Saturday, 4 March 2023

AP मध्ये US$ 3.9 अब्ज गुंतवणुकीसह सरकारने 2,880 - MW Dibang MPP ला मंजूरी दिली


💸💵अरुणाचल प्रदेश (AP) मधील 2,880 मेगावॅट (MW) दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प (MPP), आतापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, वीज मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने ₹31,876.39 कोटी (US$3.9 अब्ज) च्या गुंतवणुकीसह कार्यान्वित केला आहे. कडून मान्यता मिळाली.


🔮🧿चीनच्या सीमेला लागून असलेला हा प्रकल्प नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेड विकसित करेल.


⏳⌛️प्रकल्पाच्या बांधकामाचा अंदाजे कालावधी 9 वर्षांचा होता.


💸🪙आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने प्रकल्पाच्या "गुंतवणूकपूर्व क्रियाकलापांसाठी" 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.


❎💠प्रकल्पातून दरवर्षी 11,223 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण होईल.


♣️🟦हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील दिबांग नदीवर आहे.


🔴🔘दिबांग नदीच्या खालच्या भागाचा विकास करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.


🚓🔵👁‍🗨या भागाचा मोठा भाग पुरापासून वाचवावा लागला.

उत्तराखंड भारतातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक स्थापन करणार आहे



🌹❣️उत्तराखंड सरकार भारतातील पहिली सरकारी मातेची दूध बँक स्थापन करणार आहे, ही एक सुविधा आहे जी नवजात बालकांना आईच्या दुधातील पोषक तत्वे पुरवली जाईल याची खात्री करू शकते.


🌕🌺ही घोषणा उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी अमर उजालाच्या गढवालच्या उदयोन्मुख नेत्यांच्या कार्यक्रमादरम्यान केली.


🤱मदर मिल्क बँक:👉


💮🌀प्रसूतीनंतर ज्यांची आई मरण पावली अशा नवजात बालकांना या मिल्क बँकेद्वारे दूध उपलब्ध करून दिले जाईल.


🏮👍👨‍⚕उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ धनसिंग रावत यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्तनदा महिला या बँकेत दूध दान करू शकतील.

फील्ड मेडल 2022


◆ युक्रेनियन गणितज्ञ मेरीना वायझोव्स्का (Maryna Viazovska) यांना 5 जुलै 2022 रोजी प्रतिष्ठित फील्ड मेडल जाहीर झाला. 


◆ इराणी मरियम मिर्झाखानी (2014) नंतर फील्ड पदकप्राप्त वायाझोव्स्का या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. 


➤ गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा हा सन्मान यावर्षी 4 जणांना जाहीर झाला.


◆ इतर विजेत्यांमध्ये जिनेव्हा विदयापीठाचे फ्रेंच गणितज्ञ ह्यूगो डुमिनिल कॉपिन, प्रिन्स्टन विद्यापीठाचे कोरियन अमेरिकन गणितज्ञ जून हुह आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ब्रिटिश गणितज्ञ जेम्स मेनार्ड यांचा समावेश आहे.


◆ विजेत्यांची घोषणा सामान्यतः गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये केली जाते, जी या वर्षी रशियामध्ये होणार होती परंतु त्याऐवजी ते हेलसिंकी येथे हलवण्यात आली.

30 एप्रिल Combine पूर्व साठी काही महत्वपूर्ण गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे...


_अभ्यासात सातत्य ठेवा .


_स्वतःच्या Note's असतील तर त्या व्यवस्थित Read करा.


_आयोगाचे मागील 2017 पासून ते 2022 पर्यंतचे पूर्व चे सर्व पेपर व्यवस्थित चाळा.(अतिशय महत्त्वपूर्ण 2020 ,2021 आणि 2022 चे Prelims चे पेपर व्यवस्थित चाळा)


_ 30 एप्रिल.. पेपर मध्ये चूका टाळण्यासाठी  'टेस्ट सिरीज' चा जास्तीत जास्त सराव करा.(वेळेचे महत्व तुम्हाला टेस्ट पेपर सोडवल्याशिवाय समजणार नाही)


_स्वतः प्रत्येक प्रश्नाचे Analysis करा. 


_ जास्तीत जास्त Revision करा.


_30 एप्रिल ला होणारा Combine चा पेपर आहे त्याच्यामुळे तुमचा अभ्यास एकदम जबरदस्त पाहिजे.. कारण इथे वेळेची मर्यादा असते...


_प्रश्न दिसत्या क्षणीच उत्तर मिळाले पाहिजे.. त्याच्यामुळे तुफान अभ्यास करा

समान नागरी संहिता म्हणजे काय?




UCC ची संकल्पना आहे की संपूर्ण देशासाठी एक कायदा असावा, की जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींना जसे की विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक इत्यादींना समान पद्धतीने सामावून घेईल.


राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये असे नमूद केले आहे की राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशातील नागरिकांसाठी UCC सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल.


कलम ४४ हे राज्य धोरणाच्या (DPSP) मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक आहे .


कलम 44 मागचा उद्देश संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केल्याप्रमाणे "धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक" च्या उद्देशाला बळकट करणे हा आहे .

ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.

1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


1) कायद्याचा कच्च्या मसुद्याला --------- म्हणतात. ( पूर्व PSI 2008) 

1) ठराव 

2) विधेयक ✅

3) अध्यादेश 

4) मसूदा 



2) दुहेरी शासन संस्था असलेल्या पध्दतीला------------ म्हणतात.( PSI पूर्व 2008 ) 

1) संघराज्य ✅

2) एकात्म 

3) घटनात्मक 

4) दुहेरी 



3) राज्यसभेमंध्ये एकूण --------- सदस्य असतात. ( PSI पूर्व 2008 ) 

1) 550

2) 350

3) 250✅

4) 238



4) डिसेंबर 1929 च्या लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? ( PSI पूर्व 2008 ) 

1) सुभाष चंद्र बोस 

2) पंडित जवाहरलाल नेहरू ✅

3) लाला लाजपत राय 

4) आचार्य नरेंद्र देव 



5) विसंगत घटक ओळखा ( PSI पूर्व 2008 ) 

1) नगरपालिका 

2) नगरपंचायत 

3) महानगरपालिका 

4) केंद्र सरकार ✅



6) एकाच विषयावर केलेल्या केंद्र आणि राज्य यांच्या कायद्यात विसंगत असेल तर ---------- कायदा रद्द होतो. ( PSI पूर्व 2008 ) 

1) केंद्रशासनाचा 

2) राज्यशासनाचा✅

3) स्थानिक स्वराज्य शासनाचा 

4) केंद्र व राज्य दोहोंचा 



7) ----------- ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडनारा दुवा मानला जातो. ( PSI  पूर्व 2008 ) 

1) नगरपंचायत 

2) पंचायतसमिती ✅

3) ग्रामपंचायत 

4) ग्रामसभा 


पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

           ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.


            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.


– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.

– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.

– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.

– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.

– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.

– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.

– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.


 ७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :


१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )

2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )

३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )

४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )

५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )

६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )

७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )

अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST )

यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)

९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )

१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )

११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )

१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )

१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )

१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )

१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )

१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )

१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )

१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )



घटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह - संघटना यातील फरक.

▪️'कायदेशीरदृष्ट्या मंडळ व आयोग तीन प्रकारचे असतात—


💥घटनात्मक संस्था


(अ) प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतीने स्थापन केलेले मंडळ किंवा आयोग यांन घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतात.


🎯 यामध्ये खालील मंडळांचा/आयोगांचा समावेश होतो


(१) निवडणूक आयोग 

(२) केंद्रीय लोकसेवा आयोग

(३) राज्य लोकसेवा आयोग

(४) वित्त आयोग

(५) अधिकृत भाषा आयोग

(६) मागासवर्ग आयोग

(७) अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. (८) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग.


💥वधानिक संस्था.


(ब) संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनविलेले मंडळ व आयोग यांना वैधानिक संघटना म्हणतात. 


🎯यामध्ये खालील संघटनांच समावेश होतो.


(१) विद्यापीठ अनुदान आयोग

(२) तेल व नैसर्गिक वायू आयोग

 (३) प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ

(४) उत्पादन व आयातशुल्क केंद्रीय मंडळ

(५) रेल्वे मंडळ

(६) अणुऊर्जा आयोग

(७) पूर नियंत्रण मंडळ.

(८) महिलांसाठी राष्ट्रीय आयोग 

इत्यादी.


💥कार्यकारी किंवा सह - संघटना.


(क) केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाने किंवा आदेशाने बनविलेले मंडळ आणि आयोग. याला सह- संघटना म्हणतात. व संबंधित मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असतात. 


🎯यामध्ये खालील संघटनांचा समावेश होतो.


(१) अखिल भारतीय हातमाग मंडळ

(२) नियोजन आयोग

(३) कर्मचारी निवड आयोग

(४) अखिल भारतीय हस्तकला मंडळ इत्यादी.

(५) निती आयोग.


राज्यघटना प्रश्नसंच

 1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०✅

ड) कलम ३६२

====================


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅

ड) वरीलसर्व

===================


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅

ड) सहा महिने

====================


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅

ड) महाराष्ट्र

====================


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

====================


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅

ड) यापैकी नाही

=================


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅

ड) व्ही. के. सिंग

====================


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

====================


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅

क) कलम २६३

ड) कलम २६४

====================


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

राज्यसेवा परीक्षा नियोजनअभ्यासासाठी टिप्स-

-- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- चालू घडामोडी या विषयासाठी मागील जानेवारी 2022 पासून चालू घडामोडी चा अभ्यास करा

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 
पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2023 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो.


प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 


स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय 


उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.


यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?


खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.


मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.


* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.


* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. 

🔶 प्रचिन भारताचा इतिहास- र स शर्मा 

🔶 मध्यकालीन भारत- सतीश चंद्र 

🔶 जागाच इतिहास- जान माधुर के सागर आनुवाद मराठी 

🔶 सामाजिक समस्या- राम आहूजा हिंदी में 

🔶 Ethics GS- माधवी कवि, Unique Academy 

🔶 आंतरिक सुरक्षा- Tata magro हिंदी में 

🔶 आंतराठिय संबंध- डाँ शोलौद देवळणकर 

🔷 NCERT Geography, 6,7,9,11 

🔷 NCERT History- 6.7,12

🔷 आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, 

🔷 स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, 

🔷 भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, 

🔷 भारताचा भूगोल- माजिद हुसन, 

🔷 जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, 

🔷 विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच 


अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.


* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.


नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?


नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 


👉 योग्य मार्गदर्शकाची आवश्यक आहे,

विविध समित्याविषयी थोडक्यात माहिती

1) रंजन गोगोई समिती 

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.


2) परमराजसिंग उमरानंगल समिती 

भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


3) एच.एस. बेदी समिती 

शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.


4) गोपाळ सुब्रमण्यम समिती 

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


5) दीपक मोहांती समिती 

वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.


6) श्याम बेनेगल समिती 

सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.


7) अरविंद पनगारिया समिती 

जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी


8) एम. वेंकच्या नायडू समिती 

जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती


9) बी.के. प्रसाद समिती 

इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.


10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती 

ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.


11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती 

राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली


12) प्रो. राकेश भटनागर समिती 

जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती


13) विलास बर्डेकर समिती 

राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.


14) भगवान सहाय्य समिती 

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

तुम्हाला हे पाठ आहे का :- मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

महाराष्‍ट्राचा-खनिज संपत्ती

👉 महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात.


👉 दशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.


👉 महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.


👉 दशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. 


👉 महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.


👉 दशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. 


👉 तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.


👉 कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व सिलिमिनाईटचे साठे आहेत.

कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.

भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. 


👉 यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.


👉 महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.

हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.


👉 दशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो. 

खनिज संपत्ती :


१. मँगेनीज:- भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.

जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.


२. बॉक्साईट- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -

जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे. 

जिल्हा - भंडारा.


४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.

जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.


५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे.

जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.


६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.

जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.


७. दगडी कोळसा:- महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.

जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,


८. लोहखनिज- भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. 

जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.


९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.


१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्हयात अत्यल्प प्रमाणात सापडते.


११.अधक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.


१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.


१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.


महाराष्ट्रातील भूगर्भ रचना :

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, 

डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, 

शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे

      

1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

उत्तर: कुलाबा


2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

उत्तर: 1897


3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

उत्तर: बराकपुर


4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

उत्तर: मिनामाटा


5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर: ॲडम स्मिथ


6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

उत्तर: यवतमाळ


7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर: 11 जुलै


8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

उत्तर: 1993


9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

उत्तर: 1972


10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

उत्तर: गडचिरोली

इतिहास सराव प्रश्न

Ques. कादिरी संप्रदाय चा प्रवर्तक कोण होता? 

A. अब्दुल कादिर गिलानी 👍

B. ख्वाजा अब्दुलला

C. दारा शिकोह

D. मोईनुद्दीन चिश्ती



 Ques. 1857 ई चेे विद्रोहाची सुरूवात कुठुन झाली ? 

A. बलिया

B. फैजाबाद

C. बराकपुर 👍

D. उत्तर प्रदेश



 Ques. 1857 ई च्या विद्रोहात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले ? 

A. मंगल पांडे 👍

B. भगत सिंह

C. तात्या टोपे

D. चंद्रशेखर आजाद



 Ques. 1857 ई च्या विद्रोहात कानपूर मध्ये नेतृत्व कोणी केले 

A. मंगल पांडे

B. तात्यां टोपे 👍

C. रानी लक्ष्मी बाई

D. नाना साहेब



 Ques. 1857 ई च्या विद्रोहात विशेष बाब काय होती ? 

A. कंपनीचा विरोध

B. हिंदू-मुस्लिम ऐक्य 👍

C. भारताचे स्वातंत्र्यासाठी लढा

D. ब्रिटीश सरकारचा विरोध


 भारतीय सुधार समितीची स्थापना कधी झाली ? 

A. 1864

B. 1854

C. 1857 👍

D. 1942


भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या 1885 ते 1905 च्या काळाला काय म्हणले  जाते ? 

A. उदारवादी काळ 👍

B. उग्रवादी काळ

C. पूंजीवादी काऴ

D. क्रांतीकारी काळ


 हिंदुस्तान सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्शवभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? 

अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल 

ब. सायमन कमिशन 

क. नेहरू रिपोर्ट 

ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे


वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? 

A. अ, ब , आणि क

B. ब, क, आणि ड

C. अ, ब आणि ड

D. अ, ब, क आणि ड 👍



 भारतीय कांग्रेसची स्थापना कोणा द्वारे झाली ? 

A. व्योमेश चंद्र बैनर्जी

B. डॉ. ए. ओ. ह्यूम 👍

C. गोपाल कृष्ण गोखले

D. महात्मा गांधी


Ques. कादिरी संप्रदायाचा प्रवर्तक कोण होता? 

A. अब्दुल कादिर गिलानी 👍

B. ख्वाजा अब्दुलला

C. दारा शिकोह

D. मोईनुद्दीन चिश्ती



 Ques. 1857 ई चेे विद्रोहाची सुरूवात कुठुन झाली ? 

A. बलिया

B. फैजाबाद

C. बराकपुर 👍

D. उत्तर प्रदेश



 Ques. 1857 ई च्या विद्रोहात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले ? 

A. मंगल पांडे 👍

B. भगत सिंह

C. तात्या टोपे

D. चंद्रशेखर आजाद



 Ques. 1857 ई च्या विद्रोहात कानपूर मध्ये नेतृत्व कोणी केले 

A. मंगल पांडे

B. तात्यां टोपे 👍

C. रानी लक्ष्मी बाई

D. नाना साहेब



 Ques. 1857 ई च्या विद्रोहात विशेष बाब काय होती ? 

A. कंपनीचा विरोध

B. हिंदू-मुस्लिम ऐक्य 👍

C. भारताचे स्वातंत्र्यासाठी लढा

D. ब्रिटीश सरकारचा विरोध



1857 उठावाची केंद्र आणि नेते

❑ बरेली  ➭   खान बहादुर खान 


❑ कानपुर  ➭   नाना साहब


❑ आरा (बिहार)  ➭   कुँवर सिंह


❑ अवध  ➭   हजरत महल 


❑ झाँसी ➭   रानी लक्ष्मीबाई


❑ हरियाणा  ➭   राव तुलाराम


❑ सम्बल ➭   सुरेंद्र साईं


❑ इलाहाबाद ➭   लियाकत अली


❑ ग्वालियर / कानपुर ➭   तात्या टोपे


❑ लखनऊ ➭   बेगम हजरत महल 


❑ बैरकपुर ➭ मंगल पांडे


महत्वपूर्ण नारे (slogan)



1. जय जवान जय किसान

►- लाल बहादुर शास्त्री


2. मारो फिरंगी को

►- मंगल पांडे


3. जय जगत

►- विनोबा भावे


4. कर मत दो

►- सरदार बल्लभभाई पटले


5. संपूर्ण क्रांति

►- जयप्रकाश नारायण


6. विजय विश्व तिरंगा प्यारा

►- श्यामलाल गुप्ता पार्षद


7. वंदे मातरम्

►- बंकिमचंद्र चटर्जी


8. जय गण मन

►- रवींद्रनाथ टैगोर


9. सम्राज्यवाद का नाश हो

►- भगत सिंह


10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है

►- बाल गंगाधर तिलक


11.इंकलाब जिंदाबाद

►- भगत सिंह


12. दिल्ली चलो

►- सुभाषचंद्र बोस


13. करो या मरो

►- महात्मा गांधी


14. जय हिंद

►- सुभाषचंद्र बोस


15. पूर्ण स्वराज

►- जवाहरलाल नेहरू


16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान

►- भारतेंदू हरिशचंद्र


17. वेदों की ओर लौटो

►- दयानंद सरस्वती


18. आराम हराम है

►- जवाहरलाल नेहरू


19. हे राम

►- महात्मा गांधी


20. भारत छोड़ो

►- महात्मा गांधी


21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है

►- रामप्रसाद बिस्मिल


22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा

►- इकबाल


23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा

►- सुभाषचंद्र बोस


24. साइमन कमीशन वापस जाओ

►- लाला लाजपत राय


25. हू लिव्स इफ इंडिया डाइज

►- जवाहरलाल नेहरू

स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे महत्त्वाचे १०० प्रश्न व उत्तरे


ब्रिटीशांचा भारतातील पहिला व्हॉईसरॉय कोण होता?

     🔴 लाॅर्ड कॅनिंग ✅✅

     ⚫️ लॉर्ड वेलस्ली

     🔵 वॉरन हेस्टिंग्ज

     ⚪️ यापैकी नाही



१ जानेवारी १९२३ रोजी मोतीलाल नेहरु व देशबंधू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

     🔴यग इंडिया

     ⚫️सवराज्य पक्ष ✅✅

     🔵नाझीवादी पक्ष

     ⚪️इडिया कॉग्रेस


देशी व्यापारोत्तेजक मंडळ   या संस्थेची स्थापना कोणी केली?

     🔴छत्रपती शाहू महाराज

     ⚫️विठ्ठल रामजी शिंदे

     🔵बाबा पद्मजी

     ⚪️सार्वजनिक काका ✅✅


इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

     🔴मराठा

     ⚫️बहिष्कार भारत

     🔵परभाकर

     ⚪️सधारक ✅✅


स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री कोण?

     🔴डॉ. पंजाबराव देशमुख ✅✅

     ⚫️सी.सुब्रह्यण्यम

     🔵सरदार बलदेवसिंग

     ⚪️गलझारीलाल नंदा


जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी...... यांच्याकडून देण्यात आली.

     🔴बरिटिश सरकार

     ⚫️पण्यातील जनता

     🔵सत्यशोधक समाज

    ⚪️ मबईतील जनता ✅✅


१९ व्या शतकात पंजाबात  नामधारी शिख चळवळ  र्उफ  कुका चळवळ  कोणी सुरु केली?

      🔴गरु रामसिंग ✅✅

      ⚫️गरु तेगबहादूर

      🔵लाला हरदयाळ

      ⚪️गरुजीत सिंग


१८५७ चा उठाव म्हणजे ख्रिश्चन धर्माविरुध्द हिंदूचे बंड  असे कोण म्हणाले?

     🔴डॉ. शेन ✅✅

     ⚫️न. र. फाटक

     🔵थॉमस मन्रो

    ⚪️ यापैकी नाही


कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

   🔴  १०२

   ⚫️ १०१ ✅✅

   🔵  १००

   ⚪️    ११०


१९७१ साली कोणता देश स्वतंत्र झाला

     🔴नामिबिया

     ⚫️बांगला देश ✅✅

     🔵फिजी

     ⚪️झिंबाब्वे


इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला?

     🔴कोलंबस

     ⚫️रॉर्बट क्लाईव्ह

     🔵वास्को द गामा ✅✅

     ⚪️वॉरन हेस्टिंग


१८५७ साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला?

     🔴दिल्ली

     ⚫️बराकपूर ✅✅

     🔵मीरत

     ⚪️बरेली



Q11) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?

      🔴पराथमिक ✅✅✅

     ⚫️ दवितीय

      🔵तत्तीय

     ⚪️ वरील सर्व



Q12) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.

      🔴नयूर्यॉक

      ⚫️वॉशिग्टन

      🔵लडन

      ⚪️जिनिव्हा✅✅✅


Q13) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?

      🔴बक ऑफ हिंदोस्तान

      ⚫️इपिरियल बॅंक✅✅✅

      🔵परेसिडेन्सी बॅंक

      ⚪️सट्रल बॅंक



Q14) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?

     🔴 बक ऑफ बॉम्बे

      ⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅

      🔵सटेट बॅंक ऑफ इंडिया

      ⚪️अशी बॅंक नाही



Q15) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?

      🔴सोनपूर✅✅✅

      ⚫️पष्कर

      🔵जयपूर

      ⚪️रायबरेली



Q16) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?

    🔴  आध्र

     ⚫️ तामिळनाडू

    🔵  कर्नाटक✅✅✅

     ⚪️ करळ



Q17) बालिका दिन  हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?

      🔴पडिता रमाबाई

      ⚫️इरावती कर्वे

      🔵सावित्रीबाई फुले✅✅✅

      ⚪️डॉ. आनंदी गोपाळ



Q18)  भारताचा पहिला राष्ट्रपुरुष  ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?

      🔴बाळशास्त्री जांभेकर

      ⚫️लोकमान्य टिळक

      🔵महात्मा गांधी

      ⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅



Q19) फिल्म फेअर पुरस्कार  कोणाद्वारे देण्यात येतो?

      🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅

      ⚫️इडियन एक्सप्रेस

      🔵द हिंद

      ⚪️लोकशक्ती टाईम्स



Q20) रेमन मॅगसेसे  पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?

      🔴१९५०

      ⚫️१९५५

      🔵१९६५

      ⚪️१९५७✅✅✅



Q21) गेट वे ऑफ इंडिया  निर्माण झाल्याचे साल कोणते?

      🔴१९०१

      ⚫️१९०२

      🔵१९०४

      ⚪️१९११✅✅✅



Q22) रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

      🔴लपान्स

     ⚫️ वहिएन्ना

      🔵जिनिव्हा✅✅✅

      ⚪️परीस


Q23) ओझोन दिन  कोणता दिवस आहे?

      🔴१५ जून

      ⚫️१५ मे

      🔵१८ मार्च

      ⚪️१६ सप्टेंबर✅✅✅

      

Q24) हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?

      🔴राष्ट्रपतीभवन

      ⚫️राजभवन

      🔵निलायम✅✅✅

      ⚪️मगलधाम


Q25) नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?

      🔴सरीता क्रांती

      ⚫️अमृत क्रांती✅✅✅

      🔵जलक्रांती

      ⚪️जलस्वराज्य


Q26)"सरिता"  शब्दास समानर्थी शब्द कोणता

    1⃣वनिता

      2⃣नदी✅✅✅

      3⃣सनिता

      4⃣ रजिता

  


Q27) पक्षी   या शब्दाशी विसंगत शब्द कोणता

     🔴खग

     ⚫️विहंगम

     🔵सगम✅✅

     ⚪️वदिज



Q28) दाढी धरणे   या शब्दाचा अर्थ काय

      🔴विनवणी करणे✅✅✅

      ⚫️मारामारी करणे

      🔵दाढी ओढणे

      ⚪️लाचारी करणे



Q29) पाणी पडणे   या अर्थ काय

      🔴पाउस पडणे

      ⚫️ओले होणे

      🔵वाया जाणे✅✅✅

      ⚪️पाण्यात पडणे



Q30) श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांच्या पुस्तकाचे नाव काय आहे

      🔴फोडणीचे पोहे

      ⚫️दडपे पोहे

      🔵सदाम्याचे पोहे✅✅✅

      ⚪️कच्चे पोहे



Q31) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता

      🔴उट

      ⚫️हत्ती

      🔵शहामृग

      ⚪️जिराफ✅✅✅



Q32) जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहले

      🔴बकिमचंद्र चटर्जी

      ⚫️कसुमाग्रज

      🔵रविंद्रनाथ टागोर✅✅✅

      ⚪️प. नेहरू



Q33) सायकलचा शोध कोणी लावला

      🔴मकमिलन✅✅✅

      ⚫️जॉनबेर्अड

      🔵आल्फ्रेड नोबेल

      ⚪️वॉटरमन



Q34) कोल्हाटयाचं पोरं  हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक कोणी लिहले ?

      🔴भगवान सोनटकपेे

      ⚫️डॉ.किशोर शांताबाई काळे✅✅

      🔵लाखा कोल्हाटी

      ⚪️विजय काळे



Q35) धुम्रपानामुळे कोणता रोग होतो

      🔴कष्ठरोग

      ⚫️पोटाचा कॅन्सर

      🔵फफ्फुसाचा कॅन्सर✅✅✅

      ⚪️नयुमोनिया



Q36) काळ  हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

      🔴लो. टिळक

      ⚫️गो. ग. आगरकर

      🔵वि. रा. शिंदे 

      ⚪️शिवरामपंत परांजपे✅✅



Q37) भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना कोणता?

      🔴रांची

      ⚫️बरौनी

      🔵तर्भे

      ⚪️सिंद्री✅✅✅



Q38) वटवृक्ष  हे .. .. .. या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे.

      🔴शिवाजी शिक्षण संस्था

      ⚫️सवामी विवेकानंद शिक्षण संस्था

      🔵रयत शिक्षण संस्था✅✅

      ⚪️हिंगणे स्त्री शिक्षण संस्था



Q39) दास कॅपिटल  या ग्रथांचे लेखक .. .. ..

      🔴कार्ल माक्र्स✅✅✅

      ⚫️जॉन रस्कीन

      🔵सलमान रश्दी

      ⚪️लिओ टॉलस्टॉय



Q40) बुलढाणा  जिल्ह्यात असलेले जगप्रसिध्द सरोवर कोणते ?

      🔴वलर

      ⚫️मान सरोवर

      🔵लोणार सरोवर✅✅

      ⚪️यापैकी नाही


Q46) जिल्हा परिषदेच्या   महिला व बालकल्याण समितीचा सचिव   म्हणून कोण काम करतो?

      🔴तहसीलदार

      ⚫️गट विकास अधिकारी

      🔵समाजकल्याण अधिकारी

      ⚪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी✅✅



Q47) विधानपरिषदेची जननी   कोणास म्हणतात?

      🔴विधानसभा✅✅

      ⚫️लोकसभा

      🔵राज्यसभा

      ⚪️पचायत राज परिषद



Q48) अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?

      🔴३५२✅✅

      ⚫️३६८

      🔵३५६

      ⚪️३६०



Q49) देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक  योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?

      🔴१९६९ ते १९७०

      ⚫️१९५१ ते १९५२

      🔵१९७७ ते १९७८

      ⚪️१९७४ ते १९७५✅✅



Q50) जन्म मृत्यूचा दाखला कोणत्या कर्मचार्‍याशी संबंधित आहे?

     🔴 गटविकास अधिकारी

      ⚫️पचायत विस्तार अधिकारी

      🔵गरामसेवक✅✅

      ⚪️तलाठी


Q51) जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची कागदपत्रे कोण तयार करतो?

      🔴जिल्हाधिकारी

      ⚫️तलाठी✅✅

      🔵तहसिलदार

      ⚪️यापैकी कोणीही एक


Q52) भारतात प्रशासकीय (सिव्हील) सेवा कोणी सुरु केल्या?

      🔴लॉर्ड कर्झन

      ⚫️लॉर्ड कॉर्नवॉलिस✅✅

      🔵लॉर्ड डलहौसी

      ⚪️लाॅर्ड मेयो


Q53) महाराष्ट्रातील   रोजगार हमी योजना   कशावर आधारीत आहे?

      🔴मलभूत कर्तव्य

      ⚫️नसर्गिक अधिकार

      🔵मार्गदर्शक तत्त्वे✅✅

      ⚪️रोजगाराचा मूलभूत हक्क



Q54) कोणास   भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह   म्हणून ओळखले जाते?

      🔴लॉर्ड माऊंटबॅटन

      ⚫️लॉर्ड लिटन

      🔵लॉर्ड रिपन✅✅

      ⚪️लॉर्ड कॅनिंग



Q55) महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?

      🔴७८✅✅

      ⚫️१४८

      🔵१७८

      ⚪️२८८



Q56) महाराष्ट्रातुन लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

      🔴४०

      ⚫️४२

      🔵४८✅✅

      ⚪️यापैकी नाही


Q57) मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?

      🔴राष्ट्रपती

      ⚫️ससद

      🔵विधानपरीषद

      ⚪️विधानसभा✅✅



Q58) राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?

      🔴उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

      ⚫️राज्याचे मुख्यमंत्री

      🔵महाधिवक्ता✅✅

      ⚪️राज्यपाल



Q59) राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?

      🔴दोन

      ⚫️चार

      🔵पाच

      ⚪️सहा✅✅



Q60) पंचायत राज्याची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली ?

      🔴महाराष्ट्र

      ⚫️मध्य प्रदेश

      🔵आध्र प्रदेश

      ⚪️राजस्थान✅✅


Q76) मलबार सागरी सराव हा कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? 

🔴भारत-चीन 

🔵भारत-नेपाळ 

⚫️भारत-अफगाणिस्तान 

⚪️भारत-जपाण-अमेरिका✅✅


Q78) UPSC च्या प्रभारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ??

🔴अरविंद सक्सेना ✅✅

🔵अरविंद मल्होत्रा 

⚫️डव्हिड आर 

⚪️यापैकी नाही 



Q.79)  जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?

🔴नया. इंदिरा बॅनर्जी

🔵नया. आर. भानमती

⚫️नया. गीता मित्तल✅✅

⚪️नया. इंदू मल्होत्रा



Q80) जागतिक पहिला पवन शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? 

🔴भारत

🔵बरिटन 

⚫️जपाण

⚪️जर्मनी ✅✅



Q81) स्त्री धर्मनीती   हे पुस्तक कोणी लिहिले?

      🔴पडिता रमाबाई✅✅

      ⚫️डॉ. आनंदीबाई जोशी

      🔵गोपाळ हरी देशमुख

      ⚪️सरस्वतीबाई जोशी


Q82) डॉ. सी.डी.देशमुख यांनी पुढीलपैकी कोणत्या नदीस  महाराष्ट्राची भाग्यविधाती  असे म्हटले?

      🔴गोदावरी

      ⚫️कष्णा

      🔵भीमा

      ⚪️कोयना✅✅


Q83) महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बॅंकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

      🔴अहमदनगर

      ⚫️मबई✅✅

      🔵पणे

      ⚪️नागपूर



Q84) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल......

      🔴१० वर्षे

      ⚫️६ वर्षे

      🔵८ वर्षे

      ⚪️६ वर्षे किंवा ६२ वय यापैकी जे आधी असेल ते✅✅




Q85) पहिला  परमवीर चक्र पुरस्कार  कोणास मिळाला होता?

      🔴लफ्ट. आर.आर.राणे

      ⚫️मजर सोमनाथ शर्मा✅✅

      🔵नाईक जदुनाथ सिंग

      ⚪️कपनी हवालदार मेजर पिरुसिंग



Q86) गो.ग.आगरकरांनी केलेले शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीतले भाषांतर

      🔴भताचा वाडा

      ⚫️पनर्जन्म

      🔵विकारविलसित✅✅

      ⚪️विकारशलाका



Q87) बटाटा  या वनस्पतीचा खाण्यासारखा भाग म्हणजे ....... होय.

      🔴मळे

      ⚫️खोड✅✅

     🔵बीज

      ⚪️फळ



Q88) राष्ट्रीय पातळीवरील कृषी माल सहकारी विपणन संस्था कोणती आहे?

      🔴अ‍ॅपेडा

      ⚫️नाफेड✅✅

      🔵मपेडा

      ⚪️राष्ट्रीय कृषीमाल निर्यात विकास महामंडळ

  


Q89) महाराष्ट्र शासनाची  जल व भूमी व्यवस्थापन  ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे?

      🔴नागपूर

      ⚫️पणे

     🔵औरंगाबाद✅✅

     ⚪️अमरावती

    

Q90) महाराष्टातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती?

      🔴नागपूर

      ⚫️मबई✅✅

      🔵कोल्हापूर

      ⚪️औरंगाबाद


Q91) मेदापासुन किती उर्जा (उष्मांक)  मिळते?  (ASST 2014)
🔴४कॅलरी 
⚫️९कॅलरी ✅✅✅
🔵७कॅलरी 
⚪️१२कॅलरी


Q92) लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो? (STI 2012)
🔴A✅✅✅
⚫️B
🔵C
⚪️D


Q93) आहारातील उर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते??  (PSI 2012)
🔴परथिने 
⚫️कर्बोदके✅✅✅
🔵मद
⚪️जीवनसत्वे 


Q94)  कोणत्या प्राण्याचे ह्रृदय सर्वात मोठे आहे? (ASST 2014)
🔴मगर
⚫️हत्ती 
🔵सिंह 
⚪️जिराफ✅✅✅


Q95) नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? (ASST 2015)
🔴आक्सीटोसीन✅✅✅
⚫️वहासोप्रिसीन
🔵अड्रेनॅलीन
⚪️थायरोक्झिन


Q96) खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? (PSI 2014)
🔴कगारू
⚫️पलाटिपस✅✅
🔵पग्विन 
⚪️वहेल



Q97) मद्यपानामुळे_________चा अभाव निर्माण होतो? (PSI 2012)

🔴थायमिन
⚫️रटीनाॅल
🔵नायसीन✅✅✅
⚪️अस्काॅर्बीक आम्ल

Q98) हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? (STI 2016)
🔴सटफिलोकोकस
⚫️बासिलस
🔵सट्रेप्टोकोकस
⚪️कलोस्ट्रिडियम✅✅✅



Q99) बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? (STI 2016)
🔴अल्फा
⚫️गमा ✅✅✅
🔵मायक्रोवेव्हस्
⚪️अल्ट्राव्हायलेट



Q100) मलेरिया रोग______ मुळे होतो. (PSI 2011)
🔴पलाझमोडियम✅✅✅
⚫️पलॅनेरिया
🔵फायलेरिया
⚪️आरेलिया


अंकगणित प्रश्नमंजुषा ( Test Series )

Latest post

नचिकेत मोर समिती.

स्थापना - Sept 2013 - RBI ने स्थापन केलेली. अहवाल - 2014 लघुव्यवसाय व कमी उत्पन्न कुटुंबांनी एकात्मिक वित्तीय सेवा समिती. शिफारशी - A) प्रत्...