Thursday 5 December 2019

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन

१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 

डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : 

Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).

३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : 

मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).

४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : 

महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.

५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).

६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : 

‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’

७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान : 

१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :

चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.

९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी : 

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता.

१०. बाबासाहेबांचे लेखन : 

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

मासात्सुगू असाकावा: आशियाई विकास बँकेचे (ADB) नवे अध्यक्ष

- जापानचे मासात्सुगू असाकावा ह्यांची आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

-  ताकेहिको नाकाओ ह्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

- मासात्सुगू असाकावा हे आशियाई विकास बँकेचे 10 वे अध्यक्ष असणार. ते 17 जानेवारी 2020 रोजी पदभार सांभाळतील.

- सध्या ते जापानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

▪️आशियाई विकास बँक (ADB)

-- आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे,

- ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधल्या आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या हेतूने केली गेली.

- मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.

- “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. त्याचे 68 देश सभासद आहेत.
--------------------------------------------------

झटपट महत्त्वाचे 10 सराव प्रश्न उत्तरे

1) सोन्याच्या दागिन्यांसाठी “हॉलमार्किंग” कधीपासून अनिवार्य करण्यात येणार आहे?
उत्तर : सन 2021

2) नोव्हेंबर 2019 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली?
उत्तर : सुरिनम

3) कोणत्या दिवशी पॅलेस्टिनी लोकांसह एकनिष्ठता विषयी आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो?
उत्तर : 29 नोव्हेंबर

4) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाचा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अकीथम अचुथन नामबूथीरी

5) भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंका या देशासाठी किती पतमर्यादा निश्चित केल्याची घोषणा केली?
उत्तर : 450 दशलक्ष डॉलर

6) “अर्ली इंडियन्सः द स्टोरी ऑफ अवर अ‍ॅन्सेस्टर्स अँड व्हेअर वूई केम फ्रॉम” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : टोनी जोसेफ

7) अंदमान निकोबार कमांडचे 14 वे कमांडर-इन-चीफ कोण आहेत?
उत्तर : पोडाली शंकर राजेश्वर

8) अलीकडेच मेघालायमध्ये आढळून आलेल्या नव्या मत्स्यप्रणालीचे नाव काय आहे?
उत्तर : शिस्टुरा सींगकई

9) ‘2019 अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ ही मोटार शर्यत कोणी जिंकली?
उत्तर : लुईस हॅमिल्टन

10) “आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन” कधी साजरा केला जातो?
उत्तर : 3 डिसेंबर

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
   1) तालव्य    2) मूर्धव्य      3) दन्त्य      4) ओष्ठय

उत्तर :- 1

2) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –

   1) मन + रथ    2) मनो + रथ    3) मन + ओरथ    4) मन: + रथ

उत्तर :- 4

3) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.

   1) विकारी    2) अविकारी    3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 1

4) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.

   1) वकिली    2) गुलाम      3) गायक      4) लबाड

उत्तर :- 1

5) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) अनिश्चित    2) संबंधी      3) दर्शक      4) आत्मवाचक

उत्तर :- 4

6) पुढील वाक्यातील मुळ विधेय कोणते आहे ?

     “पूर्वी घडून आलेला आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.”

   1) आणखी एक      2) प्रसंग     
   3) आहे      4) सांगण्यासारखा

उत्तर :- 3

7) खालील वाक्य कोणत्या कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकाराचे आहे ?
     ‘त्याची गोष्ट वाचून झाली.’

   1) शक्य कर्मणी प्रयोग    2) समापण कर्मणी प्रयोग
   3) नवीन कर्मणी प्रयोग    4) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

उत्तर :- 2

8) ‘रामकृष्ण’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

   1) अव्ययीभाव समास    2) कर्मधारय समास 
   3) बहुव्रीही समास    4) व्दंव्द समास

उत्तर :- 4

9) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते चिन्ह वापर करतात.

   1) स्वल्पविराम      2) अर्धविराम   
   3) अपूर्ण विराम      4) यापैकी  नाही

उत्तर :- 3

10) पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता ?

   1) किमयागार      2) विसंगत   
   3) ‍विधिलिखित      4) विश्वासघात

उत्तर :- 2

एससी/एसटी राजकीय आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ:-

• लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एससी,एसटी) आरक्षण १० वर्षांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

• या पूर्वी हे आरक्षण वाढवण्याचा निर्णय सन २००९ मध्ये घेण्यात आला होता.

• भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३४ नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एससी, एसटी आरक्षण लागू करण्यात आले आहे. परंतु, त्यावेळी हे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी लागू करण्यात आले होते.

•  त्यानंचर १० वर्षांनी ते आणखी १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूर्वी सन २००९ मध्ये यूपीए सरकारने हे आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या आरक्षणाची मर्यादा २५ जानेवारी २०२० पर्यंत होती. संसदेने या आरक्षणाच्या कालमर्यादेला मंजुरी दिल्यास ते जानेवारी २०३० पर्यंत लागू होणार आहे.

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 5/12/2019

१) असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधीत केली आहे ?
    1) 10 
    2) 14 
    3) 19    
    4) 21

उत्तर :- 2

२) पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या, त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरविले जाऊ शकत  नाही.

   ब) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही.

   क) कोणीही स्वत:विरुध्द साक्षीदार होऊ शकत नाही.

   1) अ   
  2) ब   
  3) क    
4) वरील सर्व

उत्तर :- 3

३) “स्वातंत्र्य समतेपासून वेगळे/अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व
     समतेला बंधुते पासून वेगळे करता येणार नाही.” हे उद्गार कोणाचे आहेत ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरु   
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
    3) डॉ. एस. राधाकृष्णन 
    4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4

४). अ) भारताच्या राज्यघटनेत ‘अल्पसंख्य’ शब्दाची व्याख्या नाही.

    ब) अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था नाही.

   1) अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब बरोबर आहे, ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ बरोबर आहे, पण ब चूक आहे.

   4) अ चूक आहे, पण ब बरोबर आहे.

उत्तर :- 2

५) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ................... यांनी ‘सर्वात टिकात्मक भाग’ असे केले आहे  ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरु  
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
   3) सरदार वल्लभभाई पटेल   
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा,व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

   अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.

   ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा  अधिकार राज्यसंस्थेला असेल.

   क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.

   ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.

   1) अ, ब 
   2) क, ड  
   3) अ, ब, क  
   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

७) योग्य कथन / कथने ओळखा.
   अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.
   ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.
   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे

   2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
  
  4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची
,
उत्तर :- 3

८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने  सत्य आहेत ?

   अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

  ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू  शकते.

   क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

   ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या  वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

   1) अ, ब   
   2) अ, ड   
   3) अ, ब, क, ड  
   4) अ

उत्तर :- 4

९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरू 
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
   3) सरदार वल्लभभाई पटेल   
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

१०) कालानुक्रमे मांडणी करा:

   अ) अंतर्गत सुरक्षा कायदा    
   ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
   क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा   
   ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा

   1) ब, अ, ड, क    2) अ, ब, क, ड    3) क, ड, अ, ब    4) ब, ड, क, अ

उत्तर :- 1

११) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

   1) 84 वी घटना दुरुस्ती   

  2) 85 वी घटना दुरस्ती

   3) 86 वी घटना दुरुस्ती   

  4) 87 वी घटना दुरुस्ती

उत्तर :- 3

१२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?

   अ) कायद्यासमोर समानता   
   ब) अस्पृश्यतेची समाप्ती
   क) पदव्यांची समाप्ती   
   ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य

   1) अ, ब, ड    2) अ, क, ड   
3) क, अ, ब    4) ब, ड, क

उत्तर :- 3

१३).  खालील विधाने विचारात घ्या :

   अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.

   ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.

   क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.

         वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब 
   2) ब आणि क  
   3) अ आणि क 
   4) अ, ब आणि क

उत्तर :- 4

१४).  मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............
     ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.

   1) सीडॉ (CEDAW)    

2) युएनडीपी (UNDP)

3) सीइसीएसआर (CECSR)  

4) युएनसीएचआर (UNCHR)

उत्तर :- 1

१५).  योग्य कथन / कथने ओळखा :

   अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

   ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.

   1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे 

    2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर

   3) दोन्ही कथने अ आणि ब  बरोबर
आहेत

   4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत

उत्तर :- 2

१6) खालील विधाने पहा :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पूश्यता नष्ट करण्यात आली आहे.

   ब) भारतीय राज्यघटनेच्या 52 व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतूदी लागू करण्यात आल्या.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ   
   2) ब   
   3) अ, ब  
   4) यापैकी  नाही

उत्तर :- 3

17) भारतीय संविधान (पहिली सुधारणा) कायदा 1950 कशासाठी आहे.

   अ) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध

   ब) व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष

   क) लोकसभेतील प्रतिनिधित्व पुर्ननिर्धारित केले गेले

   ड) राज्यांकरिता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला.

   1) अ, ब    2) क, ड   
   3) ब, क      4) अ आणि क

उत्तर :- 1

18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते ?

     “स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदा-या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि  त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दबून जाईल.”

   1) मूलभूत हक्क   

    2) सांघिक कार्यकारी मंडळाचे अधिकार
   3) राज्य धोरणांची निदेशक तत्वे  

   4) नियोजन आयोग

उत्तर :- 3

19) खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

   अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मुलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

   ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

   1) विधान अ सत्य आहे मात्र ब चुकीचे आहे

   2) विधान ब सत्य आहे मात्र अ चुकीचे आहे

   3) दोन्ही विधाने सत्य आहेत

   4) दोन्ही विधाने असत्य आहेत

उत्तर :- 3

20).खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.

     विधी मंत्रालयाने तयार केलेला मसूदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबध्दता वाढविणारे विधेयक मे 1975
     मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली.
अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते ?

   1) विधीमंडळाची सक्रियता   
   2) आत्यंतिक विधीवाद
   3) कार्यकारी मंडळाची सक्रियता   
   4) प्रशासकीय सक्रियता

   उत्तर :- 2

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...