Wednesday 14 April 2021

Online Test Series

10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने


1. Hemis National Park

- जम्मू आणि काश्मीर 

- 4400 KM²


2. Desert National Park 

- राजस्थान 

- 3162 KM²


3. Gangotri National Park 

- उत्तराखंड

- 2390 KM²


4. Mamdapha National Park 

- अरूणाचल प्रदेश

- 1985 KM²


5. Khangchendzonga National Park 

- सिक्किम

- 1784 KM²


6. Guru Ghasidas (Sanjay) National Park 

- छत्तीसगढ 

- 1440 KM²


7. Gir Forest National Park 

- गुजरात 

- 1412 KM²


8. Sundarbans National Park 

- पश्चिम बंगाल 

- 1330 KM²


9. Jim Corbet National Park 

- उत्तराखंड 

- 1318 KM²


10. Indravati National Park 

- छत्तीसगढ 

- 1258 KM²

भारतातील सर्वात मोठे


Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा )


सर्वोच्च न्यायालयाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण निवाडे



🎯 1) रोमेश थापर वि. मद्रास राज्य (1950)


 1) "सर्व लोकशाही संस्था, संघटनांकरिता भाषण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य (Freedom of Speech and of the Press) पायाभूत आहे. 

2)या स्वातंत्र्याशिवाय मुक्तपणे राजकीय चर्चा होणार नाहीत तर लोकशिक्षणही होणार नाही. 

3)लोकशाही शासनाच्या योग्य कार्यचलनाकरिता ही बाब अत्यंत आवश्यक आहे." 


🎯2) मनेका गांधी वि. भारतीय संघ (1978) 


👉 "भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्ाला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत आणि या हक्कासोबतच प्रत्येक नागरिकाला माहिती गोळा करण्याचा आणि केवळ भारतातील अन्य लोकांसमवेतच नव्हे तर परदेशातील व्यक्तींसोबतही तिचा विनिमय (Exchange) करण्याचा हक्क आहे."


🎯3) प्रभा दत्त वि. भारतीय संघ (1982) 


👉 सर्वोच्च न्यायालयाने तिहार कारागृहाच्या अधिक्षकांना आदेश दिले की, 

"त्यांनी वर्तमानपत्राच्या काही प्रतिनिधींना रंगा आणि बिल्ला या फाशी जाहीर झालेल्या दोन गुन्हेगारांची मुलाखत घेण्यासाठी अनुमती द्यावी."


🎯(4) इंडियन एक्सप्रेस वि. भारतीय संघ (1985) 


1) "लोकशाही यंत्रणेमध्ये वृत्तपत्रे (प्रसारमाध्यमे) फार महत्त्वाची भूमिका बजावतात. 

2)न्यायालयांचे कर्तव्य आहे की त्यांनी वृत्तपत्रांचे (प्रेस) स्वातंत्र्य अबाधित राखावे आणि या स्वातंत्र्यामध्ये अडथळा ठरणार्या सर्व कायद्यांना आणि प्रशासकीय कृतीला अवैध मानावे."


🎯(5) सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय वि. क्रिकेट असोशिएशन ऑफ बेंगाल (क्रिकेट असोसिएशन) (1995)


 1)"इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांना माहिती पुरविणे वा त्यांच्याकडून माहिती प्राप्त करण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आहे.

2) न्यायालयाने नमूद केले की, लहरी (Frequencies) किंवा हवेतील तरंग (Airwaves) ही सार्वजनिक मालमत्ता असल्यामुळे शासनाला प्रसारणावर मक्तेदारी निर्माण करता येणार नाही..

3)न्यायालयाने आदेश दिले की, शासनाने तात्काळ पाऊले उचलून वारंवारितेचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र आणि स्वायत्त अशी सार्वजनिक अधिसत्ता (Public Authority) स्थापन करावी.

4) या निर्णयामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने (कलम 19.1 आणि 19.2) फार महत्त्वाची भूमिका बजावली.


🎯(6) भारतीय संघ वि. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (2002) -


 1)एकतर्फी माहिती, अपप्रचार, चुकीची माहिती देणे आणि माहिती न देणे या सर्वांमुळे नागरिक सजग होत नाहीत आणि ही बाब लोकशाहीची थट्टा करणारी आहे.

2) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माहिती देण्याचा, प्राप्त करण्याचा तसेच मत स्वातंत्र्याचा समावेश होतो.


First… वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला



1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला


2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान


3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला


4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.


5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला


6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली


7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.


8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला


9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला


11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.


12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे


13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.


14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू


15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश


16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला


17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू

महत्वपूर्ण भारतीय संविधान के Question answer



🔲 किस अधिनियम द्वारा भारत में प्रांतों को स्वायत्तता प्रदान की गई थी

Ans- भारत सरकार अधिनियम, 1935✅✅


🔲 शासन की एकात्मक पद्धति का लाभ हैं

Ans- दृढ़ राज्य✅✅


🔲 जिस संविधान सभा द्वारा भारत के संविधान का अधिनियम किया गया, उसके सदस्य थे

Ans- विभिन्न प्रांतों की विधान सभाओं द्वारा निर्वाचित✅✅


🔲 भारतीय संविधान में आपात उपबंध कहां से लिए गए हैं

Ans- भारत सरकार अधिनियम,1935✅✅


🔲 भारत की संविधान सभा किसके कहने पर बनाई गई थी

Ans- कैबिनेट मिशन✅✅


🔲 भारत का संविधान सभा का अध्यक्ष कौन था

Ans- डाॅ. राजेन्द्र प्रसाद✅✅


🔲 भारतीय संविधान की प्रस्तावना में किस प्रकार के न्याय की बात कही गई हैं

Ans- सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय की बात की गई हैं।✅✅


🔲 सविधान की प्रस्तावना में भारत को किस रूप में घोषित किया गया हैं

Ans- एक प्रभुसत्तासंपन्न, समाजवादी, पंथनिरपेक्ष, लोकतांत्रिक गणराज्य✅✅


🔲 भारत पूर्ण संप्रभु लोकतांत्रिक गणतंत्र कब बना

Ans- 26 नवंबर, 1949✅✅


🔲 सविधान की उद्देशिका का संशोधन कितनी बार किया गया था

Ans- एक बार✅✅


🔲 भारतीय संविधान में ‘संघीय’ शब्द का प्रयोग कहां पर हुआ हैं

Ans- संविधान में कही नही✅✅


🔲 भारतीय संविधान के अनुच्छेद 1 में यह घोषणा की गई हैं, कि ‘‘इंडिया अर्थात भारत’’ ……… हैं

Ans- राज्यों का संघ✅✅


🔲 किस अनुच्छेद में इंडिया को भारत भी कहा गया हैं

Ans- अनुच्छेद 1✅✅


🔲 भारत में किस प्रकार का संघवाद देखा जाता हैं

Ans- संघ बनाकर राज्यों का गठन करना✅✅


🔲 भारतीय संविधान कब लागू हुआ

Ans- 26 जनवरी, 1950✅✅


🔲 भारतीय संविधान की रचना के समय संविधान सभा का संविधानिक सलाहकार कौन था

Ans- बी.एन.राव✅✅


🔲 सरकार की किस प्रणालि में द्विसदन पद्धति एक अनिवार्य लक्षण हैं

Ans- संघीय प्रणाली✅✅


🔲 भारत एक कैसा देश हैं

Ans- लोकतंत्र✅✅


🔲 भारत में, एकल नागरिकता की अवधारणा अपनाई गई हैं

Ans- इंग्लैड से✅✅


🔲 सविधान का कौन सा भाग नागरिकता के प्रावधानों से संबंधित हैं- 

Ans- II ✅✅


🔲 भारतीय संवाद निकट हैं

Ans- कनाडा कें✅✅


🔲 भारतीय संविधान ने भारतीय महासंघ की योजना किसके संविधान से ली थी

Ans- कनाडा✅✅


🔲 भारत के संविधान का निर्माता किसे माना जाता हैं

Ans- बी.आर. अंबेडकर✅✅

ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना


⭕️टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर करोना विषाणू संसर्गाचा धोका रोखण्यासाठी आता जपान सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.


⭕️जपानची राष्ट्रीय लसीकरण मोहीम मागे पडली असून राजधानी टोक्योमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांनी असमर्थता दर्शवली आहे. रात्रजीवनाचा तसेच खाण्यापिण्याचा आस्वाद घेत असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा संसर्ग नंतर कार्यालये, शाळा येथे होत आहे. हे लक्षात घेता बार आणि रेस्टॉरंट्स थोड्या कालावधीसाठी सुरू ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिल्या आहेत.


⭕️नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ११ मेपर्यंत या नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन जनतेला करावे लागणार आहे.


⭕️ पश्चिम जपानमधील क्योटो आणि ओकिनावा येथे करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे सुगा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका, ह््योगो आणि मियागी या शहरांमध्येही सावधगिरीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक


🌹भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


🌹२०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती.


🌹५५ वर्षीय हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेत दाखल होणार आहेत. २०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.

भारत- नेदरलँड्स यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषद.


 

🔶पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2021 रोजी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.


🔶नेदरलँडसमध्ये अलीकडेच झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये पंतप्रधान रुट यांना मिळालेल्या विजयानंतर या परिषदेचे आयोजन होत आहे आणि दोन्ही देशांदरम्यान नियमितपणे होणाऱ्या उच्च स्तरीय संवादामुळे द्विपक्षीय संबंधांना प्राप्त झालेली गती त्यामुळे कायम राखली जाईल. या शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करतील आणि दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणाऱ्या नव्या मार्गांचा वेध घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही ते परस्परांशी विचारविनिमय करतील.


🔶भारत आणि नेदरलँड्स यांच्यात लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य यांच्या सामाईक विभागणीमुळे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. युरोप खंडात मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीय समुदायाचे नेदरलँड्स म्हणजे जणू काही घरच आहे. दोन्ही देशांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, आरोग्य सेवा, स्मार्ट सिटी आणि शहरी वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नूतनक्षम उर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य आहे. दोन्ही देशांदरम्यान अतिशय भक्कम आर्थिक भागीदारी असून नेदरलँड्स हा भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये 200 पेक्षा जास्त डच कंपन्या कार्यरत आहेत आणि नेदरलँडसमध्येही तितक्याच प्रमाणात भारतीय कं पन्या कामकाज करत आहेत.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...