Wednesday 8 April 2020

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

बहिष्कृत भारत

हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या‍ अंकापासून ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.

आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।
जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी।
इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे।
आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई।
एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।
संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

झांसीमध्ये ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारणार

उत्तरप्रदेशाच्या झांसी या शहरात ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ उभारण्याची भारत सरकारची योजना आहे. सध्या विकसित करण्यात येत असलेल्या बुंदेलखंड प्रदेशात संरक्षण मार्गिका तयार केली जात आहे, त्यांच्याच एक भाग म्हणून ‘एरो अँड डिफेन्स पार्क’ची उभारणी केली जाणार आहे.

🔸‘एरो अँड डिफेन्स पार्क’ याचा परिसर 6 हजार एकर पर्यंत पसरलेला असेल. प्रकल्पामध्ये अंदाजे 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

🔸हा प्रकल्प युक्रेनच्या कंपन्यांच्या सहकार्याने ‘टायटन एव्हिएशन अँड एरोस्पेस इंडिया लिमिटेड’ ही कंपनी विकसित करणार आहे.

🔸हा प्रकल्प चार टप्प्यात विकसित करण्याचे नियोजित आहे. तेथे एव्हिएशन यूनिवर्सिटी, एरोस्पेस लॅबोरेटरीज तसेच एअरबस, बोईंग, रशियन हेलिकॉप्टर अश्या वाहनांसाठी सिम्युलेटर सुविधा उभारली जाणार आहे. विमानांसाठी प्रगत देखरेख व दुरुस्ती केंद्र आणि ड्रोनची निर्मिती अश्या अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहे.

🔸याशिवाय धावपट्टी, निवासी वसाहत, विमानांसाठी सुट्या भागांसाठी उत्पादन केंद्र आणि विमानबांधणी केंद्र देखील असणार आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा - प्रशांत मोरे, संदीप दिवे अंतिम फेरीत.

🌸छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि संदीप दिवे यांनी अंतिम फेरी गाठली. महिलांमधून माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारी आणि एस. अपूर्वा यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवले.

🌸उपांत्य लढतीत विश्वविजेत्या प्रशांत मोरेने (रिझव्‍‌र्ह बँक) महाराष्ट्राच्या निसार अहमदला २५-०, २५-१६ असे नमवत वर्चस्व दाखवून दिले. अन्य उपांत्य लढतीत एअर इंडियाच्या संदीप दिवेने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित त्रिपानकरचा २५-०४, २३-२० असा पराभव केला.

🌸महिलांमधून पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या रश्मी कुमारीने तिच्याच संघाच्या नाग ज्योतीला चुरशीच्या सामन्यात ०१-२५, २०-१७, २४-१२ असे हरवून अंतिम फेरी गाठली. आंतरराष्ट्रीय फेडरेशन चषक विजेत्या एलआयसीच्या एस. अपूर्वाने बिहारच्या खुशबू राणीचा सरळ दोन सेट्समध्ये १८-८, २३-१६ असा पराभव केला.

'ऑपरेशन व्हेनिला': मादागास्करमध्ये भारतीय नौदलाची मानवतावादी मोहीम


➡️मादागास्करमध्ये आलेल्या ‘डियाने’ चक्रीवादळानंतर चालविलेल्या 'ऑपरेशन व्हेनिला' या मोहिमेच्या अंतर्गत तिथल्या लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऐरावत’ जहाज पाठवले गेले आहे.

➡️1 जानेवारी 2020 रोजी भारताने जीवनावश्यक साहित्य मादागास्करच्या अधिकार्‍यांकडे सोपवल्या.

➡️सेशेल्सकडे मार्गक्रम करणार्‍या भारतीय जहाजाला विंनतीवरून या बेटराष्ट्राकडे वळविण्यात आले होते.सूचना मिळतास मदतीसाठी पोहचणारा पहिला परकीय देश म्हणून भारत ठरला आहे.

➡️मादागास्करसंदर्भात भारताने दिलेली मदत ही भारताच्या 'सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन (SAGAR)' या दृष्टीकोनातून भारतीय नौदलाच्या परराष्ट्र सहकार्य पुढाकार’च्या अनुषंगाने आहे.

➡️मादागास्कर हा इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) या आंतर-सरकारी संघटनेचा सदस्य देखील आहे.

➡️हिंद महासागर क्षेत्रात येणार्‍या संकटकालीन परिस्थितीला प्रतिसाद देणारा पहिला म्हणून भारतीय नौदल उदयास आले आहे.

➡️NS ऐरावत हे एक उभयचर लढाऊ जहाज आहे. हे जहाज मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) मोहिमेचा देखील एक भाग आहे, हे आवश्यक मदत साहित्य वाहून नेते.

ईशान्य राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास.


 
🦋2014-15 पासून आतापर्यंत ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय आणि एनईसीने ईशान्य राज्यांच्या विकासासाठी विविध योजनांच्या अंतर्गत 8640.08 कोटी रुपयांच्या 549 प्रकल्पांना मंजुरी दिली.

🦋याकाळात एकूण 667 प्रकल्प पूर्ण झाले. यामध्ये याकाळात मंजुरी मिळालेल्या 32 प्रकल्पांचा समावेश होता. उर्वरित प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.

🦋केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

♾♾आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वेलनेस सेंटर♾♾

🚦आयुष्मान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर अंतर्गत दीड लाख उपआरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डिसेंबर 2022 पर्यंत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यात येत आहे.

🚦2018-19 या वित्तीय वर्षापर्यंत 40,000 हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरना परवानगी द्यायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 62,000 पेक्षा जास्त मंजूऱ्या देण्यात आल्या.

🚦राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यासह ही केंद्रे बळकट करण्यासाठी तंत्रविषयक आणि वित्तीय सहाय्यता पुरवली जाते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

राष्ट्रपतींनी कुष्ठरोगासाठीचे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार केले प्रदान.

✴️राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ. एम. एस. धर्मशक्तू यांना भारतीय नामांकन (वैयक्तिक) गटासाठी तर, लेप्रसी मिशन ट्रस्टला संस्था गटासाठी कुष्ठरोगासाठीचे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान केले.

✴️यावेळी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, कुष्ठरोगाविरोधातील आपल्या लढ्यात इतक्या वर्षात आपण कुष्ठरोग निर्मुलनात यशस्वी झालो आहोत.

✴️वैज्ञानिक संशोधन संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कामामुळे कुष्ठरोगाबाबत कलंक आणि पूर्वग्रह यात लक्षणीय घट झाली आहे. मात्र तरीही नवीन रुग्ण आढळत आहेत, असे ते म्हणाले.

✴️कुष्ठरोग नियंत्रणाची हिच पातळी कायम राखण्याचे आव्हान असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार सर्वांना सहज उपलब्ध होणे आणि एकात्मिक कुष्ठरोग सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय स्थितीपेक्षाही या आजाराशी जोडलेले सामाजिक कलंक अजूनही कायम असून, ही चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

✴️ या रोगाबाबत जागृक आणि शिक्षित व्हायला हवे आणि हिच जागृकता माहितीच्या प्रसाराद्वारे जनतेमध्ये निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लॉकडाउन : अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम; ५२ टक्के नोकऱ्यांवर टांगती तलवार ?

- देशात करोना व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. परंतु यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सीआयआयनं केलेल्या एका सर्व्हेक्षणात यामुळे देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. तब्बल २०० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यादरम्यान ऑनालाइन पद्धतीनं सीआयआयनं सर्व्हेक्,ण केलं.

- ‘CII सीईओ स्नॅप पोल’नुसार देशातील सर्वाधिक कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं समोर आलं आहे. तसंच यामुळेच नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुरू तिमाहित आणि गेल्या तिमाहित बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नात १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशांतर्गत कंपन्यांचं उत्पन्न आणि नफा या दोन्हीमध्ये होत असलेल्या घसणीचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही पडणार असल्याचं सीआयआयकडून सांगण्यात आलं.

- रोजगाराकडे पाहिल्यास संबंधित क्षेत्रांमध्ये ५२ टक्के नोकऱ्यांवर गडांतर येऊ शकतं. तर दुसरीकडे लॉकडाउनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ४७ टक्के कंपन्यांमध्ये १५ टक्क्यापेक्षा कमी नोकऱ्यांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. तर ३२ टक्के कंपन्यांमध्ये १५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता सर्व्हेक्षणादरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.
--------------------------------------------------

१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा.

🔰तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १५ एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी BCG च्या अहवालाचा हवाला दिला आहे. ३ जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असं या अहवालात म्हटल्याचं राव यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे. खरंतर लॉकडाउन संपण्यासाठी १४ एप्रिल ही तारीख अजून उजाडायची आहे. मात्र तो संपण्याआधीच के चंद्रशेखर राव यांनी आणखी दोन आठवडे भारतात लॉकडाउन हवा अशी मागणी केली आहे.

🔰२५ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीसाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याआधी २२ मार्चच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला. आता हा कालावधी आणखी वाढवावा अशी मागणी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

🔰भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४ हजारांच्या वर गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि येत्या काळातही ही संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा असं राव यांनी म्हटलं आहे. अद्याप लॉकडाउन नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. मात्र आता तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी केलेल्या मागणीवर मोदी सरकार काही विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कॅनडाचा ऑलिम्पिक २०२०मधून माघार घेण्याचा निर्णय

🔰करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (IOC) योग्य वेळी स्पर्धे संदर्भातील निर्णय घेऊ असे म्हटले आहे. तर जपानचे पंतप्रधान स्पर्धा स्थगित किंवा पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर एक मोठा धक्का बसला आहे.

🔰कॅनडाने ऑलिम्पिक २०२०मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रविवारी ही घोषणा केली. कॅनडाच्या ऑलिम्पिक समितीने आणि पॅराऑलिम्पिक समितीने करोना व्हायरसमुळे २०२०मध्ये होणाऱ्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणार नसल्याचे म्हटले आहे.

🔰याशिवाय गेल्या ४८ तासात कॅनडा अनेक देशातील ऑलिम्पिक समिती आणि क्रीडा संघटनांना जुलैपासून सुरू होणारी ही स्पर्धा स्थगित करण्याची मागणी करण्यास सांगत आहेत. याआधी अमेरिका आणि ब्रिटनच्या ऑलिम्पिक समितीने ही स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण या वर्षीच्या स्पर्धेतून एखाद्या देशाने माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

🔰करोना व्हायरसमुळे जगभरात १३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा वेळी ऑलिम्पिकचे आयोजन करणे अशक्य वाटत आहे. कॅनडाच्या ऑलिम्पिक समिती आणि पॅराऑलिम्पिक समितीने दोन्ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील विनंती त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देखील केली आहे.

🔰सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा स्थगित करणे योग्य ठरले.खेळाडूंची सुरक्षितता आणि जगाचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे कॅनडाच्या समितीने म्हटले आहे.

ब्रिटनचे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठ


लंडनच्या ‘टाइम्स’ या संस्थेच्यावतीने ‘टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ अहवाल 2020’ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार
भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था , रोपार या केवळ दोन भारतीय संस्थांनी या यादीत प्रथम 350 क्रमांकामध्ये जागा मिळविलेली आहे. या दोन संस्थांनी समान गुणासह संयुक्तपणे क्रमांक ‘301-350’ या गटात जागा मिळविलेली आहे.

🔰 अहवालातील महत्वाचे निष्कर्ष:-
• जगातले सर्वोत्तम विद्यापीठ - ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटन.

🔰 प्रथम 10 सर्वोत्तम विद्यापीठे
१. ऑक्सफोर्ड विद्यापीठ.( ब्रिटन.)
२. कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),
३. केंब्रिज विद्यापीठ (ब्रिटन)
४. स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका)
५. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
६.प्रिन्सटन विद्यापीठ (अमेरिका)
७.हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका)
८. येल विद्यापीठ (अमेरिका)
९. शिकागो विद्यापीठ (अमेरिका)
१०. इम्पीरियल कॉलेज लंडन (ब्रिटन)

•  जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती सुधारली असून गेल्यावर्षी केवळ 49 संस्था यादीत समाविष्ट होत्या मात्र या वर्षी 56 संस्थांचा क्रमांक लागला आहे. नवीन IIT इंदौर या संस्थेचे 351-400 गटात स्थान आहे, पंजाब विद्यापीठ, चंदीगड 601-800 या गटात कायम असून IIT गांधीनगर नव्यानेच 501-600 या गटात प्रवेश केला आहे.

• जागतिक क्रमवारीत समाविष्ट केल्या गेलेल्या भारतीय संस्थांच्या संख्येमुळे, भारत हा आशिया खंडात पाचव्या स्थानावर असून जापान आणि चीन अव्वल आहेत

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...