Tuesday, 3 January 2023

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.
मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.

 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.
1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.
हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.
सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.
आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.

संस्थात्मक योगदान :

1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.
1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.
2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)
24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.
ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.
1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.
1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.
मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.
20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.

आंबेडकरांचे लेखन :

The Problem Of Rupee
1916 - Cast In India
1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)
1946 - The Untouchables
1956 - Thoughts on pakisthan.
1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.
'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.
1920 - मुकनायक.
1927 - समता.
1946 - Who Were Shudras?

वैशिष्ट्ये :

गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.
1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.
1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.
1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.
29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.
1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.
14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

लहान आतडे



🔹अन्नलिकेचा सर्वात लांब भाग


🔸वयासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी


🔹लांबी : 5 ते 6 मीटर 


🔸3 मुख्य भाग :-


1)अध्यात्र


2)मध्यांत्र


3)शेषांत्र


🔹संबंधित ग्रंथी :-


- स्वादुपिंड


- स्वादुरस स्त्रावते


🔸3 प्रमुख विकर असतात


🔘आमयलेज :-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये


🔘ट्रिपसिन :-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये


🔘लायपेज :-मेद पचन मेदाम्ले मध्ये


पचनसंस्था


★ पचनसंंस्थेत अन्ननलिका व पाचक  ग्रंथी यांचा समावेश असतो.

★ अन्ननलिका :- एकूण लांबी ९५० सेंमी ( ३२ फूट) 

★टप्पे :- 

१) मुखवास ( Buccal cavity)

२) ग्रासनी (Throat)

३) ग्रासिका (Oesophagus)

४) जठर ( stomach)

५) लहान आतडे (Small Intestine ) 

६) मोठे आतडे ( large Intestine )


🔸 मुखवास (Mouth ) 


● लाळ (saliva ) :- लाळ ग्रंथी 3

१) कर्णमूल ग्रंथी ( parotid gland )

२) अधोहणू ग्रंथी ( Sub- mandibular gland ) 

३) अधोजिव्हा ग्रंथी ( Sub lingual gland )

● या टप्प्यात अन्नाचे चवरण होते आणि त्यात लाळ मिसळते.

●लाळ किंचित आम्लधर्मी असते ,त्यामुळे अन्नातील जंतूंचा नास होतो.

●लाळे मध्ये टायलीन नावाचे विकर असते.हे विकर स्टार्चचे रूपांतर माल्टोज मधे करते.


🔸 गरासनी :- 


●ग्रासनी मध्ये अन्न व श्वसननलिका असते.

●श्वासनलीकेच्या तोंडावर epiglotis नावाचा पडदा असतो.हा पडदा अन्नाचा कण श्वसन्नलिकेत जाऊ देत नाही.


🔸 ग्रासिका :- 


● घश्यापासून जठरपर्यंत असते 

● तिची लांबी २५ सेमी 

●अन्न अन्ननलिकेत आल्यावर जठरात पोहचण्यासाठी सुमारे ८ सेकंद  लागतात.

●अन्ननलिकेतील स्नायू अंकूचन आणि प्रसरण होऊन अन्नाला पुढे ढकलतात.


🔸 जठर :- 

●स्थान - पोटात डावीकडे

●जठरामद्ये लक्षतावधी जाठर ग्रंथी ( grastic gland ) असतात. 

●जठरात अन्न सुमारे 5 तास थांबते.

●जठर ग्रंथीतून पुढील गोष्टी स्त्रावतात - 

१) जठर रस :-  

●यात Pepsin व  Renin ही दोन विकार असतात.

२) हायड्रोक्लिरीक ऍसिड - 

●अन्नातील जंतूंचा नाश

● पेप्सीन प्रोटीनचे रूपांतर peptonce मध्ये करते. 

● रेनिन हे विकर फक्त लहान मुलांमध्येच आढळत.हे विकर दुधातील केसीनचे रूपांतर पराकेसीन करते. 

●जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण होत नाही.फक्त पाणी ,अल्कोहोल व औषध यांचे शोषण होते.


🔸 लहान आतडे :- 


●लांबी - २० - २५ फूट

● शरीरातील सर्वांत लांब अवयव

● अन्नाचे मुख्यत्वे पचन येथे होते,उरलेले अन्न ६-८ तास रहाते .

● येथील अन्नमध्ये पुढील रसायने मिसळतात.

१)लायपेज 

२) अमायलेज {ठोस अन्नतील पोषक द्रव्यांचे शोषण}

३) ट्रीप्सिन

४) पित्तरस - मेदाचे विघटन

( पित्त रस यकृतात तयार होतो)


🔸 मोठे आतडे :- 


●लांबी - १.५ मी 

● मोठ्या आतड्यात द्रव अन्नातील पोषक द्रव्ये शोषले जातात. आणि त्याचे रुपांतर ग्लुकोज मध्ये होते.

● मोठया आतड्याच्या सुरवातीला एक नळी असते. त्या नळीला Apendix असे म्हणतात. 

ही नळचा अन्नपचनातील कोणत्याही कार्यात सहभाग होत नाही.

●  अशा प्रकारे अन्नातून ग्लुकोज ही उर्जा मुक्त होते आणि अन्नातील अनावश्यक भाग सौच्यामार्फत बाहेर टाकले जाते।

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?

अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे 

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️

________________________

2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

________________________

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

________________________

4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

________________________

5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे 

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

________________________

6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

________________________

7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड 

 D. फिनॉल.

________________________


8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.

_______________


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.



*‘दिनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?* 


 A) महात्मा ज्योतिबा फुले ✅

 B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 C) म. गो. रानडे 

 D) यापैकी नाही


*खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही?* 


 A) पैठण 

 B) नाशिक 

 C) वर्धा ✅

 D) यापैकी नाही


*नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?* 


 A) उपनगराध्यक्ष 

 B) विभागीय आयुक्त ✅

 C) मुख्याधिकारी 

 D) यापैकी नाही


*‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अँस्ट्रो फिजिक्स’ हि संस्था कोठे आहे?* 


 A) मुंबई 

 B) बंगळूर ✅

 C) दिल्ली 

 D) यापैकी नाही


डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?


 A) गुजरात 

 B) महाराष्ट्र 

 C) कर्नाटक 

 D) गोवा✅


‘रामगुंडम’ औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?


 A) तामिळनाडू 

 B) गुजरात 

 C) तेलंगणा ✅

 D) केरळ


नदी गावाजवळून वाहत होती’ या वाक्यात विधेय विभाग कोणता?


 A) गावाजवळून वाहत होती. ✅

 B) होती. 

 C) वाहत होती. 

 D) नदी वाहत होती.


खालील वाक्यातील काळ ओळखा.“आम्ही सिनेमा पाहत आहोत?”


 A) अपूर्ण वर्तमानकाळ ✅

 B) पूर्ण वर्तमानकाळ 

 C) अपूर्ण भूतकाळ 

 D) अपूर्ण भविष्यकाळ

भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास.



●पहिला राष्ट्रध्वज : १९०२ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. 


●हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.


● हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.


●द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.


● या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.


● हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.


● यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.


●वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.


● खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.


●मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.


●तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.


● या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.


● या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.


● झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.


● या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.


●चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.


● या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.


● पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.


● या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला. 


●१९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.


● सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.


● दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.


● राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.


● अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.


● राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.


● मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.


● राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.


● "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.


● हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.

या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.


●१९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.


● १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.

गांधी युगातील महत्वाच्या घटना :





🔶गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) –

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

साराबंधी चळवळ (सन 1918) –

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) –

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.

फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.

या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

4. सायमन कमिशन (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.

5. नेहरू रिपोर्ट (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्राचा भूगोल


✳️पराकृतिक विभाग


१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश


२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा


३. महाराष्ट्राचे पठार


४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली


🅾️पश्चिम वाहिनी नद्या


१. तापी-पूर्णा नदी प्रणाली


२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या


१. प्राणहिता नदी प्रणाली


२. गोदावरी नदी प्रणाली


३. कृष्णा नदी प्रणाली


४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान


महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक


१. भौगोलिक स्थान


२. अक्षवृत्तीय विस्तार


३. मोसमी वारे


४. सागरी सान्निध्य


५. प्राकृतिक रचना


✳️मदा


१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)


२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)


३. खोल काळी मृदा


४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा


५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा


६. पिवळसर तपकिरी मृदा


७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा


८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती


महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:


१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती


३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


४. आर्द्र-पानझडी वनस्पती


५. शुष्क पानझडी वनस्पती


६. रूक्ष काटेरी वनस्पती


७. खाजण वनस्पती

मातीचे प्रकार व स्थान


गाळाची मृदा

सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.


काळी मृदा 

दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.


तांबडी मृदा

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.


वाळवंटी मृदा 

राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.


गाळाची मृदा 

नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.

Police bharti question set

🔰 1) राजाराम मोहन रॉय यांना राजा हि पदवी कोणी दिली 

1)देंवेंद्रनाथ टागोर 

2)नेताजी बोस

3)अकबर✅✅

4)डॉ़ सेन

____________________________


🔰 2)राणी लक्ष्मीबाई पूर्ण नाव काय 

1)लक्षमीबाई महादेव जानकर 

2)मणकणिका मोरोपंत तांबे ✅✅

3)राणी पांडूरंग माने

4)लक्षमीबाई महादेव थोरात

__________________


🔰 3)कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उदृगार कोणाचे आहे 

1)नेहरू

2)गांधी

3)लालबहादूर शास्त्री✅✅

4)इंदिरा गांधी

____________________________


🔰 4)चले जाव ठराव कोणत्या अधिवेशन मंजूर करण्यात आला 

1)मुंबई

2)पुणे

3)वधाँ✅✅

4)कलकत्त

____________________________


🔰5)पाकिस्तान हा शब्द कोणत्या पुस्तकात वाचायला मिळाला

1)never Pakistan 

2)no in pictures 

3)Now or Never ✅✅

4)some of the entire

 


MTDC चा अर्थ काय?

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ

B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅

C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ

D) यापैकी नाही


महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.

A) पोलीस मित्र

B) जागर

C) दक्षता ✅✅

D) यापैकी नाही


पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात  आहे.

A) तिसरे

B) दुसरे

C) चौथे

D) पाचवे ✅✅


भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?

A) १० ✅✅

B) ७

C) ५

D) ११


भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

A) आग्नेय ✅✅

B) ईशान्य

C) नैॠत्य

D) वायव्य


भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

A) पोर्तुगीज ✅✅

B) इंग्रज

C) डच

D) फ्रेंच


मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.

A) ४६ ✅✅

B) ४४

C) ३२

D) ५२


भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

A) लक्षद्वीप

B) मालदीव

C) छागोस

D) अंदमान ✅✅


‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.

A) कर्नाटका

B) राजस्थान ✅✅

C) बिहार

D) गुजरात


आम्ल पदार्थाची चव कशी असते?

A) खारट

B) आंबट ✅✅

C) तुरट

D) गोड


नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.

A) मुंबई

B) औंरंगाबाद

C) पुणे ✅✅

D) नागपूर


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

A) रासबिहारी बोस ✅✅

B) चंद्रशेखर आझाद

C) सुभाषचंद्र बोस

D) रामप्रसाद बिस्मिल


भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?

A) २४ डिसेंम्बर ✅✅

B) १५ मार्च

C) १ जुलै

D) २ आक्टोबर


I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?

A) भारत

B) पाकिस्तान ✅👌

C) अमेरिका

D) रशिया


अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च

A) जागतिक जल दिन ✅✅

B) साक्षरता दिन

C) जागतिक महिला दिन

D) जागतिक एड्स दिन


‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

A) द्वित

B) अग्रज

C) अनुज

D) द्विज ✅✅


‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.

A) गोल्फ

B) बुद्धिबळ

C) हाॅकि

D) बॅटमिंटन ✅✅


भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

B) विक्रम साराभाई ✅✅

C) सतीश धवन

D) माधवन नायर


अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?

A) विशाखापट्टणम

B) मालदीव

C) छागोस

D) पोर्ट ब्लेअर ✅✅


‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) उसने अवसान आणणे

B) सतत त्रास होणे

C) यातायात करणे ✅✅

D) अतिशय काळजी घेणे


कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?

A) शांताराम नांदगावकर

B) जोतीबा फुले

C) जगदीश खेबुडकर

D) सुरेश भट्ट ✅✅


हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.

A) माईन काम्फ ✅✅

B) दास कॅपिटल

C) तरुण तुर्क

D) आपला लढा


‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) भुरळ पडणे✅✅

B) बेशुद्ध पडणे

C) मती नष्ट होणे

D) हरवणे


‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.

A) कपिल देव

B) सुनील गावसकर

C) सचिन तेंदुलकर ✅✅

D) अॅडम गिल ख्रिस्ट


क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?

A) वाॅशिंग्टन

B) रोम

C) न्यूयाॅर्क

D) माॅस्को ✅✅

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


▪️भवैज्ञानिक इतिहास


सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


▪️भविशेष


सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.


सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.

म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.


तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.


पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.


चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.


पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.


▪️नदया


भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.


सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.


कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.


तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.


पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.


सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.


▪️हवामान


समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.


बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.


▪️वने


पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.


सस.पासून  सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :


(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.


(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.


(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).


(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.


(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी  राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.


(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.


(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.


सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.


सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.


वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.

पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.


▪️जवविविधता


पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.


भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.


पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.


निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.


कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.


ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.


कोहिमा लढाई.



🅾️१६-एप्रिल १८च्या दरम्यान ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.


🅾️ या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली पण कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मेच्या मध्यापासून जून २२ पर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणार्‍या जपानी सैन्याला मागे रेटत रस्ता काबीज केला.


🅾️ तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी मैल दगड १०९ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.


🅾️  इ.स. १९४४च्या सुरुवातीस युनायटेड किंग्डमने भारतातून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश) आणि तेथून आग्नेय आशियामध्ये ठाण मांडून बसलेल्या जपान्यांना हुसकावण्यासाठीची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी ईशान्य भारतातील मिझोरम प्रदेशातील इंफाळ शहरात आपले इंडियन फोर्थ कोअर हे सैन्यदल जमवले होते.


🅾️ याला काटशह देण्यासाठी जपानने उ-गो मोहीम या नावाखाली प्रतिआक्रमण करण्याचे ठरवले.


🅾️ जपानच्या पंधराव्या सैन्यदलाच्या मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची याने या मोहिमेला अधिक मोठे करण्याचे ठरवले.


🅾️ मतागुचीच्या आराखड्याप्रमाणे जपानी सैन्य फक्त चौथ्या कोअरला अडवण्यासाठी नाही तर ब्रिटिश भारतावर आक्रमण करण्यासाठीच चालून जाणार होते. यात ईशान्य भारतातून घुसून थेट भारताच्या मध्यापर्यंत धडक मारण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही होते.

मान्सूनचे स्वरूप


*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल* 


*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण* 


*क) मान्सूनचा खंड*


*ड) मान्सूनचे निर्गमन*


*🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल*


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


*🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण* 


*1) आर्द काल व शुष्क काल*

👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


*2 पाऊसचे  वितरण*


👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .


👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

*3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध*


👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;


*👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*


👉  पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


*🚺क) मान्सूनचा खंड* 


*👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*

पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....


🔹 पाऊस घेऊन येणारे *उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने* अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 


🔹उत्तर भारतात *मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे* पाऊस पडत नाही.


🔹भारताच्या *पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील* तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 

*🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे*

 पाऊस पडत नाही . 

तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


*🚺ड) मान्सूनचे निर्गमन*


👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते . *मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

ब्रह्मपुत्र नदी



◆आशियातील ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. लांबी २,९०० किमी. पाणलोट क्षेत्र ९,३५,५०० चौ. किमी. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत सस. पासून ७,२०० मी. उंचीवर (८२० १०’ पू. रेखांश व ३०० ३१ ’ उ. अक्षांश) चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते.

◆हे उगमस्थान मानसरोवरापासून सु. १०० किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून सु. १६० किमी. अंतरावर आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.

◆भारतात ब्रह्मपुत्र महानद असाच या नदीचा निर्देश करण्यात येत असे. या नदीशी अनेक आख्यायिका निगडित असून त्या महाभारत कालिकापुराण कालिदासाचा रघुवंश यांसारख्या संस्कृत साहित्यातूनआढळतात. ‘लौहित्य’ (म्हणजे लाल रंगाची) असेही तिचे नाव असून परशुरामाने क्षत्रिय संहाराने रक्तरंजित झालेला परशू ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात धुतल्याने तिचे पाणी लाल झाले, अशी एक आख्यायिका आहे.

◆आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्याच’ म्हणून तिचा उल्लेख करतात.

◆ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखत असून तिबेटमध्ये तिला काही स्थानिक नावेही आहेत.

◆उगमानंतर ही नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेमी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व देशेने वाहत जाते. तिबेट मधील ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण प्रवाह सु. १,२९० किमी. आहे.

◆या भागातील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदऱ्यांमधून उड्या घेत वाहू लागते. तेथे प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह व प्रपातमाला आढळतात. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते. तिबेटमध्ये त्सांगपोला डावीकडून जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू) तर उजवीकडून न्येन-चू हो (न्यांग) ह्या उपनद्या येऊन मिळतात. चीचू या उपनदीतीरावरच ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण आहे.

◆भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथूनच तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे.

◆आसाममध्ये ब्रह्मापुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोरच मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली या १,२५६.१५ चौ. किमी. क्षेज्ञाच्या बेटाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मपुत्रेला भारतात उत्तरेकडून सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली या उपनद्या येऊन मिळतात. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोऱ्याची लांबी सु. ७५० किमी. व रुंदी सरासरी ८०
बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून तोरसा, जलढाका, तिस्ता या उपनद्या येऊन मिळतात. पुढे गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हाच ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो; तर जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो. तत्पूर्वी जमुनेला बारल, अत्राई, हुरासागर यांचा संयुक्त प्रवाह उजवीकडून येऊन मिळतो.

◆तसेच धालेश्वरी व बडी गंगा या शाखा तिच्यापासून वेगळ्या होऊन स्वतंत्रपणे मेघना नदीला मिळतात. ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो. पुढे पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

◆एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या वरच्या टप्प्याविषयी अज्ञानच होते. किंबहुना त्सांगपो व दिहांग (ब्रह्मपुत्रा) ही एकच नदी आहे. या

जगाविषयी सामान्य ज्ञान


💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.


💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.


💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.


💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.


💠 शरीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.


💠 नपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.


💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.


💠 यशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.


💠जरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.


💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.


💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.


💠 वहॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.


💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.


💠 इग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.


💠लडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.


💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.


💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.


💠 सवित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.


💠 कनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.


💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.


💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.


💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.


💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.


💠 सवीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.


💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.


💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.


💠 नदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.


💠तर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.


💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.


💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.


💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.


💠 लडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.


💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.


💠मक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.


💠 दबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.


💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)


💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.


💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.


💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.


💠 लहासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.


💠 बकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.


💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.


💠 परिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.


💠 लडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.


💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.


💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.


💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.


💠 कनडा सर्वात लांब रस्ते.


💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.


💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.


💠 कनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.


💠 बराझील कॉफी उत्पादनात प्रथम.


💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.


💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.


💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.


💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.


💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.


💠कयुबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.


💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.


💠 मगनीज उत्पादनात रशिया प्रथम.


💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.


💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.


💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.


💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम


💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.


💠अमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.


💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.


💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.


💠इडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.


💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.


💠गरीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.


💠 बराझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.


💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.


💠इग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.


💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा


💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट


💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली


💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस


💠 वहिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.


💠 बरुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.


💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


💠 हग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.


💠 कप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.


💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.


💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.


💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.


💠नपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.


💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.


💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.


💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.


💠मबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.


💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.


💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.


💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.


💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.


💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.


💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ

जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.

प्रश्नमंजुषा

 1. गोविद वल्लभ पंतसागर हा जलाशय ........नदीवरील धरणामुळे तयार झाला आहे. 

1.शोन

2.बेटवा

3.रीहाद🚩

4.कोसी


 2. तांबडा समुद्र  हा ......प्रकारच्या संरचनेतुन तयार झालेला आहे? 

1)वली संरचना

2)लाव्हा संरचना

3)प्रस्तरभंग संरचना

4)अवशिस्त संरचना🚩


 3) काठमांडू हे हवाई मार्गाने ........या शहरापासून सर्वात जवळ आहे? 

1)पाटणा🚩

2)वाराणशी

3)आगरतला

4)दिल्ली


 4)आखाती प्रवाहाच्या उगम......... च्या आखातात होतो? 

1.वास्को

2.मेरिस्को

3.दुबई

4.कॅलिफोर्निया🚩


 5)दामोदर नदीचे खोरे .......च्या खाणीसाठी महत्वाचे आहे? 

1.दगडी कोळसा🚩

2.सोने

3.चांदी

4.जस्त


 *6)स्पेन या देशाची राजधानी...... होय?** 

1)कैरो

2)व्हिएन्ना

3)बॉन

4)माद्रिद🚩



 7) उद्योगाच्या स्थानिकीकरण विषयी 1909 मध्ये सिध्दांत मांडणारा जर्मन शात्र्यंज्ञ कोण?

1)आल्फ्रेड वेबर🚩

2)आल्फ्रेड वेगनर

3)मॉलथस

4)जॉन मेकींदर


 8)खालील पैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत? 

1)गारो

2)खासी

3)जैतीया

4)वरील सर्व🚩


 9. त्सुनामी लाटा निर्माण होण्याचे कारण .........हे आहे? 

1)चक्रीवादळे निमिर्ती

2)fon व चिनुक वारे वाहने

3)सागर तळाशी भूकंप होणें🚩

4)खग्रास सूर्यग्रहण


 10) गेंडा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध उद्यान काझीरंगा........ या राज्यात आहे? 

1)आसाम🚩

2)पश्चिम बंगाल

3)उत्तर प्रदेश

4)अमरावती


 11) महोगणी प्रकारचे वुक्ष कोणत्या ठिकाणी आढळतात? 

1)उष्ण कटिबंधीय अरण्ये🚩

2)समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये

3)मॅगृव्ह अरण्ये

4)पानझडी अरण्ये



 12) इरॉस-433 या लघुग्रहावर उतरणारे नासाच्या (अमेरिका) उपग्रहाचे नाव.......आहे? 

1)नियस शुमाकर🚩

2)चॅलेंजर

3)पाथ फाईडर

4)शुमाकर लेव्ही


 13) चंद्राचा किती टक्के भाग पुथ्वीवरून दिसू शकते? 

1)75%

2)40%

3)59%🚩

4)यापैकी नाही



 14) संपात दिन किंवा आयन दीन केव्हा असतो? 


1)21 मार्च व 22 डिसेंबर

2)4 जानेवारी 22 सप्टेंबर

3)22 डिसेंबर व 22 जून🚩

4)21 मार्च व 23 सप्टेंबर



 15)पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखी निर्मित पर्वत रंगांच्या पाण्यावर आलेल्या पुष्ठभागास ज्वालामुखी निर्मित बेटे म्हणून संबोधले जाते.खालीलपैकी कोणते बेट अशा प्रकारचे उदाहरण म्हणून सांगता येईल? 

1)श्रीलंका

2)इंग्लंड

3)मालदीव

4मॉंरिशस🚩


        

 १६.  देशातील पहिला उभा-उत्थापक पूल (vertical lift bridge) कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? 

 उत्तर : रामेश्वरम(तामिळनाडू)

परदूषण



- हवा प्रदुषन -*
---------_----_-------
हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते
१) नैसर्गिक प्रदुषन  जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते.
अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात.

२) मानवनिर्मित हवा प्रदुषन - जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती इंधन ज्वलनातून सातत्याने प्रदुषन होत असते.
नैसर्गिक प्रदुषनाचे परीनाम त्या त्या भागातच जानवतात अशा संकटांचे प्रमानही त्या मानाने कमी असते. पन मानवनिर्मित हवा प्रदुषनाचे परीनाम सर्वदूर राष्ट्राच्या सीमा ओलांडून होत असतात.
*-विभिन्न प्रदूषकांचे दुष्परीनाम-*
🔸 *कार्बनडायॉक्साईड*
       हा वायू त्या मानाने कमी हानीकारक असुन , सायलंसरमधुन तो बाहेर फेकला गेल्यावर वायूचक्राचा घटक म्हनुन त्यात मिसळून जातो. परंतू तो जागतीक तापमान वाढवन्याचा दुष्परिनाम करत असतो.

🔸 *कार्बन मोनॉक्साइड*
        स्वयंचलित वाहनांमध्ये कार्बोरेटर व थ्रोटल यांच्या सहायाने हवा इंजिन मध्ये जात असते. थ्रोटल या हवेचे प्रमान नियंत्रित करत असतो व कार्बोरेटर या हवेमध्ये पेट्रोल मिसळत असतो. अशी हवा व पेट्रोल इंजिनमध्ये पाठवली जाते , तेंव्हा या मिश्रनाचे आदर्श.  प्रमान १४:५ असे असावे लागते. या आदर्श मिश्रनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बनडायॉर्साइड व पान्याची निर्मिती होते. जर या मीश्रनातील हवेचे प्रमान कमी झाले तर, पेट्रोलच्या संपुर्न ज्वलनाला लागनारा प्रानवायू कमी पडतो. त्यामुळे पेट्रोलचे संपुर्न ज्वलन होत नाहू.त्यामुळे कार्बनडायॉक्साइड  त्याबरोबरच कार्बनमोनॉर्साइड हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. तो रक्तात मिसळला गेला तर रक्तातील प्रानवायूचे प्रमान कमी होते. त्यामुळे शारिरीक क्रिया मंद होत जातात. या प्रदुषकाचा परिनाम मुथ्यत:श्वसन संस्थेवर होत असतो. र्हदयविकारग्रस्त, गर्भवती स्त्रीयाव गर्भ यांना हे प्रदुषक अतिशय घातक आहे.
*उपाय*
कार्बनमोनॉक्साइडची निर्मीती मुळातच कमि व्हावा हाच महत्वाचा उपाय आहे. वाहन इंजिनचे सोग्य प्रकारे ट्युनिंग केल्याने इंधन व हवा यांचे प्रमान योग्य राखले जाउन इंधनाचे संपुर्ण ज्वलन होउ लागले की हा विषारी वायू अत्यल्प प्रमानात निर्मान होइल.

🔸 *अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन*
         इंजिनच्या ज्वलनकक्षेतील इंधन पुर्णपने जळू न शकल्याने अर्धवट किंवा न जळलेले हायड्रोकार्बन्स निर्वात पंपाद्वारे बाहेर फेकले जातात. ' दोन स्ट्रोक ' वर्गातील स्वयंचलित वाहनातून अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन्स निर्मान होन्याते प्रमान जास्त आहे. हे हायड्रोकार्बन्स श्वासाबरोबर शरिरात जाउन कँसर होउ शकतो. त्याचा जास्त दुष्परिनाम फुफ्फुसांवर होतो. या समस्येवर निश्चितपने मात करेल अशी उपाययोजना अद्याप तरी अस्तित्वात नाही.

🔸 *सल्फरडायॉक्साइड*
         इंधनात असलेल्या सल्फर यंयुगांचे ज्वलन झाल्यास हा वायू तयार बोतो. त्यामुळे घशात गुदमरने, नाकातून रक्त येने, , डोळ्यांची आग , खोकला अशा आजारांबरोबर फुफ्फुस व इतर अवयवांना हानी पोचते.

🔸 *नायट्रोजन ऑक्साइड*
      नायट्ट्रोजन्यची ऑक्साइड्स ही इंजनाच्या ज्वलनकक्षात उच्च तापमानाला प्रानवायू व नायट्रोजनच्या संयोगामुळे निर्मान होतात. नायट्रिक ऑक्साइड पासुन आरोग्याला तशी कोनतूही हानी पोचत नसली तरी त्यांचा अधिकांश भाग नायट्रोजन ऑक्साइडमध्ये रबपींतरीत होत असतो. हा वायू अत्यंत विषारी असतो. श्वसन शक्तिवर ते दुष्परिनाम करतात तसेच दृष्टी आणि गंधशक्तिवर ते परीनाम करतात. वातावरनातल्या आर्द्रतेशी त्यांचा संयोग झाला की नायट्रीक आम्ल तयार होते. पावसाच्या थेंबाबरोबर हे आम्ल जमिन प्रदुषित करते. पिके नष्ट करते  पान्याचे साठे प्रदुषित होतात.
----------------------------

*- हवा प्रदुषनावर उपाययोजना -*

१) लोकसंख्येला आळा घालन्यासाठी व्यक्ती, समाज व शासन या पातळायांवर नियोजनपुर्वक काम करायला हवे.

२) प्रदूषक जिथे निर्मान होतात , त्या जागा म्हनजे ऊर्जा प्रकल्प,रासायनिक कारखाने,अशा विविध ठिकानी प्रदूषके निर्मान होतात.तिथे सुरवातिलाच प्रदूषकांच्या निर्मितीवर कडक निसंत्रन ठेवता येने शक्य आहे. तसेच प्रदूषक आणि त्यांची सहनसीमा प्रत्येक उद्योगाने कटाक्षाने पाळली तर हवा प्रदूषनाचे प्रमान निश्चितच कमी होइल.

३) कोळसा ट,डिजल इत्यादींचा वापर करुन उर्जा निर्मान करताना मोठ्या प्रमानात हवेचे प्रदूषन होते. त्याचप्रमाने अणुउर्जा प्रकल्पांमध्ये हानिकारक विकीरनाचा धोका असतो. ही हानी टाळन्यासाठी लौरऊर्जा, पवनऊर्जा, व जैविकऊर्जा , सागरीऊर्जा अशा पारंपारीक ऊर्डास्त्रोतांचा विकास सर्वत्र होने आवश्यक आहे.

४) उत्सर्जित होनारिया उपद्रवकारक वायूंवर प्रक्रिया करून , संस्करन करून ते निरूपद्रवी रसे होतूल यावर संशौधन करायला हवे.

५) एकाच ठिकानी कारखान्यांची गर्दी झाली की , त्या परीसरातील सर्वच वातावरन प्रदूषित होते. त्यासाठू कारखाने विकेंद्रुत स्वरूपात निर्मान करन्याची गरज आहे.

६) कारखान्यांतून बाहेर पडनार्या विषारी वायुंवर व सुक्ष्म कनांवर , ते बाहेर पडन्या आधिच प्रक्रिया करन्याची यंत्रना सूक्ष्मपने सुरु असने आवश्यक आहे.

७) प्रत्येक लहानमोठ्या कारखान्या भोवती हरीतपट्टा निर्मान करन्याची कडक नियम व अमलबजावनी हवी.

८) लोकजागृती ही अत्यंत महत्वाची बाब असल्याने लोकशिक्षनातून जागृतीची मोहिम सातत्यानेवचालू रहायला हवी.

९) वाहनांची देखभाल स्वत:च कशी केली पाहीजे याची माहिती वाहन चालकांना करून घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

- जलप्रदूषन कारने-*

१) *दैनंदिन वापरातून प्रदूषन* -
      दैनंदिन स्वच्छता, कपडे,धुणे,भांडी घासने यामध्ये डिटर्जंट ,साबन,रासायनिक द्रव्य यांचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषित झालेले पाणी ड्रेनेजमार्फत नदिला मिळते. मलमूत्रही त्यात असते. ड्रेनेदची सोय नसलेल्या ठिकानचे सांडपाणी जमिनीत मुरुन भूगर्भातील पाणी साठ्यात मिसळते. त्यांमुळे तलाव व विहिरींचे पाणी दूषित होते.

२) *औद्योगीक अपशिष्टे*
          कारखान्यांमध्ये पाण्याचा अनेक कारनांसाठी वापर केला जातो. वापरलेले अशुद्ध पाणी तसेच रसायने , वंगने,तेल,शिशे,लोखंड इत्यादी धातूंचे सुक्ष्म कन अल्केहोल,साखर,कागद या उद्योगातील टाकाउ पदार्थ तसेच गंधक आम्लांचे अंश अशी विभिन्न स्वरूपातील अपशिष्टे म्हनजेच टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी कारखान्यातून बाहेर सोडले जाते. ते नदी , नाले, तवाव इत्यादीतवमिसळले की ते पान्याचे स्त्रोत प्रदूषित होतात.

३) *किटकनाशके व खते*
      उत्पादन वाढीसाठी शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांचा फवारन ी साठी उपयोग केला जातो. यातिल काही अंशच वनस्पति शौषुन घेतात व उरलेले हवेत मिसळतात.द्रवरूपातील उरलेली नाशके जमिनीत,पान्यात विरघळतात. पाऊस पडताना ही नाशके जमिनीखाली जातात किंवा वाहुन नदी नाल्यांना मिळतातअशा विषारी द्रव्यांमुळे हवा , पाणी व जमिन प्रदूषित होते.

४) *वातावरनातील प्रदुषके*
         उद्योगधंद्यामुळे निर्मान झालेली प्रदुषके वातावरनात असतात. ते पावसाबरोबर खाली पोचतात. हे प्रदूषित पानी नदी नाल्यांना मिळते त्यामुळे जल प्रदुषन होते.

५) *खनिज तेल*
       तेल वाहतुक करनार्या जहाजातून  गळती होते. जहाजाचा अपघात झाल्यास तेल संपुर्न समुद्रावर पसरते. त्यामुळे शेकडो मैल समुद्राचे प्रदूषन होते. यमुद्रात्या पान्यात तेल तवंगामुळे प्रानवायू समुद्रात पोचत नाही. त्यामुळे जलचरांची हानी होते. पृष्ठभागावर वावरनार्या पानपक्षाच्या पंखांना तेल चिकचून राहिल्याने ते उडू शकत नाहीत. त्यांची जिवितहानी होते.

६) नद्यांमध्ये मृत प्राणी, अर्धवट जळालेली प्रेते, निर्माल्य राख, उत्सवातील मुर्ती, प्लास्टिक कचरा, मलमुत्र विसर्जन, अशा अनेक गौष्टी टाकल्या जातात. त्यामुळे दल प्रदुषन होते

 जलप्रदुषन नियंत्रण आणि उपाय -*

*🔸-सार्वजनिक उपाय-*
१) विहिरी व जलाशयांमध्ये तुरटी,पोच्याशियम परमँगन्ट टाकने.

२) विहीरी व तलावांची नियमित सफाई करने , बंदिस्त करने.

३) विहिरीत उतरन्यासाठी असलेला मार्ग बंद करने

४) जलाशयांजवळील सांडपान्याचे मार्ग बंदवकरने

५) फिल्टर पद्धतिचा अवलंब करने

*🔸- भौतिक पद्धती -*
१) पाणी काहीकाळ स्थिर ठेवने त्याने अशुद्ध पदार्थ तळाला बसतात. चांगले पाणी वर राहते.

२) पाणी उकळुन घेतल्याने त्यातिल जिवानु नष्ट होतात. हे पाणी बेचव असले तरी पिन्यास योग्य असते. ही पद्धति घरगुती स्वरूपात सोयीची आहे.

३) पाणी उकळुन वाफ करने व ती थंड करुन पाणी करने या पद्धतिने शुद्ध व गुनकारी पाणी मिळते. अशा पान्याचा उपयोग औषधनिर्मीती मध्ये करतात.

*🔸- रासायनिक पद्धती -*
     १)    गढुळ पाणी शुद्ध करन्यासाठी तुरटी फिरवतात. त्यामुळे माती, नविरगळनारे कन आणि ब्याक्टेरिया तळाशी बसतात.
     दुसर्या प्रकारात पोटँशियम परमँगनेट , क्लोरिन ग्यास, चुना, आयोडिन, ब्लिचिंग पावडर यांसारखिया किटानुनाशक पदार्थांना पान्यात मिसळून ब्याक्टेरियासारखे किटाऩु नष्ट केले दातात.

*🔸- यांत्रिक पद्धति -*
१) मलमुत्रव टाकाउ पदार्थ , उतर सांडपाणी नाल्यात व समुद्रात सोडन्यापुर्वी त्यावर प्रकि्रिया करून मगच सोडायला हवे.

२) पाणी प्रदुषित होन्यासारख्या जागा हेरुन त्या ठिकानी पानी परीक्षनीची सोय होने आवश्यक आहे.

३) प्रदुषके सेडनारे उद्योग व कारखान्यांनी प्रक्रिया संयंत्रे उभारुन ती कार्यरत ठेवायला हवीत.
------------------------------------------------------------------------------------------------

- भूमी प्रदूषन -*
*- कारणे -*

जमिनीचा गैरवापर यामुळे तिच्या प्रतित बदल घडतात. अगदी सुरवातीला मानव शिकार करुन जगत होता. नंतर शेतीचा शौध लावून तो स्थिर झाला. शेतीसाठी मानवाने अरण्ये तोडली आणि आता घर, कारखाने, खानी,धरने अशा गरजा भागवन्यासाठी उत्तम प्रतिची शेतदमिनही वापरली जात आहे.
खते व कीटकन

MPSC Science, [14.08.16 17:11]
ाशके व पाऩी यांचा जमिनीतलअतिवापरामुळे ती जमिन क्षारपज जमिन होत चालली आहे.
            भूप्रदुषनाची प्रमुख कारने जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळनी आणि बेफिकीरी ही असली तरी इतर ही कारनांनी भुप्रदुषन होते.जसे घरगुती व सार्वजनिक कचरा ,सांजपानी,औद्योगिक कचरा, वापरवेली टाकाऊ रसायने, कृषी कचरा खते , कुटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्यांचा ढीग वाढत दातो. त्यामुळे दमिनीची गुणवता खालावत जाउन ती नापीक होते.

*- भूप्रदुषनावरील उपाय -*

१) सेंद्रियव जैविक खतांचा वापर करने. कीटकनाशके व तननाशकांचा अनावश्यक वापर टाळने.

२) जमिनीला बाध घालने.

३) बाजूने चर खनने. त्यामुळे पिकांना दिलेले पाणी जादा झाल्यास ते जमिनीतुन बाहेर पडू शकत्य त्यामुळे जमिन पीनथळ होत नाही.

४) जमिनीवर विविध जातींची झाडे लावावीत. एकाच जातीच्या झाडांमुळे जमिनीचा कस कमि होत जातो.

५) सेंद्रिय व ओल्याकचर्यापासुन खत तयार करावे.

६) वृक्षापोपन कार्यक्रम अधिक वेगाने करने.

७) प्लास्टीकचा कचरा जमिनीवर टाकू नये. त्याचे कधिही विघटन होत नसल्याने तो तसाच जमिनीत कायमचा राहते.
------------------------------------------------------------------------------------------------

 🔹धवनी प्रदूषन -

- कारणे - ----

१) *नैसर्गीक* --- यात वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट, भूकंप इत्यादीलआवाज येतात

३) *मानवनिर्मीत*---- यात स्वयंचलुत वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश भोंगे , कारखान्यातील यंत्रामचा खडखडाट, घरगुती उपकरनांचे आवाज, रेडिओ, टीव्ही यामचा उच्च आवाज,मिरवनुका, अशा अनेक प्रकारच्या तिव्र आवाजामुळेलध्वनिप्रदूषन होत असते.

*- ध्वनी प्रदूषन उपाय -*

१) सर्व स्वयंचलित वाहनांचे हॉर्न्स विशिष्ट पातळिच्या तिव्रतेचेच ठेवन्याचे बंधन उक्पादकांपासुनच घातले गेले पाहिजे. अशा नियमामची कडक अमलबजावनी झाली पाहिजे.

२) सर्व वाहनांची देखभाल नियमित पने होने आवश्यक आहे.

३) आवाज उपकरनाच्या निर्मीतीच्या  वेळीच त्यावर नियंत्रन आवश्यक आह्.

४) सार्वजनिक ठिकानी ध्वनीक्षेपकावरील आवाजावर असलेले विशिष्ट बंधन काटेकोरपने पाळने गरजेचे आहे.

५) विशिष्ट जागा, इमारती, परिसर आवजरहीत विभाग म्हनुन निर्मान करुन अमलबजावनी आवशियक आहे.


भूकंप लहरींचे प्रकार :-

■ प्राथमिक लहरी (P waves) :
» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो.
» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात.
» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.

■ दुय्यम लहरी (S waves) :
» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते.
» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत.
» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.

■ भूपृष्ठ लहरी (L waves) :
» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात.
» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.
» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही.
» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
_____________________
■ रिश्टर स्केल (Richter Scale) :
» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.

Latest post

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे उत्तर : तात...