर रांगेत प्रवरा नदी उगम पावते

३) गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे


बिनचूक विधाने निवडा

१) १,२

२) २,३

३) १,२,३

४) १,३ ✅✅✅✅

बालाघाट डोंगर रांगात सिंधफणा नदी उगम पावते

प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदरा जवळ उगम पावते



नेवासे शहर कुठल्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे.

१) मुळा मुठा

२) प्रवरा शिवणा

३) मुळा दारणा

४) प्रवरा मुळा ✅



 खालीलपैकी कुठली नदी गोदावरी नदीला डाव्या तिरावरून येऊन भेटते

१) शिवना✅✅✅

२) प्रवरा

३) दारणा

४) बोर


शिवना नदी ही गोदावरी ला डाव्या तिरा कडून येऊन भेटते तर प्रवरा दारणा आणि बोर या नद्या उजवा तीरावरून गोदावरीला येऊन भेटतात


 प्राणहिता नदी खालीलपैकी कुठल्या नद्या मिळून तयार झाली आहे.

१) वर्धा आणि वैनगंगा

२) वर्धा आणि पैनगंगा

३) वैनगंगा आणि पैनगंगा

४) वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा✅✅✅✅




खालीलपैकी कुठल्या नद्या भीमानदीच्या डाव्या उपनद्या आहेत

१)  सीना

२) माण

३) घोड

४) वेळ


१) १,२,३

२) २,३,४

३) १,३,४ ✅✅✅✅

४) वरीलपैकी सर्व 


माण ही नदी भीमा नदीची उपनदी


 १) कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो.

२) कृष्णा नदीच्या नदी प्रवाहाची दिशा उत्तर - दक्षिण आहे

३) कऱ्हाड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो

चूक नसलेली विधाने निवडा

१) १,२

२) २,३

३) १,२,३ ✅✅✅

३) १, 3



 डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीस कुठली नदी मिळते

१) दूधगंगा

२) तुळशी

३) पंचगंगा 

४) येरळा ✅✅✅


कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त येरळा नदी येऊन मिळते



तापी नदी कुठल्या राज्यातून वाहते

१) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ✅✅✅✅

२) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड

३) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश

४) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक



खोल घळई मधून कुठली नदी वाहते

१) तापी ✅✅✅

२) गोदावरी

३) कृष्णा

४) भीमा


तापी नदीचे क्षेत्र खचदरी च्या भागात येते म्हणून ही नदी खोल घळई मधून वा



१) कोकणातील नद्या लांबिने खूप लहान असून मंद गतीने वाहतात

२)  कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे.

३) कोकणातील नद्या पञ्चीमवाहिनी नद्या आहेत

४) कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात.


बिनचूक नसलेली विधाने निवडा.

१) १,२

२) २,३

३)  १,३

४) १,४ ✅✅✅


कोकणातील नद्या लांबीने लहान असतात परंतु त्या वेगाने वाहतात

कोकणातील नद्या खाड्या तयार करतात



महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे

१) 65%

२) 81%

३) 70 %

४) 75% ✅✅✅



 महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्यांचे क्रम लावा

१) गोदावरी, तापी, भीमा, वैनगंगा

२) गोदावरी , भीमा , वैनगंगा ,तापी

३) गोदावरी, भीमा, तापी, वैनगंगा

४) गोदावरी, वैनगंगा, भीमा , तापी ✅✅✅


गोदावरी 668 km

वैनगंगा 495 km

भीमा 451 km

तापी 208 कम



नद्यांच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार नद्यांचा चढता क्रम ओळखा

१) भीमा, वर्धा, कृष्णा, गोदावरी

२) कृष्णा, वर्धा, भीमा, गोदावरी ✅✅✅✅

३) वर्धा, कृष्णा ,भीमा , गोदावरी

४) वर्धा, भीमा, कृष्णा, गोदावरी





खालीलपैकी अचूक विधान ओळखा? 

A)  सातमाळा अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे.

B) गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगामुळे अलग झालेले आहे.

 *पर्यायी* *उत्तरे* 

1) अ आणि ब दोन्ही सत्य

2) अ आणि ब दोन्ही असत्य

3) हे सत्य असून बी असत्य आहे✅✅

4) हे असत्य असून बी सत्य आहे.

 *स्पष्टीकरण* गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या रंगामुळे अलग झालेले आहे.





महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत?

1) गोदावरी,  मांजरा, तापी✅

2) गंगा गोदावरी कृष्णा

3) महानदी कावेरी तापी




खालीलपैकी अचूक विधाने ओळखा? 

1)  गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किमी आहे. 

2) भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी आहे. 

3) कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किमी आहे. 

4) तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे.

महाराष्ट्राचा भूगोल


✳️पराकृतिक विभाग

१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश

२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा

३. महाराष्ट्राचे पठार

४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली

🅾️पश्चिम वाहिनी नद्या

१. तापी-पूर्णा नदी प्रणाली

२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या

१. प्राणहिता नदी प्रणाली

२. गोदावरी नदी प्रणाली

३. कृष्णा नदी प्रणाली

४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान

महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक

१. भौगोलिक स्थान

२. अक्षवृत्तीय विस्तार

३. मोसमी वारे

४. सागरी सान्निध्य

५. प्राकृतिक रचना


✳️मदा

१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)

२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)

३. खोल काळी मृदा

४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा

५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा

६. पिवळसर तपकिरी मृदा

७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा

८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -



🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.


🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.


🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.


🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा.

 

🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.


🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.


🔶 सिंधफणा - बिंदुसरा.


🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

गोदावरी नदी


१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

_____________________________

मानवी भूगोलासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ व लेखक



① बर्नहार्डस वारेनियस (जर्मन)

➤ ग्रंथ: जिओग्राफिया जनरलीस


② चार्ल्स डार्विन (इंग्रजी)

➤ ग्रंथ: ओरिजिन ऑफ स्पेसीस (1859)

➤ सिद्धांत: थिअरी ऑफ इव्होल्यूशन


③ हेन्री थॉमस बकल (इंग्रजी इतिहासकार)

➤ ग्रंथ: हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड


④ कार्ल रिटर

➤ ग्रंथ: युरोपा (1863)


⑤ 'अर्डकुंड' (Erdkunde)

➤ लेखक: कार्ल रिटर

➤ अर्थ: भूगोल

➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ

➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला


⑥ कॉसमॉस (Kosmos)

➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट

➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक

➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह

➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'


⑦ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)

➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल

➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ


⑧ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)

➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)

➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ


19 September 2025

माहिती अधिकार कायदा (RTI- 2005)

प्रकरण 1: प्रारंभिक (Preliminary)

👉कलम 1: कायद्याचे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ.
👉कलम 2: कायद्यातील महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या (उदा. माहिती, सार्वजनिक प्राधिकरण, माहितीचा अधिकार).

प्रकरण 2: माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्ये (Right to Information and Obligations of Public Authorities)

👉कलम 3: नागरिकांना माहितीचा अधिकार.
👉कलम 4: सार्वजनिक प्राधिकरणांवर स्वयं-प्रकट करण्याची कर्तव्ये.
👉कलम 5: जन माहिती अधिकारी (PIO) आणि सहायक जन माहिती अधिकारी यांची नियुक्ती.
👉कलम 6: माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करण्याची पद्धत.
👉कलम 7: विनंती अर्जाचा निकाल लावण्याची प्रक्रिया आणि वेळेची मर्यादा.
👉कलम 8: माहिती सार्वजनिक न करण्याचे अपवाद (उदा. राष्ट्रीय सुरक्षा, परदेशी संबंध).
👉कलम 9: काही प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे.
👉कलम 10: माहितीचे काही भाग वेगळे करून देणे (Severability).
👉कलम 11: त्रयस्थ पक्षाची माहिती (Third Party Information).

प्रकरण 3: केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission)

👉कलम 12: केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना.
👉कलम 13: मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी.
👉कलम 14: मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे.

प्रकरण 4: राज्य माहिती आयोग (State Information Commission)

👉कलम 15: राज्य माहिती आयोगाची स्थापना.
👉कलम 16: राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी.
👉कलम 17: राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे.

प्रकरण 5: माहिती आयोगाचे अधिकार, कार्ये, अपील आणि दंड (Powers and Functions of the Information Commissions, Appeal and Penalties)

👉कलम 18: माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्ये.
👉कलम 19: अपील करण्याची प्रक्रिया.
👉कलम 20: दंड (Penalties).

प्रकरण 6: संकीर्ण (Miscellaneous)

👉कलम 21: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण.
👉कलम 22: हा कायदा इतर कायद्यांपेक्षा श्रेष्ठ (Overriding Effect).
👉कलम 23: न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी (Bar of Jurisdiction).
👉कलम 24: विशिष्ट गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांना हा कायदा लागू नाही.
👉कलम 25: देखरेख आणि अहवाल देणे (Monitoring and Reporting).
👉कलम 26: शासनाने जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम तयार करणे.
👉कलम 27: योग्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार.
👉कलम 28: सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार.
👉कलम 29: नियम विधिमंडळापुढे ठेवणे.
👉कलम 30: अडचणी दूर करण्याचा अधिकार (Power to remove difficulties).
👉कलम 31: निरसन (Repeal).

18 September 2025

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?

- गुरुमुखी.


०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?

- पृथ्वी आणि शुक्र.


०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?

- पारा.


०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?

- तानाजी मालुसरे.


०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?

- पाण्यात.


०१) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

- कर्नाळा.

 

०२) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?

- कोयना.


०३) पत्रकार दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

- ६ जानेवारी. 

 

०४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

- शुक्र.


०५) मंगळ या ग्रहाला ..... असेही संबोधतात?

- लाल ग्रह.


०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?

- फातिमा बिबी.

     

०२)भारतातील  पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ?

- प्रांजल पाटील.


०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ?

- कोलकाता.


०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ?

- २४.


०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ?

- पाच टक्के.


०१) 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?

- २००९.


०२) कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- स्वामी विवेकानंद.


०३) 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?

 - फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)


०४) ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Intensive Care Unit.


०५) 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बॉक्सिंग. 


०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलम आरा.


 ०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ?

- अभिनव बिंद्रा.(नेमबाजी)


०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ?

- १९५४.


 ०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Know Your Customer.


०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सिंधुदुर्ग.


०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?

- मेलॅनिन.


०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.


०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?

- जलसंजीवनी.


०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

- महर्षी धोंडो केशव कर्वे.


💐 विटामिन बी चे अविष्कारक कोण आहेत ?

🎈मॅकुलन.


💐 शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

🎈मिलींद बोकील.


💐 सोमनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?

🎈गुजरात.


💐 मंडो नृत्‍य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

🎈गोवा.


💐 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈मुंबई.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

 - आशिया.


०२) राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे ?

- ११२.


०३) 'नौटंकी' हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?

- उत्तर प्रदेश.


०४) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

- तामिळनाडू.


०५) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?

- नैऋत्य मोसमी वारे.


०१) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात ?

- मिर्झापूर.


०२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?

- प्रतल.


०३) शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते ?

- मांडीत. 


०४) कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो ?

- क्लोरो-फ्लोरो कार्बन.(CFC)


०५) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- यमुना. 


०१) भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?

- हडप्पा. 


०२) 'भरतनाट्यम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- तामिळनाडू.


०३) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?

- ऑस्ट्रेलिया. 


०४) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- शरयू. 


०५) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात ?

- सरन्यायाधीश.


०१) वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?

- २१ टक्के.


०२) मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती ?

- १४.


०३)  कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो ?

- मलेरिया.


०४) मानवी शरीरात किती मणके असतात ?

- ३३.


०५) वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?

- पॅरिस.


०१) भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला ?

 - C-DAC.


०२) भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली ?

- १९५६.


०३) १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या ?

- पोखरण.


०४) न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन देतो ?

- संवेग.


०५) मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

- हवामानशास्त्र.


०१) तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात ?

- भुईमूग.


०२) 'रुपया'  हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?

- शेरशहा सुरी.


०३) 'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले ?

- महात्मा फुले.


०४) आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

- संसदेला.


०५) तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?

- गहू.


०१) बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत ?

- अहिराणी. 


०२) आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ?

- इंडिया गेट.


०३) भारताचे  राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते ?

- सत्यमेव जयते. 


०४)  चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो ?

- नायट्रोजन. 


०५) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- नाईल.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10:पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

20 महत्त्वाचे CSAT सराव प्रश्न उत्तरे

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

 शुक्रवार

 मंगळवार

 गुरुवार

 बुधवार

उत्तर : बुधवार



 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

 मावस बहीण

 पुतणी

 भाची

 आत्या

उत्तर :भाची



 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

 K

 J

 N

 S

उत्तर :K



 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

 गुरुवार

 बुधवार

 सोमवार

 रविवार

उत्तर :गुरुवार



 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

 9 वेळा

 10 वेळा

 11 वेळा

 8 वेळा

उत्तर :10 वेळा



 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

 पाच

 सात

 आठ

 वरील सर्व

उत्तर :पाच



 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

 लाकूड

 हात

 बैठक

 पॉलिश

उत्तर :बैठक



 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

 आंबा

 गुळ

 बटाटा

 गवत

उत्तर :आंबा



 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

 E

 W

 S

 R

उत्तर :S



 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

 312

 121

 393

 101

उत्तर :393



 11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

 51

 52

 50

 48

उत्तर :51



 12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

 10

 15

 25

 30

उत्तर :15



 13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

 PICEP

 CEPRJ

 PIRCE

 PRICE

उत्तर :PRICE



 14. विसंगत शब्द शोधा.

 जव (सातू)

 कापूस

 तांदूळ

 गहू

उत्तर :कापूस



 15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

 2 तास

 अडीच तास

 1 तास

 दिड तास

उत्तर :दिड तास



 16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

 31520201514

 31515202014

 32520152014

 31420151520

उत्तर :31520201514



 17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

 तीन वेळा

 दोन वेळा

 चार वेळा

 पाच वेळा

उत्तर : दोन वेळा



 18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

 1

 25

 5

 15

उत्तर :5


 19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

 12

 15

 18

 20

उत्तर :12



 20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

 9 वाजून 25 मिनिटे

 10 वाजून 35 मिनिटे

 11 वाजून 20 मिनिटे

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :



1. ग्रहाचे नाव - बूध


सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

 परिवलन काळ - 59

 परिभ्रमन काळ - 88 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव - शुक्र


सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

 परिवलन काळ - 243 दिवस

 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

 परिवलन काळ - 23.56 तास

 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव - मंगळ


सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

 परिवलन काळ - 24.37 तास

 परिभ्रमन काळ - 687

 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव - गुरु


सूर्यापासुन चे अंतर - 77.86

 परिवलन काळ - 9.50 तास

 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


6. ग्रहाचे नाव - शनि


सूर्यापासुन चे अंतर - 142.6

 परिवलन काळ - 10.14 तास

 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव - युरेनस  


सूर्यापासुन चे अंतर - 268.8

 परिवलन काळ - 16.10 तास

 परिभ्रमन काळ - 84 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


सूर्यापासुन चे अंतर - 449.8

 परिवलन काळ - 16 तास

 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

चला जाणून घेऊ - भूगोल : पर्वतांचे प्रकार

💠 सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय. जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार

▪ वलित पर्वत : वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात 

▪ विभंग-गट पर्वत : विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.

▪ घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.

▪ ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

▪ अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.

भूगोल महत्त्वाची माहीती

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

ग्रहाचे वर्गीकरण


√ लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे दोन वर्ग केले आहे.


१) अंतर्ग्रह

२) बहिर्ग्रह


√ १) अंतर्ग्रह : 


◆ सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा, याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. 


◆ बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.


◆ बुध व शुक्र या दोन्ही ग्रहांचे कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत येत असल्याने त्यांना कक्षान्तर्गत ग्रह असेही म्हणतात.


√ २) बहिर्ग्रह : 


◆लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. यांत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. सर्व ग्रहांना खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे व त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.


 ●●ग्रहांची वैशिष्ट्ये●●


१) बुध : 


√ सूर्याला सर्वात जवळचा ग्रह.

√ आकारमानाने सर्वात लहान ग्रह. 

√ सर्वात हलका व सर्वात उष्ण ग्रह.

√ सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह.

√ सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास ८८ दिवस लागतात. 

√बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही.


२) शुक्र (Venus) : 


√ सर्वात तेजस्वी ग्रह.

√ कृष्ण पक्षात रात्री त्यापासून प्रकाश मिळतो.

√ पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.

√ शुक्र हा जवळ-जवळ सर्व बाबतीत पृथ्वीसारखाच आहे म्हणून याला पृथ्वीची बहिण म्हणतात.

√ सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतांना स्वत:भोवती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. 

√ अपवाद शुक्र आणि यूरेनस मात्र स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात.

√ चंद्राप्रमाणे शुक्राच्यादेखील कला दिसतात.

√ शुक्रावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेला असल्याने त्याला “ढगांच्या आड लपलेला शुक्र' असेही म्हणतात.

√ शुक्र ग्रहावर दिवस आणि रात्रीचे तापमान सारखेच असते.

√ शुक्राला उपग्रह नाही.

√ पहाटे हा ग्रह पूर्व क्षितिजावर व संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर दिसला.


३) पृथ्वी : 


√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह. 

√ सर्वाधिक घनतेचा ग्रह(५.५) gm/cm' 

√ चंद्र हा एकमेव उपग्रह.

√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह. 

√ पृथ्वीची विभागणी सुमारे ७१% पाणी व २९% भूभाग अशी करण्यात येते. 

√ पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध म्हणून तर दक्षिण गोलार्ध हा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो.


◆ पृथ्वीची माहिती


√ पृथ्वीचा आकार - जिऑईड (पृथ्वी धूवाकडील बाजूला चपटी व विषुववृत्तालगत फुगीर)

√ पृथ्वीची उत्पत्ती - सुमारे ४५० कोटी वर्षापूर्वी

√ पृथ्वीचे क्षेत्रफळ - ५ अब्ज चौ.कि.मी.

√ पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ - ३९,८४३ कि.मी.

√ ध्रुवीय परिघ - ३९,७४६ कि.मी.

√ विषुववृत्तीय व्यास - १२,७५४ कि.मी.

√ ध्रुवीय व्यास - १२,७१० कि.मी.

√ पृथ्वीची घनता - ५.५ gm/em' |

√ सूर्यापासून अंतर - अंदाजे १५ कोटी कि.मी.

√ पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम एऍटोस्थेनिस या इजिप्तच्या संशोधकाने शोधला.

√ पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक वेग (escape velocity) ११.२ किमी/सेकंद.

√ पृथ्वीचा परिवलन काल - २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद. 

√ परिभ्रमण (सूर्यभोवती फिरणे) - ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट ५४ सेकंद


४) मंगळ (Mars) : 


√ लाल ग्रह असेही म्हणतात. 

√ कारण Feo चे प्रमाण जास्त.

√ शुक्राप्रमाणे मंगळ हादेखिल पृथ्वीला जवळचा ग्रह

√ मानव वस्ती शक्य असलेला ग्रह

√ त्यामुळे जगातील प्रमुख देश आज मंगळावर संशोधन करण्यात गुंतलेले आहे. (pathfinder, curosity यान)

√ उपग्रहांची संख्या : दोन (Phobos, Deimos)

√ Nix oympia हे सर्वात उंच शिखर (ऐवरेस्ट पेक्षा ३ पट उंच)


५) गुरू (Jupiter) : 


√ सर्वात मोठा व जड ग्रह. 

√ गुरूच्या पृष्ठभागावर पांढरट पट्टे आढळतात. 

√ गुरू हा पृथ्वीच्या तुलनेत १३०० पटीने मोठा आहे.

√ अलीकडे गुरूच्या भोवती शनीप्रमाणे कडी आढळून आली आहे.

√ उपग्रहांची संख्या - ६३ (Lo, Europe, casillo, Ganymeda)

√ गुरूला स्वत:भोवती एक फेरी घालण्यास (परिवलन) १ तास ५० मिनिटे लागतात. 

√ तर सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास १२ वर्षे लागतात. 

√ सर्व ग्रहांपैकी सर्वात छोटा दिवस गुरू चा आहे.


६) शनि (Saturn) :-


√ दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह. 

√ निळा रंग ही शनिची महत्वाची खूण आहे.

√ सर्वात कमी घनतेचा ग्रह (०.६८) gm/cm'.

√ या ग्रहाभोवती तीन कडी आहेत. कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात.

√शनि - ३१ उपग्रह (Titan, Rhea, Tethys). 

√ Titan हा सूर्यमालेतील एकमेव उपग्रह आहे ज्याला स्वत:चे वातावरण आहे.


७) युरेनस : (प्रजापती)


√ रंग हिरवट निळा आहे.

√ युरेनस स्वत:भवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

√ त्यामुळे युरेनस वर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो.

√ उपग्रह : २७ (Ariel, Miranda, Titanica, oberon)

√ यूरेनस या ग्रहाला प्रजापती हे भारतीय नाव जनार्दन बाळाजी मोडक यांनी दिले.


८) नेपच्यून (वरूण):


√ सूर्याला आणि पृथ्वीला सर्वात लांबचा ग्रह.

√ निळ्या रंगाचा ग्रह. 

√ या ग्रहाच्या भवती मिथेन वायु जास्त असावे.

√ उपग्रह - १४ (Titron, merid)

√ या ग्रहाभोवती पाच कडी आहेत. 

√ हा सर्वात शित ग्रह आहे.


◆ बटूग्रह


√ नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकार 

√ उदा.: प्लुटो, पॅसिडॉन.

√ महत्त्वाचे : ऑगस्ट २००६ मध्ये प्लूटो (कुबेर) हा ग्रह' म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली. 

√ कारण : प्लुटो वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करित व प्लुटो नेपच्यूनची कक्षा ओलांडत असे.

√ अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ क्लॉईड टॉम्बथ याने १९३० मध्ये प्लूटो या ग्रहाचा शोध लावला होता.

भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा

📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

नुकतेच सुरू झालेले चॅटबॉट/ॲप्स आणि त्यांची उद्दिष्टे


🔹 ‘सचेत’ अ‍ॅप
➤ लोकांना नैसर्गिक आपत्तींपासून सावध ठेवण्यासाठी

🔹 AI चॅटबॉट ‘सारथी’ (हरियाणा)
➤ शासकीय धोरणे सहजतेने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी

🔹 e-SEHAT अ‍ॅप (जम्मु-कश्मीर)
➤ राज्यातील लोकांसाठी आरोग्य सेवा सुलभ व अधिक प्रभावी करण्यासाठी

🔹 RISE अ‍ॅप (उत्तरप्रदेश)
➤ मुलांच्या नियमित लसीकरणाला सुधारण्यासाठी

🔹 SwaRail अ‍ॅप (भारतीय रेल्वे)
➤ तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी

🔹 RBIDATA पोर्टल (भारतीय रिझर्व बँक)
➤ आर्थिक आणि वित्तीय डेटा पर्यंत पोहोच उपलब्ध करून देण्यासाठी

🔹 ‘मित्र’ पोर्टल (SEBI)
➤ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीचे ट्रॅकिंग करण्यासाठी

🔹 सन्मान संजीवनी अ‍ॅप (हरियाणा)
➤ महिला व किशोरी सन्मान योजनेतील सुविधा ट्रॅक करण्यासाठी

🔹 भारतपोल पोर्टल (CBI)
➤ फरारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी

17 September 2025

वारे

 उष्ण व कोरडे वारे ⚡️

१) फॉन - आल्प्स पर्वताच्या उतारावरून

२) चिनुक - उत्तर अमेरिका व कॅनडात असणाऱ्या रॉकी पर्वतावरून पूर्वेकडे

३) सिमुन - सहारा व अरब भागातील वाळवंटी प्रदेशातून

४) सिरोक्को - उत्तर आफ्रिका, सिसली व दक्षिण इटली

५) शामल - इराण, इराक, अरब प्रदेशातील वाळवंटी भागातून

६) झोंडा - अर्जेंटिना (अँडिज पर्वतातून)

७) खामसिन - उत्तर आफ्रिकेतून

८) हबुब - उत्तर सुदान

९) हरमॅटन - पश्चिम आफ्रिकेच्या गिनीच्या आखताकडे

१०) नोर्वेस्टर - पश्चिम बंगाल

११) लू - पाकिस्तान व उत्तर भारतातील मैदानी प्रदेश

१२)बाग्यो - फिलिपाईन्स 



थंड वारे ⚡️

१) पंपेरो - अर्जेंटिना, उरुग्वेमधील पंपास

२) बोरा - दक्षिण युरोपातील ऑडियाट्रीक समुद्रावरून

३) मिस्ट्रल - फ्रान्स

४) सर्दली बूस्टर - ऑस्ट्रेलिया

५) पापागयो - मेक्सिको

६) ब्लिझार्ड - सायबेरिया, कॅनडा

७) बर्ग विंड - दक्षिण आफ्रिक

बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५

१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा 


२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू 


३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट


४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू 


५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला 


६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव 


७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन) 


८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री* 


९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती* 


🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस 


१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष 


१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर


दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)

🔹 नियंत्रण – ग्रामविकास मंत्रालय

🔹 सुरुवात – २५ सप्टेंबर २०१४

🔹 उद्दिष्ट – ग्रामीण गरीब तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणून समावेशक विकास साधणे


🔹 लक्ष्यगट – १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण गरीब तरुण

▪️ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

▪️ प्रशिक्षित झालेल्या किमान ७५% तरुणांना रोजगाराची हमी


🔹 आरक्षण प्रमाण –

▪️ महिला – ३३%

▪️ अनुसूचित जाती व जमाती – ५०%

▪️ अल्पसंख्यांक – १५%


💠 प्रादेशिक योजना (DDU-GKY अंतर्गत)

🔹 हिमायत – जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण तसेच शहरी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण

🔹 उम्मीद – जम्मू-काश्मीरमधील स्त्रियांचे सबलीकरण व स्वयंसहायता गटांची निर्मिती

🔹 परवाज – दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण अल्पसंख्यांक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व शिक्षण

🔹 रोशनी – अति डाव्या विचारसरणीने बाधित जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणे

16 September 2025

HDI म्हणजे Human Development Index.



हे एक सांख्यिकीय मापन (statistical measure) आहे जे देशातील मानवी विकासाची स्थिती दर्शवते. UNDP (United Nations Development Programme) दरवर्षी हा इंडेक्स प्रकाशित करतो.


🧱 HDI चे मुख्य तीन घटक (Three Main Dimensions):

 1. ✅ आयुष्याचा कालावधी (Life Expectancy at Birth)

→ आरोग्य स्थिती मोजण्यासाठी वापरले जाते.

 2. ✅ शिक्षण (Education)

 • सरासरी शैक्षणिक कालावधी (Mean Years of Schooling)

 • अपेक्षित शैक्षणिक कालावधी (Expected Years of Schooling)

 3. ✅ आर्थिक क्षमता (Standard of Living)

→ प्रति व्यक्ती निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (Gross National Income per capita, GNI per capita).



🎯 HDI चे महत्त्व:

 • एका देशात लोकांचे आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्तर कसा आहे हे समजून घेण्यासाठी उपयोगी.

 • देशांना तुलनात्मक आढावा घेण्यासाठी.

 • सामाजिक-आर्थिक धोरणे बनवण्यासाठी मदत करते.



📊 HDI Value Interpretation:


HDI Value Range Meaning

0.800 – 1.000 Very High Human Development

0.700 – 0.799 High Human Development

0.550 – 0.699 Medium Human Development

Below 0.550 Low Human Development




🌍 उदाहरण – 2021 च्या अहवालानुसार:

🇳🇴 Norway (HDI ~ 0.961) → Very High Development

🇮🇳 India (HDI ~ 0.645) → Medium Development


प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025

 

1.उद्देश 🎯

➤ पैशांवर आधारित ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी घालणे.


2.संसदेत मंजुरी 📜

➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025

➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025

➤ मांडणारे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव


3.प्रमुख तरतुदी ⚖️

➤ ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी: असे खेळ चालवणे बेकायदेशीर.

➤ चालवणाऱ्यांसाठी शिक्षा:

▪️ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास

▪️ आणि/किंवा ₹1 कोटी दंड

➤ जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा:

▪️ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास

▪️ आणि/किंवा ₹50 लाख दंड

➤ आर्थिक निर्बंध:

▪️ बँका व वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी व्यवहार करण्यास सक्त मनाई.


1857 च्या उठावानंतरचा काळ:


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

 हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव

🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.


📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे


१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे 


* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.

* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण

सामाजिक कारणे 

* हिंदी लोकांना रानटी समजले जाई

* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना

* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.

धार्मिक कारणे 

* तिसरे संकट धर्मावर आले.

* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया


२. आर्थिक, लष्करी कारणे 


आर्थिक कारणे


* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.

* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक

* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी


लष्करी कारणे 


* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.

* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.


३. तात्कालिक कारण


हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम


― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.

― मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. 

― (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. 

― ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.

― गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.

― कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.

― प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.

― बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

― या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.

― सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.

― या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.

― काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.

― व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.

― मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.

― भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

― निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

― स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.

― भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.


▪️छोडो भारत चळवळ


क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.


▪️नेताजी सुभाष चंद्र बोस


भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


▪️आझाद हिंद सेना


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.


▪️भारतीय नौदलाचा उठाव


आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :


👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

इंग्रज सरकार विरुध्दच्या या उठावात भारतीयांना आलेल्या अपयशाची प्रमुख कारणे

 हा उठाव स्थानिक स्वरुपात, मोजक्याच क्षेत्रात, मर्यादीत प्रमाणात व असंघटीत असा होता.

 तसेच भारतातील एेक्याचा अभाव हे देखील या उठावाच्या पराभवाचे मोठे कारण होते.

  इंग्रजांच्या लष्करातील जवळपास अर्धेहिंदी सैनिक इंग्रजांच्याच बाजूने लढले, तसेच शिखांनी देखील इंग्रजांना साथ दिली.

  सिंध, राजपुताना, पंजाब, काश्मिर, मुंबई, मद्रास या प्रांतातील जनता, शासक तसेच संस्थानिक यांनी या उठावात सक्रिय सहभाग न घेता ते शांत राहिले.
   शिवाय शेतकरी तसेच खालच्या जातीतील लोकांनीही या उठावात सक्रिय भाग घेतला नाही.

   पातियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैद्राबाद येथील राजांनी हा उठाव दडपून टाकण्यास सरकारला उघड सहकार्य केले.

  या उठावाचा जास्त प्रभाव केवळ पश्चिम बिहार, अवध, रोहिलखंड, दिल्ली तसेच नर्मदा व चंबळ नद्यांमधील प्रदेश येथेच जाणवला.

   उठावकर्त्यांच्या तुलनेने इंग्रजांकडे विपुल साधन सामग्री होती. उठावाला शिपायांजवळही फारच थोड्या बंदुका होत्या व तलवारी आणि भाले हिच भारतीयांची मुख्य शस्त्र होती.

   आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने तसेच तारायंत्राच्या सुविधेमुळे उठाव दडपून टाकण्यासाठी एक सार्वत्रिक योजना बनविण्यात इंग्रज सफल झाले व अनुभवी अधिकाऱ्यांच्या रुपात कंपनी जवळ योग्य नेतृत्वही होते.

   या उठावाचे संघटन भारतीयांनी नियोजनबध्द पध्दतीने केले नव्हते. उठावात भाग घेणारे नेते शूर होते, परंतु संघटन क्षमता, अनुभव व परस्पर सहकार्याने काम करण्यात ते कमी पडले, तसेच त्यांच्यामध्येनेतृत्व गुणांचा देखील 
अभाव होता.

   कुवरसिंह व मौलवी अहमदुल्ला यांचा अपवाद वगळता प्रत्येकजण हे केवळ आपल्या क्षेत्रातच लढले.

स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्नसंच

1) ⚛️ ''एकच प्‍याला" या नाटकाचे लेखक कोण?

1)    ग. दी. मांडुळकर

2)     राम गणेश गडकरी✅✅

3)    श्रीपाद कृष्‍ण कोल्‍हेटकर

4)    वि. स. खांडेकर



2)⚛️ कोणता देश ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) ऑस्ट्रेलिया

(C) इंग्लंड

(D) भारत✅✅


3)⚛️ कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅

(B) एम. एफ. हुसेन

(C) राजा रवी वर्मा

(D) नंदालाल बोस



4)⚛️ कोणत्या शहरात ‘मुख्यमंत्री सेप्टिक टँक सफाई योजना’ सुरू करण्यात आली?

(A) जयपूर

(B) नवी दिल्ली✅✅

(C) गुरुग्राम

(D) झुंझुनू



 5)⚛️कोणती महिला पायलट भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट बनली आहेत?

(A) भावना कांत

(B) अवनी चतुर्वेदी

(C) मोहना सिंग

(D) लेफ्टनंट शिवांगी✅✅




(6)⚛️राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) याच्या 76 व्या फेरीतून केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात  घरांमध्ये स्नानगृह आहे.

(A) 54 टक्के

(B) 45.1 टक्के

(C) 46 टक्के

(D) 50.3 टक्के✅✅



(7)⚛️_______ यांच्या हस्ते "राष्ट्रीय युवा संसद योजना" याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

(A) भारताचे राष्ट्रपती✅✅

(B) भारताचे पंतप्रधान

(C) वित्त मंत्री

(D) संरक्षण मंत्री 


📌2011 चा साहीत्याचा नोबेल कोणाला प्राप्त झाला होता ?

1)   थॉमस ट्रान्सटॉमर✅✅✅✅

2)   ब्रायन क्रोबीला

3)   मारीयो ल्लोसा

4)   हर्टा म्युलर


📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम

(B) 10 वा

(C) 30 वा

(D) 9 वा✅✅


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.

(A) 10 नोव्हेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 11 ऑक्टोबर

(D) 12 नोव्हेंबर


📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?

(A) आसाम

(B) मणीपूर✅✅

(C) त्रिपुरा

(D) मेघालय


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 9 ऑक्टोबर

(D) 11 ऑक्टोबर


📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम __ येथे आयोजित केला जाणार आहे.

(A) नवी दिल्ली

(B) लखनऊ✅✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √

विष्णुशास्त्री चिपळूणकर

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

छत्रपती शाहू महाराज

=========================

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते?

संत तुकाराम

संत सावतामाळी

संत नरहरी सोनार

संत नामदेव.   √

=========================

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड

दादोबा पांडुरंग

बाळशास्त्री जांभेकर

नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

=========================

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस

कापूस

भात

नीळ.   √

=========================

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √

अनेक संस्थाने खालसा करणे

ख्रिश्चन धर्म प्रसार करणे

पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

=========================

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 

विनोबा भावे.    √

सरदार वल्लभभाई पटेल 

मौलाना आझाद

=========================

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?

विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली

साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत

साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √

विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

=========================

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे

ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे

वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √

निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

=========================

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √

लाला लजपतराय

लाला हरदयाळ

महात्मा गांधी

=========================

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √

डॉ. राधाकॄष्णन

डॉ. आंबेडकर

डॉ. झाकीर हुसेन

=========================

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √

कुसूम

कंडोल

शलार्इ

=========================

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √

दमास्कस

तेल अवीव 

तेहरान 

=========================

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड

मंगोलाइड .  √

बुश मॅनाइड 

ऑस्ट्रेलोंइड

=========================

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर

वज्रेश्र्वरी.  √

गणपतीपुळे

संगमेश्र्वर

=========================

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 

काळी जमीन.   √

तांबडी जमान

रेताड जमीन

=========================

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव

कोर्इमतूर

कानपूर

मांजरी.   √

=========================

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली

चेन्नर्इ

मुंबर्इ.   √

हैद्राबाद

=========================

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र

केरळ .  √

प. बंगाल

तमिळनाडू

=========================

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई

दिल्ली.   √

मद्रास 

बंगलोर

=========================

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √

बंगालचा उपसागर  

हिंदी महासागर   

पॅसिफिक महासागर


🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅


______________________________

🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

______________________________

⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

______________________________

🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास


🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

______________________________

🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?


A) भारत आणि म्यानमार☑️

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड


🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

A) नेपाळ

B) म्यानमार

C) इंडोनेशिया

D) इराक

______________________________

🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?

A-कलम 110

B-कलम 111

C-कलम 112

D- कलम 113


______________________________

🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ

(2)राजाराम मोहन रॉय✅✅

(3)पं. मदनमोहन मालविय

(3)यापैकी नाही

______________________________

🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन

वि.डी.सावरकर

अशोक मेहता✅✅

अशोक कोठारी

______________________________

⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा

कळसुबाई✅✅✅

साल्हेर

मलयगिरी

______________________________

🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

______________________________

🟡 सयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅

२) 25 ऑक्टोबर 1 9 45  

३) 24 ऑक्टोबर 1 9 54  

४) 25 ऑक्टोबर 1 9 54  


प्रश्न.१. आदिमानवातील कोणत्या मानवास 'हॕन्डी मॕन' म्हणून ओळखले जाते.?

१. होमो इरेक्टस 

२. होमो निअॕन्डरथॕलेन्सीस

३. होमो हायब्डर्रजेन्सिस

४. होमो हॕबिलीस ✔️



प्रश्न.२. खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.?

१. कार्बन मोनाँँक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

२. ओझोन वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो.  ✔️

३. कार्बनडाय आँक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो.

४. तरंगणाऱ्या कणांमुळे फुफ्फुसांचे रोग होतात.



प्रश्न.३. स्ट्राॕबेरी हे ------- प्रकारचे फळ आहे.?

१. संयुक्त

२. कॕप्सुलर

३. लिंबु वर्गीय

४. अॕग्रीगेट ✔️


प्रश्न.४. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू-रेणूंमधील अंतर ......?

१. वाढते  ✔️

२. कायम राहते

३. कमी होते

४. नष्ट होते


प्रश्न.५. उच्च दर्जाच्या मोतीस (Pearl) काय म्हणतात.?

१. रिअल मोती (Real)

२. स्वेता मोती (Sweta)

३. लिन्घा मोती (Lingha)  ✔️

४. अॕमेथिस्ट (Amethist)


प्रश्न.६. टेबलावर ठेवलेले पेन अचल स्थितीत राहते, ही बाब म्हणजे न्युटनच्या गतिविषयक कितव्या नियमाचे उदाहरण आहे.?

१. पहिल्या  ✔️

२. दुसऱ्या 

३. तिसऱ्या 

४. चौथ्या 


प्रश्न.७. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे. त्याचे कारण पुढीलपैकी कोणते आहे.?

१. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.

२. जनुकीय परिवर्तित जीवाणू हे तयार करतात. ✔️

३. येथे किण्वनाची प्रक्रिया अतिशय जलद असते.

४. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.


प्रश्न.८. मानवी आरोग्याच्या स्थितीत सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.?

१. सामाजिक आरोग्य

२. वैयक्तिक आरोग्य

३. सामाजिक आरोग्यशास्त्र 

४. आरोग्य विकास  ✔️



प्रश्न.९. ओझोन वायूचे एकक पुढीलपैकी कोणते आहे.?

१. A.U.

२. B.U.

३. C.U.

४. D.U.  ✔️



प्रश्न.१०. रसेल कार्लसन यांचे प्रसिद्ध पुस्तक 'सायलेंट स्प्रिंग' हे पुढील कशाशी संबंधित आहे.?

१. किटकनाशके व त्यांचे दुष्परिणाम  ✔️ 

२. नद्या व नदीकाठचा प्रदेश

३. जैवविविधता 

४. विषाणूजन्य आजार व मानवावर होणारे परिणाम


प्रश्न.११. एकक वेळेत पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर आदळणाऱ्यां विद्युत चुंबकीय ऊर्जेस काय म्हणतात.?

१. किरणोत्सार (Radioactivity)

२. फाॕलआऊट (Fallout)

३. इरॕडिअन्स (Irradiance)  ✔️

४. जडत्व (Inertia)


प्रश्न.१२. जैवतंत्रज्ञानात सर्वाधिक अभ्यासला गेलेला जीवाणू म्हणून पुढीलपैकी कोणत्या जीवाणूला ओळखले जाते.?

१. अॕन्थ्रॕक्स बॕसिलस

२. स्ट्रेप्टोकोकस मँसिअस

३. सुडोमोनास 

४. ई. कोलाय  ✔️


प्रश्न.१३. मसाल्यात वापरले जाणारे दगडफूल पुढीलपैकी कोणते आहे.?

१. उस्निया

२. पारमेलिया  ✔️

३. ब्राओरिया

४. लँमिनारिया


प्रश्न.१४. सूर्यफूल ही ------ वनस्पती आहे.?

१. अनावृत्तबीजी 

२. एकबीजपत्री

३. नेचोद्रभिदी

४. द्वीबीजपत्री  ✔️


प्रश्न.१५. डीएनए मध्ये थायमीन (T) हा नेहमी कुठल्या नत्र घटकाशी जोडी बनवतो.?

१. सायटोसिन

२. ग्वानाईन

३. अॕडेनाईन  ✔️

४. थायमीन


प्रश्न.१६. पुढीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॕलरीज मिळतात.?

१. एक कप आईस्क्रीम ✔️

२. एक कप सरबत

३. एक कप दूध

४. एक कप आंब्याचा रस


प्रश्न.१७. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही.?

१. क्षयरोग

२. हिवताप  ✔️

३. विषमज्वर 

४. यकृतदाह


प्रश्न.१८. L-Dopa हे औषध पुढीलपैकी कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.?

१. टि.बी.  

२. कँन्सर

३. पार्किन्सन्स✔️

४. मलेरिया


 मिलिट्री व औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे RDX निर्माण करण्यासाठी पुढील कोणती पद्धती वापरली जात नाही.?

१. बाखमन पद्धती 

२. वुलविच पद्धती 

३. नायट्रेशन पद्धती

४. थिओडोलाईट पद्धती ✔️


भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

A) आग्नेय ✅✅

B) ईशान्य

C) नैॠत्य

D) वायव्य


भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

A) पोर्तुगीज ✅✅

B) इंग्रज

C) डच

D) फ्रेंच


मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.

A) ४६ ✅✅

B) ४४

C) ३२

D) ५२


भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

A) लक्षद्वीप

B) मालदीव

C) छागोस

D) अंदमान ✅✅


‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.

A) कर्नाटका

B) राजस्थान ✅✅

C) बिहार

D) गुजरात


आम्ल पदार्थाची चव कशी असते?

A) खारट

B) आंबट ✅✅

C) तुरट

D) गोड


नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.

A) मुंबई

B) औंरंगाबाद

C) पुणे ✅✅

D) नागपूर


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

A) रासबिहारी बोस ✅✅

B) चंद्रशेखर आझाद

C) सुभाषचंद्र बोस

D) रामप्रसाद बिस्मिल


भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?

A) २४ डिसेंम्बर ✅✅

B) १५ मार्च

C) १ जुलै

D) २ आक्टोबर


I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?

A) भारत

B) पाकिस्तान ✅👌

C) अमेरिका

D) रशिया


अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च

A) जागतिक जल दिन ✅✅

B) साक्षरता दिन

C) जागतिक महिला दिन

D) जागतिक एड्स दिन


‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

A) द्वित

B) अग्रज

C) अनुज

D) द्विज ✅✅


‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.

A) गोल्फ

B) बुद्धिबळ

C) हाॅकि

D) बॅटमिंटन ✅✅


भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

B) विक्रम साराभाई ✅✅

C) सतीश धवन

D) माधवन नायर


अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?

A) विशाखापट्टणम

B) मालदीव

C) छागोस

D) पोर्ट ब्लेअर ✅✅


‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) उसने अवसान आणणे

B) सतत त्रास होणे

C) यातायात करणे ✅✅

D) अतिशय काळजी घेणे


कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?

A) शांताराम नांदगावकर

B) जोतीबा फुले

C) जगदीश खेबुडकर

D) सुरेश भट्ट ✅✅


हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.

A) माईन काम्फ ✅✅

B) दास कॅपिटल

C) तरुण तुर्क

D) आपला लढा


‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) भुरळ पडणे✅✅

B) बेशुद्ध पडणे

C) मती नष्ट होणे

D) हरवणे


‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.

A) कपिल देव

B) सुनील गावसकर

C) सचिन तेंदुलकर ✅✅

D) अॅडम गिल ख्रिस्ट


क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?

A) वाॅशिंग्टन

B) रोम

C) न्यूयाॅर्क

D) माॅस्को ✅✅



🔰 1) राजाराम मोहन रॉय यांना राजा हि पदवी कोणी दिली 
1)देंवेंद्रनाथ टागोर 
2)नेताजी बोस
3)अकबर✅✅
4)डॉ़ सेन

____________________________

🔰 2)राणी लक्ष्मीबाई पूर्ण नाव काय 
1)लक्षमीबाई महादेव जानकर 
2)मणकणिका मोरोपंत तांबे ✅✅
3)राणी पांडूरंग माने
4)लक्षमीबाई महादेव थोरात

____________________________

🔰 3)कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उदृगार कोणाचे आहे 
1)नेहरू
2)गांधी
3)लालबहादूर शास्त्री✅✅
4)इंदिरा गांधी
____________________________

🔰 4)चले जाव ठराव कोणत्या अधिवेशन मंजूर करण्यात आला 
1)मुंबई
2)पुणे
3)वधाँ✅✅
4)कलकत्त
____________________________

🔰5)पाकिस्तान हा शब्द कोणत्या पुस्तकात वाचायला मिळाला
1)never Pakistan 
2)no in pictures 
3)Now or Never ✅✅
4)some of the entire

🏆 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 
⚫️ चाल☑️
🔴 गती
🔵 तवरण 
_________________________

🏆 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन
⚫️ हड्रोजन
🔴 कार्बन डायऑक्साईड☑️
🔵 नायट्रोजन
_________________________

🏆 नयूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️
⚫️बल
🔴तवरण
🔵घडण

🏆 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा
⚫️बिटा
🔴गमा☑️
🔵कष-किरण
_________________________

🏆 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
🔴यकृत
🔵कल्शियाम
_________________________

 🏆 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
🔴विद्युत सुवाहक म्हणून 
🔵वरील सर्व कारणांसाठी 
_________________________

🏆 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
🔴मोरचुद
🔵कॉपर टिन
_________________________

🏆 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी
⚫️लहान☑️
🔴दप्पट
🔵तिप्पट
_________________________

🏆 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
🔴चौपट होते
🔵दप्पट होते ☑️
_________________________

🏆 धवनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .
⚪️सथायू 
⚫️दरव
🔴वायू
🔵निर्वात प्रदेश ☑️

Que.1 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?
1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन

 

Que .2: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी

 

Que.3 : पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते 
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?
1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919

 

Que .4 : खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?
1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बगालचे विभाजन - 1905


Que.5 : भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?
1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
 A) वर्धा 
 B) गडचिरोली 
 C) चंद्रपूर 
 D) गोंदिया ✅✅


 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
 A) ६ लिटर 
 B) ५ लिटर 
 C) ४ लिटर ✅✅
 D) ३ लिटर


 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
 A) प्रथमान्त ✅✅
 B) द्वितीयांत 
 C) चतुर्थ्यांत 
 D) तृतीयान्त

“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
 A) कारणबोधक 
 B) विकल्पबोधक 
 C) न्यूनत्वबोधक 
 D) परिणामबोधक✅✅


नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
 A) २ जानेवारी 
 B) २१ एप्रिल ✅✅
 C) २८ फेब्रुवारी 
 D) १४ सप्टेंबर


 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
 A) PRYW 
 B) ORTW 
 C) NPUH 
 D) ORYH ✅✅


: : x चे 15% = 900 चे 10% तर x =?
 A) 60 
 B) 600 ✅✅
 C) 700 
 D) 800


भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 
 B) डायरेक्टर आई. बी. 
 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 
 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅
 


पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 
 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅
 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



 “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
 A) तत्पुरुष ✅✅
 B) अव्ययीभाव 
 C) कर्मधारय 
 D) द्विगु


देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
 A) अकोदरा ✅✅
 B) रावतभाटा 
 C) बडोदरा 
 D) मानकापूर