Tuesday 13 August 2019

🔶🔶सविनय कायदेभंग चळवळ 🔶🔶

ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी १४ १९३० रोजी झाली होती.

🔷🔷सुरुवात🔷🔷

भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते.
महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या.
सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेलानिघाले. 
एप्रिल ५, १९३० ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला.

☘☘नॉलेज क्लस्टर’मध्ये पुण्यासह सहा शहरांची निवड☘☘

🅾केंद्र सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’  (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणे, भुवनेश्वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये किंवा राज्यात अस्तित्वात असलेल्या संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात  समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे.

🅾राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांसाठी निश्चित केलेल्या अ‍ॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे.

🅾या सर्व शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असून, काही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेत, असे पीएसए कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावरील २० प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असून, तीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला.

डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत परतणार.

✍माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा राज्यसभेत परतणार आहेत. राजस्थानमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता डॉ. सिंग हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

✍डॉ. सिंग यांनी १९९१ ते २०१९ अशी २८ वर्षे आसाममधून राज्यसभेचे सदस्यत्व केले होते. जून महिन्यात त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आली. आसाम विधानसभेत काँग्रेसकडे पुरेशी मते नसल्याने डॉ. सिंग यांचा राज्यसभेचा मार्ग बंद झाला होता. डॉ. सिंग यांच्यासारखे  नेते राज्यसभेत आवश्यक असल्याने काँग्रेसने तमिळनाडूतून डॉ. सिंग यांना निवडून आणण्याची योजना आखली होती.

✍याच दरम्यान राजस्थान भाजप अध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनाने राजस्थानमध्ये एक जागा रिक्त झाली होती.  २०० सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०० आमदार असून, अपक्ष आणि बसपाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे डॉ. सिंग यांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही.

यशाचा राजमार्ग आता तुमच्या WhatsApp वर

आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक  चॅनेलवर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी Channel आहे कि ज्यातून BANKING आणि MPSC साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात OFFICER व्हायचंय तसेच ज्याना COACHING परवडत नसेल अशा सर्वाना आम्ही विनंती करू कि यशाचा राजमार्गला Join करा.

Click here
👇👇👇👇

*चालू घडामोडी (13/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘चित्रभूषण’*

● अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.

● शाल, श्रीफळ आणि 51,000 हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

● चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले.

◆ तसेच रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

● शाल, श्रीफळ आणि 11 हजार रुपये रोख रक्कम असे देण्यात येणार्या या पुरस्काराचे स्वरूप आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *काजिन सारा सरोवर ठरले जगातील सर्वात उंचीवरील सरोवर*

● नुकतेच नेपाळमध्ये काजिन सारा नावाचे सरोवर सापडले आहे,  हे सरोवर आता जगातील सर्वात उंचीवरील सरोवर म्हणून ओळखले जाणार आहे.

● हे सरोवर नेपाळमधील मनांग जिल्ह्यातील चामे नावाच्या क्षेत्रात सिंगारखडका भागात स्थित आहे.

● सध्या जगातील सर्वात उंचीवरील सरोवर तिलिचो आहे,  ते नेपाळमध्ये  4,919 मीटर उंचीवर आहे.

★ काजिन सारा सरोवर :

● या सरोवराचे स्थानीक नाव सिंगार आहे.
●  हे सरोवर  5200 मीटर उंचीवर स्थित आहे.
● हिमालयातील बर्फ वितळण्यामुळे हे सरोवर तयार झाले आहे.
_______________________________
                ★ संकलन ★
   राजेश देशमुख               दिगंबर आधुरे
(राज्य कर निरीक्षक)   (सहा. कक्ष अधिकारी)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *चंद्रिमा शहा : भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा*

● प्रख्यात जीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.

● 2020 ते 2022 पर्यंत त्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

● याआधी त्या दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थाच्या संचालिका होत्या.

★ भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी :

● या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली होती, त्यावेळी ही संस्था "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया" या नावाने ओळखली जात होती. 1970 पासून ही संस्था भारतीय 'राष्ट्रीय विज्ञान अकादमी' नावाने ओळखली जाते.

● ही विज्ञानातील सर्व शाखांमधील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे.

● उद्देश : देशात विज्ञानाचा प्रसार करणे
● मुख्यालय : नवी दिल्ली
● यापूर्वीचे अध्यक्ष : अजय सूद
● वर्तमान अध्यक्षा : चंद्रिमा शहा
_______________________________
                ★ संकलन ★
   राजेश देशमुख               दिगंबर आधुरे
(राज्य कर निरीक्षक)   (सहा. कक्ष अधिकारी)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *डॉ. विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली*

◆ भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, 'इस्रो'चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

◆- भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक
◆- जन्म: 12 ऑगस्ट 1919
◆- मृत्यू: 30 डिसेंबर 1971

◆- भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी Cosmic Rays वरती संशोधन केले

◆- 1962 मध्ये Indian National Committees for Space Research या संस्थेची स्थापना केली 1969 मध्ये याचेच नाव ISRO ठेवण्यात आले.

◆- 1962 मध्ये IIM अहमदाबाद स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली
---------------------------------------------------
● पुरस्कार

◆- 1962: शांती स्वरूप भटनागर पदक
◆- 1966: पद्म भूषण
◆- 1972: पद्म विभूषण (मरणोत्तर)

◆ ISRO ची महत्त्वाची संस्थेचे Vikram Sarabhai Space Centre असे नामांकरण करण्यात आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

RRB JE CBT -1 Result 👇👇

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...