Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ मार्च २०२६

नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

♍️जग : वनसंपत्ती♍️ 

💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.

💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.

💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.

💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️

💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.

💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.

💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.

💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,

💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.

💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️

💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.

💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.

💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.

💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.

💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी

💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.

💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला

💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.

💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.

💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.

💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश

💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.

💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.

💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.

💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.

💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️

💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश

💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश

💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश

💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.

💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.

💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,

💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.

💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.

💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,

💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.

💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.

💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,

💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,

💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,

💠कशर - स्पेन, भारत, इराण.

💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,

💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.

💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.

💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,

💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.

💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.

💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वने

◾️ सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

◾️घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

◾️विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

🔰 वृक्षाचे स्वरूप
____________________________

◾️ वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

◾️उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात

◾️काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात

◾️पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात

◾️कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

🔰 वृक्षाचे प्रकार 
____________________________

◾️सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

🔰 आर्थिक महत्व
____________________________

◾️उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

◾️इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

◾️खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

◾️ उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

____________________________

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

⏩काळी मृदा

✔️बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात. ✔️मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.

✔️या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.


✔️ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.

✔️महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.

✔️महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.


⏩जांभी मृदा

✔️2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्‍चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.

✔️सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.

✔️या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.


✔️महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते. या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते.


✔️डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.



⏩गाळाची मृदा

✔️सततच्या संचयनामुळे नदी खोर्‍यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते. ✔️बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.

✔️महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.


✔️उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्‍यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.


✔️गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.


⏩तांबडी-पिवळसर मृदा

✔️महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.

✔️ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.

✔️तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.

✔️मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अ‍ॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते. ✔️ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.

✔️या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात .

ज्वारी (कोरडवाहू पीक)

✅ज्वारी (कोरडवाहू पीक)✅

● ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. रब्बी व खरीप दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जाते.

● महाराष्ट्रात एकूण लागवडी पैकी 35% क्षेत्रात ज्वारी लावले जाते हे देशाच्या एकूण ज्वारी उत्पन्नाच्या ते 46% आहे.

● हे पीक 25 ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान व 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत घेतले जाते म्हणून याला कोरडवाहू पीक म्हणतात.

● महाराष्ट्रात पठारात हे पीक घेतले जाते.

● कोकणात व पूर्व विदर्भात हे पीक घेतले जात नाही कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त असते.

●कायम भुसभुशीत मृदेत ज्वारीचे उत्पादन चांगले होते हे पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते.

●खरिपातील झालेला "जोंधळा "असे म्हणतात तर रब्बी च्या ज्वारी ला  शाळू असे म्हणतात.

■ज्वारीच्या प्रमुख जाती:

फुले, माऊली, फुले चित्रा, फुले सुचित्रा, फुले अनुराधा

◆महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम:

सोलापूर >अहमदनगर> पुणे

◆सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे:

सोलापूर> अहमदनगर> सांगली

◆सर्वाधिक हेक्टरी उत्पादन:

चंद्रपूर> जळगाव> कोल्हापूर

◆रोगांचा प्रादुर्भाव:

तुडतुडे, खोडकिडा, खोडमाशी, मावा, लाल कोळी, खळखळया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काळी मृदा/ रेगूर मृदा

काळी मृदा/ रेगूर मृदा

 ◆ दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात.

◆बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

• महाराष्ट्रात काळी मृदा विस्तृत प्रमाणात आढळते.
• कर्नाटकात उत्तरेकडे या मृदेचा रंग अधिक काळा होत जातो.
• आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते.

◆या मातीत लोह, अ‍ॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते.

◆तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे.

◆ उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात. मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात.

◆पिके : काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

•कापूस, ऊस, तंबाखू यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तृणधान्ये, तेलबिया, विविध प्रकारचा भाजीपाला, संत्री- मोसंबी- द्राक्षांसारखी फळे
पिकवली जातात.

 ◆या जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कोरडवाहू शेतीसाठी ही जमीन आदर्श मानली जाते.

१३ मार्च २०२६

महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार

- एकूण लोकसंख्या: 11,23,74,333

- पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी

- स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी

- ग्रामीण लोकसंख्या: 54.77%

- शहरी लोकसंख्या: 45.23%

- पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929

- एकूण साक्षरता: 82.3%

- पुरूष साक्षरता: 88.4%

- स्त्री साक्षरता: 75.9%

- घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)

➖➖➖➖➖➖➖➖➖

🔴विशेष माहिती:


- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)

- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)

- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)

- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)

- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर

- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली

- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे

- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स


🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.


🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.


🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.


🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.


🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.


🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.


🔶सजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.


🔶मळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.


🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.


🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.


🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.


🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.


🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.


🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता


🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.


🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.


🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.


🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.


🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.


🔶पणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.


🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.


🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).


🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).


🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.


🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.


🔶बलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.

१००० भूगोल प्रश्न

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


 1) ............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

   1) सातारा    2) कोल्हापूर    3) कराड      4) महाबळेश्वर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे.

   1) भीमा    2) गोदावरी    3) कृष्णा      4) वैनगंगा

उत्तर :- 2


3) योग्य जोडया लावा. 

  धरण      जलाशयाचे नाव

         अ) कोयना      i) शहाजी सागर

         ब) भाटघर      ii) शिवसागर

         क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

         ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक

    अ  ब  क  ड

           1) i  iv  ii  iii

           2) i  iii  ii  iv

           3) iv  iii  ii  i

           4) ii  iv  i  iii

उत्तर :- 4


4) महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

   1) वशिष्ठी    2) तापी      3) भीमा      4) उल्हास

उत्तर :- 3


5) खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

   1) देहू      2) आळंदी    3) पंढरपूर    4) नाशिक

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व  पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत

   अ) मका, भात, वाटाणा    ब) गहू, रताळी, भात

   क) वाटाण, कपाशी, गहू    ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी

   1) अ व ड    2) ब आणि क    3) कव अ    4) ड फक्त

उत्तर :- 4


2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर 

     होतो ?

   1) वा-याचा वेग    2) पालाश    

   3) सूर्यप्रकाश    4) पाण्याचे रेणू

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?

   1) जीवाणू खत    2) शैवाल खत    

   3) हरीत शेणखत    4) वरील सर्व

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?

   1) आइबीडीयु     2) सीडीयु    

   3) एमडीयु    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................

   1) लोह    2) चुना      3) पालाश    4) स्फुरद

उत्तर :- 3


1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.

   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC

उत्तर :- 2


2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.

   क) आर्थिक लाभ मिळवणे.

   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?

   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश

   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश

उत्तर :- 1


4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.

   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²

उत्तर :- 4


5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :

   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.

   2) दिवासाची लांबी बदलते.

   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.

   1) एरंड, भात, ओट    2) गहू, भात, वांगी

   3) मका, भात, टोमॅटो    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 1


2) योग्य जोडया लावा.

  वारे      स्थान

         अ) गरजनारे चाळीस    i) 50º द. अक्षवृत्त

         ब) शूर पश्चिमी वारे    ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त

         क) उन्मत साठ    iii) 40º द. अक्षवृत्त

         ड) निर्वात पट्टा    iv) 60º द. अक्षवृत्त 

    अ  ब  क  ड

           1)  i  iii  iv  ii

           2)  iii  i  iv  ii

           3)  iv  iii  ii  i

           4)  i  ii  iii  iv

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?

   1) 1º सें.दर 160 मी. ला    2) 1º सें. दर 170 मी. ला

   3) 1º सें. दर 100 मी. ला    4) 1º सें. दर 260 मी. ला

उत्तर :- 1


4) योग्य जोडया लावा.

  वातावरणाचे थर      उंची

         अ) तापांबर        i) 500 ते 1050 किमी

         ब) स्थितांबर      ii) 16 ते 50 किमी

         क) आयनांबर      iii) 0 ते 16 किमी

         ड) बाह्यांबर        iv) 80 ते 500 किमी

    अ  ब  क  ड

           1)  iii  ii  i  iv

           2)  ii  iv  i  iii

           3)  iii  ii  iv  i

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 3


5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................

   1) कमी कालावधीचा हवामान अंदाज    

   2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

   3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज    

   4) वरील सर्व

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?

   1) खारे व मतलई वारे    2) मान्सूनपूर्व वारे

   3) पर्वतीय/ डोंगरी वारे    4) दरी वारे

उत्तर :- 1


2) पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण –

   1) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.    2) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.

   3) जैविक इंधन उष्णता बाहेर सोडतात.        4) वनस्पती कार्बनडायऑक्साईडचे शोषण करतात.

उत्तर :- 2


3) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................

   1) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.

   2) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.

   3) जास्त तापमान असेल.

   4) कमी तापमान असेल.

उत्तर :- 2


4) हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ...................... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :

   1) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात.

   2) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.

   3) ढग पृथ्वीकडून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.

   4) ढग हे अति उंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करून उष्णता पृथ्वीकडे पाठवतात.

उत्तर :- 3


5) समुद्र सपाटीपासून वातावरणाची लांबी किती आहे ?

   1) 60,000 ते 80,000 कि.मी    2) 16,000 ते 29,000  कि.मी

   3) 35,000 ते 65,000 कि.मी    4) 10,000 ते 30,000 कि.मी

उत्तर :- 2


1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान 

     होतात.

   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण    

   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण

उत्तर :- 4


2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :

   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.

   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.

   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.

   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.

उत्तर :- 3


3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव

   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस

   3) वेगवान वारे          4) थंड रात्री

उत्तर :- 2


4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :

   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च

उत्तर :- 1


1) भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?

   1) 27%    2) 34%      3) 51%      4) 17%

उत्तर :- 1


2) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात 

     नाही, कारण :

   1) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.

   2) प्रचलित वा-यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.

   3) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वा-यांची दिशा बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधाने पहा :

   अ) फिलीपाइन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.

   ब) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.

   क) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.

   3) विधाने ब आणि क बरोबर आहेत.  4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) .............. च्या परिणामने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.

   1) उत्सर्जनाचा वेग    2) त्याची वारंवारिता

   3) त्याची तीव्रता    4) वरील सर्व

उत्तर :- 4


5) महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषि हवामान विभागांमध्ये .................. च्या आधारावर विभागलेले आहे.

   1) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती      2) पर्जन्य, तापमान व वनस्पती

  3) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती        4) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार 

उत्तर :- 3


1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :

   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.

   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.

   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड

उत्तर :- 1


2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक

उत्तर :- 2


3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या 

     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.

   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर

   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे

   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?

   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी

   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?

   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश

उत्तर :- 2


1) गरजणारे चाळीस हे ..................... वारे आहेत ?

   1) ईशान्य – व्यापारी    2) आग्नेय – व्यापारी    

   3) नैऋत्य – प्रतिव्यापारी    4) वायव्य – प्रतिव्यापारी

उत्तर :- 4


2) दिवसातील सर्वाधिक तापमान .............................. या वेळेत असते.

   1) सकाळी 11.00 ते दुपारी 12.00      2) दुपारी 12.00 ते दुपारी 1.00

   3) दुपारी 1.00 ते 2.00        4) दुपारी 2.00 ते 3.00

उत्तर :- 4


3) महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात ...................... या 

     महिन्यांत जास्त येतात.

   1) एप्रिल आणि जुलै    2) एप्रिल आणि मे    

   3) मे आणि जून      4) जून आणि जुलै

उत्तर :- 3


4) खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.

   1) हिमालय पर्वत व तिबेटचे पठार यांचे स्थान व विस्तार

   2) व्दीपकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण

   3) जेट स्ट्रीम वा-यांचे उच्च वातावरणातील चालीय संचलन

   4) हिन्दी महासागर व आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा व थंड होण्याच्या क्रियेतील तफावत

उत्तर :- 2


5) ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा .............................. टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते ?

   1) 120    2) 100      

   3) 150    4) 125

उत्तर :- 1


1) खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

   1) पश्चिम पाकिस्तान    2) फीलीपाईन्स    3) दक्षिण व्हिएतनाम    4) मध्य केनिया

उत्तर :- 4


2) भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :

   अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा

   ब) ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम 

   क) चीन, दक्षिण जपान      ड) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग

   1) अ, ब, क बरोबर    2) ब, क, ड बरोबर    3) अ, क, ड बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) तापमानाचे उभे वितरण हे ............................ या घटकावर अवलंबून आहे.

   1) अक्षवृत्ते      2) उंची      3) समुद्र सानिध्य      4) सागरी प्रवाह

उत्तर :- 2 


4) जोडया लावा.

   अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा    i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.

   ब) मध्य कटिबंधीय जास्त थराचा पट्टा  ii) वर्षभर तापमान 0ºC पेक्षा कमी असते.

   क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा    iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप पडतात.

   ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा    iv) थंड हवा 25º आणि 35º अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iv  iii

         2)  iv  ii  iv  iii

         3)  iii  iv  i  ii

         4)  ii  iii  iv  i

उत्तर :- 3


5) खालील विधाने पहा.

   अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.

   ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो.

   क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) फक्त विधान ब बरोबर आहे.

   3) फक्त विधान क बरोबर आहे.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


1) योग्य जोडया लावा :

  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष

         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm

         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm

        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm

         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm

    अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  ii  iv  iii

           4)  iii  iv  i  ii

उत्तर :- 4


2) खालील विधानांचा विचार करा.

   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.

   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत

उत्तर :- 3


3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ............... 

     प्रसंगी येते. 

   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.

   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.

उत्तर :- 2


4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.

   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994  

उत्तर :- 2


5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान

   2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन

   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1  


1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :

   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर

   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड

उत्तर :- 2


2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.

   1) 75      2) 79      3) 85      4) 73

उत्तर :- 1


3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला

      जात आहे ?

   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार

   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद

उत्तर :- 4


4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?

   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.

   2) पाणी साठयास सुरुवात होणे.

   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.

   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.

उत्तर :- 1


5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू 

     करण्यात आले ?

   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ

उत्तर :- 3


1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?

   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर :- 2


2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?

   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी

   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी

   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी

   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी

उत्तर :- 2


3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?

   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत

   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी 

     केली जाते त्यास ...................... म्हणतात.  

   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती

   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व

उत्तर :- 2


5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.

    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.

         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?

   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.

उत्तर :- 2


1) जर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती 

     पटीने वाढेल ?

   1) एकपट    2) दुप्पट      3) चारपट    4) आठपट

उत्तर :- 3


2) कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?

   1) समतल पट्टा    2) वारा प्रतिबंधक पट्टा  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


3) पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?

   अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.

   ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7 टक्के आहे.

   क) केवळ 1 टक्के ताजे पाणी मानवास उपयुक्त आहे.

   ड) सुमारे 70 टक्के ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते 

         दुरापास्त आहे.

   1) ब आणि क    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :

   अ) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया नुसार खतांचा वापर.

   ब) जमिनीमध्ये बियाण्याच्या 5 से.मी. बाजूला किंवा खाली खत देणे.

   क) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खतांचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.

   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) अ, ब, क

उत्तर :- 4

5) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात  ?

   अ) तुषार तोटयामधील अंतर    ब) पीक भूमिती

   क) संच चालवण्याच्या कालावधी    ड) वा-याची स्थिती

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) अ आणि ड    4) क आणि ड

उत्तर :- 3



1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?

   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम

उत्तर :- 1


2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?

   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन

उत्तर :- 1


3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही 

     कारण – 

   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.

   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.

   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.

   4) यापैकी काहीही नाही.

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :

   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.

   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.

   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक 

         संस्थेने खर्च करावी लागते.

   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत 

     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.  

   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

उत्तर :- 1


1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?

   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार    

   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड

उत्तर :- 2


2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?

   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.

   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड

उत्तर :- 1


3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.

   1) खार    2) उथळ व उताराच्या  

   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी

उत्तर :- 2


4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.

   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन

उत्तर :- 3


5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :

   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.

   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.

   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत

   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 3 


1) ................... पिकांसाठी ठिबक सिंचन पध्दत अतिशय उपयुक्त आहे.

   1) अधिक पाण्यामध्ये होणा-या    2) क्षारांना बळी न पडणा-या

   3) कमी उत्पन्न देणा-या      4) फळ

उत्तर :- 4


2) डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या संकलन करण्यासाठी कोणत्या 

     प्रकारचा तलाव वापरतात ?

   1) बंधा-याने बांधलेला    2) खोदलेला    

   3) पृष्ठीय      4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) केंद्रीय जल आयोग हा ......................संबंधी कार्यरत आहे.

   1) भूजल      2) पाण्याची गुणवत्ता    

   3) पृष्ठभागावरील पाणी    4) पाणी पुरवठा व स्वच्छता

उत्तर :- 3


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) धन आयन – विनिमय क्षमता मोन्टरमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते.

   ब) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोणपर्णात्सर्जन बासालीन रोखते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    

   3) दोन्ही    4) एकही नाही

उत्तर :- 1


5) समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या 

     उत्पन्ना ............................... असते ?

   1) पेक्षा अधिक    2) एवढे    

   3) पेक्षा कमी    4) पेक्षा अनिश्चित

उत्तर :- 3 


1) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?

   1) प्रजोत्पादन अवस्था    2) रोप अवस्था

   3) जोमदार शाखीय अवस्था  4) पक्वता अवस्था

उत्तर :- 1


2) पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषीविद्या विषयक कोणकोणत्या उपाय योजना आहेत ?

   अ) पिकाची निवड व जमिनीची मशागत      ब) पट्टा पेर आणि जमिनीवरचे अच्छदान

   क) समतल बांधबंधीस्‍ती आणि वनस्पतीजन्य अडथळे    ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त    

   3) अ आणि क फक्त    4) ड फक्त

उत्तर :- 1


3) ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा पुरवणी 

     सिंचन म्हणून दिले जाते त्यास .......................... असे म्हणतात.

   1) पाऊस संचयन    2) पाणी संचयन    

   3) संरक्षित सिंचन    4) सिंचन

उत्तर :- 2


4) दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास .......................... असे म्हणतात.

   1) अधेझ्न (Adhesion)      2) कोहीझन (Cohesion)    

   3) प्रतिसारण (Repulsion)    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


5) कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ................... या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.

   1) तुषार सिंचन      2) ठिबक सिंचन    

   3) सरी – वरंबा पध्दत    4) मोकाट पध्दत

उत्तर :- 2


1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.

   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी

   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व

उत्तर :- 4


2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.

   1) नत्र      2) स्फुदर      

   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2


3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला 

     ................... म्हणतात.

   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन

   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन

उत्तर :- 4


4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.

   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे

   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त

उत्तर :- 3


5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.

   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता

   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता

उत्तर :- 2


1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?

   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून

   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?

   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती

   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती

उत्तर :- 1


4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?

   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)

   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे

उत्तर :- 2


5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.

    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.

   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे

   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे

उत्तर :- 3


1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?

   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत

   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?

   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      

   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)

   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)

   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)

उत्तर :- 3


3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    

   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश

उत्तर :- 4


4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.

   1) 4.5 – 6    2) 6 – 7    

   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5

उत्तर :- 2


5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?

   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर

   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ

उत्तर :- 4


1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:

   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50

उत्तर :- 4


2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?

   1) जमीन धुपीचे परिणाम      

   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम

   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    

   4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 3


3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................

   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      

   3) >10%      4) 40% ते 45%

उत्तर :- 1


4) जमिनीचा पोत म्हणजे

   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना

   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 4


5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?

   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    

   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम

   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  

   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश

उत्तर :- 4


1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?

   1) नत्र      2) पालाश    

   3) स्फुरद    4) लोह    

उत्तर :- 3


2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?

   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%    

   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?

   1) मका    2) ज्वारी      

   3) बाजरी    4) चवळी

उत्तर :- 4


4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.

   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग

   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ

उत्तर :- 3


5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर 

     करतात?

   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग

   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व

उत्तर :- 1 


1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?

   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे

   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत

उत्तर :- 3


2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.

   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.

   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.

   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.

   1) 10      2) 15      3) 20      4) 25

उत्तर  :- 3


1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.

   1) 10-20    2) 20-30    

   3) 30-50    4) 60-75

उत्तर :- 3


2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?

   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक    

   3) जैविक    4) भस्मीकरण

उत्तर :- 2


3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?

   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.

   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.

उत्तर :- 4


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?

   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.

   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.

   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.

   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर

   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक

उत्तर :- 3  


1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे

   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल

   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड

उत्तर :- 3


2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे 

     म्हणतात.

   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप

उत्तर :- 3


3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?

   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन

उत्तर :- 1


4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.

   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.

   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता

   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)

   क) सच्छिद्रता

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 4


1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................

   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते

   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.

   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स

उत्तर :- 3


3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.

   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50

उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.

   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.

   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.

   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.

   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.

   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?

   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप

   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर

   इ) भटकी शेती

   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ

उत्तर :- 4


1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?

   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट

   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट

   इ) अविकसित प्रदेशातून सूट

    योग्य पर्याय निवडा:

   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब

उत्तर :- 4


3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.

   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.

   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा 

         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.

   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.

   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.

   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.

   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर 

         म्हणतात.

   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?

   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.

   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.

   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क

उत्तर :- 4


1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?

   1) पुणे      2) अहमदनगर    

   3) औरंगाबाद    4) लातूर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

   1) 6      2) 4      

   3) 7      4) 9

उत्तर :- 1


3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.

   1) महाड    2) वाई      

   3) महाबळेश्वर    4) नाशिक

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

   1) लोणावळा    2) चिखलदरा    

   3) महाबळेश्वर    4) माथेरान

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

   1) सांगली    2) सातारा    

   3) रायगड    4) रत्नागिरी

उत्तर :- 3


1) जोडया जुळवा.

   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल

   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी

   क) गडचिरोली    3) मँगनीज

   ड) ठाणे    4) चुनखडी

   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2

   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4

उत्तर :- 2


2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?

   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी

   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला

   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी

   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली

उत्तर :- 2


4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.

   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा

उत्तर :- 4


5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर 

     कोणते ?      

   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर

उत्तर :- 3


1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.

   1) सोलापूर    2) अहमदनगर    

   3) जालना    4) अमरावती

उत्तर :- 2


2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.

   1) रेषीय    2) जुळी      

   3) गोलाकार    4) डोंगरमाथा

उत्तर :- 4


3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास 

     .................... स्थलांतर म्हणतात.

   1) सक्तीचे    2) अंतर्गत    

   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

   1) अकोला    2) बुलढाणा    

   3) वाशिम    4) हिंगोली

उत्तर :- 1


5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.

   1) तीन    2) पाच      

   3) सात    4) नऊ

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?

   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.

   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.

   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.

   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर :- 1


2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?

   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण    

  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही

उत्तर :- 2


3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.

   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.

   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क

उत्तर :- 3


4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र

उत्तर :- 1


5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.

   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा

उत्तर :- 3 


1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.

   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास

उत्तर :- 3


2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.

   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा

उत्तर :- 3


3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे

   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर :- 2


4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?

   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.

   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.

   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.

   4) वरील कोणतेही नाही.

उत्तर :- 4


1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.

   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%

उत्तर :- 1


2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.

   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

उत्तर :- 1


3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?

   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍    

   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी

उत्तर :- 2


5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.

   1) 470 W/m²      2) 770 W/m²      

   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²

उत्तर :- 4


1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

   1) सह्याद्री    2) सातपुडा    

   3) मेळघाट    4) सातमाळा

उत्तर :- 2


5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

   1) उस्मानाबाद    2) धुळे      

   3) परभणी    4) भंडारा

उत्तर :- 2


1) कोकणचे हवामान ..................... आहे.

   1) कोरडे    2) विषम      

   3) सम      4) थंड

उत्तर :- 3


2) .................. ही वर्धा नदीची उपनदी आहे.

   1) पेनगंगा    2) भीमा      

   3) येरळा    4) पंचगंगा

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ................ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    

   3) औरंगाबाद    4) सोलापूर

उत्तर :- 2


4) पश्चिम महाराष्ट्रातील .................. जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

   1) नाशिक    2) पुणे      

   3) कोल्हापूर    4) सोलापूर

उत्तर :- 3


5) महाराष्ट्राच्या पठारावर .................. मृदा आढळते.

   1) क्षारयुक्त    2) वाळुकामय    

   3) काळी    4) जांभी

उत्तर :- 3


भूगोल प्रश्नसंच


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

१२ मार्च २०२६

भारताच्या विभाजनाबद्दल माहिती


भारताची फाळणी किती वेळा झाली?

ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा


 1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.

 2) 1904 मध्ये नेपाळ

 3) 1906 मध्ये भूतान

 4) 1907 मध्ये तिबेट

 5) 1935 मध्ये श्रीलंका

 6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.

 आणि ...

 7) 1947 मध्ये पाकिस्तान




 अखंड भारताची फाळणी:

पुर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.

 1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.

 वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.

पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:


 1) श्रीलंका:


 ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.

श्रीलंकेचे जुने नाव सिंहलद्वीप होते.

सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले.  सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. 

सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते.  श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.


 2) अफगाणिस्तान:

 अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते.

अफगाणिस्तान हा एक शैव देश होता.

महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे.

कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता.

कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते.

तो भारताचा एक भाग होता.

1876   मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.  करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.


 3) म्यानमार (बर्मा):

म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते.

1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.

प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.


 4) नेपाळ:

 नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.

भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे.

1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.

काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.

नेपाळमध्ये 81 टक्के हिंदू आणि 9% बौद्ध आहेत.


सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.

1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.


 5) थायलंड:


 थायलंडला 1393 पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.

अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.

आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.


 6) कंबोडिया:


कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे,

हा अखंड भारताचा भाग होता.

भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले.

येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे.

राष्ट्रभाषा संस्कृत होती.

कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.


जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.  मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत.

अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.


 7) व्हिएतनाम:

 व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.

अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील.

येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची.

लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.


 8) मलेशिया:

 मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.

 हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.

मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत.

मलय देशात शैव धर्म पाळला जात होता.

देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची.

येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.


 9) इंडोनेशिया:

इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे.

दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश .

तेथे हिंदू राजांचे राज्य होते.

सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते.


सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात.

१३ जानेवारी २०२६

महाराष्ट्राचा भूगोल


🔅 महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६०

🔅 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी.


🔰 महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२

🔰 महाराष्ट्राची राजधानी – मुंबई

🔰 महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर

🔰 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे

🔰 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर

🔰 महाराष्ट्राचा आकार – त्रिकोणाकृती


🌊 महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा – ७२० कि.मी. 


🔅 महाराष्ट्रातील जिल्हे – ३६

🔅 महाराष्ट्रातील तालुके – ३५८

🔅 महाराष्ट्रातील महानगरपालिका – २७

🔅 महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा – ३४


⚜️ महाराष्ट्रातील महसूल विभाग (प्रशासकीय) महाराष्ट्रातील 

    प्रादेशिक विभाग – ५

⚜️  महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग – १

 

🔰  महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार – १५८’ उत्तर ते २२ उत्तर

🔰  महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार – ७२६ पुर्व ८९’ पूर्व रेखांश


🔰 महाराष्ट्राचे स्थान – उत्तर – पूर्व गोलाधार्त आहे.

🥉 कषेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – तिसरा


🔅 कषेत्रफळानुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.३६%

🥈 भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात 

     क्रमांक – दुसरा


🔅 भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.२८%

⚜️ मबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा 

     परिषदा नाहीत.

⚜️ मबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.


⬆️ महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य – मध्यप्रदेश

⬇️ महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य – गोवा व कर्नाटक

➡️ महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य – छत्तीसगड 

↘️ महाराष्ट्रच्या आग्नेयेला असलेले राज्य – तेलंगणा

↖️ महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य – गुजरात, दादरा, नगर हवेली.


⏫  महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार

⏬ महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग

⏩ महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली

⏪ महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर


🌊 सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – ठाणे (२५km)

🌊 सर्वात जास्त समुद्रकिनारा - रत्नागिरी (२३७km)


🔰 महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा – नंदूरबार



1⃣ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग

2⃣ महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद

3⃣ महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा – नागपूर


🐿 महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरूखार

🕊 महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल

🌼 महाराष्ट्राचे राज्यपूल – ताम्हन/जाराल

🦋  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरा - ब्ल्यू मॉरमोन

🍋 महाराष्ट्राचे राज्य वृक्ष - आंबा


📚 महाराष्ट्राची राजभाषा – मराठी

🔰 महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याची लागून आहे.

🔰 महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागून आहे.


🔅 विदर्भाचे काश्मीर व नंदनवन – चिखलदरा

🔅महाराष्ट्राचे नंदनवन- महाबळेश्वर


🌧  महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे 

      ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)

⛈ महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे 

     ठिकाण – गगनबावडा (कोल्हापूर)

☁️ महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण 

    - दहीवड व म्हसवड (सातारा)

🌧 महाराष्ट्रा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य 

     जास्त पडतो.

🌦 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला किनारी भागात 

     आंबेसरी / आमसरी असे म्हणतात.

⛈ उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला पठारी भागात अवकाळी

    किंवा वळवाचा पाऊस असे म्हणतात.

 🔅 हवामान संक्रामणाचा महिना – ऑक्टोबर

⛈ महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जूलै महिन्यात पडतो.

🏔 समुद्रासपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाते..


🔅 महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा – काळी मृदा

🔅 काळ्या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकापासून होते

🔅 टिटॅनी फेरस मॅकोटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला 

      काळा रंग येतो

🔅 काळ्या मृदेला रेगूर / रेगूड / कापसाची काळी मृदा 

     असेही म्हणतात

🔅 कापूस हे रेगूर मृदेतील अतिशय महत्त्वाचे पिक आहे.


🔰 मदा व जलसंधारण आयुक्तालय – औरंगाबाद

🔰 महाराष्ट्राचे वनांखालील एकूण क्षेत्र – २०.१२%

🔰 महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्यालय – नागपूर

🌳 महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने असणारा जिल्हा – गडचिरोली

🌵महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असणारा जिल्हा – लातूर

 

🔅 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३४ क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक आहे.


जगाविषयी सामान्य ज्ञान


💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.


💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.


💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.


💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.


💠 शरीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.


💠 नपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.


💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.


💠 यशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.


💠जरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.


💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.


💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.


💠 वहॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.


💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.


💠 इग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.


💠लडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.


💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.


💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.


💠 सवित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.


💠 कनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.


💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.


💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.


💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.


💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.


💠 सवीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.


💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.


💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.


💠 नदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.


💠तर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.


💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.


💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.


💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.


💠 लडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.


💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.


💠मक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.


💠 दबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.


💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)


💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.


💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.


💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.


💠 लहासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.


💠 बकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.


💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.


💠 परिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.


💠 लडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.


💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.


💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.


💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.


💠 कनडा सर्वात लांब रस्ते.


💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.


💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.


💠 कनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.


💠 बराझील कॉफी उत्पादनात प्रथम.


💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.


💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.


💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.


💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.


💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.


💠कयुबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.


💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.


💠 मगनीज उत्पादनात रशिया प्रथम.


💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.


💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.


💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.


💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम


💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.


💠अमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.


💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.


💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.


💠इडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.


💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.


💠गरीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.


💠 बराझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.


💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.


💠इग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.


💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा


💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट


💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली


💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस


💠 वहिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.


💠 बरुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.


💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


💠 हग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.


💠 कप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.


💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.


💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.


💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.


💠नपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.


💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.


💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.


💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.


💠मबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.


💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.


💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.


💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.


💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.


💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.


💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ

जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.