Tuesday, 21 February 2023

आयुष्मान खुराना यांची युनिसेफच्या बाल हक्कांसाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे



🔹बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना याची 19 फेब्रुवारी 2023 रोजी संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) भारताचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔸आयुष्मानची सप्टेंबर 2020 मध्ये युनिसेफ इंडियाचे सेलिब्रेटी अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ज्यामुळे मुलांवरील हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी आणि बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी वकिली करण्यात आली होती.


🔹राष्ट्रीय राजदूत म्हणून ते सर्व मुलांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी युनिसेफला मदत करतील.

बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम मोडला.



🔹इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स 18 फेब्रुवारी 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला.


🔸त्याने इंग्लंडचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमचा मागील विक्रम मागे टाकला.


🔹स्ट्रोक्सने 90 कसोटीत 109 षटकार मारून हा विक्रम केला.


🔸मॅक्युलमच्या नावावर 101 कसोटीत 107 षटकारांचा विक्रम होता.


-----------------------------------------------------------

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


अनिमिया म्हणजे काय?


🔴रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.


🔘रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहाची गरज असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीन लाल रक्तकणात असते. यांचे कार्य छातीतून शरीराच्या विविध भागात प्राणवायु पोहोचविणे हे आहे. प्राणवायुमुळे शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाते.


🔰अनिमियाची कारणे

लोहयुक्त आहाराची कमतरता

सकस आहाराची कमतरता

मानसिक तणाव

मासीक पाळीतील रक्तस्राव

जास्तीची बाळंतपणे (२ पेक्षा जास्त )

वारंवार गर्भपात

मलेरिया

जंत

मुळव्याध


🛑अनिमिया आजाराचे चिन्ह/ लक्षणे

आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग फिका पडतो.

नखे, डोळे, जीभ फिके दिसायला लागतात.

चक्कर येणे

भूक मंद होणे

चालताना दम लागणे

थोडे श्रम केले तरी थकवा जाणवणे

निरुत्साह वाढतो

चिडचिडेपणा वाढतो.


✅लोहाच्या कमतरतेमुळे महिला व बालकांमधील काही दुष्परिणाम

अ) महिलांमध्ये रक्ताची कमी असल्यास होणारे दुष्परिणाम कमी वजनाचे बालक जन्माला येते. वेळेच्या अगोदर बाळंत होणे. गरोदरपणात रक्तस्राव होणे. बाळंतपणानंतर जास्त रक्तस्राव होणे बाळंतपणातच महिलेचा मृत्यू होणे जन्माच्या अगोदरच बाळाचा मृत्यू होणे. किशोरींमध्ये पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.


ब) बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे सारखे आजारी पडतात.कुठल्याही कामात लक्ष न देणे. त्यामुळे अशा प्रकारची मुले खेळात, अभ्यासात, इतर बालकांपेक्षा मागे राहतात.

आत्मविश्वास कमी होणे.बाळ चिडचिडे होते. सतत रडते.


 

स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

प्रिय विद्यार्थी मित्रांनो... येणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत खालील मुद्दे लक्षात घ्या;

1. 'परीक्षा होईल की नाही' यासारख्या चर्चांमध्ये लक्ष देऊ नका, परीक्षा नक्की होणार असे मनाला कायम सांगा.

2. उपलब्ध प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा.

3.  दररोज 5 तासांचा वेळ revision साठी द्या.

4. दररोज 5 तासांचा वेळ CSAT ला द्या.

5. दररोज 2 तास जुन्या प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी यांना द्या.

6. Tension येत असल्यास सराव पेपर्स आता देऊ नका.

7. परीक्षेत आठवेल का नाही? असा विचार करू नका, आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या नसतात तर उपलब्ध पर्यायातून उत्तर शोधायचे असते.

8. पदांची संख्या , मेरिट यांचा विचार करू नका, ते तुमच्या हातात नाही.

9. पुरेशी झोप घ्या, यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल.

10. आत्मविश्वास कायम ठेवा. नको त्या लोकांपासून दूर राहा.

11. राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यावर लगेचच Combine पूर्वपरीक्षेवर focus ठेवा.

12.  stick to wicket, runs will come automatically.


भारतीय अर्थव्यवस्था

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
रुपयाची परिवर्तंनियता (Convertibility of Rupee) :

अर्थ: जगातील चलने परस्परांमध्ये विनिमयक्षम (Exchangeable) असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनांमध्ये करता येते.

मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा(Exchange Control) टाकत असतात.

मात्र जेंव्हा एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे/मर्यादा नसते तेंव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हंटले जाते.

उदा.
1) विनिमय करायच्या चलनाच्या संख्येवर बंधन नसते, म्हणजेच हवे तेवढया चलनाचा विनिमय करता येऊ शकेल.

 

2) विनिमय दर सरकार ठरविणार नाही. तर तो दोन्ही चालनाच्या मागणी आणि पुरवठयाच्या परस्पर संयोगाने परकीय चलन बाजारात ठरेल.

 

3) सर्व व्यवहारांसाठी असा बाजारात ठरलेला (Market Determined) एकच दर असेल म्हणूनच या व्यवस्थेला पूर्ण परिवर्तनीय व्यवस्था (Fully-Convertible System) असे म्हणतात.

पूर्ण परिवर्तनीय व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारची नियंत्रणे/मर्यादा टाकल्यास ती अंशत: परिवर्तनीय व्यवस्था (Partially Convertible System) ठरते.

उदा.
1) चलन फक्त काही व्यवहारांसाठी मुक्तपणे परिवर्तनीय असेल. उदा. फक्त वस्तूंच्या आयाती-निर्यातीसाठी किंवा फक्त सेवांच्या देवाण-घेवाणसाठी किंवा फक्त भांडवली व्यवहारांसाठी किंवा फक्त विशिष्ट वस्तु व सेवांच्या देवाण-घेवाणीसाठी.

2) एका पेक्षा अधिक विनिमय दरांचा वापर केला असेल तर. उदा. परदेशात मौजमजा ट्रिप्ससाठी परकीय चलन हवे असल्यास विनिमयाचा अधिक दर आकाराला जाऊ शकेल, याउलट अन्नधान्याच्या आयातीसाठी कमी दर आकाराला जाईल.

3) दुहेरी विनिमय दराचा (Dual Exchange Rate) वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच काही सरकारी किंवा सरकार पुरस्कृत व्यवहारांसाठी सरकारी दर (Official Rate) तर इतर बिगर-सरकारी व सरकारने नियंत्रित न केलेल्या व्यवहारांसाठी बाजार दर (Market-Rate)..

एन.सी.सक्सेना समिती :

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ही एन.सी.सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती (Committee for Estimation of BPL Families in Rural Areas) स्थापन केली होती.
या समितीने सप्टेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केली होती.
या समितीने सध्याची दारिद्रय रेषा अपूर्ण असून त्यात वाढ सुचविली, जेणे करून आवश्यक कॅलरीज उपलब्ध होऊ शकतील. तसेच समितीच्या मते दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या 50 टक्के इतकी उच्च आहे.
मात्र या शिफारशी नियोजन मंडळाने फेटाळून लावल्या.

दारिद्रय निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम (Policies and programmers towards poverty alleviation) :

भारताच्या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय हे सरकारच्या विकास धोरणांचे प्राथमिक उद्दीष्टय असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुतेक सर्व धोरणांमध्ये दारिद्रय निर्मूलनावर भर देण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सरकारने विविध डावपेचांचा स्विकार करण्यात आलेला आहे.
दारिद्रय निर्मूलनासाठी सरकारने त्री-आयामी दृष्टीकोनाचा स्विकार केला आहे.

अ) वृद्धीधारीत दृष्टिकोन,

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम, आणि

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद.

अ) वृद्धीधारित दृष्टिकोन (Growth-oriented Approach) –

हा दृष्टिकोन अशा अपेक्षेवर आधारलेला आहे की, आर्थिक वृद्धीचे परिणाम (जिडीपी व दर डोई जीडीपीतील वेगवान वृद्धी) समाजाच्या सर्व गटांपर्यंत पसरतील, तसेच गरीब जनतेपर्यंत झिरपत जातील.
1950 च्या दशकात व 1960 कया दहकाच्या सुरुवातीपर्यंत नियोजनाचा मुख्य भर याच दृष्टीकोनावर आधारित होता. त्यामागे असा विचार होता की, निवडक प्रदेशांमध्ये वेगवान औधौगिक विकास आणि हरित क्रांतीच्या माधमातून कृषि विकास घडवून आणल्यास न्यून-विकसित प्रदेशांना तसेच समाजातील मागास आणल्यास गटांना त्याचा फायदा प्राप्त होईल.
मात्र, एकंदरीत वृद्धी आणि कृषि व उधोग क्षेत्रातील वृद्धी अपेक्षित वेगाने होऊ शकली नाही. दुसर्‍या बाजूला, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे दर डोई उत्पन्नातील वाढ अत्यल्प ठरली. हरित क्रांतीमुळे प्रादेशिक तसेच वैयक्तिक विषमतेत भरच पडली. भू-सुधारणा यशस्वी होऊ शकल्या नाही. त्यामुळे आर्थिक वृद्धीचे फायदे गरीब जनतेपर्यंत झिरपून पोहचले नाहीत.

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम (Poverty Alleviation Programmers PAPs) –

वृद्धीधारीत दृष्टीकोनाला पर्याय म्हणून धोरण निर्मात्यांनी दारिद्र्यावर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांच्या राबवणुकीचार भर देण्यास सुरुवात केली. सामाजिक मालमत्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कामाची निर्मिती करून गरीब जनतेसाठी उत्पन्नसृजक रोजगार निर्माण करता येईल, हा मागील विचार होता.
या दृष्टीकोनाचा अवलंब अल्प प्रमाणात तिसर्याच योजनेदरम्यान करण्यात आला, व त्यानंतर टप्प्याटप्याने त्याचा विस्तार करण्यात आला. अशा दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांचे तीन प्रकार पडतात-
स्वयंरोजगाराचे कार्यक्रम: उदा. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना.
मजुरी रोजगार कार्यक्रम: उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
स्वयंरोजगार व मजुरी रोजगारांचे एकत्रीकरण असलेल्या योजना: उदा. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना.

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद (Provision of minimum basic amenities) –

या दृष्टिकोनात जनतेला किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दरिद्रयाचा प्रश्न हाताळण्याचा समावेश होतो.

सामाजिक उपभोगाच्या गरजांवर (उदा. अनुदानित दराने अन्नधान्य पुरवठा, शिक्षण व आरोग्य सोयी, पाणी पुरवठा व स्वच्छता इ.) सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेचे राहणीमान उंचवता येऊ शकते, या कल्पनेचा भारत हा जगात अग्रेसर देश असल्याचे मानले जाते.

या दृष्टीकोना अंतर्गत कार्यक्रमांच्या आधारे रोजगार निर्मिती करणे, गरिबांच्या उपभोगात भर घालणे व शिक्षण-आरोग्यात सुधारणा होणे, या बाबी अपेक्षित आहेत.

गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील तीन प्रमुख कार्यक्रम राबविले जात आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था
एकात्मिक बाल विकास योजना
राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना
वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राबविण्यात येणार्यान योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश होतो-

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
भारत निर्माण योजना
इंदिरा आवास योजना
ग्रामीण गरीबांना शहरी सेवांचा पुरवठा (PURA)

तसेच, सरकारने काही विशिष्ट गटांना मदत करण्यासाठी विशेष सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आहेत.
उदा. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP), ज्यांतर्गत ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’ चालविली जाते.

MPSC राज्यसेवा पुर्व मधील #Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?


राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.


🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.


❇️ गरिबी व बेरोजगारी -


यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.


❇️ लोकसंख्या-


यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.


❇️ 3.शाश्वत विकास -


 या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.


❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -


 यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या  लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.


❇️ 5. समावेशन -


यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना  चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.


❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -


 यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.


🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.


एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.


यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे?

१. जापान ची घटना 

२. आयरिश घटना

३. ऑस्ट्रेलियाची घटना 

४. वायमार प्रजासत्ताक ची घटना✅


2. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाही?

१. के एम मुंशी 

२. एन माधवराव 

३. टी टी कृष्णमाचारी 

४. जे बी कृपलानी✅


3. खाली दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा.

१. संविधान सभेत एकूण 379 सदस्य होते

२. संविधान सभेच्या निर्मितीची रचना ऑगस्ट ऑफर मध्ये करण्यात आली 

३. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये दहा जागा अपक्षांना मिळाल्या 

४. 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले✅


4. खालील विधानांचा विचार करा..

अ) भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही 

ब) सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर✅


5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आली.

ब) संस्थानिकांना मिळालेल्या 93 जागा भरू शकल्या नाहीत कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला.

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर✅

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर


6. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले?

१. 41

२. 43

३. 44

४. यापैकी नाही✅


7. घटनेच्या संघ राज्य शासन व्यवस्थेवर विविध तज्ञांची मते खाली दिलेली आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

१. अर्ध संघराजीय - के सी व्हेयर

२. सहकारी संघराज्य - ग्रेन विल ऑस्टिन 

३. वाटाघाटीचे संघराज्य - मॉरीस जोन्स 

४. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य - एच सी मुखर्जी✅


8. 42 वी घटनादुरुस्ती किती सली संमत करण्यात आली?

१. 1974

२. 1975

३. 1976 ✅

४. 1977 


9. घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?

1. साध्य करावयाचे आदर्श

2. शासन व्यवस्था 

3. सत्तेचा स्त्रोत

१. फक्त 1

२. फक्त 2

३. 1, 2

४. 1, 2, 3✅


10. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?

१. राज्यघटनेचा सरनामा✅

२. मार्गदर्शक तत्त्वे 

३. मूलभूत कर्तव्य

४. आणीबाणीच्या तरतुदी



१९२६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ  

  2) अ व ब    

3) अ व क    

4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


१९२७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 

   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन

   क) कल्याणकारी राज्य 

    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

   1) अ, ब, क    

2) अ, ब     

 3) अ, ब, ड    

4) अ, ब, क, ड

उत्तर :- ४


१९२८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) पंडित जवाहरलाल नेहरू 

   2) सच्चिदानंद सिन्हा

   3) डॉ. राजेंद्र प्रसाद     

 4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4



१९२९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर   

 2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) जवाहरलाल नेहरू    

  4) बी. एन. राव

उत्तर :- 4


१९३०) संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

   1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते    

  2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

   3) यामध्ये केवळ एकच सरकार असते  

  4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर :- 2


२०२१) खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    

2) लोकसंख्या वाढ

   3) बेरोजगारीत वाढ    

4) प्रशासकीय खर्चात वाढ

उत्तर :- 3


२०२२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना   

 2) समन्वित किंमत रचना

 3) 1 व 2 दोन्ही      

4) कोणतेही नाही

उत्तर :- 3


२०२३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............   टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के

    2) 35 टक्के 

   3) 40 टक्के

    4) 45 टक्के

उत्तर :- 3


२०२४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही.  

  2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.

   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर :- 2


२०२५) योग्य पर्याय निवडा.

     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ)वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.   

  ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.

   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक 

   2) वरील सर्व बरोबर    

   3) अ व ब बरोबर    

4) केवळ क बरोबर

उत्तर :- 2



२०२६) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.

   .................. सरकारने ऑगस्ट 2002 मध्ये पहिला राजवित्तीय जबाबदारी कायदा संमत केला.

   1) कर्नाटक  

  2) केरळ      

   3) तामिळनाडू  

  4) पंजाब

उत्तर :- 1


२०२७) बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?

 1) 38.0%  

 2) 46.0%    

 3) 37.0%    

4) 42.0% 

उत्तर :- 1


२०२८) सार्वजनिक लेखा – समिती त्यांचा अहवाल खालील सभेला तयार करते.

  1) संसद  

  2) राष्ट्रपती    

  3) पंतप्रधान  

  4) वित्त – मंत्री

उत्तर :- 1


२०२९) 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?

  1) 1993 – 94  

  2) 2000 – 01    

  3) 2007 – 08  

  4) 2008 – 09

उत्तर :- 4


२०३०) अ) जुलै 1991 मध्ये भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.

    ब) अवमूल्यनामुळे व्यापारतुट भरून काढण्यास मदत होते.

 1) फक्त अ बरोबर आहे.     

 2) फक्त ब बरोबर आहे.

 3) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. 

 4) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत.

उत्तर :- 3


१९५१) योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

  अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे   

  ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

  क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे    ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

1) अ, ब, क, ड    

2) अ, ड, क, ब   

3) अ, ब,  ड, क   

4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2


१९५२) ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  1) अ, ब  

 2) ब, क     

 3) क, ड    

 4) अ, ब, क

उत्तर :- 4


१९५३) खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.


1) अ, ब    

2) ब, क      

3) क, ड      

4) फक्त ड

उत्तर :- 3


१९५४)  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

  1) डॉ. राजेंद्र प्रसाद   

 2) डॉ. झाकीर हुसेन

  3) आर. व्यंकटरमण्‍  

 4) के. आर. नारयणन्

उत्तर :- 1


१९५५) भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

 1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य  

 2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य

 3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य   

 4) वरील सर्वच

उत्तर :- 4



महत्वाचे खटले


🌻कशवानंद भारती खटला 1973:-

👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे

👉परास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले

👉मलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


🌻मिनर्व्हा मिल खटला 1980:-

👉भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे

👉घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही

👉राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


🌻बरुबारी युनियन खटला 1960:-

👉परास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


🌻ए के गोपालन खटला 1950:-

👉कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


🌻मनका गांधी खटला1978:-

👉कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


🌻आय आर कोहेल्लो खटला 2007:-

👉नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


🌻एस आर बोंमई खटला 1994:-

👉घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.


Mpsc प्रश्न सराव


1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.

   1) बालाघाट    2) महादेव    3) सातपुडा    4) अजिंठा


उत्तर :- 1


2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?

   1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा    2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा

   3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना    4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा


उत्तर :- 1


3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

   ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

   क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.

   ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

   1) ब      2) क      3) ड      4) कोणतेही नाही


उत्तर :- 4


4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?

   1) गोदावरी    2) भीमा      3) कृष्णा      4) वरील एकही नाही


उत्तर :- 2


5) योग्य जोडया लावा.

  धबधबे      ठिकाण

         अ) मार्लेश्वर      i) सातारा

         ब) ठोसेघर      ii) रत्नागिरी

         क) सौताडा      iii) अहमदनगर

         ड) रंधा      iv) बीड


    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  i  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  iv  iii  ii

           4)  ii  i  iv  iii


उत्तर :- 4



1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?

   1) तापी    2) वैनगंगा    3) नर्मदा      4) कृष्णा


उत्तर :- 2


7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?

   अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.

   ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.


   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य    3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब योग्य नाहीत


उत्तर :- 2


8) जोडया लावा.

  जिल्हा      धबधबा

         अ) अहमदनगर    i) सौताडा धबधबा

         ब) अमरावती    ii) सहस्त्रकुंड धबधबा

         क) बीड      iii) रंधा धबधबा

         ड) यवतमाळ    iv) मुक्तागिरी धबधबा

    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  iv  i

           2)  i  iv  iii  ii

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  ii  iii  i


उत्तर :- 3


9) खालील विधाने पहा.

   अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

   ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

   क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

   1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.    2) विधान अ आणि क बरोबर आहेत.

   3) विधान ब आणि क बरोबर आहेत.    4) सर्व विधाने बरोबर आहेत.


उत्तर :- 4


10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?

   1) पूर्णा    2) पांझरा    3) दुधना      4) गिरणा


उत्तर :- 3


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    ड) अपक्ष

   1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड      2) ब, क, ड    3) अ, ब, क    4) अ, ड, क


उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.


उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा      ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ    3) अ, ब, क, इ    4) ब, क, इ


उत्तर :- 3



6) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती


   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड


उत्तर :- 1


7) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर    2) आयव्हर जेनिंग्ज  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन  4) मॉरिस जोन्स


उत्तर :- 4


8) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना      2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता    4) न्यायालयीन पुनर्विलोकन


उत्तर :- 1


9) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता      3) न्याय      4) बंधुभाव


उत्तर :- 3


10) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या .............  घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी      3) 42 वी      4) 46 वी


उत्तर :- 3

ग्रामपंचायत

– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.


गेल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे

◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.

◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.

◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

गेल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे

◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.

◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.

◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


१) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32    2) अनुच्छेद 25    3) अनुच्छेद 14    4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1

२) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4

३) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
   2) मालमत्तेविषयक हक्क
   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क
   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- 2

४) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये
   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार
   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट
   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4

५) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा    2) विधान परिषद    3) उच्च न्यायालय    4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

   1) सर्व विधाने
   2) कोणतेही नाही
   3) फक्त अ 
   4) अ आणि ब

उत्तर :- 3

७) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

उत्तर :- 4

८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती
        व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.

   1) अ    
   2) ब  
   3) क   
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

९) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा    2) स्वातंत्र्याचा 
   3) धर्माचा    4) चौथ्या

उत्तर :- 1

१०) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार 
    2) संपत्तीचा अधिकार
   3) स्वातंत्र्याचा अधिकार  
   4) शैक्षणीक अधिकार

उत्तर :- 2

११) मूलभूत हक्कांसदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत.
   ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते.
   क) संसद त्यांवर मर्यादा घालू शकते.
   ड) ते समर्थनीय आहेत.

    1) अ 
    2) ब   
   3) क  
   4) ड

उत्तर :- 1

१२) भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील “धर्मस्वातंत्र्याचा हक्क” यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ?

   1) एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क

   2) एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क

   3) एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क

   4) सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क

उत्तर :- 4

१३) मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे  ?

   1) कायदेमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ
   3) राजकीय पक्ष 
   4) न्यायमंडळ

उत्तर :- 4

१४) भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ती कलमे कोणती ?

   1) कलम 13 ते 17 
  2) कलम 14 ते 18 
  3) कलम 15 ते 19   
4) कलम 16 ते 20

उत्तर :- 2

१५) घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

   अ) पोटकलम 4-A चा 77 व्या घटनादुरुस्तीव्दारे समावेश केला गेला.

   ब) पोटकलम 4-A हे पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात आहे.

   क) पोटकलम 4-A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या हिताकरता, पदोन्नतीमधील    आरक्षणासंदर्भात आहे.

   1) अ आणि ब बरोबर, तर क चूक आहे.

   2) अ आणि क बरोबर, तर ब चूक आहे.

   3) सर्व बरोबर आहेत

   4) अ बरोबर, तर ब आणि क चूक आहेत.

उत्तर :- 1

१६) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

   1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

    2) मुद्रण स्वातंत्र्य

   3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2

१७) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व 
   ब) देशाची एकता   
   क) प्रांताची सुरक्षितता  
   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

   1) अ, क    2) ब, ड    
  3) अ, ब      4) ड

उत्तर :- 3

१८) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क   
   2) स्वातंत्र्याचा हक्क 
   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 
  4) मालमत्तेचा हक्क

उत्तर :- 4

१९) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. 

   1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)
   2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)

उत्तर :- 3

२०) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या   अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.

         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ  
2) केवळ ब आणि क   
3) केवळ अ आणि क   
4) केवळ अ, ब आणि क

उत्तर :- 4

हडप्पा संस्कृती थोडक्यात......



▪️(इंग्रजी: Harappan civilization)

👉 ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे.

▪️हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो.

▪️इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.

▪️या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात.

▪️नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात.

▪️जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.

▪️हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.

▪️उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या.

🛑 अशाच प्रकारच्या संस्कृतीचे
      अवशेष पश्चिम भारतात

👉कालीबंगन,
👉धोळावीरा,
👉सरकोटडा,
👉लोथल,
👉दायमाबाद

इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.


MPSC प्रश्नमंजुषा

 🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

______________________________

🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

______________________________

⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

______________________________

🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास



🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

______________________________

🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड


🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

A) नेपाळ

B) म्यानमार

C) इंडोनेशिया

D) इराक

______________________________

🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?

A-कलम 110

B-कलम 111

C-कलम 112

D- कलम 113

______________________________

🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ

(2)राजाराम मोहन रॉय✅✅

(3)पं. मदनमोहन मालविय

(3)यापैकी नाही

______________________________

🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन

वि.डी.सावरकर

अशोक मेहता✅✅

अशोक कोठारी

______________________________

⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

दोदाबेटा

कळसुबाई✅✅✅

साल्हेर

मलयगिरी

______________________________

🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

______________________________

🟡 सयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅

२) 25 ऑक्टोबर 1 9 45  

३) 24 ऑक्टोबर 1 9 54  

४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

______________________________

प्रश्न.१. आदिमानवातील कोणत्या मानवास 'हॕन्डी मॕन' म्हणून ओळखले जाते.?

१. होमो इरेक्टस 

२. होमो निअॕन्डरथॕलेन्सीस

३. होमो हायब्डर्रजेन्सिस

४. होमो हॕबिलीस ✔️


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

प्रश्न.२. खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.?

१. कार्बन मोनाँँक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

२. ओझोन वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो.  ✔️

३. कार्बनडाय आँक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो.

४. तरंगणाऱ्या कणांमुळे फुफ्फुसांचे रोग होतात.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

प्रश्न.३. स्ट्राॕबेरी हे ------- प्रकारचे फळ आहे.?

१. संयुक्त 

२. कॕप्सुलर

३. लिंबु वर्गीय

४. अॕग्रीगेट ✔️

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

प्रश्न.४. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू-रेणूंमधील अंतर ......?

१. वाढते  ✔️

२. कायम राहते

३. कमी होते

४. नष्ट होते

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

प्रश्न.५. उच्च दर्जाच्या मोतीस (Pearl) काय म्हणतात.?

१. रिअल मोती (Real)

२. स्वेता मोती (Sweta)

३. लिन्घा मोती (Lingha)  ✔️

४. अॕमेथिस्ट (Amethist)

❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥

प्रश्न.६. टेबलावर ठेवलेले पेन अचल स्थितीत राहते, ही बाब म्हणजे न्युटनच्या गतिविषयक कितव्या नियमाचे उदाहरण आहे.?

१. पहिल्या  ✔️

२. दुसऱ्या 

३. तिसऱ्या 

४. चौथ्या 

🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️

प्रश्न.७. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे. त्याचे कारण पुढीलपैकी कोणते आहे.?

१. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.

२. जनुकीय परिवर्तित जीवाणू हे तयार करतात. ✔️

३. येथे किण्वनाची प्रक्रिया अतिशय जलद असते.

४. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.

⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

प्रश्न.८. मानवी आरोग्याच्या स्थितीत सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.?

१. सामाजिक आरोग्य

२. वैयक्तिक आरोग्य

३. सामाजिक आरोग्यशास्त्र 

४. आरोग्य विकास  ✔️

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

प्रश्न.९. ओझोन वायूचे एकक पुढीलपैकी कोणते आहे.?

१. A.U.

२. B.U.

३. C.U.

४. D.U.  ✔️


🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊

*प्रश्न.१०. रसेल कार्लसन यांचे प्रसिद्ध पुस्तक 'सायलेंट स्प्रिंग' हे पुढील कशाशी संबंधित आहे.?*

१. किटकनाशके व त्यांचे दुष्परिणाम  ✔️ 

२. नद्या व नदीकाठचा प्रदेश

३. जैवविविधता 

४. विषाणूजन्य आजार व मानवावर होणारे परिणाम


🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

प्रश्न.११. एकक वेळेत पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर आदळणाऱ्यां विद्युत चुंबकीय ऊर्जेस काय म्हणतात.?

१. किरणोत्सार (Radioactivity)

२. फाॕलआऊट (Fallout)

३. इरॕडिअन्स (Irradiance)  ✔️

४. जडत्व (Inertia)

🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄

प्रश्न.१२. जैवतंत्रज्ञानात सर्वाधिक अभ्यासला गेलेला जीवाणू म्हणून पुढीलपैकी कोणत्या जीवाणूला ओळखले जाते.?

१. अॕन्थ्रॕक्स बॕसिलस

२. स्ट्रेप्टोकोकस मँसिअस

३. सुडोमोनास 

४. ई. कोलाय  ✔️

🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

प्रश्न.१३. मसाल्यात वापरले जाणारे दगडफूल पुढीलपैकी कोणते आहे.?

१. उस्निया

२. पारमेलिया  ✔️

३. ब्राओरिया

४. लँमिनारिया

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆💠💠💠💠💠💠💠💠💠💠

प्रश्न.१४. सूर्यफूल ही ------ वनस्पती आहे.?

१. अनावृत्तबीजी 

२. एकबीजपत्री

३. नेचोद्रभिदी

४. द्वीबीजपत्री  ✔️

💠💠💠💠💠💠💠💠💠💠🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रश्न.१५. डीएनए मध्ये थायमीन (T) हा नेहमी कुठल्या नत्र घटकाशी जोडी बनवतो.?

१. सायटोसिन

२. ग्वानाईन

३. अॕडेनाईन  ✔️

४. थायमीन


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝

प्रश्न.१६. पुढीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॕलरीज मिळतात.?

१. एक कप आईस्क्रीम ✔️

२. एक कप सरबत

३. एक कप दूध

४. एक कप आंब्याचा रस

🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🥝🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒

प्रश्न.१७. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही.?

१. क्षयरोग

२. हिवताप  ✔️

३. विषमज्वर 

४. यकृतदाह

🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🎒🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺

प्रश्न.१८. L-Dopa हे औषध पुढीलपैकी कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.?

१. टि.बी.  

२. कँन्सर

३. पार्किन्सन्स✔️

४. मलेरिया

🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🚺🍂🍂🎍🍂🍂🎍🍂🍂🎍🍂

प्रश्न. १९. मिलिट्री व औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे RDX निर्माण करण्यासाठी पुढील कोणती पद्धती वापरली जात नाही.?

१. बाखमन पद्धती 

२. वुलविच पद्धती 

३. नायट्रेशन पद्धती

४. थिओडोलाईट पद्धती ✔️

इतिहास प्रश्नोत्तरे



1) सरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?

अ) जोसेफ मॅझीन 

ब) नेपोलियन 

क) बिस्मार्क ✅

ड) चर्चिल


2)’अ‍ॅट द फिट ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) जवाहरलाल नेहरू 

ब) मौलाना आझाद 

क) वल्लभभाई पटेल 

ड) डॉ. राजेंद्र प्रसाद✅


3) अरब-इस्त्रायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी कशी राहिली?

अ) अरब राष्ट्रांना अनुकूल✅

 ब) अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे 

क) रशियाच्या भूमिकेप्रमाणे 

ड) इस्त्रायलला अनुकूल


4) पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल कोण होते?

अ) लॉर्ड माऊंट बॅटन 

ब) लियाकत अली 

क) बॅ. महम्मद अली जिना ✅

ड) महम्मद इकबाल


5) इंदिरा गांधी सर्वप्रथम किती साली पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या?

अ) 1964 

ब) 1965 

क) 1966 ✅

ड) 1967


6) खालीलपैकी कोणाचे नाव गरीब हटाव या घोषणेशी जोडता येईल?

अ) मोरारजी देसाई 

ब) इंदिरा गांधी ✅

क) राजीव गांधी 

ड) लाल बहादूर शास्त्री


7) चले जावच्या चळवळीत महात्मा गांधींनी भारतातील जनतेस कोणता मंत्र दिला होता?

अ) मरा किंवा जिंका 

ब) करा किंवा मरा ✅

क) जिंका किंवा मरा 

ड) मारा किंवा जिंका


8) खालीलपैकी कोणास मुस्लिम लिगचे संस्थापक म्हणून ओळखतो?

अ) नवाब सलिमुल्ला ✅

ब) बॅ. मोहम्मद अली जिना 

क) आगा खान 

ड) सर सय्यद अहमद खान


9) गांधी आणि लेनीन या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) वसंतराव तुळपुळे 

ब) नारायणराव लोखंडे 

क) राममनोहर लोहिया 

ड) श्रीपाद अमृत डांगे✅


10) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता?

अ) दापोलीजवळ आंबावडे 

ब) इंदुरजवळ महू ✅

क) मराठवाड्यात औरंगाबाद 

ड) रत्नागिरीजवळ चिखली

प्रश्नसंच


1. कोणत्या राज्याला 28 ऑगस्ट 2018 पासून आणखी सहा महिन्यासाठी "अशांत शेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे?

A) बिहार      

B) आसाम 💬      

C) अरुणाचल प्रदेश        

D) सिक्किम


2. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कोणत्या सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता?

A) 1931💬      

B) 1971          

C) 1951        

D) 1961


3. यावर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?

A) फ्रान्सिस दिब्रिटो                  

B) रामकृष्ण महाराज लहवितकर    

C) किसन महाराज साखरे💬    

D) रामकृष्ण महाराज बोधले


4. जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकांच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

A) चीन 💬        

B) ब्राझील          

C) भारत          

D) अमेरिका


5. BIMSTEC या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A) 1991          

B) 1996        

C) 1997💬      

D) 1998


6. कोणता देश 29व्या " अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक " मेळाव्याचा (ADIBF) " सन्माननीय पाहुणा " आहे?

A) बांग्लादेश        

B)  इराण          

C) भारत 💬        

D) पाकिस्तान


7. कोणत्या भारतीयास UN च्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केले गेले आहे?

A) सत्या त्रिपाठी💬        

B) प्रज्ञा झा        

C) शशी थरूर        

D) यापैकी नाही


8. भारतातील किती राज्यांमध्ये सध्या विधानपरिषद अस्तित्वात आहे?

A) पाच          

B) सहा          

C) सात💬        

D) आठ


9. कोणत्या हवाई वाहतूक कंपनीने नुकताच जैवइंधनावर विमान वाहतुकीचा  प्रयोग यशस्वी केला आहे?

A) इंडिगो        

B) स्पाइस जेट 💬    

C) एअर इंडिया        

D) गो एअर


10.  "अटल जी ने कहा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी      

B) ब्रिजेंद्रा रेही 💬      

C) व्ही एस नाईक        

D) सत्येन्द्र अगरवाल



11. चर्चेत असलेली नाओमी ओसाका ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?

A) जपान 💬    

B) अमेरिका      

C) इंग्लंड      

D) सर्बिया


12. "अभयम-181" या नावाचे मोबाईल अॅप हे महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने कोणत्या राज्य सरकारने लॉंच केले आहे?

A) गुजरात💬      

B) महाराष्ट्र      

C) मध्य प्रदेश    

D) तामिळनाडू


13. कम्युनिशंस कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी एग्रीमेंट(COMCASA) हा करार खालील कोणत्या दोन देशात झाला?

A) भारत - फ्रान्स    

B) भारत - जपान      

C) जपान - अमेरिका    

D) भारत - अमेरिका💬


14. रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असून ते सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहे?

A) 44      

B) 45      

C) 46💬    

D) 47


15. खालीलपैकी कोणत्या देशाने ' NOPE ' या मंगळ मोहिमेची घोषणा केली आहे?

A) इस्राईल      

B) यूएई 💬      

C) सौदी अरेबिया          

D) इराण


16. नुकताच निवृत्त झालेला क्रिकेटपटू ऍलिस्टर कुक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

A) दक्षिण आफ्रिका        

B) ऑस्ट्रेलिया      

C) वेस्ट इंडिज      

D) इंग्लंड💬


17. भारतात प्रथमच भरविण्यात आलेल्या 'FIBA 3×3 world tour master' ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A) बास्केटबॉल 💬      

B) बॉक्सिंग    

C) ब्रिज      

D) बॅटमिंटन


18.  भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये कोणत्या संघाला नमवत ब्राँझ पदक मिळविले?

A) जपान      

B) दक्षिण कोरिया    

C) पाकिस्तान💬    

D) फिलिपिन्स


19. "Moving on, moving forward : A year in office" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) व्यंकय्या नायडू 💬    

B) रामनाथ कोविंद    

C) सुमित्रा महाजन    

D) अरुण जेटली


20. नुकतेच निधन झालेले आर्थर परेरा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

A) बुद्धिबळ      

B) बॅटमिंटन      

C) फुटबॉल💬      

D) टेनिस


21. राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणारा 2016- 17 चा " तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम " या पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीस मिळाला?

A) शेळगाव गौरी    

B) मन्याचीवाडी      

C) हिवरे बाजार 💬    

D) खाटाव


22. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी कोणास देण्यात आला?

A) विजय भटकर      

B) गिरीश प्रभुणे      

C)सुहास बहुळकर 💬        

D) यापैकी नाही


23. दुसरी "जागतिक हिंदू परिषद" कुठे पार पडली?

A) नवी दिल्ली        

B) लंडन        

C) शिकागो 💬      

D) न्यूयॉर्क



 1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित न्हवती

ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या

ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.

1.अ आणि ब

2. ब आणि क

3. अ आणि ड✅

4  वरील सर्व


2.खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही

1. भारतीय प्रशासकीय सेवा 

2. भारतीय पोलीस सेवा

3. भारतीय विदेश सेवा✅

4. भारतीय वन सेवा


3.घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

1. सिमला परिषद

2. कॅबिनेट मशीन✅

3. क्रिप्स योजना

4.यापैकी नाही



4.राज्यपालांची नेमणूक कोण करतात?

1. पंतप्रधान

2. मुख्यमंत्री

3. राष्ट्रपती✅

4. उपराष्ट्रपती


5.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1.लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत

2.राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत✅

3. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो

4. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे.


6.राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

1. राष्ट्रपती

2. पंतप्रधान

3 उपराष्ट्रपती✅

4. गृहमंत्री


7.भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे ......

1. कल्याणकारी राज्याची निर्मिती✅

2. समाजवादी व निधर्मी समाज रचना

3. व्यक्तीस्वातंत्र्याची हमी

4. मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध


8.भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?

1. भारतीय नियोजन आयोग

2. भारतीय निवडणूक आयोग

3. संघ लोकसेवा आयोग

4. भारतीय वित्त आयोग✅


9.वन हा विषय कोणत्या सुचितील आहे?

1. केंद्र

2. राज्य✅

3. समवर्ती

4. यापैकी सर्व


10.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास ....

1. अंदाजपत्रक दुरुस्त करून फेरसादर केले जाते 

2. राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता पाठविले जाते 

3. राष्ट्रपतींचे अभिप्रायासाठी पाठविले जाते

4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.


प्रश्न 1 मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकचा ठरला आहे?

A  कोल्हापूर 

B  सातारा  

C  पुणे 

D  नाशिक 

उत्तर  2


प्रश्न 2  इम्रान खान हे पाकिस्तान या देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता तेहरिक-ए-इन्साफ याची स्थापना पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती?

A  14 ऑगस्ट 1993

B  16  जुलै  1996

C  22 एप्रिल 1996

D  16 ऑक्टोबर 1998

उत्तर  C


प्रश्न 3  पुढील विधाने अभ्यासा?

अ  इस्रोने 23 नोवेंबर 2018 रोजी तीस उपग्रह अवकाशात सोडले

ब 30 पैकी पंचवीस उपग्रह हे अमेरिकेचे आहेत

क या मोहिमेत भारतासह एकूण दहा देश सहभागी आहेत

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे

1  फक्त अ

2  ब आणि  क

3  फक्त  क

4  अ आणि  ब

उत्तर  4


प्र 4  इसरो ने जे 30 उपग्रह सोडले त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?

1  अमेरिका

2   जपान

3   स्पेन

4   नेदरलँड

उत्तर  2


प्र  5 हाइपर सपेक्ट्रल इमेजिंग सॅटॅलाइट हा उपग्रह कोणत्या  कोणत्या देशाने विकसित केला आहे?

1  फ्रांस

2  रशिया

3  भारत

4   चीन

उत्तर  3


प्र  6  इंडियन पोस्टल पेमेंट बँक ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती?

1   पुणे

2   रांची

3  अलाहाबाद

4  लखनऊ

उत्तर  2


प्र  7   पुढील पैकी कोणती बँक ही ग्राहकांना क्रेडिट कार्ड सेवा पुरवत नाही?

1  बंधन बँक

2  देना बँक

3  महाराष्ट्र ग्रामीण बँक

4  पोस्टल पेमेंट बँक

उत्तर 4


8  वारसा यादीत पुढिलपैकी कोणत्या रेल्वेचा समावेश होत नाही?

1  निलगिरी

2  दार्जिलिंग

3  पठाणकोट

4  कलका

उत्तर  3


प्र  9  नुकतेच भारतीय रेल्वे ने कोणत्या देशाच्या रेल्वे सोबत करारावर हस्ताक्षर केले? 

1  चीन

2  रशिया

3  नेपाळ

4  म्यानमार

उत्तर  3


प्र  10  महाराष्ट्रत पहिला समलिंगी विवाह कोठे पार पडला?

1  नाशिक

2  नागपूर

3  यवतमाळ

4  पुणे

उत्तर 3 


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९

Latest post

नचिकेत मोर समिती.

स्थापना - Sept 2013 - RBI ने स्थापन केलेली. अहवाल - 2014 लघुव्यवसाय व कमी उत्पन्न कुटुंबांनी एकात्मिक वित्तीय सेवा समिती. शिफारशी - A) प्रत्...