Thursday 21 October 2021

काही जुन्या पण महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

🌷झूल

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.

🌷आंबवणी, चिंबवणी

शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात.

🌷वाफा, सारा

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.

🌷खांदमळणी

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.

🌷कंडा

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.

🌷चाळ

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात.

🌷शेंट्या

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.

🌷आडणा

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.

🌷फण

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात *फण* बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.

🌷भूयट्या

जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला भूयट्या म्हणतात.

🌷रूमण

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.

🌷उभाट्या

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ


१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
     ~मोठ्याने हसणे .

२】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~ योजलेले काम कसेबसे पार पाडणे .

३】"थुंकी झेलणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~भलती खुशामत करणे.

४】" विडा उचलणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~ प्रतिज्ञा करणे .

५】"रक्ताचे पाणी करणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
    ~ खूप कष्ट करणे .

६】"वाटाण्याच्या अक्षता लावणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
    ~ स्पष्ट शब्दात नकार देणे .

७】"अत्तराचे दिवे जाळणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
    ~भरपूर उधळपट्टी करणे.

८】" असतील शिते तर जमतील भुते" या म्हणीचा अर्थ काय?
    ~ आपल्या जवळ पैसे असल्यास आपल्याभोवती             खुशामतकऱ्यांची गर्दी जमते.

९】"काखेत कळसा आणि गावाला वळसा" या म्हणीचा अर्थ काय ?
   ~ वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे.

१०】" कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी" या चा अर्थ काय ?
   ~एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नाने बदलू शकत नाही.

११】" गाढवाला गुळाची चव काय" याचा अर्थ काय?
    ~ मूर्ख माणूस आज चांगल्या गुणांची पारख नसते.

१२】" चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे" या म्हणीचा अर्थ काय?
   ~ प्रत्येकाला आयुष्यात गाजवण्याची संधी कधीतरी संधी चालून येते .

१३】"वरातीमागून घोडे "या म्हणीचा अर्थ काय?
   ~ वेळ निघून गेल्यावर कृती करणे.

१४】" पी हळद अन हो गोरी "चा अर्थ काय?
     ~एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा.

१५】" डोंगर पोखरून उंदीर काढणे" या म्हणीचा अर्थ काय?
   ~ अफाट कष्ट नंतर शिल्लक लाभ पदरी पडणे.

१६】" ताकापुरती आजी" या म्हणीचा अर्थ काय ?
  ~आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे.

महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली

गणित विषयातील महत्त्वाचे मुद्दे

समसंख्या :
ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला सम संख्या म्हणतात.

विषमसंख्या :
ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला विषमसंख्या म्हणतात.

विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात.

संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :

सम संख्या + सम संख्या = सम संख्या
सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या – विषम संख्या = सम संख्या
सम संख्या x सम संख्या = सम संख्या
विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या
सम संख्या – सम संख्या = सम संख्या
सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
सम संख्या x विषम संख्या = सम संख्या

मूळ संख्या :

ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.

उदा. 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी.

(फक्त 2 ही समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी सर्व मूळसंख्या ह्या विषम संख्या आहेत) 1 ते 100 संख्यांचा दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या खाली दिल्या आहेत.

नैसर्गिक संख्यामूळसंख्या
1 ते 10 2,3,5,7
11 ते 20 11,13,17,19
21 ते 30 23,29
31  ते 40 31,37
41 ते 50 41,43,47
51 ते 60 53,59
61 ते 70 61,67 
71 ते 80 71,73,79 
81 ते 90 83,89 
91 ते 100 97

जोडमुळ संख्या :

ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो  त्यास जोडमुळ संख्या म्हणतात, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत.

उदा. 3-5, 5-7, 11-13, 17-19, 29-31, 41-43, 59-61, 71-73.

संयुक्त संख्या :

मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.उदा. 4,6,8,9,12 इ.

अंकांची स्थानिक किंमत :

संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे देतात.
उदा. 45123 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत 5000, तर 2 ची स्थानिक किंमत 20 होय.

एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. तर दोन अंकी 90, तीन अंकी 900 आणि चार अंकी एकूण संख्या 9000 आहेत.

लहानात लहान – एक अंकी संख्या 1 आहे, तर दोन अंकी संख्या 10, तीन अंकी संख्या 100 आहे. याप्रमाणे 0 वाढवीत जाणे.

मोठयात मोठी – एक अंकी संख्या 9, दोन अंकी संख्या 99, तीन अंकी संख्या 999 आहे. पुढे याचप्रमाणे 9 वाढवीत जाणे.

कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते.

0 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
i) 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
ii) 1 हा अंक 21 वेळा येतो
iii) 0 हा अंक 11 वेळा येतो.

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
अ. 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी 19 येतात.
ब. दोन अंकी संख्यात 1 ते 9 या अंकाच्या प्रत्येकी 18 संख्या असतात.

त्रिकोणी संख्या :

दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.

उदा : 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91, इत्यादी

त्रिकोणी संख्या = n x(n+1)/2 या सूत्रात n = नैसर्गिक संख्या (1,2,3,4____)

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे

  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन
______________________________

भूगोल प्रश्नसंच

1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................
   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते
   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.
   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स
उत्तर :- 3

3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.
   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50
उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.
   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.
   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.
   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.
   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.
   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?
   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप
   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर
   इ) भटकी शेती
   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ
उत्तर :- 4

1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस
   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली
उत्तर :- 3

2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?
   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट
   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट
   इ) अविकसित प्रदेशातून सूट
    योग्य पर्याय निवडा:
   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब
उत्तर :- 4

3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.
   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.
   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा
         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.
   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.
   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.
   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही
उत्तर :- 4

4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.
   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर
         म्हणतात.
   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?
   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.
   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.
   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.
   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.
   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क
उत्तर :- 4

1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?
   1) पुणे      2) अहमदनगर   
   3) औरंगाबाद    4) लातूर
उत्तर :- 3

2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
   1) 6      2) 4     
   3) 7      4) 9
उत्तर :- 1

3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.
   1) महाड    2) वाई     
   3) महाबळेश्वर    4) नाशिक
उत्तर :- 2

4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?
   1) लोणावळा    2) चिखलदरा   
   3) महाबळेश्वर    4) माथेरान
उत्तर :- 2

5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
   1) सांगली    2) सातारा   
   3) रायगड    4) रत्नागिरी
उत्तर :- 3

काही राष्ट्रीय महामार्ग

1)NH३ मध्य प्रदेश सीमेपासून - सांगवी - धुळे - मालेगाव - नाशिक - इगतपुरी - भिवंडी - ठाणे - मुलुंड - मुंबई ३९१

2)NH1४ ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा - पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१

3)NH४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ रा.म.क्र.४शी तिठा २०

4)NH ४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब (किमी १६.६८७) ७

5)NH ६ गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव - एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर - भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३

6) NH७ मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट - करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२

7)NH८ गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८

8)NH१३ सोलापूर - नंदनी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३

9)NH १६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढ सीमेपर्यंत ३०

10)NH१७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ - वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२

11)NH५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२

12)NH६५ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत. ३३६

13)NH६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५

.14)NH२०४ रत्‍नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६

15)...NH २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद - वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००

16)NH२२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा - अहमदनगर - पाथर्डी - परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. 

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प


महाराष्ट्रातला महत्त्वाचा असा एक ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प. जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी.

श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष.
ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे “जंगलच्या राजा” चे साम्राज्य. तांबड्या मातीवरून चालत जात असतांना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही.

ताडोबा, ३१ मार्च १९५५ रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याचे क्षेत्रफळ ११६.५५ चौ.कि.मी. भोवताली ५०९.२७० चौ.कि.मी चे जंगल असल्याने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा सर्व परिसर संरक्षित होऊन अंधारी प्रकल्पाची निर्मिती झाली...
येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा...

महाराष्ट्रातून धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे कुठून कुठे

🚇 महाराष्ट्र एक्सप्रेस ★कोल्हापूर ते गोंदीया

🚇 हरिप्रिया एक्सप्रेस ★ कोल्हापूर ते तिरूपती

🚇 सिद्धेश्वर एक्स्प्रेस ★सोलापूर ते मुंबई

🚇 सिंहगड एक्स्प्रेस ★ पुणे ते मुंबई

🚇 तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस ★  दादर ते सावंतवाडी

🚇 महालक्ष्मी एक्स्प्रेस ★ कोल्हापूर ते मुंबई

🚇 सह्याद्री एक्स्प्रेस ★ कोल्हापूर ते मुंबई

🚇 डेक्कन एक्स्प्रेस ★ पुणे ते मुंबई हजरत

🚇 निजामुद्दीन एक्सप्रेस ★ गोवा ते दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अनुशीलन समिती

अनुशीलन समिती : विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था. संस्थेच्या कार्याचा काही भाग उघड चाले, तर काही पूर्णपणे गुप्त असे. युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात. गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.

वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले. अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली. पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे, तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते. ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई. समितीच्या शाखा सर्व बंगालभर होत्याच. त्याशिवाय आसाम, बिहार, पंजाब, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत व दक्षिणेत पुण्यापर्यंतही त्या पसरलेल्या होत्या.अनुशीलन समितीच्या अंतर्गत व्यवस्थेसंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र डाक्का येथील शाखेची माहिती मिळते व त्यावरून बरीच कल्पना येऊ शकते. या समितीच्या संपूर्ण बंगालमध्ये शाखा प्रस्थापित करण्यात आल्या होत्या. त्यांतून रशियातील क्रांतिकार्याच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येई. कार्यासाठी शस्त्रास्त्रे जमा केली जात व त्यांचा वापर परक्या अंमलदारावर व आपल्यातील फितूर अधिकाऱ्यांवर करावयाचा असे. द्रव्यासाठी आवश्यक तेव्हा लूटमार करणे, हाही त्यांच्या कार्यक्रमाचा भाग असे.भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात ह्या समितीचे कार्य फारसे परिणामकारक झाले नसले, तरी तिच्या उद्दिष्टांची व मार्गांची दखल घेणे अगत्याचे आहे.

जगातील सर्वात मोठ्या दहा बँका

💁‍♂ कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असतो तो म्हणजे तेथील बँक व्यवस्था. तर आज आपण जगातील टॉप 10 बँकांची माहिती जाणून घेऊ...

1⃣ पहिल्या क्रमांकावर आहे ICBC बँक. Industrial and Commercial Bank of China ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. चीनमधील सरकारी बँकांच्या यादीमध्ये ही बँक अग्रस्थानी आहे.

2⃣ दुसऱ्या क्रमांकावर आहे JPMorgan Chase बँक. ही एक अमेरिकन बँक आहे.

3⃣ तिसऱ्या क्रमांकावर आहे China Construction Bank. ही चीनमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. या बँकेच्या केवळ चीनमध्येच 13 हजार 629 हून अधिक शाखा आहेत.

4⃣ चौथ्या क्रमांकावर आहे Bank of America. या बँकेचे मुख्य कार्यालय नॉर्थ कॅरेलॉनामध्ये आहे.

5⃣ पाचव्या क्रमांकावर आहे Bank of China. नावावरुनच ही बँक चीनमधील असल्याचं स्पष्ट होतयं. ही चीनमधील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक आहे. चीनमध्ये एकूण चार सरकारी बँका आहेत.

6⃣ Wells Fargo बँक सहाव्या क्रमांकावर आहे. ही एक अमेरिकन बँक आहे. ही अमेरिकेतील चौथी सर्वात मोठी बँक आहे.

7⃣ सातव्या क्रमांकावर आहे Citi Bank समुह. ही एक अमेरिकन बँक आहे. या बँकेच्या मुख्य कार्यालय न्यूयॉर्क शहरामध्ये आहे.

8⃣ आठव्या क्रमांकावर आहे HSBC Holdings समुह. ही एक ब्रिटीश बँक आहे.

9⃣ नवव्या क्रमांकावर आहे Banco Santander बँक. ही बँक मूळची स्पेनमधील आहे.

🔟 दहाव्या क्रमांकावर आहे BNP Paribas बँक. ही बँक मूळची फ्रान्समधील आहे. या बँकेच्या शाखा 77 देशांमध्ये आहेत.

🧐 *भारताचे स्थान?* : भारतातील एकही बँक या यादीमध्ये नाही. मात्र भारतातील सर्वात मोठ्या बँकेबद्दल बोलायचे झाल्यास HDFC ही भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे.

जागतिकीकरण


          जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते.

        विश्व बॅंकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजे-

  १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे.

२) आयात शुल्काचा दर कमी करणे.

३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.

◾️जागतिकीकरण म्हणजे ◾️

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...