मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू.


🍀रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका  ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.


🍀तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🍀तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.


🍀सरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.


🍀एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली  2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

अलिगड मुस्लीम आंदोलन


🔹अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.


🔸आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते


🔹तयांनी 'पीरी-मुरीदी प्रथा' एवं 'दास प्रथा' समाप्त करण्याचे प्रयत्न केले


🔸सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला 'ऐंग्लों ओरियन्टल स्कूल' म्हणत


🔹यथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !



📚 आन्दोलनाचेे इतर नेते 📚


🔸दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली। 


🔹कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली


🔸 1870 नंतर प्रकाशित 'डब्ल्यू. हण्टर' चे पुस्तक 'इण्डियन मुसलमान' मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा


🔹सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित 'अलीगढ़ आन्दोलन' चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता👇


🔺नजीर अहमद चिराग 

🔺अली अल्ताफ 

🔺हसैन मौलाना 

🔺शिबली नोमानी


अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?


उत्तर👇


1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता. 


2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे. 


3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. 


4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले. 


5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला. 


6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला. 


7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.


 8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला. 


9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.


पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला. 


10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

वहाबी आंदोलन


🔹वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते


🔸वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत


🔹आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते


 🔸पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते 


🔹ह आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते


 🔸ज उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते



📚 सय्यद अहमद ची इच्छा 📚


🔹सय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते


🔸तयांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती


🔹सय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला


🔸अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,


🔹तयांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला


🔸अापल्या नावाचे सिक्के भी चालवले


📚  फाँसी ची शिक्षा 📚


🔸1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले


🔹कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली


🔸तयांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली


फॉर्वर्ड ब्लाॕक



🔹सभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


 🔸पक्षाचे उद्दीष्ट -


कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना

मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


मुखपत्र-फार्वड ब्लॉक


"नागपुर-पहिली परिषद "


२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.

 परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

ताश्कंद करार



● भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी हा करार झाला.


● भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 


● भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या मध्यस्थीने हा करार झाला.


●या करारान्वये संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.


● २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले.


● एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.


● एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.


● एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.


● एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.


● युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.


● उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.


● अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे. 


● या करारानंतर लगेच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंद येथेच निधन झाले.

बगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -



🔸बगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.


🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.


🔸तयामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.


🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.


🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.


🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.

नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?



- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखला दिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. 


- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.


-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते. 


-  डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं. 


- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य



●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे


●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.


●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.


●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.


●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे


●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे


●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे


●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले


●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज


●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर


●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे


●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई


●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई 


●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई


●केसरी — लोकमान्य टिळक


●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख


●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे


●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख


●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी


●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर


●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी


●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.


●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.


●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.


●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे


●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे


●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित 


●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.


●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



🎯 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


🎯 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


🎯 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

सटॅच्यू ऑफ युनिटी


✔️मर्तिकार :- शिल्पकार राम सुतार 

✔️ कोठे :-  नर्मदा नदी , गुजरात

✔️ उची :- १८२ मीटर 

✔️ जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात 

      भव्य पुतळा आहे. 

✔️ लोकार्पण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ✔️ पतळ्याचे वजन :-  १७०० टन 

✔️ ह शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प 

      आहे. 

✔️ पायांची उंची :- ८० फूट,

✔️ हाताची उंची :-  ७० फूट

✔️ चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये  

     असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची       

     उंची १५३ मीटर आहे.


✔️  हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच 

       पुतळा मानला जायचा, मात्र 'स्टॅच्यू 

       ऑफ युनिटी'ने त्याचा पुतळ्याचाही 

       रेकॉर्ड मोडला आहे.

✔️  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनण्यास 

        कालावधी :-  ३३ महिने 

✔️ पतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० 

      पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. 

✔️ खर्च :-  २ हजार ९८९ कोटी रुपये 

✔️ सरवात :- ३१ ऑक्टोबर २०१३

✔️ सरदार पटेल यांच्या १३८ व्या 

     जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात 

     आले होते.

✔️ नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री 

      होते

✔️ लोकार्पण सोहळ्यासाठी 'युनिटी ट्रेन' 

      नावाची ट्रेनही धावणार आहे.

✔️ या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर, 

      अलाहबाद,रायबरेलीहून लोक या  

      ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे

अनिमिया म्हणजे काय?

🔴रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.


🔘रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहाची गरज असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीन लाल रक्तकणात असते. यांचे कार्य छातीतून शरीराच्या विविध भागात प्राणवायु पोहोचविणे हे आहे. प्राणवायुमुळे शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाते.


🔰अनिमियाची कारणे


लोहयुक्त आहाराची कमतरता


सकस आहाराची कमतरता


मानसिक तणाव


मासीक पाळीतील रक्तस्राव


जास्तीची बाळंतपणे (२ पेक्षा जास्त )


वारंवार गर्भपात


मलेरिया


जंत


मुळव्याध


🛑अनिमिया आजाराचे चिन्ह/ लक्षणे


आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग फिका पडतो.


नखे, डोळे, जीभ फिके दिसायला लागतात.


चक्कर येणे


भूक मंद होणे


चालताना दम लागणे


थोडे श्रम केले तरी थकवा जाणवणे


निरुत्साह वाढतो


चिडचिडेपणा वाढतो.


✅लोहाच्या कमतरतेमुळे महिला व बालकांमधील काही दुष्परिणाम


अ) महिलांमध्ये रक्ताची कमी असल्यास होणारे दुष्परिणाम


कमी वजनाचे बालक जन्माला येते.


वेळेच्या अगोदर बाळंत होणे.


गरोदरपणात रक्तस्राव होणे.


बाळंतपणानंतर जास्त रक्तस्राव होणे


बाळंतपणातच महिलेचा मृत्यू होणे


जन्माच्या अगोदरच बाळाचा मृत्यू होणे.


किशोरींमध्ये पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.


ब) बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम


बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे सारखे आजारी पडतात.


कुठल्याही कामात लक्ष न देणे. त्यामुळे अशा प्रकारची मुले खेळात, अभ्यासात, इतर बालकांपेक्षा मागे राहतात.


आत्मविश्वास कमी होणे.


बाळ चिडचिडे होते. सतत रडते.


 


स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे

 चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे. 


🔰 पण 1969 ते 1972 दरम्यान 12 व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ? 


🔰 चंद्रावर पाऊल टाकणारी 12 व्यक्तिंची नावे आज आपण जाणून घेणार आहोत (सर्व अमेरिकेचे रहिवासी)


👨‍🚀 1) निल आर्मस्ट्राँग : अपोलो 11

👨‍🚀 2) बझ अल्ड्रिन : अपोलो 11

👨‍🚀 3) पेटे कॉनराड : अपोलो 12

👨‍🚀 4) एलन बीन : अपोलो 12

👨‍🚀 5) एलन शेपर्ड : अपोलो 14

👨‍🚀 6) एडगर मिशेल : अपोलो 14

👨‍🚀 7) डेविड स्कॉट : अपोलो 15

👨‍🚀 8) जेम्स इरविन : अपोलो 15

👨‍🚀 9) जॉन यंग : अपोलो 16

👨‍🚀 10) चार्ल्स ड्यूक : अपोलो 16

👨‍🚀 11) यूजीन सेरनन : अपोलो 17

👨‍🚀 12) हैरिसन श्मिट : अपोलो 17

आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी

 

♒️आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.


♒️करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.


♒️तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


♒️विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना  यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.

अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव.


अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर

ग:-गङचिरोलि, गोंदिया

क:- कोल्हापूर

म:- मुंबई

ला:- लातूर

उ:- उस्मानाबाद

ठ:- ठाणे

पा:- पालघर, पुणे, परभणी

य:- यवतमाळ

धु :- धुळे

र:- रायगड, रत्नागिरी

स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग

भ:- भंङारा 

जे:- जळगाव, जालना

च:- चंद्रपूर

हा:- हिंगोली

ब:- बिड, बुलढाणा

न:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद

व:- वर्धा, वाशिम

अन्नपचन प्रक्रिया


🌾सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.


🌾अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.


🌾या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.


🌾या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.


🌾खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.



🌿1. अंग पदार्थ – मुख व गुहा


स्त्राव – लाळ  


विकर – टायलिन


माध्यम – अल्पांशाने


मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  


क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


🌿2. अंग पदार्थ – जठर


स्त्राव – हायड्रोक्लोरिक


माध्यम – आम्ल, अॅसिड  


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  


क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक


🌿3. अंग पदार्थ – जठररस  


स्त्राव – पेप्सीन,रेनीन


माध्यम – आम्ल


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध


क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर



🌿4. अंग पदार्थ – लहान आतडे


स्त्राव – पित्तरस


माध्यम – अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद


क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.



🌿5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  


विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ


माध्यम – अल्कली, अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद


क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल



🌿6. अंग पदार्थ – आंत्ररस


विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ


माध्यम – अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  


क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...