नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२३ एप्रिल २०२५
२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ
१. भारताच्या नवीन अॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे?
ए.आय.ओ.सी.
बी. युनेस्को
सी. वाडा
डी. नाडा
उत्तर: सी. वाडा
२. 'समर्थ' ही एआय प्रणाली कोणत्या क्षेत्रात काम करते?
अ. शेती
ब. आरोग्यसेवा
क. सुरक्षा
D. शिक्षण
उत्तर: C. सुरक्षा
३. भारताने 'समर्थ' एआय डिटेक्शन सिस्टम कोणत्या देशाला निर्यात केली आहे?
A.नेपाळ
बी. भूतान
C. बांगलादेश
ड. श्रीलंका
उत्तर: D. श्रीलंका
४. UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे?
UNCTAD चे मुख्यालय कुठे आहे?
ए. पॅरिस
बी. न्यू यॉर्क
सी. जिनेव्हा
डी. ब्रुसेल्स
उत्तर: सी. जिनिव्हा
५. 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवला जातो?
अ. गृह मंत्रालय
ब. पर्यटन मंत्रालय
C. अर्थ मंत्रालय
D. ग्रामीण विकास मंत्रालय
उत्तर: अ. गृह मंत्रालय
६. व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामचा मुख्य उद्देश काय आहे?
अ. वनक्षेत्र विकास
ब. किनारी क्षेत्राचा उन्नती
C. सीमावर्ती क्षेत्र विकास
D. वाळवंट क्षेत्राचा प्रचार
उत्तर: C. सीमावर्ती क्षेत्र विकास
७. कोणत्या राज्याने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा बनवली आहे?
ए. केरळ
बी. तामिळनाडू
क. महाराष्ट्र
डी. गुजरात
उत्तर: C. महाराष्ट्र
८. भारत कोणत्या क्रमाने WADA मान्यताप्राप्त अॅथलीट पासपोर्ट युनिट स्थापन करणारा देश बनला आहे?
अ. १५ वा
ब. १६ वा
क. १७ वा
दि.१८ वा
उत्तर: क. १७ वा
९. २०२५ मध्ये भारतासाठी UNCTAD चा अंदाजित GDP विकास दर किती असेल?
अ.५.८%
६.०%
क. ६.५%
डी.७.१%
उत्तर: क. ६.५%
१०. 'जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन' कधी साजरा करण्यात आला?
अ. २० एप्रिल
ब. २१ एप्रिल
क. २२ एप्रिल
डी. २३ एप्रिल
उत्तर: बी. २१ एप्रिल
कोनांची मापे दर्शविणारा तक्ता
1. शून्यकोन - 0° मापाचा कोन
2. लघुकोन - 90° पेक्षा कमी
3. काटकोन - 90° मापाचा कोन
4. विशालकोन - 90°पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी
5. सरळकोन - 180° मापाचा कोन
6. प्रविशालकोन - 180° पेक्षा जास्त व 360° पेक्षा कमी
7. सहअवसानी कोन 360° पेक्षा जास्त
8. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180°
9. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360°
10. वर्तुळाचे माप - 360°
11. अर्धवर्तुळाचे माप 180°
12. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाचे माप 180°
13. चक्रीय चौकोनाचे संमुख कोन पूरक असतात - 180°
14. छेदिकेवरून तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील कोनांची बेरीज 180°
15. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60°
16. षट्कोनातील प्रत्येक कोनाचे माप 120°
17. अर्धवर्तुळाने आंतरित केलेल्या कोनाचे माप- 90°
18. काटकोनाचे माप - 90°
19. कोटीकोनाचे माप (दोन कोनांच्या मापांची बेरीज) - 90°
20. पूरक कोनाचे माप (दोन कोनांच्या मापांची बेरीज) 180°
21. रेषीय जोडीतील कोनांचे माप (दोन कोनांच्या मापांची बेरीज) 180°
22. समद्विभुज त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर एकरूप बाजू समोरील कोन - 45° प्रत्येकी
संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच
1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे
उत्तर : तात्या टोपे
2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?
महादेव गोविंद रानडे
लिओ टॉलस्टॉय
दादाभाई नौरोजी
गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले
3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?
सरोजिनी नायडू
प्रितीलता वडडेदार
इंदिरा गांधी
राणी लक्ष्मीबाई
उत्तर : प्रितीलता वडडेदार
4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?
पंडित नेहरू
विनोबा भावे
साने गुरुजी
सरदार पटेल
उत्तर : सरदार पटेल
5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?
डॉ. आंबेडकर
लॉर्ड आयर्विन
बॅ. जिना
पंडित नेहरू
उत्तर : डॉ. आंबेडकर
6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?
स्वा.सावरकर
बटूकेश्वर दत्त
रासबिहारी घोष
भुपेंद्रनाथ दत्त
उत्तर : स्वा.सावरकर
7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?
सुभाषचंद्र बोस
रासबिहारी बोस
कॅ. भोसले
कर्नल धिल्लन
उत्तर : रासबिहारी बोस
8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?
लॉर्ड कॅनिंग
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेटिंग
लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी
9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड बेटिंग
लॉर्ड रिपन
लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी
10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?
1 एप्रिल 1878
मार्च 1905
मार्च 1978
एप्रिल 1994
उत्तर : 1 एप्रिल 1878
11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?
लॉर्ड रिपन
लॉर्ड मॅकॉले
लॉर्ड मेयो
लॉर्ड विलीग्टन
उत्तर : लॉर्ड रिपन
12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?
मुंबई ते ठाणे
मुंबई ते दिल्ली
कल्याण ते ठाणे
मुंबई ते पुणे
उत्तर : मुंबई ते ठाणे
13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?
मंगल पांडे
तात्या टोपे
कूंवरसिंह राणा
कर्नल आयरे कूट
उत्तर : कूंवरसिंह राणा
14. जालियनवाला बाग कोठे आहे?
पटियाळा
दिल्ली
अमृतसर
अलाहाबाद
उत्तर : अमृतसर
15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?
सर सय्यद अहमद खान
मौलाना अली महंमद
आगाखान
महात्मा गांधी
उत्तर : महात्मा गांधी
16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
नेताजी सुभाषचंद्र बोस
जवाहरलाल नेहरू
मोतीलाल नेहरू
मौलाना आझाद
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस
17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?
नबाब सलीमुल्ला
आगाखान
बॅ. महंमद जीना
मौलाना आझाद
उत्तर : नबाब सलीमुल्ला
18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?
सेनापती बापट
बी.सी.दत्त
मोहन रानडे
पं. जवाहरलाल नेहरू
उत्तर : बी.सी.दत्त
19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
सच्छिंद्रनाथ सन्याल
नानासाहेब पेशवे
तात्या टोपे
उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?
सच्छिंद्रनाथ सन्याल
बंकिमचंद्र चटर्जी
व्योमेशचंद्र बॅनर्जी
महात्मा गांधी
उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल
सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
* १८२९ : सती बंदीचा कायदा
* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* १९०४ : अभिनव भारतची स्थापना
* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* १९१६ : लखनौ करार.
* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
१९१९ : माँटफर्ड कायदा.
* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत िहंसा
* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* १९२३ : झेंडा सत्याग्रह.
* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* १९२७ : बार्डोली सत्याग्रह
* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.
* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट
* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* १९३१ : गांधी-आयर्विन करार.
* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अॅक्ट मंजूर.
* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.
* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.
स्वराज्य पक्ष
🔹सवराज्य पक्ष उदयाची कारणे
* म. गांधीचा चळवळ तहकुबीचा आदेश
* सरकारची ताठर भूमिका
* राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यातील सहकार्याची समाप्ती
* गांधीजींची अनुपस्थिती
* चौकशी समितीचा निष्कर्ष
🔹सवराज्य पक्षाची स्थापना
* मोन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अंतर्गत होऊ घातलेल्या निवडनुकीवर बहिष्कार घालावा असे राष्ट्रसभेचे धोरण होते.
* परंतु हा बहिष्कार घालण्याऐवजी कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला सनदशीर मार्गाने विरोध करावा असे काही नेत्यांना वाटत होते.
* त्यामुळे राष्ट्रसभेची फेरवादी नावाचा गट सी. आर. दास. व मोतीलाल नेहरू यांच्या नियंत्रणाखाली स्थापन झाला.
* नाफेरवादी एक गट डॉ राजेंद्रप्रसाद वाल्लभबाई पटेल यांच्या नियंत्रणाखाली तयार झाला. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून तिच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना डिसेंबर १९२२ मध्ये फेरवादी विचारवंतानी केली.
🔸सवराज्य पक्षाची उदिष्टे
* आपल्या मताचा प्रसार करून असहकार चळवळीमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज दूर करून व निवडणुका लढवणे व कायदे मंडळाचे सभासदत्व प्राप्त करणे.
* सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्वराज्याची तळमळ कायम ठेवून राष्ट्रीय चळवळीत प्रगती करणे आवश्यक होते.
* ब्रिटीश शासनाच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवून हिंदुस्तानच्या घटनेत आवश्यक ते अनुकूल परिवर्तन घडवून आणणे.
* देशातील सर्व हिंदू मुसलमानामध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे.
* ब्रिटीश शासनाची हिंदुस्तानच्या बाबतीत असलेली ताठर भूमिका बदलून कल्याणकारी राज्य स्थापन करणे.
🔹सवराज्य पक्षाची कार्ये
* सरकारच्या धोरणावर प्रहार
* चळवळीची जागृती
* चळवळीचे कार्यक्रम
* गोलमेज परिषदेची उभारणी
लॉर्ड & वहाइसरॉय
👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :
सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.
👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :
सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अॅक्ट फॉर पंजाब अॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.
👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :
सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.
👉 वहाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :
१८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता. बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला. बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले. त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला. त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे. इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.
👉लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)
लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे. १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला. आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.
👉 वहाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४)
भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो. इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अॅक्ट पास केला. इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला. रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली. हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली. १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली. १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली. १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.
👉 लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८)
रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली. डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अॅचिसन समिती नेमली. चार्ल्स अॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली. १८८७ मध्ये अॅचिसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या. डफरिनच्या काळात अॅलन ‘ाुम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला. डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली. बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.
👉 लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४)
भारतीयांना शासनात सहभाग मिळावा म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा, १८९२ संमत झाला. सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिला डय़ुरांड रेषा म्हणतात. १८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अॅक्ट मंजूर केला गेला. समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे व्हाइसरॉय लॅन्सडाऊनने एज ऑफ कन्सेंट अॅक्ट (संमतिवयाचा कायदा) १८९१ मध्ये संमत केला.
👉 लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९)
यांच्या कारकिर्दीत १८९६ चा भीषण दुष्काळ पडला. १८९६-९७ दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने अन्नधान्य हाँगकाँगकडून मुंबई बंदरात आणले. या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.
👉 लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)
👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.
👉 कर्झनच्या शेती सुधारणा :
👉 १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.
👉 लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०)
👉 १९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले. १९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला. मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली. स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले. १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अॅक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला.
👉 वहाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६)
👉 भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड हार्डिंग्जला ओळखतात. व्हाइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्लीत १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली. २३ डिसेंबर, १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलविली. त्या शाही मिरवणुकीत हार्डिंग्ज बॉम्बहल्ल्यात जखमी झाला. रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरला. तो खटला दिल्ली खटला म्हणून ओळखतात.
डिसेंबर, १९१४ मध्ये प्रथम महायुद्धास सुरुवात झाली. भारतीयांनी त्यास बिनशर्त पाठिंबा दर्शविला.
👉 लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१)
👉 लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य केले होते. १९१९ चा माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला. १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू केला. १३ एप्रिल, १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. (जनरल डायर). १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ .
👉 लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६)
👉 लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली. काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला.
👉 लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)
👉 आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले. डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला. आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली. ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.
👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६)
👉 वहाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.
👉 वहाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३)
👉 सटॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता. १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली. सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.
👉 लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७)
👉 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली. इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली. आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.
👉 वहाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८)
👉 मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले. २ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ३ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ठरले. माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते.
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1) 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?
✔️ लार्ड कँनिंग
2) 1857 च्या उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ति कोण ?
✔️ मगल पांडे
3) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ?
✔️ विनोबा भावे
4) " आझाद हिंद सेने " ची स्थापना कोणी केली ?
✔️ रासबिहार बोस
5) मायकेल ओडवायरीची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली ?
✔️ उधमसिंग
6) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता ?
✔️ लार्ड कर्झन
7) भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ति कोण ?
✔️ राजा राममोहन रॉय
8) " पुणे करार " कोणाकोणामंध्ये झाला ?
✔️ महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर
9) जहाल गटातील तीन प्रसिद्ध नेत्यांची ( त्रिमूर्ती ) नावे सांगा ?
✔️ लाल - बाल - पाल
10) इ.स. 1930 मंध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले ?
✔️ रम्से मँक्डोनाँल्ड
11) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
गो. कृ. गोखले
12) जुन्या मुबंई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर -----------होता
✔️ एलफिन्स्टन
13) इ.स. 1829 मंध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला ?
✔️ बटिग विल्यम
14) " शिवजयंती उत्सव " महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण ?
✔️ बा.ग.टिळक
15) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ?
✔️ सर ए. ओ.ह्युम
16) भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ----------------
✔️ अनी बेझंट
17) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
✔️ वयोमेशचंद्र बँनर्जी
18) डाँ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी "गदर " ही गुप्त क्रांतिकारक संघटना ----------या देशामंध्ये सुरू केली ?
✔️ अमेरिका
19) काँग्रेसचे पहिले अधिवेशन ------------या शहरात घडून आले ?
✔️ मबंई
20) कलेक्टर जँक्सनचा वध करणारा क्रांतिकारक -------------
✔️ अनंत लक्ष्मण कान्हेरे
21) " अभिनव भारत संघटनेचे " संस्थापक कोण ?
✔️ वि.दा.सावरकर
22) आद्य क्रांतिकारक ?
✔️ वासुदेवन बळवंत फडके
23) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कदी झाला ?
✔️ 1858
24) हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पाश्र्वभूमी कोणी तयार केली ?
✔️ सवामी रामानंद तीर्थ
25) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराँय कोण ?
✔️ लार्ड कँनिंग
26) "व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट "रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण ?
✔️ लार्ड रिपन
27) लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटा बरोबर केली जाते ?
✔️ औरंगजेब
29) 1929 मंध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या आध्यक्षेखाली पास झाला ?
✔️ पडित नेहरू
30) "गदर पार्टीचे " पुणे जिल्ह्यातील कार्यकरते कोण ?
✔️ विष्णू गणेश पिगंळे
32) विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक ------------
✔️ धोंडो केशव कर्वे
31) भारकाचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ?
✔️ सी. राजगोपालाचारी
33) होमरुल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली ?
✔️ मबंई
34) "असहकार चळवळ " कोणी केली ?
✔️ महात्मा गांधी
35) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरूध्द----------- यांनी आवाज उठविला ?
✔️ वि.रा.शिदें
36) वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही ------------
✔️ पडित नेहरू
37) मुंबई येथे थिआँसाँफिकल सोसायटी शाखा इ.स.-----------या वर्षी झाली ?
✔️ इ.स.1897
38) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना "राणीचा जाहिरणामा " प्रस्तुत करणार्या साम्राद्नीचे नाव -----------?
राणी व्हिक्टोरिया
✔️
39) भारतातील" स्वतंत्र " हा शब्द ब्रिटिश राजकर्त्यानी ---------------मंध्ये वापरला ?
✔️ अटलीच्या घोषणेत
40) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात।?
✔️ लार्ड रिपन
तिसरी गोलमेज परिषद
कार्यकाळ :- 1 महिना
उपस्थित सदस्य :- 46 प्रतिनिधी उपस्थित होते व तेही सरकारशी एकनिष्ठ होते.
🖍काँग्रेसने या परिषदेवर बहिष्कार टाकला.
🖍इग्लंडमधील मजुर पक्षाने देखील या परिषदेस अनुपस्थिती दर्शविली.
🖍 सरकारचे धोरण यावेळेस अधिकच प्रतिगामी होते.
🖍 या परिषदेला जिना, इक्बाल यांनाही बोलविले नाही.
🖍तसेच हिंदु महासभेलाही नाही.
🖍बरिटीशशासित भारताचे केवळ 22 व संस्थांनाचे 12 एवढेच प्रतिनिधी या परिषदेसाठी आमंत्रीत केले गेले होते.
🖍मजुर पक्षानेही या परिषदेतुन अंग काढुन घेतले.
🖍महत्वाचे उपस्थित असेलेल प्रतिनिधी :-
👉आगाखान,
👉आबेडकर,
👉तजबहादुर सप्रु,
👉कळकर,
👉बगम शहनवाझ.
महत्वाचे म्हणजे हे महत्वाचे प्रतिनिधी तिनही परिषदेला हजर होते.
🖍 यातील योजनेत मुलभुत हक्कांचा समावेश करण्यात यावा अशी भारतीय प्रतिनिधींनी मागणी केली पण ती मंजुर झाली नाही.
🖍 एकुण 3 परिषदांपैकी 2 परिषद मध्ये काँग्रेसचा सहभाग नसल्याने यांना फारशी लोकप्रियता मिळाली नाही.
📚या परिषदेमध्ये पुढील बाबींवर चर्चा झाली.
👉मतदान अधिकारात स्त्रियांचा सहभाग.
👉कद्रीय संघटनेच्या बाबतीत मतदान पध्दती, अर्थव्यवस्था व राज्याचे अधिकार.
🖍वरील 3 परिषदेमधील चर्चेनुसार मार्च 1933 मध्ये सरकारतर्फे एक श्वेत पत्रिका प्रसारीत करण्यात आली.
🖍या श्वेतपत्रिकेच्या आधारे ब्रिटन संसदेमध्ये एक कायदा पारित करण्यात आला व यालाच 1935 चा
भारत सरकारचा कायदा असे म्हणतात.
📚 सदर्भ :- "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारनी", बी पब्लिकेशन, पुणे.
लेखन व संकलन - अॅड. वरद देशपांडे
गोलमेज परिषद
⚜पहिली गोलमेज परिषद (१९३०-३१)⚜
इंग्लंड मध्ये पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड च्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३० मध्ये भरवण्यात आली आली. पहिल्या गोलमेज परिषदेला एकंदर ८९ प्रतींनिधी जमले होते. ८९ सदस्या पैकी १६ सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रसभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता.
सरकारच्या विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ चालू ठेवली होती. यामुळे व्हाईसरॉय ने महात्मा गांधीस व इतर नेत्यास तरुंगातून मुक्त केले.
५ मार्च १९३१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व इंग्लंडवरुन आलेल्या आयर्विन यांच्यात अनेक करार झाले; त्या करारास गांधी-आयर्विन करार म्हणून संबोधले जाते.
गांधी आयर्विन करारा बरोबरच सविनय कायदेभंग चळवळीचा शेवट झाला. त्याच बरोबर हिंदुस्थानातील नेत्यांनी दुसर्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यास संमती दर्शवली.
⚜दुसरी गोलमेज परिषद⚜
७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.
ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.
पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली.
परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.
गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.
मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.
त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.
1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.
हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.
सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.
आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.
संस्थात्मक योगदान :
1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.
1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.
2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)
24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.
ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.
1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.
1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.
मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.
20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.
आंबेडकरांचे लेखन :
The Problem Of Rupee
1916 - Cast In India
1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)
1946 - The Untouchables
1956 - Thoughts on pakisthan.
1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.
'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.
1920 - मुकनायक.
1927 - समता.
1946 - Who Were Shudras?
वैशिष्ट्ये :
गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.
1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.
1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.
1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.
29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.
1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.
14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.
सायमन कमिशन महत्वाचे मुद्दे
सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी. २६ जाने. १९३० रोजी पहिल्या स्वातंत्र्यदिन पाळला गेला.
नेहरू अहवालातील तत्त्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची धमकी गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्विन यांना दिली. (२३ डिसेंबर १९२९), आयर्विन यांचा प्रतिसाद नाही.
१९२९च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (१२ मार्च १९३० ते ५ मार्च १९३१)
१२ मार्च १९३० रोजी आपल्या ७८ सहकाऱ्यांनिशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.
साबरमती ते दांडी अंतर – ३८५ कि.मी.
६ एप्रिल १९३० रोजी मिठाचा कायदा मोडला.
धरासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (२१ मे १९३०)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.
या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (१९३०)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३०मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्विन करार – ५ मार्च १९३१, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.
दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर १९३१मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रारंभ - ३ जाने. १९३२
सविनय कायदेभंगाची समाप्ती – १९३४
सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न
प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: ओडिशा
प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर –: सी. राजगोपालाचारी
प्रश्न –: टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर -: अलेक्झांडर ग्राहम बेल
प्रश्न –: महात्मा गांधींनी साबरमती आश्रम कधी स्थापन केला?
उत्तर:- १९१६
प्रश्न -: चौरी चौरा घटना केव्हा आणि कुठे घडली?
उत्तर –: ४ फेब्रुवारी १९२२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा शहरात
प्रश्न –: मोप्ला चळवळ कधी आणि कुठे झाली?
उत्तर –: १९२१, मलबार, केरळ
प्रश्न -: स्वराज पक्षाची स्थापना कोणी केली?
उत्तर –: मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास
प्रश्न –: लखनौ करार कधी आणि कोणामध्ये झाला?
उत्तर –: डिसेंबर १९१६ मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात
प्रश्न –: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या?
उत्तर: सरोजिनी नायडू
प्रश्न –: दांडी यात्रा कधी सुरू झाली?
उत्तर:- १२ मार्च १९३०
प्रश्न -: प्राणीशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात?
उत्तर –: अरिस्टॉटल
प्रश्न -: आग्रा किल्ला कोणी बांधला?
उत्तर: अकबर
प्रश्न –: कोणाचा वाढदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: मेजर ध्यानचंद
प्रश्न –: जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: ५ जून
प्रश्न -: चंपारण्य सत्याग्रह कधी झाला?
उत्तर: १९ एप्रिल १९१७
प्रश्न –: राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने लोकसभा तिचा कार्यकाळ संपण्यापूर्वी विसर्जित करू शकतात?
उत्तर: पंतप्रधान
प्रश्न -: सांची स्तूप कोणी बांधला?
उत्तर: सम्राट अशोक
प्रश्न -: प्रसिद्ध चिनी प्रवासी फा-हियान यांनी कोणाच्या कारकिर्दीत भारताला भेट दिली होती?
उत्तर –: चंद्रगुप्त दुसरा
प्रश्न -: रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर –: व्हिटॅमिन ए
प्रश्न –: पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे?
उत्तर: तामिळनाडू
निजाम राजवटीची स्थापना
1. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.
2. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.
3. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.
4. मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२० मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.
5. निजाम व मोगल सरदार मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.
6. पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात.
7. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले. इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान अलीचे स्वप्न होते.
8. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला दिले.
9. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.
इंग्रज निजाम संबंध
1. निजामाच्या हाताखाली दक्षिणेतील सहा सुभे आणि त्यांतील कडप्पा, कुर्नूल, अर्काट, शिरे व सावनूर हा नबाबाचा प्रदेश होता. याशिवाय म्हैसूर, तंजावर संस्थांनाचे राजे त्याचे मांडलिक म्हणून समजले जात.
2. दक्षिणेत त्यास प्रथम मराठे नंतर इंग्रज, हैदर व टिपू हे प्रतिस्पर्धी होते. मराठ्यांचे बळ खच्ची करण्याकरिता निजामाने अनेक उपाय योजले; पण त्याच्या सर्व कारस्थानांना शह देणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्याने निजाम व दिल्लीकर मोगल यांचे संबंध तोडण्याचे प्रयत्न करुन निजामाच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळविल्या.
3. १७४८ मध्ये निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर निजामशाहीत गोंधळ माजला. नवा निजाम नासिरजंग याच्याविरुद्ध त्याचा भाचा मुजफ्फरजंग याने बंड पुकारुन अर्काटच्या नबाबामार्फत फ्रेंचांशी संधान बांधले. या प्रकरणी झालेल्या लढायांत प्रथम नासिरजंग व नंतर मुजफ्फरजंग मारले जाऊन, नासिरजंगाचा भाऊ सलाबतजंग गादीवर आला सलाबतजंगाच्या दरबारी फ्रेंचांचे वर्चस्व वाढून उत्तर सरकार या नावाने ओळखला जाणारा प्रदेश फ्रेंच सैन्याच्या खर्चासाठी देण्यात आला.
4. १७५५ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध होऊन उत्तर सरकारचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा ताबा कबूल करण्यात यावा आणि त्याबाबत कंपनीतर्फे काही ठराविक रक्कम निजामाला देण्यात यावी, अशी बोलणी करण्याकरिता इंग्रजांनी आपले दोन अधिकारी हैदराबादला सलाबतजंगाकडे पाठविले, हाच निजाम व इंग्रजांचा आलेला पहिला संबंध होय. सलाबतजंगाने इंग्रजांची मागणी मान्य केली व उत्तर सरकारचा प्रदेश कायमचा इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला.
5. सलाबतजंगाला गादीवरुन काढून त्याचा धाकटा भाऊ निजाम अली १७६२ मध्ये निजाम बनला. त्याने आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत हैदर अली व टिपू यांच्याशी झालेल्या युद्धांनंतर इंग्रजांशी पूर्ण सहकार्य करुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.
6. १७९५ मध्ये निजाम अलीने मराठ्यांविरुद्ध इंग्रजांनी आपणास मदत करावी, अशी मागणी केली पण इंग्रजांनी निजामाची विनंती नाकारली. त्याचा परिणाम म्हणजेच खर्ड्याच्या लढाईत (१७९५) पराभूत होऊन निजामास मराठ्यांबरोबर नामुष्कीचा तह करावा लागला.
7. इंग्रजांनी या युद्धात आपल्याला मदत केली नाही, याचे वैषम्य वाटून निजामाने आपल्याकडे असलेल्या इंग्रजी सैन्याला परत पाठविले, पण स्वतःचा मुलगा अलीजाहने बंड केल्याने निजामास हे सैन्य परत बोलवावे लागले.
8. या काळात निजामाच्या सैन्यात फ्रेंचांचे बरेच वर्चस्व होते. पण १७९८ मध्ये फ्रेंच सेनापती मुसा रेमाँच्या मृत्यूनंतर हे सैन्य बरखास्त करावे, अशी इंग्रजांनी केलेली मागणी निजामाने मान्य केली. यामुळे फ्रेंचांची मक्तेदारी संपून निजामाच्या दरबारात इंग्रजांचे वर्चस्व वाढले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणच्या टिपूविरुद्धच्या लढाईत निजामाने इंग्रजांस मदत केली. लॉर्ड वेलस्लीने सुरु केलेल्या तैनाती फौजेच्या पद्धतीस निजाम बळी पडला.
9. १२ ऑक्टोबर १८०० मध्ये निजाम व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात तह झाला. या तहान्वये निजामाच्या संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबाद येथे कायम ठेवण्यात आली. निजामाने भारतातातील कोणत्याही सत्ताधीशांबरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही, असे कबूल केले.
10. इंग्रजी फौजेच्या खर्चाकरिता श्रीरंगपटणच्या लढाईत मिळालेले कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर व बल्लारी हे जिल्हे निजामाने इंग्रजांना कायमचे दिले. त्यांच्या मोबदल्यात निजामाचे परचक्रापासून व राज्यातील बंडखोरीपासून रक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी घेतलीयावेळेपासून निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले.
11. ही घटना निजाम अलीचा मुलगा सिकंदरजाह, सरदार महिपतराव वगैरेंना आवडली नाही. त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारस्थाने व हैदराबाद राज्याविरुद्ध बंडे सुरु केली. १८०० ते १८५७ या काळातील सिकंदरजाह, रावरंभा निंबाळकर, महिपतराव वगैरेंची कारस्थाने, त्याचप्रमाणे निरनिराळ्या जमातींची व व्यक्तींची बंडे मुख्यतः इंग्रजी सैन्याने मोडून काढली.१८५७ च्या उठावात हैदराबादच्या जनतेने भाग घेतला, पण इंग्रज आणि सालारजंग यांनी या चळवळीचा बंदोबस्त करण्यात यश मिळविले.
12. १८५७ नंतरच्या काळात मुख्यतः निजाम व इंग्रजांविरुद्धच्या हैदराबादमधील जनतेच्या सनदशीर चळवळींचा समावेश होतो. त्यांत १८९२ मधील आर्यसमाजाची स्थापना, १९०५ मधील स्वदेशी चळवळ, १९१० मधील दहशतवाद्यांची कृत्ये, १९२१ मधील आंध्र महासभा व स्टेट रीफॉर्म्स असोसिएशनची स्थापना व १९३८ मधील काँग्रेस, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचा सत्याग्रह वगैरे महत्त्वाच्या घटना होत.
13. १८८० पासून हिंदी मुसलमानांचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून इंग्रजांनी, निजाम व त्याचे अधिकारी यांच्या मनात, हैदराबादच्या राज्यास मोगली साम्राज्याचा अवशेष व मुसलमान संस्कृतीचे प्रतीक म्हणून विशिष्ट स्थान आहे, अशा प्रकारची कल्पना भरविली.
14. अर्थात त्यामुळेच पुढील राजकारणात निजामाने इंग्रजांना नुसतीच मदत केल
कुशाण राजे आणि सम्राट कनिष्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या.
➡️त्यांमध्ये मध्य आशियातून आलेल्या 'कुशाण' नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले.
भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली.
➡️नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली.
कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला.
✔️सम्राट कनिष्क : -
कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते.
➡️कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत.
कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती.
कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले काम्पूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे.
➡️कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने 'बुद्धचरित' आणि 'वज्रसूचि' हे ग्रंथ लिहिले.
कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैदय होता.
जगाविषयी सामान्य ज्ञान
💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
💠 शरीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
💠 नपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
💠 यशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
💠जरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
💠 वहॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
💠 इग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
💠लडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
💠 सवित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
💠 कनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.
💠 सवीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
💠 नदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
💠तर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.
💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
💠 लडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
💠मक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
💠 दबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
💠 लहासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
💠 बकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
💠 परिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
💠 लडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.
💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
💠 कनडा सर्वात लांब रस्ते.
💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
💠 कनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
💠 बराझील कॉफी उत्पादनात प्रथम.
💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.
💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
💠कयुबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.
💠 मगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
💠अमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
💠इडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
💠गरीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
💠 बराझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
💠इग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
💠 वहिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
💠 बरुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
💠 हग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
💠 कप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
💠नपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
💠मबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ
जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.
बंगाल राज्य व बंगाल युद्धे
प्लासीची लढाई :
बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.
सिराजउद्दौला (कार. १० एप्रिल १७५६-२३ जून १७५७) हा ⇨अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. अंधारकोठडीची तथाकथित घटना याच वेळची [⟶ अंधारकोठडी, कलकत्त्याची]. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. ⇨रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले (२ जानेवारी १७५७). तेव्हा सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला (९ फेब्रुवारी १७५७). या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करावयाचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले (२३ मार्च १७५७) आणि सिराजउद्दौलाविरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला.
कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या : (१) फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी. (२) फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात आणि (३) फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत. सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापतिपदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याचे चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.
विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. त्यामुळे नबाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. पुढे फ्रेंचांबरोबरच्या युद्धात (कर्नाटक) त्यांना या वेळची बरीच साधनसामग्री उपयोगी पडली [⟶ इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील]. बंगालमधील फ्रेंचांचे वर्चस्व कमी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तिथे दृढतर झाली. यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.
बक्सारची लढाई
(२२ ऑक्टोबर १७६४). मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.
लढाईची पार्श्वभूमी व कारणे
प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा सुभेदार मीर जाफर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कुरकुर करू लागला. मीर जाफरनंतर त्यास कोणी वारस नसल्याने, त्याच्या जावयास-मीर कासिमला सुभेदारी द्यावी या कंपनीच्या बेताला मीर जाफरने संमती दिली नाही. ब्रिटिशांचे पारडे बंगालमध्ये जड होत असल्याचे पाहून मीर जाफरने डचांच्या स्वारीला फूस दिली. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०) वरील घटनांवरून मीर जाफरबद्दल कंपनीला संशय आला आणि त्यामुळे कंपनीने त्यास पदच्युत केले व मीर कासिमला सुभेदारपद दिले. सुभेदारीच्या बदल्यात मीर कासिम कंपनीच्या मर्जीप्रमाणे सुभ्याचा कारभार करील, अशी कंपनी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. कंपनी व कंपनीच्या इंग्रज नोकरांनी मीर कासिमला कर न देता व्यापार चालू केला. बंगाल सुभ्यातील (बंगाल, बिहार, व ओरिसा) प्रजेने व जमीनदारांनी कंपनीच्या व्यापाराबद्दल तक्रारी केल्या. यावरून मीर कासिमने कंपनीकडे तक्रार केली. त्याच्या कर वसुलीत मोठी घट येऊ लागली. कंपनीने या घटनांकडे दुर्लक्षच केले. मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला. वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते. मीर कासिमने कंपनीला एलिसबद्दल कळविले होते. मीर कासिम नमत नाही हे पाहून त्याऐवजी मीर जाफरला परत सुभेदार करण्याचे कंपनीने ठरविले. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासिमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. बंगालमधून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मीर कासिम तयार झाला. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मोंघीरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मोंघीर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. शाह आलमसुध्दा शुजाउद्ददौल्यापाशी होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला.
बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दीदैल्याकडे आले.
पाटण्याहून निघालेल्या कंपनी सैन्याला (सेनापती मेजर हेक्टर मन्रो) बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली. कंपनीचा जय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला.
मोगली सैन्याचा पराभव होण्याची कारणे
खंबीर नेतृत्वाची उणीव व भाडोत्री यूरोपीयांची दगाबाजी. मीर कासिमने यूरोपीय पध्दतीचे कवायती सैन्य प्रथमच हिंदुस्थानात तयार केले होते. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या त्याच्या बंदुका कंपनी बंदुकापेक्षा परिणामकारक होत्या. असे असूनही राइनहार्टने दगा दिल्यामुळे मोगलांना पराभव पतकारावा लागला. पुढे २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या असईची लढाई ही बसारच्याच लढाईची पुनरावृत्ती होती. बक्सारच्या विजयामुळे संपूर्ण बंगाल सुभ्याचा कारभार कंपनीच्या हातात आला; मोगल सम्राट शाह आलम तिच्या आश्रयास आला; कलकत्ता ते अयोध्या प्रांतांच्या पश्चिमी हद्दीपर्यंत वा अप्रत्यक्ष कंपनीची हुकूमत आल्यामुळे मराठ्यांच्या व पठाण -रोहिल्यांच्या कारवायांना पायबंद घालणे कंपनीला सुलभ झाले. रॉबर्ट क्लाईव्हच्या वक्तव्यावरून संपूर्ण मोगल साम्राज्य कंपनीच्या हातात आल्यासारखेच होते. ३ मे १७६५ रोजीकोरा येथे शेवटची लढाई होऊन शुजाउद्ददौलासुध्दा कंपनीचा मांडलिक झाला. मराठ्यांना किंवा एतद्देशीय राजसत्तांना या संघर्षाच्या दूरगामी परिणामाची जाणीव झाली नाही.
महत्वपूर्ण युद्ध
⚔️हाईडेस्पीज का युद्ध (Battle of the Hydaspes) :
समय : 326 ई.पू.
किसके बीच – सिकंदर और पंजाब के राजा पोरस के बीच हुआ, जिसमे सिकंदर की विजय हुई।
⚔️कलिंग की लड़ाई (Kalinga War);
समय : 261 ई.पू.
किसके बीच – सम्राट अशोक ने कलिंग पर आक्रमण किया। युद्ध के रक्तपात को देखकर उसने युद्ध न करने की कसम खाई।
⚔️सिंध की लड़ाई :
समय : 712 ई.
किसके बीच – मोहम्मद कासिम ने अरबों की सत्ता स्थापित की।
⚔️तराईन का प्रथम युद्ध (Battles of Tarain) :
समय : 1191 ई.
किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे चौहान की विजय हुई।
⚔️तराईन का द्वितीय युद्ध (2nd Battles of Tarain) :
समय : 1192 ई.
किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे मोहम्मद गौरी की विजय हुई।
⚔️चदावर का युद्ध (Battle of Chandawar) :
समय : 1194 ई.
किसके बीच – इसमें मुहम्मद गौरी ने कन्नौज के राजा जयचंद को हराया।
⚔️पानीपत का प्रथम युद्ध (First Battle of Panipat) :
समय : 1526 ई.
किसके बीच – मुग़ल शासक बाबर और इब्राहीम लोधी के बीच।
⚔️खानवा का युद्ध (Battle of Khanwa):
समय : 1527 ई.
किसके बीच – बाबर ने राणा सांगा को पराजित किया।
⚔️घाघरा का युद्ध (Battle of Ghagra) :
समय : 1529 ई.
किसके बीच – बाबर ने महमूद लोदी के नेतृत्व में अफगानों को हराया।
⚔️चौसा का युद्ध (Battle of Chausal) ;
समय : 1539 ई.
किसके बीच – शेरशाह सूरी ने हुमायु को हराया
⚔️कन्नौज/बिलग्राम का युद्ध (Battle of Kanauj or Billgram) :
समय : 1540 ई.
किसके बीच – एकबार फिर से शेरशाह सूरी ने हुमायूँ को हराया व भारत छोड़ने पर मजबूर किया।
⚔️पानीपत का द्वितीय युद्ध (Second Battle of Panipat) :
समय : 1556 ई.
किसके बीच – अकबर और हेमू के बीच।
⚔️तालीकोटा का युद्ध (Battle of Tallikota) :
समय : 1565 ई.
किसके बीच – इस युद्ध से विजयनगर साम्राज्य का अंत हो गय।
⚔️हल्दीघाटी का युद्ध (Battle of Haldighati) :
समय : 1576 ई.
किसके बीच – अकबर और राणा प्रताप के बीच, इसमें राणा प्रताप की हार हुई।
⚔️पलासी का युद्ध (Battle of Plassey) :
समय : 1757 ई.
किसके बीच – अंग्रेजो और सिराजुद्दौला के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई और भारत में अंग्रेजी शासन की नीव पड़ी।
⚔️वांडीवाश का युद्ध (Battle of Wandiwash) :
समय : 1760 ई.
किसके बीच – अंग्रेजो और फ्रांसीसियो के बीच, जिसमे फ्रांसीसियो की हार हुई।
⚔️पानीपत का तृतीय युद्ध (Third Battle of Panipat) :
समय : 1761 ई.
किसके बीच – अहमदशाह अब्दाली और मराठो के बीच, जिसमे फ्रांसीसियों की हार हुई।
⚔️बक्सर का युद्ध (Battle of Buxar) :
समय : 1764 ई.
किसके बीच – अंग्रेजो और शुजाउद्दौला, मीर कासिम एवं शाह आलम द्वितीय की संयुक्त सेना के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई।
⚔️परथम आंग्ल मैसूर युद्ध
समय : 1767-69 ई.
समाप्त - मद्रास की संधि
किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जिसमे अंग्रेजो की हार हुई।
⚔️दवितीय आंग्ल मैसूर युद्ध
समय : 1780-84 ई.
समाप्त - मंगलोर की संधि
किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जो अनिर्णित छूटा।
⚔️ ततीय आंग्ल मैसूर युद्ध
समय : 1790-92 ई.
समाप्त - श्रीरंगपट्टनम की संधि
किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच लड़ाई संधि के द्वारा समाप्त हुई।
⚔️चतुर्थ आंग्ल मैसूर युद्ध
समय : 1797-99 ई.
किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच, टीपू की हार हुई और मैसूर शक्ति का पतन हुआ।
⚔️चिलियान वाला युद्ध :
समय : 1849 ई.
किसके बीच – ईस्ट इंडिया कंपनी और सिखों के बीच हुआ था जिसमे सिखों की हार हुई।
⚔️भारत चीन सीमा युद्ध :
समय : 1962 ई.
किसके बीच – चीनी सेना द्वारा भारत के सीमा क्षेत्रो पर आक्रमण। कुछ दिन तक युद्ध होने के बाद एकपक्षीय युद्ध विराम की घोषणा। भारत को अपनी सीमा के कुछ हिस्सों को छोड़ना पड़ा।
⚔️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War)
समय : 1965 ई.
किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। भारत पाकिस्तान के बीच शिमला समझौता हुआ।
⚔️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War)
समय : 1971 ई.
किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। फलस्वरूप बांग्लादेश एक स्वतन्त्र देश बना।
⚔️कारगिल युद्ध (Kargil War)
समय : 1999 ई.
किसके बीच – जम्मू एवं कश्मीर के द्रास और कारगिल क्षेत्रो में पाकिस्तानी घुसपैठियों के बीच।
Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions
प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे…………….होय.
A) शिपायांची गर्दी
B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट
C) स्वातंत्र्य युद्ध
D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.
B✅🎁🍨🔥⚔️
प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.
A) रावसाहेब पटवर्धन
B) बापू गोखले
C) गंगाधर फडणीस
D) तात्या टोपे
D ✅🎁🍨🔥⚔️
प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?
A) बहादूरशहा
B) नानासाहेब
C) बापू गोखले
D) कुंवर सिंह
C ✅🎁🌹🔥⚔️
प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?
A) हैद्राबाद
B) ग्वाल्ह्रेर
C) बडोदा
D) जगदीशपूर
D ✅🎁🌹🔥⚔️
प्र5):जबलपूर प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.
A) मान सिंह
B) विक्रम सिंह
C) शंकर सिंह
D) लॉरेन्स
C ✅🎁🔥🌹⚔️
प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर कोण होता ?
A) सायमन फ्रेझर
B) निकोलसन
C) हडसन
D) लॉरेन्स
A ✅🎁🌹〽️⚔️
प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.
A) तिसरा बाजीराव
B) तात्या टोपे
C) चिमासाहेब
D) नानासाहेब
D ✅🎁🌹Ⓜ️⚔️
प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.
A) जळता निखारा
B) बंदूक
C) लालकमळ
D) गुलाब
C ✅🎁🌺🌺Ⓜ️
प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?
A) ११ मे १८५७
B) ३० जून १८५७
C) २९ मार्च १८५७
D) ३१ मे १८५७
D ✅🎁🌺🌹Ⓜ️
प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?
A) सर हेन्री बर्नाड
B) जनरल नील
C) जनरल स्मिथ
D) निकोलसन
D ✅🎁〽️Ⓜ️⚔️
प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला
B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले.
C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला .
D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला
C ✅🎁🔥⚔️Ⓜ️
प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .
A) नानासाहेब
B) तात्या टोपे
C) बहादूरशहा
D) कुवंर सिंह
B ✅🎁🌹🔥〽️
प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?
A) रियासतकार सरदेसाई
B) अशोक मेहता
C) सर जॉन सिली
D) वि. दा . सावरकर
C ✅Ⓜ️🎁🔥⚔️
प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी याने खालसा केलेले नाही.
A) सातारा
B) नागपूर
C) ग्वाल्हेर
D) म्हैसूर
C ✅🎁🔥🌹Ⓜ️
प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?
A) कुँवर सिंह
B) तात्या टोपे
C) अझीमउल्ला
D) नानासाहेबांचे सैन्य
D ✅🎁🌹🔥〽️
प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते ?
A) कोटा
B) नसीराबाद
C) जैसलमेर
D) अजमेर
A ✅🎁🌹Ⓜ️🔥
प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?
A) संस्थानिक
B) जमीनदार
C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग
D ✅🎁🌹Ⓜ️🔥
प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?
A) आदिवासी जमाती
B) जमीनदार
C) जुने संस्थानिक
D) वरील सर्व
D ✅🎁🔥Ⓜ️〽️
प्र 19) :१८५७ च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले होते ?
A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह
C) पुरंदर सिंह
D) पिलारि बरुआ
A ✅🎁🔥〽️Ⓜ️
प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार कोण ?
A)अजिमुल्ला खान
B) झवान बख्त
C) झीनत महल
D) बख्त खान
[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?
१] १००-२०० nm
२] २८०-३१५ nm
३] ६४०-८२० nm
४] ८५०-९१० nm
उत्तर✅
२] २८०-३१५ nm
--------------------------------
[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?
१] पर्यावरणवादी
२] पर्यावरण विशेषज्ञ
३] जंगलात रहाणारे आदिवासी
४] जुन्या पिढीतील शहरी लोक
उत्तर✅
३] जंगलात रहाणारे आदिवासी
--------------------------------
[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?
१] पेंच
२] ताडोबा
३] मेळघाट
४] सह्याद्री
उत्तर
१] पेंच ✅
--------------------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती
३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती
४] जैविक नैसर्गिक आपत्ती
उत्तर✅
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
--------------------------------
[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?
१] निकटदृष्टीता
२] दूरदृष्टीता
३] रंगांधळेपणा
४] वृद्धदृष्टीता
उत्तर✅
१] निकटदृष्टीता
--------------------------------
[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?
१] अमेरिका
२] इस्त्राईल
३] पेरू
४] फ़िलिपाइन्स
उत्तर
४] फ़िलिपाइन्स ✅
--------------------------------
[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?
१] २ ऑक्टोबर २००८
२] १५ ऑगस्ट २००८
३] २ ऑक्टोबर २००९
४] १५ ऑगस्ट २००९
उत्तर
३] २ ऑक्टोबर २००९ ✅
--------------------------------
[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] ठाणे
२] बुलढाणा
३] पुणे
४] धुळे
उत्तर
३] पुणे ✅
--------------------------------
[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?
१] म.गो.रानडे
२] पंजाबराव देशमुख
३] नारायण लोखंडे
४] मुकुंदराव पाटील
उत्तर
१] म.गो.रानडे ✅
---------------------------------
[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?
अ] कमी खर्चाची शेती
ब] कमी वेळ लागतो
क] कमी मजूर लागतात
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
१] फक्त अ✅
लॉर्ड कर्झन (1899 - 1905)
●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय....
●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.
●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.
●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core ची स्थापना केली.
●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.
●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.
●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली.
●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.
●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.
●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.
●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला.
●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.
●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.
●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली.
●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.
●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.
●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.
●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.
●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.
●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.
●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित 'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.
●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947
- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.
पहिली गोलमेज परिषद
तारिख :- 12 नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931
कार्यकाळ :- तीन महिेने
अध्यक्ष :- सर रॅमसे मॅकडोनाल्ड
उपस्थित भारतीय सदस्य :- एकुण 89
उद्घाटक :- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज.
🖍 काँग्रेस पक्षाने या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही. कारण कायदेभंग चळवळीत काँग्रेसचे अनेक नेते तुरूंगवासात होते व बाकीच्यांनी काँग्रेसच्या निर्णयाला साथ दिली.
🖍 यावेळी मुस्लिमांचे प्रतिनिधी निवडण्याचे काम लॉर्ड आयर्विन यांनी अापल्या कार्यकारी मंडळातील कट्टर मुस्लिम नेते फजली हुसेन यांच्यावर सोपविले होते व त्यांनी मवाळ मुस्लिम नेते सोडून कडव्या मुस्लिम नेत्यांची निवड केली
📚 या परिषदेतील उपस्थित असलेले प्रमुख भारतीय 📚
🖍 मसिल्म लीग :- मुहम्मद अली जिना, आगा खान, ए.के. फजलुल हक, मुहम्मद शफी.
🖍 हिंदु महासभा :- एम.आर.जयकर, बी.एस.मुंजे
🖍 भारतीय लिबरल पार्टी :- तेजबहादुर सप्रु, सी.वाय. चिंतामणी, श्रीनिवासन शास्त्री.
🖍अस्पृश्यांचे प्रतिनिधी :- बाबासाहेब आंबेडकर
🖍कामगार प्रतिनिधी :- एन.एम. जोशी
📚 परिषदेतील प्रमुख ठराव व मागण्या 📚
🖍 या परिषदेत वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली.
🖍सपूर्ण भारतीय राज्याचे स्वरूप संघराज्य असावे.
🖍बरम्हदेश हा भारतापासुन वेगळा करण्यात यावा.
🖍 या परिषदेत आठ उपसमित्या स्थापन करण्यात आल्या.
🖍 जिना व आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाचा आग्रह धरला.
🖍जातीय प्रश्नावर या परिषदेत एकमत होवू शकले नाही.
🖍काँग्रेसच्या गैर हजेरित घटनात्मक सुधारणा अशक्य ठरल्या.
🖍 डाँ. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली.
Latest post
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947
- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
प्रश्न.1) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? 👉 उत्तर - देवेन भारती प्रश्न.2) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत ? ...
-
1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी -...