Tuesday 27 August 2019

बेझंट ॲनी : 🌸

(१ ऑक्टोबर १८४७ – २० सप्टेंबर १९३३).

विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. ॲनी बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे (१८५२) या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना जर्मन, फ्रेंच इ. भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. या काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या. पुढे रेव्हफ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला (१८६७). त्यांना दिग्बी हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून अलग व्हावे लागले (१८७३). त्यानंतर त्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व तिचा मृत्यू झाला (१८७४).

नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावीत होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (१८३३–९१) यांच्या ‘नॅशनल सेक्युलरसोसायटी’ मध्ये दाखल झाल्या (१८७४). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, स्त्रियांचा मतदानाचा हक्क इत्यादींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले. १८८५ साली त्या ‘फेबिअन सोसायटी’च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला. लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या ७०० मुलींचा संप घडवून आणला (१८८८) आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात, हे दाखवून दिले. या काळातील बहुतेक सर्व समाजसुधारणांसाठी त्यांनी लेखनभाषणादी मार्गांनी भरीव कार्य केले.

थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम ⇨ हेलेना ब्लाव्हॅट्‌स्की (१८३१-९१) यांचा द सीकेट डॉक्ट्रिन हा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांच्याकडे परीक्षणार्थ आला (१८८९). त्याच्या प्रभावाने त्यांनी ब्लाव्हॅट्‌स्की यांचे शिष्यत्व पत्करले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या. १८९३ साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून श्रोत्यांची हृदये हेलावून सोडली.

त्या १८९३ साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही, तरी श्रद्धेने हिंदू आहोत, असे त्या मानू लागल्या. त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे इत्यादींवर अनेक व्याख्याने दिली. गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले (१९०५). भारतीयांनी आपली प्राचीन परंपरा विसरू नये, म्हणून त्यांनी भारताच्या प्राचीन श्रेष्ठत्वाचे चित्र लोकांपुढे उभे केले. त्यांनी वृत्तपत्रांतून प्रचंड लेखन केले. लेखन व व्याख्यानांतून मिळालेल्या पैशाच्या प्रचंड देणग्या दिल्या. त्यांच्या ग्रंथांची संख्या सु. ४५० आहे. त्यांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : माय पाथ टू अथेइझम (१८७७), रॅडिकॅलिझम अँड सोशिअ‍ॅलिझम (१८८७), द एन्शंटविजडम (१८९७), एज्युकेशन अ‍ॅज अ नॅशनल ड्युटी (१९०३), अ स्टडी इन कॉन्शसनेस (१९०४), हिंदू आयडियल्स (१९०४), हिंट्‌स ऑन द स्टडी ऑफ द भगवद्‌गीता(१९०५), फोर ग्रेट रिलिजन्स (१९०६), इंट्रोडक्शन टू योग (१९०८), द रिलिजस प्रॉब्लेम्स इन इंडिया (१९०९), यूनिव्हर्सल टेक्स्ट बुक ऑफ रिलिजन अँड मॉरल्स (३ खंड, १९११-१५), सोशल प्रॉब्लेम्स (१९१२), द फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स (१९२२), वर्ल्ड प्रॉब्लेम्स ऑफ टुडे (१९२५), हिस्टरी ऑफ द फ्रेंच रेव्होल्यूशन (१९३१). एका पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचे मोठेपण सांगितलेले पाहून भारतीय लोक प्रभावित झाले. ते त्यांना ईश्वराचा, गार्गीचा वा सरस्वतीचा अवतार मानू लागले. सनातनी हिंदू मात्र त्यांना हिंदूंचा प्रच्छन्न शत्रू म्हणत होते.

त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज काढले (१८९८) व सरकारी अनुदान न घेता ते चालविले. त्याच्याच आधारावर पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली. या विश्वविद्यालयाने त्यांना सन्मान्य डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी ‘इंडियन बॉइज स्काउट्‌स असोसिएशन’ स्थापन केली (१९१७). मदनपल्ली येथे नॅशनल कॉलेज (१९१५) आणि राष्ट्रीय शिक्षणाला चालना देण्यासाठी एक संस्था (१९१७) तसेच अड्यार येथे नॅशनल युनिव्हर्सिटी (१९१८) स्थापन केली. यांखेरीज अनेक शाळा, वसतिगृहे इत्यादींची स्थापनाही त्यांनी केली. सहभोजने, बालविवाहांना प्रतिबंध, स्त्रियांची सुधारणा इ. क्षेत्रांतही त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्य केले. त्यांनी विमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. (१९१७).

कर्नल ऑल्‌टकटच्या मृत्यूनंतर थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची प्रचंड बहुमताने निवड झाली (१९०७). मृत्यूपर्यंत त्याच अध्यक्षा होत्या. जिद्‌दू कृष्णमूर्ती (सध्याचे जे. कृष्णमूर्ती) या लहान मुलाला मसीहा मानून त्यांनी त्याचे शिक्षण केले (१९०९); त्याच्यासाठी ‘पूर्वतारक संघ’ स्थापन करून हेरल्ड ऑफ द स्टार हे मुखपत्र सुरू केले.

भारताच्या राजकीय नेतृत्वात १९१४ च्या सुमारास एक प्रकारची शिथिलता आली होती. यावेळी राजकीय उन्नतीशिवाय भारताची खरी उन्नती नाही, हे त्यांनी ओळखले आणि त्या राजकारणात उतरल्या. अल्पावधीतच त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी मद्रास येथे कॉमनवील आणि न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे सुरू केली (१९१४). त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली (१९१६). या बाबतीत त्यांना लो. टिळकांचे सहकार्य मिळाले. महायुद्ध सुरू होताच ब्रिटिशांची अडचण तीच भारतीयांची संधी, असे त्यांनी घोषित केले. १५ जून १९१७ रोजी मद्रास सरकारने त्यांना ऊटकमंड येथे तीन महिने स्थानबद्ध केले. १९१७ सालीच भारतीय काँग्रेसच्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांनी जहाल व मवाळ या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे काँग्रेसचे नेतृत्व म. गांधीजींकडे गेले. त्यांची असहकारिता व सामुदायिक सत्याग्रह ही आंदोलने अ‍ॅनी बेंझंटना मान्य नसल्यामुळे त्यांचे गांधीजींशी पटू शकले नाही. त्यामुळे १९१९ नंतर त्यांनी जवळजवळ काँग्रेस सोडल्यासारखेच केले आणि त्या राजकारणात अत्यंत अप्रिय झाल्या. त्यांना भारतासाठी स्वातंत्र्य हवे असले, तरी भारताने कॉमनवेल्थमध्ये रहावे, असे त्यांना वाटत असे.

अलौकिक वक्तृत्व, प्रकांड पांडित्य, प्रचंड कार्यक्षमता, विलक्षण स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा, जन्माने ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मीयता, समाजाच्या उत्थानाची तळमळ इ. सद्‌गुणांमुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू बनले होते. त्यामुळेच त्या ज्या ज्या क्षेत्रात गेल्या, त्या त्या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांना नेतृत्त्व प्राप्त झाले.

थिऑसॉफिकल सोसायटीचे केंद्र असलेल्या अड्यार या उपनगरात त्यांचे निधन झाले.

श्रावणबाळ योजनेत तब्बल 10 वर्षांनंतर बदल


◾️श्रावण वृद्धापकाळ योजनेचे निकष तब्बल 10 वर्षांनंतर बदलले आहेत. 2009 मध्ये शासनाने अनुदानात 100 रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर आता यामध्ये 400 रुपये अनुदानात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने अधिवेशनात वयाचा भेदभाव न करता सरसकट 600 वरून हे अनुदान थेट एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निणर्याचे स्वागत राज्यभरातील 'थरथरत्या हातां'कडून होत आहे.

◾️श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता 600 वरून 1 हजार करण्यात आले आहे. विधवा महिलांना एक अपत्य असल्यास 1100, दोन अपत्य असल्यास 1200 रुपये दरमहा मिळणार आहेत

एका ओळीत सारांश, 28 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉ही ई-कॉमर्स कंपनी भारतात मिलिटरी व्हेटेरन्स एम्प्लॉयमेंट प्रोग्राम नावाचा कार्यक्रम राबववित आहे - अॅमेझॉन इंडिया.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉केंद्र सरकारला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) लाभांश व अतिरिक्त राखीव निधीपोटी इतका निधी मिळणार - 1 लक्ष 76 हजार कोटी रुपये.

👉ही सरकारी संस्था ई-तपासणी प्रणाली चालू करण्याची योजना आखत आहे - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO).

👉26 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मत्स्यपालन व पशुपालनात गुंतलेल्या शेतकर्‍यांना दोन लक्ष रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कर्जावर इतके व्याज अनुदान देण्याच्या पद्धती जाहीर केली - 2%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉नेपाळची राजधानी काठमांडू आणि हे भारतीय शहर यांच्यादरम्यान 650 किलोमीटरच्या प्रवासासाठी एक बस सेवा सुरू झाली - पश्चिम बंगालमधले सिलीगुडी.

👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशाच्या राजाने "द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स" देऊन गौरवले - बहरीन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉27 ते 29 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 7 व्या कम्युनिटी रेडियो संमेलनाचा विषय - कम्युनिटी रेडियो फॉर एसडीजीस.

👉26 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या ठिकाणी एकात्मिक वस्त्रोद्योग पर्यटन संकुलाचे भुमिपूजन केले - नोंगपोह, री भोई जिल्हा, मेघालय.

👉सार्वजनिक क्षेत्राच्या गटात ‘BML मुंजाल अवॉर्ड फॉर बिझिनेस एक्सलन्स थ्रू लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या पुरस्काराचे विजेता – भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉जीवनगौरव गटात तेनझिंग नोर्गे नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 याचे विजेता - वांगचूक शेर्पा.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाण्याच्या पृष्ठभागावर चालणार्‍या किंवा धावू शकणार्‍या ‘मेसोव्हेलिया’ या कुटुंबातल्या अर्ध-जलचर किटकांच्या इतक्या प्रजाती शोधल्या - सात (अंदमान बेटे, मेघालय, तामिळनाडू येथे).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉बहरीन - राजधानी: मनामा; राष्ट्रीय चलन: बहरीनी दिनार.

👉भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) - स्थापना वर्ष: सन 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.

👉भारत सरकारच्यावतीने साहसी क्षेत्रात व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार - तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार.

👉हिमालयाचे शिखर सर करणारे पहिले व्यक्ती - न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी तेनझिंग नोर्गे (1953 साली).

👉भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) याचे स्थापना वर्ष – सन 1916.

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1935 - 1937).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018:-

● 2018 या वर्षासाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

● पुरस्कार विजेते –

● जीवनगौरव पुरस्कार - वांगचूक शेर्पा
● भू साहस – गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, मनिकंदन के.
● जल साहस - जलतरणपटू प्रभात राजू कोळी
● हवाई साहस - रामेश्वर जांग्रा

● राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात इतर क्रिडा पुरस्कारांसह हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

●पुरस्काराबद्दल

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दरवर्षी साहसी क्षेत्रात व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिला जातो.

तरुणांना धीर देण्याची, जोखीम घेण्याची, सहकार्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीत तयार राहण्याची भावना उत्पन्न करण्यासाठी प्रोत्साह देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार तयार करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे भू, जल, हवाई साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते.

हिमालयाच्या शिखरावर पहिली चढाई 1953 साली ब्रिटिश मोहिमेतले न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी केली होती. त्यांच्या स्मृतीत हा पुरस्कार दिला जात आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विधानपूरक      2) फक्त सकर्मक      3) व्दिकर्मक    4) उभयविध

उत्तर :- 3

2) अ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुध्द होते.
    ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुध्द मत नोंदवले.

          या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?

   1) शब्दयोगी व क्रियाविशेषण    2) क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
   3) दोन्ही शब्दयोगी      4) दोन्ही क्रियाविशेषण अव्यये

उत्तर :- 2

3) वाघ माझ्यासमोरून गेला – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

4) ‘देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढ भावो’
      या संतवचनात .................... या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.

   1) विकल्पबोधक    2) न्यूनत्वबोधक      3) कारणबोधक    4) उद्देशबोधक

उत्तर :- 1

5) खालील किती शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहे.

     ऊं, ॲ:, अरेरे, अयाई, अगाई, हाय
   1) पाच        2) चार        3) सर्व      4) तीन

उत्तर :- 3

6) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

   1) आम्ही करू    2) मी करीन   
   3) मी करून    4) आम्ही करावे

उत्तर :- 1

7) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

   1) स्त्रीलिंगी    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

8) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

   1) ने, ए, ई, शी    2) ऊन, हून   
   3) त, ई, आ    4) चा, ची, चे

उत्तर :- 4

9) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

   1) संकेतार्थी    2) विध्यर्थी   
   3) संयुक्त    4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

10) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

   1) धडकली    2) युध्द बंद झाल्याची    
   3) बातमी     4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4

दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव


◾️नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव देण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या 12 सप्टेंबरला कोटला स्टेडियमच्या नामांतरणाच्या समारंभात हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत.

माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच जेटलींच्या स्मरणार्थ कोटला स्टेडियमचं नामकरण करण्याचा निर्णय डीडीसीएनं घेतला आहे.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवार 25 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. जेटली यांचं दिल्ली क्रिकेटसाठी केलेलं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळेच राजकीय क्षेत्रासह क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियममधील एका स्टँडला भारतीय कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात येण्यात येणार आहे.

जाणून घ्या, झेड प्लस सुरक्षेबद्दल 'सर्वकाही'

*🔮✍️एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक १ ची सुरक्षा मानली जाते. ती भेदणे अतिशय कठीण असते असेही बोलले जाते. त्यानंतर, दुसरा क्रमांक झेड प्लस आणि झेड सुरक्षाचा असा आहे. तसं, आणखी दोन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था असतात. त्या म्हणजे, एक्स (X )आणि वाय(Y) होय.*

*झेड प्लस सुरक्षा म्हणजे नेमकी काय असते..? यामध्ये किती सुरक्षा जवान असतात..?*

*देशातील सर्वात महत्वाच्या नेत्यांना, व्यक्तींना, अधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षा आणखी मजबूत होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते. तसेच देशाचे पूर्व प्रधानमंत्री, देशातील महत्वाचे मंत्री, यांना साधारणपणे झेड प्लस सुरक्षा दिली जाते. या मध्ये सुरक्षेचे मजबूत कव्हर दिले जाते. हि देशातील एसपीजी नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. झेड प्लस सुरक्षा कोणाला द्यायची हे केंद्र सरकार ठरवत असते. झेड सुरक्षेमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. ते म्हणजे, एक झेड प्लस (Z Plus) आणि दूसरी झेड (Z Security) सुरक्षा. साधारणपणे केंद्रातील मोठे मंत्री आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते.*

*(उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा आहे झेड प्लस सुरक्षा )*

*किती प्रकारची असते सुरक्षा व्यवस्था*

*भारतात साधारणतः सुरक्षा व्यवस्था चार श्रेणीत विभागली गेली आहे. ती म्हणजे, झेड प्लस (Z+), (उच्च स्तर) झेड (Z), वाय (Y) आणि एक्स (X) श्रेणी. या चार प्रकारात कोणत्या स्तराची सुरक्षा द्यायची हे सर्वतोपरी सरकार ठरवत असते. एखाद्याला एखाद्या प्रकरचा धोका असेल तर सरकार व्ही.व्ही.आय.पी सुरक्षा देऊ शकते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, अधिकारी, माजी अधिकारी , न्यायाधीश, माजी न्यायाधीश, उद्योगपती, क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार, साधू – संत अथवा नागरिक यापैकी कोणालाही हि सुरक्षा पुरवली जाऊ शकते.*

*अशी असते झेड प्लस सुरक्षेची रचना*

*झेड प्लस सुरक्षा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामध्ये एकूण ३६ सुरक्षा कर्मचारी असतात. त्यातील १० दहा जवान (National Security Guards) आणि SPG (Special Protection Group) चे कमांडो असतात. सोबतच काही पोलिसांचा समावेश असतो. या सुरक्षेमध्ये पहिल्या घेऱ्याची जबाबदारी हि एनएसजी (NSG ) ची असते. तर दुसरी एसपीजी (SPG ) कमांडोंची जबाबदारी असते. सोबतच झेड प्लस सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहन सुद्धा दिलेले असते.*

*झेड प्लस सुरक्षा या लोकांना मिळते*

*उपराष्ट्रपति, माजी प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री, महत्वाचे केंद्रीय मंत्री, प्रमुख नेते, प्रसिद्ध कलाकार,खेळाडू, देशातला एखादा प्रसिद्ध व्यक्ती किंवा नागरिक.*

*अशी असते झेड सुरक्षा*

*झेड सुरक्षेमध्ये एकूण 22 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यामध्ये ५ एनएसजी कमांडो असतात. तसेच आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) आणि सीआरपीएफ च्या अधिकाऱ्यांचा सुरक्षेमध्ये समावेश असतो. या सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही पुरविली जातात. तसेच दिल्ली पोलिस किंवा स्थानिक पोलिसांचे सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश असतो.*

*वाय सुरक्षेची रचना*

*हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. ज्या लोकांना थोडा कमी धोका असतो. त्या लोकांना हि सुरक्षा दिली जाते. यामध्ये सर्व मिळून ११ सुरक्षा कर्मचारी असतात. ज्यामध्ये दोन कमांडोंचा समावेश असतो.*

*एक्स श्रेणी ची सुरक्षा*

*या सुरक्षा व्यवस्थेमध्ये २ सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये १ पीएसओ (व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी) असतो. देशातील खूप लोकांना हि सुरक्षा दिली गेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एकाही कमांडोचा समावेश नसतो.*

*या ४ ठिकाणाहून निवडले जातात या सुरक्षा व्यवस्थेतील जवान*

*१. एसपीजी (Special Protection Group)*
*२. एनएसजी (National Security Guard)*
*३. आईटीपीबी (Indo- Tibetan Border Police)*
*४. सीआरपीएफ* *(Central Reserve Police Force)*

G7 Summit 2019

- 45 वी परीषद फ्रान्समधील बिआरेत्झ या शहरात 24 ते 26 ऑगस्ट 2019 या कालावधीत पार पडली.
- 44 वी परीषद ला मालबाई, क्युबेक कॅनडा येथे पार पडली होती.
- भारत G7 चा सदस्य नसला तरी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तिगतरित्या या परीषदेसाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिषदेला पर्यावरण, हवामान बदल, महासागर आणि डिजिटल बदल यांसंदर्भात संबोधित केले.
- जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द, राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करणे या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्या संदर्भात प्रमुख जागतिक सत्तांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रश्नांसंदर्भात त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न होता.
---------------------------------------------------------
● G7 [Group of Seven Countries]

- स्थापना: 1975, प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली.
- 1976 साली कॅनडा सामील झाला त्यामुळे समूहाचे नाव ‘जी-7’ असे झाले.
- सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. 2014 मध्ये या गटाची पुनर्रचना झाली, म्हणून हे स्थापना वर्ष मानले जाते.
- IMF च्या मते हे सात देश म्हणजे जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था आहेत.
- जगाच्या अर्थव्यवस्थांपैकी 58% संपत्ती या सात राष्ट्रांकडे आहे.
- जागतिक GDP च्या 46% पेक्षा जास्त GDP या सात देशांचा आहे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...